Tuesday, August 25, 2020

भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी भाग १ (रत्नागिरी ते जयगड)

रत्नागिरी जिल्ह्याचा ईतिहास
येवा कोकण आपुलाच असा…… अश्या गोड कोकणातला एक मोठा जिल्हा रत्नागिरी! समुद्र लाभलेल्या जिल्हयाची शानच काही न्यारी असते. थकलेले भागलेले जीव रोजच्या राहाटगाडग्याला कंटाळुन समुद्राच्या ओढीने काही क्षण निवांत व्हायला येतात आणि समुद्राला आपल्या हृदयात साठवुन माघारी वळतात. असे हे समुद्र प्रेम! ते ज्याला कळले तो खरा भाग्यवंत!
  आणि असं समुद्राचं वैभव अनंत हस्तानं कोकणाला लाभलंय! आणि म्हणुनच पर्यटक फार मोठया संख्येने नित्य नियमाने कोकणात येतातच येतात.
रत्नागिरीला काय काय आहे? अहो काय नाही विचारा… समुद्र, निसर्ग, मासे, जहाजातली सफर, आंबे, विशेषतः कोकणचा हापुस, काजु बदाम, सुकामेवा, येथील मुर्तीकला, आकर्षक मुत्र्या, असं बरच काही अनुभवायचं असेल बघायचं असेल तर कोकण सफर करायलाच हवी.
 
    पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.
   रत्नागिरीच्या पश्चिमेला समुद्रकिनारा आणि पुर्वेला सहयाद्रीच्या पर्वतरांगा पहायला मिळतात. परशुरामाच्या आईचे नाव "कोकण्णा" होते म्हणून या प्रदेशाला कोकण नाव पडले अशी एक शक्यता तर फार पुर्वी पासून या भुमीत कोकणी आदिवासी जाती जमातीचे वास्तव्य असल्याने कोकण किंवा अपरांत असे या प्रदेशाला नाव पडले. सारी पृथ्वी दान केल्यानंतर स्वतःला रहाण्यासाठी जागा उरली नाही म्हणुन परशुरामांनी बाण मारुन सागर शंभर योजने मागे हटवला आणि कोकणची हि देवभुमी निर्माण केली असे पुराणकथा सांगते. त्याच कोकणातील एक भाग म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी या नावाबध्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत , त्यापैकी दोन पाहू.
   रतनगिरी नावाचे साधु विजापुराहून येथे आले, त्यांची समाधी रत्नदुर्ग किल्ल्यावर आहे म्हणून या गावाला रत्नागिरी नाव पडले असावे हि एक शक्यता तर
रत्नदुर्ग किल्ल्यावर देवी भगवती आहे तीने रत्नासुर नावाच्या दैत्याचा वध केला आणि ज्या डोंगरावर विसावली त्या डोंगराला रत्नदुर्ग तर परिसराला "रत्नागिरी" नाव पडले. रत्नदुर्ग हा गड बहामनी कालखंडापासून आहे तर रत्नागिरी शहरातील एतिहासिक वास्तु दोनशे ते अडीचशे वर्ष जुन्या आहेत. रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटीश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ शिवापुर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर हि चार ठिकाणे एकत्र करुन ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरी शहराचा दर्जा दिला, नंतर ते जिल्हयाचे ठिकाण बनले. मराठयांच्या इतिहासात रत्नागिरीचे आगळेवेगळे महत्व पहायला मिळते, रत्नागिरी साता.यातील राजांच्या ताब्यात सुमारे 1731 ते 1818 पर्यंत होते पण पुढे 1818 पासुन इंग्रजांनी यावर ताबा मिळवला.
रत्नागिरीत म्यानमार चे शेवटचे राजा थिबु आणि स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकरांना कैद करून ठेवले होते असे इतिहास सांगतो.
     रत्नागिरीच्या उत्तरेला रायगड जिल्हा, उत्तर पुर्वेला सातारा, पुर्वेला सांगली, दक्षिण पुर्वेला कोल्हापुर, दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि दक्षिण पश्चिमेकडुन उत्तर पश्चिमे पर्यंत अरबी समुद्र पसरलेला आहे.
रत्नागिरी जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत
  1.     रत्नागिरी
  2.     खेड
  3.     गुहागर
  4.     चिपळुण
  5.     दापोली
  6.     मंडणगड
  7.     राजापुर
  8.     लांजा
  9.     संगमेश्वर
राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 आणि क्र. 204 या जिल्हयातुन गेले आहेत. सावित्री आणि वैष्णवी या जिल्हयातील महत्वाच्या नद्या. समुद्राशी संबंधीत व्यवसाय रत्नागिरीत मोठया प्रमाणात असुन येथील अर्थव्यवस्था ब.याच प्रमाणात समुद्राशी निगडीत आहे. या ठिकाणचा हापुस आंबा फार प्रसिध्द असुन विदेशात देखील निर्यात केला जातो.
 कोकण रेल्वेचा मार्ग
नारळ, काजु, फणस, आमसुल (रातांबा) सूध्दा मुबलक प्रमाणात होतात. या ठिकाणी प्रामुख्याने तांदळाची शेती केली जाते. दापोलीचे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ प्रसिध्द असुन नवनवीन संशोधनं या ठिकाणी होत असतात. बरेच गड आणि किल्ले या जिल्हयात आजही आपल्याला पहायला मिळतात त्यातले काही महत्वाचे म्हणजे जयगड, पालगड, पूर्णगड, प्रचितगड, भवानीगड, महिपतगड, यशवंतगड, रत्नदुर्ग, विजयगड, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, गोविंदगड, जयगड हे सांगता येतील.
 रत्नागिरीला यायचे कसे ?
पुण्यातून रत्नागिरीत येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मुळशीमार्गे ताम्हिणी घाटातून आल्यास रत्नागिरीच्या उत्तर टोकाकडे म्हणजे मंडणगड, दापोलीमध्ये येता येते. तिथून खेडला येता येते. दापोलीतून सागरी महामार्गानेही रत्नागिरीत येता येते. भोरमार्गे वरंधा घाटातून, तसेच वाई-महाबळेश्वरमार्गे पोलादपूर घाटातून आल्यास खेडमध्ये येता येते. सातारा-पाटण मार्गे कुंभार्ली घाटातून उतरून चिपळूणला येता येते. चिपळूण किंवा खेडला आल्यावर मुंबई-गोवा महामार्गाने रत्नागिरीत येता येते. या मार्गांवरही अनेक पर्यटनस्थळे आहेत. पुण्यातून रत्नागिरीचे अंतर सुमारे ३०० किलोमीटर आहे.
    मुंबईवरून मुंबई-गोवा महामार्गाने पनवेल, वडखळ, माणगाव, खेड, परशुराम, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या मार्गाने रत्नागिरीत येता येते. हे अंतर सुमारे ३५० किलोमीटर आहे. 
   गोव्याकडून यायचे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, खारेपाटण, तळेरे ही छोटी शहरे ओलांडून रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात येता येते. तसेच पुढे येऊन लांजा तालुक्यानंतर रत्नागिरी तालुला लागतो. हे अंतर सुमारे २४० किलोमीटर आहे.
   कोल्हापूरवरून रत्नागिरी हे अंतर केवळ १३० किलोमीटर असून, या मार्गावरही एसटी बसेसची सेवा उपलब्ध आहे.
    कोकण रेल्वे हादेखील रत्नागिरीत येण्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. पनवेल-रोह्यापासून हा मार्ग कोकणात येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, अंजनी, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, राजापूर रोड ही रेल्वेस्थानके या मार्गावर आहेत. कोकण रेल्वेमार्गाने प्रवास म्हणजे पर्यटनाचा मनमुराद आनंद. आता पुण्याहून सुटणारी एर्नाकुलम गाडीही आठवड्यातून दोनदा कोकण रेल्वेमार्गावरून जाते. त्यामुळे पुणेकरांनाही हा पर्याय उपलब्ध झाला आहे.
    रत्नागिरी जिल्ह्याला जवळ असलेले विमानतळ म्हणजे मुंबई आणि गोवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले असून, लवकरच तो वाहतुकीला खुला होणार आहे. तसेच, नजीकच्या भविष्यात ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरीतील विमानतळही कार्यान्वित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे हवाईमार्गेही कोकणात येणे सोपे होणार आहे.
रत्नागिरीचा महत्वाचा व्यवसाय मासेमारी आहे. रत्नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसलेले शहर असुन भारतातील एक महत्वाचे बंदर आहे. स्वातंत्र्य लढयात ज्यांचे योगदान महत्वाचे होते असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे, शिक्षणतज्ञ समाजसेवक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरीचाच. भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे मुळात रत्नागिरी जिल्हयातलेच!
     रत्नागिरी शहरातील एके एक पर्यटन स्थळाची माहिती घेउया.
 थिबा राजवाडा  
   ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचे वास्तव्य असलेला ‘थिबा पॅलेस’  हा भव्य ऐतिहासिक राजवाडा रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. इ.स. १८८५ सालापासून म्हणजे सुमारे १३२ वर्षांपासून रत्नागिरीची नाळ ब्रह्मदेशाशी म्हणजेच आताच्या ‘म्यानमारशी’ जोडलेली आहे.
थिबा राजाने ब्रह्मदेशावर सात वर्षे राज्य केले व असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. त्या वेळच्या ब्रह्मदेशावर इंग्रजांनी कब्जा मिळवून तिथे सात वर्षे राज्य करणाऱ्या थिबा राजाचा सगळा मुलुख आपल्या ताब्यात घेतला.  ' थिबा ' हा ब्रह्मदेशाचा शेवटचा राजा. ब्रह्मदेशाचे राजे ' मिडॉन ' यांच्या ४६ पुत्रांपैकी हा एक . थिबा हा एक धार्मिक प्रवृत्तीचा बौद्ध धर्मीय , सरळमार्गी राजकुमार होता . त्यामुळे त्यास आर्थिक व्यवहार कधी जमलाच नाही.
मिडॉन राजाच्याअनेक राण्यांपैकी राणी 'अलनंदा ' ही अत्यंत महत्वाकांक्षी होती. संपूर्ण ब्रह्मदेशाची सत्ता फक्त आपल्याच हातात असावी, या साठी आपल्या तालावर चालणारा राजा असावा, म्हणून थिबा हाच राजा होणे तिला इष्ट वाटत होते.हे उद्दिष्ट समोर ठेवून, ते साध्य करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने कट रचून तिने इतर राजकुमारांची हत्या करविली. त्यातून जे राजकुमार वाचले, त्यांना तिने राज्याबाहेर पळवून लावले, आणि थिबास राज्याभिषेक करुन राज्यकारभार स्विकारण्यास भाग पाडले.
 
त्यानंतर तिने आपल्या दोन कन्या ' सुपायग्वी ' व ' सुपायलती ' , म्हणजेच थिबाच्या सावत्र बहिणी यांच्याशी त्याचा विवाह लावून दिला.एवढा आटापिटा करुनही ब्रह्मदेशाची सत्ता आपल्याच हातात ठेवण्याचा राणी अलनंदा हिचा हेतू तिचीच महत्वाकांक्षी कन्या सुपायलती हिने धुळीस मिळवला. तिने आपली आई अलनंदा हिस राज्याबाहेर हुसकावून लावून , स्वत:स ' महाराणी ' म्हणून घोषित केले. थिबावर तिची पकड पहिल्यापासूनच असल्यामुळे , थिबाच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णयही ती स्वत:च घेऊ लागली. थिबाच्या राज्यकारभारात नको तितकी ढवळाढवळ केल्याची शिक्षा तिला, थिबाला आणि पर्यायाने संपूर्ण ब्रह्मदेशालाच भोगावी लागली.
सुपायलतीच्या कुटिल कारवायांमुळे राजा थिबा ब्रिटिशांच्या रोषाला कारणीभूत ठरला , आणि ब्रिटिशांनी ब्रह्मदेशावर आक्रमण करुन, थिबाचा पराभव करून त्यास अटक केली.२८ नोव्हेंबर, १८८५ ही रात्र ब्रह्मदेशाच्या इतिहासातील पहिली पारतंत्र्याची रात्र ठरली.
ब्रिटिशांनी थिबा व त्याच्या कुटुंबियांना ' कॅलिन ' बोटीने १५ डिसेंबर,१८८५ रोजी मद्रास येथे आणले. आणि तेथून पुढे रत्नागिरी येथे आणले. थिबास प्रथम रत्नागिरीला अक्कलकोटचे दिवाण रावबहादूर सुर्वे व रावबहादूर विष्णू फडके यांचे बंगले भाड्याने घेऊन तेथे ठेवले. परंतु काही वर्षांनंतर त्यांना ती निवासस्थाने अपुरी पडु लागल्याने, थिबाच्या पसंतीने ब्रिटिशांनी या ' Palace ' चे बांधकाम १९०६ साली सुरु केले. सुमारे सत्तावीस एकर आणि साडेअकरा गुंठ्यांच्या विस्तीर्ण जागेवर त्याकाळात एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून हा प्रशस्त, ब्राह्मी पद्धतीचा, तीन मजली राजवाडा थिबा राजा व त्याच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यासाठी रत्नागिरीतील सड्यावर म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर भागांत बांधला गेला.१३नोव्हेंबर, १९१० रोजी थिबा या राजवाड्यात रहायला आला.    रत्नागिरीत राजा आणि त्यांचे कुटुंब ३१ वर्ष ब्रिटिश शासनाच्या नजरकैदेत राहिले. नवीन बांधलेल्या राजवाड्यात नोव्हेंबर १९१० मध्ये गृहप्रवेश करताना म्यानमार वरून पाच बौद्ध भिक्खूंना बोलविण्यात आले होते. बौद्ध पद्धतीने विधी झाल्यावर थिबा राजे भावूक झाले. दुःख सहन करण्याची सहनशीलता कुटुंबाला प्राप्त व्हावी यासाठी भिक्खूंकडे त्यांनी आशीर्वाद मागितला.
याच राजवाड्यात ब्रिटिशांनी थिबाला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नजरकैदेत ठेवले. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत राजा थिबाला अशी आशा वाटत असे की, आपले एकनिष्ठ सैनिक आपला शोध घेत घेत एक ना एक दिवस रत्नागिरीस नक्की पोहचतील, आणि ब्रिटिशांच्या तावडीतून आपली निश्चित सुटका करतील. या वेड्या आशेपोटी आपल्या खोलीच्या खिडकीतून समुद्राच्या दिशेने , तासनतास आपली नजर लावून, आपलली सुटका करण्यासाठी येत असलेल्या सैनिकांनी भरलेल्या जहाजांची वाट पाहत बसत असे. याच ठिकाणी वयाच्या ५८व्या वर्षी, १६ डिसेंबर १९१६ रोजी थिबाने आपल्या आयुष्यातील अखेरचा श्वास घेतला.
 
थिबा राजाला एकूण चार मुली होत्या. भारतात आल्यावर त्या चारी मुलींचे शिक्षण काही योग्य झाले नाही. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी फिया ही राजवाड्यात सेवेत असलेल्या गोपाळ सावंत नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. तिला त्याच्यापासून २६ नोव्हेंबर १९०६ रोजी मुलगी झाली. तिचे नाव टुटू होते. पाहिले महायुद्ध चालू असतानाच थिबा राजे यांचे १९१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर ब्रिटिशांनी ब्रम्हदेशाच्या या राजघराण्याला मायदेशी जाण्याची परवानगी दिली. सर्वजण म्यानमारला गेले. पण थोड्याच दिवसांनी फिया आपली मुलगी टुटूला घेऊन रत्नागिरीला परत आली. व तेथेच आयुष्यभर राहिली. ३ जून १९४७ रोजी तिचे निधन झाले. तिची मुलगी टुटूने शंकर पवार यांचेशी लग्न केले. तिला ४ मुली आणि ७ मुलगे झाले. २४ ऑक्टोबर २००० मध्ये टुटू सुद्धा गेली. १६ डिसेंबर २०१६ मध्ये थिबा राजांना जाऊन शंभर वर्षे झाली. त्या स्मृतिदिनी दिवशी म्यानमारचे उपराष्ट्रपती यु मंत स्यू आणि सैन्यदल प्रमुख यांनी रत्नागिरीला येवून थिबा राजाच्या समाधीला भेट दिली. त्यावेळी टुटूच्या सर्व मुलांची आणि म्यानमारवरून आलेल्या सर्व नातेवाईकांची गळाभेट झाली.  थिबा राजाचे म्यानमारमधील वंशज आज उच्चशिक्षित आहेत. मात्र रत्नागिरीतील त्यांचे वंशज मोलमजुरी करीत आहेत.
  
 
 
 
 अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या `थिबा पॅलेस` मधे तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरून समोरच्या सागराचे अथांग दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या पट्ट्या लावल्या असून, खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत.
राजवाड्याच्या आतील भागात पुरातन वस्तू संग्रहालय आहे. तळमजल्यावर असलेल्या प्राचीन मूर्ती सुंदर असून अनेक कलारसिकांसाठी वरच्या मजल्यावरीलं चित्रप्रदर्शनाचं नेहेमीच आकर्षण राहिलं आहे. सोमवार सोडून इतर दिवशी ‘थिबा पॅलेस’ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.
थिबा पॉइंट : थिबा पॅलेसजवळ असलेल्या या ठिकाणाहून भाट्ये खाडी आणि जवळपासच्या ठिकाणांचे सुंदर दृश्य दिसते. थिबा राजा या ठिकाणी बसून मायदेशाची आठवण काढत समुद्र पाहत असायचा. इथून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते. येथे आता उद्यान विकसित करण्यात आले असून, जवळच जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने आहेत.
 
  थिबा पॉइंटवरील उद्यान
 इथून जवळच असलेल्या `थिबा पॉईंट` जवळ आता जिजामाता गाडर्न उभं आहे. या ठिकाणावरून मोठं सुंदर दृश्य दिसतं. अस्ताला जाणारा सूर्य बघण्यासाठी इथे नेहमीच गर्दी असते. सूर्याचे नारिंगी बिंब क्षितीजाआड जात असताना त्या पार्श्वभूमीवर भाट्ये खाडी, राजिवडा बंदर, समुद्र व उंच भगवती किल्ला खूप सुंदर दिसतो. मनाला हे वातावरण सुखावत असताना आतमधे नकळत कुठेतरी तो दुर्दैवी थिबा राजा आठवत राहातो. 
थिबा पॉइंटवरून दिसणारे विहंगम दृश्य. समोर भाट्ये खाडी, त्यावरील पूल आणि पलीकडे रत्नदुर्ग किल्ल्यावरील दीपगृह
श्री देव भैरी : ही रत्नागिरीची ग्रामदेवता आहे. खालच्या आळीमध्ये हे देऊळ असून साधारण ३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असावे. मंदिर परिसरात जुगाई देवी, तृणबिंदgकेश्वर, जंबुकेश्वर पंचायतन, गणपती, विष्णू, हरतालिका, सूर्यनारायण यांच्या मूर्तीही दिसून येतात. गुजरातमधील काही लोक येथे येऊन राहिले होते. त्यांनी श्री भैरी व विठ्ठल मंदिर बांधले.
अठरा हातांचा गणपती : श्री. जोशी यांच्या मालकीच्या खासगी मंदिरातील ही वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आहे. गणपतीच्या हातांत अठरा शस्त्रे दाखविले आहेत. हे मंदिर फाटक हायस्कूलजवळ आहे. 
सत्यनारायण मंदिर : सत्यनारायणाच्या पूजा घरोघर होतात; पण सत्यनारायण मंदिर कुठेच दिसत नाही. येथील परटवणे भागात श्री समर्थ चंद्रशेखरस्वामी यांनी सन १९१६मध्ये हे मंदिर स्थापन केले. या मंदिरात इतरही अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. दोन मुखे, तीन पाय व सात हात असलेली ही मूर्ती चुलीचे प्रतीक आहे. या मंदिराजवळच भार्गवरामाचे ३०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. येथील मूर्ती बैठ्या स्वरूपात आहेत.
काशीविश्वेश्वर मंदिर : राजिवडा बंदराजवळ हे मंदिर आहे. हे सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे मंदिर असावे. या ठिकाणी पूर्वी जंगल व स्मशान होते. स्थानिक लोकांकडून सांगितल्या जाणाऱ्या कथेप्रमाणे, एक अपरिचित साधुपुरुष येथे येऊन राहिले होते. तेथील पठारावरील एका शिळेवर एक गाय पान्हा सोडीत असे. तेथे साधूमहाराजांच्या सांगण्यावरून खोदाई केली असता पाण्याचे कारंजे उडाले व अधिक खोदाई केली असता शिवलिंग सापडले. तेथेच कोरून सभागृह करण्यात आले व शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. साधूमहाराज नंतर अदृश्य झाले. हेच ठिकाण काशीविश्वेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. येथून भाट्ये खाडीचे सुंदर दृश्य दिसते.
काळबादेवी मंदिर : मिऱ्या बंदराच्या पुढे काळबादेवी गावामध्ये (पुसाळे) देव रामेश्वर व काळबादेवी ही दोन मंदिरे आहेत. येथे काळ्या पाषाणातील काळबादेवीची मूर्ती आहे. शेजारीच तटबंदी असलेले रामेश्वर मंदिर आहे. येथे पोर्तुगीज घंटा असून, तिचे वजन १५० किलो आहे. ही घंटा सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी पाठवली आहे. विसाजीपंत लेले यांनी ती उंटावरून येथे आणली. जवळच हसनपीर दर्गा असून, त्याच्या पूजेचा पहिला मान हिंदूंना आहे. येथील किनारा खूपच सुंदर आहे. येथे हंगामामध्ये सीगल पक्षी येतात.
रत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी
रत्नागिरी शहरात रत्नागिरी बंदराजवळ रत्नदुर्ग किंवा भगवती किल्ला १२व्या शतकापासून उभा आहे. रत्नागिरीच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर सुमारे १२११ मीटर लांब व ९१७ मीटर रुंद असणारा हा अवाढव्य किल्ला १२० एकरांवर पसरला आहे. त्याच्या बालेकिल्ल्याला ९ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण २९ बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह असल्याने हा परिसर खूपच नयनरम्य दिसतो. पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर असलेला रत्नदुर्ग चढायला सोपा असून वाहनमार्ग थेट भगवतीच्या मंदिरापर्यंत जातो.
रत्नदुर्ग किल्ल्याचा दुसरा भाग म्हणे दीपगृह. किल्ल्याच्या उजवीकडचा उतार थेट कोळी वस्तीतून भगवती बंदराकडे जातो, तर डावीकडचा रस्ता थेट दीपगृहाकडे जातो. या रस्त्यावर डाव्या हाताला एका छोट्या घुमटीत रतनगिरी बाबांची समाधी आहे व त्यांच्यावरून या किल्ल्याला रत्नदुर्ग हे नाव पडले असावे असे स्थानिक सांगतात. दीपगृहावर जाण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. दीपगृहाशेजारील बुरुजावर चार तोफा ठेवल्या असून त्यापैकी दोन तोफा ४ फूट लांबीच्या तर दोन तोफा अंदाजे १२ फूट लांबीच्या आहेत.
हे दीपगृह बघायला रुपये १०/- ( दहा फक्त ) फि आहे तर कॅमेरा फि रुपये २५/- आहे.
गडाचा तिसरा भाग म्हणजे भगवती देवीचे मंदिर. गडाच्या या बालेकिल्ल्यात नूतनीकरण केलेली भक्कम तटबंदी असून त्यात अकरा बुरुज बांधलेले आहेत. गडाचा हा परिसर समुद्रापासून सुमारे २०० फूट उंचीवर आहे. मंदिरापर्यंत गाडीने जाता येते व तिथून पायऱ्या चढून दरवाजाजवळ पोहोचता येते. भगवती मंदिराचा परिसर ही गडावरील सगळ्यात मोठी वास्तू असून मंदिर परिसराचा दरवाजा सकाळी ८ ते संध्या.६ वाजेपर्यंत उघडा असतो.
रत्नदुर्ग हा बहमनी काळात बांधला गेला आहे. त्यानंतर पुढे इ.स.१६६० पर्यंत तो आदिलशाहीत होता. १६७० च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी कोकणातील अनेक किल्ले स्वराज्यात आणले त्याचबरोबर हा किल्लादेखील स्वराज्यात सामील झाला. १७५५ मधे रत्नदुर्ग आंग्रें यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. १९५० मधे भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन १९८९ मधे या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. अनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्यावर एखाद्या जाणकार बुजुर्गाला भेटल्याची अनुभूती आपल्याला येते. हा किल्ला त्याच्या उंचीवरून दिसणाऱ्या मोहक परिसरासाठी तेवढाच प्रसिद्ध आहे.

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

भारतीय असंतोषाचे जनक अशी बिरुदावली धारण करणारे स्वातंत्र्यसंग्रामाचे अध्वर्यू लोकमान्य टिळक यांचा दीडशे वर्षांपूर्वी १८५६ मधे रत्नागिरीत जन्म झाला. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक आळीत हे टुमदार कोकणी घर असून जन्मानंतर लो. टिळकांचे या घरांत सुमारे १० वर्षे वास्तव्य होते.
टिळकांचे मूळ गाव दापोलीतील चिखलगाव हे होते. त्यावेळी लोकमान्यांचे वडील रत्नागिरीत शिक्षक म्हणून कामाला होते. इंदिराबाई गोरे यांच्या मूळच्या घरांत टिळक कुटुंब भाड्याने राहात होते. रत्नागिरीतील टिळकजन्माची ही वास्तू महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याने जतन केली असून, तिला स्मारक म्हणून घोषित केले आहे.
बाल गंगाधर टिळकांचे काही वैयक्तिक सामान जसे की पगडी, उपर्णा आणि पेन येथे काही जुन्या फोटोंसह प्रदर्शन देखील आहेत. दुर्दैवाने, पर्यटक हे ठिकाण वगळतात परंतु अशा ठिकाणी जरुर भेट द्या.
सोमवार वगळता अन्य दिवशी हे स्मारक पर्यटकांसाठी खुले असते. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान आठवत या नरकेसरीच्या स्मृतीस्मारकातून केलेली भटकंती नक्कीच स्फूर्तिदायी ठरते.
बाहेरील आवारात लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. दरवर्षी या ठिकाणी टिळक जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक

प्रखर क्रांतिकारक, सेनानी, विचारवंत, प्रभावी लेखक व कवी अशा अनेक बिरुदावली मिरविणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरीचं एक अनमोल रत्न. रत्नागिरी शहरातील पतितपावन मंदिराच्या परिसरांत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे हे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आले आहे.
या स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर ‘गाथा बलिदानाची’ ही प्रदर्शनी असून १८५७ च्या स्वातंत्र्य समरापासून ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा स्फूर्तिदायी,  त्यागमय व तेजस्वी इतिहास दालनांमधून मांडण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुले, त्यांची काठी, जंबिया, व्यायामाचे मुद्गल अशा अनेक गोष्टी पाहून बाहू स्फूरण पावतात.
मार्सेलीस बंदरावर ज्या बोटीतून सावरकरांनी मायभूमीच्या ओढीने समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली, त्या ‘मारिया’ बोटीची प्रतिकृती इथे ठेवली आहे. तळमजल्यावरील सभागृहात माहितीपटांद्वारे सर्वांना थोर नररत्ने व इतरही अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते. या स्मारकाला स.१० ते १२ व सायं ४ ते ६ या वेळेत भेट देता येते.
रत्नागिरीतील प्रेरणादायी सावरकर स्मृतितीर्थ
सावरकरांना पन्नास वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना १३ मार्च १९१० रोजी अटक झाली. त्यांना प्रारंभी अंदमानला ठेवण्यात आले. सावरकर पंधरा वर्षे दोन महिने दहा दिवस प्रत्यक्ष कारागृहात होते, तर तेरा वर्षे चार महिने स्थानबद्धतेत होते. त्यांची १० मे १९३७ रोजी स्थानबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता करण्यात आली. सावरकरांना २४ डिसेंबर १९१० रोजी पंचवीस वर्षांची पहिली, तर ३१ जानेवारी १९११ रोजी पुन्हा पंचवीस वर्षांची दुसरी अशी एकूण ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर चार जुलै १९११ रोजी त्यांचा अंदमानमधील कारावास सुरू झाला. अंदमान येथील कारागृहात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्यांना प्रथम मद्रास आणि नंतर रत्नागिरीच्या विशेष कारागृहात १६ मे १९२१ रोजी हलविण्यात आले.
येथे सावरकरांना दोन वर्षे ठेवण्यात आले होते. पायात दंडा बेडी, अंगावर कुडता आणि ‘पन्नास वर्षे बंदीचा, १९६० साली सुटका’ असे लिहिलेला कथलाचा बिल्ला घालून सावरकर यांना येथे ठेवले होते.रत्नागिरीत त्यांना २३ सप्टेंबर १९२३पर्यंत ठेवण्यात आले होते. पुढे त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहात पाठविण्यात आले, तर सहा जानेवारी १९२४पासून रत्नागिरीतच स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. स्थानबद्धतेच्या संपूर्ण काळात ते रत्नागिरीतच होते.
 
रत्नागिरीतील कारावास आणि स्थानबद्धतेच्या प्रदीर्घ काळात सावरकरांनी केलेले कार्यच आता रत्नागिरीची ओळख झाली आहे.
सावरकरांच्या आठवणी सांगणाऱ्या अनेक वास्तू रत्नागिरीत आहेत; मात्र दोन स्मारके सर्वांत महत्त्वाची आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे स्मारक म्हणजे विशेष कारागृह आणि दुसरे म्हणजे त्यांनी सामाजिक समरसतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून स्थापन केलेले पतितपावन मंदिर. पोर्तुगीजांनी दारूगोळा ठेवण्यासाठी १८३४ साली रत्नागिरीत एक इमारत बांधली. एका करारानुसार ही इमारत ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी १८५३मध्ये कारागृहात रूपांतरित केली. सोळा एकर परिसरात कारागृहाच्या सर्व इमारती उभ्या आहेत. अंदमानप्रमाणेच त्या काळी रत्नागिरी हा अत्यंत दुर्गम भाग होता. पश्चि मेला विस्तीर्ण अरबी समुद्र, तर पूर्व आणि दक्षिणोत्तर भागातून रत्नागिरीला थेट येणाऱ्या रस्त्यांची वानवा तेव्हा होती. सहजपणे रत्नागिरीत येणे तेव्हा शक्य नव्हते. त्यामुळेच ब्रह्मदेशचा थिबा राजा किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या कैद्यांना ठेवण्यासाठी ब्रिटिशांच्या दृष्टीने ही अत्यंत उत्तम आणि सुरक्षित जागा होती. देशभरातील कुख्यात आणि खतरनाक गुन्हेगारांना या कारागृहात ठेवले जात असल्याने या कारागृहाला विशेष कारागृहाचा दर्जा देण्यात आला. या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रशासकीय इमारतीच्या वरच्या मजल्यावर स्वतंत्रपणे ठेवण्यात आले होते. अन्य कैद्यांशी त्यांचा संपर्क येऊ नये, अशी खबरदारी घेण्यात आली होती. शिवाय कारागृहावर कोठूनही हल्ला झालाच, तरी ती प्रशासकीय इमारत असल्याने तेथे पुरेसा कडक बंदोबस्तही होता. त्यामुळे सावरकर पळून जाण्याची किंवा त्यांना कोणी सोडवून घेऊन जाण्याची शक्यता नव्हती. कारागृहातही त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी लागली, एवढा ब्रिटिशांना सावरकरांचा धसका होता.
 
अर्थातच ती खोली अत्यंत लहान म्हणजे ६.५ फूट बाय ८.५ फूट एवढ्याच आकाराची होती. तेथेच त्यांना कायम राहावे लागत होते. प्रातर्विधीही तेथेच उरकावे लागत असत. (मुळशी सत्याग्रहातील अग्रणी पांडुरंग महादेव ऊर्फ सेनापती बापट यांनाही याच कारागृहात २४ नोव्हेंबर १९३१ ते ३१ डिसेंबर १९३५ या काळात ठेवण्यात आले होते; मात्र त्यांना कारागृहात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले नव्हते. अन्य कैद्यांसाठी असलेल्या विभागातच त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. कारण ते ब्रिटिशांच्या दृष्टीने खतरनाक गुन्हेगार नव्हते.) सध्या त्या खोलीत सावरकरांच्या गळ्यात अडकवण्यात आलेले साखळदंड, बेड्या, लोहगोळे इत्यादी वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत.
 
ती खोली आणि त्याच्या बाहेरचा भाग स्वातंत्र्यवीरांचे स्मारक म्हणून जतन करून ठेवण्यात आला आहे. स्मारक म्हणून या कक्षाची घोषणा झाल्यानंतर चरित्रकार धनंजय कीर यांच्या हस्ते १९८३ साली कोठडीत सावरकरांची स्मृती म्हणून ठेवलेल्या भव्य तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
डिसेंबर २०१७मध्ये तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या कारागृहाला आणि सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. या कोठडीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी कोठडीचे सुशोभीकरण करण्याची आणि कोठडीला लागूनच स्वातंत्र्यवीरांचे जाज्वल्य संघर्ष दाखविणारे चित्र प्रदर्शन उभारण्याची सूचना कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांना केली. श्री. देशमुख यांनीदेखील या सूचनेला केवळ वरिष्ठांचे आदेश न मानता डॉ. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मनोभावे काम केले. तुरुंगाधिकारी वर्ग एक आणि दोनचे श्री. कांबळे आणि अमेय पोतदार यांनी कसून मेहनत घेतली. सावरकरांचा इतिहास जिवंत करणारी छायाचित्रे, चित्रे लावण्यासाठी अनेकांची मदत झाली. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे संचालक आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी या कारागृहाला भेट दिली होती. त्यांनी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन तर दिलेच; पण प्रत्यक्ष मदतही केली. पुण्यातील इतिहास अभ्यासक नितीन शास्त्री यांचीही मोठी मदत झाली. त्यांच्या संग्रहातून सुमारे ७५० चित्रे मिळाली. त्यापैकी २०० चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. सावरकरांचा कुटुंबवृक्ष, त्यांच्या काळातील, तसेच भारतीय स्वातंत्र्यातील सशस्त्र क्रांतिकारकांची माहिती, चित्रे, तसेच प्रसिद्ध नसलेल्या अनेक क्रांतिकारांच्या चित्रांचाही त्यात समावेश आहे. २८ मे हा स्वातंत्र्यवीरांचा जन्मदिन! त्याचे औचित्य साधून २८ मे २०१८ रोजी रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आज आपण कोठडीला भेट दिली, की आपले मन भक्तिभावाने, देशप्रेमाने आपसूकच भारून जाते. चित्रमय, आकर्षक, भव्य प्रदर्शन आपल्या डोळ्यांसमोर स्वातंत्र्यवीरांचा सर्व संघर्ष जिवंत उभा करते. याबरोबरच मोठा गट आल्यास भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनने स्वातंत्र्यवीरांच्या जीवनकार्यावर निर्माण केलेला सुमारे पाऊण तासाचा माहितीपट पाहण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या प्रेरणादायी स्मारकाला रत्नागिरीला येणाऱ्या नागरिकांनीच नव्हे, तर तर देश-विदेशातील देशप्रेमी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मुद्दाम येऊन भेट दिली पाहिजे, असे हे स्मारक आहे.
साकारण्यात आलेल्या या नव्या व्यवस्थेची दखल कारागृह विभागाच्या विशेष पोलीस निरीक्षकांनीही घेतली. यापूर्वी केवळ वारसा म्हणून सावरकरांची कोठडी जतन करण्यात आली होती. तिचे सावरकरांची स्मृती वास्तू म्हणून रूपांतर करण्यासाठी कारागृहाचे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा विशेष पोलीस निरीक्षक श्री. राजवर्धन यांनी केली. तसे प्रशंसापत्र त्यांनी गेल्या १६ जानेवारीला अधिकाऱ्यांना दिले आहे. हीसुद्धा कौतुकाची बाब आहे.
गोपनीय दस्तऐवज
जानेवारी २०१८मध्ये कारागृहात झालेल्या बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी क्रांतिकारकांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या कारागृहाबाबत विशेष आस्था दाखवून जुन्या कागदपत्रांची माहिती घेण्याची सूचना केली होती. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यासाठी कारागृहात चार ते पाच तास ठाण मांडून या कागदपत्रांची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. या वेळी १९०८पासूनची काही गोपनीय कागदपत्रे हाती लागली. वीर सावरकर आणि सेनापती बापट यांच्याबरोबरच कराचीचे क्रांतिकारक स्वामी गोविंदानंददेखील रत्नागिरीच्या कारागृहात होते. या तीन क्रांतिकारकांच्या कारागृहातील वास्तव्यादरम्यानच्या गोपनीय कागदपत्रांचा ऐतिहासिक खजिना कारागृह प्रशासनाच्या हाती लागला. शंभर वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक कागदपत्रे म्हणजे इतिहास महत्त्वाचा ठेवा ठरणार असून, त्यात महात्मा गांधींनी सेनापती बापट यांना पाठवलेली तार व अन्य पत्रांचाही समावेश आहे. ११० वर्षांपूर्वीची कागदपत्रे आजही सुस्थितीत आहेत. ही कागदपत्रे लोकांनाही पाहण्यासाठी खुली व्हावीत, यासाठी शासनाची विशेष परवानगी घेण्यात येणार आहे; मात्र सध्या तरी ही कागदपत्रे जनतेसाठी गोपनीयच राहणार आहेत. या कागदपत्रांची पाहणी व अभ्यास करता यावा यासाठीचा एक परिपूर्ण प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. रत्नागिरी कारागृहातील शिक्षेदरम्यान सावरकरांनी कमला महाकाव्य, सन्यस्त खड्ग हे नाटक, तसेच अन्य साहित्यही लिहिले. तसेच अनेक कविता त्यांनी लिहिल्याचे समोर येत आहे. त्यांच्या कवितांची सर्व हस्तलिखिते अद्याप प्रशासनाच्या हाती लागलेली नसली, तरी त्याचा शोध सुरू आहे. अंदमान येथून दोन मे १९२१ रोजी प्रथम अलीपूरच्या तुरुंगात काही दिवस ठेवल्यानंतर सावरकरांना १६ मे १९२१ रोजी रात्री साडेनऊ वाजता गोपनीयरीत्या रत्नागिरीच्या विशेष कारागृहात आणले गेले होते. यासंबंधीची कागदपत्रेही यामध्ये आढळली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इतर कैद्यांना जेलमध्ये बाहेरचे अन्न, लेखन साहित्य, कपड्यांसाठी परवानगी दिली जात असताना सावरकर यांनाही तशी परवानगी नाकारण्यात आली नव्हती, ही बाबही या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. अंदमान कारागृहात सावरकरांना या सर्व सुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे रत्नागिरी कारागृहातही या गोष्टींना अनुमती मिळावी, यासाठी सावरकरांनी कारागृह महानिरीक्षकांना कारागृह अधीक्षकांमार्फत लिहिलेले पत्र या कागदपत्रांमध्ये सापडले आहे.
सावरकरांना दिवसभर हातमाग यंत्रावर काम करावे लागत होते. या कामाची नोंद असलेली व त्यांची वैयक्तिक माहिती असलेली कागदपत्रेही यामध्ये आढळली आहेत. सावरकरांचे बंधू त्यांना भेटण्यासाठी कारागृहात आले होते, याची नोंद असलेले कागदपत्रदेखील सापडलेली आहेत. सावरकरांना तीन सप्टेंबर १९२३ रोजी रत्नागिरी येथून येरवडा कारागृहात हलविण्यात आले. या वेळी सावरकरांना नेण्यासाठी एका कर्नलची नेमणूक करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यांना ॲम्बेसॅडर कारने येरवड्याला रवाना करण्यात आले होते, अशी महत्त्वपूर्ण माहिती व त्या कारचा कममांक असलेली कागदपत्रेही आढळली आहेत.
 
पतितपावन मंदिर आणि सावरकर स्मारक
रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर पुरातन आहे. राजस्थानातून आलेल्या गुजर कुटुंबीयांनी हे मंदिर बांधले. मुमय मंदिराभोवती इतर देवदेवतांची मंदिरे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता. विठ्ठल मंदिरातील सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निश्चय सावरकरांनी केला. दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या मदतीने तेव्हा तीन लाख रुपये खर्चून हे मंदिर स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी बांधले. बहुजन समाजासाठी हे मंदिर खुले करण्यात आले आणि त्यांना पूजा-प्रार्थनेचा समान अधिकार देण्यात आला. सामाजिक समतेचा एक अध्याय सुरू करणाऱ्या या पतितपावन मंदिराचे उद्घाटन २२ फेब्रुवारी १९३१ रोजी करण्यात आले. हे मंदिर म्हणजे सावरकरांचे स्मारक आहेच; पण त्याच मंदिराच्या परिसरात सावरकरांचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर गाथा बलिदानाची हे प्रदर्शन असून १८५७च्या स्वातंत्र्यसमरापासून ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा स्फूर्तिदायी, त्यागमय व तेजस्वी इतिहास तेथे मांडण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुले, त्यांची काठी, जंबिया, व्यायामाचे मुद्गल, सावरकारांची काठी, त्यांचा चष्मा, त्यांच्या जवळ असणारा जंबिया अशा अनेक गोष्टी तेथे प्रेरणा देत आहेत. मार्सेलिस बंदरावर ज्या बोटीतून सावरकरांनी मायभूमीच्या ओढीने समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली, त्या मोरिया बोटीची प्रतिकृती तेथे ठेवली आहे. तळमजल्यावरील सभागृहात माहितीपटांद्वारे सर्वांना थोर नररत्ने व इतरही अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते. या स्मारकाला सकाळी साडेदहा ते दुपारी १२ आणि सायंकाळी साडेतीन ते साडेपाच या वेळेत भेट देता येते.

मत्स्यालय

रत्नागिरी शहरात डॉ. बाबासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या अधिपत्याखालील मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे.
येथे खाऱ्या व गोड्या पाण्यातील विविध प्रकारचे मासे व इतर जलचर यांचे संग्रहालय आहे.
घोडमासा, कोंबडामासा, ट्रिगरमासा, समुद्री काकडी, शेवंड, तारामासा, ऑक्टोपस, समुद्री कासवे, समुद्री साप अशा अनेक नमुन्यांबरोबरच सुमारे १३०० समुद्री जिवांचे नमुने असलेले हे मत्स्यालय पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचेही आकर्षण ठरले आहे. त्या शिवाय शिंपल्यांचे २५० हून जास्त प्रकार इथे ठेवले आहेत.
येथील प्रमुख आकर्षण म्हणजे ५५ फूट लांबीचा आणि सुमारे ५ हजार किलोग्रॅम वजनाचा भीमकाय देवमाशाचा सांगाडा. सर्वांना आवडेल असे आवर्जून पाहाण्यासारखे हे ठिकाण आहे.
 
मत्स्यालयात ठेवलेला देवमाशाचा सांगाडा
येथील प्रमुख आकर्षण म्हणजे ५५ फूट लांबीचा आणि सुमारे ५ हजार किलोग्रॅम वजनाचा भीमकाय देवमाशाचा सांगाडा. सर्वांना आवडेल असे आवर्जून पाहाण्यासारखे हे ठिकाण आहे. रत्नागिरीच्या मत्स्यालयाला भेट देण्यासाठी प्रति व्यक्ती १५/- ( पंधरा रुपये) तर कॅमेर्‍याने फोटो काढायचे असतील तर २५/- ( पंचवीस रुपये) फि भरावी लागते.
भगवती बंदर : भगवती देवीच्या नावावरून भगवती बंदर हे नाव देण्यात आले. ब्रिटिशांनी मिऱ्या डोंगराच्या उत्तरेस काळबादेवी उपसागराच्या चिखलदरीतच १८५७मध्ये सैन्य उतरवले होते. तेव्हापासून मिऱ्या बंदराच्या किनारपट्टीवरून पुढे कोल्हापूरकडे आंबा घाटातून जाण्यासाठी रस्ता विकसित होत गेला. नर्मदा सिमेंट (आता एल अँड टी) प्रकल्पामुळे येथे वर्दळ वाढली आहे. भगवती बंदराच्या बाजूस असलेला समुद्र पांढऱ्या रेतीचा आहे. त्यामुळे याला पांढरा समुद्र असे म्हणतात. मांडवी बाजूच्या समुद्राला काळा समुद्र म्हंणतात.
मिऱ्या बंदर : रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीची तीन प्रमुख बंदरे आहेत, रत्नागिरीचे मिऱ्या बंदर, दापोली तालुक्यातील हर्णै बंदर आणि राजापूर तालुक्यातील नाटे बंदर. मच्छिमारांकडे आधुनिक बोटी, ट्रॉलर अशा सुविधा असल्याने लांबवर खोल समुद्रात जाऊन मासेमारी चालते.
 मांडवी किनारा : रत्नागिरी शहराजवळील हा दुसरा समुद्रकिनारा. येथेही कायम गर्दी असते. मांडवी किनाऱ्यावर चमकदार काळी वाळू आहे. म्हणून त्याला काळा समुद्र म्हणतात.
मांडवी किनारा
श्री देव भैरी : ही रत्नागिरीची ग्रामदेवता आहे. खालच्या आळीमध्ये हे देऊळ असून साधारण ३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असावे. मंदिर परिसरात जुगाई देवी, तृणबिंदgकेश्वर, जंबुकेश्वर पंचायतन, गणपती, विष्णू, हरतालिका, सूर्यनारायण यांच्या मूर्तीही दिसून येतात. गुजरातमधील काही लोक येथे येऊन राहिले होते. त्यांनी श्री भैरी व विठ्ठल
 मंदिर बांधले. 
अठरा हातांचा गणपती : श्री. जोशी यांच्या मालकीच्या खासगी मंदिरातील ही वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आहे. गणपतीच्या हातांत अठरा शस्त्रे दाखविले आहेत. हे मंदिर फाटक हायस्कूलजवळ आहे. 
सत्यनारायण मंदिर : सत्यनारायणाच्या पूजा घरोघर होतात; पण सत्यनारायण मंदिर कुठेच दिसत नाही. येथील परटवणे भागात श्री समर्थ चंद्रशेखरस्वामी यांनी सन १९१६मध्ये हे मंदिर स्थापन केले. या मंदिरात इतरही अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. दोन मुखे, तीन पाय व सात हात असलेली ही मूर्ती चुलीचे प्रतीक आहे. या मंदिराजवळच भार्गवरामाचे ३०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. येथील मूर्ती बैठ्या स्वरूपात आहेत. 
काशीविश्वेश्वर मंदिर : राजिवडा बंदराजवळ हे मंदिर आहे. हे सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे मंदिर असावे. या ठिकाणी पूर्वी जंगल व स्मशान होते. स्थानिक लोकांकडून सांगितल्या जाणाऱ्या कथेप्रमाणे, एक अपरिचित साधुपुरुष येथे येऊन राहिले होते. तेथील पठारावरील एका शिळेवर एक गाय पान्हा सोडीत असे. तेथे साधूमहाराजांच्या सांगण्यावरून खोदाई केली असता पाण्याचे कारंजे उडाले व अधिक खोदाई केली असता शिवलिंग सापडले. तेथेच कोरून सभागृह करण्यात आले व शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. साधूमहाराज नंतर अदृश्य झाले. हेच ठिकाण काशीविश्वेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. येथून भाट्ये खाडीचे सुंदर दृश्य दिसते.
 काळबादेवी मंदिर : मिऱ्या बंदराच्या पुढे काळबादेवी गावामध्ये (पुसाळे) देव रामेश्वर व काळबादेवी ही दोन मंदिरे आहेत. येथे काळ्या पाषाणातील काळबादेवीची मूर्ती आहे. शेजारीच तटबंदी असलेले रामेश्वर मंदिर आहे. येथे पोर्तुगीज घंटा असून, तिचे वजन १५० किलो आहे. ही घंटा सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी पाठवली आहे. विसाजीपंत लेले यांनी ती उंटावरून येथे आणली. जवळच हसनपीर दर्गा असून, त्याच्या पूजेचा पहिला मान हिंदूंना आहे. येथील किनारा खूपच सुंदर आहे. येथे हंगामामध्ये सीगल पक्षी येतात.

रत्नागिरीची खाद्यभ्रमंती:-

 नाश्ता :

पहाटे चार वाजल्यापासून रत्नागिरीकरांची खवय्येगिरी सुरु होते. पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत कांदापोहे, शिरा आणि चहा रत्नागिरी बस स्थानकाबाहेर अत्यंत कमी दरात आणि चवदार मिळतात.
हॉटेल गोपाळ : रत्नागिरी मारुती मंदिर येथे हे हॉटेल असून येथील मिसळ प्रसिद्ध आहे. या इथे गेल्यावर दहीवड्याची चव चाखायला देखील विसरू नका. या हॉटेलमध्ये सर्व पदार्थ शेंगतेलात तयार केले जातात.
दत्त कॅफे : रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण चित्रपटगृहासमोर गांधी यांचे हे हॉटेल आहे. चटकदार मिसळ आणि कांदाभजी साठी हे ठिकाण अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे.
रसराज : नव्यानेच सुरु झालेल्या या हॉटेलमध्ये मिसळ अतिशय चविष्ट मिळते. रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण चित्रमंदिराच्या शेजारी हे हॉटेल आहे.
मिथिला : साउथ इंडीयन पदार्थ खाण्यासाठी मारुती मंदिर येथे असणाऱ्या या हॉटेलला भेट द्या. डोसा, मेदुवडा, उत्तप्पा, इडली सांबार या सोबतच सकाळी फक्त १० वाजेपर्यंतच मिळणाऱ्या पायनापल शिऱ्याची चव चाखायला विसरू नका.
वडा पाव : मारुती मंदिर येथील साईश्वरी हॉटेल बटाटे वड्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. येथील चटणीचे अनेक फॅन आहेत. याच बरोबर जुना माळ नाका येथील आहार हॉटेल मध्ये देखील चविष्ट वडापाव मिळतो.
सामोसा : रत्नागिरी परटवणे रोडवर असणारे सुरुची फुड्स येथे सामोसा अतिशय चविष्ट मिळतो.

जेवण :

गोगटे खानावळ : रत्नागिरी कॉंग्रेस भवन समोर असणारे गोगटे यांचे हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण अतिशय उत्तम आणि अल्पदरात मिळते.
हॉटेल सिद्धाई : रत्नागिरी शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर पानवल येथे असणाऱ्या या हॉटेल मधील शाकाहारी जेवणाची चव चाखून बघाच. भाकरी, भाजी, मोदक, अळूवडी, काजूगर उसळ, मिरचीचा ठेचा अशा अनेक चविष्ट पदार्थांनी सजवलेली थाळी असते. निसर्गसानिध्यात जेवणाचा बेत जरूर करा. मांसाहारी खवय्यांनसाठी तर इथे मेजवानीच असते. संगमेश्वरी मटन, गावठी कोंबडी अतिशय सुंदर असते. या सोबत मोठे वडे खाण्यास देखील विसरू नका.
आमंत्रण : जुना माळ नाका येथे हॉटेल विहार डिलक्स शेजारी हे हॉटेल असून इथे मालवणी पद्धतीचे मासे अतिशय चांगले मिळतात. येथील जंबो सुरमई थाळी खाऊन तृप्त झाल्यासारखेच वाटेल.
गोपाळ : नाश्त्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या गोपाळ हॉटेलचे भोजनालय पहिल्या माळ्यावर आहे. खातू बंधू यांचे दर्जात्मक सूत्र येथे देखील लागू आहे. येथील मटन थाळी, फिश थाळी प्रसिद्ध आहे.
शुभम् : मारुती मंदिर येथील किरपेकर स्वीट्स शेजारी हे हॉटेल असून कमी बजेटमध्ये येथे मांसाहारी व मत्स्याहारी जेवण मिळते.
ग्रीनपार्क : कुटुंबासमवेत अथवा मित्रांबरोबर निसर्ग सानिध्यात जेवणाचा बेत रंगवायचा असेल तर निवळी येथील हॉटेल ग्रीन पार्क येथे जा. येथे रोटी, बटर चिकन आणि पनीर टिक्का मसाला जरूर चाखून बघा. येथे मिळणाऱ्या बटर रोटी सारखी कॉलेटी इतरत्र कुठेही मिळणार नाही.
शांती धाबा : निवळी येथे असणारा शांती धाबा हा रत्नागिरीतील खवय्यांसाठी रात्री अपरात्री मिळणाऱ्या जेवणासाठीचा आधारस्तंभ आहे. येथील दुध शेवभाजी जरूर चाखा.
व्हेज ट्रिट : रत्नागिरी येथील टिळक आळी येथे असणारे हे हॉटेल पूर्ण शाकाहारी आहे. योग्य दर, चविष्ट पदार्थ आणि भरपूर कॉंटिटी हे येथील वैशिष्ट.
हॉटेल विवेक : व्हेज नॉनव्हेज दर्जेदार जेवणासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे येथील प्रत्येक डिश वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची असते. स्टार्टर मध्ये चिकन सुनेहरा कबाब, चिकन कोरीयंडर गार्लिक, जीरा राईस आणि सर्वात शेवटी हॉट ब्राउनी जरूर चाखा. खरं म्हणजे येथील प्रत्येक पदार्थ टेस्टी असतो.
हॉटेल डायमंड : येथील तंदूर डिशेस, बटर चिकन, जीरा राईस अतिशय उत्तम असते.
टेस्टी कॉर्नर : स्वच्छ आणि चविष्ट चायनीज खाण्यासाठी जुना माळ नाका येथील टेस्टी कॉर्नरला जरूर भेट द्या.

स्नॅक्स अँड कोल्ड्रीक्स

पाणीपुरी – क्वालिटी स्नॅक्स, जुना माळ नाका
भेळ – रत्ना भेळ, उद्यमनगर रोड
रगडा पॅटिस – अभिरुची स्नॅक्स, मांडवी रत्नागिरी
सामोसा कोन – बोंद्रे भेळ सेंटर, थिबा पॉईंट
थालीपीठ – भिडे उपाहारगृह, गोखले नाका
पॅटिस – हॉटेल छाया, गोखले नाका
लस्सी – चंद्रशेखर डेरी, थिबा पॅलेस रोड आणि माय टेस्ट – आरोग्य मंदिर
दुध कोल्ड्रिक – समाधान ज्यूस सेंटर, गोखले नाका. इथे लिंबू सरबत देखील सुरेख मिळते.
बुर्जी पाव – हाथखंबा येथील गद्रे पेट्रोल पंपा समोरील डोळस यांच्या गाडीवर बुर्जी पाव चविष्ट मिळतो.

पार्टी ऑर्डर

पार्टीच्या जेवणासाठी चविष्ट पदार्थ आणि उत्तम सेवा पाहिजे असल्यास गणेश धुरी मो. ९८६००९४८४८ या क्रमांकावर संपर्क साधा.
बिर्याणी : व्हेज, नॉनव्हेज उत्कृष्ट बिर्याणी पाहिजे असल्यास जरूर ऑर्डर द्या मुखरी – मो. ९४२१२३३१५५. इतकी चविष्ट बिर्याणी आपल्याला रत्नागिरीत इतर कुठेही मिळणार नाही. १ किलोच्या वर ऑर्डर घेतली जाते.
रत्नागिरीला रहाण्याची व्यवस्था:-
१)बर्वे होम्स( सावरकर गायवाडी रोड)
7756971304
२) दर्या अस्साद बीच रिसॉर्ट
9673633151
( आरे वारे बीच)
३) प्रभा ब्रेड अँड ब्रेकफास्ट
9270935777, 9422432432
घर न-. 543 B, मधुबन कम्पाउंड, कुवारबाव, साई मंदिराच्या मागे
४) हॉटेल अल्पा
स्वरुपानंद कमर्शिअल कॉम्प्लेक्सच्या मागे, मारुती मंदिराजवळ
9821563927
५) निहार अ‍ॅग्रोटुरिझम
दांडेडोम, करकरवाडी, शाळा क्रमांक २ जवळ
9423290138, 7741856777
६) रिसबुड लॉज
रत्नागिरी रेल्वे स्टेशनजवळ, गायलवाडी नाका
9422431493
६) सबेरा रेसिडेन्सी
पाडवेवाडी रोड, हनुमान नगर
9422507755
७) समर्थ ए.टि.सी. बीच होम स्टे
538, आरे वारे बीच, काळबादेवी बीचजवळ
9821665532
७) शांती द ग्रँड पॅलेस
राम लेन, पोलिस हेड क्वार्टरजवळ
2352270765
७) द ग्रँड ईन
DYS plaza,मारुती मंदिर
95525490880, (02352)2263800, (02352)226340
८)आपलंच घर अतिथी निवास
9822870626
127 D, सड्ये-पिरंडवणे
9)आमंत्रण रेस्टॉरंट ( रत्नागिरी ):- (02352) 226001
10) कोहीनुर समुद्र , रत्नागिरी (02352 - 35231/35232)
पानवल, चिंचखरी,हातीस  :-
रत्नागिरीहून पोमेंडीमार्गे पानवलला जाता येते. पानवल गावाजवळ आशियातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. अंतर आहे अठरा किलामीटर. पुलाची उंची पासष्ट मीटर आहे. ती भव्य निर्मिती पाहिल्यावर त्या निर्मितीमागे असणाऱ्या हातांविषयी मनात अभिमानाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. पुलाच्या सभोवतालचा परिसरही सुंदर असून जंगलातील भटकंतीचा आनंद त्या भागात घेता येतो. रत्नागिरी शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर पानवल गावाकडे जाणारा रस्ता आहे. त्या कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यास तीन किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस पानवलचा रेल्वे पूल आहे. परतीच्या प्रवासात सोमेश्वर खाडीजवळील सोमश्वर मंदिर आणि तेथूनच पाच किलोमीटर अंतरावरील चिंचखरी दत्तमंदिराला भेट देता येते.
रत्‍नदुर्ग किल्‍लाचिंचखरी येथे निसर्गरम्य परिसरात उभारलेले दत्त मंदिर आहे. ते रत्नागिरी शहरापासून नाचणेमार्गे दहा किलोमीटर अंतरावर आहे. गजानन महाराज बोरकर यांचे चिंचखरी हे जन्मगाव. त्यांनी त्या ठिकाणी तपोवनाची निर्मिती करून दत्त मंदिर उभारले. मंदिराच्या बाजूचा निर्मळ पाण्याचा प्रवाह आणि परिसरातील दाट वनराई यांमुळे मंदिरात प्रवेश करताक्षणी प्रसन्न वाटते. श्री गुरू दत्ताची संगमरवरी मूर्ती तेवढीच देखणी आहे. राजीवाडा बंदरापासून बोटीनेदेखील चिंचखरी येथे जाण्याची सोय आहे.
चिंचखरीच्या अलिकडे डाव्या बाजूस दाट वनराईतून सोमेश्वरकडे रस्ता जातो. ते गाव बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. गावाच्या मध्यभागी सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. चार भागांत विभागलेल्या मंदिराची वास्तू स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहे. दगडी तटबंदीच्या मधोमध सुंदर कौलारू मंदिर उभारले गेले आहे.
काजळी नदीच्या तीरावर हातीस गावच्या बाबरशेख बाबांनी लोकांना भक्तिमार्ग दाखवला. ते गाव रत्नागिरीपासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या महानिर्वाणानंतर गावातील जनता हिंदू असल्याने ग्रामस्थांनी इब्राहिमपट्टण येथील मुस्लिम बांधवांच्या मदतीने दफनविधी पार पाडला. तेव्हापासून दोन्ही गावांतील मंडळी माघ पौर्णिमेला बाबांचा ऊरुस साजरा करतात. सोहळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. ऊरुसामधील शस्त्रास्त्रांचे खेळ आणि गावातील ढोलपथकाचे खेळ डोळ्यांचे पारणे फेडतात.
            रत्नागिरी शहरातून जयगडला जाण्यासाठी रस्त्यांचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक रस्ता म्हणजे रत्नागिरी ==> आरे-वारे ==> नेवरे ==> भांडारपुळे ==> गणपतीपुळे ==> मालगुंड ==> जयगड असा सागरी महामार्ग ज्याला महाराष्ट्राचा कोस्टल हायवे म्हणतात. तर दुसरा रत्नागिरी ==> हातखंबा फाटा ==> निवळी फाटा ==> चाफे ==> खंडाळा ==> जयगड असा नेहमीचा थेट जाणारा रस्ता. निवळी फाटा मुंबईहून कोंकणात जाताना हातखाम्ब्याच्या अलीकडे मुंबई-गोवा रस्त्यावर लागतो. निवळी फाटा ते गणपतीपूळे हे अंतर २७ ते ३१ किमी आहे, हा रस्ता तसा सरळच गावागावातून गणपतीपुळ्यात पोहचतो. रत्नागिरी शहरातून पुळ्यात जाता येते,
 यापैकी पहिला रस्ता पर्यटकांसाठी निश्चितच उत्तम कारण हा संपूर्ण रस्ता कधी समुद्राच्या अगदीच जवळून तर कधी डोंगरावरून छोटी छोटी वळणे घेत समुद्रकिनार्‍याचे विलोभनीय दृष्य दाखवतो. त्यामुळे रत्नागिरीवरून जयगडकडे जाताना या सागरी महामार्गाने जावे . मुंबई-गोवा रस्त्यावरून रत्नागिरी शहरात जाण्यासाठी हातखंबा ह्या फाट्यावरून वळण घ्यावे लागते. एकदा का हातखंबा तिठयावरून आत शिरलात कि सरळ सरळ रत्नागिरी शहरातून गाडी हाकत न्यायची, मारुती मंदिर चौकातून सरळ पुढे आल्यावर एस.टी. महामंडळाचे वर्कशौप उजव्या हाताला लागेल तिथून पुढे गेल्यावर रात्नागिरी एस.टी. डेपो दिसेल., इथून पुढे गेलात कि तिसरया उजव्या वळणाला (होटेल रुद्र समोरील रस्ता ) आत वळावे. इथून पुढे जाताना अजून एक छोटेखानी मारुतीचे मंदिर लागेल, मग सावरकरांचा पुतळा असलेले चौक ओलांडले कि बँक ऑफ इंडिया वरून सरळ पुढे जाऊन  फाटक हायस्कूल लागते. तिथून पुढे सरळ गेल्यावर थोड्या अंतरावर छोट्याश्या वहाळावरचा पूल ओलांडून पुढे निघालो कि लगेचच एक चार रस्ता असलेला चौक लागेल, चौकातून सरळ पुढे गेल्यावर खऱ्या अर्थाने  गणपतीपुळ्याच्या आरे-वारेतून जाणारया रस्त्याचा प्रारंभ होतो.  इथून मात्र मासळीच्या वासामुळे, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे आपल्याला समुद्राच्या सोबतीची जाणीव व्हायला सुरुवात येते. काही अंतरापर्यंत रस्त्याच्या एका बाजूला कोळी बांधवांची घरे दिसतात तर दुसऱ्या बाजूला समुद्राचे आट घुसलेले पाणी  तसेच त्या पाण्यात मासे पकडण्यासाठी टाकलेली छोटी-मोठी जाळी दिसत राहतात. नंतर काहीश्या छोट्या उंचीच्या खाऱ्या पाण्यातील झुडुपांमधून हा रस्ता पुढे जात राहतो,  अधून मधून छोट्या घरांची सोबत असतेच. मग हा रस्ता छोटी-मोठी वळण घेत थोड काळजीपूर्वक उजव्या हाताचे वळण घेतो आणि सरळ पुढे जात राहतो तो थेट आरे गावाला जोडणाऱ्या पुलापर्यंत. समुद्राच्या आत शिरलेल्या पाण्यावरील पूल पार केला कि आपण आरे ह्या गावात शिरतो, पुढे जाताना लागणारे डाव्या हाताचे वळण सोडून पुढे गेल्यावर मात्र उजव्या हाताचे वळण घ्यावे लागते.
समुद्राच्या किनार्‍याने जाणारा रस्ता
आरे बीच
आरे बीच
रत्नागिरी शहरातून जयगड-गणपतीपुळ्याकडे जाण्यासाठी, अलीकडेच काही वर्षांपूर्वी आरे-वारे ह्या दोन गावांमधून जाणारा नवीन सागरी महामार्ग झाला आहे. एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले "कॉम्बिनेशन” ज्या पर्यटकांना अनुभवायचे आहे त्यांनी आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळ्याला नक्कीच जावे. रत्नागिरी शहरापासून फक्त १२ किलोमीटर अंतरावर आरे-वारेचा समुद्रकिनारा आहे. रत्नागिरी शहरातून शिरगाव ==> काळबादेवी असा प्रवास करत पुढे गेल्यानंतर अथांग समुद्र सुरु होतो. येथेच एक मोठा ब्रिज आहे जो, आरे आणि वारे या दोन गावांना जोडतो. एकदा का या आरे-वारे रस्त्याला लागलो कि गाडीचा स्पीड आपोआपच कमी होऊ लागतो, कारण डाव्या हाताला दिसत असतो अथांग समुद्र आणि नजरेसमोर असतो समुद्राच्या बाजूने डोंगरातून जाणारा घाट रस्ता. दूरवर पसरलेला समुद्र, पांढरीशुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने असा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे नक्कीच मिळतो. त्यामुळे येथे प्रत्येक वळणावर गाडी थांबवून हे निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहवत नाही.
वारे बीच

काजीरभाटी बीच

आरे-वारे मार्गानेच पुढे गेल्यावर काही अंतरावरच काजीरभाटी गावाचा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा बाकी समुद्रकिनाऱ्यासारखाच पण अजून तरी पर्यटकांच्या "वक्रदृष्टी" पासून थोडा दूर त्यामुळे अतिशय शांत आणि स्वच्छ. अश्या एखाद्या सुंदर आणि जवळ जवळ निर्मनुष्य बीचवर समुद्रकिनाऱ्यावरून चालत चालत, लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत दूरवर एक फेरफटका मारण्यात काही वेगळीच मजा असते. येथील निळ्याभोर समुद्रकिनारी असलेली सुरुची झाडे आणि त्यामधून वाहणारा समुद्रावरचा थंड वारा मन प्रसन्न करून टाकतो.
काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीच
  काजीरभाटी बीचवर स्कुबा डायव्हिग हे नवे आकर्षण आहे. डाईव्हचे ठिकाण समुद्रकिनार्‍यापासून फक्त 200-300 मीटर अंतरावर होते आणि एकूण खोली 4-5 मीटर असते.ईथले पाणी ईतके नितळ आहे कि  आपल्याभोवती भरपूर कोरल, रॉक पॅचेस आणि रंगीबेरंगी लहान मासे फिरत असताना आरामात पाहू शकतो. हे अनोखे जग पाहणे डोळ्यांसाठी एक ट्रीट आहे. ज्याना शक्य आहे त्यानी स्कूबा डायव्हिंग जरुर करावे.
रुपेश प्रभु (काजीरभाटी बीचवर स्कुबा डायव्हिंगसाठि  ): 919766420038 / सचीन गोवेकर 918669646658
 
    पुन्हा तसाच वळणावळणाचा रस्ता आणि शेजारी अथांग पसरलेला समुद्र असे सुंदर दृश्य पहात भांडारपुळे गाव ओलांडून थोड्याच वेळात गणपतीपुळ्यात पोहोचतो. आता मात्र इतक्या वेळ शांत असणारा रस्ता वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीत हरवून गेला. कधीकाळी निळाशार समुद्र, चमचमती पांढरी वाळू, नजर पोहोचणार नाही असा लांबलचक सुंदर किनारा आणि त्यातच डोंगराच्या कुशीत विसावलेले शांत मंदिर अशी ओळख असणारे गणपतीपुळे हल्ली एक पर्यटन स्थळ म्हणून फारच नावारूपाला आलंय. त्यातच सन २००५ च्या सुमारास आलेल्या 'नवरा माझा नवसाचा' या पिक्चरचे शुटींग या गणपतीपुळे मंदिराच्या परिसरात झाले आणि या गावाला व येथील मंदिराला एक वेगळीच प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे सध्या गणपतीपुळे म्हणजे अतिप्रसिद्ध झालेले पर्यटकांचे एक तीर्थक्षेत्रच.
काजीरभाटी बीच डोंगरावरून
 आरे-वारे ते गणपतीपुळे मार्गावर लागणारी एक खिंड
भांडारपुळे गावातील एक दृश
भांडारपुळे बीच डोंगरावरून

 गणपतीपुळे

  मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे.
        कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात ( सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी ) आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते.
    या देवस्थानाचा उल्लेख ३४०० वर्षांपासून आढळतो. पुळे या लहान खेड्यात बाळंभटजी भिडे रहायला आले.ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. "आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन", असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.   अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला  – भक्तांची कामनापूर्ती करण्यासाठी मी गणेशगुळे (पावस जवळील ) येथून या पवित्र क्षेत्री दोन गंडस्थळे व दंतयुक्त असे रूप धारण करून या डोंगरात आलो आहे. तू माझी पूजा – अर्चा – उपासना कर, तुझ्या गावावरील सर्व संकटे दूर होतील. माझे निरंकार स्वरूप याच कैवल्याच्या बनात म्हणजे डोंगरात आहे.
      त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सघ्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, दृष्टांताप्रमाणे भिडे गुरुजी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला. दरम्यान – डोंगराच्या पायथ्यावर, समुद्राच्या काठावरील केवढ्याच्या वनात एक गाय फिरत असताना एका ठिकाणी उभी राहिली आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा झरू लागल्या, त्या धारा गाईच्या पायांजवळ असलेल्या लहान शिळेवर पडत होत्या. ती गाय भिडे यांचीच होती. गुराख्याने हे पाहिले आणि भिडे यांना सांगितले. सर्वांना आश्चर्य वाटले कारण ती गाय भाकड होती; दूध देत नव्हती !त्यांनी तात्काळ सर्व परीसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरु केली. लोकांनी त्या शिलाखण्डाची पूजा केली, शेंदूर चर्चीत केला तेच ठिकाण आजचे गणपतीपुळे!
        गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे, त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्यदैवत अशी श्री मंगलमुर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.
     त्याच वेळी पावसजवळील गणेशगुळे मंदिरातील पाण्याचा झरा बंद झाला म्हणून ‘गुळ्याचा गणपती पुळ्यास आला’. अशी म्हण प्रचलित झाली. भिडे यांनी तिथे डोंगराच्या पायथ्याशी मंदिर बांधून पूजा सुरू केली. मंदिराच्या मागील टेकडीचा रस्ता मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे. टेकडीला फेरा मारला कि भक्त पुन्हा मंदिरात पोहचतो.
   असे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या गणेशाचे दर्शन घेतले होते. मंदिराची धर्मशाळा आणि नंदादीप श्रीमंत रमाबाई पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांनी बांधले आहे. मंदिराबाहेर ११ दीपमाळा असून कार्तिक पौर्णिमेला गणपतीची मिरवणूक काढण्यात येते.  २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या काळात सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट येथील गणेशमूर्तीवर पडतात.
     श्री क्षेत्र गणपतीपुळे म्हणजे धार्मिकतेला पर्यटनाची जोड लाभलेले क्षेत्र. पाठीशी हिरव्यागार डोंगराची भक्कम साथ तर पुढय़ात अफाट निळा अरबी समुद्र. निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले हे गाव असून किनाऱ्याला लागूनच सुमारे तीनशे फूट उंचीची आणि एक किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपतीचे मंदिर आहे. मंदिर डोंगराच्या एका बाजूला असल्याने गणपतीला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. साधारण दीड किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. 
 गणपतीपुळ्याचे जुने मंदिर
 गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी एक शांत खेडं होतं तर पूर्वीचं मंदिर म्हणजे एक छोटसं कौलारू घर. पश्चिमेला मावळणार्‍या सूर्याचे किरण या मूर्तीवर पडत असत असं सांगतात. आता मात्र इथे भव्य मंदिर उभारले गेले आहे.
गणपतीपुळ्याचे प्रसिद्ध गणेश मंदिर

 
 
 
 गणपती मंदिरावरील सुंदर मूर्त्या

  मंदिरात सद्या खिचडी आणि लाडू (गोड) म्हणून महाप्रसाद कोणतेही शुल्क न घेता दिला जातो. गणपतीपुळ्यात सध्या प्रवेश करण्यापुर्वी प्रति व्यक्ती १०/- ( दहा रुपये) प्रवेश फि द्यावी लागते.

मंदिरासमोरच गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा आहे. पण हा समुद्र जलक्रीडेसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. आतापर्यंत कितीतरी पर्यटकांना त्याने गिळंकृत केलेले आहे. कृपया या बीचवर गेल्यास खोल पाण्यात उतरू नका. ज्यांना पोहता येत नाही, त्यांनी विशेष काळजी घ्या. मंदिर प्रशासनाने अशा घटना घडू नयेत म्हणून ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. शासनाने लाईफ गार्ड नेमलेले आहेत तरी देखील आपण स्वतःच आपली काळजी घ्यावी.
 गणपतीपुळ्याच्या मंदिरातील मुषकाची पितळी मुर्ती
गणपतीपुळेपासून ४ कि.मी. अंतरावर पॅरासेलिंग हा प्रकल्प सुरू आहे. समुद्र किनार्‍यावर भरधाव धावणार्‍या वाहनाला मागे दोर बांधून पॅराशूटच्या साहाय्यानेसुमारे २५० फूट उंचीवर आकाशविहार करण्याचा रोमांचकारी अनुभव या ठिकाणी घेता येतो.

प्राचीन कोकण

    गणपतीपुळ्यातलेच "प्राचीन कोकण" नावाचे अनोखे म्युझियम. म्युझियम खूप सुंदर आहे आणि अगदी पुन्हा पुन्हा पाहावे असे. गणपतीपुळे गावात आणि मंदिर परिसरात फिरताना अनेक ठिकाणी "प्राचीन कोकण" असे जाहिरात असणारा बोर्ड लावलेला दिसतो आणि येथेच आपली या ठिकाणा बद्दलची उत्सुकता वाढते.
    महाराष्ट्र व देश-विदेशातील पर्यटकांना ५०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन कोकणाची माहिती व्हावी व कोकणची पुरातन संस्कृती कळावी या हेतूने कोकण टुरिझम डेव्हलपमेंटने गणपतीपुळे येथे प्राचीन कोकण उभारले आहे. कोकणात पर्यटन विकास होत असताना इथे अत्याधुनिक सोयी उपलब्ध होण्याबरोबरच येथील सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्टय़े लोकांसमोर जायला हवीत, या हेतूनेच ‘प्राचीन कोकण’ या अनोख्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या मोर्डे गावातील पदवीधर तरुण "वैभव सरदेसाई" यांच्या मनात महाविद्यालयीन जीवनापासून कोकणच्या संस्कृतीची महाराष्ट्राला व देशविदेशातील पर्यटकांना, तसेच स्थानिक तरुण पिढीला ओळख करून देण्यासाठी काही तरी वेगळे काम करण्याचा ध्यास होता. याच ओढीतून त्यांनी के.टी.डी.आर.सी.ची स्थापना करून या माध्यमातून गणपतीपुळे येथे प्राचीन कोकण हा भव्य प्रकल्प उभा केला. गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर ३ एकराच्या भव्य परिसरात उभारलेला प्राचीन कोकण हा प्रकल्प नक्कीच पाहण्यासारखा आहे.गुहा-भुयारे हे ऐतिहासिक कोकणाचे खास वैशिष्टय़ आहे. त्यामुळे प्राचीन कोकणाच्या प्रवेशद्वाराची रचना देखील भल्यामोठय़ा गुहेतून केली असून, क्षणभर ती कृत्रिम आहे यावर विश्वासच बसत नाही. ही गुहा वर्तमानकाळाचे प्रतीक आहे आणि आतील बाजूस आहे ५०० वर्षांपूर्वीचा भूतकाळ. येथून पुढे पाहायला मिळते ते ५०० वर्षांपूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांचे समाजजीवन, खानपान पद्धती, ग्रामव्यवस्था, बारा बलुतेदार व्यवसाय, त्यांची घरे, वेशभूषा आदी खास कोकणातील चालीरीती. लाईफसाईझ मुर्त्यांमधून सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे. सोबत असलेल्या गाईडकडून माहिती ऐकत गावात फेरफटका मारता येतो. येथे एक नक्षत्र बाग आहे ज्यामधे २७ नक्षत्रांना जोडून २७ झाडे दिली आहेत. प्रत्येक जन्मनक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो, त्यानुसार ही नक्षत्र बाग लावण्यात आलेली आहे. भेट देणाऱ्यांनी आपापल्या जन्मनक्षत्रानुसार कुठला आराध्य वृक्ष आहे ते पहायचे. त्यांचे संरक्षण व संगोपन केल्यास आपल्याला ज्ञान, आरोग्य व संपन्नता मिळते असे प्राचीन ग्रंथात उल्लेख आहेत. ती झाडे प्राचीन कोकणामधे पाहायला मिळतात. येथे सुमारे १५० प्रकारची औषधी झाडे लावलेली आहेत.
खोतांचे विशिष्ठ कोकणी घर, नाभिक आणि कोकणातील ग्रामदेवता “वाघजाई” देवीचे मंदिर

‘प्राचीन कोकण’ येथे कोकणातले सांस्कृतिक वैभव दृष्टिपथास पडते. खोतांच्या घराची रचना, कोळी बांधवांची मासे पकडण्याची खोबणी, छत्रीसारखे वापरले जाणारे इर्ले, कपडे वाळविण्यासाठीची उचल, भातुकली अशा काळाच्या पडद्याआड जाणाऱ्या वस्तूंचं दर्शन या प्रदर्शनात घडतं. गावातील बारा बलुतेदारांचं जीवन उत्तमरितीने मांडतांना त्याची माहितीदेखील तेवढ्याच रोचक पद्धतीने इथले गाईड सांगत असतात. कुंभार, तेली, सुतार, लोहार, न्हावी, सोनार यांचे जीवन जवळून पाहण्याचा अनुभव रोचक असाच असतो. त्याचवेळी त्या काळातील संस्कृती स्पष्ट करणाऱ्या अनेक वस्तू पहायला मिळतात. स्वयंपाकघरातील जुन्या प्रकारचे लाकडाचे पुरणयंत्र, मोदकपात्र, घंगाळे, उखळ आणि स्वयंपाकघराच्या बाजूला असलेल्या पाणवठ्यावर आपली नजर खिळते.
बारा बलुतेदारांपैकी लोहार, सुतार, वाणी आणि कुंभार
  बारा बलुतेदारांतील सोनार, कासार, बांबूचे काम करणारे कामगार आणि एक कोकणी स्वयंपाकघर

पर्यटकांना कोकणातील वैशिष्ट्य आठवणींच्या रुपात घरी नेता यावे यासाठी प्रकल्पाच्या शेवटी खास विक्रीचे दालन आहे. त्यात कोकणची वेगळी चव असणारे पदार्थ, सावंतवाडीची लाकडी खेळणी, शंखापासून बनविलेल्या वस्तू अशी विविध प्रकारची खरेदी करता येते. 
 
नुकतेच समुद्रकिनाऱ्यातील मत्स्यसंपत्तीचे नवे दालन येथे सुरू झाले आहे. 
 
येथील शंख-शिंपल्यांचे प्रदर्शन तर जरूर भेट द्यावे असेच. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी www.prachinkonkan.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्राचीन कोकणमध्ये प्रवेश फि ५०/- ( पन्नास रुपये) शिवाय कॅमेरा वापरायचा असेल तर २५/- ( पंचवीस रुपये) फि आहे.

 मॅजिक गार्डन




     या ठिकाणी आपण काही ईल्युजन राइड, मॅजिक शो, मिरर मॅझ इ. लहान मुलांसह मनोरंजनासाठी भेट देण्याची एक चांगली चांगली जागा आहे. प्राचीन कोकण या म्युझियमच्या थेट समोर हे मॅजिक गार्डन आहे. 
 मॅजिक गार्डनची प्रति व्यक्ति प्रवेश फि ३००/- ( तीनशे रुपये) आहे.

गणपतीपुळे येथील हॉटेल

गणपतीपुळे येथे रहाण्यासाठी हॉटेल
     लँडमार्क रिसॉर्ट (02357 - 235284 Or मुंबई बुकींग : 022-26354124)
    शिवसागर पॅलेस (02357 - 235070 / 235726)
   अभिषेक बीच रिसॉर्ट (02357- 235214/235327)
    हॉटेल कृष्णा सी व्ह्यु (02357 - 235647)
   हॉटेल श्री सागर (02357-235345, 235145)
    हॉटेल दुर्वांकुर (02357 - 235764)
   अर्नव बीच रिसॉर्ट  (091 - 9422508503)
  ट्रँक्वीलिटी बीच रिसॉर्ट (02357-235750)
हॉटेल सिध्दी- श्री. महेश केदार (02357) 235599/ 9422631199 
गणपतीपुळेला भक्तनिवास आहे, त्याचा देखील लाभ घेता येईल ( मंदिरापासून ठीक १.४ किमी ). कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सोयी भक्त निवास पुरवते. स्वच्छ रूम आणि सेवा देखील उत्तम आहे. नाष्टा आणि जेवण अगदी माफक दरात असून तितकेच चविष्ट आहे . .रूम चे रेट -५० रु पासून ५०० पर्यंत आहेत .२.नाष्टा मध्ये
पोहे आणि उपमा २० रु, चहा ५ रु, कॉफी १० रु, आणि जेवण फक्त ६० रु तेही अनलिमिटेड .भक्त निवास संपर्क - (०२३५७)२३५७५४/२३५७५५
 

मालगुंड

 गणपतीपुळ्यापासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर असणारं कोकणातील एक शांत, सुंदर आणि आटोपशीर असं समुद्रकिनारी वसलेलं गाव. मालगुंडची खास ओळख म्हणजे “जुने जाऊ द्या मरणालागुनी” असे म्हणत मराठी कवितेच्या इतिहासात एक क्रांतिकारक पर्व उभे करणारे युगप्रवर्तक कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांचं जन्मगाव. दि. ७ ऑक्टोबर १८६६ साली ज्या घरात कवी केशवसुत यांचा जन्म झाला त्या घराचे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मदतीने स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते ८ मे १९९४ रोजी या स्मारकाचे उद्घाटन झाले. केशवसुतांच्या वापरातील अनेक वस्तूंच्या सहाय्याने, तसेच अनेक दुर्मिळ फ़ोटो वापरून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळ घर अगदी जसे आहे तसेच ठेऊन बाहेर सुंदर वाटिका तयार केलेली आहे आणि त्यात संगमरवराच्या फरशीवर केशवसुतांच्या कविता शिल्पित करून जिवंत करण्यात आल्या आहेत.
कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांचे मालगुंड गावातील घर
केशवसुत यांच्या कविता
आम्ही कोण?, नवा शिपाई, एक तुतारी द्या मज आणुनि, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही केशवसुतांच्या उल्लेखनीय कविता येथे बघायला मिळतात. या वास्तूत ग्रंथालय, अभ्यासिका, वाचनालय असे विविध कक्ष आहेत. एका स्वतंत्र दालनात महाराष्ट्रातील काही प्रतिभावंत कवींची माहिती, सुंदर स्केचेस आणि प्रत्येकाची एक उत्कृष्ट कविता येथे पाहायला मिळते. स्मारक भवनाच्या मागील बाजूस खुला रंगमंच असून तेथे साहित्यिक कार्यक्रम होत असतात. एखाद्या कवीचे अशा तऱ्हेचे उभारलेले हे महाराष्ट्रातील सध्यातरी एकमेव स्मारक असावे असे वाटते. त्यामुळे गणपतीपुळ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारे हि ठिकाण नक्कीच चुकवू नये असे आहे. केशवसुत स्मारक पहाण्यासाठी प्रति व्यक्ती १०/- ( दहा रुपये) प्रवेश फि द्यावी लागते.
घरामागील शिळांवर लिहिलेल्या त्यांची प्रसिद्ध कविता तुम्ही वाचू शकता.मराठी साहित्यात रस असणार्‍या मराठी माणसांसाठी ही सोन्याची खाण आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी दुपारची वेळ ही सर्वात चांगली वेळ आहे.
  याचबरोबर आपण एक हजार वर्ष जुन्या राममंदिरालाही भेट देउ शकता.मालगुंड येथील आणखी एक आवर्जून बघण्यासारखे ठिकाण म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. हे हेमाडपंती शैलीतील मंदिर पेशव्यांचे पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेले सरदार मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ बांधले आहे. मालगुंड हे मेहेंदळ्यांचे गाव होते.
मालगुंड गावातील दुसरी बघण्यासारखी गोष्ट म्हणजे अलीकडेच सुरु झालेले छोटेखानी मत्स्यालय. कोण्या एका खाजगी कंपनीने "फिश वर्ल्ड" नावाने हे मत्स्यालय मालगुंड गावात सुरु केले आहे.
 मोठ्या माणसांसाठी ३०, तर लहान मुलांसाठी १० रुपये एवढे तिकीट काढून या छोट्या फिश वर्ल्डला भेट देता येते. येथे समुद्री घोडा, स्टार फिश, समुद्री साप, टायगर फिश, कॅट फिश, गोबरा असे अनेक सागरी व गोड्या पाण्यातील मासे पाहता येतात.
लहान मुलांना अगदी जवळून हे रंगीबेरंगी समुद्री जीवन पाहता येत असल्याने येथेही नक्की भेट द्यावी.
     मालगुंडला वर्षाअखेरीला जाणे शक्यतो टाळलेले बरे, कारण डिसेंबरचा शेवटचा आठवडा मालगुंडमधे योगमाता निर्मला देवीचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. योग आणि प्रार्थना आणि उत्सव यासाठी भारत आणि जगातील त्यांचे अनुयायी  मालगुंडला येतात. 23 डिसेंबरपासून वर्ष संपेपर्यंत मालगुंडमध्ये खोली न मिळाण्याचे हेच कारण होते. जर आपण मालगुंडजवळ सुट्टी घालवणार असाल तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळणे चांगले. अर्थात श्री निर्मला देवीचे अनुयायी मालगुंडबाहेर राहणे पसंत करत नाहीत म्हणून गणपतीपुळे ते रत्नागिरी परिसरातील हॉटेल आपण शोधू शकतो.
      मालगुंडला  गायवाडी बीचला आपटे यांच्या शुभन्कर होम स्टे रहायला चांगला आहे. बीचच्या अजून जवळ 'माडाच्या बनात' नावाचं भारी रिजॉर्ट दिसले. http://www.madachyabanat.com/ रेट्स ही भारी आहेत.
 बीच अवघ्या १० मिनिटाच्या अंतरावर आहे. पण त्यामुळे गावापासून लांब. उल्लेखनीय म्हणजे तिथले 'स्वाद ' रेस्टोरंट. शाकाहारींसाठी पर्वणी. तिथली व्हेज थाळी खूप छान होती. नॉन व्हेजींसाठी असे काही खास रेस्टोरंट दिसले नाहीत. नॉनव्हेज बनवून देणारे घरगुती बोर्ड दिसले.
बीच क्लीन आहे. आता सुट्टीच्या पिरियड मध्ये ही तुरळक गर्दी होती. बीचवर खायला काही मिळत नाही. एक दोन टपऱ्या होत्या नारळ पाणी, चहाच्या.
मालगुंडमध्ये मुक्कामासाठी काही हॉटेलचे पत्ते आणि संपर्क क्रमांकः-
 श्री. पि.बी. साळवी
मु.पो. -मालगुंड
ता. जि. -रत्नागिरी
Tel.952357 235336
रुम्स-4      उपलब्ध बेड- 8       टेरीफ- Rs.३00/-        जादा व्यक्तिसाठी-  Rs.100/-
 सागर दर्शन बीच रिसॉर्ट ( मालगुंड) : 919422382593 / 919881060298
  अर्थव रेसिडेन्सी, मालगुंड (9422986307/ 9422500180)
 गणपतीपुळे मालगुंड (रत्नागिरी)9820728024/9819454548
माडाच्या बनात ( मालगुंड) 919867027261 / 919930024501 (मध्यम श्रेणीचे रिसॉर्ट)
कृष्णकुंज रिसॉर्ट : 919820198037 (बजेट हॉटेल)
प्रथमेश वॉटर स्पोर्ट ( मालगुंड ) : 919405957305 / 917020207826
 
 मालगुंड बीचचा नकाशा
मालगुंड उत्तरेला  वरवडे समुद्रकिनारा आहे. पांढर्‍या रंगाच्या वाळूने समुद्रकिनारा पर्यटकांची फार वर्दळ नसल्याने स्वच्छ आहे. फारसा मानवी वावर नसल्याने आणि तुमचे नशीब जोरावर असेल तर येथे तुम्हाला  डॉल्फीन दिसू शकतात.
 वरवडे बीचचे नयनरम्य दृष्य
   यानंतर जयगडच्या दिशेला म्हणजे वरवडेच्या उत्तरेला उंडी या गावचा काहीसा निर्जन समुद्रकिनारा आहे. सध्या शेजारची पुर्ण टेकडी जिंदाल या कंपनीने त्यांच्या नोकरवर्गासाठी घर बांधण्यासाठी घेतल्याचे समजते, सहाजिकच या बीचवर इतर पर्यटकांना प्रवेश नाही.
  काचरे बीचचा एक भाग
 काचरे बीचचा पॅनोरमिक व्ह्यु
   अर्थात ईथे नसला तरी याच्या उत्तरेच्या म्हणजे काचरे गावचा बीच अप्रतिम आहे. या किनार्‍यावर रस्ता अरुंद आहे आणि ईथे पर्यटकांची वर्दळ जवळपास नाही म्हणले तरी चालेल. मधे असलेल्या खडकाळ भागामुळे ह्या बीचचे तीन भाग होतात. पुर्णपणे अस्पर्शीत अश्या या समुद्रकिनार्‍याला जरुर भेट द्या.
 
 यानंतर पुढचा  समुद्रकिनारा नंदीवडे बीच आहे. अगदी टिपीकल कोकणी खेडे असणार्‍या नंदीवडे गावात हनुमान मंदिर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा स्वच्छ असण्याचे सर्व श्रेय अर्थातच गावकर्‍याना द्यायला हवे. गावात होमस्टेही उपलब्ध आहेत.
वरवडे ते नांदिवडे परिसरातील बीच

जयगड

जयगड बंदर व किल्ला - रत्नागिरीतील महत्वाचे ठिकाण. वाहतुकीसाठी सुरक्षित असे हे बंदर असून, या ठिकाणी जिंदाल वीज प्रकल्पामुळे हा भाग नावारूपाला आला आहे. पूर्वी बोटीने कोकणवासीय मुंबईहून इथे यायचे व येथून लाँचमधून किंवा होडीने मुंबई-गोवा मार्गावरील कुरधुंड्यापर्यंत जायचे. वाटेत अनेक छोटी गावे आहेत. त्या गावांतील लोकांना फक्त या लाँचचा आधार होता.पण ती गावे आता रस्त्याने चिपळूण-रत्नागिरीला जोडली आहेत.
 
कऱ्हाटेश्वर मंदीर आणि परिसर
मालगुंडवरून जयगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जयगडच्या थोडे अलीकडे जेएसडब्ल्यु (जिंदाल स्टील वर्क्स) यांचा भव्य दिव्य प्रकल्प उभा आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडे एक रस्ता पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिराजवळ जातो. आपले वाहन थेट मंदिरापर्यंत अगदी सहजपणे नेता येते. कऱ्हाटेश्वर हे भगवान शंकराचे देवस्थान आहे. जुन्या लाकडी बांधणीचं आणि कौलारू छपराचं कऱ्हाटेश्वराचं मंदिर समुद्र किनाऱ्यावरील एका मोठ्या खडकावर बांधले असल्याने एका तुटक्या कडय़ावर उभे असल्यासारखे भासते. या मंदिराला शांत आणि तितकाच गूढ परिसर लाभलेला आहे. मंदिर परिसरात दाखल होताच समुद्राची गाज कानावर पडते. शंकराचे दर्शन घेऊन मंदिरामागे असलेल्या साठ-सत्तर पायऱ्या उतरून गेल्यावर आपण समुद्राजवळ पोहोचतो. येथे एक आश्चर्य दडलेले आहे. एकीकडे खऱ्या पाण्याने भरलेला अथांग समुद्र असताना दुसऱ्या बाजूस चक्क गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. गोमुखातून पडणारे पाणी अतिशय नितळ, गार आणि चवीला गोड आहे.
 पूर्वी येथे झऱ्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असे. ‘बेभाटी गंगा’ असे तिला ओळखले जायचे. मंदिराभोवतालची जागा रुंद करण्यासाठी खडक फोडले, तेव्हापासून ती लोप पावली.
समोर दिसणारा निळा फेसाळणारा समुद्र, नारळीची झाडे, येथे मिळणारा शांत एकांत, खडकावर आदळणाऱ्या लाटांचा खेळ हे सारे पाहण्यासाठी या प्राचीन मंदिराला अवश्य भेट द्यावी.
समोर समृद्र असून देखील या गोमुखातून गोड पाण्याची संततधार पडत असते
कऱ्हाटेश्वर मंदीर आणि परिसर
टाळकेश्वर मंदिर
 कऱ्हाटेश्वर मंदीराकडे जाताना आपल्याला जुने टाकळेश्वर मंदिर बघायला मिळते
जय विनायक मंदिर
गणपतीपुळे-जयगड रस्त्यावर मालगुंड सोडल्यानंतर थोड्याच अंतरावर उजव्या हातास एक सुंदर आणि वेगळ्या आधुनिक धाटणीचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. हे आहे जिंदाल ग्रुपने जयगड परिसरात बांधलेले "जय विनायक मंदिर". हे मंदिर कऱ्हाटेश्वरकडे जाण्याच्या अगदी मार्गावरच असले तरी कऱ्हाटेश्वर देवस्थान थोडे आडवाटेला असल्याने प्रथम शंकराचे दर्शन घ्यायचे आणि मगच मुलाकडे म्हणजेच गणपतीबाप्पाकडे यायचे. जय विनायक मंदिर म्हणजे विस्तीर्ण परिसर, सुंदर बाग, कारंजे, विशिष्ठ रेखीव बांधकाम आणि अतिशय प्रसन्न अशी गणेश मूर्ती. हे मंदिर पॅगोडा पद्धतीने बांधलेले आहे. मंदिरात सुंदर अशी ब्राँझची गणपतीची मूर्ती आहे. मंदिराचे वेगळ्या पद्धतीचे आर्किटेक्चर, सुंदर रचना असलेल्या बागा आणि मग प्रसन्न करणारे वातावरण यासाठी या मंदिराला जाता जाता धावती भेट द्यायला हरकत नाही.
जय विनायक मंदिर, जयगड
जय विनायक मंदिर, जयगड
सुंदर गणेश मूर्ती
 
 
 
रात्री लाईटमधे प्रकाशमान झालेले मंदिर पाहण्यासारखे असते

जयगड किल्ला

   प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या जयगड या नैसर्गिक बंदराच्या काठी वसलेला तसेच शास्त्री नदीच्या  खाडीच्या दक्षीण मुखाशी एका बाजूस समुद्र व दुसऱ्या बाजूस खाडी अशा बेचक्यात उभा असलेला डोंगरावर जयगडाची उभारणी झालेली आहे. आजही उत्तम सुस्थितीत असलेला हा देखणा किल्ला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढला असून किल्ल्याचा तटावरून फेरफटका मारताना समुद्र पाहणं म्हणजे सुखंच.
इतिहास -
जयगड किल्ल्याची बांधणी विजापूरच्या आदिलशहाने केली. पण गडाचा बालेकिल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असे १८८४ च्या गॅझेटमध्ये लिहले आहे. पुढे हा किल्ला संगमेश्वरच्या नाईकाने आदिलशहाकडून घेतला. या नाईकाकडे आरमार देखील होते. आदिलशहाने हा गड घेण्याचा दोनदा अयशस्वी प्रयत्न केला शेवटी तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश आले. शिवाजी महाराजांनी १६५७ ते १६६० च्या दरम्यान जयगड जिंकून स्वराज्यात सामील केला. पुढे याचा ताबा सिद्धीकडून आंग्रे घराण्याकडे आला. १७२४ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी जयगडची दुरुस्ती केली. त्यानंतर पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने १७५६ मध्ये तुळोजी आंग्रेचा पराभव करून गड ताब्यात घेतला. शेवटी १८१८ मध्ये याचा ताबा सहज इंग्रजांकडे गेला.
गडफेरी-
१२ एकराच्या प्रशस्त जागेत बालेकिल्ला विस्तारला आहे. बालेकिल्ल्याच्या भोवती सपाट जागेवर खंदक असून उत्तरेस व पूर्वेस उतार सुरू होईपर्यंत हा खंदक खणलेला आहे. अर्थात खंदकाची खोली जेमतेम असल्याने बहुधा हा अग्नीखंदक असावा.
 जयगडच्या बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार दोन भव्य बुरुजांच्या मध्ये उभे असून प्रवेशद्वारावर कोरलेली दोन सुंदर कमळे आपले लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या बुरुजाच्या माथ्यावर एक भव्य शासकीय विश्रामधाम बांधले आहे. किल्ल्याच्या चहूबाजूंनी भक्कम तटबंदी असून तटबंदीला जिने आहेत. तटफेरी मारताना आपल्याला शत्रूवर मारा करण्यासाठी बांधलेल्या जंग्या, वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे गोलाकार बुरुज, गडाच्या एका बुरुजावर बांधलेली खोली आपणास पहावयास मिळते. गडावर थोडीशी पडझड झालेल्या दुमजली इमारतीचे अवशेष आहेत. त्याच्या शेजारी गणपती मंदिर असून मंदिरासमोर दीपमाळ आहे. येथे समोरच जयबाचे स्मारक नावाचे ठिकाण आहे. आदिलशाहने या गडाचे बांधकाम काढल्यानंतर गडाचा तट वारंवार कोसळत होता. त्या वेळी नरबळी देण्याची कल्पना पुढे आली. जयबा नावाच्या माणसाने स्वतःला गडाच्या पायात जिवंत गाडून घेतले व त्यावरच हा तट बांधण्यात आला. या घटनेची आठवण म्हणून या गडाचे नाव जयगड पडले अशी दंतकथा सांगितली जाते. (स्मारक संदर्भ - वेध जलदुर्गांचा लेखक - भगवान चिले )
गणेश मंदिराच्या मागे राजवाड्याची भग्न वास्तू आहे. तसेच गडावर एक चोरदरवाजा, पाण्याच्या तीन विहिरी, सदरेच्या इमारतीचा चौथरा, तटात जागोजागी सैनिकांना विश्रांतीसाठी बांधलेल्या देवड्या व भक्कम बांधणीची दारुकोठारे पाहावयास मिळतात.
 
किल्ल्याला पडकोट आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला खंदकात जाण्यासाठी केलेल्या प्रवेशद्वाराने आपण पडकोटात प्रवेश करतो. येथे दगडातील एक छोटी शिलागुंफा आहे. गुहेत मोहमाया देवीचे ठिकाण दिसते. गडाच्या समुद्राकडील दरवाजाकडे जाताना गर्द झाडीत ३ पाषाणस्तंभ पहावयास मिळतात.
 
तसेच किल्ल्याचा तटबंदी वरून आपल्याला एका बाजूला जिंदाल पावर प्लांट दिसतो . हा प्रकल्प म्हणजे कोंकणात आधुनिकीकरणाची नांदी पण त्याच्या इथल्या निसर्ग सृष्टीवर होणारा परिणाम, घटत जाणार आंबा बागांच उत्पादन विचार करायला लावत खरचं ही चांगली नांदी आहे की विनाशा कडे नेणारी. असो... किल्ल्यावरून एका बाजूला अथांग समुद्राचा व दुसऱ्या बाजूला खाडीचा रमणीय असा परिसर आपल्याला दिसतो.
कोळीसरे परिसराचा नकाशा
कोळिसरे :
 जयगडजवळच्याच आणखी एका ठिकाणाची माहिती करुन घेउ. गणपतीपुळ्याला तर अनेक जण जातात; पण त्याच मार्गावरचं कोळिसरे हे निसर्गाच्या कुशीत दडलेलं मंदिर आणि तिथला परिसर कुलदैवत नसलेल्या पर्यटकांच्या फारसा परिचयाचा नसतो. गणपतीपुळे आणि जयगडसह आवर्जून भेट द्यावी, असं हे ठिकाण.
   मुंबई किंवा पुणे मार्गे जायचे असल्यास पुणे-बंगळुरू हायवेवर उंब्रज फाट्याला उजवीकडे वळून चिपळूण मार्गे जावे लागते. रत्नागिरी-जयगड रस्त्यावर हातखंबा गावानंतर निवळी फाटा आहे. आधी जाकादेवी, मग चाफे, मग पुढे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर कोळिसरे फाटा आहे. ह्या ठिकाणाहून कोळिसरे गाव २ किलोमीटर आत आहे. रत्नागिरीहून इथे यायचे असल्यास दुपारची रत्नागिरी-रीळ ही एस. टी. सोयीची आहे. तथापि, आपल्या सोयीने यायचे असल्यास स्वत:चे अथवा खाजगी वाहन अर्थातच अधिक उपयुक्त ठरेल.कोकणातली आडवाटेवरची सगळीच गावं डोंगरावरच्या गर्द झाडीत लपलेली आणि निसर्गसौंदर्याची भरपूर उधळण असलेली आहेत. कोळिसरे गावात प्रवेश करताना सभोवतीचा निसर्ग असाच मन अतिशय प्रसन्न करतो.  हिरवळीने वेढलेल्या पर्वतरांगा आणि उन्हाळ्यातही तूलनात्मक दृष्ट्या कमी तापमान यामुळे इथे पर्यटकांची एप्रिल-मे महिन्यातही ये-जा असते. अगदी जंगलासारखी घनदाट झाडी हे या गावचे वैशिष्ठ्य. कोळिसरेमधल्या लक्ष्मीकेशव मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांची एक छान उतरंड आहे. डोंगराच्या उतारावर, वरून सहज दिसणार नाही, अशा रीतीनं हे मंदिर वसलेलं आहे. त्याचं स्थान आणि एकूण परिसरच आपल्याला प्रचंड उत्साह, ऊर्जा देतो. दाट झाडीत लपलेलं हे मंदिर बघूनच उतरून तिथपर्यंत जाण्याची उत्सुकता दुपटीनं वाढते.
लक्ष्मीकेशवाची मूर्तीलक्ष्मीकेशवाची मूर्ती
लक्ष्मीकेशव देवस्थानाच्या निर्मितीची आख्यायिका खूप रंजक आहे. मराठवाड्यातल्या मालखेडचं राष्ट्रकूट घराणं (इ. स. ७५० ते ९७३) महाराष्ट्रावर राज्य करत होतं. त्यांची विष्णूवर अतिशय भक्ती होती. या घराण्याच्या सदस्यांनी अनेक ठिकाणी विष्णूच्या सुंदर मूर्तींची स्थापना करून, त्यांची मंदिरं बांधली. अनेक वर्षांनंतर हा भाग यादव घराण्याच्या अंमलाखाली आला. त्याच सुमारास परकीय मुस्लिम आक्रमकांनी मंदिरं आणि मूर्ती यांच्यावर हल्ले करायला सुरुवात केली होती. त्यांच्यापासून विविध देवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. त्यातलीच ही लक्ष्मीकेशवाची एक मूर्ती. ती कोल्हापूरला हलवण्यात येऊन रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर वऱ्हवडे गावातले श्री. जोशी, श्री. विचारे आणि श्री. काणे या तिघांना मूर्ती कुठे आहे, याचा दृष्टांत झाला. त्यांनी कोल्हापूरला जाऊन मूर्ती ताब्यात घेतली. ती एका लाकडी पेटीत घालून खाडीतून देवरूख-संगमेश्वरमार्गे आणत असताना विश्रांतीसाठी कोळिसरे गावात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मूर्तीची पेटी एवढी जड झाली, की त्यांना उचलता येईना. त्याच वेळी कोळिसरे गावातले ग्रामस्थ भानुप्रसाद तेरेदेसाई यांना ‘या मूर्तीची प्रतिष्ठापना गावातच करावी,’ असा दृष्टांत झाला आणि ही मूर्ती गावातच ठेवून या लक्ष्मीकेशव मंदिराची उभारणी करण्यात आली, असं सांगितलं जातं.
     सन १५१० मध्ये भानुप्रभू तेरेदेसाई कुटुंबीयांनी हे मंदिर बांधलं.भानुप्रभू हे बहामनी राज्यातील सैतवडे महालातील गावांचे महालकरी होते. हेच तेरेदेसाई दाभोळसमोरच्या अंजनवेल म्हणजे गोपाळगडाचे किल्लेदार होते. मंदिराची उभारणी करत असताना एका ठिकाणी खणताना पाण्याचा झरा सापडला. तिथून स्वच्छ आणि शुद्ध पाणी अखंडपणे वाहत होतं. तो झरा अजूनही देवळाच्या खालच्या बाजूला आहे आणि बारमाही वाहतो. निसर्गाचे असे काही चमत्कार खरंच माणसाला थक्क करून सोडतात. या झऱ्याचे पाणी स्वामी स्वरूपानंद यांना आवडायचे.
    लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||
 
देवळातली लक्ष्मीकेशव मूर्ती अतिशय आकर्षक आणि सुबक आहे. काळ्या संगमरवरात ती घडवलेली असून, पाच फूट उंचीची आहे. चार हातांपैकी उजव्या हातात कमळ, एका हातात शंख, डाव्या हातात चक्र आणि गदा अशी शस्त्रं आहेत. मूर्तीच्या मागे प्रत्येक बाजूला पाच, असे विष्णूचे दहा अवतारही कोरलेले दिसतात. अतिशय वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना होते. देवळाच्या सभामंडपात गेल्यावर तेथून हलावेसेच वाटत नाही. सुंदर, कोरीव लाकूडकाम, स्वच्छता यामुळे येथील पावित्र्य आणखीच वाढते.
उत्सव
श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात होतो. या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. आणखी काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून या देवस्थानचा सगळा कारभार पाहणार्‍या 'श्रीलक्ष्मीकेशव देवस्थान ट्रस्ट' यांच्या नावे देणगी देऊन आपल्याला मदत करता येऊ शकते.
जेवणाची व रहाण्याची सोय
श्री. तेरेदेसाई यांच्याकडे जेवणाची सोय होऊ शकते. देवदर्शनाला जाताना त्यांना जेवणाचे सांगून मग देवदर्शन घेऊन त्यांच्याकडे जेवायला यावे. निवासस्थानाच्या जवळच 'लकेर' नामक भक्तनिवास आहे तेथे राहण्याची तसेच चहा व फराळाची सोय होऊ शकते. लकेर म्हणजेच लक्ष्मी-केशव-रत्नेश्वर यांची अद्याक्षरे! पर्यटकांची फारशी गर्दी नसल्याने आठवड्याच्या एखाद्या मधल्याच वारी गेल्यास (शनिवार-रविवार सोडून कुठलाही वार) आगाऊ आरक्षण करण्याची तशी गरज नाही. तरीही गैरसोय टाळायची असल्यास आधी पत्रव्यवहार किंवा फोनाफोनी करावी हे उत्तम. श्री. तेरेदेसाई यांचा फोन क्रमांक मिळू शकला नाही, पण पुजारी श्री. मराठे यांच्याशी (०2357)-243835 या क्रमांकावर संपर्क साधून श्री तेरेदेसाई यांचा संपर्क होऊ शकतो.
      जयगड परिसराची भटकंती आटोपून आपण आता रत्नागिरी जिल्ह्याच्या आणखी उत्तर भागात जाउया. रेवस ते रेड्डी अश्या नितांत रमणीय "सागरी महामार्गाचा" प्रकल्प महाराष्ट्र शासन उभारते आहे, त्यातील बराचसा भाग पुर्ण झाला आहे. मात्र काही ठिकाणी खाड्यांची पात्रे रुंद असल्याने आणि खोली अधिक असल्याने त्या खाड्यांवर पुल उभारण्या एवजी तिथे फेरी सेवा सुरु आहे. थेट आपली बाईक, चारचाकी या फेरीत चढवून थेट फेरीच्या रुफटॉपवर जायचे आणि खाडीवरुन येणार्‍या थंडगार वार्‍याची मजा घेत सभोवतालचा निसर्ग न्याहाळायचा. खाडीचे निळे पाणी, त्यात अलगद पोहणारे आणि मधूनच सुळकन दर्शन देउन जाणारे मासे,नदी कडेची खाजणे , सोनेरी रंगाच्या वाळुचा मस्त किनारा आणि हिरव्या रंगाची दाट सुरुची बने असा मस्त निसर्गाचा कॅनव्हास बघता बघता हा फेरीचा छोटासा जलप्रवास कधी संपतो ते कळत नाही.
 
अश्याच एका प्रवासाचा आपण अनुभव घेउन जयगडच्या धक्यावरुन सुवर्णदुर्ग शिपींग सर्व्हिसेसच्या फेरीने आपण तवसाळला जाउया.
तवसाळचा समुद्रकिनारा अप्रतिम आणि बराच अस्पर्शित आहे. समोर जयगड किल्ला आणि बंदर दिसत असते तर पाठीशी विजयगड किल्ल्याची राहिलेली तटबंदी उभी असते. वेळ असल्यास या तवसाळ बीचला जरुर भेट द्या.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...