चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण हे महत्त्वाचे ठिकाण आहे. चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, कदंब, क्षत्रप, कलचुरिस व राष्ट्रकूट यांनी राज्य केले. त्यानंतर दिल्ली सल्तनत, आदिलशहा, मराठा यांचे येथे वर्चस्व होते.शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे'परिसर पाहायला हवा. शहरात हायवेला लागून पाग नावाचा भाग आहे. तेथे पागा असाव्यात. आदिलशाहीमध्ये मक्केकडून विजापूरला येण्यासाठी जी बंदरे विकसित केली गेली, त्यापैकी गोवळकोट हे चिपळूणला लागून असलेले महत्त्वाचे बंदर होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते,इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत,येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा. गुहागर तालुका व चिपळूण तालुक्यातील ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. निसर्गसंपन्न चिपळूण हे अनेक घाटांनी वेढलेले आहे.
चिपळूण परिसराचा नकाशा
चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक ‘स्वामी’ अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला ‘नंदी’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात ‘श्रीलक्ष्मी मल्लमर्दन’ची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशव’ स्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य,राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.
चिपळूणचे वैभवशाली वस्तुसंग्रहालय
संग्रहालयात शिरल्यावर डाव्या बाजूने पाहत आत गेलो, की मनाला थक्क करणाऱ्या अनेक वस्तू दिसतात. संग्रहालयाच्या सुरुवातीलाच दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मीळ पुरातन वस्तूंचा खजिना दिसतो. येथील काही दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱ्या आपल्याला तब्बल किमान १२ लाख वर्षे (आदिम पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, इतिहासपूर्व, नवपाषाण, सिंधू संस्कृती, ताम्रपाषाण, महापाषाण) मागे घेऊन जातात. या वस्तू पुण्यातील जागतिक कीर्तीच्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेचे (डेक्कन अभिमत विद्यापीठ) कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूप मूर्ती, भोम (ता. चिपळूण) येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कट्यार आदी शिवकालीन शस्त्रे, दगडाच्या ठोकळ्यात कोरलेला चारशे वर्षांपूर्वीचा गणपती, कलात्मक कंदील, दुसऱ्या महायुद्धात वापरलेली भूमापन दुर्बीण, वाळूचे घड्याळ, फोनचा प्रवास दर्शविणारे जुने लाकडी टेबलावरील आणि भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्ट्यपूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटीयन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काट्यापासून बनविलेली पेटी, दक्षिण ध्रुवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक (कणकवली), सिलिका (कासार्डे-तरळा), आयर्न ओअर (फोंडा-कणकवली), क्वार्टझ् (वाटूळ-लांजा), बॉक्साइट (केळशी-दापोली), जांभा (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आदी खनिजे, होकायंत्राची दिशा बदलविणारे देवाचे गोठणे (राजापूर) येथील दगड, जुना सारीपाटाचा खेळ अशा विविध वस्तू आकर्षक रचनेत मांडण्यात आल्या आहेत.
दोन हजार वर्षांपूर्वीपासून अगदी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश कालखंडापर्यंतची नाणी येथे पाहता येतात. त्यात मौर्य, सातवाहन, कुषाणकाळ, शिलाहार, रोमन, पोर्तुगीज डच, शिवकालीन, पेशवेकालीन, इंदूर संस्थान, नागपूर संस्थान, झाशी संस्थान, ग्वाल्हेर संस्थान आदींच्या पुरातन नाण्यांचा समावेश आहे. पहिल्या महायुद्धात मिळालेली सन्मानपदके, १२व्या शतकातील सोन्याचे पद्मटंक आणि शिलाहारकालीन (शतक नऊ ते अकरा) डाळीच्या एका दाण्याच्या आकाराचे सोन्याचे फनम या गोष्टी संग्रहालयाच्या खजिन्याचे मूल्य वाढवत आहेत. विचारपूर्वक तयार करण्यात आलेले कोकणातील खेडेगावातील स्वयंपाकघर, तेथील भाकरी थापणारी महिला, चूल, चिमटा, फुकणी, तांब्या, लाकडाचा पलिता, पाटा-वरवंटा, पाणी तापवण्याचे तपेले, कंदील, लाकडाची विळी, रॉकेलचा दिवा आदि साहित्य आपल्याला ग्रामीण लोकजीवनाचा नजरा दाखवते. त्यासोबतच कोकणी वापरातील कणगी, पाणी तापवायचा बंब, हरीक दळायचे जाते, पातेली, काथवट, लाकडी मापटी, घिरट, उखळ, शंभर वर्षांपूर्वीची लाकडी पेटी, पंचपाळे, चौफुला, नारळाच्या करवंटीपासून बनविलेले जेवण वाढायचे डाव, तांब्या-पितळेचे हंडे-कळश्या यांसह कोकणी देवघरातील दोनशे वर्षे जुनी प्रभावळ, समई, फुलदाणी, आरतीचे ताट, संपुष्ट, तेल घालायचे भांडे, करा-दिवा, पंचदीप, पूजेची उपकरणे, रक्तचंदन, विष्णुमूर्ती आदि दोन-तीनशे वर्षांपूर्वीच्या वस्तू आपल्याला कोकणाची सैर घडवून आणतात.
डेरवणनजीक कुडप गावी मोठाल्या झाडाच्या खोडालाही लाजवतील अश्या वेलीनी समृद्ध ३७ एकर देवराईच्या वनात,भगवान शंकराचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभार्यात तीन शाळूंखेवर सोमेश्वर, रामेश्वर, वैजनाथ ही तीन रूपे चार लिंगात स्थापित असलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी जांभ्या दगडातील ९२ पायर्या चढून जावे लागते.अभ्यासकांच्या अंदाजानुसार, सन १७५० ते १८०० दरम्यानची ही लिंगे स्मृती स्वरूपात स्थापन केली गेली असावीत. यातील दुहेरी लिंग हे दोन गुरूबंधू अथवा गुरू-शिष्य प्रतीकअसावे. फार पूर्वी आपल्याकडे महत्वाची व्यक्ती गेल्यानंतर ‘लिंग’ स्थापन करण्याची प्रथा होती. अनेक प्राचीन वीरगळींवर आपल्याला शिवपिंडी कोरल्याचे दिसते. निसर्गरम्य लोटनशहा दर्गा हे शहरातील उंचीवरचे ठिकाण आहे. इथल्या वनराईत विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे.
डेरवण, निवळी, तेरव परिसराचा नकाशा
तेरव :
येथील मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे आहे. १८६०मध्ये त्याचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर २००२मध्ये लोकवर्गणीतून भव्य मंदिर बांधण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या यादीत अधिकृत पर्यटनस्थळ म्हणून हे समाविष्ट करण्यात आले आहे. मंदिरात चार देवींच्या मूर्ती आहेत. भवानी, वाघजाई, कालकाई आणि नवदुर्गा अशा चार देवता येथे आहेत. तसेच सात उद्यानांनी त्याची शोभा वाढविली आहे. कामथे रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेला हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
डेरवणची शिवसृष्टी :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या पुढे सावर्डेपासून डावीकडे सुमारे २ कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीतारामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन १९८५ साली उभारली आहे. कै. गणेश (दादा) पाटकर या शिल्पकाराने सुमारे १५ वर्षांच्या मेहनतीतून इथे शिल्पे साकारली आहेत.
श्रीसंत सीताराम बुवा आत्माराम वालावलकर यांच्या निकटवर्तीयांनी सद्गुरू जोशी तथा दिगंबरदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आपला समाज व राष्ट्र वैभवशाली बनविण्याची स्फूर्ती केवळ दृश्यरूपातील शिवचरित्र अनभुतीतून येईल, हा विचार सद्गुरू दिगंबरदास महाराजांनी प्रत्यक्ष उतरविण्यास डेरवणची भूमी निवडली. पंधरा वर्षांच्या अथक मेहनतीतून शिवाजी महाराजांची शिवशिल्पसृष्टी प्रत्यक्षात साकारली. हे ठिकाण एखाद्या छोट्या किल्ल्याप्रमाणे बनवले आहे.


श्रीशिवसमर्थ गडात भव्य तटबंदीतून प्रवेश करताना प्रथम सुसज्जतेने गस्त घालणारे मावळे स्वागतास दुतर्फी सामोरे येतात.
गडाच्या महादरवाजासमोर दोन हत्ती झुलत आहेत.








महादरवाजाच्या आत प्रवेश करताच दिव्य शिल्पसृष्टी चित्त वेधून घेते. शिवचरित्रातील चित्तथरारक प्रसंग घटना कलात्मकतेने साकारले आहेत. तटबंदीवर चौफेर कडा पहारा देत उभे असलेले मावळ्यांचे पुतळे अगदीच जिवंत वाटतात. प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि प्रत्येकाच्या हातातील विविध मराठा हत्यारे कल्पकतेने बनवलेली आहेत.
येथील परिसरात प्रवेश करतानाच समोर रस्त्यावर दुतर्फा असलेले घोड्यावरील सशस्त्र मावळे आपल्याला शिवकाळात घेऊन जातात. लहान मुले तर मावळे पाहून हरखून जातात. येथे शिवसमर्थ गड या नावाने उभारलेल्या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित शिल्पे कोरण्यात आली आहेत. शिवरायांच्या लहानपणापासून अनेक प्रसंग यात साकारले आहेत. विविध प्रसंग अक्षरशः जिवंत वाटतात व बघणाऱ्यांना खिळवून ठेवतात.
शिवराज्याभिषेकाचे शिल्प फारच अप्रतिम आहे. शिवसृष्टीच्या जवळ असलेला समाधी मंदिराचा परिसरही अत्यंत रम्य व शांत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत पर्यटक शिवसृष्टीला भेट देऊ शकतात. सीतारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही भव्य शिवसृष्टी उभारली गेली आहे. कोकणाची पर्यटनातील हे एक प्रमुख ठिकाण झाले आहे. येथे वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हॉस्पिटलही चालविले जाते.
दोणवली :
हे चिपळूण तालुक्यातील एक निसर्गरम्य ऐतिहासिक गाव आहे. गावात पेशवेकालीन श्री सिद्धिविनायक मंदिर उभे आहे. गाभाऱ्यात संगमरवरी पाषाणाची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची सुबक मूर्ती आहे. मंदिराचा सभामंडप उघडा असून गाभारा बंदिस्त आहे. मंदिराची बांधणी जांभा दगड, गूळ, चुना इत्यादींपासून केली आहे. हे मंदिर इ. स. १७७४ दरम्यान थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले असा उल्लेख आहे. मंदिराच्या पिछाडीस ओहोळावर असलेला मोठ्या आकाराच्या जांभ्या दगडापासून तयार केलेला अर्धवर्तुळाकृती ऐतिहासिक पूल बघण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक येत असतात. खेकडे संवर्धनासाठी या गावाची निवड करण्यात आली आहे.
बिवली : ‘
बिवलीचा लक्ष्मीकेशव’ प्रसिद्ध आहे. शाळिग्रामापासून बनविलेली लक्ष्मीकेशवाची मूर्ती पाहण्यासाठी भाविक तर येतातच; पण या शिल्पाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक आणि इतिहासाचे अभ्यासकही येतात. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या प्रकारच्या मूर्तीस केशवमूर्ती म्हणतात. परकीय मूर्तिभंजकांपासून वाचवण्यासाठी गावोगावचे लोक देवळातील सुंदर मूर्ती त्या काळी विहिरीत, कुंडात, डोहात टाकून देत असत किंवा कधीकधी जमिनीत लपवून ठेवूत असत. अशीच एक मूर्ती नीलकंठशास्त्री थत्ते यांना सापडली आणि त्यांनी ती मूर्ती बिवली या आपल्या गावी बसवली. हे नीळकंठशास्त्री थत्ते न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले होते. चिपळूणपासून २५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कोकणात श्री विष्णूची अनेक मंदिरे आहेत. दिवेआगरपासून अशा मूर्ती दिसून येतात. साधारण शिलाहार व होयसळ शैलीचा प्रभाव या शिल्पांवर दिसून येतो. ११-१२व्या शतकात या ठिकाणी शिलाहार राजांची राजवट होती. प्रत्येक मूर्तीच्या शिल्पामध्ये वेगळेपण असले, तरी शैली एकच दिसून येते. मूर्ती सालंकृत असून, डोक्यावर समृद्धीचे प्रतीक असलेला शोभिवंत मुकुट आहे. तसेच ‘तीन माळा गळा’ शोभून दिसतात. यातील एका माळेतीळ पदकात आंबे दिसून येतात. बारकाईने पाहिल्यास अनेक दागिने कोरलेले आढळून येतात. मंदिर परिसर निसर्गरम्य आहे.
वाशिष्ठी बॅकवॉटरची रम्य सफर!
वाशिष्ठीच्या बॅकवॉटरमध्ये दिवसभर क्रोकोडाइल टुरिझमचा आनंद घेण्यासाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केली आहे. २०१४पासून वर्षातून दोन वेळा म्हणजेच नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जातो. प्रति वर्षी किमान २५ हजार पर्यटकांची उपस्थिती या उपक्रमाला सातत्याने लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवंगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातली वाशिष्ठी खाडी, तिच्यातली छोटी-मोठी बेटं, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि इथल्या समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळतो आहे.
वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्नािगिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरच्या झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम आहे. या उगमाचा शोध आम्ही नव्यानं, नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून २०१५ साली सहकारी मित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास महाडिक यांच्या साथीनं घेतला होता. नैसर्गिकदृष्ट्या कोणत्याही नदीचं मुख हा एक अद्भुत जादुई प्रदेश असतो. वाशिष्ठीबाबतही तसेच आहे. आगामी काळात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या माध्यमातून ‘वाशिष्ठी सफर (परिक्रमा) : उगम ते संगम’ हा चिपळूणच्या पर्यटनातला महत्त्वाकांक्षी उपक्रम पर्यटकांसाठी सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे.
वाशिष्ठी नदी चिपळूण, खेड, गुहागर, दापोली तालुक्यांच्या सीमांतून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. खेडकडून येणारी जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. या वाशिष्ठीला नारिंगी, तांबी, धावती, वैतरणा आणि शिवनदी या नद्या येऊन मिळतात. कोयना अवजलामुळे वाशिष्ठी सदा भरलेली, वाहणारी असते. या वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. अचाट वैविध्याची रेलचेल असलेल्या या खोऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बावी, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, छोटे ओहोळ यांसह खारफुटीची जंगलं, ससे, साळींदर, बिबटे, कोल्हे, रानगवे, अन्य प्राणिसंपदा असून, ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपं आहेत.
फार पूर्वी शिवनदी हीच चिपळूणची जीवनवाहिनी होती. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात, डोंगरात होतो. शिवनदी शहराच्या मध्यभागातून वाहते. तिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्चिीम असे दोन भाग नैसर्गिकरीत्या निर्माण झाले आहेत. तिची शहरातली लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. या नदीवर कामथे आणि फणसवाडी असे दोन बंधारे आहेत. शिवनदीच्या पात्रातून चिपळूणमधील पागमळ्यापर्यंत पूर्वी लहान होड्यांचा प्रवास चाले. मालवाहू-प्रवासी गलबते गोवळकोट बंदरातून, वाशिष्ठी नदीमार्गे बाजारपूल, बंदरनाका परिसरात येत. तिथे गलबतातला माल हा लहान नावांत घालून शिवनदी पात्रातून पागमळा परिसरात चढ-उतारासाठी येत असे. वाशिष्ठीला कोयनेचं अवजल उपलब्ध झाल्यानंतर शिवनदीचं महत्त्व झपाट्यानं कमी होऊन तिचं अस्तित्व कचरा, गाळ, दूषित सांडपाणी यांमुळे संपल्यात जमा आहे.
कोयनेच्या या अवजलाचा वापर कशा प्रकारे करावा, याबाबत उपाय सुचवण्यासाठी शासनानं जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑक्टोबर २००५ रोजी पाच सदस्यांच्या अभ्यासगटाची स्थापना केली होती. २९ ऑगस्ट २००६ रोजी या समितीनं राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. या पाण्याच्या मदतीनं कोकणातलं सुमारे एक लाख ७० हजार ५०५ एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं, असं पेंडसे समितीचा अहवाल सांगतो. सुमारे ४०० पानांचा हा अहवाल २०१३पर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. पेंडसे समितीचा अहवाल आजही राजकीय साठमारीत इतर अनेक अहवालांप्रमाणे धूळ खात पडला आहे. संघर्षाची फार मानसिकता नसलेल्या इथल्या जनतेला, लोकप्रतिनिधींना या पाण्याच्या पुनर्वापराद्वारे संपूर्ण कोकणची तहान भागवावी यासाठी आपण सर्वपक्षीय एकत्र यावं, असं कधीही वाटलेलं नाही. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचं रासायनिक प्रदूषण, सडणाऱ्या पाइपलाइन, जळणारी पिकं, कमी होत गेलेली मस्यसंपदा, पशु-पक्षी, मातांच्या दुधात मिळणारे अवजड धातूंचे अंश, बेकायदा वाळूउपसा इतके होऊनही वाशिष्ठी अजूनही संपलेली नाही. आजही वाशिष्ठीच्या खोऱ्यात वैविध्याची रेलचेल आहे.
अंजनवेलचा गोपाळगड किल्ला याच वाशिष्ठीच्या दाभोळ खाडीमुखावर वसलेला आहे. मराठी आमदानीत हे जिल्ह्याचे ठिकाण होते. किल्ला तीन बाजूंनी समुद्रवेष्टित असून, चौथ्या बाजूला खंदक आहे. भोवतालचा तट जाड दगड व चुन्यापासून तयार केलेला, २० फूट उंच, आठ फूट रुंद आणि चांगला भक्कम आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे दोन वाशिष्ठीचे पहारेकरी आहेत. गोविंदगड किल्ला जंजिऱ्याच्या हबशांनी बांधला. तो शिवाजी महाराजांनी १६७० साली जिंकून घेतला. एका छोट्या बेटावर वसलेल्या किल्ल्याचा परिसर दोन एकर आहे. या किल्ल्यात रेडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातल्या तोफा व पाण्याचा मोठा हौद असून, सहा तोफांचं हल्लीच एकत्रित जतन केलेलं पाहायला मिळतं.
वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर मालदोली गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली अभियांत्रिकी आश्चर्य ठरलेली ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही वारसा वास्तू आहे. उपलब्ध मौखिक माहितीनुसार या वास्तूचे प्लॅनिंग भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले होते. खाडीकिनारी वसलेल्या या वास्तूची आजची काठिण्यपातळी मोहवून टाकणारी आहे. साडेसात एकर जागेत अंदाजे दोन हजार चौरस फूट आकारात ही वास्तू आहे. उंचीवरील जिने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार नाही, असे पाहून या जिन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. ९० वर्षांनंतरही या वास्तूतल्या लाकडाला काहीही झालेलं नाही. वास्तूतल्या जवळपास वीस-बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंतीतली दोन कपाटं आहेत. खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतल्या प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. छताच्या ‘लगी’ आज नव्वदीनंतरही मजबूत असून, त्यांना कुठंही बाक आलेला नाही. छपराच्या नऊ इंच आयबीमची मजबुती नव्वद वर्षांनंतरही सहज नजरेत भरते. भिंतींचा मूळ गिलावा अजिबात हललेला नाही व त्याचे तुकडे गळून पडलेले नाहीत. वास्तू परिसरात आंब्याच्या ८० झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरीचे (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) झाड आहे. पीक भरपूर यायला हवं, याकरिता वनस्पतिशास्त्रानुसार परागीकरण भरपूर व्हायला हवं. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येऊन भरपूर परागीकरण व्हावं, म्हणून या सुगंधी झाडांची रचना इथं करण्यात आली आहे.

मालदोली गाव
वाशिष्ठीच्या जोडनद्यांमध्ये गोंधळेसह दापोली तालुक्यातल्या उन्हवरे गावातले गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझी लेणी, मालदोली बंदरासमोरची गुहा लहान बोटीनं भरती-ओहोटीची वेळ बघून, साधारण द्वादशी ते चतुथीपर्यंत जाऊन बघू शकतो. गाडीनं जाण्यासारखी दोन प्राचीन ठिकाणं म्हणजे बिवली गावचं प्राचीन लक्ष्मीकेशव मंदिर आणि दोणवलीचं सिद्धिविनायक मंदिर होय. दाभोळ ते चिपळूण-गोवळकोट बंदरांचं अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ किलोमीटर आहे.
अलीकडच्या काही वर्षांत, वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल टुरिझम
विकसित झालेल्या दाभोळ ते गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४
कि.मी. आहे. चिपळूण बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल सफारी दम्यान वाळूत पहुडलेल्या
मगरींसोबत, आपण मराठी साहित्यात ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीतून श्री.ना.
पेंडसे यांनी आजार्मार केलेला तुंबाड किनारा,विविध बेटे आणि दोन्ही
तीरावरील विविधता अनभवू शकतो. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला
जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन,शक्तिशाली
बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ
डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर
म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब
या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन
१९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी
मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे
‘विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक
वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध
जीवनानुभव ठरावा.
गोवळकोट :
गोवळकोट ऊर्फ गोविंदगड हा गिरिदुर्ग वाशिष्ठी खाडीच्या तीरावर उभा आहे.

प्रसिद्ध मुस्लिम विचारवंत दिवंगत हमीद दलवाई व विद्यमान खासदार हुसेन दलवाई हे गोवळकोटजवळील मिरजोळी या गावचे सुपुत्र. हा किल्ला चिपळूणपासून अगदी जवळ म्हणजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. पायथ्याशी करंजेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आहे. निसर्गाच्या सान्निध्यातील हे मंदिर खूपच छान आहे. हा किल्ला एखाद्या बेटासारखा आहे.

गोवळकोट किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी असून, जवळच गोवळकोट बंदर आहे. पूर्वी किल्ल्यावर २१ तोफा होत्या असे म्हणतात. करंजेश्वरी मंदिराजवळील पायऱ्या चढून गेल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी समोर दोन बुरुज व त्यामध्ये दरवाजाची जागा दिसते. परंतु आज तिथे किल्ल्याचा दरवाजा, त्याचे खांब व कमान यांच्या फक्त खुणाच शिल्लक आहेत. क्रिकेटपटू गुलाम परकार या गावचेच.
चिपळूणचा पहारेकरी अशी नोंद असलेला, दोन एकर शेत्रात विस्तारलेला किल्ले गोविंदगड आवर्जून पाहावा असा आहे. ३४२ पायऱ्या चढून वा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण १२ बुरुजांपैकी ४ बुरुज सुस्थितीत आहेत. चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात आहे. किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो.
किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या याच देवीचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
पर्यटकांच्या प्रवास मार्गावर आणि मोक्याच्या ठिकाणी (विसावा पॉइंट) पर्यटन फलक, नवे पर्यटन प्रकल्प, संग्रहालय निर्मिती, किमान पर्यटन हंगामात शहर सुशोभिकरण, स्वच्छता,रेल्वेस्टेशन ते गांधारेश्वर मार्गे चिपळूण शहर या अंतर्गत रस्त्याची सुधारणा, पर्यटन डॉक्युमेंटेशन, आपल्याकडील विसावा पॉइंट सारख्या ठिकाणी संकासूर, जाकडी,कोळीनृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेराव-पर्यटक फोटो दर्शन यावर विचार करावा लागणार आहे. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण राज्यभर कुठेही फिरा, आपल्याला काही महत्वाच्या ठिकाणी, मुख्य मार्गावर ‘आपण येथे आहात ; u are here’ असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहे ? याची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातील, बरच काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेल, आपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं ?याचे नियोजनही करू. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहे,अशी व्यवस्था आपण चिपळूणात करायला हवी आहे. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६’ वर मध्यवर्ती असलेल्या चिपळूणनजीक एखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे समृद्ध प्राचीन कोकणी खेडे अगदी जसेच्या-तसे, धूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावात, खानपान, जगण्याच्या काही सवयी, मनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! काय हरकत आहे ? अशा नव्या गोष्टींचा आगामी काळात विचार करायला लागणार आहे. चिपळूणात कोकणी खाद्यसंस्कृती हमखास जपणारी काही हॉटेल तयार व्हायला हवीत, त्यांचे मार्केटिंग व्हायला हवे.
चिपळूणात, शहरानजीक दीडशे फुटावरून कोसळणारा बाह्यवक्र जलप्रपात 'सवतसडा' हा अगदी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांच्या पावसाळी आकर्षणाचा विषय आहे. त्यासोबतच वीर-देवपाट येथे १०० फुट उंचीवरून दोन टप्यात कोसळणारा बारमाही धबधबा, अडरे धबधबा आणि कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात विसावा पॉइंट असून येथून वळणावळणाच्या ‘वाशिष्ठी’ नदी पात्राचे विहंगम दृश्य पाहाता येते. चिपळूणचे उद्योगपती श्रीराम रेडीज यांनी धामणवणे येथील आपल्या १०० एकर जागेत ‘एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स’ फार्मची उभारणी केली असून येथे जंगल सफारी,नेचरट्रेल, पक्षी अभयारण्य, शेततळे, कँप, बाल्या नृत्य, जाखडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्थाही अशा ठिकाणी मागणीनुसार होऊ शकते. याखेरीज शहरात पेढे-परशुराम येथे तालुक्यातील पहिले ‘श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्र’असून अशी इतर ७-८ केंद्रे कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले डी.बी.जे.महाविद्यालयाचे जैवसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध २१ दुर्मीळ प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे जतन येथे करण्यात आले आहे. तालुक्यात ११२ देवराया असून त्यातल्या दसपटी, कुडप, वीर, गुढे, शिरंबे येथील देवरायात‘नेचरट्रेल’ची अनुभूती घेता येते.
वैजी गावातील प्राचीन विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे. चिपळूणच्या इतिहासात प्राचीन संदर्भ असलेल्या, ई. स. सहाव्या शतकापासूनचे पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या ‘राजेशिर्के’ यांचे कुटरे, डेरवण आणि तळसर येथील मराठा वास्तुशैलीने युक्त चौपाखी वाडे आपला इतिहास सांभाळून आहेत. या वाड्यात दोन दशकांहून अधिक काळातील वापरातील विविध वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यासोबतच मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या “ रामचंद्र वासुदेव मराठे न्यास” या हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते. त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे.
चिपळूणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात ‘खाडी,डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला,हेरीटेज’ अशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून निर्माण झाल्या तर आज येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निश्चित वाढ होईल.गोव्यात ‘मांडवी’ आणि‘झुआरी’ नदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहे, मग संपूर्ण महाराष्ट्रात बारमाही वाहणाऱ्या एकमेव, चिपळूणला ‘आपण’पर्यटन समृद्ध करू शकतो आहोत. फक्त याचा नीट विचार व्हायला हवा.त्याच-त्याच पर्यटनस्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांसाठी ‘डेस्टिनेशन चिपळूण’ एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. अलिकडच्या काही वर्षांत ‘क्रोकोडाईल टुरिझम’साठी महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेल्या चिपळूणच्या विविधांगी ‘पर्यटन श्रीमंती’चा हा आढावा आपल्यालाही चिपळूण पर्यटनाबाबत अनुकूल बनवेल.
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण हे महत्त्वाचे ठिकाण आहे. चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, कदंब, क्षत्रप, कलचुरिस व राष्ट्रकूट यांनी राज्य केले. त्यानंतर दिल्ली सल्तनत, आदिलशहा, मराठा यांचे येथे वर्चस्व होते.शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे'परिसर पाहायला हवा. शहरात हायवेला लागून पाग नावाचा भाग आहे. तेथे पागा असाव्यात. आदिलशाहीमध्ये मक्केकडून विजापूरला येण्यासाठी जी बंदरे विकसित केली गेली, त्यापैकी गोवळकोट हे चिपळूणला लागून असलेले महत्त्वाचे बंदर होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते,इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत,येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा. गुहागर तालुका व चिपळूण तालुक्यातील ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. निसर्गसंपन्न चिपळूण हे अनेक घाटांनी वेढलेले आहे.
चिपळूण परिसराचा नकाशा
चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक ‘स्वामी’ अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला ‘नंदी’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात ‘श्रीलक्ष्मी मल्लमर्दन’ची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशव’ स्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य,राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.
चिपळूणचे वैभवशाली वस्तुसंग्रहालय
अफाट ग्रंथसंपदा, हजारो दुर्मीळ ग्रंथ अशी
पैशांत मोजता न येणारी बौद्धिक संपत्ती लाभलेल्या चिपळूणच्या तब्बल १५५
वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले ‘संग्रहालय’ २४
नोव्हेंबर २०१८ रोजी मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी
व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पर्यटक,
अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी खुले केले. भगवान परशुराम यांचे वास्तव्यस्थान,
क्रोकोडाइल टुरिझमसाठी प्रसिद्ध ‘ऑफबीट डेस्टिनेशन’ असलेल्या चिपळुणातील हे
संग्रहालय कोकणाच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव ठरते आहे. भारतीय मातीतील
दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी
वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षांतील विविध वस्तूंचा दुर्मीळ ठेवा पाहायला
उपलब्ध असलेले पनवेल ते पणजीदरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे.
वस्तुसंग्रहालयाचे
वेगळेपण जुन्या रचनेच्या देखण्या प्रवेशद्वारापासूनच सुरू होते.
प्रवेशद्वाराच्या उजव्या कोपऱ्यातील लक्ष वेधून घेणाऱ्या दगडी वस्तू
आपल्याला वस्तुसंग्रहालयाच्या जगात घेऊन जातात. दरवाज्यातून आतमध्ये
गेल्यावर दिसणारी आकर्षक रचना आपले लक्ष वेधून घेते. आजच्या पिढीला माहिती
नसणाऱ्या अनेक वस्तू इथे पाहता येतात. भाकरी थापणारी कोकणी महिला आपल्याला
ग्रामीण कोकणातील स्वयंपाकघरात घेऊन जाते. सहसा पाहायला न मिळणारे, आवर्जून
बनवून घेण्यात आलेले येथील हरीक दळायचे जाते आपल्याला ‘हरीक म्हणजे काय’
या प्रश्नात टाकते. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत कोकणी लोकांच्या जेवणात
मुख्य अन्न म्हणून हरकाचा भात असे. पुढे कोकणचा ‘विकास’ आडवा आला. तांदळाची
(भात) विविध बियाणी उदयास आली आणि पचायला हलका असणारा हरकाचा भात मागे
पडला. पर्यायाने हरकाचे उत्पादन थांबले. हरीक हे तीळासारखे लहान धान्य
असते. त्याचा भात पौष्टिक, चविष्ट असतो. हा भात साबुदाण्यासारखा फुलतो.
१९५०-५५ दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी ९० टक्के हरीक आणि
उर्वरित शेतीत वरी, नाचणी आणि कडधान्ये-भाजीपाल्याची पिके घेत असे. या
हरकाच्या अत्यंत चिवट रोपकाडीचा उपयोग घरबांधणीसाठी काढाव्या लागणाऱ्या
मातीच्या मापांमध्ये होत असे! एखाद्या प्रश्नातून जिज्ञासूला अशी अत्यंत
ज्ञानरंजक माहिती उपलब्ध करून देण्याची क्षमता संग्रहालयामध्ये असते.
म्हणूनच कशाच्याही निमित्ताने प्रवासाला दूरदेशी कोठेही गेलो, तर तेथील
संस्कृतीची प्रतीके असलेली संग्रहालये आवर्जून पाहावीत असे म्हटले जाते.
संग्रहालयात शिरल्यावर डाव्या बाजूने पाहत आत गेलो, की मनाला थक्क करणाऱ्या अनेक वस्तू दिसतात. संग्रहालयाच्या सुरुवातीलाच दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मीळ पुरातन वस्तूंचा खजिना दिसतो. येथील काही दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱ्या आपल्याला तब्बल किमान १२ लाख वर्षे (आदिम पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, इतिहासपूर्व, नवपाषाण, सिंधू संस्कृती, ताम्रपाषाण, महापाषाण) मागे घेऊन जातात. या वस्तू पुण्यातील जागतिक कीर्तीच्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेचे (डेक्कन अभिमत विद्यापीठ) कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूप मूर्ती, भोम (ता. चिपळूण) येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कट्यार आदी शिवकालीन शस्त्रे, दगडाच्या ठोकळ्यात कोरलेला चारशे वर्षांपूर्वीचा गणपती, कलात्मक कंदील, दुसऱ्या महायुद्धात वापरलेली भूमापन दुर्बीण, वाळूचे घड्याळ, फोनचा प्रवास दर्शविणारे जुने लाकडी टेबलावरील आणि भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्ट्यपूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटीयन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काट्यापासून बनविलेली पेटी, दक्षिण ध्रुवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक (कणकवली), सिलिका (कासार्डे-तरळा), आयर्न ओअर (फोंडा-कणकवली), क्वार्टझ् (वाटूळ-लांजा), बॉक्साइट (केळशी-दापोली), जांभा (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आदी खनिजे, होकायंत्राची दिशा बदलविणारे देवाचे गोठणे (राजापूर) येथील दगड, जुना सारीपाटाचा खेळ अशा विविध वस्तू आकर्षक रचनेत मांडण्यात आल्या आहेत.
धोंडो
केशव कर्वे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, दत्तो वामन पोतदार, पां. स.
साने अर्थात साने गुरुजी, दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, जयप्रकाश
नारायण यांच्या सन १९४०दरम्यान घेतलेल्या स्वाक्षऱ्या, दोनशे
वर्षांपूर्वीचे ब्रिटिशकालीन, होळकर संस्थान (इंदूर), सांगली संस्थान,
श्रीमंत सरकार गायकवाड (बडोदे), जोधपूर सरकार यांचे स्टॅम्पपेपर, ग्रामर ऑफ
संस्कृत हे सन १८०५ चे कलकत्त्यातून प्रकाशित झालेले पुस्तक, दोन आणे
किमतीची भगवद्गीता प्रत, दोनशे वर्षे जुनी हस्तलिखिते, १७६३ सालचे झाशी
संस्थानचे जमा-खर्चाचे कागद, १८३४ साली पार्थिवेश्वराला (पाथर्डी-चिपळूण)
दिलेल्या सनदीची मूळ प्रत, लोकमान्य टिळकांनी १३ फेब्रुवारी १९२० रोजी
चिपळूणला पाठविलेल्या पत्राची प्रत, ‘मु. पो. चिपळूण बंदर’ असा उल्लेख
असलेली इस्ट इंडिया कंपनीची पोस्टकार्ड आपल्याला इतिहासात घेऊन जातात.
दोन हजार वर्षांपूर्वीपासून अगदी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश कालखंडापर्यंतची नाणी येथे पाहता येतात. त्यात मौर्य, सातवाहन, कुषाणकाळ, शिलाहार, रोमन, पोर्तुगीज डच, शिवकालीन, पेशवेकालीन, इंदूर संस्थान, नागपूर संस्थान, झाशी संस्थान, ग्वाल्हेर संस्थान आदींच्या पुरातन नाण्यांचा समावेश आहे. पहिल्या महायुद्धात मिळालेली सन्मानपदके, १२व्या शतकातील सोन्याचे पद्मटंक आणि शिलाहारकालीन (शतक नऊ ते अकरा) डाळीच्या एका दाण्याच्या आकाराचे सोन्याचे फनम या गोष्टी संग्रहालयाच्या खजिन्याचे मूल्य वाढवत आहेत. विचारपूर्वक तयार करण्यात आलेले कोकणातील खेडेगावातील स्वयंपाकघर, तेथील भाकरी थापणारी महिला, चूल, चिमटा, फुकणी, तांब्या, लाकडाचा पलिता, पाटा-वरवंटा, पाणी तापवण्याचे तपेले, कंदील, लाकडाची विळी, रॉकेलचा दिवा आदि साहित्य आपल्याला ग्रामीण लोकजीवनाचा नजरा दाखवते. त्यासोबतच कोकणी वापरातील कणगी, पाणी तापवायचा बंब, हरीक दळायचे जाते, पातेली, काथवट, लाकडी मापटी, घिरट, उखळ, शंभर वर्षांपूर्वीची लाकडी पेटी, पंचपाळे, चौफुला, नारळाच्या करवंटीपासून बनविलेले जेवण वाढायचे डाव, तांब्या-पितळेचे हंडे-कळश्या यांसह कोकणी देवघरातील दोनशे वर्षे जुनी प्रभावळ, समई, फुलदाणी, आरतीचे ताट, संपुष्ट, तेल घालायचे भांडे, करा-दिवा, पंचदीप, पूजेची उपकरणे, रक्तचंदन, विष्णुमूर्ती आदि दोन-तीनशे वर्षांपूर्वीच्या वस्तू आपल्याला कोकणाची सैर घडवून आणतात.
संग्रहालय
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वाचन मंदिराचे कलादालन उभे राहते आहे. आपल्या
कर्तृत्वाने कोकणच्या लाल मातीचा सुगंध देशासह जगभर पोहोचविलेल्या निवडक
७५ कोकणरत्नांची तैलचित्रे या कलादालनात पाहता येतील. या सर्व
कोकणरत्नांच्या कार्य-कर्तृत्वाची माहिती असलेली रंगीत पुस्तिकाही अल्प
दरात उपलब्ध केली जाणार आहे. त्या माध्यमातून कोकणच्या मातीचा सुगंध
सर्वांना अनुभवता येईल.
अनेक
दोलामुद्रित पुस्तके, जुन्या पोथ्या असा दुर्मीळ ग्रंथसंग्रह, ३००
वर्षांपूर्वीची हस्तलिखिते, ६२ हजार ३४४ ग्रंथ, १४२७ दुर्मीळ ग्रंथ आणि
संबंधित लेखकांच्या स्वाक्षऱ्या असलेली ३०० पुस्तके असा खजिना असलेले हे
वाचनालय एक ऑगस्ट १८६४ रोजी स्थापन झाले आहे. अशा समृद्ध वाचनालयाचे हे
संग्रहालय आहे.
लोकमान्य
टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी हे
वस्तुसंग्रहालय उभारण्याचे स्वप्न पहिले होते. त्यांच्यासह वाचन मंदिराचे
अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले आणि सर्व संचालक मंडळाची मेहनत या
संग्रहालयाच्या उभारणीमागे आहे. कमी जागेतही एखाद्या राष्ट्रीय
संग्रहालयासारखी मांडणी हे वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य असून, त्या
कौशल्यामागे ज्येष्ठ कला मार्गदर्शक प्रकाश राजेशिर्के यांची मेहनत आहे. या
वस्तुसंग्रहालय दालनाएवढ्या चार दालनांत राहतील एवढ्या जुन्या वस्तू,
नाणी, हस्तलिखिते, ग्रामदेवता पालखी, दगडी वस्तू, इरले, शेतीची अवजारे अशा
गोष्टी वाचनालयाला अद्याप जागेअभावी मांडता आलेल्या नाहीत.
कोकणची
सांस्कृतिक राजधानी असलेले चिपळूण हे महाराष्ट्रात वेगाने विकसित झालेले
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक प्रमुख शहर आहे. कोकणात-चिपळुणात
येणारे इतिहासप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक, पर्यटक, शालेय सहली, नव्या
पिढीतील तरुणांनी हे संग्रहालय आवर्जून पाहायला हवे! हे संग्रहालय-कलादालन
बुधवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सात
वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले असते. तिकीट दर शालेय आणि महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये, तर इतरांसाठी १० रुपये इतका आहे.
लोकमान्य
टिळक स्मारक वाचन मंदिरात लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या मातोश्री
उषाताई साठे यांच्या नावाने बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन महाजन यांच्या
हस्ते २० जानेवारी २०१९ रोजी झाले. त्यांच्या वडिलांनी लिहिलेल्या
‘आठवणींचे अमृत’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २१ जानेवारी
रोजी झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाजन यांच्यासह मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनायक राऊत,
खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी
यांच्यासह अनेक मान्यवरांनी या वस्तुसंग्रहालयाला भेट दिली.
पत्ता : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संग्रहालय, जुन्या बहिरी मंदिराजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
फोन : (०२३५५) २५७५७३
मोबाइल : ९४२३८ ३१६६७.
चिपळूण येथे रहाण्याची सोयः-
१) हॉटेल अभिरुची: मुंबई-गोवा हायवे
२) हॉटेल अयोध्या:
३) हॉटेल ओअॅसिस- बहादुरशेख नाका
४) एशियन लॉज-लेक व्ह्यु आर्केड, वीरेश्वर कॉलनी, एस. टी. स्टँडच्या मागे
५) रेड रुफ फार्महाउस
६) रिव्हर व्ह्यु रिसॉर्ट
७) सुर्वे फार्महाउस
८) क्वालिटी रिसॉर्टः , चिपळुण -02355-259081-83, M: 9011009425/9421
कुडप:-चिपळूण येथे रहाण्याची सोयः-
१) हॉटेल अभिरुची: मुंबई-गोवा हायवे
२) हॉटेल अयोध्या:
३) हॉटेल ओअॅसिस- बहादुरशेख नाका
४) एशियन लॉज-लेक व्ह्यु आर्केड, वीरेश्वर कॉलनी, एस. टी. स्टँडच्या मागे
५) रेड रुफ फार्महाउस
६) रिव्हर व्ह्यु रिसॉर्ट
७) सुर्वे फार्महाउस
८) क्वालिटी रिसॉर्टः , चिपळुण -02355-259081-83, M: 9011009425/9421
डेरवणनजीक कुडप गावी मोठाल्या झाडाच्या खोडालाही लाजवतील अश्या वेलीनी समृद्ध ३७ एकर देवराईच्या वनात,भगवान शंकराचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभार्यात तीन शाळूंखेवर सोमेश्वर, रामेश्वर, वैजनाथ ही तीन रूपे चार लिंगात स्थापित असलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी जांभ्या दगडातील ९२ पायर्या चढून जावे लागते.अभ्यासकांच्या अंदाजानुसार, सन १७५० ते १८०० दरम्यानची ही लिंगे स्मृती स्वरूपात स्थापन केली गेली असावीत. यातील दुहेरी लिंग हे दोन गुरूबंधू अथवा गुरू-शिष्य प्रतीकअसावे. फार पूर्वी आपल्याकडे महत्वाची व्यक्ती गेल्यानंतर ‘लिंग’ स्थापन करण्याची प्रथा होती. अनेक प्राचीन वीरगळींवर आपल्याला शिवपिंडी कोरल्याचे दिसते. निसर्गरम्य लोटनशहा दर्गा हे शहरातील उंचीवरचे ठिकाण आहे. इथल्या वनराईत विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे.
डेरवण, निवळी, तेरव परिसराचा नकाशा
तेरव :
येथील मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे आहे. १८६०मध्ये त्याचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर २००२मध्ये लोकवर्गणीतून भव्य मंदिर बांधण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या यादीत अधिकृत पर्यटनस्थळ म्हणून हे समाविष्ट करण्यात आले आहे. मंदिरात चार देवींच्या मूर्ती आहेत. भवानी, वाघजाई, कालकाई आणि नवदुर्गा अशा चार देवता येथे आहेत. तसेच सात उद्यानांनी त्याची शोभा वाढविली आहे. कामथे रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेला हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
डेरवणची शिवसृष्टी :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या पुढे सावर्डेपासून डावीकडे सुमारे २ कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीतारामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन १९८५ साली उभारली आहे. कै. गणेश (दादा) पाटकर या शिल्पकाराने सुमारे १५ वर्षांच्या मेहनतीतून इथे शिल्पे साकारली आहेत.
डेरवण येथे दोन गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. एक म्हणजे शिवसमर्थ
गड ज्याला शिवशिल्पसृष्टी म्हणतात. येथे शिवाजी महाराज्यांच्या आयुष्यातील
महत्वाचे प्रसंग शिल्परुपात चितारले आहेत. तर दुसरी पाहण्यासाठी गोष्ट
म्हणजे सुंदर आणि अतिशय स्वच्छ असे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, श्री
दिगंबरदास महाराज आणि श्रीराम यांचे मंदिर.
इथला एक सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे मंदिर परिसरात स्त्रिया व
मुलींना वयोमानानुसार साडी व फ्रॉक परिधान केला असेल तरच सोडले जाते. मात्र
शिवशिल्पसृष्टी पाहण्यासाठी हा नियम लागू होत नाही. पूर्वी हा नियम
शिवशिल्पसृष्टी पाहण्यासाठी सुद्धा लागू होता. आता पँट, ट्राऊझर घातलेल्या
स्त्रियांनाही आत सोडतात, फक्त मंदिरात प्रवेश करायची परवानगी मिळत नाही.
शॉर्ट पँट घातलेल्या पुरुषांना सुद्धा मंदिरात प्रवेश नाही.श्रीसंत सीताराम बुवा आत्माराम वालावलकर यांच्या निकटवर्तीयांनी सद्गुरू जोशी तथा दिगंबरदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आपला समाज व राष्ट्र वैभवशाली बनविण्याची स्फूर्ती केवळ दृश्यरूपातील शिवचरित्र अनभुतीतून येईल, हा विचार सद्गुरू दिगंबरदास महाराजांनी प्रत्यक्ष उतरविण्यास डेरवणची भूमी निवडली. पंधरा वर्षांच्या अथक मेहनतीतून शिवाजी महाराजांची शिवशिल्पसृष्टी प्रत्यक्षात साकारली. हे ठिकाण एखाद्या छोट्या किल्ल्याप्रमाणे बनवले आहे.


श्रीशिवसमर्थ गडात भव्य तटबंदीतून प्रवेश करताना प्रथम सुसज्जतेने गस्त घालणारे मावळे स्वागतास दुतर्फी सामोरे येतात.
गडाच्या महादरवाजासमोर दोन हत्ती झुलत आहेत.








महादरवाजाच्या आत प्रवेश करताच दिव्य शिल्पसृष्टी चित्त वेधून घेते. शिवचरित्रातील चित्तथरारक प्रसंग घटना कलात्मकतेने साकारले आहेत. तटबंदीवर चौफेर कडा पहारा देत उभे असलेले मावळ्यांचे पुतळे अगदीच जिवंत वाटतात. प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि प्रत्येकाच्या हातातील विविध मराठा हत्यारे कल्पकतेने बनवलेली आहेत.
छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधलेले असून मंदिराच्या बाजूने विविध
सरदार घोड्यावर बसलेले आहेत.
शिवरायांच्या मंदिरात भवानी माता महाराजांना
तलवार देतानाचा प्रसंग, शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा, समर्थ रामदास,
तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या सुंदर मूर्त्या आहेत.
येथील परिसरात प्रवेश करतानाच समोर रस्त्यावर दुतर्फा असलेले घोड्यावरील सशस्त्र मावळे आपल्याला शिवकाळात घेऊन जातात. लहान मुले तर मावळे पाहून हरखून जातात. येथे शिवसमर्थ गड या नावाने उभारलेल्या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित शिल्पे कोरण्यात आली आहेत. शिवरायांच्या लहानपणापासून अनेक प्रसंग यात साकारले आहेत. विविध प्रसंग अक्षरशः जिवंत वाटतात व बघणाऱ्यांना खिळवून ठेवतात.
शिवराज्याभिषेकाचे शिल्प फारच अप्रतिम आहे. शिवसृष्टीच्या जवळ असलेला समाधी मंदिराचा परिसरही अत्यंत रम्य व शांत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत पर्यटक शिवसृष्टीला भेट देऊ शकतात. सीतारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही भव्य शिवसृष्टी उभारली गेली आहे. कोकणाची पर्यटनातील हे एक प्रमुख ठिकाण झाले आहे. येथे वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हॉस्पिटलही चालविले जाते.
हे चिपळूण तालुक्यातील एक निसर्गरम्य ऐतिहासिक गाव आहे. गावात पेशवेकालीन श्री सिद्धिविनायक मंदिर उभे आहे. गाभाऱ्यात संगमरवरी पाषाणाची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची सुबक मूर्ती आहे. मंदिराचा सभामंडप उघडा असून गाभारा बंदिस्त आहे. मंदिराची बांधणी जांभा दगड, गूळ, चुना इत्यादींपासून केली आहे. हे मंदिर इ. स. १७७४ दरम्यान थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले असा उल्लेख आहे. मंदिराच्या पिछाडीस ओहोळावर असलेला मोठ्या आकाराच्या जांभ्या दगडापासून तयार केलेला अर्धवर्तुळाकृती ऐतिहासिक पूल बघण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक येत असतात. खेकडे संवर्धनासाठी या गावाची निवड करण्यात आली आहे.
बिवली : ‘
बिवलीचा लक्ष्मीकेशव’ प्रसिद्ध आहे. शाळिग्रामापासून बनविलेली लक्ष्मीकेशवाची मूर्ती पाहण्यासाठी भाविक तर येतातच; पण या शिल्पाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक आणि इतिहासाचे अभ्यासकही येतात. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या प्रकारच्या मूर्तीस केशवमूर्ती म्हणतात. परकीय मूर्तिभंजकांपासून वाचवण्यासाठी गावोगावचे लोक देवळातील सुंदर मूर्ती त्या काळी विहिरीत, कुंडात, डोहात टाकून देत असत किंवा कधीकधी जमिनीत लपवून ठेवूत असत. अशीच एक मूर्ती नीलकंठशास्त्री थत्ते यांना सापडली आणि त्यांनी ती मूर्ती बिवली या आपल्या गावी बसवली. हे नीळकंठशास्त्री थत्ते न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले होते. चिपळूणपासून २५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कोकणात श्री विष्णूची अनेक मंदिरे आहेत. दिवेआगरपासून अशा मूर्ती दिसून येतात. साधारण शिलाहार व होयसळ शैलीचा प्रभाव या शिल्पांवर दिसून येतो. ११-१२व्या शतकात या ठिकाणी शिलाहार राजांची राजवट होती. प्रत्येक मूर्तीच्या शिल्पामध्ये वेगळेपण असले, तरी शैली एकच दिसून येते. मूर्ती सालंकृत असून, डोक्यावर समृद्धीचे प्रतीक असलेला शोभिवंत मुकुट आहे. तसेच ‘तीन माळा गळा’ शोभून दिसतात. यातील एका माळेतीळ पदकात आंबे दिसून येतात. बारकाईने पाहिल्यास अनेक दागिने कोरलेले आढळून येतात. मंदिर परिसर निसर्गरम्य आहे.
वाशिष्ठी बॅकवॉटरची रम्य सफर!
मनसोक्त
संचार करणाऱ्या मगरी पाहायच्यात? केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा
आहे? रम्य खाडी, संथ पाणी, किनाऱ्यावरची टिपिकल गावं, किनाऱ्याला बिलगलेले
डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब,
विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायची
असेल, तर पर्यटकांना चिपळूणमध्ये ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय
उपलब्ध झाला आहे. वाशिष्ठी खाडीला निसर्गानं मुक्तहस्तानं सौंदर्य दिलं
आहे. इतकी वर्षं हे सौंदर्य लोकांपुढे आलं नव्हतं. ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’
या चिपळूणच्या पर्यटन विकासासाठी झटणाऱ्या संस्थेच्या सततच्या प्रयत्नांनी
आता येथे पर्यटकांची लगबग सुरू झाली आहे.
आपल्या
देशात फक्त चेन्नईत क्रोकोडाइल पार्क आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मगरी
पाहता येतात. ‘क्रोकोडाइल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी
बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. ‘मगर’ हा घटक चिपळूणच्या
पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण ठरू शकतो, याची जाणीव झालेल्या चिपळुणातल्या
पर्यटनप्रेमींनी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेच्या माध्यमातून ‘क्रोकोडाइल
सफारी’ उपक्रम सुरू केला आहे. आजतागायत इथल्या मगरींनी कोणावरही कधीही
हल्ला केल्याचे वृत्त नाही. या मगरी ओहोटीदरम्यान वाशिष्ठी खाडीच्या
किनाऱ्यावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. अगदी आठ-१० फुटांच्या अंतरावरून
त्यांना पाहण्याचा आनंदही घेता येतो. विशेष म्हणजे त्यांना खाडीतल्या
नैसर्गिक वातावरणात पाहता येतं. सरकारने चेन्नईप्रमाणे इथंही ‘क्रोकोडाइल
पार्क’ होऊ शकेल का, याची शक्यता तपासण्याची, तसंच या मगरींचा शास्त्रोक्त
अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. सध्या इथल्या मगरी चिपळूणच्या पर्यटन
व्यवसायाला आकार देण्याचं काम करत आहेत, हे नक्की!
वाशिष्ठीच्या बॅकवॉटरमध्ये दिवसभर क्रोकोडाइल टुरिझमचा आनंद घेण्यासाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केली आहे. २०१४पासून वर्षातून दोन वेळा म्हणजेच नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जातो. प्रति वर्षी किमान २५ हजार पर्यटकांची उपस्थिती या उपक्रमाला सातत्याने लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवंगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातली वाशिष्ठी खाडी, तिच्यातली छोटी-मोठी बेटं, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि इथल्या समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळतो आहे.
खाडीत
साधारणत: पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी दिसतातच; पण वूली नेक्ड
स्टॉर्क, ओरिएंटल हनी बझार्ड, पफ थ्रोटेड बॅब्लर, लिटल रिंग प्लोव्हर,
युरेशियन कॉलर्ड डव्ह, प्लेन प्रिनिया, अॅशी प्रिनिया, लिटिल स्टिंट,
मार्शलज आयोरा, कॉमन आयोरा, पाइड अॅव्होसेट, सिट्रिन वॅगटेल, युरेशियन
स्पूनडिल, ब्लॅक हेडेड आयबीस, कॉमन रेडशॅक, चेंजेबल हॉक इगल, ब्राह्मणी
काइट, मोर, पेंटेड स्टॉर्क, जांभळी पाणकोंबडी, आयबीस, डार्टर, आल्बिनो
किंगफिशर, हेरॉन आदी दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही इथं होतं. ‘क्रोकोडाइल
सफारी’साठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात येते. मे
२०१८मध्ये मुंबई-पुण्यातल्या साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत ‘समर बोटिंग आणि
क्रोकोडाइल सफारी’च्या उद्घाटनासाठी चिपळुणात आलेले नामवंत हास्यकवी अशोक
नायगावकर यांनीही ‘वाशिष्ठी नदीतल्या पर्यटनाला अत्याधुनिक पातळीवर आणा’
असा सल्ला दिला होता.
वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्नािगिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरच्या झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम आहे. या उगमाचा शोध आम्ही नव्यानं, नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून २०१५ साली सहकारी मित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास महाडिक यांच्या साथीनं घेतला होता. नैसर्गिकदृष्ट्या कोणत्याही नदीचं मुख हा एक अद्भुत जादुई प्रदेश असतो. वाशिष्ठीबाबतही तसेच आहे. आगामी काळात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या माध्यमातून ‘वाशिष्ठी सफर (परिक्रमा) : उगम ते संगम’ हा चिपळूणच्या पर्यटनातला महत्त्वाकांक्षी उपक्रम पर्यटकांसाठी सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे.
वाशिष्ठी नदी चिपळूण, खेड, गुहागर, दापोली तालुक्यांच्या सीमांतून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. खेडकडून येणारी जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. या वाशिष्ठीला नारिंगी, तांबी, धावती, वैतरणा आणि शिवनदी या नद्या येऊन मिळतात. कोयना अवजलामुळे वाशिष्ठी सदा भरलेली, वाहणारी असते. या वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. अचाट वैविध्याची रेलचेल असलेल्या या खोऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बावी, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, छोटे ओहोळ यांसह खारफुटीची जंगलं, ससे, साळींदर, बिबटे, कोल्हे, रानगवे, अन्य प्राणिसंपदा असून, ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपं आहेत.
फार पूर्वी शिवनदी हीच चिपळूणची जीवनवाहिनी होती. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात, डोंगरात होतो. शिवनदी शहराच्या मध्यभागातून वाहते. तिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्चिीम असे दोन भाग नैसर्गिकरीत्या निर्माण झाले आहेत. तिची शहरातली लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. या नदीवर कामथे आणि फणसवाडी असे दोन बंधारे आहेत. शिवनदीच्या पात्रातून चिपळूणमधील पागमळ्यापर्यंत पूर्वी लहान होड्यांचा प्रवास चाले. मालवाहू-प्रवासी गलबते गोवळकोट बंदरातून, वाशिष्ठी नदीमार्गे बाजारपूल, बंदरनाका परिसरात येत. तिथे गलबतातला माल हा लहान नावांत घालून शिवनदी पात्रातून पागमळा परिसरात चढ-उतारासाठी येत असे. वाशिष्ठीला कोयनेचं अवजल उपलब्ध झाल्यानंतर शिवनदीचं महत्त्व झपाट्यानं कमी होऊन तिचं अस्तित्व कचरा, गाळ, दूषित सांडपाणी यांमुळे संपल्यात जमा आहे.
कोयनेच्या या अवजलाचा वापर कशा प्रकारे करावा, याबाबत उपाय सुचवण्यासाठी शासनानं जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑक्टोबर २००५ रोजी पाच सदस्यांच्या अभ्यासगटाची स्थापना केली होती. २९ ऑगस्ट २००६ रोजी या समितीनं राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. या पाण्याच्या मदतीनं कोकणातलं सुमारे एक लाख ७० हजार ५०५ एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं, असं पेंडसे समितीचा अहवाल सांगतो. सुमारे ४०० पानांचा हा अहवाल २०१३पर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. पेंडसे समितीचा अहवाल आजही राजकीय साठमारीत इतर अनेक अहवालांप्रमाणे धूळ खात पडला आहे. संघर्षाची फार मानसिकता नसलेल्या इथल्या जनतेला, लोकप्रतिनिधींना या पाण्याच्या पुनर्वापराद्वारे संपूर्ण कोकणची तहान भागवावी यासाठी आपण सर्वपक्षीय एकत्र यावं, असं कधीही वाटलेलं नाही. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचं रासायनिक प्रदूषण, सडणाऱ्या पाइपलाइन, जळणारी पिकं, कमी होत गेलेली मस्यसंपदा, पशु-पक्षी, मातांच्या दुधात मिळणारे अवजड धातूंचे अंश, बेकायदा वाळूउपसा इतके होऊनही वाशिष्ठी अजूनही संपलेली नाही. आजही वाशिष्ठीच्या खोऱ्यात वैविध्याची रेलचेल आहे.
अंजनवेलचा गोपाळगड किल्ला याच वाशिष्ठीच्या दाभोळ खाडीमुखावर वसलेला आहे. मराठी आमदानीत हे जिल्ह्याचे ठिकाण होते. किल्ला तीन बाजूंनी समुद्रवेष्टित असून, चौथ्या बाजूला खंदक आहे. भोवतालचा तट जाड दगड व चुन्यापासून तयार केलेला, २० फूट उंच, आठ फूट रुंद आणि चांगला भक्कम आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे दोन वाशिष्ठीचे पहारेकरी आहेत. गोविंदगड किल्ला जंजिऱ्याच्या हबशांनी बांधला. तो शिवाजी महाराजांनी १६७० साली जिंकून घेतला. एका छोट्या बेटावर वसलेल्या किल्ल्याचा परिसर दोन एकर आहे. या किल्ल्यात रेडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातल्या तोफा व पाण्याचा मोठा हौद असून, सहा तोफांचं हल्लीच एकत्रित जतन केलेलं पाहायला मिळतं.
मराठी भाषेतले श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची ‘तुंबाडचे खोत’ ही द्विखंडी कादंबरी
याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची
सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची
समाप्ती होते ती त्याच आमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या
प्रसंगी. म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षांचा प्रदीर्घ कालखंड हा या कादंबरीचा
गाभा आहे. चित्रविचित्र इतिहासाच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य
स्वभावविशेष, व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणाऱ्या अनेक
घटना, पुन्हा एक व्यक्ती दुसरीसारखी नाही. एकूण काळ सव्वाशे वर्षांचा असला,
तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर आहे. हा परिसर वाशिष्ठी
आणि खेडहून येणाऱ्या जगबुडी नदीच्या संगमावर आहे. श्री. ना. पेंडसे यांनी
अजरामर केलेला तुंबाड किनारा, विविध बेटं आणि दोन्ही तीरांवरची विविधता
पर्यटक अनुभवू शकतो.
वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर मालदोली गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली अभियांत्रिकी आश्चर्य ठरलेली ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही वारसा वास्तू आहे. उपलब्ध मौखिक माहितीनुसार या वास्तूचे प्लॅनिंग भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले होते. खाडीकिनारी वसलेल्या या वास्तूची आजची काठिण्यपातळी मोहवून टाकणारी आहे. साडेसात एकर जागेत अंदाजे दोन हजार चौरस फूट आकारात ही वास्तू आहे. उंचीवरील जिने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार नाही, असे पाहून या जिन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. ९० वर्षांनंतरही या वास्तूतल्या लाकडाला काहीही झालेलं नाही. वास्तूतल्या जवळपास वीस-बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंतीतली दोन कपाटं आहेत. खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतल्या प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. छताच्या ‘लगी’ आज नव्वदीनंतरही मजबूत असून, त्यांना कुठंही बाक आलेला नाही. छपराच्या नऊ इंच आयबीमची मजबुती नव्वद वर्षांनंतरही सहज नजरेत भरते. भिंतींचा मूळ गिलावा अजिबात हललेला नाही व त्याचे तुकडे गळून पडलेले नाहीत. वास्तू परिसरात आंब्याच्या ८० झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरीचे (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) झाड आहे. पीक भरपूर यायला हवं, याकरिता वनस्पतिशास्त्रानुसार परागीकरण भरपूर व्हायला हवं. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येऊन भरपूर परागीकरण व्हावं, म्हणून या सुगंधी झाडांची रचना इथं करण्यात आली आहे.
दापोली
तालुक्यातलं पन्हाळेकाझी हे गाव कोरलेल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
गावातली कोटजाई नदी पुढे वाशिष्ठी खाडीला जाऊन मिळते. या नदीच्या काठावर
महाराष्ट्रातला दुसरा सर्वांत मोठा नितांतसुंदर लेणीसमूह आहे. इथल्या गुंफा
ऐतिहासिक असून, त्या जवळपास हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. एकूण २९
भल्यामोठ्या दगडांमध्ये लेणी पाहायला मिळतात. या ठिकाणी श्री गणेश, सरस्वती
यांसारख्या देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसंच, भिंतींवर
महाभारत आणि रामायणातले काही प्रसंग चित्रित केले आहेत. पन्हाळेकाझी इथं
नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक लेण्यांचं अनोखं मिश्रण आहे. एके काळी
शिलाहार राज्याची राजधानी असलेल्या या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या
प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्ध स्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचं कोरीव मंदिर,
रामायण आणि महाभारतातले प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान या देवतांची शिल्पं
कोरलेली आहेत.
हा
संपूर्ण परिसर पाहण्यासाठी किमान दोन-तीन तास लागतात. कोटजाई नदीकाठचं
दृश्य अतिशय रमणीय आहे. इथला परिसर हिरव्यागर्द वनराईनं समृद्ध आहे.
दापोलीपासून पन्हाळेकाझी २१ किलोमीटरवर आहे. चिपळूण तालुक्यातल्या गोंधळे
इथल्या तांबी नदीच्या किनारी असलेलं पेशवेकालीन हरिहरेश्वर मंदिर,
परिसरातली इंग्रजी ‘एल’ आकाराची प्राचीन विहीर (घोडेबाव), शेकडो
वर्षांपूर्वीचं वडाचं झाड पाहण्यासारखं आहे. भरती-ओहोटीचं गणित सांभाळून
छोट्या बोटीनं खाडीमार्गानं आपण पन्हाळेकाझीसह इथंही पोहोचू शकतो.

मालदोली गाव
वाशिष्ठीच्या जोडनद्यांमध्ये गोंधळेसह दापोली तालुक्यातल्या उन्हवरे गावातले गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझी लेणी, मालदोली बंदरासमोरची गुहा लहान बोटीनं भरती-ओहोटीची वेळ बघून, साधारण द्वादशी ते चतुथीपर्यंत जाऊन बघू शकतो. गाडीनं जाण्यासारखी दोन प्राचीन ठिकाणं म्हणजे बिवली गावचं प्राचीन लक्ष्मीकेशव मंदिर आणि दोणवलीचं सिद्धिविनायक मंदिर होय. दाभोळ ते चिपळूण-गोवळकोट बंदरांचं अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ किलोमीटर आहे.
चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या
दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचं सर्वाधिक
प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. २६ जानेवारी १९३७ रोजी जगातल्या सर्वांत
नामांकित नौकायानतज्ज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहणी केली होती. भारतातलं
सर्वांत सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता.
१०८ फूट खोल, २५ मैल लांब असलेल्या या खाडीत एका वेळी दोन-तीन टनाच्या
किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. १९५०पर्यंतच्या ३०० वर्षांत ही
निरीक्षणं अनेकांनी नोंदवली. त्या वेळी मुंबई-न्हावाशेवा ही बंदरं जन्मलीही
नव्हती. १८०८ साली अमेरिकेत बोस्टन येथे ‘विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले
होते. त्यातही या दाभोळसंदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या
जगप्रसिद्ध खाडीतला फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.
ओहोटीच्या
वेळी खाडीकिनाऱ्यावर शरीराचं तापमान नियंत्रित करण्याकरिता ‘बास्किंग’
करीत निवांत पहुडलेल्या, ‘मॅन्ग्रूव्ह’मध्ये (कांदळवन) लपलेल्या, कातळावर
बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी बोटीतून बघायला धमाल मजा येते. या बोट
प्रवासात सुमारे आठ ते १० फूट लांबीच्या किमान १० तरी मगरी पाहायला मिळतात.
नशीब जोरावर असेल, तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. अर्थात त्यासाठी
ओहोटी असली पाहिजे. पावसाळ्यात हा सगळा परिसर हिरवागार असतो. हिवाळ्यात इथं
कुडकुडायला लावणारी थंडी असते. या खाडीपट्ट्यात आजवर पक्ष्यांच्या ७० ते
८० जाती नोंदवल्या गेल्या आहेत. हे बॅकवॉटर आणि इथल्या मगरी हे मोठं आकर्षण
आहेच; पण वाशिष्ठीच्या खाडीतीरावर आणि जोडनद्यांमध्ये भरपूर प्राचीनता,
लोकसंस्कृती, जीवनपद्धती, चालीरीती पाहायला मिळतात. आपल्या मातीतलं हे सारं
वैभव अनुभवण्यासाठी एकदा तरी या वाशिष्ठीच्या खाडीची सफर करायलाच हवी!
गोवळकोट :
गोवळकोट ऊर्फ गोविंदगड हा गिरिदुर्ग वाशिष्ठी खाडीच्या तीरावर उभा आहे.

प्रसिद्ध मुस्लिम विचारवंत दिवंगत हमीद दलवाई व विद्यमान खासदार हुसेन दलवाई हे गोवळकोटजवळील मिरजोळी या गावचे सुपुत्र. हा किल्ला चिपळूणपासून अगदी जवळ म्हणजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. पायथ्याशी करंजेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आहे. निसर्गाच्या सान्निध्यातील हे मंदिर खूपच छान आहे. हा किल्ला एखाद्या बेटासारखा आहे.

गोवळकोट किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी असून, जवळच गोवळकोट बंदर आहे. पूर्वी किल्ल्यावर २१ तोफा होत्या असे म्हणतात. करंजेश्वरी मंदिराजवळील पायऱ्या चढून गेल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी समोर दोन बुरुज व त्यामध्ये दरवाजाची जागा दिसते. परंतु आज तिथे किल्ल्याचा दरवाजा, त्याचे खांब व कमान यांच्या फक्त खुणाच शिल्लक आहेत. क्रिकेटपटू गुलाम परकार या गावचेच.
चिपळूणचा पहारेकरी अशी नोंद असलेला, दोन एकर शेत्रात विस्तारलेला किल्ले गोविंदगड आवर्जून पाहावा असा आहे. ३४२ पायऱ्या चढून वा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण १२ बुरुजांपैकी ४ बुरुज सुस्थितीत आहेत. चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात आहे. किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो.
किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या याच देवीचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
अलोरे विद्युतगृह :
महाराष्ट्राची
भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना प्रकल्पाची विद्यृतगृहे सह्याद्रीच्या
पायथ्याशी आहेत. कोयना धरणाचे पाणी उंचावरून बोगद्याद्वारे खाली आणून
त्यावर विद्युतनिर्मिती केली जाते. आता हे विद्युतगृह बघण्यास बंदी आहे.
वरच्या बाजूला प्रसिद्ध कुंभार्ली घाट आहे. येथे पावसाळ्यात छोटे-मोठे
धबधबे पाहायला मिळतात. येथून लांबवरच्या कोकणाचे दर्शन होते. सध्या आलोरे वीजनिर्मितीगृह बघायला परवानगी मिळत नाही.
कोळकेवाडी धरण
निवळी :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून येताना गणपतीपुळ्याला जाण्यासाठी येथूनच उजवीकडे वळावे लागते. निवळी फाटा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रागैतिहासिक संस्कृतीच्या खुणा आढळल्याने पुरातत्त्व अभ्यासकांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाणारी आणि आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे येथे पाहण्यास मिळतात. निवळीपासून गणपतीपुळे रस्त्यावर साधारण ८०० मीटर अंतरावर उजवीकडे ही कातळशिल्पे आहेत. रस्त्यावर डावीकडे चार नारळीची झाडे आहेत. त्याच्या समोरच ही शिल्पे आहेत. तसेच निवळी फाट्याजवळून गावडेवाडीजवळही अशीच कातळशिल्पे आहेत.
निवळीचा धबधबा : मुंबई-गोवा महामार्गाने चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना निवळी घाटातच रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यावरूनच निवळीच्या धबधब्याचे दर्शन घडते. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो.

थोडे पुढे गेल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या मार्गाने खाली जाऊन धबधब्यात भिजता येते. पावसाळ्यात येथे उतरण्याचा धोका पत्करू नये.
चिपळूण तालुक्याचे पर्यटनः-
आगामी काळात चिपळूणात परशुरामचा महेंद्रगिरी डोंगर ते वाशिष्ठी खाडीतील
बेटे ते गोवळकोट किल्ला असा रोप-वे,चिपळूण पर्यटन माहिती केंद्र, सवतसडा
धबधबा बारमाही प्रवाही करणे, हाऊसबोटची उपलब्धी, वाशिष्ठी खाडीच्या दोन्ही
तीरावर होम स्टे, त्यातून स्थानिकांना रोजगार, तळ्यांचे शहर असलेल्या
चिपळूणात नारायण आणि रामतीर्थसह इतर तलाव ऊर्जितावस्थेत आणणे, ‘रिव्हर बँक
प्रकल्प’हे आगामी महत्वाचे प्रकल्प असायला हवे आहेत.शहरातील पर्यटनाशी
निगडीत रिक्षावाले, चारचाकी वाहतुकवाले, छोटे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या
एकत्रीकरण आणि संवादाची आवश्यकता, रिक्षांवर पर्यटन लेखन, रिक्षादर
निश्चिती व्हायला हवी असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत.चिपळूणात
आजमितीस एकूण ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार आहेत, त्यात ७०
रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची
व्यवस्था असून परिसरात होम-स्टेची ८ ठिकाणे आहेत.
कोळकेवाडी धरण
निवळी :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून येताना गणपतीपुळ्याला जाण्यासाठी येथूनच उजवीकडे वळावे लागते. निवळी फाटा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रागैतिहासिक संस्कृतीच्या खुणा आढळल्याने पुरातत्त्व अभ्यासकांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाणारी आणि आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे येथे पाहण्यास मिळतात. निवळीपासून गणपतीपुळे रस्त्यावर साधारण ८०० मीटर अंतरावर उजवीकडे ही कातळशिल्पे आहेत. रस्त्यावर डावीकडे चार नारळीची झाडे आहेत. त्याच्या समोरच ही शिल्पे आहेत. तसेच निवळी फाट्याजवळून गावडेवाडीजवळही अशीच कातळशिल्पे आहेत.
निवळीचा धबधबा : मुंबई-गोवा महामार्गाने चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना निवळी घाटातच रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यावरूनच निवळीच्या धबधब्याचे दर्शन घडते. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो.

थोडे पुढे गेल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या मार्गाने खाली जाऊन धबधब्यात भिजता येते. पावसाळ्यात येथे उतरण्याचा धोका पत्करू नये.
चिपळूण तालुक्याचे पर्यटनः-
पर्यटकांच्या प्रवास मार्गावर आणि मोक्याच्या ठिकाणी (विसावा पॉइंट) पर्यटन फलक, नवे पर्यटन प्रकल्प, संग्रहालय निर्मिती, किमान पर्यटन हंगामात शहर सुशोभिकरण, स्वच्छता,रेल्वेस्टेशन ते गांधारेश्वर मार्गे चिपळूण शहर या अंतर्गत रस्त्याची सुधारणा, पर्यटन डॉक्युमेंटेशन, आपल्याकडील विसावा पॉइंट सारख्या ठिकाणी संकासूर, जाकडी,कोळीनृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेराव-पर्यटक फोटो दर्शन यावर विचार करावा लागणार आहे. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण राज्यभर कुठेही फिरा, आपल्याला काही महत्वाच्या ठिकाणी, मुख्य मार्गावर ‘आपण येथे आहात ; u are here’ असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहे ? याची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातील, बरच काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेल, आपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं ?याचे नियोजनही करू. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहे,अशी व्यवस्था आपण चिपळूणात करायला हवी आहे. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६’ वर मध्यवर्ती असलेल्या चिपळूणनजीक एखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे समृद्ध प्राचीन कोकणी खेडे अगदी जसेच्या-तसे, धूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावात, खानपान, जगण्याच्या काही सवयी, मनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! काय हरकत आहे ? अशा नव्या गोष्टींचा आगामी काळात विचार करायला लागणार आहे. चिपळूणात कोकणी खाद्यसंस्कृती हमखास जपणारी काही हॉटेल तयार व्हायला हवीत, त्यांचे मार्केटिंग व्हायला हवे.
चिपळूणात, शहरानजीक दीडशे फुटावरून कोसळणारा बाह्यवक्र जलप्रपात 'सवतसडा' हा अगदी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांच्या पावसाळी आकर्षणाचा विषय आहे. त्यासोबतच वीर-देवपाट येथे १०० फुट उंचीवरून दोन टप्यात कोसळणारा बारमाही धबधबा, अडरे धबधबा आणि कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात विसावा पॉइंट असून येथून वळणावळणाच्या ‘वाशिष्ठी’ नदी पात्राचे विहंगम दृश्य पाहाता येते. चिपळूणचे उद्योगपती श्रीराम रेडीज यांनी धामणवणे येथील आपल्या १०० एकर जागेत ‘एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स’ फार्मची उभारणी केली असून येथे जंगल सफारी,नेचरट्रेल, पक्षी अभयारण्य, शेततळे, कँप, बाल्या नृत्य, जाखडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्थाही अशा ठिकाणी मागणीनुसार होऊ शकते. याखेरीज शहरात पेढे-परशुराम येथे तालुक्यातील पहिले ‘श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्र’असून अशी इतर ७-८ केंद्रे कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले डी.बी.जे.महाविद्यालयाचे जैवसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध २१ दुर्मीळ प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे जतन येथे करण्यात आले आहे. तालुक्यात ११२ देवराया असून त्यातल्या दसपटी, कुडप, वीर, गुढे, शिरंबे येथील देवरायात‘नेचरट्रेल’ची अनुभूती घेता येते.
वैजी गावातील प्राचीन विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे. चिपळूणच्या इतिहासात प्राचीन संदर्भ असलेल्या, ई. स. सहाव्या शतकापासूनचे पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या ‘राजेशिर्के’ यांचे कुटरे, डेरवण आणि तळसर येथील मराठा वास्तुशैलीने युक्त चौपाखी वाडे आपला इतिहास सांभाळून आहेत. या वाड्यात दोन दशकांहून अधिक काळातील वापरातील विविध वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यासोबतच मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या “ रामचंद्र वासुदेव मराठे न्यास” या हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते. त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे.
चिपळूणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात ‘खाडी,डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला,हेरीटेज’ अशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून निर्माण झाल्या तर आज येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निश्चित वाढ होईल.गोव्यात ‘मांडवी’ आणि‘झुआरी’ नदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहे, मग संपूर्ण महाराष्ट्रात बारमाही वाहणाऱ्या एकमेव, चिपळूणला ‘आपण’पर्यटन समृद्ध करू शकतो आहोत. फक्त याचा नीट विचार व्हायला हवा.त्याच-त्याच पर्यटनस्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांसाठी ‘डेस्टिनेशन चिपळूण’ एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. अलिकडच्या काही वर्षांत ‘क्रोकोडाईल टुरिझम’साठी महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेल्या चिपळूणच्या विविधांगी ‘पर्यटन श्रीमंती’चा हा आढावा आपल्यालाही चिपळूण पर्यटनाबाबत अनुकूल बनवेल.
No comments:
Post a Comment