संगमेश्वर परिसराचा नकाशा
वीर/देवपाटचा धबधबा : वीर येथे देवपाटचा बारामाही धबधबा आहे. हा धबधबा दोन टप्प्यांत आहे. काळ्या कातळातून डोहात कोसळणाऱ्या आणि पोफळीच्या दाट रांगांच्या बाजूला असणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. कोकणात महामार्गापासून किंवा सागरकिनाऱ्यापासून अशी अनेक ठिकाणे दडलेली आहेत, की तेथे कोकणाचे अस्तित्व टिकून आहे. असेच एक जोडगाव म्हणजेच वीर व देवपाट. चिपळूणकडून येताना सावर्ड्याच्या पुढे थोड्या अंतरावर उजवीकडे वहाळकडे एक रस्ता गेला आहे. वहाळच्या पुढे देवपाट आहे.
चिपळूण तालुक्यातील बारमाही वाहणारा धबधबा म्हणजे वीर देवपाटचा धबधबा असून तो दोन टप्प्यांत पडतो. तुंबरव येथून १० कि.मी. अंतरावरील वहाळ गावापासून वीर बंदराजवळ जाता येतं. देवपाटच्या धबधब्याकडे जाण्याचा रस्ता तिथूनच जवळ असलेल्या पोफळीच्या दाट झाडीतून जातो.
वीर गावात पोहोचता पोहोचता धबधब्याचा नाद अखंड ऐकू येत असतो, मात्र दाट झाडी पार केल्याशिवाय धबधब्याचं दर्शन होत नाही. काळ्या कातळांमधून खालच्या डोहात त्याचा अव्याहत प्रवाह कोसळत असतो. खालच्या डोहांत जलक्रीडेचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो.
येथे एक धबधबा आहे. तसेच या गावात श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवस्थान, आहे. या गावात पारंपरिक दशावतार नाटके व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. कोकणातील अशा सर्वच गावांतून गणपती, होळी व गावच्या देवाची जत्रा हे सण दिवाळीपेक्षाही मोठ्या आनंदाने, पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. पालखी घेऊन केलेले नृत्य खूप उत्साहित करणारे असते. आता रस्ते झाल्यामुळे खाडीचे सौंदर्य बघता येत नाही. शास्त्री नदीला आरवलीकडून गड नदी व देवपाटकडून कापशी नदी अशा दोन नद्या मिळतात. भातगाव पुलाच्या पूर्वेला हा त्रिवेणी संगम आहे.

भातगाव खाडीपूल : सागरी मार्गावर अनेक ठिकाणी पूल झाल्यामुळे कोकणातील दळण वळण खूप सोपे झाले आहे. असाच हा एक पूल आहे, जो कोकणाचे सौंदर्य अधिक खुलवून दाखवितो. या पुलाच्या पूर्वेला कापशी, गड व शास्त्री या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे शास्त्री नदीचे विशाल पात्र एखाद्या छोट्या समुद्रासारखे भासते. गणपतीपुळ्याहून येताना जाकादेवीजवळ डावीकडे वळल्यावर हा पूल लागतो.

येथून गुहागर व चिपळूण जवळ पडते. हा पूल जयगड खाडीवर (शास्त्री नदीवर) आहे. येथून शास्त्री नदी जयगडपर्यंत नागमोडी वळणे घेत जाते. दुतर्फा उंच सदाहरित डोंगर व मधून जाणारी शास्त्री नदी हे अतिशय सुंदर दृश्य दिसते. जयगडजवळील तवसाळपासून इथपर्यंत तासिका तत्त्वावर डुबको (मोटरबोट) मिळतात व केरळप्रमाणे खाडीतील नौकानयनाचा आनंद येथे मिळतो. भातगाव हे माझे गाव आहे. गावात जुगाई देवीच्या देवळाच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे.

गावाच्या वरच्या बाजूने गुहागरकडे जाणारा रस्ता आहे. तेथूनही खाडीचे विहंगम दृश्य दिसते.
प्रचितगड : संगमेश्वरजवळील शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक संकटांची प्रचिती देणारा तो प्रचितगड असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. शिवरायांनी २९ एप्रिल १६६१ रोजी शृंगारपूर जिंकले. त्याच वेळी कोकणावर नजर ठेवता येईल असा प्रचितगडही घेतला. १७१०-१२मधील छत्रपती शाहू महाराज व रामचंद्रपंत अमात्य यांच्या करारात प्रचितगडाचा उल्लेख येतो
नंतर जानेवारी १८१८मध्ये कर्नल प्रॉथरने प्रचितगडाचा ताबा घेतला. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा महत्त्वाचा टेहळणी किल्ला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर गावातून या गडावर सह्याद्री पर्वतामधून पायवाटेने जाता येते. शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडीक वास्तू असून, येथील कातळाच्या कुंडात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटला पाहिजे.
कसब्याचं कर्णेश्वर मंदिर
संगमेश्वर
तालुक्यातलंच आणखी एक प्रेक्षणीय मंदिर म्हणजे कसब्याचं कर्णेश्वर मंदिर.
मार्लेश्वरपासून या मंदिराचं अंतर सुमारे ३५ किलोमीटर आहे. मुंबई-गोवा
महामार्गावर संगमेश्वर शहराजवळ दोन किलोमीटरवर महामार्गालगत हे मंदिर आहे.
चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना शास्त्री नदीवरचा पूल ओलांडल्यावर डावीकडे
कसबा गावाकडे जाणारा रस्ता आहे. तिथे मंदिराकडे जाण्याची पाटीही आहे. हा
कच्चा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो.
कोकणची भूमी ही प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. त्यात कोकणातील अनेक प्राचीन मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. संगमेश्वर तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. येथे कसबा नावाचे गाव आहे. या भागाला ऐतिहासिक महत्त्व आहे. औरंगजेबाच्या सरदारने छत्रपती संभाजीराजांना १६८२ मध्ये याच कसबा गावात अटक करून पुढे पुण्यातील तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली. कसबा गावाची आणखीन एक ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर. कसबा संगमेश्वर या गावांना फार पूर्वी ‘रामक्षेत्र’ असंही ओळखलं जात असे. मुंबई- गोवा महामार्गावर शास्त्री पुल ओलांडल्यावर डावीकडे कसबा नावाच्या या गावात हे कर्णेश्वराचे मंदिर आहे. संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा अद्भूत अविष्कार आहे. भल्या मोठ्या दगडांना आकार देत अप्रतीम शिल्पकला साकारून हे मंदिर उभारण्यात आले आहे.
संभाजीमहाराजांचा अर्धपुतळा कसबा गावात शिरल्या शिरल्या दिसतो. याच पुतळ्याच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. अत्यंत सुंदर असे हे मंदिर प्रथम दर्शनीच मनमोहून टाकते. मंदिरात पोहचल्यावर डाव्या बाजूला छोटसे सूर्यमंदिर दिसले.




मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत. पूर्व दिशेला असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या दोन राक्षसांचे शंकराबरोबर युद्ध झाले होते. त्या युद्धा पराजय झाल्यावर आपल्या पायाशी स्थान मिळावे असे या दोन राक्षसांनी शंकराकडे वर मागितला. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेरील दरवाज्याच्या चौकटीत स्थान दिले. यांना पाय लावून हात येण्याची प्रथा आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस सुंदर असे दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध, कलिंकी आदींची शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर मगरीच्या पाठीवर उभे असल्याचे मगरीच्या शिल्पावरून वाटते. शक्यतो महादेवाच्या मंदिरात गोमुखातून तीर्थ बाहेर येताना दिसते मात्र याठिकाणी मगरच्या शिल्पातून ही सोय केलेली आहे. कर्णेश्वर मंदिरा बाहेर गणेशाची छोटी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहिल्यावर मला वाईतील महागणपतीची मूर्तीची आठवण आली.
दरवाज्याजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे
पालाथे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची
आसने दिसतात. साधारणपणे चार फूट उंच असलेली आसने आहेत. मंदिराच्या मुख्य
दरवाजाजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत. तेथून पुढे मंडप,
मंदिराच्या छतावरची कोरीव शिल्प, सिंह, मुख्य छतातून झुंबराप्रमाणे दिसणारे
कमलाकृती दगडी झुंबर, सभामंडपातील शिलालेख, शेषशाही विष्णूचे शिल्प कोरून
ठेवलेली आहेत. मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती
दिसते. मंडपाला एकूण चार खांब आहेत. विशेष म्हणजे हे चारही खांब एकसमान
आहेत. दक्षिण दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख आहे. मुख्य मंडपाच्या
डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी
विष्णूची मूर्ती आहे. येथील भगवान विष्णूचे शेषशायी शिल्प व दगडी झुंबर हे
पाहण्यासारखे आहे.
मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरील अलंकृत खांब, सुंदर नक्षीदार कोरलेले आहेत. कर्णेश्वर मंदिराचा कोपरानकोपरा दगडी शिल्पकलाकुसरीने कोरलेला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिराच्या मागील बाजूने एका ठिकाणाहून पाहिल्यास मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. मंदिराबाहेर गणपती, पार्वती, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, बलराम, हनुमान या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच मंदिरातील प्रत्येक खांबाला एकाच साच्यामधून काढल्याप्रमाणे नक्षीकाम आहे. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे बांधकामामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही.
कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. काळाच्या ओघात मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या. नुकतेच श्री केदारनाथला महाप्रलय झाला. सुदैवाने मंदिर वाचले. पण प्राणहानी प्रचंड झाली. आज जी काही प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात आहे. ती अप्रतिम कलाकृतींनी साकारलेली आहे. प्राचीन कलाकृतींकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कोकणात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. खरे तर हे बहुमूल्य ठेवे जपून ठेवायला हवे. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा खजिना टिकून राहील. कोकण सहलीत कर्णेश्वराचं मंदिर आवर्जून पाहायला हवे. मंदिराभोवती असलेली हिरवीगार दाट झाडी, डोंगर, नद्या, शेती यांनी हा परिसर बहरेला आहे. महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो.



कोकणची भूमी ही प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. त्यात कोकणातील अनेक प्राचीन मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. संगमेश्वर तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. येथे कसबा नावाचे गाव आहे. या भागाला ऐतिहासिक महत्त्व आहे. औरंगजेबाच्या सरदारने छत्रपती संभाजीराजांना १६८२ मध्ये याच कसबा गावात अटक करून पुढे पुण्यातील तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली. कसबा गावाची आणखीन एक ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर. कसबा संगमेश्वर या गावांना फार पूर्वी ‘रामक्षेत्र’ असंही ओळखलं जात असे. मुंबई- गोवा महामार्गावर शास्त्री पुल ओलांडल्यावर डावीकडे कसबा नावाच्या या गावात हे कर्णेश्वराचे मंदिर आहे. संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा अद्भूत अविष्कार आहे. भल्या मोठ्या दगडांना आकार देत अप्रतीम शिल्पकला साकारून हे मंदिर उभारण्यात आले आहे.
संभाजीमहाराजांचा अर्धपुतळा कसबा गावात शिरल्या शिरल्या दिसतो. याच पुतळ्याच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. अत्यंत सुंदर असे हे मंदिर प्रथम दर्शनीच मनमोहून टाकते. मंदिरात पोहचल्यावर डाव्या बाजूला छोटसे सूर्यमंदिर दिसले.
मंदिर एक आख्यायिका अनेक
कर्णेश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी हे मंदिर
पांडवांनी एक रात्रीत बांधले असते सांगतात. तर कोणी पांडवांनी आपला मोठा
भाऊ कर्णाची आठवण राहावी म्हणून हे मंदिर बांधले असे सांगतात. भगवान
परशुराम यांनी हे मंदिर बांधल्याची सुद्धा आख्यायिका आहे. वनवासात असताना
पांडव परशूरामांकडे धर्नुविद्या शिकले. परशरामांनी सहावा मोठा भाऊ
कर्णाबद्दल सांगितले. तेव्हा पांडवांनी कर्णेश्वर मंदिर बांधले असेही
सांगितले जाते. या मंदिरांच्या वास्तुरचनेवरून सातव्या शतकातील चालुक्य
घराण्यातील कर्ण नावाच्या राजाने हे मंदिर उभारले असे इतिहासतज्ज्ञ
सांगतात. बाकी आख्यायिका काहीही असो. मंदिरावरील कलाकुसर पाहून मंदिर कोणी
बांधले या पेक्षा ते कसे बांधले असेल याचा विचार करतानाच आश्चर्य वाटू
लागते. कसबा गावात पूर्वी ३०० ते ४०० मंदिरे असल्याच्या नोंदी आहेत. सध्या
यातील काही मोजकीच मंदिरे तग धरून आहेत.![]() |
श्री कर्णेश्वर मंदिराचा कळस. |



![]() |
कर्णेश्वर मंदिरातील ही गणेशाची छोटी मूर्ती. |
![]() |
विठ्ठल रुखुमाई व श्री गजानन |

![]() |
कोरीवकाम |
![]() |
कोरीवकाम |
पालथे ताट :
कर्णेश्वराचे मंदिर एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे. कर्णेश्वर म्हणजे महादेव. प्रत्येक प्राचीन मंदिराला काहीना काही आख्यायिका असते. अशीच एक आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. दमल्यावर ते जेवायला बसले असता पहाटे कोंबडा आरवला. पहाट झाल्याने जेवायचे कसे म्हणून ताटे पालथी टाकून उठले. या मंदिरात ५ दगडी पालथी ताटे (पराती) कोरलेल्या आहेत. या ताटाखाली गुप्त धन परले असल्याचे सांगितले जाते. पांडवांनी त्या काळातील लिपीत दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत. या ओळींचा अर्थ समजू शकल्यास ही पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटाखाली लपवलेले धन मिळेल. अंदाजे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली पाच ताटे आहेत. मंदिराला तीन दरवाजे असून, प्रत्येक दारात पालथे ताट आहे. एक ताट मंदिराच्या मध्यभागी असून, पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. त्यावर मोठे शिवलिंग आहे. गाभाºयात न बसता देखील गाभाºयाबाहेर बसून पिंड संपूर्ण दिसते. त्यामुळे ध्यानधारणा करण्यासाठी बाहेर देखील बसता येते.मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत. पूर्व दिशेला असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या दोन राक्षसांचे शंकराबरोबर युद्ध झाले होते. त्या युद्धा पराजय झाल्यावर आपल्या पायाशी स्थान मिळावे असे या दोन राक्षसांनी शंकराकडे वर मागितला. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेरील दरवाज्याच्या चौकटीत स्थान दिले. यांना पाय लावून हात येण्याची प्रथा आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस सुंदर असे दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध, कलिंकी आदींची शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर मगरीच्या पाठीवर उभे असल्याचे मगरीच्या शिल्पावरून वाटते. शक्यतो महादेवाच्या मंदिरात गोमुखातून तीर्थ बाहेर येताना दिसते मात्र याठिकाणी मगरच्या शिल्पातून ही सोय केलेली आहे. कर्णेश्वर मंदिरा बाहेर गणेशाची छोटी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहिल्यावर मला वाईतील महागणपतीची मूर्तीची आठवण आली.
![]() |
पालथे ताट |
मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरील अलंकृत खांब, सुंदर नक्षीदार कोरलेले आहेत. कर्णेश्वर मंदिराचा कोपरानकोपरा दगडी शिल्पकलाकुसरीने कोरलेला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिराच्या मागील बाजूने एका ठिकाणाहून पाहिल्यास मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. मंदिराबाहेर गणपती, पार्वती, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, बलराम, हनुमान या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच मंदिरातील प्रत्येक खांबाला एकाच साच्यामधून काढल्याप्रमाणे नक्षीकाम आहे. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे बांधकामामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही.
कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. काळाच्या ओघात मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या. नुकतेच श्री केदारनाथला महाप्रलय झाला. सुदैवाने मंदिर वाचले. पण प्राणहानी प्रचंड झाली. आज जी काही प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात आहे. ती अप्रतिम कलाकृतींनी साकारलेली आहे. प्राचीन कलाकृतींकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कोकणात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. खरे तर हे बहुमूल्य ठेवे जपून ठेवायला हवे. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा खजिना टिकून राहील. कोकण सहलीत कर्णेश्वराचं मंदिर आवर्जून पाहायला हवे. मंदिराभोवती असलेली हिरवीगार दाट झाडी, डोंगर, नद्या, शेती यांनी हा परिसर बहरेला आहे. महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो.
![]() |
छतावरची कोरीव शिल्प |
![]() |
नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती |
![]() |
शेषशायी विष्णूची मूर्ती. |
![]() |
श्री कर्णेश्वर |
![]() |
शंख आकारातील बकुळीची फुले |
![]() |
दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख |
ऐतिहासिक वारसा असलेले कसबा गाव
कसबा गावातच सरदेसाइंच्या वाड्यात संभाजीमहाराज आलेले असताना शत्रूला खबर मिळाली. याच ठिकाणी संभाजीमहाराजांना कैद करण्यात आले. महाराष्ट्राचा इतिहास ज्या जागेवर एक क्षणात बदलला त्या कसबात्यातील सरदेसाइंचा वाडा आज जमिनदोस्त झालेला आहे. येथील गावकºयांना विचारले असता वाड्याच्या काहीच खाणाखुणा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. काय दुर्देवी योगायोग म्हणावे लागेल की अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावर असलेले कसबा हे गाव. त्यावरून या भागाला संगमेश्वर म्हणू लागले. छत्रपती संभाजीमहाराजांना येथे पकडले गेले. तेथून पुढे पुण्याजवळील तुळापूरजवळील भीमा, भामा, इंद्रायणी या त्रिवेणी नद्यांच्या संगमाजवळ त्यांचा क्रूर वध करण्यात आला. दोन्ही ठिकाणी तीन नंद्यांचा संगम झाला.![]() |
सुंदर असे दशावताराचे शिल्प |
![]() |
यक्ष-यक्षिणी मूर्तींचे कोरीव काम |
![]() |
श्री कर्णेश्वर मंदिराची माहिती सांगताना पुजारी. |
मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. |
![]() |
मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. |
![]() |
श्री कर्णेश्वर |
![]() |
मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. |

![]() |
मगरीचे शिल्प. |


![]() |
बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम . |
![]() |
सूर्यमंदिर |
![]() |
श्री. कर्णेश्वर मंदिराचा परिसर |
![]() |
बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम. |
![]() |
बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम. |
![]() |
अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम |
आणखीन काय पहाल :
कसबा
म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सरदारांनी पकडलं ते ठिकाण.
कसबा गावात सुरुवातीला संभाजी महाराजांची समाधीही आहे. एका दगडातून
कोरलेलं भव्य मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. देवळाच्या आवारात प्रवेश
केल्यावरच समोरची भव्य आणि कोरीव रचना पाहून मन प्रसन्न होतं. देवळाच्या
शिल्पकारांच्या कौशल्याला आणि मेहनतीला आपण मनापासून दाद देतो. मंदिराला
तीन दरवाजे असून, प्रत्येक दरवाज्यात एक पालथे ताट आहे. अशी एकूण सहा ताटं
या देवळात आहेत. पांडवांनी अज्ञातवासात असताना आपला मोठा भाऊ कर्ण याची
आठवण म्हणून एका रात्रीत एका दगडातून हे मंदिर कोरून काढलं आणि पहाट
झाल्यामुळे जेवणाची ताटं ते तशीच टाकून गेले, अशी एक आख्यायिका आहे. सुमारे
चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली ताटं हे देवळाचं एक वैशिष्ट्य आहे.
मंदिरातली
शिल्पकला अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन
अष्टभैरव द्वारपाल आहेत. मुख्य मंडपात नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती
दिसते. मंडपाला चार खांब असून, चारही एकसमान आहेत. दक्षिण दरवाज्याजवळील
खांबावर शिलालेख कोरलेला दिसतो. पांडवांच्या पाच ताटांबरोबर कर्णाचं म्हणून
सहावं ताट दिसतं, त्यावर नंदीची मूर्ती आहे. महालक्ष्मी, शेषशायी विष्णू,
देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी अशा अनेक मूर्ती देवळात असून,
त्यांचं कोरीवकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या आवारात उत्तर दिशेला
सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचं मंदिर आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना
आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी.
मंदिराच्या मागेच अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगमही पाहायला
मिळतो.
शिरंबेचा मल्लिकार्जुन :
संगमेश्वर तालुक्यात माखजन, वहाळ गावाजवळ हे ठिकाण आहे. निसर्गरम्य
परिसरात सुमारे ५० चौरस फुटांच्या तळ्याच्या मध्यभागी कोकणी पद्धतीच्या
मंदिराची उभारणी केली गेली आहे. मंदिरात जाण्यासाठी छोटा पूल बांधण्यात आला
आहे.मंदिराच्या चारही बाजूंनी स्वच्छ, वाहते पाणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर असे आहे, की जे पाण्यात आहे. येथील शिवलिंगही पाण्यामध्येच आहे. गाभारा सभामंडपाच्या खूप खाली आहे. शिवलिंग निम्मे पाण्यातच आहे. मंदिराजवळ ग्रामदेवता व गणपतीचे मंदिर आहे. संगमेश्वर एसटी बसस्थानकावरून शिरंबे येथे जाण्याची सोय आहे.
आरवली व तुरळ – गरम पाण्याचे झरे : मुंबई-गोवा
महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात आरवली येथे गरम पाण्याचे कुंड आहे.
त्वचारोगावर उपाय म्हणून अनेक लोक येथे स्नानासाठी येत असतात. येथील पाणी
मध्यम गरम (कोमट) असते.
आरवली
येथून थोडे पुढे गेल्यावर तुरळ येथे अगदी उकळते पाणी कुंडातून सतत बाहेर
येत असते. येथील पाणी इतके गरम असते, की कुंडातून बाहेर पडणारे पाणी सुमारे
अर्धा किलोमीटरपर्यंत गरम असते. येथे बहिरोबाचे एक जुने मंदिर असून,
प्राचीन मूर्तीही पाहायला मिळतात. खरं तर तुरळ आणि राजवाडी या दोन गावांदरम्यान जवळपास १४ ठिकाणी असे गरम
पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे सृष्टीच्या या भौगोलिक चमत्काराचा मनसोक्त
आनंद इथे लुटता येतो.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गडनदी पात्राशेजारच्या आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडांना 2019 या वर्षी 108 वर्ष पूर्ण झाली आहेत. ब्रिटीशांच्या काळात मुंबई गोवा मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम सुरू असताना 24 जानेवारी 1911 रोजी गरम पाण्याच्या साठ्याचा शोध लागला होता.
ब्रिटीशांनी या महामार्गाचे काम हाती घेतले तेव्हा हे काम सोपे नव्हते. आजच्या सारखी यंत्रणा त्या काळात नसल्याने हे काम प्रचंड आव्हानात्मक होते. डोंगर खोदणे आणि पूल उभारणे ही कामे अत्यंत अवघड होती. संगमेश्वर तालुक्यातील आरवलीजवळ ब्रिटीशांनी गडनदीवर काळ्या पाषाणात पूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. यावेळी या गरम पाण्याच्या कुंडांचा शोध लागला होता. या गरम पाण्याचा या महामार्गाने येणा-जाणाऱ्या प्रवाशांना लाभ व्हावा यासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी दोन स्वतंत्र कुंडे बांधली गेली
संगमेश्वर तालुक्यात मुंबई गोवा महामार्गालगत राजवाडी,तुरळ आणि आरवली येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. यातील तुरळ आणि राजवाडी येथील कुंडात असणाऱ्या पाण्याचे तापमान अधिक असल्याने या पाण्याने स्नान करणे अशक्य होते. परिणामी आरवली येथील कुंडावर पर्यटक, प्रवासी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
संगमेश्वर येथे ब्रिटीशांनी 1911 साली उभारलेला डाकबंगला देखील 108 वर्षांचा झाला आहे. दुर्दैवाने एका बाजूला नदी असल्याने आणि रस्त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने यावर्षी हा डाकबंगला जमीनदोस्त केला जाणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गडनदी पात्राशेजारच्या आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडांना 2019 या वर्षी 108 वर्ष पूर्ण झाली आहेत. ब्रिटीशांच्या काळात मुंबई गोवा मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम सुरू असताना 24 जानेवारी 1911 रोजी गरम पाण्याच्या साठ्याचा शोध लागला होता.
ब्रिटीशांनी या महामार्गाचे काम हाती घेतले तेव्हा हे काम सोपे नव्हते. आजच्या सारखी यंत्रणा त्या काळात नसल्याने हे काम प्रचंड आव्हानात्मक होते. डोंगर खोदणे आणि पूल उभारणे ही कामे अत्यंत अवघड होती. संगमेश्वर तालुक्यातील आरवलीजवळ ब्रिटीशांनी गडनदीवर काळ्या पाषाणात पूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. यावेळी या गरम पाण्याच्या कुंडांचा शोध लागला होता. या गरम पाण्याचा या महामार्गाने येणा-जाणाऱ्या प्रवाशांना लाभ व्हावा यासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी दोन स्वतंत्र कुंडे बांधली गेली
संगमेश्वर तालुक्यात मुंबई गोवा महामार्गालगत राजवाडी,तुरळ आणि आरवली येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. यातील तुरळ आणि राजवाडी येथील कुंडात असणाऱ्या पाण्याचे तापमान अधिक असल्याने या पाण्याने स्नान करणे अशक्य होते. परिणामी आरवली येथील कुंडावर पर्यटक, प्रवासी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
संगमेश्वर येथे ब्रिटीशांनी 1911 साली उभारलेला डाकबंगला देखील 108 वर्षांचा झाला आहे. दुर्दैवाने एका बाजूला नदी असल्याने आणि रस्त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने यावर्षी हा डाकबंगला जमीनदोस्त केला जाणार आहे.
करबुडे बोगदा आणि पानवल पूल :
रत्नागिरी जिल्ह्यातून कोकण रेल्वेचा १८४ किलोमीटरचा मार्ग जातो.
डोंगरातून, खाडी आणि नद्यांवरून नागमोडी वळणे घेत जाणाऱ्या या रेल्वेने
प्रवास करणे आनंददायी असते. या रेल्वेमार्गावर आशियातील सर्वांत मोठा, सहा
किलोमीटर लांबीचा करबुडे बोगदा आहे. निवळी फाट्यावरून गणपतीपुळ्याला जाताना
उजवीकडे वळल्यास बोगद्याकडे जाण्यासाठी फाटा लागतो. अर्थात हा बोगदा
रेल्वेन जाताना बघण्यात मजा आहे.

रत्नागिरीजवळील रेल्वेचा पानवल पूल दोन डोंगरांना जोडतो. या पुलासाठी १२ कमानी आणि १० खांब बांधलेले आहेत. त्यापैकी सहा खांब हे कुतुबमिनारपेक्षाही उंच आहेत. सद्यस्थितीत हा आशियातील रेल्वेचा सर्वांत उंच पूल आहे.
उक्षीतील कातळशिल्प
इंग्रजी भाषेत जी ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाते तिला मराठीत ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘पेट्रोग्लिफ्स’ असे आहे. ग्रीक भाषेतला हा शब्द असल्याने ग्रीक भाषेत पेटाचा अर्थ पाषाण आणि ग्लिफीन म्हणजे कोरणे असा आहे. निसर्गातल्या पाषाणावर मानवाने कोरलेल्या खुणा म्हणजे ‘पेट्रोग्लिफ्स’ होय. सर्वसाधारणपणे अशी शिल्प ही गुहेच्या भिंंतीवर किंवा उभ्या पाषणाच्या पृष्ठभागावर कोरली जातात.
कातळशिल्पांची ठिकाणे
रत्नागिरी तालुका - जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी - गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले. राजापूर तालुका - देवाचेगोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरेकोंब, विखारेगोठणे, बारसू, पन्हाळे, शेडे, कोतापूर, देवीहसोळ. लांजा तालुका - भडे, हर्चे, रूण, खानावली, रावारी, लावगण
कोकणचा इतिहास उलगडणाऱ्या या खोदशिल्पांना राज्य संरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या लोकसहभागातून या कातळ खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधलेला आहे. त्याशेजारी चबुतरा बांधला असून, त्यावरून कातळशिल्प व्यवस्थित दिसू शकते.. त्यामुळे उक्षी गावात पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल. उक्षीमध्ये पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठीही गर्दी होते. त्यासोबत कातळशिल्पे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
रत्नागिरीतील लाजूळ व रानपाट या दोन बोगद्यांमध्ये असणारा हा निसर्गरम्य, आकर्षक धबधबा आपल्याला जाता-येता रेल्वेने पाहता येऊ शकतो. हे ठिकाण पाहण्यासाठी लाजूळ येथे गाडी पार्क करुन पायी १ ते १.५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. किंवा मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाकडे जाणारा रस्ता आहे. या गावापासून गणपतीपुळे ३२ किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यानेच रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचता येते. कोकण रेल्वेने प्रवास करताना रत्नागिरीला येताना उक्षी स्थानक ओलांडल्यावर जवळच उजवीकडे उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो.
पावसाळ्यात या धबधब्याखाली जाता येत नाही. कारण पाण्याचा प्रवाह जोराचा असतो. परंतु श्रावणानंतर या पाण्याचा प्रवाह कमी होतो. त्यानंतर धबधब्याखाली आंघोळ करता येऊ शकते. या धबधब्याचे वैशिष्ट्य असे की, येथे आंघोळीसाठी कोणताही धोका नाही.धबधब्याचे पाणी थेट अंगावर घेता येते. या धबधब्याशेजारी एक छोटा डोह आहे. यामध्ये या धबधब्याचे पाणी साचून पुढे वाहू लागते. या ठिकाणी पाण्याची खोली साधारण ३ ते ४ फूट उंच आहे. त्यामुळे या धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी लहान मुले घेऊन गेल्यास कोणताही धोका नाही.धबधब्याशेजारी सपाट दगड असून, या ठिकाणी बसून जेवणासह अल्पोपाहार करण्यासाठी मोठी जागा आहे. धबधब्याच्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल, असा आहे. या निसर्गरम्य धबधब्याची माहिती नसल्याने हा धबधबा अजूनही दुर्लक्षित आहे. मात्र या ठिकाणी एक काळजी घेतली पाहिजे, धबधब्याकडे जाताना रेल्वेरुळाजवळ थांबू नये.

रत्नागिरीजवळील रेल्वेचा पानवल पूल दोन डोंगरांना जोडतो. या पुलासाठी १२ कमानी आणि १० खांब बांधलेले आहेत. त्यापैकी सहा खांब हे कुतुबमिनारपेक्षाही उंच आहेत. सद्यस्थितीत हा आशियातील रेल्वेचा सर्वांत उंच पूल आहे.
उक्षीतील कातळशिल्प
इंग्रजी भाषेत जी ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाते तिला मराठीत ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘पेट्रोग्लिफ्स’ असे आहे. ग्रीक भाषेतला हा शब्द असल्याने ग्रीक भाषेत पेटाचा अर्थ पाषाण आणि ग्लिफीन म्हणजे कोरणे असा आहे. निसर्गातल्या पाषाणावर मानवाने कोरलेल्या खुणा म्हणजे ‘पेट्रोग्लिफ्स’ होय. सर्वसाधारणपणे अशी शिल्प ही गुहेच्या भिंंतीवर किंवा उभ्या पाषणाच्या पृष्ठभागावर कोरली जातात.
परंतु, कोकणात ती आकाशाच्या छताखाली, कातळावर कोरली गेली आहेत. मानवाच्या
कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून या शिल्परचनेकडे पाहिले जाते.
इसवी सन पूर्व ३५ हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचे शिल्प असल्याचे
तज्ज्ञांचे मत आहे.
विविध प्राणी, पक्षी, सुंदर नक्षीकाम असलेली ही खोदचित्रे गूढ आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली ही कातळशिल्प नजरेस पडल्यानंतर त्याबाबतचे
कुतूहल अधिक वाढले. रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये कातळशिल्पे सापडली
आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात एक
हजारपेक्षा अधिक कातळशिल्पे असून, या प्रत्येक रचना भिन्न आहेत. मंडणगड व
गुहागर तालुक्यातही कातळशिल्पे सापडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड
तालुक्यातही काही रचना सापडल्या आहेत.
२० फूट लांब व १६ फूट रूंदीचे हत्तीचे शिल्प कोरण्यात आले आहे. या
शिल्पाच्या निकट तसेच शेजारच्या गावातही काही कोरीव कातळ शिल्प आढळली आहेत.
प्राचीन कलेचा उत्कृष्ट नमुना या शिल्पाव्दारे लोकांसमोर येत आहे. अनुप
सुर्वे यांच्या जागेमध्ये हे हत्तीचे शिल्प आढळले. त्यांनी विनामोबदला ही
जागा उपलब्ध करून दिली. तसेच जवळच काशिनाथ देसाई यांच्या जागेमध्ये सुमारे
पंधरा खोदशिल्पे आहेत.
कातळशिल्पांची ठिकाणे
रत्नागिरी तालुका - जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी - गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले. राजापूर तालुका - देवाचेगोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरेकोंब, विखारेगोठणे, बारसू, पन्हाळे, शेडे, कोतापूर, देवीहसोळ. लांजा तालुका - भडे, हर्चे, रूण, खानावली, रावारी, लावगण
कोकणचा इतिहास उलगडणाऱ्या या खोदशिल्पांना राज्य संरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या लोकसहभागातून या कातळ खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधलेला आहे. त्याशेजारी चबुतरा बांधला असून, त्यावरून कातळशिल्प व्यवस्थित दिसू शकते.. त्यामुळे उक्षी गावात पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल. उक्षीमध्ये पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठीही गर्दी होते. त्यासोबत कातळशिल्पे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
कसे जायचे?
हत्तीचे
हे खोदशिल्प उक्षी गावातील प्रसिद्ध धबधब्यापासून केवळ दोन किलोमीटर
अंतरावर आहे. हे ठिकाण मुंबई-गोवा महामार्गापासून २५ किलोमीटर, तर
रत्नागिरी शहरातून ते ४० किलोमीटर अंतरावर आहे. कोकण रेल्वेचे स्थानकही
उक्षी गावात असल्याने बाहेरील पर्यटकांनाही येथे जाणे शक्य आहे.
रानपाटचा धबधबा :
रत्नागिरी तालुक्यातील रानपाट येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. १२
महिने वाहणाऱ्या धबधब्याकडे पाहून मन उल्हासित होऊन धबधब्याखाली मनसोक्त
आंघोळ करण्याचा मोह आवरला जात नाही. मात्र, या नयनमनोहर धबधब्याकडे
दुर्लक्ष होत आहे.रत्नागिरीतील लाजूळ व रानपाट या दोन बोगद्यांमध्ये असणारा हा निसर्गरम्य, आकर्षक धबधबा आपल्याला जाता-येता रेल्वेने पाहता येऊ शकतो. हे ठिकाण पाहण्यासाठी लाजूळ येथे गाडी पार्क करुन पायी १ ते १.५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. किंवा मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाकडे जाणारा रस्ता आहे. या गावापासून गणपतीपुळे ३२ किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यानेच रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचता येते. कोकण रेल्वेने प्रवास करताना रत्नागिरीला येताना उक्षी स्थानक ओलांडल्यावर जवळच उजवीकडे उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो.
पावसाळ्यात या धबधब्याखाली जाता येत नाही. कारण पाण्याचा प्रवाह जोराचा असतो. परंतु श्रावणानंतर या पाण्याचा प्रवाह कमी होतो. त्यानंतर धबधब्याखाली आंघोळ करता येऊ शकते. या धबधब्याचे वैशिष्ट्य असे की, येथे आंघोळीसाठी कोणताही धोका नाही.धबधब्याचे पाणी थेट अंगावर घेता येते. या धबधब्याशेजारी एक छोटा डोह आहे. यामध्ये या धबधब्याचे पाणी साचून पुढे वाहू लागते. या ठिकाणी पाण्याची खोली साधारण ३ ते ४ फूट उंच आहे. त्यामुळे या धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी लहान मुले घेऊन गेल्यास कोणताही धोका नाही.धबधब्याशेजारी सपाट दगड असून, या ठिकाणी बसून जेवणासह अल्पोपाहार करण्यासाठी मोठी जागा आहे. धबधब्याच्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल, असा आहे. या निसर्गरम्य धबधब्याची माहिती नसल्याने हा धबधबा अजूनही दुर्लक्षित आहे. मात्र या ठिकाणी एक काळजी घेतली पाहिजे, धबधब्याकडे जाताना रेल्वेरुळाजवळ थांबू नये.
देवरूख : हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. रायगडावरून विशाळगडावर जाताना छत्रपती
शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजीराजे श्री सोळजाई मंदिरात दर्शनासाठी येथे
येत असत. येथे त्या वेळची घोड्यांची पागाही आहे. समाजसुधारक पार्वतीबाई
आठवले व भूदानयज्ञातील विनोबाजींचे सहकारी शरदशेठ सार्दळ व त्यांची कन्या
स्वातंत्र्यसैनिक विमल सार्दळ यांचे जन्मस्थान येथे आहे.
देवरुख परिसराचा नकाशा
देवरुख परिसराचा नकाशा
गणेशमूर्तींचा अमोल संग्रह
.........
वसंत
मनोहर उर्फ बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या पावशतकात
निर्माण झाले आहे. सत्तावीस वर्षांपूर्वी त्यांनी छोट्याशा जागेत अवघ्या
५०० चौरस फूट जागेत सुश्रुत सर्जिकल्स कारखाना सुरू केला. कालांतराने अॅडलर
नावाची आणखी एक कंपनी सुरू झाली. आता भव्य इमारतीतून चालणाऱ्या या
कंपन्यांमध्ये शरीरातील हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरले प्रत्येक
इन्स्ट्रुमेंट तयार केले जाते. या उत्पादनाला जगभरात मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून कच्चा माल आयात करून या साधनांचे उत्पादन केले
जाते. दोन्ही कंपन्यांना उत्पादनांसाठी आयएसओ प्रमाणपत्रे आहेत. या
कारखान्यांमुळे तीनशेहून अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे; मात्र ही केवळ
उद्योगाची एकच बाजू झाली. तेथील कामगार-कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीची सोय
झाली असली, तरी सांस्कृतिक आणि कला क्षेत्राची मोठी भूक या उद्योगाच्या
पाठबळावर सुरू झालेल्या पित्रे ट्रस्ट आणि अन्य संस्थांनी भागविली आहे.
मोठे सामाजिक कार्यही या संस्थांनी केले आहे.
‘क्रेडार’ या संस्थेच्या स्थापनेतून डी-कॅड (देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयात चित्रकला, हस्तकला, पेपर क्राफ्ट, पेपर मॅश, स्क्रीन प्रिंटिंगसह कलाविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात. हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंची विक्रीही तेथे होते. देवरूखमधील नाट्यगृहाची कमतरता लक्षात घेऊन बाळासाहेब पित्रे प्रायोगिक कलामंच स्थापन करण्यात आला. तेथे संगीत, सांस्कृतिक महोत्सव, व्यावसायिक नाट्यप्रयोग होतात. पित्रे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यही केले जाते. चारशे शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. परिसर विकास प्रकल्प राबवून प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराचे दिशादर्शनही करण्यात आले आहे. बेंगळुरू येथील विवेकानंद योग संशोधन संस्थेशी संलग्न असलेले बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र रत्नागिरीत राष्ट्रीय सेवा समितीतर्फे चालविले जाते. या केंद्राची शाखा आता देवरूखमध्येही सुरू होत आहे.

देवरूख
शहरात डी कॅड संस्थेने सुरू केलेल्या उषाताई नातू गणेश संग्रहालयात
देशविदेशांतील दोनशेहून अधिक गणेशमूर्ती एकत्रित ठेवण्यात आल्या आहेत. या
वर्षीच्या गणेशोत्सवातही भाविकांना या मूर्ती पाहण्यासाठी खुल्या ठेवण्यात
आल्या आहेत. कलेची सामाजिक दृष्टी असलेल्या बाळासाहेबांनी कलेचे आणि
कलाकारांचीही अनेक रोपे लावली आहेत, असेच म्हणता येईल. उषाताई नातू
गणेशमूर्ती संग्रहालय हेसुद्धा बाळासाहेबांच्या कलात्मक दृष्टीचेच एक अपत्य
आहे.
बाळासाहेबांच्या
विहीणबाई म्हणजेच त्यांच्या सूनबाई भारती अजय पित्रे यांच्या मातोश्री उषा
माधव नातू यांनाही कलेची दृष्टी उपजतच लाभली होती. भारती पित्रे यांच्याशी
बोलताना त्याचे अनेक दाखले मिळतात. अगदी स्वयंपाक करायचा झाला, तरी तो
व्यवस्थित असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. प्रत्येकच बाबीकडे त्या
वेगळेपणाने पाहत असत. गणेशमूर्तींच्या संग्रहाची सुरुवात त्यांच्या या
वेगळेपणाने पाहण्यातूनच झाली. त्या मुंबईला राहत. देशात विविध ठिकाणी आणि
विविध देशांमध्ये प्रवास करताना तेथील गणेशांची रूपे त्यांनी संग्रहित
केली. त्यांच्याच नात्यातील डॉ. वझे यांच्या एका पुस्तकातून त्यांनी त्या
मूर्तींचे संदर्भ लावले. विश्वकोशाच्या आधारे ठिकठिकाणच्या मूर्तींची
माहिती संकलित केली. काही मूर्ती त्यांनी वर्णनानुसार खास कलाकारांकडून
तयार करवून घेतल्या. त्यांचा हा छंद त्यांनी कित्येक वर्षांपासून जोपासला
होता. अगदी १९६० सालापासूनच्या मूर्ती त्यांनी संग्रहित केल्या होत्या.
उभा, आडवा, बसलेला, नृत्य करणारा अशा विविध पोझेसमधील मूर्ती त्यात आहेत.
माती, चिनी माती, लाकूड, पोवळे, विविध रत्ने, तसेच धातूच्या मूर्तींचाही
त्यात समावेश आहे. काही मूर्तींच्या तपशिलावरून नजर फिरविली, तरी त्यातील
वैविध्य लक्षात येईल. त्यांच्या संग्रहातील सर्वांत जुनी मातीच्या चौकटीची
मूर्ती १९६० साली त्यांनी मिळविली. सर्वांत अलीकडच्या मूर्ती १९९४ सालच्या
गोमेद आणि पुष्कराज रत्नामध्ये बनविलेल्या आहेत. कोयरीच्या आकाराचा गणपती
त्यांनी मुंबईच्या चोरबाजारातून मिळविला आहे. संग्रहालयात दीड इंचापासून ते
चार फुटांपर्यंतच्या मूर्तींचा समावेश आहे. चौदा विद्या आणि ६४ कलांचा
अधिपती असलेल्या विघ्नहर्त्या गणेशाची महती केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण
जगभरात आहे. जगभरात गणरायाचे भक्त आणि त्याची स्थाने आढळतात. विघ्नहर्त्या
गणरायाच्या कीर्तीचा महिमा अगाध आहे. त्याचे दर्शन ठिकठिकाणच्या
मूर्तींच्या आकारातून प्रकट होते.

संग्रहातील
काही मूर्तींचे वर्णन, त्या जेथे उपलब्ध झाल्या ते ठिकाण आणि त्या
संग्रहात समविष्ट झाल्याचे वर्ष असे : स्फटिक (१९९३), चंद्रमणी (१९७६),
फिरोजा (१९८६), गनस्टोन, श्रीनगर (१९८६), पन्ना एमेराल्ड, बेंगळुरू
(१९८१), पोवळे (१९८८), अलेक्झांडर, त्रिवेंद्रम (१९७४), माणिक, दिल्ली
(१९७६), टायगर स्टोन (१९९१), कॅट्स आयस्टोन (१९९१), नीलमणी, त्रिवेंद्रम
(१९८४), हिरवे मीनावर्क डिझाइन देऊन तयार करून घेतलेला गणपती (१९८५),
चांदीच्या अंगठीतील गणपती (१९८७), १४ कॅरेट सोन्याचा उजव्या सोंडेचा गणपती
(१९९४), दशावतारी, दार्जिलिंग (१९८९), तुळशी वृंदावन, फुलदाणी (आर्टिस्ट
आजगावकर यांनी केलेले) (१९७५, १९७६), फुलदाणी, पठाणकोट (१९८८), काळा उभ्या
दगडाचा मोठा गणपती, हैदराबाद (१९७८), टेराकोटा (१९८५, १९९१), बेंगळुरूजवळ
स्वतः चितारलेला गणपती (१९८९), उंदरावर उभा अष्टभुज, त्रिवेंद्रम (१९८४),
अख्ख्या हस्तिदंतातून कोरलेली गणेश-लक्ष्मी, चंदनातील उभा, म्हैसूर (१९७२),
चारही दिशांना तोंड असलेला छत्रीधारी, महाबळेश्वर (१९७४), तीन ताम्रपट
(१९७४), काचेचा सुवर्णवर्ख अलंकारयुक्त (१९७९), संगमरवरी, आग्रा (१९८१),
ग्रीन स्टोन, दिल्ली (१९८१), मंदारवृक्षाच्या मुळाचा (१९९१), सुपारीवर
कोरलेला, गोवा (१९८९), दगडी डबी, हैदराबाद (१९७०), साबण्या (सोप स्टोन),
दिल्ली (१९७६), पोपटी दगड, हैदराबाद (१९७४), पितळी, तिरुपती (१९७८), नाच
करणारा, श्रीनगर (१९७७), सोंडेने लाडू घेणारा उभा, चंडीगड (१९७६), देवीसह
उभा राहून नृत्य करणारा, काश्मीर (१९७५), तारेचा उभा, बडोदा (१९८४),
अष्टविनायक (१९८५), काचेचा उभा, पुणे (१९९०), उभा, गीता वाचणारा (१९८५),
गौरीसह बारा हातवाला, महाबळेश्वर (१९८१), उभा, तारेचा, अहमदाबाद (१९७९),
बासरीवादक, डफवादक (१९८२), गणपतीपुळे (१९८९), तांब्याचा, नाशिक (१९८७),
पितळेचा बसलेला (१९८५), टिटवाळा (१९८८), पंचागुळ डबी, गोवा (१९९१),
तांब्याचा पाय पसरून रुसून बसलेला, महाबळेश्वर (१९८४), शेषशायी पंचधातू,
दिल्ली (१९७४), नागावर बसलेला, बेळगाव (१९७३), फायबर ग्लास (आर्टिस्ट वाघ
यांच्याकडून करून घेतलेला) (१९८०), वीणावादक (१९९४), कालियामर्दन (१९८५),
दुतोंडी (१९८६), नेपाळी नाचाच्या वेशात (१९८२), जस्ताचा (१९८१), एकाच
पायावर नाचणारा, म्हैसूर (१९७६), चंदनाचा पेन्सिल होल्डर, म्हैसूर (१९७६),
मडक्यावरील (ओल्ड सिरॅमिक) (१९९०), अॅल्युमिनियम फॉइल (भारती पित्रे)
(१९८५), पितळेचा, नेपाळ, पंचधातू पोकळ मॉडर्न आर्ट, उदयपूर (१९८९).
याशिवाय
भरतनाट्यममुद्रा, वाजंत्रीवाला, तीन तोंडाचा, लाकडी अलंकारयुक्त दगडावरील
कोरीव अशा विविध स्वरूपातील गणपती संग्रहालयात आहेत. याशिवाय चीन, जपान,
इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया, आफ्रिका, श्रीलंका, भूतान, सुदान आणि इतर
ठिकाणच्या देखण्या मूर्तीही दिवंगत नातू यांच्या या संग्रहात आहेत. त्यांनी
अनेक मूर्ती त्यांच्या हितचिंतकांना भेटीदाखलही दिल्या आहेत. त्या दिल्या
नसत्या, तर हा संग्रह कितीतरी मोठा झाला असता. आपल्या पश्चात या मूर्ती
सांभाळल्या जाव्यात, यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेला गणेशमूर्तींचा
संग्रह ‘डी-कॅड’ची मातृसंस्था ‘क्रेडार’ला भेट म्हणून दिला. त्यातूनच
‘डी-कॅड’ने उषाताई नातू यांच्या नावाने चार वर्षांपूर्वी मूर्तींचे
संग्रहालय सुरू केले आहे. देवरूख येथील हे संग्रहालय गणेशभक्तांनी आणि
कलाप्रेमींनीही जरूर पाहावे असेच आहे.
भाद्रपद
महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते, अशी
परंपरा आहे; मात्र देवरुख येथील ऐतिहासिक चौसोपी वाड्यातील उत्सव भाद्रपद
शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि शुद्ध षष्ठीला संपतो. गेली ३५० वर्षे हा
उत्सव सुरू आहे.
मार्लेश्वरची डोंगरलेणी
कोकणातली डोंगरातली, आडबाजूची शिवमंदिरं ही संस्कृतीची, निसर्गाची एक सुंदर देणगी आहे. प्राचीन काळात बांधली गेलेली ही मंदिरं डोंगरात आडबाजूला असली, तरी आता तिथे जाण्याच्या वाटा सोप्या झाल्या आहेत. डोंगराच्या कपारीत कोरून काढलेली रचना, प्रचंड मेहनत घेऊन घडवलेली अप्रतिम शिल्पं आणि बाजूलाच वाहणारे असंख्य झरे, ओहोळ आणि काही धबधबे असा हा निसर्ग अक्षरशः वेड लावणारा. काही मंदिरं डोंगरातल्या सपाट जागी, व्यवस्थितपणे घडवण्यात आली आहेत, तर काही अगदी अवघड अशा जागी बांधलेली. रत्नागिरी जिल्ह्यातलं मार्लेश्वरचं मंदिर हे असंच निसर्गाच्या कुशीत दडलेलं आणि शेजारीच वाहणाऱ्या अफाट धबधब्यामुळे पावसाळ्याच्या हंगामात आवर्जून लक्ष वेधून घेणारं.

संगमेश्वर
तालुक्यातल्या देवरूख या मुख्य ठिकाणापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर
डोंगरात हे शिवाचं स्थान आहे. संगमेश्वर या गावाहूनही मार्लेश्वरकडे जाता
येतं.

मार्लेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचण्याआधीच काही अंतरापासून नागमोडी आणि हिरव्या राईनं वेढलेली अशी भन्नाट वाट सुरू होते. हा घाट कोकणाची सगळी वैशिष्ट्यं दाखवत आपलं लक्ष वेधून घेतो. मध्येच डोंगरातला एखादा चुकार धबधबा आपल्याला वाकुल्या दाखवतो, तर कधी माकडांची टोळी आपली वाट अडवून बसते.

कधी झाडीतून अवखळपणे वाहणारा एखादा ओहोळ त्याचा प्रवाह शोधण्यासाठी आपल्याला आव्हान देत राहतो. निसर्गाच्या या वेगवेगळ्या रूपांचा आस्वाद घेत, नागमोडी वाटेचा आनंद लुटत आपण मार्लेश्वरच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. इथे गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे. गाड्या त्याच ठिकाणी सोडून डोंगरात वसलेल्या मार्लेश्वर देवस्थानाची वाट आता चढून जायची असते. डोंगरातला हा प्रवास निसर्गाच्या साथीनं आणि बांधलेल्या भक्कम पायऱ्यांवरून होतो.

मार्लेश्वर मंदिराची कमान लक्ष वेधून घेते आणि आपण पायऱ्या चढायला सुरुवात करतो. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे सातशे पायऱ्या असल्या, तरी ही वाट डोंगराच्या कडेकडेने जात असल्यामुळे प्रवासाचा थकवा जाणवत नाही. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी, अशा या प्रवासात अखंड झाडांच्या कमानी, धबधबे आणि पावसाचीही साथ असते.

मार्लेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचण्याआधीच काही अंतरापासून नागमोडी आणि हिरव्या राईनं वेढलेली अशी भन्नाट वाट सुरू होते. हा घाट कोकणाची सगळी वैशिष्ट्यं दाखवत आपलं लक्ष वेधून घेतो. मध्येच डोंगरातला एखादा चुकार धबधबा आपल्याला वाकुल्या दाखवतो, तर कधी माकडांची टोळी आपली वाट अडवून बसते.

कधी झाडीतून अवखळपणे वाहणारा एखादा ओहोळ त्याचा प्रवाह शोधण्यासाठी आपल्याला आव्हान देत राहतो. निसर्गाच्या या वेगवेगळ्या रूपांचा आस्वाद घेत, नागमोडी वाटेचा आनंद लुटत आपण मार्लेश्वरच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. इथे गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे. गाड्या त्याच ठिकाणी सोडून डोंगरात वसलेल्या मार्लेश्वर देवस्थानाची वाट आता चढून जायची असते. डोंगरातला हा प्रवास निसर्गाच्या साथीनं आणि बांधलेल्या भक्कम पायऱ्यांवरून होतो.

मार्लेश्वर मंदिराची कमान लक्ष वेधून घेते आणि आपण पायऱ्या चढायला सुरुवात करतो. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे सातशे पायऱ्या असल्या, तरी ही वाट डोंगराच्या कडेकडेने जात असल्यामुळे प्रवासाचा थकवा जाणवत नाही. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी, अशा या प्रवासात अखंड झाडांच्या कमानी, धबधबे आणि पावसाचीही साथ असते.

तीन
बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं हे ठिकाण अतिशय मनोरम आहे. धार्मिक नसलेला
माणूसही केवळ पर्यटनाच्या हेतूने या ठिकाणी येऊन छान रमू शकतो.

मार्लेश्वर मंदिर परिसराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेला अफाट धबधबा. मंदिरापासून थोडं पुढे गेलं, की एका डोंगराच्या कड्यावरून बेफामपणे स्वतःला खाली झोकून देणारा हा धबधबा दिसतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं. धबधबा म्हणजे मनसोक्त आंघोळ, असं गणित असलं, तरी पावसाळ्यात या धबधब्याचा प्रवाह एवढा जोराचा असतो, की त्याच्या धारेच्या आसपासही फिरकता येत नाही.

हा धबधबा जिथे पडतो, तिथे एक मोठं, खोल कुंड तयार झालं असून, तिथूनच नदीचा उगम होतो. हीच संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध बावनदी.

धारेश्वर या नावाने हा धबधबा ओळखला जातो. पाऊस ओसरल्यानंतर काही काळानंतर या धबधब्यापर्यंत जाण्याची संधी मिळते; मात्र तरीही एकूणच प्रवाहाचा अंदाज घेऊन आणि योग्य सल्ला घेऊन जाणं श्रेयस्कर.

मार्लेश्वर मंदिर परिसराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेला अफाट धबधबा. मंदिरापासून थोडं पुढे गेलं, की एका डोंगराच्या कड्यावरून बेफामपणे स्वतःला खाली झोकून देणारा हा धबधबा दिसतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं. धबधबा म्हणजे मनसोक्त आंघोळ, असं गणित असलं, तरी पावसाळ्यात या धबधब्याचा प्रवाह एवढा जोराचा असतो, की त्याच्या धारेच्या आसपासही फिरकता येत नाही.

हा धबधबा जिथे पडतो, तिथे एक मोठं, खोल कुंड तयार झालं असून, तिथूनच नदीचा उगम होतो. हीच संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध बावनदी.

धारेश्वर या नावाने हा धबधबा ओळखला जातो. पाऊस ओसरल्यानंतर काही काळानंतर या धबधब्यापर्यंत जाण्याची संधी मिळते; मात्र तरीही एकूणच प्रवाहाचा अंदाज घेऊन आणि योग्य सल्ला घेऊन जाणं श्रेयस्कर.
कसं जायचं?
देवरूखपासूनचं अंतर १८ किलोमीटर, संगमेश्वरपासूनचं अंतर ३० किलोमीटर.
पुण्यापासून सुमारे २७० किलोमीटर. (उंब्रज-पाटण-कोयना-चिपळूणमार्गे)
मुंबईहून अंतर सुमारे २९० किलोमीटर (पनवेल-पेण-खेड-चिपळूणमार्गे)
टिकलेश्वर:-
देवरुख जवळील एक सुंदर पवित्र स्थान म्हणजे टिकलेश्वर मंदिर. सह्याद्रीच्या रांगामध्ये टिकालेश्वर मंदिर एका उंच शिखरावर आहे. टिकलेश्वर पर्वताच्या शिखरावर उभे राहून, तुम्हाला लांब पसरलेले दाट हिरवेगार जंगले, दर्याखोर्या आणि सह्याद्रीचे वैभवशाली सौंदर्य पाहायला मिळते. भाविकांबरोबरच अनेक ट्रेकर्स आणि पर्वतारोही टिकेलेश्वरच्या सुंदर दर्या आणि पर्वतरांगाकडे आकर्षित होतात. देवरुखपासून 4 किलोमीटर अंतरावर टिकालेश्वरच्या पायथ्याशी तलावडे हे गाव आहे. श्रावणात आणि महाशिवरात्रीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. थोडी खडतर चढण असली तरी इथला अनवट निसर्ग अनुभवायला जरुर यावे.
खोरनिनको धबधबा, लांजा
पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं आणि टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो. ऐन पावसाळ्यांत इथल्या डोंगरात कोरलेल्या सांडव्याच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी किती सुंदर दिसेल अशी कल्पना करून ज्याने कुणी हा सांडवा इथे बांधला त्याच्या सौंदर्यदृष्टीची दादच द्यायला हवी.
राजापूर-साखरपा रस्त्यावर लांजा तालुक्यामधे भांबेड गावापासून १२ किमीअंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघु पाटबंधारे विभागाने हे मातीचं धरण बांधलं आहे.

सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाला दरवाजे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात पायऱ्यांवरून एका संथ लयीत पडणाऱ्या धबधब्याच्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही विसरता न येणारा अनुभव असतो. सांडव्याच्याकडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहोचलं की समोर दिसणारं दृश्य स्तिमित करतं. धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.
धबधब्याच्या पाण्याच्या भिंतींमध्ये अक्षरशः आरपार घुसून मासे पकडणाऱ्या इथल्या स्थानिक मच्छीमारांना बघणं हा एक मजेशीर अनुभव असतो. स्वच्छ वातावरणांत हवेत धुकं नसलं की विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला लोखंडी पूल खोरनिनको धरणाच्या भिंतीवरून दिसू शकतो.

शॄंगारपुरजवळील तिवरे गावात धोदावणे हा बारमाही वहाणारा धबधबा हे ठिकाण न चुकविण्यासारखे आहे. नायरी-तिवरे छोटय़ाशा वस्तीवरून एक रस्ता सरळ आत जंगलात जातो. गाडीरस्ता संपला की पुढे फक्त जंगलातून चालत जायचे. प्रचितगड आणि टिकलेश्वराच्या डोंगररांगांच्या मधून हा रस्ता पुढे पुढे जात असतो. वाटेत अगदी एखाद दुसरे घर लागते. आपल्याला सोबत छोटय़ा नदीची असते आणि हा रस्ता जिथे जाऊन संपतो तिथे ५० फूट उंचावरून पडणारा धोदावणे धबधबा आपली वाट पाहत असतो. काही अंतर आधीपासूनच त्याचा आवाज ऐकू येत असतोच. नायरी तिवरे इथला हा धोदावणे धबधबा बारमाही आहे. शक्यतो सरत्या पावसात इथे जावे. ऐन पावसाळ्यात जर गेले तर धबधब्यापर्यंत जाताच येत नाही. नदीचे पात्र एवढे विस्तारलेले असते की पुढे रस्ताच बंद होतो. पण सरत्या पावसात गेले तर मात्र मोठा धबधबा बघता येतो. एक मोठे कुंड या धबधब्यासमोर तयार झालेले आहे. गर्द झाडी, अतिशय शांतता, आणि समोर प्रचितगडाचा अजस्र डोंगर. सगळे वातावरण अत्यंत रमणीय झालेले असते.
टिकलेश्वर:-
देवरुख जवळील एक सुंदर पवित्र स्थान म्हणजे टिकलेश्वर मंदिर. सह्याद्रीच्या रांगामध्ये टिकालेश्वर मंदिर एका उंच शिखरावर आहे. टिकलेश्वर पर्वताच्या शिखरावर उभे राहून, तुम्हाला लांब पसरलेले दाट हिरवेगार जंगले, दर्याखोर्या आणि सह्याद्रीचे वैभवशाली सौंदर्य पाहायला मिळते. भाविकांबरोबरच अनेक ट्रेकर्स आणि पर्वतारोही टिकेलेश्वरच्या सुंदर दर्या आणि पर्वतरांगाकडे आकर्षित होतात. देवरुखपासून 4 किलोमीटर अंतरावर टिकालेश्वरच्या पायथ्याशी तलावडे हे गाव आहे. श्रावणात आणि महाशिवरात्रीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. थोडी खडतर चढण असली तरी इथला अनवट निसर्ग अनुभवायला जरुर यावे.
खोरनिनको धबधबा, लांजा
पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं आणि टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो. ऐन पावसाळ्यांत इथल्या डोंगरात कोरलेल्या सांडव्याच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी किती सुंदर दिसेल अशी कल्पना करून ज्याने कुणी हा सांडवा इथे बांधला त्याच्या सौंदर्यदृष्टीची दादच द्यायला हवी.
राजापूर-साखरपा रस्त्यावर लांजा तालुक्यामधे भांबेड गावापासून १२ किमीअंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघु पाटबंधारे विभागाने हे मातीचं धरण बांधलं आहे.

सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाला दरवाजे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात पायऱ्यांवरून एका संथ लयीत पडणाऱ्या धबधब्याच्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही विसरता न येणारा अनुभव असतो. सांडव्याच्याकडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहोचलं की समोर दिसणारं दृश्य स्तिमित करतं. धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.
धबधब्याच्या पाण्याच्या भिंतींमध्ये अक्षरशः आरपार घुसून मासे पकडणाऱ्या इथल्या स्थानिक मच्छीमारांना बघणं हा एक मजेशीर अनुभव असतो. स्वच्छ वातावरणांत हवेत धुकं नसलं की विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला लोखंडी पूल खोरनिनको धरणाच्या भिंतीवरून दिसू शकतो.
धोदावणे धबधबा
शॄंगारपुरजवळील तिवरे गावात धोदावणे हा बारमाही वहाणारा धबधबा हे ठिकाण न चुकविण्यासारखे आहे. नायरी-तिवरे छोटय़ाशा वस्तीवरून एक रस्ता सरळ आत जंगलात जातो. गाडीरस्ता संपला की पुढे फक्त जंगलातून चालत जायचे. प्रचितगड आणि टिकलेश्वराच्या डोंगररांगांच्या मधून हा रस्ता पुढे पुढे जात असतो. वाटेत अगदी एखाद दुसरे घर लागते. आपल्याला सोबत छोटय़ा नदीची असते आणि हा रस्ता जिथे जाऊन संपतो तिथे ५० फूट उंचावरून पडणारा धोदावणे धबधबा आपली वाट पाहत असतो. काही अंतर आधीपासूनच त्याचा आवाज ऐकू येत असतोच. नायरी तिवरे इथला हा धोदावणे धबधबा बारमाही आहे. शक्यतो सरत्या पावसात इथे जावे. ऐन पावसाळ्यात जर गेले तर धबधब्यापर्यंत जाताच येत नाही. नदीचे पात्र एवढे विस्तारलेले असते की पुढे रस्ताच बंद होतो. पण सरत्या पावसात गेले तर मात्र मोठा धबधबा बघता येतो. एक मोठे कुंड या धबधब्यासमोर तयार झालेले आहे. गर्द झाडी, अतिशय शांतता, आणि समोर प्रचितगडाचा अजस्र डोंगर. सगळे वातावरण अत्यंत रमणीय झालेले असते.
No comments:
Post a Comment