राजापूरची
अवचितपणे प्रकट होणारी आणि लुप्त होणारी गंगा म्हणजे साक्षात गंगेचेच रूप
मानले जाते. श्री गंगेचे मंदिर अरजुना नदीकिनारी असून, ही गंगा डोंगरात उगम
पावते. साधारणत: दर तीन वर्षांनी येणारी ही गंगा प्रकट झाल्यावर मूळ गंगा,
चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, कृष्णकुंड, अग्निकुंड,
नर्मदाकुंड, सरस्वतीकुंड, गोदाकुंड, वरुणकुंड, हिमकुंड, वदिकाकुंड आणि
काशीकुंड अशा १४ कुंडांतून वाहते.
रत्नागिरी-पूर्णगड-आडिवरेमार्गे
राजापूरला गेलं, तर रानतळे गावाजवळ राजापूर शहराकडे जाण्यासाठीचा फाटा
दिसतो. तिथून तीव्र उतार उतरून गेलं, की राजापूरचा जवाहर चौक लागतो. याच
उतारात उजवीकडे धूतपापेश्वरला जाण्यासाठीचा एक रस्ता फुटतो. तिथून तीन
किलोमीटर आत गेलं, की धूतपापेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. हा आतला रस्ता
अगदीच अरुंद असल्यामुळे तिथून गाडी बेतानेच चालवावी लागते. देवळापर्यंत
चारचाकी गाडी जात असली, तरी गर्दीच्या दिवशी आत वाहनांची गर्दी होत
असल्यामुळे गाडी लांब लावूनच आत चालत यावं लागतं. मंदिराच्या परिसरात
पोहोचलं, की माडापोफळींची बनं आणि तिथून ऐकू येणारा पाण्याचा खळखळाट लक्ष
वेधून घेतो. थोडं अंतर चालून गेलं, की समोरच मंदिराची कमान दिसते.
पावसाळ्यात हा परिसर विलक्षण निसर्गसौंदर्यानं नटलेला असतो. कमानीतून आत
प्रवेश केल्यावर समोरच धूतपापेश्वराचं प्राचीन आणि देखणं मंदिर दिसतं. एका
बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला अखंड वाहणारी नदी, अशा पार्श्वभूमीवरचं हे
शंकराचं निवासस्थान पाहताक्षणीच मन वेधून घेतं. मंदिराचं आवार प्रशस्त
असून, त्याची रचनाही आकर्षक आहे. मंदिराची प्राचीनता आणि आधुनिकता यांचा
संगम साधून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे त्याचं सौंदर्य आणखी
खुललं आहे.
विरगळी च्या जवळच दग्तात कोरलेले लंबोदर आहे आणि इतर देवांच्या शिळेतून घडवलेल्या मूर्ती दिसतात. त्यामध्ये सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे राशी-शिळाचक्र.
एकाच अभेद्य दगडात कोरलेल्या या सप्तराशी ओळखणे मात्र अवघड आहे. कोणी माहितगार माणूस असेल तर तो नक्की सांगू शकतो. रोजची पूजा आणी बाकी इतर गोष्टींमुळे याची झीज होत आहे आणी म्हणून त्यातल्या राशी ओळखणे दुरापास्त झालय.
दत्त मंदिरातून दर्शन घेऊन वरच्या मजल्यावर असलेले श्रीयंत्र बघून खाली यावे आणी येथील माहितगार माणसाला पकडून इतिहास जाणून घ्यावा. अस्सल राजापुरी माणूस जर तुम्हाला भेटला तर मंदिराच्या इतिहासापासून ते मंदिराच्या ट्रस्टच्या व्यवहाराबद्दलचे स्वताच्या अनुभवाचे गाठोडे तुम्हाला देऊ करेल.
याखेरीज, राजापूरची गंगा हा सृष्टीचा चमत्कार आहे. गंगा नदी काही काळासाठी येथील डोंगरावरील मंदिरात अवतरते. अचानक प्रकट होणे व अचानक गुप्त होणे हे वैशिष्ट्य.काही कुंडामधे गरम पाणी असते. या पाण्याने त्वचारोग बरे होतात असे म्हणतात.
मंदिराच्या
बाजूलाच मृदानी नदीचे पात्र आहे. ही नदी शेजारच्याच डोंगरातून उगम पावते
आणि खळाळत पुढे झेपावते. धूतपापेश्वर मंदिराच्या बाजूला दोन ठिकाणी तिचं
पाणी उंचावरून खाली पडते, त्या ठिकाणी धबधबा तयार झाला आहे. फार उंचावरून
कोसळणारा नसला, तरी हा धबधबा विस्तीर्ण आणि आकर्षक आहे. धबधब्याचं हे रूप
तासन्तास बघत राहण्यासारखं आहे. इथून पुढे ही नदी एक छोटं वळण घेऊन संथ
वाहत राहते आणि पुढे पुन्हा थोड्या उंचीवरून खाली कोसळून आपला पुढचा मार्ग
शोधते. नदीचा हा परिसर आणि धबधबा वेडावून टाकणारा आहे. विशेषतः जुलै ते
नोव्हेंबर या काळात इथे पाणी वेगानं वाहत असल्यामुळे हा सगळाच परिसर
हिरवाईनं नटलेला असतो. पाऊसही इथे भरपूर असतो. धबधब्याचा मोठा प्रवाह अतिशय
आकर्षक दिसतो. डिसेंबरनंतर हा प्रवाह आटत जातो आणि नंतर अगदीच छोटी धार
राहते. या पात्रात डुंबणं हा अतिशय धमाल अनुभव असतो. अर्थात, पाण्याचा वेग
आणि खोली पाहूनच इथे पाण्यात उतरणं शहाणपणाचं. जोरात पाऊस असेल, तर अचानक
वेगानं पाणी येऊन पाण्याची पातळी वाढण्याचा धोकाही असतो. तसा इशाराही इथं
देण्यात आला आहे. निसर्गाशी खेळ न करता त्याला सांभाळून त्याचा आनंद घेतला,
तर तोही आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतो. धूतपापेश्वरला निसर्गाचं हे
विलक्षण लोभस रूप अनुभवायला मिळतं. श्रावणातल्या सोमवारी या मंदिरात
दर्शनासाठी गर्दी होते. महाशिवरात्रीला इथे सात दिवसांचा मोठा उत्सव असतो.
धूतपापेश्वर हे अनेकांचं कुलदैवत असल्यामुळे इथे उत्सवाच्या काळात मोठी
गर्दी उसळते. गर्दीचा हंगाम टाळून या ठिकाणी भेट दिली, तर पर्यटनाचा आणि
निसर्गाचा निर्भेळ आनंद घेता येतो.
राजापुर परिसराचा नकाशा
राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील
उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदीच्या काठावर ते वसलेले आहे.
पूर्वी हे एक सुरक्षित बंदर होते. ब्रिटिशांनी त्यांची वखार येथेच
बांधली होती. आता तिचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज येथे
येऊन गेल्याचा उल्लेख आहे.
धूतपापेश्वर...निसर्गरम्य ठिकाण
तळकोकणाला लागून असलेलं राजापूर ही एक नदीकाठी
वसलेली छोटी बाजारपेठ आहे. राजापूर प्रसिद्ध आहे ते इथे ठराविक कालावधीनंतर
उगम पावणाऱ्या गंगेसाठी. ही गंगा काही वेळा नियमित तर काही वेळा
अनियमितपणे उगवत असली, तरी तिची ख्याती लांबलांबपर्यंत पसरलेली आहे. मुळातच
राजापूर शहर सखल भागात वसलेलं. त्यामुळे नदीला थोडा मोठा पूर आला, तरी
शहराची बाजारपेठ पाण्याखाली जाते. अशा या शहरातल्या विशिष्ट भागात दर चार
वर्षांनी अवतरणारी गंगा हे एक अद्भुतच. या गंगेबद्दल नंतर बोलू. आधी
राजापूरजवळच्या एका विलक्षण ठिकाणाची माहिती घेऊ या.

सुमारे ५० मीटर सभामंडप असून मंदिराचे खांब आणि छत दोन्ही मस्त रंगकाम करून
सजवलेल्या आहेत. सभामंडपातून पुढे जाताच गर्भ गृहाच्या चौथर्यावर ५ विरगळ
ठेवलेले आहेत. रामायणातील काही प्रसंग त्यावर कोरलेले आढळतात.
विरगळी च्या जवळच दग्तात कोरलेले लंबोदर आहे आणि इतर देवांच्या शिळेतून घडवलेल्या मूर्ती दिसतात. त्यामध्ये सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे राशी-शिळाचक्र.
एकाच अभेद्य दगडात कोरलेल्या या सप्तराशी ओळखणे मात्र अवघड आहे. कोणी माहितगार माणूस असेल तर तो नक्की सांगू शकतो. रोजची पूजा आणी बाकी इतर गोष्टींमुळे याची झीज होत आहे आणी म्हणून त्यातल्या राशी ओळखणे दुरापास्त झालय.
मुख्य मंदिरातून
शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूने,मृदानी नदीच्या प्रवाहावर
बांधलेल्या छोट्याश्या पुलावरून मागील दत्त मंदिराकडे जाता येते. दत्त
मंदिरापासून मात्र आजूबाजूचा परिसर सुखावह वाटतो.
मंदिराच्या परिसरात काजू आंबा सुपारीच्या झाडांची रेलचेल असल्याने अनेक
पक्षी आणि वानरे यांची मात्र येथे चैन आहे. फोटोमध्ये दिसल्याप्रमाणे खाली
नदीपात्रात उतरणाऱ्या पायर्या कोटी तीर्थ कडे जातात. पावसाळ्यात नदीला पाणी
असताना हा मार्ग बंद होत असला तरी येथे प्रकटणारा धबधबा
प्रवाहातील कोटी-तीर्थ ( छोट्याश्या गुहेत असलेली अनेक शिवलिंगे ) याला
अभिषेक करतो.दत्त मंदिरातून दर्शन घेऊन वरच्या मजल्यावर असलेले श्रीयंत्र बघून खाली यावे आणी येथील माहितगार माणसाला पकडून इतिहास जाणून घ्यावा. अस्सल राजापुरी माणूस जर तुम्हाला भेटला तर मंदिराच्या इतिहासापासून ते मंदिराच्या ट्रस्टच्या व्यवहाराबद्दलचे स्वताच्या अनुभवाचे गाठोडे तुम्हाला देऊ करेल.
याखेरीज, राजापूरची गंगा हा सृष्टीचा चमत्कार आहे. गंगा नदी काही काळासाठी येथील डोंगरावरील मंदिरात अवतरते. अचानक प्रकट होणे व अचानक गुप्त होणे हे वैशिष्ट्य.काही कुंडामधे गरम पाणी असते. या पाण्याने त्वचारोग बरे होतात असे म्हणतात.
मंदिरात फोटू काढायला परवानगी नाही. कधी गेलात तर शिवलिंगाचा काही भाग टवका
उडाल्यासारखा तुटलेला का आहे ते विचारून बघा.
मंदिराच्या उजवीकडील बाजूस या फुलाचे झाड आहे. शिवचाफा याचे नाव. U आकाराच्या या फुलामध्ये पराग-कणांच्या मधोमध छोटेसे शिवलिंग असते म्हणजे तसा आकार असतो. दिसायला सुरेख अश्या फुलाचा वास घ्यायची हिम्मत मात्र करू नका. जास्त वेळ वास घेतल्यास श्वसनाचे विकार होऊ शकतात असे ऐकीवात आले. काही लोकांनी आमची हे फुल काढायची खटपट चाललेली बघून "ते विषारी झाड आहे" असे सांगितले. वानरे व माकडांनी या परिसरात कितीही उच्छाद मांडला तरी या झाडावर मात्र ते येत नाहीत.
मंदिराच्या उजवीकडील बाजूस या फुलाचे झाड आहे. शिवचाफा याचे नाव. U आकाराच्या या फुलामध्ये पराग-कणांच्या मधोमध छोटेसे शिवलिंग असते म्हणजे तसा आकार असतो. दिसायला सुरेख अश्या फुलाचा वास घ्यायची हिम्मत मात्र करू नका. जास्त वेळ वास घेतल्यास श्वसनाचे विकार होऊ शकतात असे ऐकीवात आले. काही लोकांनी आमची हे फुल काढायची खटपट चाललेली बघून "ते विषारी झाड आहे" असे सांगितले. वानरे व माकडांनी या परिसरात कितीही उच्छाद मांडला तरी या झाडावर मात्र ते येत नाहीत.


राजापूरची
गंगा हा तर निसर्गाचा विलक्षण चमत्कार आहे. राजापूर शहरापासून तीन
किलोमीटर अंतरावरच्या उन्हाळे परिसरात असलेल्या कुंडांमध्ये ही गंगा
प्रकटते. दर चार वर्षांनी या कुंडांमध्ये पाणी प्रवाहित होतं. त्याला गंगा
असे म्हटलं जातं. तिची साग्रसंगीत पूजा केली जाते, काही धार्मिक विधीही
होतात.
ठराविक कालावधीनंतर याच ठिकाणी या ११ कुंडांमधून पाण्याचा प्रवाह
कसा सुरू होतो, याबद्दल वर्षानुवर्षं संशोधन करण्यात येत आहे. भूगर्भातील
रचना बदलल्यामुळे असं घडत असावं, असा अंदाज आहे. याच भागात गरम पाण्याचे
झरेही आहेत. त्यांना ‘उन्हाळे’ नावानं ओळखलं जातं. गंधकाच्या समावेशामुळे
हे पाणी गरम होत असावं, असा एक अंदाज आहे; मात्र हे उकळतं पाणी कधीकधी
हातातही घेववत नाही. राजापूरची गंगा हा निसर्गाचा चमत्कार असला, तरी त्याचा
संबंध पावित्र्य आणि धर्माशीही जोडला गेला आहे. खऱ्या पर्यटकाला मात्र एक
आकर्षक ठिकाण म्हणून या ठिकाणाबद्दल नेहमीच रस वाटतो. पूर्वी नेमानं तीन ते
चार वर्षांनंतर ही गंगा अवतरत असे. आता मात्र एवढ्या वर्षांचा कालावधी
जाईलच की नाही, याबद्दल खात्री देता येत नाही. गेल्या वेळी तर अवघ्या सात
ते आठ महिन्यांतच गंगेचं आगमन झालं होतं. गंगा आल्यावर तिच्या दर्शनासाठी
या भागात भाविकांची गर्दी उसळते. पाप-पुण्याचा विचार मनात नसला, तरी
निसर्गाची ही किमया पाहायला एकदा तरी राजापूरला भेट द्यायलाच हवी.
कसं जायचं?
कोल्हापूरमार्गे
राजापूरला जाण्यासाठी अनेक बसगाड्यांची सोय आहे. रत्नागिरीहून लांजा किंवा
पूर्णगडमार्गे राजापूरला पोहोचता येतं. हे अंतर सुमारे ६२ किलोमीटर आहे.
लांजामार्गे गेलं,तर त्यात आणखी दहा ते पंधरा किलोमीटरची भर पडते.
राजापूरहून धूतपापेश्वर पाच किलोमीटरवर आहे. तिथे जाण्यासाठी खासगी
वाहनांची सोय होऊ शकते.
धूतपापेश्वर
हे देवस्थान राजापुरातच आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या
ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे. राजापूरचा आंबा प्रसिद्ध आहे. राजापुरी
भल्या मोठ्या कैऱ्या लोणच्यासाठी आणि पन्ह्यासाठी उत्तम असतात.
धूतपापेश्वर मंदिराजवळ एक धबधबाही आहे. तसेच हार्डी, चुनाकोळवण व ओझर
येथेही धबधबे आहेत.
राजापुरची गूढ कातळ-शिल्पे
कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण
मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे.
पेट्रोग्लिफ हा शब्द मूळ ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ग्रीक भाषेत ‘पेट्रो’
म्हणजे खडक आणि ‘ग्लिफ’ म्हणजे कोरीव काम. खडकावर केलेले कोरीव काम म्हणून
‘पेट्रोग्लिफ’.कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये
कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव कमी असतो. पावसाळा संपल्यावर गेले
तर शिल्पे खास उठून दिसतात. कारण त्याच्या बाजूला गवत उगवलेले असते.
कातळशिल्पांमध्ये मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी व पक्षी यांच्या
आकृती दिसतात. काही भौमितिक रचना दिसतात. एकीकडून पाहिल्यास जहाज, तर
दुसऱ्या बाजूने पाहिल्यानंतर दोन वाघांच्या मध्ये असलेला माणूस अशी
द्विमितीय चित्रेही तेथे दिसली. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा
दिसतील तशी काही रचना तेथे भासते. कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर
आढळणाऱ्या कातळ शिल्पांचे गूढ कायम असतानाच याच भागातील राजापूरच्या
कातळावरही आता तब्बल चौदा चौरस किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली
आहेत . मासे , जलकुंभ , जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती या
कातळांवर कोरलेल्या आहेत .
कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाट्याजवळ गावडेवाडी, तसेच ऐन निवळी फाटा,
भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी कातळशिल्पे खोदलेली दिसतात.
परंतु कोकणात अनेक ठिकाणी त्यांचा आढळ आहे. कातळशिल्पांचे प्रयोजन काय
होते? ती कोणी आणि का खोदली? हे अजून न उलगडलेले कोडे आहे. कातळशिल्पांच्या
जवळ अंदाजे दोनशे मीटर इतक्या त्रिज्येमध्ये खोल दगडी विहीर आढळते. हा
नियम नव्हे, परंतु तशी ती बऱ्याच ठिकाणी आढळते. ही शिल्पे खोदणाऱ्या
लोकांसाठी ती सोय केली असावी.
आदिमानवाने विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. ती कसली चित्रे आहेत,
त्यातून काय प्रतीत होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा
काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे हे गूढ तर आहेच; शिवाय, ते एक मोठे
नवलसुद्धा आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर तशा प्रकारचे कोरीव काम
केलेले सर्वत्र आढळते. परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही
खोदचित्रे खास करून कोकणातच पाहण्यास मिळतात. ह्या खोदचित्रांचे स्वरूप,
त्यांचा आढळ, आणि त्यांच्यासंबंधी स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या
विविध दंतकथा...
रत्नागिरीचे उत्साही संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी
चिकाटीने त्या खोदचित्रांचा अभ्यास केला आहे. त्यांची एक सूची तयार केली
आहे. त्यांच्यामध्ये आढळणारे साम्य आणि विविधता यांचीसुद्धा बारकाईने नोंद
केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्या विषयात लोकांमध्ये जागृती निर्माण
केली आणि स्थानिक लोकांनासुद्धा त्या शोधकार्यात सामावून घेतले. रत्नागिरी
जिल्ह्यामधील रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळजवळ
दोनशेऐंशीपेक्षा जास्त खोदचित्रे सापडली आहेत. त्यांच्या सोबतच काही देवता,
जसे की गोपद्म आणि लज्जागौरी यांचे केलेले अंकन हे आश्चर्यचकित करते.
प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात.
काही ठिकाणी हत्ती आणि वाघ यांचे केलेले अंकन अचंबित करते. त्याचा अर्थ
ज्या काळात ही चित्रे खोदली गेली त्याकाळात त्या परिसरात हत्ती आणि वाघ हे
असणार! मगर, कासव आणि मासे यांची चित्रेसुद्धा आढळतात. स्थानिक लोकांच्या
समजुतीनुसार ती खोदचित्रे पांडवांनी वनवासात असताना खोदलेली आहेत. किंवा ती
चित्रे तत्कालीन शेतकरी व मेंढपाळ यांनी त्यांच्या पशुधनाच्या रक्षणासाठी
खोदली असावीत.
सर्व खोदचित्रांमध्ये मानवी चित्रांचे अंकन हे तुलनेने जास्त आहे.
काही ठिकाणी माणसाचा आकार असून हात हे शरीराला चिकटलेले आहेत. डोके मात्र
काहीसे उंच आणि निमुळते दिसते. तो कोणी परग्रहावरील मानव असावा असा सहज भास
व्हावा इतके ते चित्र हुबेहूब खोदलेले आहे. काही ठिकाणी योगक्रियेमध्ये
असलेल्या षट्चक्रांचे सांकेतिक अंकन केले असावे असे वाटते. तेथे मानवाचा
देह फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत दाखवला आहे आणि त्यात सहा चक्रे खोदलेली
दिसतात. अर्थात तो सगळा समजुतीचा भाग आहे व ते चित्र पाहून केलेला तो केवळ
अंदाज आहे.
पुण्यातील भूगोल अभ्यासक डॉ . श्रीकांत कार्लेकर यांची टीम सध्या
यावर अभ्यास करते आहे . कोकणातील भूजलस्रोतांबाबत संशोधन करताना कार्लेकर
यांना राजापूरच्या उपळे गावात ही कातळ शिल्पे आढळली . कोकणातल्या जांभा
दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्प हे आजही एक मोठे गूढ आहे . विविध चित्रे
आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशांनी ही शिल्प समृद्ध आहेत . अनेक ठिकाणी
रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे अशी दुर्मिळ शिल्पे
गायब झाली आहेत . ही चित्रे , नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या
असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही . काहींच्या मताप्रमाणे ही
कातळ चित्रे इसवी सन पूर्व ६००० वर्षे जुनी असावीत , .
कोकणातील जांभा दगडाचा , विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे
आढळले की , इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती प्रामुख्याने काढली गेली आहेत .
देवगड आणि विजयदुर्ग येथील सडा हा जांभ्याचे आदर्श असे कातळ आहे असे
मानण्यात येते . मात्र , रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला कातळ
सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे . येथील कातळाची जाडी २५
मीटरपेक्षा जास्त असून , भूजल साठेही खूप खोल आहेत . राजापूरच्या कातळावर
जुवाठी - उपळे - प्रिंदावण या त्रिकोणात उपळे गावाच्या सीमेवर आम्हाला चौदा
चौरस किलोमीट कातळावर अनाकलनीय शिल्प आढळली आहेत . मासे , जलकुंभ ,
पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती यावर काढल्या
आहेत . मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर त्यावर
जलस्थानांशी संबंधित आकार दिसतात , असे स्थानिक नागरिक सांगतात . शास्त्रीय
पद्धतीने या प्रदेशातील कातळ चित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे ,
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात एकेकाळी बंदर असलेल्या
बारसू या गावातील मोठ्या डोंगरावर असलेलीकोरीव चित्रे ऐतिहासिक अभ्यासकांना
व संशोधकांना आजवर एक आव्हान ठरली आहेत . ही चित्रे प्रत्यक्ष पाहतानाती
कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी काढलेली असावीत असेच वाटते . मात्र ती
चित्रे कोणी आणि कधी कोरली यासंदर्भातील शोध अद्यापही लागलेला नाही .
रत्नागिरीनजिकच्या नाचणे या गावीही अशाच प्रकारचे जांभादगडावर कोरलेले
नौकेचे चित्र पहावयाला मिळते .
गावडेवाडी आणि निवळीफाटा येथे भौमितिक रचना खोदलेल्या दिसतात. तशा
रचनांना चारही बाजूंनी आधी चौकट खोदलेली आहे. त्या चौकटींच्या आतमधे विविध
भौमितिक आकार आहेत. त्यांचे प्रयोजन अनाकलनीय आहे. विद्युत मंडळाच्या तारा
जशा गावोगावी आढळतात तशा प्रकारचे नक्षीकाम त्या ठिकाणी केलेले दिसते.
चौकोन, त्रिकोण, उभ्या आणि आडव्या समांतर रेषा, सापाची नक्षी अशा प्रकारचे
विविध आकार त्या एकाच चौकटीत खोदलेले आढळतात.
सर्व कातळशिल्पांमध्ये अत्यंत देखणे शिल्प हे राजापूरजवळ बारसू गावी
असलेल्या तारव्याचा सडा येथे पाहण्यास मिळते. राजापूरपासून देवाचे गोठणेला
जाऊ लागले, की दहा किलोमीटरवर बारसू/बारसव गाव लागते. तेथून डावीकडे जाणारा
रस्ता आहे. त्या रस्त्याने अंदाजे दीड किलोमीटर गेले, की अंदाजे पन्नास
फूट लांब आणि वीस फूट रुंद अशी काळ्या खडकावर खोदचित्र चौकट दिसते. तेथे
खडकात दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्या मध्येच एक मानवी आकृती
त्या दोन वाघांना थोपवून धरत आहे असे चित्र खोदलेले आहे. पण खरे आश्चर्य
पुढेच आहे. तेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठे गलबत
समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा हलत
आहेत, पाण्यात विविध मासे पोहत आहेत असे सर्व दाखवले आहे. दोन वाघांच्या
मध्ये जी मानवी आकृती कोरलेली दिसते तिच्या छातीवर लज्जागौरीचे चिन्ह अगदी
ठसठशीतपणे जाणवते. ते धार्मिक विधीचे शिल्पांकन असेल का? किंवा ते ठिकाण
कोठल्या देवतेचे स्थान असेल का? सगळा तर्काचा भाग, परंतु इतके सुंदर, इतके
अद्भुत आणि आखीवरेखीव चित्र पाहून प्रेक्षक थक्क होतो. तसेच एक चित्र
गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाट्यावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते
निम्म्याहून अधिक संपले आहे! तो अगदी दुर्मीळ असा ठेवा आहे.
मराठे यांनी स्थानिक आमदारांच् या मार्फत विधिमंडळात सुद्धा तो प्रश्न
उपस्थित केलेला आहे. राज्य सरकारकडून अशा कातळशिल्पांसाठी काही निधी राखून
ठेवला गेला आहे. ते दोघे खेड्यापाड्यांत जाऊन शाळांमध्ये मुलांना व्याख्यान
देतात आणि त्यांच्या त्यांच्या परिसरात तसा काही ठेवा असल्यास तो शोधण्यास
सांगतात. आश्चर्य म्हणजे गुहागर तालुक्यातील शाळेच्या पटांगणातच तसे
कातळशिल्प आढळून आले!
राजापूर-आडिवरे रस्त्यावर सोलगाव फाटा आहे. तेथून आत दहा किलोमीटरवर
देवाचे गोठणे नावाचे गाव आहे. त्या गावी भार्गवरामाचे सुरेख मंदिर आहे.
थोरल्या बाजीराव पेशव्यांनी ते गाव ब्रह्मेंद्रस्वामींना आंदण दिले होते.
त्या गावात असलेल्या भार्गवराम मंदिरात एक सुंदर पोर्तुगीज घंटा टांगलेली
आहे. मंदिराच्या समोर एक पायवाट डोंगरावर जाते. डोंगरावर गेले, की काही
अंतर उजवीकडे चालून गेल्यावर एक आश्चर्य सामोरे येते. तेही कातळशिल्पच आहे.
तेथे एक मानवी आकृती कोरलेली आहे. पण आश्चर्य असे, की त्या मानवी
आकृतीच्या पोटावर जर होकायंत्र ठेवले तर ते चुकीची दिशा दाखवते! त्या
आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि होकायंत्र चुकीची दिशा
दाखवते. तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही
होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीची दिसते. कातळशिल्प खोदताना त्या
मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग त्याच ठिकाणी असे का खोदले
गेले असेल? वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्याकाळी ज्ञात
होती का ? त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आकृती आणि तेथे होकायंत्राची
गडबड यांचा काही संबंध असेल का? मुळात त्या काळी होकायंत्रे होती का? हे
सगळे प्रश्न येथे प्रेक्षकाला भंडावून सोडतात. परंतु त्या खोदचित्रामागे
काहीना काही संकेत नक्की आहेत. त्या कातळशिल्पाच्या जवळ विहीर नाही, मात्र
पाण्याचे छोटे कुंड आहे. संशोधकांना तेथे मोठे भुयार सापडले आहे. बाहेरून
तरी ते खूप खोलवर गेलेले दिसते. त्याचा शोध घेण्याचे काम तेथे
पावसाळ्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने हाती घेण्यात येणार आहे.
दुसरे एक सुंदर कातळशिल्प आहे देवीहसोळ या गावी. राजापूरच्या पुढे
असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नाव असलेल्या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर
देवीहसोळ हे गाव येते. तेथे आर्यादुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे. कऱ्हाडे
ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता आहे. त्या मंदिराच्या अलिकडे व मंदिराला
लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली
दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे.
चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले
दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही
समजतात, काही अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे.
त्यात पाणी साठलेले असते. देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या
गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष
वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या
भेटीला येते. त्या दोन गावच्या दोन देवींची भेट त्यावेळी कातळशिल्पावर
होते, हे एक नवल म्हणायला हवे! त्या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध
असलेल्या खोलगट भागात फुरसे नावाचा विषारी साप येतो आणि तो तेथेच दिवसभर
बसून असतो असे स्थानिक सांगतात. त्या कातळशिल्पापासून देवीच्या
मंदिरापर्यंत शंभर मीटर अंतर आहे. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली
दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. काही
कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत; मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी
खोदलेली आहेत.
त्या कातळशिल्पांपासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर कातळात खोदलेली मोठी
विहीर बघण्यासारखी आहे. अंदाजे चाळीस फूट खोल विहिरीला उतरण्यासाठी एका
बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातळशिल्पाशेजारी विहीर हे सूत्र तेथे तरी
पाहण्यास मिळते.
आशुतोष बापट ८६०५०१८०२०
सुधीर रिसबूड ९४२२३७२०२०
गरम पाण्याचे कुंड : सतत
गरम पाणी वाहत असणारे कुंड राजापूर शहराच्या जवळच उन्हाळे गावात आहे.
त्यावरूनच या गावाला उन्हाळे हे नाव पडले. गंगेपासून जवळच खाली नदीकिनारी
उन्हाळे गाव आहे. ग्रामदैवत लक्ष्मीचे मंदिरही तेथे आहे. जवळच बारमाही
वाहणारा गंधकयुक्त व औषधी गुणधर्म असलेला गरम पाण्याचा झरा आहे. या
पाण्याने त्वचारोग नष्ट होतात. राजापूरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर
असणाऱ्या या ठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळा व इन्स्पेक्शन बंगला आहे.
मिठगवाणे : जैतापूरजवळ
हे गाव श्री देव अंजनेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कोकणी पद्धतीचे
चौपाखी मंदिर येथे आहे. चिरेबंदी नगारखाना आहे. महाद्वारातून समोरच
गाभाऱ्यातील देवाचे दर्शन घडते. समोरच जांभ्या दगडात उंच दीपमाळा
आहेत.
मुसाकाझी बंदर :
रत्नागिरी जिल्हयातील प्राचीन बंदरांपैकी एक बंदर म्हणजेच मुसाकाजी बंदर.
राजापूर तालुक्यातील नाटे गावापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.आसपासचा परिसर
अतिशय सुंदर आहे.या ठिकाणी माणसांची फारशी वर्दळ नसते. गेली अनेक वर्षे आता
या बंदराचा वापर केला जात नाही. बंदराकडे जाणारा रस्ता हा निसर्गरम्य
आहे.मुंबई-कोकण मार्गावर होणा-या प्रवासी बोटवाहतुकीत राजापुरातील
प्रवाशांची चढउतार करणारे हे प्रमुख बंदर होते. तर ब्रिटिशकालीन राजवटीतही
सागरी महामार्गाने या बंदरातून व्यापारी उलाढाल होत होती.याची उभारणी
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीतच झाली आहे.या ठिकाणी सन १९४१ साली
या बंदराचा विकास करण्यात आल्याचे फरशी बंदराच्या सुरवातीला आढळून
येतात.ब्रिटीशांच्या काळामध्ये निर्यातकेंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या
राजापूर बंदरामध्ये जैतापूरमार्गे येणारी मालवाहतूक जहाजे, गलबते मुसाकाजी
बंदरातून होत होती. ही वाहतूक थांबल्यानंतर या बंदराकडे दुर्लक्ष झाले
आहे.शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या बंदराचा वापर केला जात असावा.
राजापुर जवळच इंग्रजांची वखार होती.हे छोटे बंदर असून, येथील पुळण छोटी असली तरी खूप छान आहे. शांतता असल्याने येथे चांगले वाटते.
No comments:
Post a Comment