भारतातील गर्भश्रीमंत गाव : धंदा शेती, १७ बँकांत ५ हजार कोटी आणि बरचं काही
भारतातील गर्भश्रीमंत गाव :
भारत खेड्यांमध्ये राहतो. पण खेडी शहरांसारखी नाहीत. त्यांची ओळख शेती आहे.जेव्हा जेव्हा डोळ्यांसमोर गावाची प्रतिमा तयार होते, तेव्हा त्यामध्ये उंच इमारती, हायफाय शाळा, मोठी रुग्णालये आणि शहरासारखे मॉल नसतात. आपल्याला दिसून येतात ती फक्त मूलभूत सुविधांशी संघर्ष करताना. भारतातील अनेक गावांची परिस्थिती अशी आहे, पण भारतातील एक असेही गाव आहे जे देशातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक मानले जाते.
भारतातील गर्भश्रीमंत गाव : हे गाव समृद्ध का आहे?
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असलेल्या या गावाचे नाव मधापर आहे, जे बँक ठेवींच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक आहे. सुमारे 7,600 घरे असलेल्या या गावात 17 बँका आहेत. आणि हो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 92 हजार लोकांकडे या सर्व बँकांमध्ये 5 हजार कोटी रुपये जमा आहेत.
हे आश्चर्यकारक कसे घडले?
याचे कारण असे आहे की या बँकांचे खातेदार यूके, यूएसए, कॅनडा आणि जगाच्या इतर अनेक भागात राहतात. गावच्या मातीशी कधीही नाळ न तुटू दिलेल्या लोकांचे हे गाव आहे.
असा झाला गावाचा विकास
या गावातील बहुतेक लोक अनिवासी भारतीय आहेत.
परंतु देशाबाहेर राहूनही त्याने येथे पैसे जमा केले आणि शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, मंदिरे, धरणे, हिरवळ आणि तलाव बांधले.
अहवालांनुसार, ‘मधापर व्हिलेज असोसिएशन’ नावाची एक संस्था 1968 मध्ये लंडनमध्ये स्थापन करण्यात आली.
ज्याचा उद्देश गाव सुधारणे आणि परदेशातील लोकांना जोडणे आहे.
संस्कृती वाचवणे हा यामागचा हेतू आहे
याव्यतिरिक्त, या गावात लंडन कम्युनिटीला जोडण्यासाठी एक कार्यालय देखील आहे.
संस्कृती आणि मूल्ये जिवंत ठेवणे हा या समाजाचा एकमेव उद्देश आहे.
पोरबंदर :-



जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल आणि निसर्गाचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर तुम्ही पोरबंदर पक्षी अभयारण्याला भेट देण्याची विचार करू शकता.३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे अभयारण्य सर्वात लहान तरीही आकर्षक पक्ष्यांच्या वास्तव्य असलेल्या अभयारण्यांमध्ये गणले जाते. एका लहान सरोवराभोवती पसरलेला हा परिसर पक्ष्यांना सुरक्षित आश्रय देतो. येथे आपण स्थानिक आणि स्थलांतरित दोन्ही पक्षी पाहू शकता. फ्लेमिंगो, आयबीस, कर्ल, मुरळी आणि चहा यासारख्या पक्ष्यांच्या प्रजाती तुम्ही येथे पाहू शकता.
इथे निवांत बसून 'पाखरे' टिपण्याची देखील सोय आहे. पक्षांची माहिती देण्यासाठी जाणकार माणूस देखील उपलब्ध आहे. इथे आजारी, अथवा जखमी पक्षांची देखभाल देखील करण्यात येते.
चौपाटी :-
पोरबंदरला चौपाटी नावाचे एक सुंदर किनारपट्टीचे ठिकाण आहे. चौपाटी बीचची गणना राज्यातील सर्वात सुंदर आणि शांत समुद्रकिनाऱ्यांमध्ये केली जाते. दूरदूरचे पर्यटक येथे विश्रांती घेतात. अरबी समुद्रातून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे पर्यटकांना खूप आवडते. बोटिंग करून तुम्ही इथल्या समुद्राच्या वातावरणाचा आनंद घेऊ शकता. सुट्टी संस्मरणीय करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. समुद्रकिनार्याजवळ चटपटीत पदार्थ खाण्याचा आनंद देखील घेऊ शकता.
कसे जायचे :-
रस्त्याने राष्ट्रीय महामार्ग 8 किंवा एनएच 8 अहमदाबाद आणि राजकोट सारख्या ठिकाणांना जोडतो. राज्य महामार्ग 6, ज्याला विस्तारीत राष्ट्रीय महामार्ग 8E असेही म्हटले जाते, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही बसेससह शहरातील वाहतुकीचे मुख्य साधन आहे. रेल्वेने पोरबंदर रेल्वे स्टेशन हे या परिसरातील मुख्य रेल्वे स्टेशन आहे. हवाई मार्गाने पोरबंदर विमानतळावर जेट एअरवेजद्वारे संचालित मुंबईसाठी नियमित उड्डाणे आहेत.
जामनगर :-
शहरातील बहुतेक स्मारके महाराजा कुमार श्री रणजितसिंहजींच्या काळात बांधली गेली. हे शहर एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र देखील आहे. याला 'छोटी काशी' असेही म्हणतात. त्यात एस्सार ऑइलसारखे कारखाने आहेत जे देशातील एक प्रमुख रिफायनरी आहे.
जामनगरला का जायचे :- शिव मंदिर, जैन मंदिर, बाला हनुमान मंदिर, लखोटा महाल, कोठा बस्ती
जामनगरला भेट देण्याची उत्तम वेळ :- ऑक्टोबर ते मार्च
जामनगर टूर्स, आकर्षणे :-
स्वामीनारायण मंदिर
भिडभंजन मंदिर
खिजडिया पक्षी अभयारण्य
हरसिद्धी मंदिर
मरीना राष्ट्रीय उद्यान
मोटा आशापुरा मा मंदिर
लाखोटा किल्ला
बेट द्वारका
लाखोटा लेक पिरोटन बेट
आराधना धाम
भुजियो कोथो
बेल हनुमान मंदिर
प्रताप विलास पॅलेस :-
नैसर्गिक आकर्षणा व्यतिरिक्त, इथल्या ऐतिहासिक वास्तू देखील भेट द्याव्यात अश्या आहेत. प्रताप विलास पॅलेस जामनगरच्या सर्वात खास प्रेक्षणीय स्थळ आणि प्राचीन इमारतींमध्ये केली जाते. हा महाल युरोपियन आणि भारतीय वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे. या वाड्यात भिंतींवर फुले, पाने, प्राणी इत्यादींचे कोरीव काम केलेले आहे. कला आणि इतिहास प्रेमींनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. २०००१ मध्ये आलेल्या भूकंपामुळे या महालाचे थोडे नुकसान झाले होते. राजवाड्यात पर्यटकांना परवानगी नाही, परंतु विशेष परवानगी काढली तर महालाला भेट देऊ शकतो.
दरबारगढ पॅलेस :-
जिथे राजांचा राज्याभिषेक सोहळा होत असे त्या भागाला तिलमेडी असे नाव आहे . राजा रावल यांचे सिंहासन, तलवार, खंजीर आणि भाला देखील तिलमेडी येथे ठेवण्यात आला आहे. महाल भिंतीवरील चित्रे, सुशोभित आरसे, सुशोभित खांब, शिल्पे, दगडी कोरीवकाम, फेटवर्क इत्यादींच्या रूपात कलेच्या उल्लेखनीय कलाकृती बघायला मिळतात. त्याच्या बांधकामाची तपशीलवार पद्धत यामुळे विशेषत: इतिहास आणि वास्तुकलाच्या प्रेमींसाठी हे एक अतिशय महत्वाचे स्मारक आहे. 2001 च्या भूकंपाने महालाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे, तरीही या ठिकाणची भव्यता आणि सौंदर्य टिकून आहे.


जामनगर हे समुद्रीप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. मरीन नॅशनल पार्क व्यतिरिक्त, आपण येथे शिवराजपूर बीचवर चालण्याचा आनंद घेऊ शकता. हा बीच द्वारकापासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे. पांढऱ्या वाळू आणि निळ्या पाण्याने हा समुद्रकिनारा पर्यटकांना प्रसन्न करतो. हा एक सुरक्षित समुद्रकिनारा आहे जिथे तुम्ही पोहण्याचाही आनंद घेऊ शकता. शहराच्या गजबजाटापासून निवांतपणा हवा असेल तर शिवराजपूर बीच हे एक उत्तम ठिकाण आहे,
मरीन नॅशनल पार्क मरीन -
भारताचे पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान गुजरातच्या जामनगरमध्ये आहे, जे येथील मुख्य आकर्षणामध्ये आहे, याला देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. कच्छच्या आखातात ४२ बेटे आहेत, जी या राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट केली गेली आहेत, प्रत्येक बेट त्याच्या अद्वितीय रचना आणि जलचरांसाठी प्रसिद्ध आहे. पिरोटन बेट हे येथील सर्व बेटांपैकी सर्वात लोकप्रिय आहे. पिरोटन बेटावर तुम्ही देखणे जलचर पाहू शकता. वनविभागाच्या परवानगीने तुम्ही येथे रोमांचक शिबिराचा आनंदही घेऊ शकता.निसर्ग प्रेमींनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. मरीन नॅशनल पार्क आणि अभयारण्य पिरोटन हे जामनगरच्या किनारपट्टीच्या भागात आहे.हा परिसर ऑगस्ट 1980 मध्ये सागरी अभयारण्य आणि जुलै 1982 मध्ये सागरी राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. एकूण साडे दहा चौरस कि.मी. राष्ट्रीय उद्यान क्षेत्राचे किमी आणि १.११ चौ. कि.मी.अभयारण्य क्षेत्रातील आरक्षित वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.बेदी बंदरापासून पिरोटन बेट 18 NM अंतरावर आहे,इथे बोटीद्वारे पोहोचता येते.ऑक्टोबर ते मार्च हा अभयारण्याला भेट देण्याचा योग्य कालावधी आहे.
समुद्री कासव
ट्युब अॅनिमॉन
जायंट कार्पेट अॅनिमॉन
कॉलिफ्लॉवर कोरल डेन्ड्रोफायटा
सॉफ्ट कोरल
PA मध्ये अधिवासांची मोठी विविधता आहे. खारफुटी, कोरल रीफ, निकृष्ट खडक, मुडफ्लाट , खाडी, खारट गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश आणि खडकाळ बेटे जैवविविधता दाखवतात. रंगीबेरंगी स्पंज आणि कोरल, जायंट सी एनीमोन, ट्यूब एनीमोन, जेली फिश, सी हॉर्स, ऑक्टोपस, ऑयस्टर, मोती ऑयस्टर, सबेला, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, स्टारफिश, बोनेलिया, सेपिया, लॉबस्टर, खेकडे आणि कोळंबीचे प्रकार, समुद्री कासव, डॉल्फिन, डगॉन्ग्स, पोर्पोइज, शार्क आणि इतर मासे हि परिसंस्था राखतात.
राष्ट्रीय उद्यानातील दोन बेटांपैकी एक ज्याला पर्यटक भेट देऊ शकतात ते म्हणजे पिरोटन बेट तर दुसरे नारारा आहे. पिरोटन बेटाला भेट देण्यासाठी, वन विभाग, सीमा शुल्क विभाग आणि बंदर विभागाच्या देखरेखीखाली अत्यंत कडक तपासणी केली जाते. भारतीय नसलेल्या व्यक्तीस पोलीस विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मूळतः 'पिरजोथान' म्हणून ओळखले जाणारे, हे नाव संत ख्वाजा खिजर रहमतुल्लाही अलैह यांचे पवित्र स्थान आहे.पिरोटन बेटापर्यंत नियमित फेरी सेवा उपलब्ध नाही. बंदरातून एक बोट भाड्याने घेणे आवश्यक आहे जे बेटावर पोहोचण्यासाठी सुमारे दिड ते दोन तास लागतात. उथळ समुद्रकिनारा असल्याने, केवळ उंच भरतीच्या वेळी बोट सोडली जाते. चंद्राच्या कलेप्रमाणे भरतीची वेळ बदलत असल्याने त्याप्रमाणे नियोजन करुन जाणे आवश्यक आहे. सर्वात जास्त भरती आणि ओहोटी याचे साधारणपणे 12 तासांचे चक्र असते, त्यामुळे एकदा तुम्ही बेटावर पोहचल्यावर तुम्हाला कदाचित त्यावर 12 तास वाट पहावी लागते.
नोव्हेंबर ते मार्चला भेट देण्याची उत्तम वेळ






आयुर्वेदीक विद्यापीठ :-
जामनगर शहरापासून वायव्येस फक्त एक किलोमीटर अंतरावर आयुर्वेदिक विद्यापीठ आहे, जे १९६७ मध्ये स्थापन झाले. इथे आयुर्वेदाच्या तत्त्वांचा आणि पद्धतींचा अभ्यास आणि संशोधन केले जाते. आयुर्वेदिक वैद्यकशास्त्राच्या पुनरुज्जीवनात या विद्यापीठाने मोठी भूमिका बजावली आहे.
रुग्णालय दररोज सुमारे 1000 रुग्णांवर (रुग्ण आणि बाह्यरुग्ण) उपचार होतो. गरीब रुग्णांना रुग्णालयातून मोफत उपचार, अन्न आणि कपडे मिळतात. संस्थेचे स्वतःचे बोटॅनिकल गार्डन आहे जिथे औषधी वनस्पतीची लागवड केली जाते आयुर्वेदाच्या प्राचीन विज्ञानाचे शिक्षणाबरोबर योग आणि निसर्गोपचाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन अभ्यासक्रमांच्या स्वरूपात दिले जाते. परदेशी विद्यार्थीही येथे अभ्यासासाठी येतात, विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे.
पर्यटनाच्या हेतूने जामनगरला भेट दिली तर आयुर्वेदिक विद्यापीठात येऊन आपल्या ज्या शंका किंवा समस्येमधून जात आहात त्यावरील आयुर्वेदिक उपाय मिळवून हि भेट अधिक फलदायी ठरू शकते.
पोरबंदरपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर स्थित, हरसिद्धी मंदिर हर्षद माता मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मूळ मंदिर कोयला डुंगर नावाच्या टेकडीवर बांधले गेले. हे मंदिर स्वतः भगवान श्रीकृष्णाने बांधले होते असे मानले जाते. त्यांनी स्वतः इथे पूजा केली होती. भगवान श्रीकृष्णाला असुरांना पराभूत करणे आणि मारणे आवश्यक होते आणि म्हणून त्यांना शक्तीची आवश्यकता होती, आणि शक्ती मिळवण्यासाठी त्यांनी हरसिद्धी मातेला प्रार्थना केली. तिच्या आशीर्वादाने भगवान श्रीकृष्णाने सर्व असुरांना यशस्वीरित्या मारले आणि यशानंतर त्यांनी हे मंदिर बांधले. भगवान श्रीकृष्णाने जरासंधाचा पराभव केल्यानंतर, सर्व यादवांनी (हर्षित) खूप आनंद केला आणि त्यांनी तेथे उत्सव साजरा केला. ऐतिहासिक महत्त्व असण्याबरोबरच, इथला समुद्र आणि समुद्रकिनारा निसर्गरम्य आहे.
आराधना धाम :-
सिंहन नदीच्या काठावर असलेले आराधना धाम तिथल्या शांत आणि रम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. हे एक जैन तीर्थक्षेत्र आहे जे जामनगर-द्वारका महामार्गाला लागून ४० एकर क्षेत्रात पसरलेले आहे.मानसिक आणि अध्यात्मिक शांततेच्या शोधात असलेल्या भाविकांच्या यादीत जामनगरमधील हे ठिकाण यादीत वरच्या स्थानी आहे. आराधना धाममध्ये विश्रामगृह देखील आहेत जिथे तुम्ही जास्त वेळ घालवू शकता. या व्यतिरिक्त इथ्र स्ट्राँग रूम, लायब्ररी, पूजा आणि ध्यानकक्ष यासारख्या अनेक सुविधा आहेत. परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी सुंदर बाग आहे.इथे आणखी एक आकर्षण आहे ते म्हणजे संगीताच्या तालावर नृत्य करणारे कारंजे सकाळी 6:00 ते संध्याकाळी 8:00 पर्यंत या काळात इथे भेट देता येईल.
भुजियो कोथो :-
जामनगरमधील भव्य ठिकाणांपैकी एक म्हणजे भुजियो कोथो. शत्रू सैन्याच्या हल्ल्यापासून शहराचे रक्षण करण्यासाठी जामनगर शहराच्या पूर्वीच्या शासकांनी याची उभारणी लखोटा तलावाजवळ केली. भुजियो कोथोची याच्या उंचीमुळे संपूर्ण जामनगर शहराचे विहंगम दृश्य दिसते. या ठिकाणी जाण्यासाठी बस, ऑटो आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.
डभोई/वढवाणा :-
हिरव्यागार शेतांमधे हा भला मोठा तलाव पक्षांचे नंदनवनच आहे. याचा व्यास अंदाजे असेल २ किमी. डभोईपासून तो साधारणतः ८ किमी अंतरावर आहे. रस्ता मस्त. रस्त्यावरच आसपासच्या शेतात अनेक स्थानिक पक्षी नजरेस पडतात. हा तलाव बांधला गायकवाड महाराजांनी १९०९-१० या काळात. याचे क्षेत्रफळ आहे ८६० चौ. किमी. ओर्संगनदीवर बांध घालून हे पाणी अडवले आहे. या पाण्यातून आसपासच्या २५/३० खेड्यांची पिण्याच्या पाण्याची व शेताला लागणार्या पाण्याची गरज भागवली जाते.
रस्ता संपला कि आपण जंगल खात्याच्या ऑफिससमोर पोहचतो.इथे एक माणूस टेबल टाकून बसलेला असतो व त्याच्या हातात पावतीपुस्तक असते. त्याच्या मागे भले मोठे डांबरी व्यवस्थित आखलेले पार्कींग आहे.इथे फार गर्दी नसते व त्यामुळे आरामात पक्षिनिरिक्षण करता येते.समोरच एक मोठा बांध दिसतो. त्यापलिकडे पाण्याचा एवढा मोठा साठा असेल असे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. पावती फाडली कि बांधावरुन गाडी घेउन मुख्य रस्त्याला दुसर्या बाजूने लागता येते. समोर अथांग निळ्याभोर पाण्यावर असंख्य म्हणजे मोजता येणार नाहीत इतकी बदके व इतर पक्षी तरंगत असतात. त्याचमागोमाग त्यांचा कलकलाट कानावर येऊन आदळतो.
पक्षिजगताचा काळा पांढरा करडा झेंडा असल्यासारखे वाटत होते.....बदके व कूट.... (बदके कुठली आहेत हे तज्ञांनी लिहावे)
येथे प्रमुखतः बदके जास्त प्रमाणात आढळतात. अर्थात विवीध मोसमात दिसणार्या पक्षांची यादी फारच मोठी आहे.
बदक क्वॅक क्वॅक करत मस्तपैकी पोहत बसली होती. खरेच हे पक्षांचे विश्व अदभुत....रम्य ! आता आपल्याला याच बांधावरुन तसेच पुढे जायचे असते. रस्ता मातीचा असल्यामुळे भरपूर धूळ उडते व रस्ताही कच्चा होता. एक छोटा कॅनॉल, त्यात वाहते पाणी, पाण्यात मासे व पाण्यावर तारा. खंड्याला याहून मासेमारीला योग्य जागा कुठून सापडणार. एक जोडी त्या तारेवर एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध बसली होती. ते चलाख पणे एकमेकांकडे पाठ करुन बसले होते. सगळीकडे निरव शांतता पसरली होती. तेवढ्या एका खंड्याला खाली पाण्यात चाहूल लागली व त्याने पाण्यात सूर मारला. बहुदा एवढा मोठा मासा त्याच्या तावडीत सापडेल असे त्याला वाटले नसेल. तो तारेवर बसणार तेवढ्यात त्याच्या चोचीतून तो पक्षी निसटला. मी श्वास रोखला.....मला वाटले गेली शिकार हातातून. पण तेवढ्यात त्याच्या जोडीदाराने त्या सावजावर सरळ रेषेत खाली झेप घेतली व तो मासा हवेतच चोचीत पकडून tतो/ती परत वर तारेवर आला/आली. काहीच मिनिटात त्याचा चट्टामट्टा झाल्यावर त्यांनी परत आपापल्या जागा घेतल्या. गंमत म्हणजे या सगळ्या शिकारीत मी पाहिले, खंड्याला स्वतःच्या पाठीमागे असलेल्या पाण्यातीला माशांची चाहूल लागू शकते.
राजकोट :-
अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा नंतर राजकोट हे गुजरातमधील चौथे मोठे शहर आहे. त्याची गणना जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये केली जाते. हे शहर राजधानी गांधीनगरपासून २३७ किमी अंतरावर आजी आणि न्यारी नद्यांच्या काठावर वसलेले आहे. राजकोट ही एक ऐतिहासिक भूमी आहे, ज्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात महत्वाची भूमिका बजावली आहे.राजकोट पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. हे राज्याच्या पश्चिमेकडील सुंदर शहर आहे. हे भारतातील ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे.हे शहर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशीही जवळून जोडलेले आहे.इथे महात्मा गांधींच्या संबधीत आठवणी आहेत, त्यांनी राजकोटमध्ये त्यांच्या अभ्यासाचा काही काळ घालवला.मुंबई राज्यामध्ये विलीन होण्यापूर्वी राजकोट ही सौराष्ट्र राज्याची राजधानी होती. नंतर ते गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आले.राजकोट हे गुजरात राज्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. इथले आदरातिथ्याच्या उच्च दर्जाचे आहे. इथे धार्मिक स्थळे, नैसर्गिक ठिकाणे, उद्याने, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक स्मारके, धरणे, शॉपिंग मॉल, बाजारपेठ अशी ठिकाणे आहेत. राजकोट भारताच्या सर्व भागांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे.
राजकोटचा इतिहास १६०० च्या आसपास प्रकाशझोतात आला. राजकोटची स्थापना १६१२ मध्ये जडेजा राजपूत कुळाने केली होती, ज्यांनी १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत या ठिकाणी राज्य केले होते.
खांभलिडा लेणी :-
या लेणी इसवी सनाच्या चौथ्या किंवा पाचव्या शतकातील असल्याचे मानले जाते, हि लेणी चुनखडीच्या खडकांत कोरलेली आहेत. खांबालिडा लेणी राजकोटच्या प्रमुख ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे, म्हणूनच पुरातत्व खात्याकडून या लेण्यांची देखभाल केली जात आहे.प्रख्यात पुरातत्त्ववेत्ता पी.पी. पंड्या यांनी १९५८ मध्ये या बौद्ध लेण्यांचा शोध लावला. जे पर्यटक राजकोटला भेट देण्यासाठी येतात त्यांनी खंभालिडा लेण्यांना भेट दिली पाहिजे
खंभालिडा लेण्यांचे प्रवेश शुल्क :- प्रवेश शुल्क नाही
काबा गांधी नो डेल्लो : -
जर तुम्ही महात्मा गांधींना मानत असाल आणि त्यांच्या आठवणींसह राजकोटमध्ये तुमचा प्रवास सुरू करायचा असेल, तर राजकोटमधील पर्यटनाची सुरवात काबा गांधी नो डेलोपासून सुरू करणे हा उत्तम पर्याय आहे.
काबा गांधी नो डेलोचे प्रवेश शुल्क :- शुल्क नाही
राष्ट्रीय शाळा : -
राजकोटमधील डॉ. याज्ञिक रोडवर स्थित राष्ट्रीय शाळा निश्चितच राजकोटमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण विशेषतः त्या पर्यटकांसाठी महत्वाचे आहे जे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित आहेत आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक आहेत. ६६ एकर क्षेत्रावर पसरलेली, राष्ट्रीय शाळा ही अशीच एक संस्था आहे, जी १९२१ मध्ये आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केली असे मानले जाते. सध्या नॅशनल स्कूल राजकोटचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे शैक्षणिक केंद्र देखील आहे.या संस्थेत खादी, कापूस आणि घाण्यावर तेल बनवण्याचे प्रकल्प सुरू केले आहेत. शाळेच्या पुढाकाराने स्थानिक विणकरांना एकल इकत विणण्याच्या कलेची ओळख करून दिली, ज्यामुळे इकोट साड्यांची विशिष्ट राजकोट शैली झाली, ज्याला बाजारात मान्यता मिळाली.
राष्ट्रीय शाळा प्रवेश शुल्क मोफत
लँग लायब्ररी राजकोट -
राजकोटमधील जवाहर रोडवर असलेली, "लाँग लायब्ररी" हे शहरातील सर्वात जुने ग्रंथालय आहे, इथे प्राचीन साहित्याच्या अमूल्य संग्रह आहे. जे वाचक आहेत किंवा साहित्याचे जाणकार आहेत त्यांच्यासाठी हे ग्रंथालय सर्वोत्तम ठिकाण आहे. लँग लायब्ररीमध्ये चर्मपत्र आणि शाईने लिहिलेल्या जुन्या पुस्तकांचा एक अद्भुत संग्रह आहे, जो देशभरातील पर्यटक आणि कवींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
लँग लायब्ररी वेळ :-सकाळी 9.00 ते संध्याकाळी 7.00
रणजीत विलास पॅलेस : -
रणजीत विलास पॅलेस हे राजकोटमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा केवळ इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाचा नाही तर इथे कुटुंब किंवा मित्रांसह सहलीसाठी योग्य ठिकाण आहे.
रणजीत विलास पॅलेसची वेळ :- सकाळी 9.00 ते 6.00
रणजित विलास पॅलेस प्रवेशशुल्क :-30 रुपये प्रति व्यक्ती
वॉटसन संग्रहालय राजकोट
निसर्गाच्या सुंदर वातावरणात वसलेले वॉटसन संग्रहालय आणि लँग लायब्ररी आहेत. या संग्रहालयाचे नाव काठीवाडमधील ब्रिटीश पॉलिटिकल एजंटच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे, ज्यांनी या क्षेत्रातील राजघराण्यांच्या योग्य संरक्षणासह ऐतिहासिक कलाकृतींचे दस्तऐवजीकरण सुरू केले. संग्रहात विविध राजघराण्यांनी दान केलेली चित्रे आणि कलाकृती, वसाहती राजवटीचे विस्तृत चित्रण आणि भरवाड, अहिर, दरबार आणि प्रांतातील इतर स्थानिक लोकांचे चित्रण करणारी वस्त्रे आणि दागिन्यांचा संग्रह आहे. सौराष्ट्र प्रदेशातील विविध ठिकाणांवरून मिळालेल्या सिंधू संस्कृतीच्या कलाकृतींचा संग्रह देखील आहे.

१९ व्या शतकातील राणी व्हिक्टोरियाची संगमरवरी मूर्ती आकर्षक आहे. सौराष्ट्रातील राजपुत्र आणि युरोपीय मान्यवर, हस्तकला, मातीची भांडी आणि रियासत यांची अनेक भव्य चित्रे आणि छायाचित्रे देखील पहाण्यासारखी आहेत.
संग्रहालय राज्य सरकारद्वारे व्यवस्थापित केले जाते. राज्याच्या जुना आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा भाग म्हणून हे जतन केले गेले आहे. या संग्रहालयात एक लायब्ररी देखील आहे, जिथे आपण संग्रहालयाने प्रकाशित केलेली पुस्तके वाचू किंवा खरेदी करू शकता.
( हे संग्रहालय दर बुधवारी आणि राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी बंद असते. )
वॉटसन संग्रहालय प्रवेश शुल्क :- 10 रुपये प्रति व्यक्ती
ज्युबली गार्डन राजकोट शहराच्या मधोमध आहे आणि राजकोटच्या दर्शनासाठी आणि लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. ज्युबिली गार्डन्स म्हणजे एका मोठे एन्टरटेन पार्कच्या तसेच अनेक दुकाने आणि संग्रहालय, कॅनॉट हॉल, अल्फ्रेड हायस्कूल आणि लँग लायब्ररीच्या असे सर्व एकत्र आहे. याशिवाय इथे अनेक प्रकारचे फूड कोर्ट, स्टॉल इ. जेणेकरून मनोरंजनाबरोबरच खाण्यापिण्याच्या चवही घेता येईल. या पार्कमध्ये मुले आणि प्रौढ दोघांसाठीही विविध प्रकारच्या राईड्स आहेत. काही दुर्मिळ प्रजातीचे पक्षी हिवाळ्यात या उद्यानात दिसतात. याशिवाय हे ठिकाण शहराचे एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे.
सामुदायिक विज्ञान केंद्र आणि तारांगण :-
कम्युनिटी सायन्स सेंटर आणि प्लॅनेटोरियम एक स्वयंसेवी संस्था चालवते. ज्याची स्थापना १९९२ मध्ये झाली. हे स्थापित करण्याचे उद्दीष्ट शैक्षणिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि सेमिनारच्या मदतीने मुलांना विज्ञान आणि गणिताशी संबंधित ज्ञान देणे आहे. या कम्युनिटी सेंटरमध्ये वैज्ञानिक आणि गणिती उपकरणांचा वापर करुन अनेक विज्ञान प्रयोग दाखविले जातात. हे ऑडिओ आणि व्हिडीओ शोच्या मदतीने ग्रहांची स्थिती आणि त्याचे परिणाम याबद्दल माहिती दिली जाते. या केंद्राची टीम एड्सविषयी मुलांमध्ये जनजागृती करते.
ऐश्वर्या मंदिर :-
ऐश्वर्या मंदिर हे राजकोटमधील एक छोटे मंदिर आहे, जे भगवान शिव यांना समर्पित आहे. हे शहरापासून १० किमी दूर जामनगर महामार्गावरील माधापार गावात आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंग 'स्वयंभू' आहे. राजकोटमधील हा एक पिकनिक स्पॉट आहे. यासह, या मंदिरात आयोजित वार्षिक उत्सव देखील खूप लोकप्रिय आहे.
जगत मंदिर :-
मुक्ती धाम :-
मुक्ती धाम हे राजकोटमधील न्यारी नदीच्या काठावर रामनाथ पारा परिसरात असलेली शवविद्युतदाहीनी आहे. जरी हे स्मशान स्थळ असले तरी या ठिकाणी वाचनालय देखील आहे ज्यात आध्यात्मिक आणि धार्मिक विषयांशी संबंधित पुस्तके आहेत. मुक्ती धाममध्ये तीन छत्री हे विश्रांतीचे ठिकाण आहे. या विश्रामधामातील खांब विविध देवतांच्या मूर्तींनी सजलेले आहेत. पौराणिक घटनांशी संबंधित काही चित्रे आणि शिल्पेही या 'धाम'च्या परिसरात प्रदर्शित केली आहेत. फुलांनी आणि झुडपांनी सजवलेली बागेत देखील आहे.
नेहरू गेट :-
नेहरू गेटला नगर दरवाजा म्हणूनही ओळखले जाते. हे एक ऐतिहासिक द्वार आहे ज्यावर वास्तुशिल्प आणि जुने घड्याळा आहे. हा दरवाजा मोरबीच्या ऐतिहासिक बाजाराकडे जाणार्या रस्त्यावर आहे.
रेसकोर्स :-
रेसकोर्स राजकोट शहराच्या मध्यभागी एका मोठ्या मैदानात आहे. याच परिसरात बालभवन, किड्स ट्रॅफिक पार्क, फन वर्ड इत्यादी ठिकाण आहेत.इथेच ऑलिम्पिक मानकानुसार असलेले इनडोअर स्टेडियम, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान, फुटबॉल मैदान, हॉकी मैदान आणि व्हॉलीबॉल मैदान यासह विविध क्रीडा सुविधा, एक जिम आणि जलतरण तलाव आहे.
राय्या नाका आणि बेदी नाका :-
नवाब राजवटीत, राजकोट शहर सन १७२० मध्ये जुंगाडचे उप फौजदार मासुम खान यांनी जिंकले. त्याने सन १७२२ मध्ये शहराचे मासुमाबाद हे नाव बदलून किल्ला बांधला. किल्ल्याला एक बाह्य तटबंदी होती जी सुमारे ४ ते ५ किमी लांब होती आणि आठ मोठे दरवाजे होते, प्रत्येक दरवाज्याला बाहेरून लोखंडी खिळे ठोकळे होते. या दरवाज्यापैकी फक्त दोन दरवाजे, राय नाका आणि बेदी नाका, अजूनही जुन्या किल्ल्याच्या अवशेषां स्वरुपामध्ये उभे आहेत. राजकोटच्या एतिहासिक अस्तित्वाची हि खुण म्हणावी लागेल.
रांचीदादा बापू आश्रम :-
श्री रांचीदादा बापू आश्रम राजकोट मधील कुवडव रोडवर आहे. हा आश्रम अनेक मानवतावादी आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी आहे. हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि आश्रमातर्फे डोळ्यांसाठी हॉस्पिटल चालवले जाते. गुरुवार इथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
स्वामीनारायण मंदिर : -
राजकोट जंक्शनपासून ४ किमी अंतरावर कलवार रोडवर, "स्वामीनारायण मंदिर" हे राजकोटचे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे, हे भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. बोचसनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण (BAPS) संस्थेने १९९८ मध्ये स्वामीनारायण मंदिराची स्थापना केली होती, म्हणून त्याला बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण म्हणूनही ओळखले जाते.
हे मंदिर त्याच्या वास्तुशिल्पासाठी प्रसिध्द आहे. हाताने कोरलेल्या दगडांनी हे मंदिर बांधले गेले आहे असे मानले जाते. इथे सर्व धर्माचे लोक येतात.हजारोच्या क्षमतेच्या या मंदिरात राज्यातील सर्वात मोठे सभागृह आहे.
स्वामीनारायण मंदिर उघडण्याच्या वेळा : सकाळी ७.३० ते १०.१५ व दुपारी ३ ते रात्री ८
ईश्वरीया पार्क : -
ईश्वरी पार्क हे राजकोट मधील आणखी एक आकर्षक ठिकाण आहे. या बागेचे उद्घाटन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी २००८ साली केले. तेव्हापासून या सुंदर उद्यानाला लाखो पर्यटकांनी भेट दिली आहे.
७७ एकरांवर पसरलेल्या या उद्यानात शांत वातावरण आहे.सर्वत्र हिरवळ आहे तसेच एक विशाल तलाव आहे, त्यात पर्यटक बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.राजकोट मधील आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.
ईश्वरी पार्कची वेळ :- दुपारी १ ते रात्री ८
ईश्वरी पार्क प्रवेश शुल्क :- पर्यटकांसाठी: 20 रु, मुलांसाठी: 10 रु
बाहुली संग्रहालय
राजकोटमधील या अनोख्या बाहुल्यांच्या संग्रहालयामुळे जगातील संस्कृती आणि परंपरांचे विहंगावलोकन करता येते. या संग्रहालयात विविध देशांमधून आणलेल्या 1000 हून अधिक बाहुल्यांचा संग्रह आहे, या संग्रहालयातील प्रत्येक बाहुली अद्वितीय आहे कारण ते जगभरातील विविध परंपरा आणि संस्कृतींच्या कथा सांगतात.जगभरातील रोटरी क्लबने त्यांच्याकडील बाहुल्यांना रोटरी क्लब ऑफ राजकोट मिडटाऊनला उदारपणे दान केले ,त्यामुळे इथे मोठा संग्रह तयार झाला. असे संग्रहालय असावे अशी कल्पना २००१ मध्ये रोटेरियन श्री दीपक अग्रवाल यांनी कल्पना केली. या रोटरी डॉल म्युझियममध्ये मानवाचा जीवनप्रवास बाहुल्यांच्या माध्यमातून दाखवला आहे ज्याचा आनंद अबालवृध्द घेतात. राजकोट मध्ये हे एक अतिशय उत्तम ठिकाण आहे.
संग्रहालयात एक मिनी थिएटर देखील आहे जिथे डिस्कव्हरी चॅनेल, नॅशनल जिओग्राफिक चॅनेल, ब्रिटानिका आणि बरेच काही बनवलेले चित्रपट आणि माहितीपट दाखवले जातात.
रोटरी डॉल्स संग्रहालय वेळ :- सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ७.३० (प्रत्येक सोमवारी बंद असताना)
रोटरी डॉल्स संग्रहालय प्रवेश शुल्क :- पर्यटकांसाठी: २५/- रुपये प्रति व्यक्ती, मुलांसाठी: १५/- रु
फनवर्ल्ड राजकोट -
फनवर्ल्ड, राजकोट हे गुजरातचे पहिले एन्टरटेनमेंट पार्क, १९८६ मध्ये याचे उदघाटन झाले. कुटुंबांसह किंवा मित्रांसोबत एक मस्त दिवस घालवण्यासाठी फनवर्ल्ड हे अतिशय योग्य ठिकाण आहे.
हे ठिकाण स्थानिक लोकांसाठी तसेच राजकोटच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे इथे दरवर्षी सुमारे 1.2 दशलक्ष पर्यटकांची भेट देतात.
Funworld वेळ :- दुपारी ३ ते रात्री ११
फनवर्ल्ड प्रवेश शुल्क :- पर्यटकांसाठी: 20 रुपये प्रति व्यक्ती, मुलांसाठी: 15 रु
गोंडल राजकोट -
राजकोटच्या दक्षिणेस सुमारे 35 किमी अंतरावर स्थित, "गोंडल शहर" राजकोटच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून सूचीबद्ध आहे, ज्यामध्ये दरवर्षी हजारो पर्यटकांची उपस्थिती असते. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह राजकोट मधील एक दिवसाच्या सहलीसाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळे शोधत असाल तर गोंडल हा तुमच्या सहलीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
राजकोटच्या दक्षिणेस सुमारे ३५ किमी अंतरावर स्थित, "गोंडल शहर" राजकोटच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी हे आहे, इथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. राजकोट मधील एक दिवसाच्या सहलीसाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळ शोधत असाल तर गोंडल हा सहलीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
गोंडल शहर गाड्यांच्या संग्रहासाठी तसेच नौलखा पॅलेस, दरबारगढ, आणि गजबजलेल्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. इथे असणार्या गल्ल्या शहराच्या सौंदर्यात भर घालतात. नौलखा महालाचे वैभव आणि भव्यता अद्वितीय आहे.नौलखा राजवाडा हा कोरीव कमानींच्या रचनेवर बांधलेला आहे. महाल संकुलात जाण्यासाठी भव्य दगडी पायऱ्या आहेत.महालचा आतील भाग पर्यटकांसाठी खुला आहे. महालाचा आतील भाग अलिशान आहे आणि जुन्या काळातील राजांच्या विलासी जीवनशैलीची अनुभूती देते. राजवाड्याच्या परिसरात एक खाजगी अभयारण्य आहे ज्यात हरीण आणि पक्षी पहायला मिळतात.नौलखा राजवाडा हे राजकोटमधील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे.याशिवाय पर्यटक गोंडलच्या प्रसिद्ध बाजारात खरेदी करून त्यांची सहल संस्मरणीय बनवू शकतात.
लाल परी तलाव :-
राजकोटपासून 5 किलोमीटर अंतरावर लाल परी तलाव हे नयनरम्य सहल ठिकाण आहे. तलावाचे स्वच्छ निळे पाणी येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. आठवड्याच्या शेवटी ताजेतवाने होण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. पर्यटक येथे पक्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ शकतात. तलाव आणि रंगीबेरंगी पक्षी पाहण्यासाठी, स्थानिक तसेच दूरवरचे पर्यटक येथे येतात.इथे आपल्याला स्थानिक व्यतिरिक्त स्थलांतरित पक्षी पहाता येतात.प्रद्युम्न झूलॉजिकल पार्क राजकोट -
राजकोटमधील लालपरी तलावाजवळील प्रद्युम्न प्राणीशास्त्र उद्यान किंवा "राजकोट प्राणीशास्त्र पार्क" हे राजकोटमधील आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. हे उद्यान ३७ एकरात पसरलेले आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती पाहता येतात. या उद्यानाच्या आजूबाजूला लालपरी तलाव आणि रवींद्र झील नावाचे दोन तलाव देखील आहेत, जे इथल्या आकर्षणात भर घालतात.
प्रद्युम्न जूलॉजिकल पार्कची वेळ :- सकाळी ९ ते ६
प्रद्युम्न प्राणी प्राणी उद्यानाचे प्रवेश शुल्क :- पर्यटकांसाठी: १० रु, मुलांसाठी: ५ रु
एजी धरण :-
एजी धरण राजकोटपासून ८ किमी अंतरावर आहे आणि इथून शहराला पाणी पुरवठा होतो. राजकोटच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये हे एक आहे. धरणाच्या भिंतीवरुन उंचीवरून पडणारे पाणी अतिशय सुंदर दिसते.
न्यारी धरण राजकोट -
राजकोटच्या भटकंतीत कुटुंबासह किंवा मित्रांसोबत निवांत वेळ घालवता येईल अशी जागा शोधत असाल, तर यासाठी तुम्ही न्यारी डॅमला जा. राजकोटपासून फक्त ५ किमी अंतरावर असलेले न्यारी धरण हे राजकोटमधील आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. इथे पर्यटक आणि स्थानिक दोघांचीही वर्दळ असते.
हँगिंग ब्रिज मोरबी :-
हँगिंग ब्रिज मोरबी, राजकोट येथे आहे. राजकोट ते मोरबी हे अंतर सुमारे ६३ किलोमीटर आहे.ब्रिटिश राजवटीत धातुच्या वायर, दोर आणि लाकडापासून हा पुल बनवलेला आहे.मचाचू नदीवर बांधलेला हा पूल १६५ फूट लांब आणि ४.५ फूट रुंद आहे.हा पूल ओलांडणे हा पर्यटकांसाठी एक थरारक अनुभव आहे.
मोरबीतील इतर पर्यटकांसाठी आकर्षणे म्हणजे मणि मंदिर, बहुधर्मीय हिंदू मंदिर, याशिवाय मोरबीतील राजस्थानी शैलीत १९३१ मध्ये बांधलेला आर्ट डेको पॅलेस आणि वेलिंग्टन सचिवालय. राजकोटच्या पर्यटन स्थळांमध्ये मोरबी हे आवर्जून जावे असे ठिकाण आहे.
हिंगोलगड निसर्ग शिक्षण अभयारण्य :-
हे अभयारण्य हिवाळ्याच्या सुरुवातीपासून ते पावसाळ्याची सुरुवात होइपर्यंतच्या कालावधीत भेट देण्यास उत्तम आहे.इथे पर्वतीय उतार, मातीची वैशिष्ट्ये व नमुने, पाण्याचा प्रवाह आणि वनस्पती (गवत, औषधी वनस्पती, झुडपे आणि झाडी) झाडे आणि प्राण्यांचे जग या सर्वांचा पर्यावरणीय अभ्यास आणि अन्न साखळीवर होणारा प्रभाव पहाता येतो.
इथे पक्ष्यांच्या जातीबरोबरच सापांच्याही बर्याच जाती पहायला मिळतात.सर्व सुरक्षितता घेउन आपण या सरिसृप मित्रांचे दर्शन घेउ शकतो.राजकोट ते हिंगोलगड अभयारण्याचे अंतर सुमारे ७० किलोमीटर आहे.
जेटपूर :-
राजकोट ते जेतपूर हे अंतर सुमारे ७० किलोमीटर आहे. जेटपूर हे राजकोट जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शहर आहे. जेतपूरची ख्याती येथे रंगणाऱ्या व कापडाच्या छपाईच्या कामामुळे आहे. हे एक पर्यटन स्थळ नाही, पण जे पर्यटक कपडे रंगवणे आणि छपाई पाहू इच्छितात ते अनेकदा जेतपूरला भेट देतात.
रामपारा वन्यजीव अभयारण्य :-
या अभयारण्याचा नैसर्गिक वातावरणात काळवीटांवा वावर दिसून येतो. कळपांमध्ये फिरणे किंवा जंगलात लपून राहणारे, हे सजीव त्यांच्या सडपातळ शरीरासाठी ओळखले जातात.फरच्या जाड कोटांसाठी त्यांची कातडी उपयोगात आणली जात असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होते. या अभयारण्यात फिरताना या काळवीटांची चपळ उडी आणि झेप बघणे रमणीय आहे.
लांडगा,कोल्हा,तरस आणि नीलगाय यासारखे इतर प्राणी अभयारण्यात दिसतात.या परिसरात १३० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आढळतात.कबूतर, मोठे तपकिरी घुबड, जांभळा सनबर्ड, पिवळ्या गळ्याची चिमणी असे या प्रदेशात राहणारे पक्षी दिसतात. राजकोट ते रामपारा वन्यजीव अभयारण्य हे अंतर अंदाजे ५४ किलोमीटर आहे.
वांकानेर :-
वांकानेर राजकोटपासून ५३ किमी अंतरावर आहे. माचू नदीच्या प्रवाहाने वेढलेले, म्हणून 'वंक'.सौराष्ट्रातील कॉलर झालवारमधील हा प्रदेश राजपुतांच्या राजवटीखाली गेला. कलेच्या राजाश्रयासाठी प्रसिद्ध असलेल्या वांकानेर राजघराण्याला स्थापत्य अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरमध्ये वैयक्तिक रस होता, त्याचे उदाहरण म्हणजे राजा अमरसिंहजींनी त्यांच्या १९०७ मध्ये बांधलेला रंजीत विलास पॅलेस.हा राजवाडा वांकानेर शहराजवळील एका टेकडीवर बांधला गेला आहे जो विविध वास्तुशैलींचा एक उत्कृष्ट मिश्रण आहे. गॉथिक कमानी,पुढे आलेल्या संगमरवरी बाल्कनी, प्रशस्त गच्ची, आयनिक स्तंभ आणि मुघल घुमट असलेला सात मजली क्लॉक टॉवर अशी मिश्र शैली इथे पहायला मिळते. खिडकीची रचना फ्रँको-इटालियन पध्दतीची आहे. इथे जुन्या गाड्यांचा उत्तम संग्रह आहे. राजभवनावर सध्या राजघराण्यातील व्यक्ती रहात असल्या तरी काही भागाचे संग्रहालयात रुपांतर केले गेले आहे.त्यामध्ये शस्त्रे, पेंढा भरलेले प्राणी, चित्रे आणि रेखाचित्रे, चांदीची शाही भांडी आणि विदेशी फर्निचर यांचा भव्य संग्रह आहे.
या पॅलेस परिसरात द रॉयल रेसिडेन्सी आणि रॉयल ओएसिस हे दोन गेस्ट हाऊस आता हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतरीत केलेली आहेत. यातील रॉयल ओएसिस मकाचू सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेले आहे, परिसरात बाग, आर्ट डेको शैलीमध्ये एक भव्य इनडोअर पूल देखील तसेच राजवाड्याचे मैदान आहे. वांकनेर जुन्या काठियावाडच्या आदरातिथ्य आणि संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करते.
अनलगड हिल -
अनलगढ हिल हे राजकोट जवळील गोंडल शहरापासून १७ किमी अंतरावर असलेले एक लहान हिल स्टेशन आहे, अगदी स्थानिक लोकांसाठी सुध्दा हे एक ऑफ बीट डेस्टिनेशन आहे. शहराच्या दगदगीपासून हे ठिकाण आपल्याला दूर नेते.राजकोटमध्ये कुटुंबासह भेट देण्याकरिता काही ठिकाणांपैकी हे एक आहे.
राजकोटला भेट देण्याचा उत्तम काळ
जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह राजकोटच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता हि माहिती हवी असेल तर ऑक्टोबर ते मार्च हा काळ राजकोटला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. या दरम्यान, राजकोटचे हवामान अतिशय आल्हाददायक असते आणि तापमान देखील 10 ° C ते 30 ° C च्या आसपास राहते, जे राजकोटमधील फिरण्यासाठी योग्य आहे.
राजकोटमध्ये राहण्यासाठी हॉटेल्स -
राजकोटमध्ये राहण्यासाठी अगदी कमी बजेटपासून ते जादा बजेटपर्यंत, सर्व प्रकारची हॉटेल्स उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार हॉटेल निवडू शकता.
हॉटेल सिल्व्हर पॅलेस
प्राइड रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर
हॉटेल प्लॅटिनम
निराली रिसॉर्ट्स
राजकोटला कसे पोहोचावे -
राजकोटमध्ये देशांतर्गत विमानतळ आहे जे भारतातील अनेक विमानतळांना जोडला गेलेले आहे. परंतु जवळचा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आहे.
ट्रेनने राजकोटला कसे जायचे -
राजकोटचे रेल्वे जंक्शन आहे जे गुजरात राज्यातील आणि देशातील प्रमुख शहरांशी अनेक एक्सप्रेस आणि सुपर फास्ट ट्रेनने जोडलेले आहे, त्यामुळे राजकोटला रेल्वेने जाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
रस्त्याने राजकोटला कसे जायचे
राजकोट राज्याच्या विविध शहरांशी रस्त्याने उत्तम प्रकारे जोडलेले आहे, म्हणून राजकोटला देशाच्या कोणत्याही भागातून प्रवास करणे अगदी सोपे आहे. राजकोटसाठी गुजरातच्या सर्व प्रमुख शहरांमधून बसेस जातात. बस व्यतिरिक्त, पर्यटक आपली कार किंवा टॅक्सी बुक करून राजकोटला जाऊ शकतात.
ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या काठेवाड एजन्सीमधील पहिल्या दर्जाचे हे एक संस्थान. याचे क्षेत्रफळ ८,६४१ चौ. किमी.वार्षिक उत्पन्न पन्नास लाख रुपये. उत्तरेस बर्दा व हालाड, पूर्वेस गोहिलवाड आणि बाकीच्या बाजूंनी अरबी समुद्राने सीमांकित झालेल्या या संस्थानाची स्थापना १७३५ मध्ये शेरखान बाबी या साहसी शिपायाने मोगल सत्ता धुडकावून केली. प्रथम त्याची राजधानी दुसरीकडे होती. मुलगा सलाबतखानच्या कारकीर्दीत ती जुनागढला हलली. अठराव्या शतकात सैन्यबळावर काठेवाडात लहान संस्थानिकांकडून त्यांनी खंडणी उकळायला सुरुवात केली. त्याला झोरतलबी म्हणत. गायकवाडांनी जुनागढची शोधा जागीर काबीज करून खंडणी बसवली. १८०७ मध्ये संस्थान इंग्रजांचे मांडलिक झाले. त्यांनीच झोरतलबी वसूल करून द्यावी असे ठरले. ब्रिटिश व गायकवाड यांना संस्थानाला ६५,६०४ रु. खंडणी द्यावी लागे. महबतखान (१९००– ) हा १९११ मध्ये गादीवर आला. हाच शेवटचा संस्थानचा नबाब. संस्थानात ७ शहरे, १८ नगरपालिका, ८११ खेडी होती. बहुसंख्य (८२%) प्रजा हिंदू होती. संस्थानची स्वतःची टाकसाळ व डाक-व्यवस्था होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रेल्वे, पक्क्या सडका, शिक्षण आणि आरोग्य यांत बऱ्याच सुधारणा झाल्या. सिंहांची वस्ती असलेला गिरनार पर्वत, वेरावळचे उत्तम बंदर, सोमनाथचे इतिहासप्रसिद्ध मंदिर ही संस्थानाची वैशिष्ट्ये होत. संस्थानिकांना फाशीची शिक्षा देण्याची परवानगी होती. येथील संस्थानिकास नबाब हा किताब होता व अकरा तोफांचा मान असे. मुसलमानी कायद्याप्रमाणे दत्तक घेण्याची सनद त्याला मिळाली होती.
जुनागडचे नवाब महाबतखान
जुनागड संस्थान हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले, पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते. या संस्थानाच्या नबाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती. जुनागढच्या नबाबाने २२ एप्रिल १९४७ रोजी पाकिस्तानात विलिन होण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याच वर्षी मेमध्ये सर शाहनबाज भूत्तो हे मुस्लिम लीगचे कार्यकर्ते संस्थानाचे दिवाण झाले. १३ सप्टेंबर १९४७ रोजी पाकिस्तानने संस्थानाचा सामीलनामा मंजूर केल्याचे कळवले; परंतु त्याला जनतेचा विरोध होता. सामळदास गांधींच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन सुरू झाले. बाबरियावाड, सरदारकड, बांटवा या छोट्या जागिरींनी भारतात सामील होण्याचे ठरविले. काठेवाडच्या संस्थानिकांनी संरक्षण मागितल्याने भारताने बाबरियावाड, मंगरोळ, मानवदार या जुनागढच्या मांडलिक संस्थानांचा ताबा घेतला. ९ नोव्हेंबर १९४७ रोजी ब्रिगेडिअर गुरुदयालसिंग व मुलकी प्रशासक यांनी जुनागढ ताब्यात घेतले. २० फेब्रुवारी १९४८ च्या सार्वमतानुसार संस्थान १९४९ मध्ये सौराष्ट्र संघात आणि १ मे १९६० पासून गुजरात राज्यात समाविष्ट झाले.
विलीनीकरण :-
महाबतखान हा या संस्थानचा नबाब होता. जुनागडचे क्षेत्रफळ ३०,३३७ चौ. मैल. होते, तर लोकसंख्या ६,७०,७१९ एवढी होती. त्यापैकी ८० टक्के हिंदू तर २० टक्के प्रजा मुसलमान होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी नबाब महाबतखान याने जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. बॅ. जीनांशी त्याने गुप्तपणे पत्रव्यवहार केला. पाकिस्तान सरकारने १३ सप्टेंबर १९४७ जुनागड संस्थान पाकिस्तानात विलीन होत असल्याचे भारत सरकारला कळविले याबाबत जुनागडशी जैसे थे (स्टॅड स्टिल) करार झाल्याचे जाहीर केले
नबाबाच्या निर्णयामुळे जुनागड संस्थानातील जनतेला धक्का बसला.. ८० टक्के जनता हिंदू असताना कोणत्याही प्रकाराचा विचार न घेता नाबाबने घेतलेला निर्णय आपला अवमान असल्याचे प्रजेला वाटले. त्यांनी नबाबाच्या विरोधात आंदोलन उभारले नबाब महाबतखान चैनी, विलासी व ऐषआरामी होता. जुनागड पाकिस्तानमध्ये सामील करून आपल्या हातून चूक होते आहे. असे नबाबास वाटले नाही. जुनागडमधील प्रजेने केलेल्या आंदोलनाला भारत सरकारने पाठिंबा दिला. जुनागडच्या आसपासची नवानगर, भावनगर, गोंडल ही संस्थाने यापूर्वीच भारतात सामील झाली होती. भारत सरकारने २४ सप्टेंबर १९४७ रोजी जुनागडमध्ये लष्करी कारवाई केली. नबाब महाबतखानास पाकिस्तानाला पळून जावे लागले. यानंतर शामळदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली काठियावाड जनता आघाडीच्या हंगामी सरकारची स्थापना झाली. फेब्रुवारी १९४८ मध्ये जुनागडमध्ये सार्वमत घेण्यात येऊन जुनागड संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्यात आले
जुनागड शहर गुजरातमध्ये असल्यामुळे सहाजिकच इथे गुजराती मोठ्या प्रमाणात बोलली जाते.पण इथे आपण इंग्लिश आणि हिंदीमध्ये संवाद साधु शकतो


पत्ता :-चिता खाना,मुल्ला वाडा
प्रवेशशुल्क : मोफत



उपरकोट किल्ला:-

या दोन्ही विहीरी उपरकोट किल्ल्याच्या आत आहेत.बहुतेक सर्व विहीरी जमिनीवर खोदल्या जातात.मात्र या विहीरींचे वैशिष्ट्य हे कि या विहीरींचे खोदकाम दगडात केलेले आहे. अर्थात हे काम किचकट आहे.सहाजिकच या विहीरींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे.अर्थातच या विहीरींच्या संदर्भात एक कथा आहे.आदि आणि कदी या नावाच्या दोन कुमारिका मुली होत्या.विहीर उभारताना तात्कालीन प्रथेप्रमाणे या दोन मुलींचा बळी इथे दिला गेला होता.त्यांच्यावरुन या विहीरीला नाव दिले गेले आहे.इथे भेट देणारे भविक या कुमारिकेंच्या श्रध्देपोटी बांगड्या आणि कपडे वहातात.

वेळ : सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते संध्याकाळी ६
प्रवेश शुल्क : भारतीय पर्यटकासाठी INR 5 आणि परदेशी पर्यटकासाठी INR 100 /-


जुनागढ बुद्ध लेणी समूह, भारतातील गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यात या प्राचीन बुद्ध लेणी आहेत. या बुद्ध लेण्यांना सहसा बुद्ध लेणी न म्हणता, कठीण खडकात कोरलेल्या खोली ज्या बुद्ध भिक्खुंसाठी राहण्यासाठी कोरलेली आहेत.
जुनागढ बुद्ध लेणी सम्राट अशोक कालीन असून या बुद्ध लेणी पहिल्या शतकात कोरलेल्या असाव्यात. जुनागढ बुद्ध लेणी प्राचीन असून आजही या बुद्ध लेणीचे अस्तित्व टिकवून आहे. या बुद्ध लेणीत भव्य स्तंभ आणि खोली कोरलेली आहेत. जुनागढ येथे बाबा प्यारे बुद्ध लेणी, उपरकोट बुद्ध लेणी कोरलेली आहेत.

जुनागढ बुद्ध लेणी समूह
उपरकोट बुद्ध लेणी ही बुद्ध लेणी जुनागढ बुद्ध लेणीचाच एक भाग आहे. ही बुद्ध लेणी जुनागढ बुद्ध लेणीच्या पूर्व दिशेला आहेत. उपरकोट बुद्ध लेणी जमिनीपासून ३०० फूट खोल असून दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात या बुद्ध लेणीचे कोरीव काम झाले आहे. या बुद्ध लेणी सातवाहन काळातील आहेत. उपरकोट बुद्ध लेणीत एक चैत्य आणि भव्य खोली बुद्ध भिक्खू यांच्या निवासासाठी तसेच ध्यान धारणेसाठी वापर केला जातो.
बावा प्यारा बुद्ध लेणी, या बुद्ध लेणी गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यात आहेत. या बुद्ध लेणी जुनागढ बुद्ध लेणी समूह यांचाच एक भाग आहे. बावा प्यारा बुद्ध लेणीत बुद्ध आणि जैन या दोन्ही धर्मातील शिल्पकला दिसून येतात. या लेण्यात एक चैत्य आणि खोली कोरलेली आहेत. या बुद्ध लेणी जेम्स बुर्गेस यांनी शोधून काढल्या आहेत. जेम्स बुर्गेस हे ब्रिटिश पुरातनवस्तुशास्त्रीय अभ्यासक होते.
जेम्स बुर्गेस यांच्या या अभ्यासानुसार बौद्ध भिक्खू यांनीच या बुद्ध लेणी कोरलेली असून यात त्यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यानंतर जैनांनी या बुद्ध लेणी वापरण्यास सुरुवात केली.
वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६



पत्ता : नगर रोड, जुनागड
वेळ : सकाळी ९ ते १२, दुपारी ३ ते संध्याकाळी ५.१५
प्रवेशशुल्क : २ रुपये प्रतिव्यक्ती
वेळ : सकाळी १० ते दुपारी १, संध्याकाळी ३ ते ६
प्रवेशशुल्क : सायन्स म्युझियमचे शुल्क २५/- रुपये, प्लॅनेटेरीयमचे शुल्क २५/- तर 3D शो साठी ४५ /- असे वेगवेगळी प्रवेशशुल्क आहेत.
भेट देण्याची वेळ : सकाळी ६ ते संध्याकाळी ६
प्रवेश : मोफत

जुनागडमध्ये फिरताना सहपरिवार भेट द्यायला आदर्श ठिकाण म्हणजे मोती बाग.जुनागडच्या कृषी विश्वविद्यालयच्या परिसरात हि मोती बाग आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत, तसेच एक तलावही आहे.
पत्ता :- वांथली रोड, मोती बाग, जूनागड विश्वविद्यालय
वेळ : सकाळी ५ ते संध्याकाळी ७
प्रवेशा शुल्क : मोफत
ज्यांना जुनागडमध्ये मनाला विरंगुळा देणारे ठिकाण हवे आहे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे सुरज फन वर्ल्ड.साधारण सणासुदीच्या काळात इथे गर्दी असते.इतर काळात इथे निवांतपणे आनंद घेता येईल.
पत्ता : कॉलेज रोड, गाँधी ग्राम
वेळ : दुपारी २ ते रात्री ११
प्रवेश शुल्क: प्रवेश शुल्क 20 रुपये
बालभवन पार्क - (Balbhawan Park)
पत्ता : जुनागढ रोड, कड़ियावाड, जूनागढ़
राजीव गाँधी गार्डेन - Rajiv Gandhi Garden
पत्ता :मनोरंजन गेस्ट हाउस जवळ, जुनागढ
शहीद पार्क - Shahid Park
पत्ता :तलाव गेट, जूनागढ़
नरसिंह मेहता लेक - Narsinh Mehta lake
१५ व्या शतकातील गुजरातमधील सुप्रसिध्द कवी आणि संत नरसिंह मेहता यांचे नाव दिलेला हा तलाव जुनागड शहराच्या मधोमध आहे.पत्ता : तलाव गेट, जूनागड
तुलसीश्याम स्प्रिंग्स :-
जुनागडच्या भेटीत नक्कीच भेट द्यावे असे ठिकाण म्हणजे तुलसी श्याम स्प्रिंग्स. भगवान विष्णु मंदिराच्या परिसरात गरम पाण्याचे तीन प्रवाह आहेत.विशेष म्हणजे या तिन्ही प्रवाहांचे तापमान वेगवेगळे असते. या पाण्यात गंधकाचा अंश असतो, त्यामुळे याला उग्र वास येतो.पण त्याच बरोबर या पाण्यात स्नान करण्याने त्वचाविकार बरे होतात.दामोदर कुंड - (Damodar Kund)
भवनाथ - (Bhavnath)
खुप प्राचीन काळापासून गिरनार पर्वताच्या पायथ्याशी भवनाथ हे मंदिर अस्तित्वात आहे, असा समज आहे. पावसाळ्यात भवनाथ परिसराला भेट देणे हा एक अनुभव आहे. महाशिवरात्रीला इथे एक छोटा कुंभमेळा असतो. त्याचबरोबर जनेवारी किंवा फेब्रुवारीत इथे यात्रा असते.
सरकेश्वर बीच – Sarkeshwar Beach:-
जुनागड परिसरात भटकंती केल्यावर आलेला थकवा घालवायचा असेल आणि त्याचबरोबर वॉटर स्पोर्टचा अनुभव घ्यायचा असेल तर सरकेश्वर बीचला जायलाच हवे. जुनागड शहरापासून चार तासाचा प्रवास केल्यावर आपण सरकेश्वर बिचवर जाउ शकतो. अर्थात थोडे अंतर जास्त असले तरी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.इथे पर्यटकांची खुप गर्दी नसल्यामुळे अगदी निवांत वेळ घालवता येतो.




जुनागड आणि परिसराचे पर्यटन करण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी अनुकुल आहे.पावसाळ्यातही या परिसरात जाता येते.मात्र इथे बर्याचदा भुस्खलन होते,त्याचा धोका सतत असतो.
जुनागडमध्ये रहाण्यासाठी हॉटेल्स :-हॉटेल्स आणि रिसॉर्ट - (Hotels and Resorts)
- Asiatic Lion Lodge
- Indralok
- Leo Resort
- Hotel Anil Farm House
- Shaan-e-gir Forest Camp Resort
- The Fern - Gir Forest Resort
- Magnum Inn
- Gir Lodge
- Harmony
- Sapphire
- Vishala
- The Lotus
- होटल प्लैटिनम (HOTEL PLATINUM)
- क्लिक होटल, जूनागढ़ (Click Hotel, Junagadh)
- होटल ग्रीनलैंड HOTEL GREENLAND
- हॉलिडे होटल एंड रिसॉर्ट जूनागढ़ (Holiday hotel and resort Junagadh)
रेस्टोरेंट - (Restaurants)
- Petals Restaurant
- Geeta Lodge
- Utsav Restaurant
- Patel Restaurant & Banquet Hall
- Santoor
- Sugar n Spice Restaurant
- Rajbhog Restaurant
- Patel Parotha House Ac Dinning Hall
जुनागडला जायचे कसे ?
जुनागडला रस्ता,रेल्वे ,विमानसेवा या विवीधमार्गाने जाता येईल.
विमानमार्गे :-
जुनागडला विमानाने जायचे असेल तर हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि जुनागडला विमानतळ नाही.तिथून जवळ असलेल्या राजकोटला छोटा विमानतळ आहे.राजकोट-जुनागड हे अंतर १०० कि.मी. आहे.राजकोट विमानतळावर उतरल्यावर बसने आपल्याला जुनागडला जाता येईल.
रेल्वेने जुनागडः

जुनागड रस्त्याने देशातील विवीध शहरांशी थेट जोडले गेले आहे.सुरत ,अहमदाबाद्,राजकोट या शहरातून जुनागडला थेट बस आहेत.स्वताच्या वहानाने जाणेही सोयीचे आहे.
Website: www.junagadhmunicipal.org
सिनेमा - (Cinema)
जूनागढ़ में मुख्य रूप से 3 सिनेमा हैं
सूरज मल्टीप्लेक्स - Suraj Multiplex
एड्रेस: बहाउद्दीन साइंस कॉलेज के पीछे, सूरज फनवर्ल्ड के पास, गांधी ग्राम
जयश्री सिनेमा - Jaishree Cinema
एड्रेस: जयश्री रोड, तलाव गेट
प्रदीप सिनेमा - Pradeep Cinema
एड्रेस: प्रदीप पुलिस स्टेशन के पास, सरदार चौक, जूनागढ़ जिमखाना के पीछे
जुनागड
साडे अकराला गीर रिसॉर्ट सोडले आणि जुनागडकडे रवाना झालो.
अंतर जास्त नाही फक्त दीड तासाचा प्रवास (५७किमी). सहलीच्या आधी काही
गोष्टींचा विचार केला होता. गीरहुन निघून थेट गिरनारला जायचे का? दुपार
होणार होती. सगळ्यांना शक्य नसले तरी काहींची गिरनार चढाईची तयारी होती.
दुपारनंतर उन्हाचा त्रास होऊ शकतो या कारणाने आज जुनागड स्थानिक स्थळे
पाहणे व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच गिरनारला जायचे ठरवले होते.
गेले दोन दिवस गीर विहार रिसॉर्टला खूप मजेत गेले होते. त्याच उत्साहात
जुनागडच्या हॉटेलला पोहचलो. पण आम्ही बुक केलेल्या सहा रूम पैकी एकही रूम
तात्काळ मिळणे शक्य नव्हते. रात्री बहुतेक कुण्या बड्या धेंडाकडची वाढदिवस
किंवा अशीच कुठलीतरी पार्टी झाली असावी व सकाळी त्यांनी खूप उशिरा चेक आऊट
केले असावे. सगळ्या रूम अस्वच्छ व अस्ताव्यस्त होत्या त्या स्वच्छ करून
आम्हाला ताब्यात मिळेपर्यंत खूप वेळ गेला.
हॉटेलमधून दिसणारा चौक व महाबत मकबरा
जेवण आटोपून बाहेर पडलो. आज आमच्या भटकंतीत उपरकोट किल्ला व महाबत मकबरा
हि दोन ठिकाणे पाहायचे ठरले होते. चौकशी केली असता ही दोन्ही ठिकाणे
नूतनीकरण चालू असल्याने पर्यटकांसाठी बंद आहेत असे समजले. इतर काय बघता
येईल त्याची चौकशी केली. प्राणी संग्रहालय पाहता येईल असे कळले. तेथेही
संध्याकाळी पाच पर्यंतच प्रवेश मिळतो. घाई करून पोहचलो "सक्करबाग
झूआलॉजिकल पार्क" ला.
सक्करबाग हे गुजरातमधील सर्वात जुने प्राणी संग्रहालय असून ते सन १८६७
मध्ये स्थापन करण्यात आले आहे. येथे आपणास विविध प्राणी/पक्षी पाहावयास
मिळतात .
दुसरे ठिकाण महाबत मकबरा नूतनीकरणासाठी बंद असला तरी जवळून एक फेरी मारण्याचे ठरविले. गेटवर विनंती केली असता फक्त बाहेरूनच पाहण्यासाठी आवारात प्रवेश मिळाला.येथे नबाब महाबत खान दुसरा (१८५१ ते ८२) यांची कबर आहे. हिंदू-इस्लामिक-युरोपिअन स्थापत्यकलेची झलक या मकबऱ्यात दिसते. मकबऱ्याच्या दोन्ही बाजूचे मिनार व त्यांना वेढून वर जाणारे चक्राकार जिने मकबऱ्याची शोभा वाढवतात, महाबत खान यांचे उत्तराधिकारी बहादूर कानजी यांच्या काळात सन १८९२ मध्ये या मकबऱ्याचे काम पूर्ण झाल्याचे कळते,
नूतनीकरणाच्या पूर्वीचा फोटो
आज इतर काही बघायचे नसल्याने महिला वर्ग खरेदीसाठी जुनागढच्या बाजारपेठेकडे वळला. बाकीची मंडळी हॉटेलवर परत गेली.
रात्री जेवण झाल्यावर थोडा वेळ सातव्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूल जवळ
जाऊन बसलो. गार हवा सुरु होती. छान वाटले. थोडा वेळ गप्पा मारून झोपायला
गेलो.
No comments:
Post a Comment