भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य. २०० ६’ उ. ते २४० ४२’ उ. ६८० ४’ पू. ते ७४० २४’ पू. क्षेत्रफळ १,९५,९८४ चौ.किमी. लोकसंख्या २,६६,९७,४७५ (१९७१). याच्या उत्तरेस पाकिस्तान व राजस्थान पूर्वेस राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र दक्षिणेस महाराष्ट्र व अरबी समुद्र आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. भारताच्या ६·१% क्षेत्रफळ आणि ४·८ % लोकसंख्या असलेल्या गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर ही आहे.
भूरचना : गुजरात राज्यात १,१२० मी.पेक्षा उंच प्रदेश कोठेही नाही. तथापि या राज्याचे (अ) उत्तरेकडील व पूर्वेकडील आणि कच्छ-काठेवाडमधील डोंगराळ प्रदेश, (आ) सौराष्ट्राचे म्हणजे काठेवाडचे पठार, (इ) मैदानी प्रदेश व (ई) किनारी सखल प्रदेश व कच्छचे रण असे चार स्वाभाविक विभाग पडतात. (अ) उत्तरेकडे साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत अरवलीचे फाटे आलेले आहेत. त्यांच्या पश्चिम भागातून बनास व पूर्व भागातून साबरमती नद्या वाहतात. पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशाच्या उत्तर व मध्य भागांत विंध्याचे व सातपुड्याचे फाटे आलेले असून उत्तर भागात रतनमाळ व पावागढ (८२९ मी.) डोंगर असून त्यांच्या उत्तरेस मही व पानम नद्या आहेत व दक्षिणेस नर्मदा व तिच्या ओरसंग व कर्जन या उपनद्या आहेत. मध्य भागात छोटा उदेपूर व राजपीपला डोंगर असून त्यात नर्मदा व तापी यांच्या दरम्यानचा डोंगराळ प्रदेश येतो. यात मठसर हे ८०० मी. उंचीचे शिखर आहे. तापीच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा किनाऱ्याला समांतर गेलेल्या आहेत. त्यांत डांग व धरमपूरचे डोंगर अधिक उंच आहेत. सह्याद्रीवरून पूर्णा, अंबिका, औरंगा, पार व दमणगंगा या नद्या पश्चिमेकडे खंबायतच्या आखातास मिळतात. कच्छमध्ये पश्चिमपूर्व गेलेल्या तुटक डोंगरटेकड्यांच्या तीन रांगा आहेत. उत्तरेकडील रांग कच्छच्या रणातील बेटांच्या रूपाने दिसते. त्यातील पछम बेटावरील डोंगर कच्छमध्ये सर्वांत उंच (४६५ मी.) आहे. काठेवाडमधील उत्तरेकडील मंडा डोंगराळ प्रदेश राजकोटच्या पूर्वेस असून त्याचे चोटिल शिखर ३४० मी. उंच आहे. हा भाग पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय या नद्यांदरम्यानच्या एका अरुंद डोंगराळपट्टीने दक्षिणेकडील गीर रांगेशी जोडलेला आहे. गीर हा अनेक टेकड्यांचा समुदाय असून त्यात सारकाला (६४३ मी.) सर्वांत उंच व आग्नेयीकडील नंदीवेला (५२९ मी.) त्याखालोखाल आहे. गिरनारचा पर्वत मैदानात अलग उभा असून त्याचे गोरखनाथ हे १,११७ मी. उंचीचे शिखर गुजरातमध्ये सर्वांत उंच आहे. या सर्व डोंगराळ प्रदेशांच्या पायथ्याचा ७५ मी. ते १५० मी. उंचीचा उताराचा प्रदेश १० ते २५ किमी. रुंदीचा असून त्यावर काही भागात गवत व काही भागात अरण्ये आहेत. (आ) सौराष्ट्र पठार ७५ ते ३०० मी. उंचीचे असून ते लाव्हाचे बनलेले आहे. ते मध्यवर्ती डोंगराळ भागाकडे उंचावत गेले असून त्यावरून उत्तरेकडील मच्छू व अजी, पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय व भगवा या नद्या वाहतात. या पठाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील ६० मी.पर्यंत रुंदीच्या व ६० किमी.पर्यंत व त्यापेक्षाही जास्त लांबीच्या अनेक भित्ती हे होय. (इ) पश्चिमेस किनारी सखल प्रदेश व पूर्वेस डोंगर पायथ्याचा प्रदेश यांदरम्यान गुजरातच्या मुख्य भूमीचे अत्यंत सपाट गाळमैदान आहे. ते सु. ९६ किमी. रुंद व दक्षिणोत्तर ४०० किमी. लांबीचे आहे. याच्या उत्तरभागात वालुकामय आणि खेडा जिल्ह्याच्या काही भागात वातोढ मृदा असून दक्षिणभागात नर्मदातापीच्या खोऱ्यात काळी रेगुड मृदा आहे. या मैदानातून साबरमती, मही, नर्मदा व तापी या प्रमुख नद्या वाहतात. (ई) दक्षिण काठेवाडाखेरीज गुजरातचा किनारा भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणाऱ्या पंकपाटांनी व खारजमिनींनी भरलेला आहे. कच्छच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांवर अशा १०—१२ किमी. रुंदीच्या दलदली आहेत. भरतीचे पाणी ओहोटीच्या वेळी त्यावरील पंकिल प्रवाहमार्गांनी परत जाते. या पंकपाटांच्या दोन्ही बाजूंस वाळूच्या टेकड्या आहेत. कच्छच्या आखाताच्या दोन्ही बाजूंचा किनारी प्रदेश असाच आहे. काठेवाडच्या पश्चिम किनाऱ्यावर पंकपाट आढळत नाहीत परंतु दलदली मात्र आहेत. पोरबंदर व भादर नदीचे मुख यांदरम्यानची दलदल विस्तीर्ण आहे. खंबायतच्या आखाताचा किनारा खाड्यांनी युक्त आहे. येथेही दलदली असून त्यांत मधूनमधून बेटे आहेत. खंबायतच्या आखाताचा सर्व भाग उत्थान पावलेला आहे. एके काळी खंबायतचे आणि कच्छचे आखात निदान वर्षातून काही दिवस पाण्याने जोडले जाऊन काठेवाड हे एक बेट बनत असे. १८१९ च्या भूकंपामुळे मधील भाग उचलला जाऊन काठेवाड गुजरातच्या मुख्य भूमीशी कायमचे जोडले गेले. १९५६ मध्ये कच्छमधील अंजार येथे मोठा भूकंप झाला व २३ मार्च १९७० च्या भूकंपाने दक्षिण गुजरातचे बरेच नुकसान झाले होते. खंबायतपासून बलसाडपर्यंतचा सर्व किनारा मही, नर्मदा, किम व तापी आणि इतर नद्यांच्या खाड्यांनी भरलेला आहे. त्यावरही पंकपाट आढळतात. गुजरातला इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त लांबीचा २,५६० किमी. किनारा लाभलेला असून त्यावर कांडला, बेडी, ओखा, पोरबंदर, वेरावळ, भावनगर, खंबायत, भडोच, सुरत ही प्रमुख बंदरे आहेत. काठेवाडच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दीव हे गोवा, दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशाचे बेट आहे. कच्छचे रण : कच्छच्या उत्तरेस मोठे रण व पूर्वेस छोटे रण या विस्तीर्ण खाऱ्या दलदली सु. २१,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापतात. मोठे रण २५६ किमी. पूर्वपश्चिम व १२८ किमी. दक्षिणोत्तर विस्ताराचे आहे. दोन्ही रणे पावसाळ्यात पाण्याखाली जातात. एरवी ती कोरडी असतात व त्यांतून पायवाटाही जातात. छोट्या रणातील पाणी नल सरोवरामार्गे खंबायतच्या आखातात येते. दोन्ही रणे म्हणजे समुद्रबूड जमिनीचा उचलला गेलेला भाग आहे. बनास, सरस्वती व लुनी या कच्छच्या रणास येऊन मिळतात. सौराष्ट्रातील नल व कच्छमधील नारायण या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांखेरीज काही किरकोळ तळी गुजरातेत आहेत परंतु मोठे तलाव नाहीत.
जीर्ण स्फटिकजन्य खडकापासून बनलेल्या मृदा निकृष्ट आहेत. तथापि बांधकामास उपयोगी असे पोरबंदर दगडासारखे व सिमेंटला उपयुक्त असे चुना खडकासारखे मूल्यवान खनिजप्रकार जमिनीतून मिळतात. सौराष्ट्रातील नद्या पावसाळ्यात वाहून एरवी कोरड्या असतात. बाकी गुजरातच्या मृदा किनाऱ्याला दलदलीचा रेतीमिश्रित गाळ, सपाटीवर जलोढ नदीगाळ, भडोच व सुरत जिल्ह्यांत काही रेगुड माती, कच्छमध्ये आणि उत्तर गुजरातेत रेताड व वातोढ माती, अशा प्रकारच्या आहेत.
राज्यातील सर्वांत महत्त्वाचे खनिज गेल्या दशकात सापडलेले खनिज तेल व वायू होत. अंकलेश्वर, कलोल व खंबायतखेरीज अहमदाबादजवळही त्याचा प्रचंड भूमिगत साठा असण्याची शक्यता दिसली आहे. कच्छ व सौराष्ट्रात सु. १·७५ कोटी टन बॉक्साइट, शेकडो कोटी टन चुनाखडक, चिनी माती व इतर जातींची चिकण माती आहे. छोटा उदेपूर भागात आशियातील अत्यंत मोठा, १ कोटी मे. टनाहून जास्त फ्ल्यूओराइटचा संचय, कच्छमधील लखपतजवळील व भडोच जिल्ह्यात मिळू सु. २४ लाख टन लिग्नाइट, शिवाय क्वॉर्ट्झ, डोलोमाइट, फ्रोट, कॅल्साइट, जिप्सम व मँगॅनीज ही खनिजे गुजरातेत उपलब्ध आहेत.
उत्तर भाग कर्कवृत्तावर असणाऱ्या गुजरातचा प्रदेश बव्हंशी उष्ण कटिबंधातच येतो. कच्छ सौराष्ट्रासारखे तुटक भूभाग, सागरसानिध्य आणि वेगवेगळ्या भागांतील उंचसखलपणा या कारणांनी या राज्यातल्या तपमानात व पर्जन्यात विविध प्रकार आहेत. दक्षिण गुजरातेत ७५ ते १५० सेंमी. पाऊस पडतो आणि किमान व कमाल तपमानात आत्यंतिक फरक नसतो, डांगमध्ये २०० सेंमी. पाऊस पडतो. उत्तर गुजरातेत पाऊस ५० ते १०० सेंमी. असतो व थंडीत तपमान बरेच खाली जाते. उत्तर व पश्चिम सौराष्ट्रात पाऊस ६७ सेंमी.पेक्षा कमी, हवा शुष्क व थंडी कडक, तर दक्षिण व पूर्व सौराष्ट्रात पाऊस थोडा अधिक व हवामानही तुलनेने समशीतोष्ण असते. कच्छच्या वैराण प्रदेशात पाऊस फारच कमी असतो, किमान तपमान १५·६० से. ते २१·१० से. तर बाकीच्या गुजरात राज्यात ते २१·१० से. ते २३·९० से.इतके असते. कमाल तपमान पूर्व सौराष्ट्र, कच्छ व उत्तर गुजरातेत २९·४० से. ते ३२·२० से. आणि कच्छ व सौराष्ट्राच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांना व मध्य गुजरातेत २६·७० से. ते २९·४० से. असे राहते. अहमदाबादचे किमान तपमान १४० से. ते २७० से., कमाल तपमान २९० से. ते ४२० से. व सरासरी ३४·७० से. याप्रमाणे असते. राज्यात वनप्रदेश थोडा आहे. सौराष्ट्रातील गीरच्या जंगलाखेरीज भडोच व सुरत जिल्ह्यांचे पूर्वभाग आणि डांग जिल्हा एवढ्याच भागात जंगले आहेत. उल्लेखनीय प्राणी म्हणजे आशिया खंडात फक्त गीरच्या जंगलात आढळणारे अवशिष्ट सिंह व नल सरोवरावर दरवर्षी उतरणारे हंसक (फ्लॅमिंगो) हे स्थलांतरी पक्षी आहेत.
लोक व समाजजीवन : गुजरातचे बहुसंख्य म्हणजे ८०% च्यावर लोक जरी हिंदू असले, तरी त्यांच्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती बऱ्याच प्रमाणात आहेत. आधीचे गिरिजन निसर्ग, दगडधोंडे, भुतेखेते अशा दैवतांचे जडात्मवादी, तर नंतरचे हरिजन अन्य धर्माचे नाहीत म्हणून हिंदूंत जमा, उरलेल्या हिंदूंत बव्हंशी माध्व, रामानुजी, वल्लभाचारी, स्वामी नारायण अशा पंथांचे वैष्णव व बाकीचे काही स्मार्त, शैव, पाशुपत पंथी, माताजीचे पूजक व सूर्योपासक अशा पंथांचे आहेत. कित्येक समन्वयी सत्पुरुष भक्त, अनिश्चित पंथी असेही आढळतात. गुजरातमधील मुसलमानांत सुन्नी, शिया, इस्माइली, मेमेन, बोहरी असे पंथोपपंथ आहेत. पाचव्या शतकात मगध सोडल्यापासून गुजरात ही सध्या चार लाखांवर लोकवस्ती असलेल्या जैनांची साक्षात धर्मभूमीच झाली आहे. श्वेतांबर पंथाचा उगम व प्रसार याच भूमीत झाला आणि गुजरातच्या इतिहासात, राजकारणात, संस्कृतीत व जीवनात जैनांनी महत्वाचा वाटा उचललेला आहे. हिंदूंची दैवते द्वारकेचा कृष्ण, डाकोरचा रणछोडजी, गिरनारची अंबामाताजी आणि नर्मदातटाकीचा महादेव व जैनांची पूज्य स्थाने शत्रुंजय टेकडीवर व गिरनार पर्वतावर आहेत. पारशी या अल्पसंख्य पण प्रगत जमातीस प्रथम गुजरातमध्येच आश्रय मिळाला व त्यांच्या जरथुश्त्री धर्माचे पालन शेकडो वर्षांपासून त्यांना निर्वेधपणे करता आले आहे. त्यांची भाषा गुजराती असून नवसारी तालुक्यात ते अधिक प्रमाणात केंद्रित झाले आहेत. गुजरातमधील बहुसंख्य मुसलमानही गुजरातीच आपली भाषा मानतात व काही पंथांचे धर्मग्रंथदेखील गुजराती लिपीत आहेत. गुजरातची जनता परधर्म सहिष्णू असली, तरी जातिभेदाच्या बंधनातून मुक्त नाही व अस्पृश्यता निर्मूलनाची प्रगतीही खुद्द महात्माजींच्या गुजरातेत अजून म्हणण्यासारखी दिसत नाही. अनुसूचित जाती व ‘साळीपरज’ जमाती वगळता बाकीचा गुजराती समाज एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतो. व्यापारी वर्ग अन्य कोणत्याही राज्यापेक्षा येथे जास्त असल्याने ‘महाजन’ वर्गाकडे समाजाचे नेतृत्व असते. या वैश्यप्रधान संस्कृतीत अनुत्पादक विद्येला व व्यापारेतर पराक्रमाला महत्त्व नसल्याने, ब्राह्मणक्षत्रियांचे स्थान दुय्यम आहे. ज्ञातीचे नियंत्रण मानण्याची रूढी सामाजिक जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात कायम आहे. तथापि परंपरागत आचारविचारांच्या पद्धतीत व्यावहारिक दृष्ट्या लवचिकपणाही आला आहे व उच्चनीचतेच्या कल्पना जन्मापेक्षा आर्थिक स्थितीवरूनही ठरू शकतात.
व्यापारात अन्यत्र कमाई करून आपल्या गावी चांगली घरे बांधण्याची प्रवृत्ती गुजरातेत असल्याने इतर राज्यातील खेड्यांपेक्षा इकडची खेडी अधिक संपन्न वाटतात. खेड्यातील सामान्य घरे कुडाच्या भिंतींची व गवती छपराची आणि बऱ्यापैकी घरे विटांनी बांधलेली व कौलारू असतात. लहानमोठ्या शहरांमधून मात्र सिमेंट काँक्रीटचा वापर सर्रास आढळतो. अनेक गावांचे जुन्या तटबंदीचे भाग अजून शिल्लक आहेत. गुजराती लोक अधिकांश शाकाहारी असून खेड्यात बाजरी वा ज्वारीची भाकरी, डाळी, तेल व भाज्या त्यांच्या भोजनात असतात. नागरी वस्तीत गहू, तांदूळ, दूधदुभते व साखर यांचा समावेश रोजच्या आहारात नित्य असतो. खेड्यातून पुरुषाचा वेश धोतर, कोपरी, सदरा आणि प्रसंगी अंगरखा, साफा किंवा पागोटे व बायकांचा चोळी, घागरा, उजव्या खांद्यावर पदराची साडी किंवा ओढणी असा असतो. तसेच पायात मोठाले पोकळ वाळे, हस्तिदंती बांगड्या, गळ्यात वजनदार अलंकार आणि दंडांवर व नाकाकानांत ठळक दागिने घालण्याची आवड ग्रामीण स्त्रियांत आढळते. शहरी वस्तीत पुरुष धोतर, शर्ट, डगला व टोपी घालतात आणि स्त्रिया उजव्या खांद्यावर पदर असलेली सहावारी साडी नेसतात. उत्तर गुजरातेत व कच्छ-सौराष्ट्रात लोकांच्या पेहरावावर राजस्थानची छाप दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांची राहणी मध्य व दक्षिण गुजरातपेक्षा वेगळी असते. उत्तर गुजरात व कच्छ-सौराष्ट्राचे लोक जास्त काटक, कष्टाळू व कडवे , तर मध्य व दक्षिण गुजरातचे सौम्य, हौशी व सुखवादी वाटतात.
गुजराती भाषा नवव्या ते दहाव्या शतकांत शौरसेनीपासून विकसित झाली, असे अभ्यासकांचे मत आहे. संस्कृत-प्राकृतशी संबंध असल्यामुळे तत्सम व तद्भव शब्दांचा भरणा तिच्यात आहे. त्याशिवाय फार पूर्वीपासून व्यापाराच्या निमित्ताने इराण-अरबस्तानशी संबंध आल्यामुळे त्या देशांच्या भाषांतले, पोर्तुगीजांशी संपर्क आल्यामुळे त्यांचे आणि मराठी-कन्नडच्या शेजारामुळे त्या भाषांचे, असे अनेकविध शब्द गुजरातीत आले आहेत. देवनागरीतील काही अक्षरांचा आकार बदलून व शिरोरेखा वगळून गुजराती लिपी बनली आहे. जुने कवी या भाषेला प्राकृत किंवा अपभ्रंश म्हणत. महाकवी प्रेमानंदाने हिला प्रथम गुजराती हे नाव दिले. तिचा विकास दहाव्या शतकापासून होऊ लागला. तेव्हापासून गुजराती साहित्याची निर्मिती होऊ लागली. प्राचीन गुजराती साहित्य ‘गौर्जरी अपभ्रंश’ भाषेतील आहे. दहाव्या शतकात रासो हा व्रज-मारवाडी भाषांतील राजस्तुतिपर काव्यप्रकार सुरू झाला. त्याचा उपयोग जैन कवींनी धर्मप्रचारासाठी केला. अकराव्या ते चौदाव्या शतकापर्यंत धार्मिक व नैतिक स्वरूपाच्या तरंगलोलासारख्या रचना निर्माण झाल्या. भरतेश्वर बाहुबलिरास हा जैनरास सर्वांत प्राचीन आहे. त्याशिवाय सिरिस्थूलिभद्रफागूसारखी फागुकाव्ये किंवा ऋतूपरत्वे गाणी व बारमासी हा ऋतुगीतांचाच एक प्रकार जैन कवींनी व नंतर उत्तरकालीन कवींनीही हाताळला. त्या उत्तर कालातल्या ऐतिहासिक किंवा चरित्रात्मक आख्यानकाव्यांना प्रबंध म्हणत. इ. स. १४५६ मधील झालोरच्या पद्मनाभाचा कान्हडदे प्रबंध विख्यात आहे. दुसरा कालखंड गुर्जर भाषेच्या भक्तियुगाचा. त्यात नरसी मेहता, मीरा, आखो, भगत, प्रेमानंद, पुरोगामी विचारसरणीचा शामळ, दयाराम, भालण, भीम अशा अनेकांनी काव्ये रचली. त्यात नरसी-प्रेमानंद-दयाराम या त्रिमूर्तींनी गुजरात काव्यात श्रेष्ठ स्थान मिळविले. अर्वाचीन कालखंड १८५० मध्ये सुरू झाला. त्यांत नवप्रेरणेचा उद्गाता नर्मद, वेन चरित्रकार दलपतराम, विद्वान साहित्यिक नरसिंहराव दिवेटिया, प्रेमकवी कलापी, कान्त, सरस्वतीचंद्र ह्या युगप्रवर्तक कादंबरीचे लेखक गोवर्धनराम त्रिपाठी, भावकवी नानालाल, कांदबरीकार कन्हैयालाल मुनशी यांची नावे उल्लेखनीय आहेत. महात्मा गांधींच्या लेखनाने तर गुजराती भाषेत नवे गांधीयुग अवतरले. मोटेचा नाडा धरणाऱ्या माणसालाही समजेल, अशी सुबोध गुजराती भाषा लिहिण्यास कृतसंकल्प होऊन त्यांनी ती समाज प्रबोधनासाठी राबवली. त्यांचे समकालीन व अनुयायी काका कालेलकर, किशोरलाल मशरूवाला, महादेवभाई देसाई, रामनारायण पाठक व धूमकेतू अशांच्या लेखनाने दुसऱ्या महायुद्धकालापर्यंत गुजराती भाषा संपन्न झाली. १९४० नंतरच्या काळात कादंबरीकार रमणलाल देसाई, चुनीलाल मडिया, आचार्य गुणवंतराय, पन्नालाल पटेल कथालेखक गुलाबदास ब्रोकर, ईश्वर पेटलीकर नाटककार चंद्रवदन मेहता विनोदलेखक ज्योतिंद्र दवे टीकाकार विजयराय वैद्य, विष्णुप्रसाद त्रिवेदी सौराष्ट्राचे सव्यसाची साहित्यकार झवेरचंद मेघाणी त्याचप्रमाणे उमाशंकर जोशी, राजेंद्र शाह, निरंजन भगत अशा वाङ्मयसेवकांनी गुजराती भाषेच्या साहित्यात मोलाची भर घातली आहे.
कला व क्रीडा : गुजरातमधील हस्तकलांत मातीची भांडी, सुरती जरीकाम, कच्छी जडावकाम, पाटण येथील गोमेद (अकीक) अलंकार, अखेडा लाखकाम, पालनपूरचा सुंगधी माल आणि अहमदाबाद व इतर ठिकाणचे कोरीव लाकूडकाम उल्लेखनीय आहेत. गुजरातच्या चित्रकलेचे वैशिष्ट्य बाराव्या ते पंधराव्या शतकांतील जैन ग्रंथांत व नंतर पंधराव्या शतकातील हिंदू पोथ्यांत मिळालेल्या चित्रांतून आढळते. राजपूत शैली आधीची ही ‘दक्षिणी राजस्थान’ शैली खास गुजरातची मानण्यात येते. ‘शिलावत’ शैलीतील कच्छ व सौराष्ट्रातील भित्तिचित्रेही गुजरातच्या प्रादेशिक चित्रकलेची स्वतंत्र शैली दाखवितात. आधुनिक काळात गुजराती चित्रकलेचे पुनरुज्जीवन होऊन लाठीनरेश मंगलसिंगजी, ब्रिजलाल भगत, खोडीदार परमार, आचार्य रविशंकर रावळ, श्यावक्ष चावडा, कनू देसाई आदी चित्रकार ख्याती पावले आहेत. गुजरातच्या रंगभूमीची परंपरा अंबाजी-बहुचराजी या देवींच्या उत्सवातून होणाऱ्या ‘भवाई’ नामक प्रहसनात्मक नाट्यप्रकाराइतकी जुनी आहे. आधुनिक रंगभूमीची सुरुवात गुजरातेत १८५०च्या सुमारास झाली. त्या कामात पारशी मंडळींनी पुढाकार घेतला. हौशी नाट्यप्रयोगापासून सुरुवात होऊन, नंतर हळूहळू धंदेवाईक नाटक मंडळ्या नाटके करू लागल्या. प्रथम रूपांतरित नाटके होत पण लौकरच स्वतंत्र कृती होऊ लागल्या. १८६८ पासून नर्मद, मणिलाल त्रिभुवनदास, प्रभुलाल द्विवेदी, कन्हैयालाल मुनशी, चंद्रवदन मेहता यांच्या नाटकांनी गुजराती रंगभूमी गाजविली. गुजरातच्या परंपरागत सामूहिक क्रीडा, रास व गरबा ही नृत्ये आणि मार्गी व देसी हे लोकसंगीताचे प्रकार आहेत. खेळ व करमणूक भक्तीवर आधारल्यामुळे लोकनृत्ये व समूहगायने यांत स्त्री-पुरुषांच्या संमिश्र समाजाला निःसंकोचपणे भाग घेता येतो. व्यापारी साहस, सुखोपभोग, दानशूरता, कला, पुरस्कार, व्यवहारचातुर्य व श्रद्धाळूपणा ही गुजरातची विशेष लक्षणे मानता येतील.

सांस्कृतिक भारत : गुजरात
गुजरातमध्ये द्वारका, सोमनाथ, पालिटना, पावागड, अंबाजी, भद्रेश्वर, श्यामलजी, तरंग, गिरनार ही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. पोरबंदर हे महात्मा गांधींचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक महत्त्व आहे. पाटणपुरा, सिद्धपूर, घुमली, दाभोई, वाडनगर, मोधेरा, लोथल व अहमदाबाद ही शहरेही ऐतिहासिक. अहमदपूर-मांडवी, चोरवाड व तिथल हे गुजरातची सुंदर समुद्रकिनारे. सतपुरा, सिंहाचे अभयारण्य, गिरचे अभयारण्य जंगल व रानटी गाढवांचे अभयारण्य (कच्छ) आदी पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे आहेत.
हेमचंद्र आचार्य, नरसी मेहता, मिराबाई, प्रेमानंद भट्ट, श्यामल भट्ट, दयाराम, दलपतराम, गोवर्धनराम त्रिपाठी, महात्मा गांधी, के.एम.मुन्शी, उमाशंकर जोशी, सुरेश जोशी, पन्नालाल पटेल, राजेंद्र शहा हे गुजरातीतील महत्त्वाचे लेखक आहेत. कवी कांत, झवेरचंद मेघानी, कल्पी आदी गुजराती कवी आहेत.
"अतिथी देवो भव " असे केवळ पाटीवर लिहून चालत नाही ,अतिथीचे भरघोस स्वागत होते.
जेवायच्या अगोदर हात धुण्यासाठी ही सोय
जेवायच्या अगोदर स्वागत पेय. गुलाबाच्या पाकळ्या घालुन केलेले पेरुचे गुलाबी सरबत येते. आणि पापडनो चुरो. मसाला साथे आणि त्यानन्तर येते ती सुप्रसिद्ध गुजराती थाळी.
या थाळीतले पदार्थ
फुलका ( पोळी ) त्यावर मेथीना थेपला आणि वर छोटिशी दिसणारी बाकरी ( भाकरी नव्हे.. बाकरी ही गव्हाच्या पिठाची असते आपण करतो त्या ज्वारीच्याभाकरीला इथे "जार नो रोटलो " असे म्हणतात )
फुलका रोटलीच्या खाली दिसते "सोले कचोरी" ( मुगाची कचोरी) आणि तांदळाचे ढोकळा
आता त्या पासून क्लॉकवाईज.
"मगना दाळनो शिरो" अस्सल तुपातला चारोली वगैरे असलेलास्पेश्यल गुजराती शिरा
"बासुंदी " व्हॅनीला इसेन्स + बदाम + भरपूर सुके अंजीर
"दाळ" दालचिनी + लवंग असलेली तुरीची आमटी
"पनीर नु रसाळु शाक"
"लीला वटाणानु शाक" ( हिरव्या वाटाण्याची भाजी)
"बतेटानु रस्साळु शाक"
" लीला तुवेरनु कठोळ" ( हिरव्या तुरीची उसळ ) ( कठोळ = कडधान्य)
ताटाबाहेर
छास
सेलेड मा काकडी बीट गाजर ,आंबे हळद ,टमेटा
आणि
चित्रात न दिसणारी मस्त वरुन लोणकढी तुमाची धार असलेली "मग ना दाळनी खिचडी अने कढी"
एवढे झाल्यावर पुन्हा हात धुण्याचा कार्यक्रम
शेवटी मुखवास म्हणून वरीयाळी अने पान ( बडीशेप आणि पान )
या इथे थाळीचे तीन प्रकार आहेत. त्याना वेगवेगळी नावे आहेत.
"नगरशेठ थाळी" असल चांदीच्या ताटात ३१ वेगवेगळे खाद्यपदार्थ
"शेठ थाळी " २२ खाद्य पदार्थ
" वेपारी थाळी " १५ खाद्यपदार्थ
खरी गुजराती थाली खाण्यासाठी , तीही खेडयाच्या वातावरणात, खाली बसुन व कन्दीलाच्या उजेडात पत्रावळईवर खावयाचि असेल, तर अमदावादच्या विशालाला भेट द्या. सोबत जुन्या पाकग्रुहात वापरल्या जाणार्या वस्तुन्चे सन्ग्रहालयही पहावयास मिळेल.
लिलु घास म्हणजे हिरवे गवत.
लीली बंगडी = हिरवी बांगडी.
लीलो चेवडो = हा बटाटाच्या चिवडा असतो तसा कच्च्या पपई पासून केलेला चिवडा असतो.
गुजरात मध्ये जैन लोकांच्या मुले कित्येक पदार्थात बटाटाऐवजी कच्ची केळी , कच्ची पपई यांचा वापर करतात.
जैन पावभाजीत बटाट्याऐवजी कच्ची केळी वापरतात
गुजरात राज्याला पश्चिमेकडील दागिना असे म्हणले जाते.गुजरातमध्ये मंदिर,अभयारण्य ,संग्रहालय आणि इतर अनेक वैशिष्ट्यपुर्ण ठिकाणे आहेत जी पर्यटकांना आवडतील.यामध्ये ह्रुद्यकुंज ( महात्मा गांधी निवासस्थान ) लोथल येथील सिंधु संस्कृतीचे अवशेष, महात्मा गांधींचे जन्मस्थान कीर्ति मंदीर,बडनगरचे हटकेश्वर मंदिर,धौलावारीया इत्यादी ठिकाणे अगदी हटके आहेत.द्वारका,पावागड,पालिताना पर्वत्,शामलाना,गिरनार पर्वतावरील मंदीर हे धार्मिक पर्यटनासाठी आहे.वास्तुकला आणि पुरातत्व वास्तुंमध्ये रुची असणार्यांसाठी अहमदाबाद्,डभोई,पाटण्,मोढेरा हो ठिकाणे पाहु शकतात.सातपुडा पर्वतराजीतील भ्रमंतीबरोबरच कोरवार्ड्,तिथल्,मांडवीचे समुद्रकिनारेही साद घालायला आहेतच.निसर्गप्रेमींसाठी गिरचे भारतीय सिंहासाठी प्रसिध्द असलेले राखीव वन आहेच.इतिहास हरवून जाणार्यांसाठी उपरकोट किल्ला,नजरबाग महाल, ड्भोई किल्ला तसेच गांधी स्मारक संग्रहालय्,बडोदा वस्तुसंग्रहालय आणि आर्ट गॅलरी पाहण्यासारखे आहे.
गुजरातमध्ये हिंदू और इस्लाम धर्माशी संबधीत बरीच धार्मिक स्थान आहेत.
द्वारकानाथ मंदिर
सोमनाथ मंदिर
तख्तेश्वर मंदिर
अक्षरधाम मंदिर
पालिताना मंदिर
कालिका मंदिर
जामा मस्जिद
राज बाबरी मस्जिद
रानी रुपमति मस्जिद
नारायण मंदिर
सिदी सैयद मस्जिद
गुजरात मधील राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य
गिर फाॅरेस्ट नेशनल पार्क
ब्लेककब नेशनल पार्क
मरीन नेशनल पार्क
वंसदा नेशनल पार्क
कच्छ डेजर्ट वन्यजीव अभयारण्य
जंगली गधा अभयारण्य
नील सरोवर पक्षी अभयारण्य
कच्छ बस्टर्ड सेंचुरी
शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य
अहमदाबाद :-

अहमदाबादमधील रस्ते अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहेत. पण रस्त्याची रुंदी जास्त असल्याने कुठे सिग्नल नाही. २०१७ साली हे शहर युनेस्कोने वारसास्थळ म्हणून घोषीत केले.११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली. जुने अहमदाबाद साबरमतीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नवीन अहमदाबाद वसलेले आहे.जुन्या शहरात वळणावळणाच्या गल्ल्या आणि लाकडी कोरीवकाम असलेली घरे आहेत.
अहमदाबादमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ :-
१) साबरमति आश्रम/महात्मा गांधी का घर
२) केलिको टेक्सटाइल संग्रहालय
३) भद्र किल्ला
४) जामा मशीद
५) सरखेज रोजा
६) शाह ए आलम रोजा
७) राणि नो हाजिरो
८) वस्त्रपुर तलाव
९) कांकरीया तलाव
१०) का़करीया प्राणी संग्रहालय
११) इस्कॉन मंदिर
१२) हाथी सिंह जैन मंदिर
१३) सिद्दी सैय्यद मशिद
१४) विंटेज कार म्युझीयम
१५) गुजरात सायन्स सिटी
१६) हलते मनोरे
तीन माकडे ....
गांधीजींचा जीवनप्रवास उलगडणारे संग्रहालय...
गांधीजीनी जगाला दिलेला हाच तो संदेश..
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन धृवतारे...
दोन राष्ट्रांचे पितामह...
अहिंसेची हिंसा...अखेरचा हा तुला दंडवत...
सुती धाग्यापासून बनविलेला हो फोटो...
तपस्वी, ध्यानमग्न, तेजस्वी महात्मा...
तेजाचे वलय प्राप्त झालेली वास्तू...गांधीजींचे निवासस्थान...
महात्म्याची सेवा करण्याचे भाग्य लाभलेल्या वस्तू...
एक स्वर्गीय अनुभूती...
सुमारे १०.३० च्या सुमारास साबरमती आश्रमात प्रवेश केला. तेथील गांधीजींच्या व्यक्तिचरित्रावर एक कटाक्ष टाकला. बाजूने जाणाऱ्या साबरमती नदीचं पात्र पाहिलं सोबतच खादी विक्री केंद्र, वाचनालय, विनोबा भावेंची राहण्याची जागा ह्या सगळ्याना भेट देऊन सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास साबरमती आश्रमातून बाहेर पडलो.
आवर्जून पहा:-मगन निवास्,उपासना मंदिर, उद्योग मंदिर्,हृद्य कुंज आणि नंदीनी
वेळः सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३०
प्रवेश : मोफत
भद्र किल्ला (Bhadra Fort) :-
भद्र किल्ल्यावर घड्याळ असलेला जो मनोरा आहे आणि यात जे घड्याळ आहे ते British East India Company ने खास लंडनवरून आणून 1878 मध्ये बसवले.
किल्ल्यातील सुंदर लाकडी कलाकृतीचे छायाचित्र

या किल्ल्याला बहुमजली तटबंदी आहे.या किल्ल्यात भद्रकाली मंदीर आहे.याच मंदीरावरुन किल्ल्याला हे नाव पडले.या संदर्भात एक कथा सांगितली जाते.इथे राज्य करणार्या सुलतानावर कृपा करण्यासाठी इथे लक्ष्मी माता प्रगटली आणि तीने आशिर्वाद दिला कि हे शहर संपत्तीने भरलेले आणि समृध्द राहील.
या किल्ल्यात सध्या राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतात आणि परिसरात बाग व हिरवळीचे पट्टे बघायला मिळतात.
पत्ता:- कोर्ट रोड ,अहमदाबाद
विशेष आकर्षण :- तीन दरवाजे क्लॉक टॉवर्,आझमखान सराई
वेळ- सकाळी ९ ते संध्याकाळी ५
प्रवेश फी- मोफत
कांकरिया लेक : -
हा लेक वर्तुळाकार असून १४५१ च्या दरम्यान बांधल्याचा अंदाज आहे. हा तलाव सुलतान मुहमद शहा आणि अहमद शहा ( दुसरा ) याने निर्माण केला.हा तलाव गुजरातमधील सगळ्यात मोठा तलाव आहे.याचा परिघ जवळपास २.२५ कि.मी. आहे. बहुतेक शासक याचा अंघोळीसाठी वापर करीत असल्यामुळे या तलावामध्ये पाणी शुध्दीकरणाची व्यवस्था आहे. या तलावाच्या मधोमध द्वीप महाल आहे ज्यामुळे या तलावाचे सौंदर्य अजून खुलले आहे.शिवाय या तलावाजवळ बाग आणि प्राणी संग्रहालय आहे.याशिवाय तलावात बोटींगची सोय देखील आहे. हा लेक बघताना हैद्राबादच्या हुसेन सागर तलावाची आठवण होत होती.अहमदाबाद फिरायला आला असाल तर एक दिवसाची पिकनिक करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
पत्ता:- कांकरीया,अहमदाबाद
विशेष आकर्षण - लहान मुलांसाठी बाग्,संगीताच्या तालावरचे कारंजे,जॉगर्स पार्क, बलुन राईड, आर्चरी,मिरर मेझ,
वेळ- सकाळी ९ ते रात्री १०, जॉगिंग करणार्यांसाठी पहाटे ४
प्रवेश फि- प्रौढांसाठी २५/- आणि मुलांसाठी १०/-
जॉगिंग करणार्यांना मोफत प्रवेश

विशेष आकर्षण - लहान मुलांसाठी बाग्,संगीताच्या तालावरचे कारंजे,जॉगर्स पार्क, बलुन राईड, आर्चरी,मिरर मेझ,
वेळ- सकाळी ९ ते रात्री १०, जॉगिंग करणार्यांसाठी पहाटे ४
प्रवेश फि- प्रौढांसाठी २५/- आणि मुलांसाठी १०/-
जॉगिंग करणार्यांना मोफत प्रवेश
कांकरीया प्राणी संग्रहालय :-
कमला नेहरु झुलॉजिकल गार्डन किंवा कांकरीया झु हे पर्यटकांनी आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे.याची उभारणी १९५१ मध्ये झाली.हे प्राणीसंग्रहालय कांकरीया नदीच्या तीरावर उभारले गेले आहे.इथे मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि झाडे बघायला मिळतात.वन्यजिव अभ्यासकांना हे प्राणी संग्रहालय म्हणजे पर्वणी आहे.इथे मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी आणि सरिसृप आह्ते.शिवाय २०१७ मध्ये इथे एक विशेष पार्क उभारण्यात ज्यात तरस्,बिबट्या असे निशाचर प्राणी ठेवले आहेत.इथे रात्रीसारखा काळोख केलेला असल्यामुळे हे प्राणी वावरताना आणि त्यांचा आवाज स्पिकरमधून आपल्याला एकायला मिळतो.
याशिवाय याच परिसरात टॉय ट्रेन, वॉटर पार्क्,निरनिराळ्या राईडस आणि खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल आहेत.उत्तम गुजराती खाणे खायचे असेल तर नगीना वाडी या बगीच्याची थीम असलेल्या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेउ शकता.
पता:- कांकरीया,अहमदाबाद
विशेष आकर्षण -रसाला नेचर पार्क आणि फुलपाखरु उद्यान
वेळ - मार्च ते ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६.२५
नोव्हेंबर ते फेब्रुवारी - सकाळी ९ ते संध्याकाळी ५
प्रवेश फी- प्रौढ- रु २०/-
तीन वर्षापर्यंत - मोफत
शैक्षणिक सहल - ५/-
३ ते १२ वयोगटापर्यंत १०/-




हाथीसिंग जैन मंदिर :-
हाथीसिंग या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली होती. पण हे मंदिर पूर्ण होण्याआधी वयाच्या ४९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या पत्नीच्या देखरेखीखाली मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यामुळे हे मंदिर हाथीसिंग याच नावाने प्रसिद्ध झाले.
अतिशय शांत व प्रेक्षणीय स्थळ. स्थापत्यकलेचा एक अदभुत अविष्कार. अतिशय देखणे कोरीव काम.
जामा मशिद :-

पत्ता : मनेका चौक, अहमदाबाद
वेळ : सकाळी ६ ते रात्री ८ ( नमाजाच्या वेळी मशीद पर्यटकांसाठी बंद असते)
प्रवेश : मोफत
सिद्दी सय्यद मस्जिद:
१५७३ साली बांधलेली हि मस्जिद अहमदाबाद शहराच्या मधोमध आहे.पिवळ्या वालुकाश्म दगडावर अतिशय नाजूक कोरलेल्या अर्धवर्तुळाकार जाळीदार नक्षीसाठी प्रसिद्ध.अहमादबादमधील हि मशीद म्हणजे फोटोग्राफरसाठी पर्वणी आहे.इथले नक्षीकाम बघून पर्यटक थक्क होतात.मशिदीच्या खिडक्यांना असलेल्या जाळीचा इंडीयन इन्स्टीट्युट अहमादबादने लोगो म्हणून उपयोग केला आहे.
पत्ता : घीकांता , अहमादबाद
विशेष आकर्षण : झाडाची नक्षी असलेली खिडक्यांची जाळी
वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६
प्रवेश फि : मोफत

जाळीदार खिडकीचे समोरील बाजूने टिपलेले सोंदर्य....
जाळीदार खिडकीचे बाहेरील बाजुने टिपलेले सोंदर्य...
चारही खडक्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव काम आहे.
ह्या मस्जिदीवरील भिंतीत एका जाळीवर काढलेलं एका झाडाचं शिल्प प्रसिद्ध आहे. ते पाहिल्यावर आपल्याला सुद्धा त्या कारीगिरीचं नवल वाटतं.
अनेक घुमट आणि मिनार एकत्र असलेली वास्तु म्हणजे सरखेज रोजा.अहमदाबाद शहरातील इतर इस्लामिक वास्तुप्रमाणेच इथेही नाजुक कोरीवकाम बघायला मिळते. हि वास्तु सरखेज तलाव या मानवनिर्मित तलावाच्या काठावर उभारलेली आहे. अर्थात या वास्तुचे खांब, कमानी या इस्लामिक शैलीच्या असल्या तरी नाजुक कोरीवकामावर हिंदु शैलीचा स्पष्ट प्रभाव जाणवतो.

विशेष आकर्षण : शेख अहमद खाट्टू गंजी बक्षीचा दर्गा आणि बारादरी
वेळः सकाळी ९ ते संध्याकाळी ६
प्रवेश : मोफत
अहमदाबाद शहरामध्ये अनेक उत्तम कोरीवकाम आणि बांधणीच्या वास्तु आहेत.पर्यटकांनी आवर्जून पहावी अशीच एक वास्तु म्हणजे शाह आलम रोजा.यालाच रसुलाबाद दर्गा किंवा आलम नो रोजा असेही म्हणतात.इथे सुफी पंथ मानणारे भाविक लांबुन येउन भेट देतात. या मशीदीच्या घुमटावर मौल्यवान रत्न आणि सोन्यानी मढवले आहे.याच मशीदीच्या आवारात चोवीस घुमटांच्या दर्ग्यात शाह आलमच्या कुटूंबाची थडगी आहेत.मशीदीच्या जमीनीवर काळ्या आणि पांढर्या संगमरवराने नक्षीकाम केले आहे तसेच दरवाज्याच्या चौकटी आणि खांबात मोठ्या प्रमाणात संगमरवर वापरला आहे.

विशेष आकर्षण : संगमरवरात केलेले बांधकाम
वेळ- सकाळ ते संध्याकाळ
प्रवेश फि-मोफत
रानी नो हाजिरो :
रानी नो हाजिरो या गुजराती शब्दाचा अर्थ म्हणजे राणीचे थडगे.या ठिकाणी अहमदशहाच्या राण्यांची थडगी आहेत.हे ठिकाण मुख्य शहरापासून दुर आणि शांत जागी आहे. इथे असलेली थडगी इतर ठिकाणी जशी बंदिस्त जागी असतात तशी न बांधता, खुल्या जागेत बांधली आहेत.थडग्यावर हिंदु,जैन आणि मुस्लिम शैलीच्या नक्षीकामाचा प्रभाव जाणवतो.

पत्ता : मानेक चौक ,अहमदाबाद
विशेष आकर्षण : या मशिदीकडे जाणार्या रस्त्यावर विविध वस्तुंची विक्री करणारी दुकाने आहेत.
वेळः सकाळी ६ ते संध्याकाळी ६
प्रवेश : मोफत
मनोरंजनाबरोबरच ज्ञानात भर घालणारी जागा म्हणजेच गुजरात सायन्स सिटी. लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी गुजरात शासनाने या सायन्स सिटीची उभारणी केली.आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून प्रत्यक्ष प्रयोग करुन त्यातून शिकण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. लहान मुल आणि विद्यार्थी यांना अहमदाबाद शहरात आवर्जून भेट द्यावी अशी हि जागा.आकाराने प्रचंड पण अजूनही विकसनशील अवस्थेत असलेली जागा. इथे मंगळयान, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक यांचा अनुभव घेण्यासाठी राईडस आहेत पण त्यासाठी किमान १५ जणांचा कंपू लागतो.
विशेष आकर्षण : 3D IMAX थिएटर, एनर्जी पार्क, म्युझिकल फाउंट्न, हॉल ऑफ स्पेस, ईलेक्ट्रोडोम, औडा गार्डन
वेळः सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३०
प्रवेश फि : प्रौढांना २०/- रुपये आणि मुलांना ५/- तसेच शालेय सहलींना ५/-

या ठिकाणी मानवाच्या उत्क्रांतीपासून ते औद्योगिक विकासापर्यंत सर्व टप्प्यांचे अगदी सविस्तर विवेचन केले आहे.
वस्त्रपुर तलाव :
अहमादबादमध्ये एखादी संध्याकाळ घालविण्यासाठी उत्तम जागा म्हणजे हा वस्त्रपुर तलाव. शहरातील शांत, निवांत परिसरात हा मानवनिर्मित तलाव आहे.सभोवताली बाग आहे. या ठिकाणी असलेल्या खुल्या रंगमंचावर अनेक सांस्कृतिक वर्षभर कार्यक्रम केले जातात. गुजरातची परंपरा समजून घेण्यासाठी हे कार्यक्रम उत्तम माध्यम आहे.

पत्ता : वस्त्रपुर ,अहमदाबाद
विशेष आकर्षण : हिरवाइने नटलेला किनारा आणि जॉगर्स पार्क
वेळ : सकाळी ८ ते रात्री १०
प्रवेश : मोफत


दादा हरी नी वाव :-

शक्यतो अहमदाबादला हिवाळ्यात भेट दिली तर उत्तम.नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी सुखद असतो.
अहमदाबादच्या रस्त्यावर खाकरा, ढोकळा, दाल वडा, खांडवी, खमण्,फाफडा,जलेबी, सामोसा, भजिया,पाणीपुरी, पराठे,पावभाजी, कुल्फी आणि बन मस्का
इंड्रोडा नेचर पार्क :-



वेळ : २४ तास

फन वर्ल्ड गांधीनगर – Fun World Gandhinagar
ज्यांना गांधीनगरच्या भटकंतीत मौज,मस्ती,धमाल करायची आहे त्यांनी नक्कीच भेट द्यावी अशी जागा म्हणजे फनवर्ल्ड.नावाप्रमाणेच एक दिवसाची सुट्टी घालवायला इथे भरपुर पर्याय आहेत.फन वर्ल्डमध्ये मास्टर स्लाईड,स्काय ट्रेन, रोलर कोस्टर,साया ट्रॉपर अश्या राईड आहेतच शिवाय बोटींगच्या सोयीबरोबर वॉटर राईडसुध्दा आहेत.यात मुलांसाठी घसरगुंडी, लेझी रिव्हर तसेच प्रौढांसाठी देखील काही वॉटर राईड आहेत.याच बरोबर भुक लागली तर जेवणाचा आनंद घेण्यासाठी फन वर्ल्डमध्ये रेस्टॉरंट देखील आहे.
वेळः सकाळी ९ ते रात्री १०
प्रवेश फी: मुलांसाठी १५/- तर प्रौढांसाठी रु ३०/- राईडसाठी रु ४००/- तसेच कॉम्बो रु ६००/- ( यात राईड्,जेवण सर्व समाविष्ट असते )
पुनीत वन गाँधी नगर – Puneet Van Gandhinagar

ज्यांना बागेमध्ये व झाडांमध्ये रुची आहे त्यांनी या उद्यानाला नक्कीच भेट दिली पाहिजे.
पत्ता : रोड नंबर ४८,सेक्टर १८ ,गांधीनगर
वेळः आठवड्यातील सर्व दिवस खुले असते.
शिल्पकाराचे गाव ( Craftsmen’s Village ):-
गांधीनगर या मुख्य शहराबरोबरच सात कि.मी.दुर पीतापुर नावाचे गाव आहे,या गावाची ओळख 'शिल्पकाराचे गाव' अशी आहे.याच गावात साड्यांवर नक्षीकाम केले जाते.या मुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि दुकानदार खरेदीसाठी येतात.साड्यांवर लाकडी प्रिटींग ब्लॉकचा उपयोग करुन नक्षी उमटवली जाते.
गांधीनगरला भेट देणार असाल तर थोडा वेळ काढून या गावाला नक्कीच भेट द्या.नजरेसमोरच सांड्यावर उमटणारे डिझाईन पाहून इथे खरेदीचा मोह न झाला तरच नवल.
विट्ठलभाई पटेल भवन गाँधी नगर – Vithalbhai Patel Bhawan, Gandhinagar

बॉटनिकल गार्डन गांधीनगर – Botanical Garden

पत्ता : इंद्रोडा नेचर पार्क्,गांधीनगर
वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ५(सोमवारी बंद)
प्रवेश फि : वय वर्ष ५ ते १२ मुलांसाठी रु ५/-, प्रौढांसाठी रु ३०/- विद्यार्थ्यांसाठी रु ८/-
संत सरोवर बांध गांधीनगर – Sant Sarovar Dam

पत्ता : गांधीनगर बस स्टँडपासून ५ कि.मी.
वेळ : पुर्ण दिवस आणि संध्याकाळी
महुदी जैन मंदिर गांधीनगर – Mahudi Jain Temple,

मंदिराच्या बाजुला तीस फुट उंचावर एक घंटा आहे.हि घंटा वाजवली तर मनातील इच्छा पुर्ण होतात असे मानले जाते.त्यामुळे हि घंटा वाजवण्यासाठीही मोठी गर्दी असते.
दांडी कुटीर (नमक पर्वत) संग्रहालय गांधीनगर – Dandi Kutir (Salt Mount) Museum

पत्ता : सॉल्ट माउंट्,सेक्टर १३ सी,गांधीनगर
वेळः सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३०
प्रवेश फि : भारतीय पर्यटकांसाठी रु १०/-, परदेशी पर्यटकांसाठी रु २००/-
https://www.thrillophilia.com/destinations/gandhinagar/places-to-visit
अदालज नि वाव (ADALAJ STEPWELL) :-
वाव म्हणजे पायऱ्यांची विहीर. हि विहीर १४००व्या शतकाच्या अखेरीस राजपूत राणी रुदाबाई यांच्या स्मरणार्थ बांधली होती. प्रवासी तसेच गावकर्यांना विश्रांतीचे एक ठिकाण म्हणून सुरुवातीस याचा वापर होत असे. अशा प्रकारच्या अनेक विहिरी गुजरातच्या विविध भागात आहेत. नंतर याचा उपयोग प्रामुख्याने पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी होऊ लागला.
हि विहीर अक्षरधाम मंदिरापासून साधारणता १८ किमी.च्या अंतरावर अहमदाबाद-गांधीनगर महामार्गावर आहे. जवळपास ७५ मी. लांब असलेली हि विहीर १६ खांबावर जवळपास ६०० वर्षानंतर भक्कम स्थितीत उभी आहे. विहिरीची रचनाच अशी केली आहे कि सूर्यकिरणे व्कचितच पाण्याला स्पर्श करतात त्यामुळे असे म्हणाले जाते कि बाहेरच्यापेक्षा पाण्याचे तापमान ५-६ अंशाने कमी असते.
अदालज हे अहमदाबाद पासून सुमारे १८ किमी दूर असलेलं एक गाव. अदालज ला जायचं झाल्यास अहमदाबाद वरून सिटीबस मिळतात
अदालज विहीर पहायची झाल्यास त्याची वेळ सकाळी ८ ते ६ आहे.
वर्षभर पावसामुळे पाण्याच्या पातळीत हंगामी उतार-चढ़ाव होणार त्यानुसार तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खोल खोदले गेले. राजा मेहमूद बेगडा ह्यांनी ही विहीर पूर्ण केल्यामुळे ही विहीर इन्डो-इस्लामिक स्थापत्यशास्त्रात बांधली गेली आहे. त्यामुळे विहिरीवरील शिल्पसुद्धा तशीच आढळतात.
सन १४९८ मध्ये ह्या विहिरीचं काम पूर्ण झालं. पाचशेहुन अधिक वर्षे पूर्ण होऊनसुद्धा आजही ह्या विहिरीवरील कोरीवकाम पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतं. विहिरीच्या बाहेरून विहिरीचं एक दृश्य ज्यावरून आपल्याला विहीरच्या लांबीचा अंदाज येईल.
खरंतर अदालजच्या विहिरीसाठी कितीही वेळ असला तरी तो कमीच वाटेल
वेळः सकाळी ८ ते संध्याकाळी ६
प्रवेश शुल्कः मोफत
विशेष महत्वाचे : दरवर्षी नोव्हेंबरमध्ये अडालज नी वाव येथे जल उत्सवाचे आयोजन केले जाते.
मोढेरा सुर्यमंदिर (Modhera Suntemple)
मोढेरा पाटी
सूर्यदेव
मोढेराचं सूर्यमंदिर हे बस स्टॉप पासून फक्त ८०० मीटर अंतरावर आहे. सूर्यमंदिर व सुर्यकुंड बघून खरंच डोळ्यांचं पारणं फिटलं. इतकं भव्य मंदिर व सभोवतालचा असलेला परिसर पाहून डोळे थक्क होतात.मोढेरा हे छोटेसे गाव आहे. इथे इतके सुंदर सूर्यमंदिर असेल यावर विश्वास बसत नाही. मोठे आवार पुरातत्व खात्याने बाग करून छान ठेवले आहे. आवाराबाहेरच्या शेतात मोर,वानरे आहेत. मंदिरासमोर मोठा पायऱ्यांचा तलाव आहे. सूर्याच्या मूर्ती मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर असल्या तरी गाभाऱ्यात नाही. शैव शिल्पे नाहीत. शेषशायी विष्णु आहे. खांब सुंदर आहेत. मोढेराहून बेचारजी मंदिर आणखी पंधरा किमी दूर आहे.
गुजरातचे सोलंकीराजे म्हणजे सूर्यवंशी चालुक्य. ते सूर्यदेवाला स्वतःची कुलदेवता म्हणून भजत असत. त्यांच्या आराध्यदेवाच्या म्हणजे सूर्यदेवाच्या पूजेसाठी त्यांनी हे भव्य सूर्यमंदिर निर्माण केलं; पण या जागेचं महत्त्व फार पुरातन आहे असं मानलं जातं. स्कंदपुराणानुसार, आजच्या मोढेरा गावाभोवती एक मोठं अरण्य होतं. त्या अरण्यात ऋषी-मुनींचे खूप आश्रम होते म्हणून त्याला ‘धर्मारण्य’ असं संबोधलं जायचं. रावणाचा वध करून अयोध्येत परतणाऱ्या श्रीरामांनी रावणहत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी सीतेसह या धर्मारण्यात जाऊन यज्ञ केला अशी कथा आहे. आम्हाला मंदिर दाखवणाऱ्या ‘गाईड’च्या मते, प्रभू श्रीराम आणि सीता यांनी या ठिकाणाला भेट देऊन यज्ञ केला आणि या ठिकाणी ‘मोढेरक’ या गावाची स्थापना केली. याच गावाला पुढं ‘मोढेरा’ असं म्हटलं जाऊ लागलं. श्रीराम इथं आले होते असा लोकांचा विश्वास असल्यामुळे मोढेराच्या सूर्यमंदिरासमोरील कुंडाला ‘रामकुंड’ असंही म्हटलं जातं.
सन १०२४-२५ च्या सुमारास सौराष्ट्रातील सोमनाथाचं मंदिर उद्ध्वस्त करून पुढं सरकणारा गझनीचा क्रूरकर्मा महमूद याचं आक्रमण चालुक्य राजा भीमदेव पहिला यानं मोढेरा इथं युद्ध करून रोखलं होतं. इतिहासतज्ज्ञांचं असं मत आहे, की या देदीप्यमान विजयाचं प्रतीक म्हणून मोढेरा इथं हे भव्य सूर्यमंदिर उभारण्यात आलं.
ॐ भूर्भुवः॒ स्वः ।
तत्स॑वितुर्वरे॑ण्यं
भ॒र्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।
धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त् ॥
सूर्याची मुर्ती.
सूर्याची मुर्ती कशी करावी याचे काही नियम आपल्या शिल्पशास्त्रात लिहून ठेवलेले आहेत त्याप्रमाणे त्याच्या दोन्ही हातात कमळे हवीत. ती त्या मुर्तीच्या खांद्यापर्यंत जायला हवीत. त्याच्या पायात बुट दाखविले पाहिजेत...त्याचे सात घोडे दाखविले पाहिजेत इ.इ. असे अनेक नियम शिल्पशास्त्रात लिहून ठेवले आहेत व त्याच प्रमाणे मूर्ती घडवाव्या लागत.
पुढे मोढेराला १०२६ साली सोलंकी घराण्याचा राजा भिमदेव याने हे सूर्यमंदीर बांधले. सोलंकी हे सूर्यवंशाचे असल्यामुळे हे स्वाभाविकच होते. मंदीराचे बांधकाम किती काळ चालले होते याची कल्पना नाही परंतू राजाने व त्याच्या कलाकारांनी हे मंदीर किती जीव ओतून बांधले आहे याची कल्पना त्यावरील कलाकुसरीवरुन येऊ शकते. बऱ्याच मंदीराप्रमाणे येथेही मावळत्या सूर्याची किरणे गाभाऱ्यात पडतात. भारतातील बरीचशी देवळे तीन भागात बांधली जातात.
गर्भगृह, गुढमंडप आणि असलाच तर स्वर्गमंडप.
या मंदिराची काही आपली स्वत:ची वैशिष्ठ्ये आहेत. एकतर पुष्करणीत (सूर्यमंदीरात याला सूर्यकुंड म्हणतात) पाय धुतल्याशिवाय या मंदीरात प्रवेश करता येत नसे, म्हणजे प्रवेश करण्याचा मार्गच असा आखला होता.
सूर्य मंदिर संकुलात तीन विभाग आहेत. प्रवेश करताच दिसते ते "रामकुंड", हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर "सभामंडप "आणि शेवटी "गूढमंडप अथवा गर्भगृह.
यात स्नान केल्यावर किंवा सूर्याला अर्ध्य दिल्यावर साधकाला एकूण दोन मंडपातून जावे लागे जे गरुडस्तंभासारख्या खांबांवर उभे केले होते.
पहिल्या मंडपाचे उरलेले दोन खांब
काठावरची देवळे
शितळादेवी; हिच्या डोक्यावर सूप आहे. देवीच्या साथीत मुलांना देवी येऊ नयेत म्हणून भाविक हिची पुजा करीत व अजूनही करतात.
सूर्यकुंडाभोवती १०८ मुर्ती आहेत व चार कोपऱ्यात गणपती, नटराज, शितळामाता, व विष्णू यांची देवळे आहेत.
नटराजाची अत्यंत सुबक मूर्ती. त्याच्या नृत्यातील डौल बघण्यासारखा आहे.
या देवतांची देवळे एकसारख्या अशा देवळात आहेत.
रामकुंड पाहून आपण मंदिराकडे वळलो की आपल्याला प्रथम दिसतो तो अत्यंत नाजूक कोरीव कामानं नटलेल्या खांबांवर तोललेला भव्य सभामंडप. रामकुंडाच्या पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश करताना आधी दिसतं ते दोन प्रचंड कोरीव स्तंभांवर उभं असलेलं कीर्तितोरण. पुढं मुसलमानी आक्रमणात या मंदिरानं खूप घाव सोसले, त्यात या तोरणाचा वरचा भाग नष्ट झाला, तरी त्याचे दोन खांब अजूनही गतवैभवाची साक्ष देतात. सभामंडप ‘सर्वतोभद्र’ म्हणजे चारही बाजूंनी प्रवेशद्वारं असलेला आहे. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन प्रकारचे आहेत. प्रवेशद्वाराजवळ असलेले छोटे खांब आणि मुख्य मंडपात जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब, ज्यांच्यावर रामायण-महाभारतातले व इतर पौराणिक कथांमधले प्रसंग कोरलेले आहेत. या मंदिरात सौरवर्षातील ५२ आठवड्यांचं प्रतिनिधित्व करणारे ५२ स्तंभ आहेत.
सभामंडपात चारही बाजूंनी जाता येते. आतमधे खांबावर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. छपराची उंची साधारणत: २३ फूट आहे. गुढमंढपातही अनेक शिल्पे कोरलेली आहेत काही कामसूत्रातीलही आहेत. याचे क्षेत्रफळ अंदाजे १३०० वर्ग फूट आहे. आतील भागात पूर्वी सूर्याची मुर्ती असावी. त्याच्याभोवती प्रदिक्षणेचा मार्ग ही आखलेला आहे. दर २१ मार्चला सूर्याची किरणे त्या मुर्तीवर पडतात. गुढमंडपात एक भुयार होते असे आमच्या गाईडने सांगितले जे सध्या बुजलेले आहे असेही सांगितले. खरे खोटे देव जाणे.
मंदीराच्या बाहेरील भिंतीवरील काही शिल्पे
बर्याच नमंदीरात मंदीराचा भार उचलण्यासाठी गजथर दाखविलेला असतो. येथे मात्र कमळाचा थर दाखविलेला आहे....
बाह्यभागातल्या एका शिल्पपट्टिकेवर एक छोटेसे प्रसूतिचित्र आहे. त्यात 'स्क्वॉटिंग' स्थितीतली प्रसूती दाखवली आहे. तिथले गाईड हे अगदी छोटे शिल्प आवर्जून दाखवतात आणि आजकाल पश्चिमेकडे लोकप्रिय होऊ घातलेली ही प्रसूती मुळातली आपल्याकडचीच आहे असे अभिमानाने सांगतात. (सांगत असत, आता माहीत नाही.)
दुर्दैवानं आज त्यापैकी काहीही अस्तित्वात नाही. खिलजीनं या मंदिराचा पुरता विध्वंस केलेला आहे; पण तरीही जे शिल्लक आहे तेच इतकं डोळे दिपवणारे आहे, की मूळ मंदिर किती वैभवशाली असेल हा विचार राहून राहून अस्वस्थ करतो. सूर्यमंदिरात प्रवेश केल्यावर बाहेर निघायचा विचारसुद्धा मनात येत नाही.
सूर्यकुंड अप्रतीम बघत रहावे असे आहे. सूर्यकुंडाच्या भोवती पायऱ्या व इतर देवतांची मंदीरे आहेत सूर्यकुंड आयातकृती असून १७६ फूट लांब व १२० फूट रुंद आहे.
रानी की वाव
राणी की वाव पाटी
प्राचीन भारतात त्यावेळच्या राजे, महाराजे, संस्थानिकांनी आपापल्या राज्यात नद्यांना कालवे काढून, विहिरी बांधून तहानलेल्या रयतेला पाणी पुरविले. जमिनीच्या पोटातील पाण्यापर्यंत खोल उतरत जाणे सुलभ व्हावे यासाठी त्या वेळी पायऱ्या असलेल्या विहिरी बांधण्याची पद्धत रूढ होती. या प्राचीन पद्धतीची मुळे हजार वर्षांअगोदरपासून आढळतात. संस्कृती विकसित होताना अन्न, पाणी, निवासाच्या मूलभूत गरजा भागविण्याबरोबर कलेचा उदय होत त्याचा आविष्कारही दैनंदिन जीवनात उमटतो. पाणथळ जागा विपुल असलेल्या गुजरात राज्यामध्ये गोडय़ा पाण्याची वानवा शतकांपासूनची. उष्ण हवा पाण्याची गरज अजूनच वाढविणारी. पायऱ्या असलेल्या मोठय़ा विहिरी खोदणे ही पद्धत तेथे हजार वर्षांपासून अवलंबिली जाणारी.
चावडा घराणे अंदाजे ७४६ ते ९४२
सोलंकी घराणे अंदाजे ९४२ ते १२४४
वाघेला घराणे अंदाजे १२४४ ते १३०४
या घराण्यांनी पाटणहूनच गुजरातवर राज्य केले. अनहिलवाड (पूर्वीचे पाटण) हे त्या काळातील फार मोठे शहर असावे.
वास्तू विशेष
सगळ्यात मागे दिसते आहे ती विहीर..ही गावकर्यांना थोडीफार माहीत होती.
आत शिरल्याशिरल्या दिसणार्या शिल्पांनी सुशोभीत भिंती..
विहिरीची मापे पाहिली तर आपण तोंडात अचंब्याने बोटे घालतो. ६४ मिटर लांब, एका बाजुला २७ मिटर व एका बाजुला २७ मिटर. खोली आहे जवळजवळ २३ मिटर.
श्रीविष्णू वराह अवतार...
भूदेवीला एका हिरण्यकश्य नावाच्या राक्षसाने पळवून पाताळात एका सरोवरात लपवून ठेवले. पृथ्वी नाहीशी झाल्यामुळे सगळीकडे हाहा:कार माजला. त्यावेळे तेथे प्रकट होऊन श्रीविष्णूने वराहाच्या अवतारात जाऊन त्या राक्षसाचा वध करुन भूदेवीला आपल्या सुळ्यांवर बसवून वर आणले.....अशी काहीतरी गोष्ट आहे ती...
ओठांची रंगरंगोटी करणारी एक सुंदर स्त्री...
आळस देणार्या स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल आपल्या साहित्यात बरेच काही लिहिले गेले आहे व अशा स्त्रियांची शिल्पेही विपूल प्रमाणावर सापडतात. असेच एक शिल्प कोपेश्वराच्या मंदिरावरही आहे...
बहुतेक मदन...हातात उस व दुसर्या हातात बाण हे त्याची चिन्हे दिसत आहेत....
पायर्यांच्या कडेला असलेल्या भिंतीवरचे कोरीवकाम...
कृष्णधवलची मजा काही औरच असते...
या प्रकारच्या खांबावर सगळा डोलारा उभा आहे..
भिंतींवरचे शिल्पकला...
यातील मूर्तींचा खजिना सापडला १९५० च्या मध्यास. भारतीत पुरातत्व खात्याने ५० वर्षे कष्ट करुन हा खजिन्याची गाळापासून सुटका केली व दहाच वर्षात युनेस्कोने रानी-की-बावला जागतिक वारसाचा दर्जा बहाल केला. या विहीरीत एकूण २९२ खांब असले असते पण आता त्यातील २२६ खांब जागेवर आहेत. आत्ता ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवर मला वाटते अजून बरेच काही सापडण्यासारखे असणार. तेथे उत्खनन का केले जात नाही हा संशोधनाचा विषय ठरावा. गुजरात-कच्छ ते पार सिंधपर्यंत ख्रिस्तपूर्व काळापासून अशा अतिखोल विहिरी खणण्याचे ज्ञान स्थानिक लोकांकडे उपलब्ध होते हे निर्विवाद. पाण्याच्या काठाने असलेले बांधकाम ना फक्त सूर्याच्या तीव्र किरणांपासून व उष्णतेपासून संरक्षण करायचे पण मला वाटते तेथे पाण्याने गारवाही निर्माण होत असावा. विशेषत: राण्यांसाठी... आता एवढ्या खोलवर असलेल्या पाण्यापर्यंत पायर्यांवरुन पोहोचायचे म्हणजे वर्तुळाकार (चौकोनी पण स्कृचे तत्व) आकारात पायर्यास हव्याच. २३ मिटर खोल उतरण्यासाठी किती वेळ लागेल याचा हिशेब केला तर त्या वेळात भिंतीवरील शिल्पे पहात पहात खाली उतरणे हे स्वाभाविकच म्हणायला हवे. हे वाचून तुम्ही तेथे गेलात तर आपल्या डोळ्यासमोर राण्या, त्यांच्या दासी व इतर लवाजमा त्या पायर्या उतरत आहेत हे दृष्य निश्चितच उभे राहील.. शिवाय या मजल्यांवर त्या काळातील खास बायकांची तुळशीबागही भरत असे.
खांबांवरची नक्षी
खालच्या मजल्यावर आपल्याला जाता येत नाही पण आपण ज्या पायर्या उतरुन जातो त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरुन आपल्याला आतील शिल्पांचे दर्शन घडते. सगळ्यात वर दिलेले छायाचित्र अशाच आतील भातील श्रीविष्णूच्या मूर्ती आहे. ते कसे काढले आहे तेही दिलेलेच आहे. अशीच अजून दोनतीन शिल्पे.. आत अंधार असल्यामुळे याची छायाचित्रे काढण्यास थोडे अवघड आहे...
ही आतील भागात असल्यामुळे तुलनेने सुस्थितीत आहेत फक्त यावर जळमटे साठलेली दिसतात आणि शिवाय कबुतरांचा त्रास आहेच...
श्री गणपती...
पद्मपाणि
वराहावतार
नागकन्या
राम

एकूण ५०० प्रमुख व जवळजवळ ११०० लहान शिल्पे कोरलेली आहेत. पण ती अशी कोरली आहेत की एवढी शिल्पे असून कोठेही दाटीवाटी झाली आहे असे वाटत नाही. शिल्पांएवढेच महत्व मोकळ्या जांगांनाही कसे असते हे आपल्याला येथे कळते. ही सगळी विहीर श्रीविष्णूच्या अवतारांवर आधारलेली आहे. महाभारतातील प्रसंग, रामायणातील प्रसंग, काही जैन ऋषींच्या मूर्ती तसेच बुद्धाच्याही एकदोन मूर्ती आहेत. अप्सरा, नृत्यांगना व विषकन्यांची अगणित शिल्पे आहेतच.
किसकी सुरत चमक रही है इस आरसी में......
सगळ्यात आत पाण्याच्यावर मोडकळीस आलेली शिल्पे....
जेथे पाणी आहे ती विहीर. यावर पाणी उपसण्यासाठी मोटी आहेत त्या जुन्याच आहेत का तुलनेनी नंतरच्या काळातील याची कल्पना नाही....
विहीरीच्या बाजूने घेतलेले पायर्यांचे छायाचित्र...
सगळ्यात शेवटच्या मजल्यावरील भिंती आता कोसळायच्या परिस्थितीत असल्यामुळे तेथे कोणालाच जाण्यास परवानगी नाही पण तेथेही शिल्पे आहेत व वातावरण गुढरम्य आहे. भुकंपप्रवण प्रदेश असल्यामुळे पुरातत्व खात्याला जमिनीतील हालचालींची नोंद घ्यावी लागते. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी काचेच्या पट्ट्या ठेवल्या आहेत. थोडीजरी हालचाल भुगर्भात झाली तर या खाली पडतात किंवा फ़ुटतात. आता अर्थात आधुनिक उपकरणेही आणलेली असावीत.
ह्या ऐतिहासिक वास्तुस यूनस्को ने २२ जून २०१४ ला जागतिक ऐतिहासिक वास्तूमध्ये सामील करून घेतलं व भारतात उपलब्ध असलेल्या सर्व विहिरींची राणी म्हणून ह्याचा सन्मान केला व सध्या चलनात असलेल्या १०० रु च्या नोटेमागे "रानी की वाव"च छायाचित्र देऊन ह्यास देशभरात प्रसिध्द केलं.
मोढेरा - पाटण - आबू
गुजरात पर्यटनाच्या जाहिरातीत मोढेराचे सूर्यमंदिर, पाटणची राणी की वाव,सिद्धपूरचे बिंदूसरोवर तीर्थ दाखवतात. अहमदाबाद,मेहसाणा,सिद्धपूर,पालनपूर,आबू रोड(राजस्थान) हे एकाच रेल्वेमार्गावर आहे आणि या स्टेशनांवर सोयीच्या वेळी गाड्या थांबतात. मेहसाणापासून मोढेरा,पाटण, सिद्धपूर आणि वडनगर पंचवीस -पस्तीस किमी परिसरांत आहे. मेहसाणा ते आबूरोड जाण्यासाठी अहमेदाबाद_अजमेर इंटरसिटी इक्सप्रेस ( १०:२० - १३:१०) आहे. आबूरोड ते मुंबई गाड्या आहेत.
१) दादर ते भुज गाडीने मेहसाणा(१२९५९),
२) मेहसाणा ते आबूरोड (१९४११),
३)आबू रोड ते बान्द्रा ( १९७०८).
मेहसाणा मुक्काम तीन दिवस, माउंट आबू अडीचदिवस. सीजन ऑक्टोबरला सुरू होतो, सेप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हॅाटेल बुकिंग आगावू करण्याची गरज नसते
( पुण्याहूनही येण्याजाण्यासाठी चांगल्या रेल्वे आहेत. इतर पर्यटक मेहसाणाला मुक्काम करत नाहीत. अहमेदाबाद येथे थांबून कार भाड्याने घेऊन / आयोजित सहल करून परत जातात. )
नकाशा १
नकाशा २
सिद्धपूर :-
. मेहसाणा तेसिध्दपुर एक तासाचा प्रवास आहे. रेल्वे ओवरब्रिजवरून गावात जावे लागते. इथे बोहरा समाजाच्या हवेली आहेत. सर्व हवेल्या बंद आहेत, मालक अमेरिकेत अथवा दुसऱ्या शहरांत राहतात.
सिद्धपूर बोहरा हवेली १
सिद्धपूर बोहरा हवेली २
बाजारातून दहा मिनिटे चालल्यावर रुद्र महालय आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र आहे. पुरातत्व खात्याचे लोक तसेच पोलीस इथे तैनात असतो.मात्र पर्यटकाना बघायची परवानगी आहे. बाबरी मस्जिद प्रकरणानंतर ही विवादास्पद वास्तू घोषित केली गेली होती कारण इथे पूर्वी मशीद होती म्हणतात.
रुद्र महालय कमान
इथे अशा बऱ्याच कमानी होत्या आणि आत रुद्र महालय नावाचे शिवालय. दोनच कमानी राहिल्या आहेत.येथून एक वळसा घालून मागे गेल्यावर सरस्वती नदीचे विशाल पात्र दिसते. आता कोरडेच आहे. या तीरावर एक महादेव आणि मुक्तिधाम स्मशान आहे. ( साताऱ्याच्या संगम माहुलीसारखे यास महत्त्व आहे.) नदीपलीकडे अजून दोन महादेव आहेत. याच बरोबर आपल्याला बिंदु सरोवराला देखील भेट देता येईल.
बिंदु सरोवर हे मोठे आवार आहे. संपूर्ण लाल दगडाच्या फरशीने झाकले आहे. स्वच्छ आणि सुंदर जागा - हाइवे टच. या जागेला पौराणिक महत्त्व आहे. कपिलमुनि आणि कर्दम ऋषींनी इथल्या कुंडापाशी आईचे श्राद्ध केले होते. कुंडास मातृतीर्थ प्रसिद्धी मिळाली आणि श्रद्धाळू इथे आइचे श्राद्ध करतात. त्यांच्यासाठी पंचवीसेक लाल दगडातल्या मेघडंबरी बांधलेल्या आहेत. एकामध्ये आठजण बसू शकतात. पितृपंधरवडा दोन दिवसानंतर सुरू होणार होता तरीही पंधरा ठिकाणी विधी सुरू होते. गुजरात सरकारने २१ कोटी रु खर्च करून ही जागा सुंदर करून टाकली आहे. फोटोस बंदी आहे. एक म्युझिअम आहे त्यातला साडेचारफुटी काळ्या दगडातला विष्णु अप्रतिम! आवारात कर्दमेश्वर महादेव आहे. या रस्त्यावर एकूण पाच महादेव आहेत, हे एक विधिक्षेत्र असल्याने आणि सिद्धपुरात निम्मी वस्ती बोहरांची यामुळे हॅाटेल्स नाहीत.
शामलाजी:-

शरद पौर्णिमेला इथे विशेष उत्सव असतो.याच काळात गोकुळात श्रीकृष्णाची विशेष पुजा केली जाते.तशीच पुजा इथे देखील केली जाते.हे मंदीर ३२० फुट उंच असून जवळपास ५०० वर्ष जुने आहे.सभामंडप,अंतराळ आणि गर्भगृह असे मंदिराचे तीन भाग आहेत.शुभ्र संगमरवर दगडापासून मंदिराची उभारणी केलेली आहे.दुमजली असलेल्या या मंदिराचे खांब आणि भिंती या नक्षीकामाने मढवून टाकलेलया आहेत.मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण आणि महाभारतातील प्रसंग कोरले आहेत.
Related Blogs: http://vadnagar.blogspot.com
वड़नगर
वडनगर हे पंतप्रधान मोदी यांचं जन्मगाव मेहसाणापासून पूर्वोत्तर चाळीसेक किमी दूर आहे. या शहराचा इतिहास २५०० वर्ष प्राचीन आहे.सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी ह्यु एन त्संग यानेही वडनगरला भेट दिली होती.
इथे एक बौध्द मठ आहे.तसेच नुकत्याच झालेल्या उत्खननात इथे प्राचीन स्तुप आणि काही दालन सापडली आहेत.वडनगर इथे १२ व्या शतकातील सोळंकी राजवटीच्या खुणा आढळतात.सरोवराभोवती पाचर वापरुन जोडलेले दगड किंवा पार्श्वभुमीवर असलेले कीर्ति तोरण हे त्याचेच प्रतिक.
दुसर्या शतकातील बुध्द्दाची मुर्ती इथे सापडली आहे.वडनगरला उत्खनन करताना दोन कोरीव स्तुप्,चैत्यगृह आणि नउ दालन देखील मिळाली आहेत.या दालनांची रचना स्वस्तिक आकाराची आहे.बौद्धकालीन किंवा नंतरची शिल्पे आहेत. त्यापैकी एक विशेष म्हणजे तोरण. याचे चिन्ह आणि नाव गुजरात पर्यटन खाते - हॅाटेल्ससाठी घेतले आहे.इथे असलेल्या अर्जुन बारी दरवाज्यावर असलेल्या शिलालेखाप्रमाणे राजा कुमारपाल याने हे शहर इ.स.११५२ मध्ये उभारले.याच शहराला इतिहासकाळात चमत्कारपुर्,आनंदपुर्,स्नेहपुर्,विमलापुर या नावाने देखील ओळखले जाते.
वडनगरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ताना रिरी संगीत महोत्सव. वडनगरच्या दक्षिणेला ताना आणि रिरी या दोन ब्राम्हण कन्यांची समाधी आहे.या दोघींची कथा आपल्याला थेट सोळाव्या शतकात घेउन जाते.अकबराच्या दरबारात तानसेन हा सर्वात महान गायक समजला जात होता.एकदा अकबराने तानसेनाला राग दीपक गायला सांगितला.मात्र हा राग गायिल्याने उष्णता तयार होउन त्याचा त्रास आपल्याला होणार हे माहिती असूनही तानसेनाने तो राग गायला.त्यामुळे तानसेनाला त्रास होउ लागला.तेव्हा तानसेनाचे गुरु रामदास यांनी त्याला राग मेघमल्हार एकायला सांगितला.त्यामुळे पाउस पडेल व शरीराचा दाह कमी होइल.ताना आणि रिरी या दोन भगिनी हा राग गाउ शकतात असे तानसेनाला समजले.त्याने त्यांच्या वडीलांकडे त्यांना गाण्यासाठी परवानगी मागितली.अकबरालाही या दोन बहिणींच्या गायनाची महती समजली आणि त्याने त्यांना दरबारात गाण्यासाठी आमंत्रण दिले.मात्र ब्राम्हण असल्यामुळे असे करणे हे अयोग्य वाटून त्या दोघीनी नकार कळविला.अकबराने त्यांचे मन वळविण्यासाठी आपले सैन्य वडनगरला पाठविले.तेव्हा त्या दोन्ही भगिनींन नकार कळविला आणि आपल्यामुळे इतर गावकर्यांना त्रास नको म्हणुन आत्महत्या केली.याच दोन्ही बहिणींची स्मृती म्हणून दोन छोटी मंदिर उभारली आहेत आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी संगीत महोत्सव आयोजित केला जातो.
सध्या वडनगर थोड्या उंचीवर वसलेले आहे. इथे आलेले पर्यटक हाटकेश्वर मंदीर्,शर्मिष्ठा सरोवर्,ताना रीरी बाग्,धीरी,गौरीकुंड, खोखा गणपती, नागमंदिर अश्या ठिकाणांना भेट देउ शकतात.याचबरोबर गुजरातमधील दोन प्रसिध्द्द संत दयाराम आणि नरसिंह मेहता यांच्या स्मृती इथे आहेत.याचबरोबर सुप्रसिध्द कादंबरीकार गोवर्धन त्रिपाठी,संगीतकार कौमुदी मुन्शी याच भुमीतील.
हटकेश्वर मंदिर, वडनगर –
वडनगर आणि मोदी:-
जुन्या वड्नगर रेल्वे स्टेशनवर मोदींच्या वडीलांचे चहाचे दुकान होते.नरेंद्र मोदी आपल्या वडीलांना इथे मदत करीत होते.पण आज या स्टेशनचे स्वरुप बदलून गेले आहे. या चहाच्या दुकानात वडनगर राष्ट्रीय स्वंयसेवक शाखा चालवणारे वकील इनामदार नेहमी येत असत.नरेंद्र मोदींचा त्यांच्याशी परिचय वयाच्या आठव्या वर्षी झाला आणि ते स्वयंसेवक बनले.पुढे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान झाले.आज वडनगरचे ब्रॉड गेज स्टेशनमध्ये झाले आहे.तसेच मेडीकल कॉलेज आणि बस स्टँडही झाले आहे.
देवनी मोरी :-
गुजरातच्या उत्तर भागात देवनी मोरी हे बौध्दकालीन प्राचीन अवशेष असणारे स्थळ आहे.इथे आठव्या शतकातील बौध्द कलाकृती सापडल्या आहेत.तसेच गुर्जर्,प्रतिहार काळातीलही काही अवशेष मिळाले आहेत.इथे सापडलेल्या वस्तु शामलाजी संग्रहालय आणि बडोद्याच्या म्युझियममध्ये ठेवल्या आहेत.इथे सापडलेल्या वास्तुंच्या शैलीवरुन या परिसराचा इतिहास औरंगाबाद्,अजिंठा,वेरुळ यांच्या समकालीन असावा.इथे एक स्तुपही सापडला आहे.स्तुपावर बुध्दाच्या नउ मुर्ती गांधार शैलीत आहेत.इथे ग्रीक प्रभाव स्पष्ट जाणवतो.पश्चिमी क्षत्रपांचा भारतीय कलाकृतीवर पडलेल्या प्रभावाचे हे उदाहरण आहे.
अहमदाबादला रात्री उशिरा पोहचून झोपेपर्यंत खूप उशीर झाला होता तरीही
नाश्ता आटोपून नऊ वाजता सर्वजण अडालज वावला जाण्यासाठी गाडीत येऊन बसले
होते. हॉटेलपासून अंतर अर्ध्या पाऊण तासाचेच (२०किमी) होते . दहाच्या आतच
अडालजला पोहचलो.
अडालज गावातील ही पायऱ्यांची विहीर अडालज वाव किंवा रुडाबाईनी वाव नावाने
ओळखली जाते. राणा वीर सिंग याने या विहिरीचे काम सुरु केले होते. त्यांच्या
पश्चात त्यांची पत्नी राणी रुडाबाईने ही विहीर सन १४९८-९९ सालात बांधली
होती. विहीर बांधण्यामागचा उद्देश प्रजेकरिता व यात्रेकरूंना पाण्याची सोय
व्हावी, घटकाभर आराम करता यावा हा होता. स्थानिक लोकांसाठी या जागेचे
आध्यत्मिक महत्वही होते.
सुरुवातीलाच दिसणारा फलक व मंदिर
विहिरीच्या पश्चिम बाजूस आवारात प्रवेश करण्याच्या ठिकाणी तिकीट खिडकी असून माणशी रु.२५/- आकारल्या जातात.
विहीर उतरायला सुरुवात करतांना
विहिरीची बांधकाम रचना उत्तर - दक्षिण असून दक्षिण बाजूकडून पायऱ्या उतरण्यास सुरुवात होते. विहीर पाचमजली असून दक्षिणेकडील बाजूने तीन दिशांनी प्रवेश करता येतो. काही पायऱ्या उतरल्यावर हे सर्व रस्ते पहिल्या मजल्यावर एका चौरस मोकळ्या जागेत एकत्र येतात. येथे छताकडील अष्टकोनी मोकळ्या जागेतून उजेड पडतो. इतर भाग झाकलेला असल्या कारणाने दुपारच्या वेळेसच विहिरीत ऊन पडू शकते ज्यामुळे विहिरीच्या आतले तापमान बाहेरच्यापेक्षा कमी राहते.
पहिल्या मजल्यावरील या लँडिंगच्या चार कोपऱ्यांमध्ये छोट्या खोल्या असून अतिशय सुंदर नक्षीकाम केलेल्या खिडकी-सज्जे व दरवाजे दिसतात.
उजेड, ऊन येण्यासाठी छताची अष्टकोनी मोकळी जागा व बाजूचे कोरीव नक्षीकाम
येथून उत्तरेकडे पायऱ्या उतरत जातात. एक एक मजला खाली उतरत जात असताना अतिशय कलात्मक असे विहिरीचे खांब व तुळया आपल्या नजरेस पडतात.
बाजूच्या भिंतींवरही अनेक भौमितिक ,फुले, प्राणी व मानवी शिल्प दिसतात
वेगवेळ्या मजल्यांवरून दिसणारी विहीर
सर्वात तळाचा मजला. येथे पाण्याचे कुंड आहे. ज्यामधून वाटसरूंना पिण्यासाठी पाणी घेता येत असे.
येथून वरच्या मजल्यांचे अतिशय छान दर्शन होते. याच्यापुढे अगदी शेवटी उत्तर बाजूस विहीर आहे पण सध्या तिकडे जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे.
पाण्याचे कुंड व तेथून दिसणारे वरचे पाचही मजले.
कुठलेही सिमेंट न वापरता एकात एक दगड अडकवून केलेली बांधकाम रचना
विहिरीचे छत. विहीर व पाण्याचे कुंड असलेल्या जागी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
थेट पाण्याच्या कुंडाकडे जाण्यासाठी विहिरीच्या दोन्ही बाजूस असलेले चक्राकार जिने
छताच्या जाळीतून घेतलेला विहिरीचा फोटो
बाहेर एक फलक आहे त्यावरील माहितीनुसार व लोक कथेनुसारसुलतान मोहम्मद
बेगडा बरोबरच्या लढाईत राजा वीरसिंग यांचे निधन झाले. मोहमद बेगडाने राणी
रुडाबाईच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
बेगडाने विहीर पूर्ण करण्यास मदत करावी या अटीवर राणीने लग्नास होकार दिला.
बेगडाने विहीर पूर्ण करण्यास सहकार्य केले. यामुळेच विहिरीच्या
बांधकामाच्या शैलीत हिंदू, जैन यांच्याबरोबरच इस्लामिक शैलीचाही प्रभाव
दिसतो. विहीरचे काम पूर्ण झाले परंतु बेगडा राणीशी लग्न करू शकला नाही
कारण त्यापूर्वीच राणीने विहिरीत उडी मारून जीव दिला.
( अवांतर:बेगडाचे मूळ नाव मोहम्मद शाह. असे म्हणतात याने चम्पानेरचा
पावागढ व गिरनारचा जुनागड हे दोन गड जिंकल्याने त्याला 'बेगडा' (बे-गडा )
ही उपाधी मिळाली)
दुसऱ्या एका कथेनुसार विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर बेगडाने कारागिरांना प्रश्न विचारला 'असेच बांधकाम तुम्ही पुन्हा करू शकाल का? उत्तर होकारार्थी आल्यावर असे निर्माण परत होऊ नये याकरिता सर्व कारागिरांची हत्या करण्यात आली.
विहिरीच्या वरील सहा कबर व आजूबाजूचा परिसर
येथून निघून आम्ही गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. या
मंदिरासाठी प्रवेश विनामूल्य आहे. मंदिरात मोबाईल फोन, कॅमेरा नेण्यास सक्त
मनाई आहे.
स्वामीनारायण पंथाचे हे मंदिर आद्य गुरु भगवान श्री स्वामी नारायण यांना समर्पित आहे.
मंदिर गुलाबी रंगाच्या वाळूकाश्म दगडापासून साकारण्यात आले आहे. मंदिराच्या
तळमजल्यावर 'हरी मंडपम' हे पवित्र स्थान आहे. येथे स्वामीनारायण व त्यांचे
शिष्य यांच्या प्रतिकृती स्थापित आहेत. पहिल्या मजल्यावर श्री स्वामी
नारायण यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्रण आहे.
मंदिराचा परिसर २३ एकर परिसरात असून आकर्षक बगीचे, लाईट अँड साउंड शो,
संध्याकाळचा संगीत कारंजे प्रदर्शन इ. गोष्टीही पाहण्यासारख्य आहेत. आम्ही
मात्र मुख्य मंदिर व थोडासा आजूबाजूचा परिसर पाहून परत फिरलो. आठवण म्हणून
शंभर रुपये देऊन मंदिरातर्फे नेमलेल्या फोटोग्राफरकडून एक फोटो काढून
घेतला. (या एकाच जागेहून मंदिराच्या दिशेने रोखलेल्या कॅमेरात आपला फोटो
काढून मिळतो)
जेवणानंतर सायन्स सेंटर बघायची इच्छा होती पण रविवार असल्याने
तिकिटासाठी खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या. काल रात्री उशिरा झोपून आज
लवकर उठलो होतो तसेच कालचा गिरनार पर्वत चढाईचा थकवाही होता त्यामुळे आजचे
पर्यटन स्थळ दर्शन थांबवून हॉटेलवर परत आलो.
थोडासा आराम करून राहिलेला वेळ शॉपिंगला जाऊन सत्कारणी लावण्याबाबत
महिलांचे एकमत झाले. हॉटेलपासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरच बाजार
असल्याचे कळले किंवा असेही म्हणता येईल की या सर्व गोष्टींचा विचार करूनच
हॉटेल ठरविले होते. पायीच निघालो. आधी लागला लाल दरवाजा येथील बाजार.
अहमदाबादमधील अगदी स्वस्त बाजारांपैकी एक. येथे लहान मुलांचे कपडे,
बूट-चप्पल, इलेकट्रॉनिक वस्तू, आर्टिफिशियल ज्वेलरी, घरातील सजावटीच्या
वस्तू इ.कमी किमतीत मिळू शकतात. घासाघीस करण्याचे कौशल्य हवे. आम्हाला काही
चांगल्या कपड्यांची खरेदी करायची होती. शोध घेत पुढे निघालो. शेवटी पोहचलो
एकदाचे इच्छित स्थळी. "रतन पोळ" बाजार. साडी, ड्रेस मटेरियल, शर्ट, पॅन्ट
इत्यादींची शेकड्याने दुकाने येथे आहेत. कमी किमतीपासून अतिशय महागडे
कपडेही येथे विक्रीस आहेत. किरकोळ तसेच ठोक विक्रीचीही दुकाने आहेत. येथे
किमतीची घासाघीस नाही. मनासारखी खरेदी झाली. साडे आठ वाजले होते. बाजार बंद
व्हायची वेळ झाली होती.
आजची खरेदी आटोपल्यावर खादाडीसाठी जायचे ठरले होते. येथील मानेक चौकातील
खाऊ गल्ली खूप प्रसिद्ध असल्याचे ऐकले होते. कापड दुकानदाराला पत्ता
विचारला तर त्याने सांगितले या गल्ल्लीतून बाहेर पडल्यावर रास्ता ओलांडला
कि तुम्ही थेट खाऊ गल्लीतच असाल. मानेक चौक हा सकाळचा भाजी बाजार, दुपारी
ज्वेलरी दुकाने व रात्री स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. रात्री दुकाने बंद
झाली की गल्लीत खाद्य पदार्थांचे स्टॉल लागण्यास सुरुवात होते. जिलेबी,
पावभाजी , चाट, डोसा, सॅन्डविच, आईस्क्रीम, कुल्फी अशा अनेक प्रकारांचे
स्टॉल येथे लागतात.
खरेदीसाठी आमचा ग्रुप विखुरला होता. त्यांची वाट बघत आम्ही एक एक पदार्थ चाखायला सुरुवात केली.
पोटॅटो ट्विस्टर विथ पेरी पेरी अँड मेयॉनीज
सेवपूरी टोकरी चाट व दही शेव पुरी
चीझ पायनापल सॅन्डविच विथ आईस्क्रिम .
जामून शॉट/किवी शॉट/पेरू शॉट
विखुरलेला ग्रूप थोड्या वेळात आम्हाला येऊन मिळाला. त्यांच्याबरोबर डोसा, रबडी, कुल्फी झाली.
रात्रीचे अकरा वाजायला आले तरी खव्वयांची गर्दी ओसरत नव्हती .
गजबजलेली खाऊगल्ली
आमचं खाऊन झालं होतं . निघायचा निर्णय घेतला व रिक्षाने पाच-दहा मिनिटात हॉटेलवर पोहचलो.
क्रमश:
सहलीचा दहावा दिवस
सकाळी नाश्ता आटोपून मोढेरा येथील सूर्य मंदिर पाहावयास निघालो. अहमदापासून
जवळपास १०० किमी तर मेहसाणा पासून २५ किमीवर पाटण या ठिकाणी हे मंदिर आहे.
सव्वा दोन अडीच तासात आम्ही मंदिराजवळ पोहचलो. माणशी रु.२५/-चे तिकीट
काढून आवारात प्रवेश केला.सूर्य देवाला समर्पित हे मंदिर सन १०२६ मध्ये
राजा भीमदेव प्रथम याने बांधले आहे. गर्भगृह, सभामंडप व कुंड असे तीन
भागात मंदिर आहे. मंदीर आभासी रेखा कर्कवृत्तावर आहे.
हे कुंड सूर्यकुंड किंवा रामकुंड म्हणूनही ओळखले जाते. कुंडात स्नान
करूनच मंदिरात प्रवेश करावा अशी श्रद्धा असावी. कुंडाच्या सभोवती सुंदर
दगडी पायऱ्या आहेत. १०८ हा आकडा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो व त्याचे
प्रतीक म्हणून १०८ छोटीछोटी मंदिरे यावर बांधली आहेत असे वाचल्याचे स्मरते.
मुख्य मंदिराकडे पायऱ्या चढून आल्यावर दोन स्तंभ दिसतात. कधीकाळी हे दोन्ही स्तंभ मंदिराच्या तोरणाचे भाग राहून मंदिराची शोभा वाढवीत असावेत.
यातून पुढे गेल्यावर लागतो तो सभामंडप.
सभामंडपाला रंग मंडप किंवा नृत्य मंडप असेही संबोधले जाते. सभामंडपाला ५२
खांब असून ते रामायण, महाभारतातील दृशांनी सुशोभित करण्यात आली आहेत. ५२
खांब वर्षाचे ५२ आठवड्यांचे प्रतीक असावे . सर्वसाधारण सभामंडप व गर्भगृह
लगतच असतात परंतु येथे दोघांचे बांधकाम काही अंतरावर असल्याचे दिसते.
सभामंडप हा गर्भगृह बांधकामाच्या नंतरच्या काळात बांधला गेला असावा.
छताचा घुमट
स्तंभ, छत व छताचा भार पेलणारे यक्ष किंवा किन्नर
सभागृहानंतर विलग असलेल्या गर्भगृहात आपण जातो.
गर्भगृहामध्येही दोन भाग दिसतात. एक म्हणजे प्रदक्षिणा मार्ग असलेले मंदिर व व दुसरा त्या समोरील मंडप. मंडपाला आठ खांब असून त्यावर सुंदर कोरीव काम आहे. मंदिर अशा तर्हेने बांधलेले आहे की सूर्य ज्या दिवशी विषुव वृत्तावर असतो त्यादिवशी सूर्याची पहिली किरणे मंदिरातील मूर्तीवर पडतील तसेच दुपारी सूर्य माथ्यावर असताना मंदिराची सावली पडणार नाही. सध्या येथे कुठलीही मूर्ती नाही. मंदिराच्या बाह्य भिंतीवर तीनही बाजूनी तसेच कोनाड्यांमध्ये सूर्याच्या बारा प्रतिमा आहेत ज्या बारा महिन्याचे प्रतीक आहेत. बाह्य भिंतीवर इतरही मूर्ती आहेत जसे अष्ट दिक्पाल, विश्वकर्मा, वरूण, गणेश सरस्वती इ. मंदिराला छत नाही. आक्रमणांमध्ये याची नासधूस झाली असावी किंवा नैसर्गिक आपत्तीत ते नष्ट झाले असावे.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर काही मैथुन शिल्पेही दिसतात तसेच मंदिरात गर्भगृहाच्या मंडपात अगदी छताजवळील पट्टीतही अशी शिल्प आहेत. निर्बंधांमुळे फोटो देणे शक्य नाही.
सभागृहाच्या उत्तरेला एक छोटेसे शिवमंदिर आहे.
मंदिराच्या आवारात वस्तू संग्रहालय आहे. येथे बांधकामातील अनेक दगडी अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात.
साधारण दोन तास येथे वेळ देऊन पाटण येथील रानी कि वाव पाहण्यास निघालो. येथून ३६ किमी व गाडीने एक तासापेक्षाही कमी अंतरावर हे ठिकाण आहे. वाटेत दुपारच्या जेवणासाठी थांबल्याने आम्हास वेळ झाला त्यामुळे दुपारी तीनच्या सुमारास येथे पोहचलो.
पाटण ही अनेक शतके सोळंकी वंशाची राजधानी होती व त्याकाळी ती अन्हीलवाड
नावाने ओळखली जात होती. सन १०६३ मध्ये पायऱ्यांची ही विहीर राणी उदयमतीने
आपले पती राणा भीमदेव प्रथम यांच्या स्मरणार्थ बांधली.
नंतरच्या काळात जवळून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पुरात वाहून आलेल्या
गाळामुळे विहिरीचा पश्चिमेकडील पाणी असलेला काही भाग वगळता पूर्णपणे
गाडल्या गेली. कदाचित येथे कठडा असल्याने हा भाग बुजला गेला नसावा.
कालांतराने गाडलेला भाग पूर्णपणे विस्मृतीत गेला.
आमच्या गाईडच्या सौजन्याने उत्खननापूर्वीचा मिळालेला एक फोटो
विहिरीला सात स्तर असून आपल्याला पायऱ्या उतरून चौथ्या स्तरापर्यंत पोहचता येते. भितींवर विष्णूचे दशावतार, देवी, मातृका, सुरसुंदरींची देखणी शिल्प आहेत. यांच्याबद्दल काही सांगण्यापेक्षा त्यांची सुंदरता फोटोंमधूनच बघूया.
वस्त्र ओढणारे खोडकर माकड
पायऱ्या उतरताना डाव्या बाजूस असेलेले शिल्प पाटणच्या प्रसिद्ध पटोला साड्यांची रचना दाखवतात.
हा विहिरीचा पाणी असलेल्या बाजूकडून घेतलेला फोटो
साडेचार वाजले होते. अहमदाबादला पोहचण्यासाठी घाई करावी लागणार होती
कारण संध्याकाळी अहमदाबाद रेल्व स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड
रहदारी असते. ज्यांना एका दिवसात मोढेरा सूर्य मंदिर व रानी की वाव दोन्ही
ठिकाणे बघायची असतील त्यांनी आसपासच किंवा मेहसाना भागात मुक्काम करणे
सोईस्कर. कारण ही दोन्ही ठिकाणे येथील कलाकुसरीचा आनंद घेत सावकाश बघण्याची
आहेत. अहमदाबादपासून जाण्याचा किंवा येण्याचा एका बाजूचा प्रवास वेळ
वाचल्यास उत्तमच.
गांधीधामधुन एकत्रित सुरु झालेली सहल मांडवी,कच्छचे श्वेत रण, भूज,
जामनगर, द्वारका,पोरबंदर, सोमनाथ, सासन गीर, जुनागड, गिरनार, अहमदाबाद,
अदलज, मोढेरा, पाटण असा प्रवास करत अहमदाबाद रेल्वे स्थानकावर समाप्त झाली.
प्रत्येक ठिकाणची स्थानिक भटकंती वगैरे पकडून अडीच हजार किलोमीटरचा
प्रवास झाला.
No comments:
Post a Comment