हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय
उस्मानाबाद शहर येथे आहे. उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित
आहे.उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाडयात त्याच्या नैर्ऋत्येला आहे. हा जिल्हा
समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो.
ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात.उस्मानाबादच्या
नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड
जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा
हे जिल्हे आहेत.

साडे तीन शक्ती पिठांपैकी एक संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी
देवीचा हा जिल्हा! शिवाजी महाराजांना ज्या देवीनं वरदान दिलं, हाती लखलखती
तलवार दिली (असे मानले जाते) तिच्या कृपा आशिर्वादाने महाराजांनी अनेक
मोहिमा फत्ते केल्यात! ती महाराष्ट्राची कुलस्वामीनी याच उस्मानाबाद
जिल्हयात वास्तव्याला आहे.जिल्हयाचे नाव हैदराबादचे 7 वे निजाम मीर उस्मान
अली खान यांच्या नावावरून पडले उस्मानाबाद!
जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास
आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही
बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या या
जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ३०
सप्टेंबर, १९९३ ला पहाटे झालेल्या भूकंपामुळे लातूरसह याही जिल्ह्याचे
प्रचंड नुकसान झाले, पण आता हा जिल्हा त्या धक्क्यातून सावरला असून
प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
OSMANABAD DIVISION bus stand depot contact number
Sr. No Designation Functioning Area Std Code No. Telephone No. Email_id
Office
1 Divisional Controller Osmanabad,(02472) 222637/ 222216
dcstosb@gmail.com
msrtcstrosm@yahoo.in
1 Divisional.Traffic Officer Osmanabad Division.-( 02472 ) 223305
2 Divisional. Accounts Officer Osmanabad Division. (02472) 223436
3 Divisional. Personnel Officer Osmanabad Division. (02472) 222246
4 Labour Officer Osmanabad Division.( 02472) 222025
1 डेपो मॅनेजर, उस्मानाबाद- ( 02472) 223389
2 डेपो मॅनेजर, उमरगा - (02475) 252053
3 डेपो मॅनेजर, भुम -( 02478) 272034
4 डेपो मॅनेजर, कळंब- ( 02473) 262206
5 डेपो मॅनेजर, तुळजापुर - (02471) 242045
6 डेपो मॅनेजर, परांडा - ( 02477) 232762
उस्मानाबाद
जिल्हयाचा अधिकतर भाग बालाघाट च्या पहाडांमधे स्थित आहे.उस्मानाबादचे
पुर्वीचे नाव धाराशिव असे होते, शहराच्या नजिक साधारण आठ कि.मी. वर धाराशिव
नावाच्या जैनांच्या लेण्या आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील तालुके – Osmanabad District Taluka
उस्मानाबाद जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत.
- उस्मानाबाद
- तुळजापुर
- उमरगा
- लोहारा
- कळंब
- भुम
- परांडा
- वाशी
उस्मानाबाद जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Osmanabad Jilha Mahiti
- क्षेत्रफळ 7569 वर्ग कि.मी.
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 आणि क्र. 211 हे या जिल्हयातुन गेले आहेत.
- या जिल्हयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सब कॅम्पस आहे
- पुर्वी या ठिकाणी मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते त्यानंतर बहामणी आणि विजापुर संस्थानात आले आणि 1948 पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात आले.
- शहरातील धारासुर मर्दिनीचे मंदिर आणि शमशोद्दीन गाझी यांची दर्गा प्रसिध्द आहे.
- उस्मानाबादचे गुलाबजाम फार प्रसीध्द आहेत आणि मांसाहारी पदार्थ आवडीने खाणा.यांकरता उस्मानाबादी शेळीचे चवदार मटन देखील प्रसीध्द आहे.
- उस्मानाबाद ची शेळी प्रसीध्द आहे.
- उस्मानाबाद रेल्वेसेवा आणि बससेवेने सगळया महत्वांच्या शहरांशी जोडला गेला आहे.
- या शहराच्या मध्यातुन भोगावती नदी वाहाते.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे :-
तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी
यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर.,
सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४०
कि.मी.वर आहे.
कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा
नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी
देवीचे मंदिर आहे.
परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.
श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे उस्मानाबाद पासून १५ कि. मी.श्रीक्षेत्र
रुईभर येथे दत्तमहाराजांचं एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या
पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे.
रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते उस्मानाबाद
पासून 20 कि.मी. च्या अंतरावर सोलापुर औरंगाबाद या रोडवरील येडशी या गावात
आहे.येथे दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे.श्रावण महिन्यात येथे मोठ्या
प्रमाणावर भक्तगण येतात.तसेच भरपूर पाउस पडल्यावर येथील धबधबा हा आकर्षण
ठरू शकते.तसेच या प्रदेश हा डोंगराल प्रदेश आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर
वनराई आहे.त्यामुले या प्रदेशास रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला,
कुंथलगिरी येथील जैन मंदिर,श्री दत्तमंदिर, तसेच नळदुर्ग येथील नर-मादी
धबधबा प्रसिद्ध आहे.
तसेच
तेर (ता. उस्मानाबाद) येथील पुराणवस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे येथे
उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट
उस्मानाबाद येथील हातलाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. उस्मानाबाद हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले दर्गा शहरातील मध्य
भागी आहे दर वर्षी येथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक पर राज्यातुचन व
विदेशातुन ऊर्सा साठी येतातउस्मानाबाद जिल्हा शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
धाराशिव लेणी Dharashiv Caves, Osmanabad)
धाराशिव लेणी
|
लेणी आणि संपन्न व्यापारीमार्ग यांच एकदम घट्ट नात आहे. प्राचीनकाळी
पैठण, तेर या शहरांमधून विविध प्रकारचा माल पश्चिम किनार्या वरील भडोच,
शुर्पारक(सोपारा), कल्याण, चौल इत्यादी बंदरात व्यापारी मार्गाने जात असे.
पश्चिम किनार्यावरील बंदरा मार्फत परदेशाशी होणार्या या व्यापारामुळे
व्यापार्यांची भरभराट होत होती. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून व
राजाश्रयामुळे महाराष्ट्रात अनेक लेणी खोदली गेली. त्यामुळे संपन्न बंदरे,
व्यापारी मार्ग, बाजारपेठा, राजधान्या यांच्या आसमंतात ही लेणी मुख्यत्वे
करुन आढळतात. या लेण्यांचा धार्मिक कार्यासाठी आणि व्यापारी मार्गावरील
विश्रांती स्थाने म्हणुन उपयोग होऊ लागला. व्यापार्यांनी दिलेल्या दानातून
या लेण्यंचा दैनिक खर्च चालत असे, अशी परस्पर पूरक व्यवस्था समाजातल्या या
दोन्ही घटकांच्या सोयीची होती.
पैठण , तेर (तगर) नगरांपासून जाणार व्यापारी मार्ग धाराशिव (म्हणजे आजचे
उस्मानाबाद) या प्राचीन शहरातून जात असे. या व्यापारी मार्गावर धाराशिव
शहरा नजिक सहाव्या शतकात बालाघाट डोंगररांगेत लेणी खोदण्यात आली. ती लेणी
धाराशिव लेणी म्हणुन आजही प्रसिध्द आहेत. बौध्द, हिंदू, जैन अशी एकूण ११
लेणी या परिसरात आहेत. याशिवाय येथे एक समाधी मंदिर आहे. त्याच्या बांधकाम
शैली वरुन ते सतराव्या शतकात बांधले असावे.
उस्मानाबाद शहरापासून ७ किमी वर धाराशिव लेणी आहेत. जेथे रस्ता संपतो
तेथून लेण्यांपर्यंत खाली उतरण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. पायर्या
उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बजूला एक ठळक पायवाट दिसते. या पायवाटेने
पुढे गेल्यावर ठराविक अंतरावर ३ हिंदू लेणी पाहायला मिळतात. त्यातील
दुसर्या लेण्यात रामायण महाभारत आणि हिंदू पुराणातल्या कथांवर आधारीत
शिल्पपट कोरलेले पाहायला मिळतात. हिंदू लेणी पाहून परत पायर्यांपाशी येऊन
खाली उतरल्यावर आपण बौध्द लेण्यांपाषी पोहोचतो. यातील दुसरे लेणे भव्य असून
त्याला दगडात कोरलेले कमानदार प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या दोन्ही
बाजूस व्दारपाल कोरलेले आहेत. आत गेल्यावर उजव्या बाजूला दगडात कोरलेल्या
स्तूपाचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी सुरुवातीची काळात बौध्द लेणे
होते. त्या लेण्यात मुचलिंड बुध्दाची मुर्ती होती. या मुर्तीत आणि
पार्श्वनाथांच्या मुर्तीत असलेल्या साम्यामुळे नंतरच्या काळात ही लेणी जैन
लेणी म्हणुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्यातल्या मुळ
मुर्तींना आज वेगळ्याच देवतेचे नावाने पुजलेल्या पाहायला मिळतात.

स्तुपाचे अवशेष पाहून पायऱ्या चढून लेण्यात प्रवेश करतांना ओवरीच्या
खालच्या बाजूस भार्गव कोरलेले पाहायला मिळतात. लेण्याची रचना ओवरी ,
सभामंडप त्याच्या दोन्ही बाजूला असलेले विहार आणि गर्भगृह अशी आहे. आजच्या
तारखेला ओवरी नष्ट झालेली आहे. सभामंडप २० खांबांवर तोललेला आहे. या
खांबावर खूप सुंदर नक्षीकाम होते . लेण्याची दुरुस्ती करतांना ते नष्ट झाले
. आता फक्त उजव्या बाहेरच्या कोपऱ्यातल्या खांबावर नक्षीकाम पाहायला मिळते
. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला ७ खोल्या आहेत. गर्भगृहात पार्श्वनाथाची
मुर्ती आहे .
समाधी मंदिर
|
या लेण्या समोरच मराठा सरदाराची समाधी मंदिर आहे . त्याची रचना
मराठेशाहीतील वाड्याप्रमाणे आहे . गाभाऱ्यात शिवपिंडीची स्थापना केलेली आहे
. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस कमानदार ओवऱ्या आहेत. गाभाऱ्या समोर असलेल्या
दारातून आणि कळसातून फक्त पिंडीवर प्रकाश पडेल अशी योजना केलेली आहे .
मंदिरासमोर वीरगळ आणि ३ समाध्या आहेत.
समाधी मंदिर
|
या नेहमीच्या गडबडीपासून लांब असलेल्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात लेणी
आणि मंदिर पाहाता पाहातांना आपला काही शतकांचा कालप्रवास होतो.
तुळजापूर , धाराशिव लेणी आणि तेर ही तीनही ठिकाण खाजगी वहानाने एका दिवसात पाहून होतात.
हातलादेवी मंदिर:-
उस्मानाबाद शहराच्या पश्चिम दिशेस बालाघाटाच्या रांगेतून अलग
असलेल्या डोंगरावर हातलादेवीचे मंदिर आहे, शहर व परिसरात देवीला हातलाई या
नावाने देखील ओळखले जाते.
देवीचा इतिहास सांगण्यासाठी मंदिर परिसरात शिलालेख किंव्हा इतर देवी
महात्म्यामध्ये या देवीचा उल्लेख मिळत नाही, त्यामुळे फक्त
शिल्पशास्त्रानुसार देवी मुर्ती कुठल्या काळातील आहे हे सांगता येते पण इथे
अजुन एक अडचण अशी आहे की , देवी भक्तांनी मुर्तीला शेंदुर लावल्याने
देवीच्या हातातील शस्त्र कोणकोणती आहेत हे नेमके सांगता येत नाही, देवीच्या
शिवलिंग सारख्या आसन पीठावरील सिंह शिल्पावरून देवी मुर्ती हजार ते आठशे
वर्ष जुनी आहे हे सांगता येते, आणि वाहन सिंह असल्याने हि माहिषासुरु
मर्दिनी आहे हे नक्की, विशेष म्हणजे या परिसरातील (उस्मानाबाद व परिसर)
जेवढी देवी मंदिरे आहेत त्यातील कुठल्याच देवीचे आसन पीठ असे नाही.
देवीला मानणारा भक्त वर्ग खुप मोठा आहे, या ठिकाणी भक्तांसाठी ओवऱ्या
, धर्म शाळा बांधलेल्या दिसत नाहीत, या गोष्टी इथे बांधण्यासाठी खुप काही
कष्ट पडतील असा भाग नाही पण इथे असा इतिहास सांगितला जातो की देवीच्या
मंदिरावर छत राहत नाही किंव्हा छत टाकला तर पडतो म्हणून इथे आता सुद्धा इथे
छत नाही मग याच गोष्टीचा विचार करून भक्तांनी स्वतःसाठी ओवऱ्या व इतर
बांधकाम इथे केले नसावे.
पुर्वी नवसपुर्ती साठी बळी देणे, पायी जाणे, तोरण बांधणे इ
गोष्टी केल्या जात, असाच नवसाचा भाग म्हणुन इथे डोंगरावर पायऱ्या देखील
बांधण्यात आल्या होत्या असा मौखिक इतिहास ऐकायला मिळतो, तसेच याच ठिकाणी
भक्तांसाठी पायऱ्या बांधल्या म्हणुन जुनीगल्ली, विजय चौक येथील गवंडी
कुटुंबाला त्या काळी निजाम सरकार ने बक्षीस पत्र देखील दिले होते.
हे क्षेत्र शिव - शाक्त पंथाचे आहे हे येथील नाग फणा, नाग शिल्प, शिवलिंग पद्धतीचे पीठ यावरून कळून येते.
- जयराज खोचरे,
पुरातत्व व इतिहास अभ्यासक.
हातलाई देवीचे मंदिर उंचावर वसले असल्यामुळे ईथून उस्मानाबाद शहराचे सुंदर दृष्य दिसते.
वडगाव सिध्देश्वर:-
ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या वडगाव सिध्देश्वर येथील श्री
सिध्देश्वरांच्या दर्शनासाठी केवळ श्रावणमासातच नव्हे तर वर्षातील बाराही
महिने भाविकांची गर्दी असते़ ‘क’ दर्जा मिळालेल्या या तीर्थक्षेत्रावर
येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, इथे विविध विकास
कामे सुरू आहेत़सिध्देश्वर मंदिराबाबत एक अख्यायिका सांगितली जाते़ वडगाव
परिसरात पूर्वी इसापूर नगरी होती़ इसापूर नगरीच्या राजाकडे अनेक गायी
होत्या़ गायी वनात चरण्यासाठी सैनिक नेत असत़ मात्र, यातील एक गाय आपल्या
वासराला दूध पाजत नव्हती़ गाय दूध का पाजत नाही, याची माहिती घेण्यासाठी
राजाने सैनिकांना सांगितले होते़ सैनिकांनी त्या गायीवर नजर ठेवली असता, ती
गाय एका वारूळावर दूध सोडत असल्याचे दिसून आले़ याची माहिती मिळताच राजाने
उत्सुकतेने त्या वारूळाच्या जागी उत्खनन केले़ त्यावेळी शंभू महादेवाच्या
जवळपास सात पिंडी तेथे आढळून आल्या़ राजाने काही दिवसातच तेथे भव्य मंदिर
उभारून परिसराचा जीर्णोध्दार केला़

तेव्हापासून आजपर्यंत परिसरातील हजारो भाविक सोमवारसह शिवरात्री, श्रावण
मासात दर्शनासाठी वडगाव येथे येतात़ इसापूर राजाची मंदिराच्या डाव्या
बाजूला असलेल्या नागझरी कुंडाजवळ समाधीही आहे़ वडगाव सिध्देश्वर गावात व
मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त चार ते पाच दिवस विविध उपक्रम राबविले जातात़
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे या कालावधीत आयोजन केले जाते़ पहिल्या
श्रावण सोमवारीही येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़
श्रावणातील प्रत्येक दिवस येथे दर्शनासाठी गर्दी असते़ ऐतिहासिक मंदिर आणि
परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी भाविकांचा ओढा वडगावकडे
वाढला आहे़. हे ठिकाण उस्मानाबाद पासून ८ कि.मी. अंतरावर आहे.
रामलिंग:-
रामलिंग हे उस्मानाबादपासून २० किमी तर बीडपासून ९५ किमी अंतरावरचं ठिकाण.
अतिशय सुंदर वन पर्यटन स्थळ. रामलिंग हे सोलापूर – बीड मार्गावरील येडशी
जवळ आहे. यासंबंधी असे सांगितले जाते के, या प्रवाह संगमात स्नान करून
प्रभू श्रीरामांनी शिवलिंगाची पूजा केली, म्हणून भगवान शंकर यांचे रामलिंग
या नावाने प्रसिद्ध झाले. सीताहरणाच्या वेळी या दंडकरण्यातून राम –
लक्ष्मणाचा संचार झाला. त्यांचे हे स्थान आहे. श्रावण महिना व दर सोमवारी
भक्तगण मोठ्या प्रमाणात येथे येतात.
पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला. दरीत उतरुन गेल्यावर समोर येते ते
नव्याने जीर्णोद्धार झालेले महादेव मंदिर. त्याचं कोरीव बांधकाम आणि
िभतीवरील देवदेवतांच्या मूर्ती लक्ष वेधतात. महादेव मंदिराकडे तोंड करून एक
पितळेचा सुंदर नक्षीकाम केलेला नंदी आहे. शांत वातावरणात महादेवाचं दर्शन
घ्यायंच आणि पावलं पुन्हा हिरव्या वाटांकडे वळवायची. मंदिराला वळसा घालून
धावणारी नदी खूपच आवडून जाते.
महादेवाच्या मंदिरासमोर, नंदीच्या पाठीमागे एक समाधी आहे. त्यावर एका
पक्षाला दोन पुरुष हातात धरून उभे असल्याचं चित्र कोरलं आहे. रावण व
जटायूच्या युद्धात जटायू जखमी झाला. रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी इथे
एक बाण मारला. त्यामुळे तिथे एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार
वाहू लागली. इथेच जटायूचा मृत्यू झाला. ही समाधी जटायू पक्ष्याची आहे अशी
आख्यायिका सांगतीली जाते.
पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रपात कोसळत राहातो. हा धबधबा
पाहण्यासाठी, येथील महादेवाचं आणि जटायूचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण मोठय़ा
संख्येने येथे येतात. हा परिसर खूप हिरवागार आणि जैवविविधतेने संपन्न आहे.
त्याचे रक्षण व्हावे म्हणून शासनाने १९९७ मध्ये २२३७.४६ हेक्टर क्षेत्राला
रामिलग घाट अभयारण्य म्हणून घोषित केले. उस्मानाबाद जिल्ह्यतलं हे स्थळ
पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं स्थळ आहे. येथे पक्ष्यांच्या १०० पेक्षा
अधिक प्रजाती आढळतात. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पाणगळीची वने व काटेरी
वने या प्रकारात हे वन मोडतं.अभयारण्यात कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, खोकड,
रानमांजर, काळवीट, ससे, रानडुक्कर, लाल तोंडाची माकडे, मोर असे वन्यजीव
पाहू शकतो.उस्मानाबाद जिल्हा अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. मात्र
पर्जन्यराजाची कृपा झाल्याक्षणी हा परिसर कात टाकतो. महाशिवरात्रीला येथे
मोठी यात्रा भरते.
‘येडशी-रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य.’ हे अभयारण्य उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. ता. १६ मे १९९७ रोजी अभयारण्य म्हणून मान्यता मिळालेलं हे जंगल सुमारे २२३७.४२ हेक्टर एवढ्या प्रदेशात पसरलेलं असून, उस्मानाबाद तालुक्यातील तीन गावं आणि कळंब तालुका असा त्याचा विस्तार आहे. भगवान शंकराच्या ‘रामलिंग’ या प्राचीन मंदिरासाठीही हे जंगल प्रसिद्ध आहे.
उस्मानाबाद शहरापासून अवघ्या २० किलोमीटरवर असलेलं हे सुंदर अभयारण्य सह्याद्रीच्या बालाघाट पर्वतरांगेत येतं. ‘उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळी वनं आणि काटेरी वनं’ या जंगलप्रकारात हे अभयारण्य मोडतं. या परिसरासंदर्भात एक आख्यायिका प्रचलित आहे. त्या आख्यायिकेनुसार, ‘वनवासात असताना रावणानं सीतेचं अपहरण केल्यानंतर सीतेच्या शोधार्थ निघालेल्या रामाची जखमी अवस्थेतील जटायू या गिधाड प्रजातीच्या पक्ष्याशी याच परिसरात भेट झाली होती. तेव्हा त्याला पाणी पाजण्यासाठी रामानं जमिनीत एक बाण मारला, त्यामुळे इथं एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली. सीतेला वाचवण्यासाठी रावणाबरोबर झालेल्या युद्धात जटायूचा मृत्यू झाला. या ठिकाणी जटायू पक्ष्याची समाधी आहे...’
पावसाळ्यात याच गुहेतून येणाऱ्या पाण्याचा मोठा धबधबा तयार होतो. या अभयारण्याच्या परिसरातील रामलिंगमंदिर, जटायूची समाधी, धबधबा व भोवतालचा सुंदर निसर्ग यांमुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींच्या आवडीचं स्थळ ठरलं आहे.
या जंगलाची एक खासियत म्हणजे, या जंगलातून एकही नदी वाहत नाही, तसंच जंगलात एकही मोठा तलाव नाही; पण जंगलातून वाहणारे दोन मोठे नाले आणि इतर उपनाले यांमुळे जंगलातील जीवांची तहान भागते. जंगलात चार विहिरी आहेत; पण त्या बारमाही नाहीत, त्यामुळे जंगलातील प्राणिमात्र या विहिरींवर पाण्यासाठी अवलंबून नाहीत. एकूणच उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार केला तर हा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा आहे. सुमारे ४०० ते ५०० मिलिमीटर एवढाच पाऊस या प्रदेशात वर्षभरात पडतो, त्यामुळे ‘दुष्काळी भागात फुललेलं नंदनवन’ असं या जंगलाचं वर्णन करता येऊ शकेल.
जंगलाची भौगोलिक ठेवण ही टेकड्यांची आणि मोकळ्या गवताळ प्रदेशांची आहे. त्यामुळे इथं भौगोलिक विविधता आढळते. त्यावर आधारित असणाऱ्या जीवांमध्येही या जंगलात विविधता आहे. जंगलाचा एकूण इतिहास पहिला तर, अगदी वाघ आणि बिबट्या या सर्वोच्च शिकारी वर्गाच्या प्राण्यांची नोंदही इथं पाहायला मिळते. कालपरत्वे जंगलाच्या एकूण परिस्थितीत बदल होत गेला आणि या सर्वोच्च शिकाऱ्यांनी या जंगलातून इतर जंगलात आश्रय घेतला. आज हे दोन्ही जीव या जंगलात पाहायला मिळत नाहीत; पण मोकळ्या माळरानांमुळे ‘काळवीटा’सारखा सुंदर प्राणी या जंगलात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो.
सन १९९७ मध्ये अभयारण्याची स्थापना झाल्यावर जंगलाला चांगल्या प्रकारे संरक्षण देण्यात आलं आहे, त्यामुळे साळिंदरासारख्या दुर्मिळ प्राण्याबरोबरच माळरानांवर आढळणाऱ्या सुंदर पक्ष्यांचा अधिवासही इथं पाहायला मिळतो. सर्पगरूड, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, भटतित्तर, चंडोल, सुगरण, डोंबारी, काळा कोतवाल, करडा कोतवाल, पीतमुखी टिटवी, नकल्या खाटीक, तुईया पोपट, पावशा, चातक, ढोकरी, गायबगळा, मध्यम बगळा, पांढऱ्या पोटाची पाणकोंबडी, अडई, टकाचोर, भारद्वाज, सातभाई, रानभाई, वटवट्या अशा पक्ष्यांच्या प्रजाती इथं पाहायला मिळतात. आपला राष्ट्रीय पक्षी मोरही इथं मोठ्या प्रमाणावर आढळतो. हिवाळ्यात काही स्थलांतरित पक्ष्यांचंही आगमन होतं.
अभयारण्याच्या क्षेत्रात एकही गाव, वस्ती नाही, त्यामुळे ‘माणसांचा जंगलभागात होणारा हस्तक्षेप’ हा निसर्गासमोर असणारा धोका या अभयारण्याबाबत दिसून येत नाही. त्यामुळे साहजिकच जंगलाच्या सौंदर्यात आणि समृद्धीत वाढ होत आहे. अशा प्रकारे जंगल वाढत गेलं तर लवकरच बिबट्यासारखे शिकारी प्राणीही इथं पाहायला मिळू शकतील. वन्यजीवांच्या अधिवासात आणि एकूण जंगलात वाढ होण्याच्या दृष्टीनं वनविभागाकडून सातत्यानं प्रयत्नही करण्यात येत आहेत.
निसर्गात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप आपण केला नाही तर, निसर्गाला त्याच्या पद्धतीनं वाढू दिलं तर जंगलाची प्रत खूप जास्त पटींनी समृद्ध होते हे वारंवार सिद्ध झालं आहे. निसर्ग वाचवणं हे काही रॉकेट सायन्स नाही. जंगल वाचवण्यासाठी काय आवश्यक आहे ते सर्व आपल्याला माहीत आहे. गरज आहे ती ते फक्त योग्य रीतीनं राबवण्याची. आपले प्रयत्न आणि आवश्यक संरक्षण आपण निसर्गाला पुरवलं तर निसर्ग त्याचं काम चोख बजावेल यात शंका नाही आणि आपली पुढची पिढी समृद्ध जंगल अनुभवू शकेल.
कसे जाल?
पुणे/मुंबई-बार्शी-सोनगाव-भानसगाव-येडशी
भेट देण्यास उत्तम हंगाम : ऑक्टोबर ते जून
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी : काळवीट, वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचिचुंद्री, मुंगूस, जवादी मांजर, ऊदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, ससा, वानर, कोल्हा, खोकड, रानडुक्कर, भेकर, लालतोंडं माकड इत्यादी.
पक्षी : टकाचोर, हळद्या, नाचण, मॉटल्ड् वूड आउल, पिंगळा, दयाळ, सोनपाठी सुतार, सर्पगरूड, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, भटतित्तर, चंडोल, सुगरण, डोंबारी, काळा कोतवाल, करडा कोतवाल, माळटिटवी, नकल्या खाटीक, रानतुईया, पावशा, चातक, ढोकरी, गायबगळा, मध्यम बगळा, लाजरी पाणकोंबडी, अडई, टकाचोर, भारद्वाज, सातभाई, रानभाई, वटवट्या, इत्यादी.
सरपटणारे प्राणी : पाल, गेको, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, नाग, फुरसं, मण्यार, घोणस इत्यादी.
वृक्ष : अर्जुन, बहावा, बाभूळ, बेल, बोर, चंदन, चिंच, धामण, जांभूळ, करवंद, खैर, मोवई, नीम, पळस, पांगारा, पिंपळ, सालई, तेंदू, वड, उंबर, आपटा, अंजन, भेरा, गराडी, सीताफळ इत्यादी.
झुडपं : लोखंडी, मुरुडशेंग, निरगुडी, रुई, तरोटा, रानतुळस इत्यादी.
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांची दर्गा उस्मानाबाद
येथील सुफी संत हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध आहे. या
दर्ग्यात फारसी भाषेतील कोरलेले एक शिलालेख असून त्यात या पुरुषाचा
निर्वाणकाळ ७२० हिजरी असा दिलेला आहे. अनेक राज्यांमधले भाविक या ठिकाणी
दर्शनाकरता येतात. हे सुफी संत इस्लामचे प्रचारक होते आणि उस्मानाबाद मधे
असलेली त्यांची दर्गा मुस्लीम बांधवांचे पवित्र स्थान आहे. मुस्लीम बांधवां
व्यतिरीक्त देखील इतर धर्माचे लोक या सुफी संताच्या प्रती आपला आदर भाव
व्यक्त करण्याकरता येथे गर्दी करतात.
तुळजापूर:-
तुळजापुर ची भवानी – Tulja Bhavani Temple
साडेतिन शक्तीपिठांपैकी दुसरे संपुर्ण शक्तीपीठ आहे तुळजापुरची तुळजाभवानी!
शिवाजी महाराजांना
या देवीने तलवार दिली असल्याचे देखील सांगितले जाते, आई तुळजाभवानीच्या
आशिर्वादाने महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या त्यामुळे स्वराज्य रक्षक
शिवाजी महाराजांना ज्या भवानीचा आशिर्वाद लाभला त्या आई भवानीच्या
दर्शनाकरता महाराष्ट्रातुनच नव्हे तर अवघ्या देशभरातुन भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात.
संपुर्ण महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी उस्मानाबादची कुलस्वामीनी मानल्या जाते.
नवरात्रात तर या गावाला झोपायला देखील वेळ मिळत नाही एवढी गर्दी त्या
दिवसांमधे या तुळजापुरला असते. प्रत्येक घरात पाहुणे असतात, जणु
ग्रामउत्सवच!
नवरात्राचा उत्सव जरी नउ दिवसांचा असला तरी तुळजापुरला हा नवरात्रौत्सव 21 दिवसांचा असतो.
आई भवानीचे हे मंदिर 12 व्या शतकापासुन अस्तित्वात आहे, भाद्रपद वदय
अष्टमीला देवीची मुर्ती सिंहासनावरून हलवण्यात येते आणि नवरात्रात पुन्हा
तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते
अष्टभुजा असलेली ही देवी सिंहावर आरूढ आहे, या देविच्या हातात वेगवेगळी
शस्त्र आहेत, आद्य शंकराचार्यांनी या देविची प्राणप्रतिष्ठापना केली
असल्याचे देखील सांगण्यात येतं.
अतिशय वैशिष्टयपुर्ण असलेली ही मुर्ती संपुर्ण विश्वातली एकमेव चल
मुर्ती आहे पुर्ण वर्षभरात ही मुर्ती तीनदा संपुर्ण विधीयुक्त हलवण्यात
येते तेव्हां देवी शयन करण्याकरता जाते असं म्हंटल्या जातं.
तुळजापुर उस्मानाबाद शहरापासुन 25 कि.मी. आणि सोलापुर पासुन 45 कि.मी. अंतरावर आहे.
महाराष्ट्र देवदेवतांची साधुसंतांची भूमी ही भूमी ज्ञान, भक्ती, वैराग्य
आणि शौर्य यांचा मिलाफाने सजलेली आहे. अनेक देवदेवतांच्या कृपाछत्राखाली
महाराष्ट्र आजही तेजाने झळकत आहे. आपल्याकडे कुळाचार आणि कुलदैवतांंची पूजा
साधना याला खूप महत्त्व आहे.
अशाच एक दैवताच दर्शन आपण घेणार आहोत तिचा मान इतका की, महाराष्ट्राच
कुलदैवत म्हणून अखील मराठी मनात हिचा महिमा नांदतो आहे. हीच ती महाराष्ट्र
धर्म रक्षिका महन्मंगला तुळजाभवानी.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत त्यात तुळजापूर हे तिसरे शक्तीपीठ आहे.
कोलापूरं महास्थान यात्रं लक्ष्मी सदा स्थिता
मात:पूर द्वितीयच रेणुकाधिष्ठीत परम
तुळजापूरमं तृतीयं स्यात सप्तशृंगं तथैवचं
तुळजापूर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासून १८ किमी तर
सोलापूर पासून ४४ किमी वर आहे. तर समुद्रसपाटीपासून २७० फूट उंच आहे.
तुळजापूरचे जूने नाव चिंचपूर, या भागात चिंचेची झाडे विपुल प्रमाणात आहेत
यावरून चिंचपूर नाव पडले असे सांगतात. हे साडेतीन शक्तीपीठांपैकी तिसरे
शक्तीपीठ आहे. या क्षेत्राचा उल्लेख स्कंदपुराणात येतो. कृतयुगात
दंडकारण्यत कर्दम ऋषी पत्नी अनुभूतीसह राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर
अनुभूती गर्भवती असल्याने तीला सती जाता आले नाही. पुढे प्रसुत होऊन मुलगा
झाल्यानंतर त्याचा सांभाळ करून, त्याला यथावकाश गुरुगृही पोहचवून, अनुभूती
तपश्र्चर्या करण्यास गेली. तीने स्वतःला टांगते ठेऊन अग्नीसाधन केले.
तपसाधनेने ती तेजस्वी झाली. पुढे शिकरी निमित्त फिरत निघालेल्या कुकुर
दैत्याच्या नजरेस अनुभूती आली. त्याने पापवासनेने तीला हात लावला. तपोभंग
झाल्यामुळे अनुभूतीने डोळे उघडले आणि दैत्याला पाहून अनुभुती भयभीत झाली.
तीने आदिशक्तीचे स्मरण केले. तीची हाक ऐकून देवी त्वरीत धाऊन आली आणि तीने
दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. अनुभूतीच्या हाकेने त्वरीत आली
म्हणून देवीस तुरजा नाव मिळाले. अनुभूतीच्या विनंतीवरून देवी आपल्या
गणांनसह इथेच राहिली.
बालेघाटातील दृष्य
|
महिकावती बखर, सभासद बखर, चित्रगुप्त बखर, शिवदिग्विजय यातही तुळजापूर
जुनी वसाहत असल्याचा उल्लेख येतो. हे देवस्थान बालेघाटात कड्याला लागून
वसलेले आहे. बालेघाट चढून आपण ज्या पठारावर येतो, त्याच पठारावर तुळजापूर
शहर वसलेले आहे.
घाटशीळ
|
बालेघाटातून जाताना डावीकडे एका वास्तूचे शिखर मन वेधून घेते. ते आहे
घाटशिळ एका कथेनुसार देवीने रामाची सीता रूपात परीक्षा घेतली. पण रामाने
तीचे मूळ रुप ओळखले, "तु का आई इथे" असे हात जोडून विचारले. यामुळे देवीस
तुकाई नाव मिळाले. श्री रामास देवी प्रसन्न झाली आणि तिने रामाला विजयी
होण्याचा वर देत, लंकेचा मार्ग दाखविला देवी रामवरदायीनी झाली. आणि याच
घाटशिळावर देवी स्थानापन्न झाली. आजही इथून ती आपल्या भक्तांची वाट पाहत
आहे. या वास्तूमध्ये एक मोठी शिळा आहे. शिळेवर देवीच्या पादुका आहेत. ही
शिळा दरवर्षी गव्हाच्या दाण्याच्या आकाराने वाढते असे म्हणतात.
कोलिन मॅकेन्झी काढलेले चित्र
|
तुळजापूर हैदराबाद निजामाच्या सत्तेखाली होते त्यावेळी गुलबर्गा सुभा होता
त्यावेळी या परीसरातील शेतीची पहाणी करायला ब्रिटिश सर्वेयर कोलिन मॅकेन्झी
नियुक्ती केली होती त्याने घाटशीळाचे चित्र काढले होते ते ब्रिटनमधील
आशिया विभागात उपलब्ध आहे. चित्राखाली "Gat-sila near Tuljapur Gat.
Mar.1.1797. sketched be c.mck."असे लिहिले आहे. ही वास्तू हैदराबाद मुक्ती
संग्राम लढ्याची साक्षीदार राहिली आहे. अॉपरेशन पोलो अंतर्गत भारतीय
सैन्याने अवघ्या दोन तासात निजामाच्या ताब्यात असलेले तुळजापूर परीसर आणि
शहर सोडवले होते. शहरात दोनशे रझाकार आणि हैद्राबाद इन्फंन्ट्रीचे सैन्य
होते. या कारवाईत काही रझाकारांनी घाटशिळावर आश्रय घेतला होता.
रझाकारांमुळे घाटशिळास धक्का बसला होता.
तुळजापूर बाजारपेठ
|
तुळजापूर
शहरात बस स्थानकातून बाजारपेठ आणि देवीचे मंदिर जवळच आहे. मंदिराकडे
जाताना दुतर्फा सजलेल्या बाजारपेठेत कुंकू हळद, माळपरड्या, बांगड्यांची
दुकाने, पुजेचे साहित्य, मिठाई, देवदेवतांचे फोटो आणि टाक व पितळेच्या
मुर्त्या , खेळणी, खाद्यपदार्थ असा नानाविध जिन्नस मिळतो.
राजे शहाजी आणि राजमाता जिजाऊ महाद्वार
|
पेठेतून मंदिराकडे आलो की आपण दोन भव्य महाद्वारांसमोर उभे ठाकतो. मंदिरात
जाण्यासाठी ही मुख्य महाद्वारे आहे यातले पहिले राजे शहाजी महाद्वार आणि
शेजारचे राजमाता जिजाऊ महाद्वार आहे. महाद्वारातच नगारखाना आहे.
महाद्वाराच्या उजवीकडे तुळजाभवानी संस्थानचे भक्तनिवास आहे.
प्रवेशद्वाराच्या उजवीकडे मंदिर संस्थानचे भक्तनिवास
|
मंदिरात जाण्यासाठी 93 पायऱ्या तीन टप्प्यात उतराव्या लागतात.
महादरवाज्यातून आत गेले की उजवीकडे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य
कार्यालय आहे. येथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे.
तिसरा कक्ष समर्थ विशेष अतिथी कक्ष आहे. डावीकडे पोस्ट कार्यालय आहे.
कल्लोळ तीर्थ
|
पायऱ्यांचे दोन टप्पे ओलांंडल्यानंतर डाव्या बाजूस कल्लोळ तीर्थ लागते.
चंद्र सुर्याने या कुंडाची निर्मिती केली आणि देवीसाठी ब्रम्हदेवाच्या
आज्ञेवरून भारतातील एकशे आठ उदकतीर्थे येथे एकत्र आली. त्यामुळे जो कल्लोळ
झाला त्यावरूनच या कुंडास कल्लोळ तीर्थ नाव पडले.
स्नान कल्लोळ तीर्थाठायी। दर्शन घेई देवीचे।।
घेता चरणतीर्थोदय। होय जन्माचे सार्थक।।
या तीर्थात अंघोळ केल्यास त्वचाविकार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कल्लोळ तीर्थाच्या भोवतीने तटबंदी आहे. तटबंदीतच प्रवेशद्वारासमोरील
भिंतीत भाविकांना स्नानानंतर वस्त्रे बदलण्यासाठी ओवऱ्या आहेत. डाव्या आणि
उजव्या भिंतीत शिवलिंग आणि नागशिल्प आहेत.
गायमुख तीर्थ
|
कल्लोळ तिर्थाच्या समोर गायमुख तीर्थ आहे. ब्रम्हदेवाने गंगा यमुना सरस्वती
यांना देवीच्या स्नानासाठी इथे प्रवाहीत होण्यास सांगितले. इथे गोमुखातून
बारमाही पाण्याचा प्रवाह वाहतो. या प्रवाहात स्नान करणे पुण्यप्रद मानले
जाते. गरीबनाथ म्हणून एक देवीचा भक्त होता. त्यास गंगास्नानासाठी काशीला
जाण्याची इच्छा झाली. तेव्हा देवीने त्यास गंगास्नानासाठी काशीला जाण्याचे
कारण नाही. गोमुखातून गंगाच वाहते आहे असे सांगितले. पण गरीबनाथाचा हट्टच
होता त्याने जाण्याचा निश्चय केला. तेव्हा देवीने त्याला वेताची काठी,
लिंबू आणि नारळ देऊन या वस्तू गंगास्नान करताना पाण्यात सोडण्यास सांगितले.
गरीबनाथ काशीला गेल्यानंतर त्याने देवीने सांगितल्याप्रमाणे वेताची काठी,
लिंबू आणि नारळ पाण्यात सोडल्या. त्यानंतर ते तुळजापूरास परतले.
नित्यप्रमाणे ते गोमुखात स्नानासाठी गेले तेव्हा गोमुखातून गंगेत सोडलेल्या
वस्तू बाहेर आलेल्या त्यांनी पाहिल्या. गरीबनाथास देवीची प्रचीती आली अशी
कथा आहे. याच गोमुखातले पाणी देवीच्या स्नानासाठी वापरतात. येथे गोमुखासमोर
एक शिवलिंगही आहे. इथे वरील गोमुखातील पाण्याची धार दोन गोमुखातून विभागून
येते.
दत्त मंदिर
|
गोमुखाच्या बाजुलाच दत्त मंदिर आहे. मंदिरात दत्त श्रीयंत्र आणि शिवलिंग
आहे. पुढे आणखी एक दरवाजा लागतो हा आहे सरदार निंबाळकर दरवाजा. रंभाजी बाजी
उर्फ रावरंभ निंबाळकर हे निजामाचे सरदार देवीचे निस्सीम भक्त होते.
त्यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नळदुर्ग, अपसिंगा, तुळजापूर भाग
जहागीर होता. त्यांनी देवीच्या मंदिराभोवती तटबंदी ओवऱ्या पुर्व आणि
पश्चिमेस दोन दरवाजे बांधले त्यामुळे या मुख्य दरवाजास त्यांचे नाव देण्यात
आले.
सिद्धीविनायक
|
दरवाज्याच्या डाव्या बाजूस उजव्या सोंडेचे सिद्धीविनायक ठाण मांडून बसले
आहेत. तर उजव्या बाजूला विठ्ठल रखुमाई, गणपती मारूती, नारदमुनी, शिव आदी
देवता आहे. निंबाळकर दरवाजातून आपण मुख्यतः मंदिराकडे जातो.
नारदमुनी, गणपती, विठ्ठल रखुमाई, मारुती शिव
|
न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जानी स्तुतिमहो।
न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा।।
न जाने मुद्रीस्ते तदपि च न जाने विलपनं।
परं जाने मातस्तवदनुसरणं क्लेशहरणं।।
हे माते, मी मंत्रही जाणत नाही आणि तंत्रही. मला स्तुती करणे
येत नाही, आवाहन आणि ध्यान य़ांची माहिती नाही. स्तोत्र व कथा मला ठाऊक
नाहीत, मला तुझ्या मुद्रा समजत नाहीत आणि व्याकुळ होऊन हंबरडाही फोडणे येत
नाही. पण मला फक्त एक गोष्ट समजते ती म्हणजे तुझे अनुसरण करणे. तुला शरण
येण्यामुळेच सर्व संकटांचा नाश होतो.
शंकराचार्यानी केलेल्या या देव्यपराधक्षमापन स्त्रोत्रास
स्मरून आणि आदिशक्तीच्या उदेकारात आपण मागच्या भागातील अर्ध्या राहिलेल्या
यात्रेस सुरूवात करू
सरदार निंबाळकर द्वार
|
सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून प्रवेश करत, आपण काही पायऱ्या उतरून मंदिर प्रांगणात येतो. हे प्रवेशद्वार निजामाचा सरदार रावरंभ निबाळकरांनी बांधले आहे. मंदिराच्या चहुबाजूने भिंतीत ओवऱ्या आहेत. या ओवऱ्याही रावरंभ निंबाळकरांनीच बांधून दिल्या आहेत. निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मार्कंडेय ऋषींचे छोटे मंदिर आहे. हे ऋषी देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांचा आश्रम यमुनाचल म्हणजेच आताच्या तुळजापूरात कृतयुगात होता. असा उल्लेख अढळतो उजव्या बाजूस देवीचा नगारखाना आहे. तसेच भक्तांना बसण्यासाठी सज्जा आहे. मुख्य मंदिर पुर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरच प्रथम होमकुंड दिसते.
होमकुंड
|
होमकुंड १० फूट लांब १० फूट रूंद आहे, आणि ७ फूट खोल आहे.
होमकुंडावर शिखर आहे. त्यावर देवकोष्टकात अनेक देवता कोरलेल्या आहेत. गंमत
म्हणजे इथे एक गणरायाचे पुण्यातल्या शारदा गणेशासारखे मंचकी पहुडलेले शिल्प
ही आहे. पण याचे वैशिष्ठय म्हणजे मंदिराच्या शिखरात कोरलेला
हा एकमेव शिंदेशाही पगडी धारण केलेला गणपती असावा. या शिवाय होमकुंडावर
समोरील बाजूस सुर्य, चंद्र, मत्स्य, शरभ, श्रीयंत्र, आणि शरभासह महासर्प
झुंज असे शिल्प आहे. तसेच हनुमान आणि गरूडही कोरलेले आहेत. होमकुंडाच्या
डाव्या आणि उजव्या कमानीवर पान आणि सर्प मेरूपृष्ठ आहे. होमकुंडाच्या
पायाशी रक्तभैरव आहे. याच ठिकाणी नवरात्रात अष्टमी आणि नवमीला होम केला
जातो. तसेच अजाबळीही याच होमकुंडात दिला जातो. अजाबळीचे बकरे सिंदफळच्या
लांडगे धनगर यांच्याकडे असते. त्यांंच्याकडून हे बकरे वाजत गाजत आणले जाते
आणि रीतसर पूजा करून ते कापले जाते. तत्पुर्वी झडती देणे महत्त्वाचे असते.
बकऱ्याच्या अंगावर पाणी टाकले जाते त्याने अंग झटकून परवानगी अर्थात झडती
दिली तरच त्याचा बळी दिला जातो. अन्यथा बकरे बदलून आणतात. सुवासीनी या
कुंडाभोवती कुंकवाचा सडा घालतात.
होमकुंडावरील पगडी धारण केलेला गणपती
|
होमकुंडाच्या डाव्या बाजूस मोठे पिंपळाचे झाड असलेला पार आणि उजव्या बाजूस कडूलिंबाचे झाड असलेला पार आहे. हे दोन्ही अनुक्रमे सीमोल्लंघनाचा आणि गोंधळाचे पार आहेत.
गोंधळाचा पार
|
हे पार होमकुंड आणि मंदिर दरम्यान आहेत. डाविकडे दोन भव्य दिपमाळ
आहे. ह्या दिपमाळ शिवरायांनी बांधून दिल्याचे सांगतात. आता आपण मुख्य
मंदिराकडे वळू.
प्रथम दर्शनी मंदिरावर दोन शिखरे दिसतात यातले पुढचे शिखर भवानी
शंकराच्या गाभाऱ्यावरील आहे आणि मागचे तुळजाभवानीच्या गाभाऱ्यावरील आहे. ही
दोन्ही शिखरे होमकुंडावरील शिखरापेक्षा मोठी आहेत. असे असले तरी
तुळजाभवानीचे शिखर सर्वोच्च आहे. मंदिराच्या स्थापत्यविषयी मतभेद आहेत. हे
मंदिर यादवकालीन असल्याचे सांगितले जाते. मुळ मंदिरात कालानुरूप अनेक बदल
झाले आहेत. मंदिराच्या बाह्य भागावर हत्ती, घोडे, मोर असे पशुपक्षी आणि
किन्नर गंधर्व ही कोरलेले आहेत. दोन्ही शिखरांवरील देवकोष्टकात निरनिराळ्या
देवीदेवता आहेत. हया शिखरांचा होमकुंडावरील शिखराचे नुतनीकरण पन्नास
वर्षात झाले आहे. मंदिराचे मुख्य शिखर ४१ फुट असून ते १९३८ साली बीडच्या
ठिगळे सावकाराने नव्याने बांधले.
तुळजाभवानी मंदिराचे शिखर
|
या मंदिराचा काळ ठरवताना पहिला लिखित संदर्भ सावरगाव च्या शिलालेखात मिळतो.
शके १०८६ मध्ये तारण संवत्सर असताना अश्विन
शुद्ध १ या दिवशी कदंबकुलतीलक महामंडलेशवर मरूडदेव त्याचा पादपद्मोपजीवी
(सेवक) भाली याने आंबादेवीच्या देवळासाठी मळ्याचा विसावा भाग दान दिला,
माधवनायक व लहिपनायक यांनी २ द्राम दिले हे (दान) जो नष्ट करील तो श्वान,
गाढव, चांडाळ होय.
पण प्रत्यक्ष तुळजाभवानीचा उल्लेखासाठी तुळजापूरच्या
नैऋत्येला सहा कोसावरील काटी गावातला मारुती मंदिरातला लेख महत्त्वाचा
ठरतो. बहमनी सुलतान फेरोजशहाच्या काळातला शके १३२० (इ.स.१३९८) च्या या
शिलालेखात-
ओम श्री सुलतान फेरोजशहा बहमनी याच्या कल्पकोडी(म्हणजे कोटी कल्प चालणाऱ्या) राज्यात श्री शक १३२० या वर्षी बहुधान्य संवत्सरात मार्गशीर्ष शुद्ध ५ शुक्रवार या दिवशी परशुरामजी गोसावी श्री तुळजा मातेच्या यात्रेस आले असताना त्या समयी काटी येथील चावडी (धर्मशाळेच्या) प्राकाराच्या किंवा तटाच्या कमासाठी सिंगऊ वसाराम यांच्या चौथाऱ्याची घरव्रूत्ती व श्रीदेवीची मुर्ती परशुरामजीने दिली ब्राम्हणांनी सुप्रतिष्ठापणा केली या महाप्रकाराच्या कामास महापुरीचा श्रीदामोदर ठाकूर, ऋषीदेव, हनुमंत ईश्वरदेव, विठ्ठलपुत्र भोगनाथ शुकदेव, केशीदेव, मल्लीनाथ गोविंद, कान्हा महादेव,लक्ष्मीदेव एतत्प्रमुख साक्षी होत
काटी शिलालेख
|
असा उल्लेख येतो. म्हणजे तुळजाभवानी मंदिर वर उल्लेख आलेल्या काळाच्याही आधीचे असावे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुर्वेला कडी किंवा चांदी द्वार,
दक्षिणेला पितळी किंवा दक्षिण द्वार, उत्तरेला चोपदार द्वार हे तीन द्वार
आहेत. यापैकी पितळी दरवाजावर जगदेव परमार या देवीभक्ताने सात वेळा देवीस
मस्तक अर्पण केल्याचा श्लोक कोरलेला आहे. गर्दीचे नियोजन आणि व्यवस्थेसाठी
प्रवेश मात्र देवस्थानातर्फे बांधलेला पाच मजली दर्शनमंडप पार करूनच होतो.
दहा हजार भाविक रांगेत उभे राहू शकतील एवढी या मंडपाची क्षमता आहे.
रांगेच्या मोठ्या खटाटोपानंतर जगदंबेच्या राऊळात प्रवेश होतो मंदिराचे
गर्भगृह गुढमंडप सोळा खांबी मंडप अशी अंतर्गत रचना आहे. मुख्य गाभाऱ्याचे
द्वार चांदिच्या पत्र्याने मढवले आहे. गाभाऱ्यात मेघडंबरी आहे. ही मेघडंबरी
पुण्याच्या चिंतामणी ज्वेलर्सने बनवली आहे. ही मेघडंबरी चांदीची असून
त्यावर गणपती, गरूड, मारुतीसह निरनिराळी अलंकरणे आहेत. पुढील बाजूस यंत्र
कोरलेले आहे. मेघडंबरीत महाराष्ट्राची महन्मंगला तुळजा भवानी विराजराम आहे.
देवीची मूळ मुर्ती
|
देवीची मुर्ती काळ्या गंडकी शीळेतून घडवलेली असून अत्यंत तेजस्वी आहे. मुर्ती तीन फुट उंच असून अष्टभुजा महिषासुरमर्दीनी आहे. देवीच्या मस्तकी सायनेलिंग आहे. मस्तकावरील मुकूटातून बटा बाहेर आलेल्या आहेत. देवीच्या आठ हातात अनुक्रमे त्रिशुळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र, राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणांचा भाता असून, उजव्या आणि डाव्या बाजूस चंद्र आणि सुर्य आहेत. देवीचा उजवा पाय महिषासुरावर असून दोन्ही पायामध्ये महिषासूराचे मस्तक पडलेले आहे. देवीच्या उजव्या बाजूस तीचे वाहन सिंह आहे. तसेच मार्कंडेय ऋषी बसलेले आहेत. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती आहे देवीच्या मुर्तीवर चक्राकार कुंडले, केयूर, अंगद, काकणे, कंठा, माला, मेखला, सारूळ्या इत्यादी अलंकार कोरलेले आहेत. तज्ञांच्या मते आताची देवीची मुर्ती ही सोळाव्या शतकातली असावी.
देवीच्या गाभाऱ्या शेजारीच उत्तरेला देवीचे शेजघर आहे. या शेजघराचे
द्वारही चांदिच्या पत्र्याने मढवलेले आहे. शेजघरात एक चांदीचा पलंग आहे
त्यावर एक चांदीचा पाळणा टांगलेला आहे. दक्षिणेला देवीचे
न्हानीघर आहे तसेच देवीला रोज लावावयाचा मळवट तयार करायचा गंधकक्षही
मंदिरात आहे. गाभाऱ्याच्या समोर एक छोटा मंडप (अंतराळ) आहे. या मंडपाच्यापुढे अर्धमंडप आहे. या मंडपात देवीचे वाहन सिंहाची संगमरवरी मुर्ती आहे.
भवानी शंकर
|
देवीच्या गाभाऱ्यासमोरच श्री भवानी शंकर आहे. शिवलिंग मागे नंदी आणि नंदीच्यापाठीवर नागफणाधर शिवाचा मुखवटा अशा थाटात भवानीशंकर अगदी जगदंबेसमोर बसले आहेत. जणू आपल्या अर्धांगिनीचे भक्तांच्या प्रेमाने सजलेले रुप पाहत आहेत. कडी दरवाजा पुढे समोरच सोळा खांबांवर तोलेला सभामंडप आहे याला घाटी मंडपही म्हणतात. याचे कारण म्हणजे इथे लटकवलेल्या दोन जुन्या घंटा (घाट) यातली एक पोर्तुगीज धाटणीची, तर दुसरी उद्धव यादवराव असे नाव असलेली घंटा आहे. गाभाऱ्याजवळ एक कडीचा खांब आहे. या खांबाची कडी आपल्या अंगावरून फिरवल्यास अनेक व्याधी बऱ्या होतात असा भक्तांचा विश्वास आहे.
महावस्त्र प्रसाद कार्यालय
|
मंदिरातून बाहेर आल्यावर मंदिराच्या प्रांगणातही पाहण्यासारखे
बरेच काही आहे.संपुर्ण मंदिर आणि प्रांगण दगडी फरसबंदीचे आहे.पुर्वी नवस
म्हणून मंदिराच्या भिंतीवर, फरसबंदीवर खांबावर नाणी ठोकली जायची आता ती
नाणी नसली तरी नाणी ठोकल्यामुळे पडलेले खळगे पाहता येतात मंदिरा भोवतीच्या
ओवऱ्यांपैकी दक्षिणेकडील भागास छबिन्याची ओवरी म्हणतात.
खंडोबा, यमाई, लक्ष्मी नरसिंह आणि दत्त मंदिर
|
मंदिराच्या मागील ओवऱ्यांमध्ये यमाई, खंडोबा, लक्ष्मी नरसिंह, दत्तात्रय,
लक्ष्मीनारायण या देवता विराजमान आहेत. मंदिराशेजारील मठात अन्नपुर्णा देवी
आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस जामदारखाना आहे आणि पुढे देवीची छबिन्याची
वहाने ठेवण्याची जागा आहे.
देवीची वाहने
|
सध्या इथे देवीला नेसवल्या जाणाऱ्या साड्यांची पावती आणि देवीचा
प्रसाद देणारे कार्यालय आहे. तसेच पुढे नवसाचे जावळ काढण्याचा ओटा आहे.
तटाच्या भिंतीतच गुप्त दानाची पेटीही आहे.
चिंतामणी
|
मंदिराच्या मागच्या भिंतीला लागूनच इच्छापूर्ती चिंतामणी हे स्थान आहे.
दक्षिणा देऊन, ह्या पाषाणावर हात ठेऊन, आपले इच्छित मागितल्यास जर ते मागणे
पुर्ण होणार असेल, तर चिंतामणी उजविकडे फिरतो. अन्यथा डावा कौल पदरात घेऊन
देवीच्या पायाशी आस ठेऊन पुढे सरकावे. मंदिर प्रांगणातून बाहेर पडण्यचा जो
मार्ग या मार्गावरच मातंगी देवीचे मंदिर आहे. इथेच एक पाण्याचे कुंडही
आहे. त्याला मातंगी कुंड म्हणतात. या कुंडातील पाण्याचा ऋतुमानानुसार रंग
बदलतो अस स्थानिक सांगतात. मातंगी हे जगदंबेचेच रूप देवीने मातंगसूराचा वध
केल्यामुळे ती मातंगी झाली. मंदिराच्या मागील बाजूस तटात छत्रपती शिवाजी
महाद्वार आहे. या दरवाजातून खाली आराधवाडीत मार्ग गेला आहे. इथे उभे राहून
खाली दरीचा आणि आसपास भाग पाहता येतो.
छत्रपती शिवाजी राजद्वार
|
आता आपण मंदिरातील पुजाविधी आणि सोहळे याविषयी माहिती घेऊ.
तुळजाभवानी मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. विशेषतः मंगळवार शुक्रवार
हे देवीचे वार जास्त गर्दीचे असतात. मंदिरात होणारे पुजाविधी आणि आरती यात
भाग घेता यावा म्हणून कित्येक भाविक रांगेत ताटकळत उभे असतात. तुळजाभवानी
मंदिर समितीने रांगेतील भक्तांना आराम मिळावा म्हणून सोयी केल्या आहेत.
रांगांच्या मोठा फेरा पार करून भाविक जगदंबेचे डोळे भरून दर्शन घेतात
तिच्या एका दर्शनातच समस्त संसारतापाचा परीहार झाल्याची अनुभूती घेतात.
तुळजाभवानीचा दिनक्रम अगदी मानवी दिनक्रमास शोभावा असाच आहे. कदाचित ती
विश्वाचा भार वाहणारी आई भक्तांकडून होणारे सोहळे आणि उपचार हसतमुखाने
स्वीकारत असावी.
पहाटे चार वाजता मुख्य प्रवेशद्वारावर सनई चौघडा वाजवून नित्योपचार विधी
सुरू होत असल्याचे जाहीर केले जाते. पूजाविधी संपेपर्यंत सनई चौघडा वाजत
राहतो. जामदार पश्चिमेस असलेल्या शिवाजी महाराज महाद्वारात जाऊन भारतीबुवा
मठाकडे तोंड करून पुजारी आले होऽऽ लवकर याऽऽ असे खड्या सुरात ललकारी देऊन
देवीस बोलावतात.
देवीचा सारीपाट भारतीबुवा मठ
|
असं म्हणतात की भारतीबुवा मठाचे संस्थापक रणछोड भारती देवीचे परमभक्त होते
देवी त्यांच्याशी बोलत असे. सोंगट्यांचा डाव खेळत असे. एकदा खेळताना किती
वेळ गेला हे देवीच्या ध्यानी आले नाही. समस्त भक्त मंडळी आणि पुजारी दर्शन
मिळण्यासाठी ताटकळत राहीले. मग देवीनेच पुजाऱ्यांना पूजाविधीसाठी
बोलावण्याची सूचना केली अशी कथा आहे. पण ललकारी देण्याची ही परंपरा
आजतागायत पाळली जाते. सकाळी साडे पाचला चरणतीर्थ पूजा होते यावेळेस करवार
संस्थांनचा प्रतिनिधी उष्णोदक, गंधलेय, अत्तरतेल, तांबूल घेऊन हजर राहतो.
याच साहित्याने ही पूजा महंत वाकोजीबुवा यांच्या हस्ते होते. या पूजेत मुख
प्रक्षाळतात नंतर चरण धुतात नंतर उपारकर मानकऱ्याकडून आलेला भाजी भाकरीचा
नैवेद्य दाखवला जातो. मराठमुलखीच्या आईची न्याहरी पण तिच्या लेकरांसारखीच
साधी आहे. या मराठमोळ्या न्याहरी नंतर करवीर संस्थानच्या प्रतीनिधी कडुन
आलेला दुधखिरीचा नैवेद्य दाखवतात. त्यासोबत तांबूल देतात.
देवीस नैवेद्य दाखवताना
|
सकाळी नऊ वाजता देवीची अभिषेक पुजा होते. देवीस गोमुखातून आणलेल्या
पाण्याने स्नान घालतात. दही, दुध, पंचामृताने अभिषेक करतात. या वेळी
गाभाऱ्यात जाता येते. भक्तजनही देवीस अभिषेक घालतात. याला भोगी करणे असं
म्हणतात. काही भक्त आमरस, ऊसाचा रस, श्रीखंडानेही सिंहासन भरतात. मुर्तीस
हात लावण्यास मनाई आहे. पुजारीच सर्व सोपस्कार पार पाडतात. देवीला
प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार पानेरी मठाचे महंत आणि सोळा आणे कदम
घराण्यात आहे. देवीच्या पुजाऱ्यांना सोपे म्हणतात. प्रक्षाळ आणि सिंहासन
पुजेसाठी मदतनीस म्हणून पवेकर काम करतात. अभिषेक पुजा नऊ ते बारा या अवधीत
होते. यानंतर देवीस वस्त्रे आणि अलंकार घातले जातात देवीच्या कपाळावर
चंदनाचा मळवट लावून कुंकू रेखले जाते. नंतर महानैवैद्य दाखवला जातो.
यावेळेस आणि भोगीसही आराधी आणि भक्त मंडळी धुप कापुर दाखवून, पोत पाजळून
देवीची गाणी आणि आरती म्हणतात.
सायंकाळी सव्वा सातला पुन्हा पंचामृत अभिषेक होतो. यानंतर देवीची मुर्ती
पुन्हा महावस्त्र अलंकाराने सजवतात. देवीस अष्टगंध कुंकू लावले जाते.
नैवैद्य दाखवून आरती केली जाते.
शिवछत्रपतींंनी देवीस अर्पण केलेला दागिना
|
देवीचा जामदारखाना हा अनेक अलंकारांनी समृद्ध आहे. अनेक भक्तांनी अर्पण
केलेले अलंकार हे आई जगदंबेचे वैभव आहे. देवीस अलंकार घालण्याची आणि ते
जामदार खान्यातून आणण्याची-ठेवण्याची जबाबदारी हमरोजीबुवा मठाची आहे. देवीस
अलंकार करताना आणि उतरवताना या मठाच्या प्रमुखास हजर रहावे लागते.
देवीच्या अलंकाराच्या पेट्या एकूण सात आहेत. यात मंगळसूत्र, मुकूट, पायजोड,
नेत्रजोड, तन्मनी, बिंदीबिजवरा, मोत्याचा कंठा, नथ, चाफेकळ्याची माळ,
बाजूबंद, हरफर रेवड्याची माळ, चंद्रहार, कर्णफुले, जडावाचे छत्र, लेणी,
चांदीच्या खडावा,कानजोड, पुतळ्याची माळ, मोरवंची, सुर्यहार असे अनेक अलंकार
आहेत. यातले महत्त्वाचे म्हणजे शिवरायांनी भवानीला अर्पण केलेली मोहोरांची
माळ. एकशे एक मोहोरा, एकशे तीन मणी असलेला, एका बाजूला राजा शिवछत्रपती
आणि दुसऱ्या बाजूला जगदंबा प्रसन्न असे मोहोरांवर उल्लेख असलेला दीड किलो
वजनाचा हा दोन पदरी अलंकार जगदंबेच्या कंठाची शोभा वाढवतो.
अलंकार पूजा
|
रात्री साडे आठ ते नऊ दरम्यान प्रक्षाळ आणि शेजारती होते. देवीचा गाभारा
आणि सिंहासन गोमुखाच्या पाण्याने धुऊन काढतात. यावेळी पुजारी भावपुर्ण पदे
म्हणतात. यानंतर शेजारती होऊन देवीचा गाभारा बंद करतात. गाभाऱ्याच्या बंद
दरवाजासमोर आरती होऊन मंदिर बंद केले जाते. मंदिराची चावी पानेरी मठाकडे
असते. वरील नित्यक्रमाव्यतिरीक्त इतर अकरा विधी दिवसभरात होतात. देवीच्या
सेवेसाठी सेवेकरी दिवसरात्र झटत असतात. उन्हाळ्यात देवीला उकाडा जाणवू नये
म्हणून पलंगे तीन महिने हातात पंखा घेऊन देवीला वारा घालण्याची सेवा करतात.
याशिवाय चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत देवीला रोज
नैवेद्यात सरबतही दिले जाते. सरबतासाठी लिंबू पुरवण्याचे काम वंशपरंपरेने
भिसे आणि दिक्षीत घराण्याकडे आहे. देवीच्या मस्तकी मुकूट बसवण्यापुर्वी
पानांची चुंबळ लावतात. ही पाने पुरवण्याचे काम तांबोळी या मुस्लिम
घराण्याकडे आहे. ते माळ पोत परडीही पाळतात. नवरात्रात हे घराणे स्वगृही
घटही बसवते. देवीचा नगारा वाजवण्याचे काम जाधव घराण्याकडे, सनई चौघडा
वाजवण्याचे काम न्हावी समाजाकडे आहे. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवण्याचे
काम करतात. देवीच्या पलंगाची सेवा पलंगे यांच्याकडे असते. देवीला चंदनाच्या
गंध हमरोजीबुवा मठातर्फे पुरवला जातो.
ग्रहणकाळात देवीचे सोवळे
|
ग्रहण काळात देवीला सोवळ्यात ठेवले जाते. देवीला श्वेत वस्त्र नेसवले जाते.
ग्रहणकाळात क्षेत्रोपाध्ये देवीच्या सप्तशती पाठाचे वाचन करतात. देवीच्या
गाभाऱ्यासमोर चोपदार आणि दरवाजासमोर भोपे पुजारी सोवळ्यात बसतात. याशिवाय
गणेश, नृसिंह, दत्त मंदिरही सोवळ्यात असते. ग्रहण सुटल्यानंतर नित्य
पुजाविधी सुरु होतात. देवीजवळचे निर्माल्य विसर्जित केले जाते. ग्रहणादिवशी
नित्य पूजाविधींच्या वेळेत बदल केले जातात.
मंदिराचा कारभार शासनाकडे गेला असला, तरी देवीची पूजाअर्चा कदम घराण्यातील
सोळा घरांकडे आहे. यानंतर भोपे पुजारी आणि इतर घराणी जी नवससायास पार
पाडतात त्यांना पाळीकर पुजारी म्हणतात. या दोन्ही पुजाऱ्यांमध्ये
उत्पन्नावरून वाद झाले होते. तत्कालीन हैदराबाद संस्थानाच्या धार्मिक
विभागाने हा वाद सोडविण्यासाठी १९१९ साली देऊळ ए कवायत नावाचा कायदेवजा
करार केला आणि पुजारी आणि मानकऱ्यांनी कोणत्या सेवा कराव्यात त्यांचे
अधिकार, त्यांचे उत्पन्न स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत याच कायद्याने
कारभार चालत आलेला आहे. आता सरकारी नियमाने ह्या कायद्यात बदल होणार आहेत.
तुळजापूरातील पुजाऱ्यांंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते आपल्याकडे आलेल्या
भक्तांची लेखी नोंद ठेवतात. काही भक्तांचे ठराविक पुजाऱ्यांंकडे येणे
ठरलेले असते. त्यामुळे आपल्या वंशजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी
पुजाऱ्यांंची बाडे उपयोगी ठरतात. पुजारी त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांची
राहण्या-खाण्याची व्यवस्था स्वतः करतात.
देवीचा छबिना
|
तुळजा भवानी मंदीरात छबिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर मंगळवारी,
शुक्रवार, गुढीपाडवा, बलिप्रतिपदा, श्रीमाळषष्ठी, मकर संक्रांत, रथसप्तमी,
नवरात्रीचे सर्व दिवशी, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौर्णिमेला आणि
पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रात्री देवीचा छबिना निघतो. मंदिरात देवीची
मोर, हत्ती, घोडा,सिंह, बैल अशी लाकडी वाहने आहेत. त्यात मेघडंबारी बसवून
देवीच्या चांदीच्या पादुका ठेवतात. वाहने सजवली जातात आणि मंदिर परीसरात
अब्दागिऱ्या,छत्र यासह थाटात छबिना काढला जातो. सेवेकरी चवऱ्या ढाळत असतात.
अनेक आराधी पोत परडी घेऊन हजर असतात. माळ आणि कवड्यांच्या पोषाखात
भोपेमंडळी असतात. मंदिराभोवती प्रदक्षिणा सुरु होते. संबळ कडाडू लागते. गोट
चोंडक झांज वाजू लागतात. यावेळेस महाद्वारावरील सनई चौघडा, नगाराही
वाजविला जातो. भुत्ये पोत नाचवू लागतात. आराध्यांच्या अंगात वारे घुमू
लागते. अवघा आसमंत "आई राजा उदो उदो ऽऽ" "सदानंदीचा उदो उदो ऽऽ" असा
उदेकाराने भारून जातो. अंगात संचार झालेल्या आराध्यासमोर भक्तगण
प्रश्ननोत्सुक होतात. आई जगदंबे पणकळा कधी होईलॽ तोही मग गळेल तेव्हा कळेल
रे ऽऽ अशा थाटात उत्तरे देतो. असा हा जगदंबेचा वैभवशाली सोहळा वर्षानुवर्षे
असाच थाटात पार पडत आला आहे.
तुळजाभवानी मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीचा निद्राकाल.
देवीचे तीन निद्राकाल आहेत.
१) घोर निद्रा :- हा भाद्रपद कृष्ण नवमी ते अमावस्या असा आहे.
२) श्रम निद्रा :- हा निद्राकाल अश्विन शुक्ल एकादशी ते चतुर्दशी असा आहे.
३) मोह निद्रा :- हा निद्राकाल पौष शुक्ल द्वितीया ते सप्तमी असा आहे.
शेजघरातील पलंग सफाई आणि गादीसाठी कापूस साफ करताना
|
देवी गाभाऱ्याशेजारी शेजघरात असलेल्या पलंगावर अश्विन नवरात्राआधी आठ दिवस
निद्रा घेते. अश्विन नवरात्रानंतर पाच दिवस माहेर वरुन आलेल्या पलंगावर
निद्रा घेते. शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान आठ दिवस शेजघरातील चांदीच्या
पलंगावर निद्रा घेते. असा एकूण एकवीस दिवसाचा देवीचा निद्राकाल असतो.
निद्राकालात देवीस अभिषेक होत नाहीत. आंचोळा भिजवून त्याने देवीची मुर्ती
स्वच्छ पुसून घेतात आणि दोन वेळेस देवीला सुगंधी तेल लावले जाते. देवीच्या
निद्रकालासाठी शेजगृह स्वच्छ केले जाते. पलंग सज्ज करण्याआधी पलंगावरील
गादी तयार केली जाते. गादीसाठी लागणारा कापूस साफ करायला भक्तजन, आराधी आणि
गावातील महिला आनंदाने सहभागी होतात. कापूस साफ करताना महिला देवीची विविध
गीते गातात देवीची स्तुतीपर कवने म्हणतात गादीचा कापूस पिंजण्याचा मान
बाशुमिया शेख पिंजारी यांच्या घराण्याकडे आहे. गादी भरण्याचा मान अच्युत
कुलकर्णी यांच्याकडे आहे. देवीच्या पलंगावर चार गाद्या टाकल्या जातात.
देवीचा निद्राकाल
|
हिंदु मंदिरामध्ये स्थापित मुर्ती हलवली जात नाही. पण तुळजापूर हे देवस्थान
एकमेव असे आहे जिथे चल मुर्ती आहे. म्हणजे मुर्ती गाभाऱ्यातून काढून
पुन्हा स्थापित केली जाते. देवीच्या मुर्तीला खालच्या बाजूस सहा इंच
लांबीचा क्रूस आहे. सिहासनाला असलेल्या खाचीत हा क्रूस घालून मुर्ती मेणाने
घट्ट बसवली जाते. मुर्ती काढल्यानंतरही खाच मेणाने भरुन काढतात. यासाठी
तीन मुठी मेण लागते. मेण पानेरी मठ पुरवतो. सायंकाळी अभिषेक झाल्यानंतर,
देवीस कणिक पासून तयार केलेल्या दिव्यांनी ओवाळले जाते. यावेळेस विड्यासह
अनेक वस्तू भोप्यांच्या ताटात असतात. देवीच्या मुर्तीस भंडारा अर्पन
केल्यानंतर, मुर्तीस गाभाऱ्यातून आणून शेजघरातील मंचकावर निजवले जाते. या
कालावधीत स्थानिक भक्त, पुजारी जोगवा मागत नाहीत. निद्राकालात देवीचा छबिना
काढत नाहीत.
आराधी
|
देवीच्या पुजाऱ्यांप्रमाणे देवीचे उपासक आराधीही महत्त्वाचे आहेत. देवीचा
महिमा आणि स्तुती कवने गात आजीवन देवीची उपासना करतात. अंगात अघळपघळ झगा,
डोक्यावर कवड्याचा टोप, कमरेला कवड्यांचा पट्टा, गळ्यात कवड्यांच्या माळा,
दंडावर कवड्यांचे बाजुबंद, खांद्याला तेलाची बुधली, कपाळी मळवट एका हातात
पोत, दुसऱ्या हातात परडी अशा रुपात देवीच्या नावाने जोगवा मागणारे आराधी
भक्त देवीस प्रिय आहेत. आराध्यांच्या प्रत्येक वस्तूला एक अर्थ आहे.
हातातील पोत हा पंचमहाभूतांचा देह आहे, त्याची ज्योत म्हणजे देहाचे चैतन्य,
ज्योतीवर दिले जाणारे तेल म्हणजे प्राणवायू, हातातील परडी म्हणजे उदर,
गळ्यातील कवड्याची माळा म्हणजे सत्कर्माची माला, आणि कपाळीचा मळवट म्हणजे
कर्मफल.
माळ परडी आणि पोत
|
अनेक देवी भक्तांच्या घरी माळ परडी असते. ही माळ, परडी देवीस प्रिय आहे.
परडीमध्ये जोगवा मागितला जातो. परडी म्हणजे ताट आणि त्यात वाटीसारखे एक
पात्र असते त्यास परसराम (परशुराम) म्हणतात. पुर्वी परडी रोग दूर करण्याचे
महत्त्वाचे साधन मानले जाई. लिंबू, हळदी कुंकू, प्रसाद परडीत घेऊन दुसरीकडे
नेऊन विसर्जित केली जाई. परडी भरणे हा एक विधी आहे. होमकुंडाजवळ अनेक
महिला आजही मीठापीठाने परडी भरतात. सत्तावीस नक्षत्र म्हणजे परडीचे
सत्तावीस कट, पृथ्वीप्रमाणे परडीचा वेज गोल, चंद्राप्रमाणे परसराम पात्र
आणि सुर्याप्रमाणे पोत आहे. मातंगी देवीची गुरू मानतात, म्हणून परडी घेणारे
गुरु करतात आणि मग त्याच्या हस्ते विधीपूर्वक परडी घेतात. देवीचे भोपे आणि
आरधी उपासना स्वीकरणारे, ज्या घरात माळ परडी परंपरेने अथवा नविन आली आहे.
तेच गळ्यात कवड्याची माळा धारण करतात. हे दिखाव्याचे साधन नाही. कुलाचाराचा
भाग आहे. कवडी सृजनाच प्रतीक मानतात. भारतीबुवा मठात शिव आणि पार्वती एकदा
सारीपाट खेळत होते. त्यावेळेस नारद तेथे आले त्यांनी देवीस तुम्हास कवडी
का प्रिय आहे? असा प्रश्न केला. तेव्हा शिवाने सारीपाटावरील एक कवडी देऊन,
तीच्या वजनाइतके धन देवलोकातून आणण्यास सांगितले. नारदांनी त्याप्रमाणे
केले देवलोकातली सकल संपत्ती इंद्राच्या मुकूटासह तोलूनही कवडीच्या
भाराइतकी झाली नाही. अशी कथा आहे. पुर्वी लोक व्यवहारात चलन म्हणून कवडी
वापरत होते. देवीच्या कवड्याच्या माळेचेही प्रकार आहेत.
१) महालक्ष्मी कवडी
२) अंबिका बट कवडी
3) येडेश्वरी कवडी
४) यल्लमा कवडी
परडी असणारे भक्त पाच घरची भिक्षा मागतात. यामागे देणाऱ्याचे कल्याण होवो
त्यास कशाची कमतरता नसो हा अशिर्वादही आहे. घरात सुतक, विटाळ झाला असेल तर
माळ परडी तुळजापुरात येऊन नवीन घ्यावी लागते. आधीची परडी होमकुंडात
विसर्जित करतात नवीन पोत करताना महिला पोतासाठी कापड वळत, देवीची गाणी
म्हणतात. याला पोत वळणे अस म्हणतात.
गोंधळाचा पार
|
देवीच्या दारात घातला जाणारा गोंधळ हा महाराष्ट्राचा कुळधर्म कुलाचार आहे.
आपल्याकडे नवीन लग्न झाल्यावर कुलदेवतेचा गोंधळ घालतात. नवरात्रात अनेक
देवस्थानी गोंधळाचे कार्यक्रम होतात. काही भक्तांकडे कुलदेवतेची घराण्यावर
कृपा राहावी म्हणून ठराविक काळात गोंधळ घालण्याची प्रथा आहे. तुळजापूरात
गोंधळाचा पार आहे. इथे भाविक, नविन लग्न झालेले किंवा काही कारणास्तव
लग्नाचा गोंधळ राहून गेलेले गोंधळाचा कुलाचार करून घेतात.
गोंधळी
|
गणांचे दल जे विधी नाट्य सादर करतात त्याला गोंधळ म्हणतात. गौंडली, गुंडली,
गोंडली असे नामभेद संगीत रत्नाकर, नृत्य रत्नावली, औमापातम वगैरे ग्रंथात
आलेले आहेत. गोंधळाचा संबंध भूमातेच्या उत्सवाशी जोडला जातो. कल्याणीचा
चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय याने आपल्या राजधानीत भूतमातृ महोत्सव प्रसंगी
गोंधळाचे आयोजन केले होते. रा. ची. ढेरे यांच्या लोकसंस्कृतीचे उपासक या
ग्रंथात याविषयी विस्तृत विवेचन केलेले आहे.
मुख्य गोंधळ्यास नाईक म्हणतात सोबत संबळवाले, तुणतुणेवाला, मंजिरीवाला,
तीन-चार सुरत्ये असा गोंधळी सरंजाम असतो. सफेद बाराबंदी, धोतर, डोक्यावर
कणगीदार पगडी, भाळी मळवट, गळ्यात कवड्याच्या माळा आणि टाक असा गोंधळ्यांचा
जामानिमा असतो. गोंधळ्यांचे रेणुराई आणि कदमराई हे दोन प्रकार आहेत.
रेणुराई हे माहुरच्या रेणुकेचे तर कदमराई हे तुळजाभवानीचे गोंधळी आहेत.
कदमराई गोंधळ्यांना आख्यानाचा गोंधळ करतात. यात गण, गौळण, आख्यान, आरती असा
क्रम असतो. आख्यानाचा विषय मुख्यतः रामायण, महाभारत आणि पौराणिक कथा असा
असतो. ह्या गोंधळ्याना म्हणून हरदासी गोंधळी ही म्हणतात. गोंधळाचे अज दोन
प्रकार रूढ आहेत. काकड्या गोंधळ आणि संबळ्या गोंधळ. काकड्या गोंधळ
कोणत्याही जातीचे लोक करु शकतात. पण संबळ्या गोंधळ फक्त गोधळी जातीचे लोकच
करतात. गोंधळाचे पुर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात. पहिल्या भागात
पूजा, गण, गवळण, आवाहन, नमन असते. तर दुसऱ्या भागात आख्यान, गायन आणि
सादरीकरण, आरती आणि भाग उतरवणे असते.
रेणुकामहात्म्य ग्रंथात एक कथा येते की परशुरामाने बेटासुराचा वध करून
त्याच्या मस्तकाचे चोंडक हे वाद्य बनवून पहिले मातृवंदन केले तोच हा गोंधळ.
तर काही ठिकाणी चंड आणि मुंड या दैत्यांचा देवीने वध केल्यानंतर
परशुरामाने त्यांच्या मस्तकाचे संबळ वाद्य बनवून देवीचा गोंधळ घातला अशी
कथा सांगितली जाते.
तर असा हा जगदंबेचा दिनक्रम आणि इतर माहितीचा आढावा.
तुळजाभवानी मंदिरात अनेक सण उत्सव साजरे होतात त्यापैकी काही महत्त्वाचे सण.
कळसावरील गुढी
|
गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. एका नविन संवत्सराची सुरुवात
तुळजाभवानी मंदिरात पहाटे चार वाजता चरणतीर्थ पुजा होते. यावेळेस देवीला
भाविकांनी अर्पण केलेला साखरेचा हार घालतात.
देवीस साखरेचा हार अर्पण
|
मंदिर संस्थानतर्फे सेवेकऱ्यांना कळसाची अब्दागिरी, महावस्त्र देण्यात
येते. चरणतीर्थ पूजेनंतर महंत तुकोजीबुवा अब्दागिरीवर फुलाने पाणी शिंपडून
चंदनाचा गंध, हळद कुंकू, गुलाल, अष्टगंध, बुक्का, अक्षता वाहतात.
अब्दागिरीला देवीला नेसवलेले वस्त्र आणि खण लावून, लिंबाचा डहाळा आणि
साखरेचा हार घालतात. सुर्योदय समयी गुढी मंदिराच्या छतावर मुख्य शिखरासमोर
लावतात.
राम मंदिरातील मुर्ती
|
रामनवमीला मंदिर संस्थानकडून, राम मंदिरात पुजेसाठी दुपारी बारा वाजता
गुलाल, खडीसाखर, रामफळ साखरेचा हार, नारळ वगैरे पुजा साहित्य येते. मंदिर
संस्थानचे व्यवस्थापक या पुजेस हजर असतात. या उत्सवास एक हजार एक रुपये
मंदिर संस्थानकडून देण्यात येतात.
नागपंचमीला पहाटे चरणतीर्थ पुजा झाल्यानंतर, भवानी शंकराचे पुजारी गुरव,
इनामदार होमासमोर भवानी शंकराचा पितळी नागफणा ठेवतात. त्यांच्यासमोर
चिखलाची नागदेवता बनवून मांडतात. स्थानिक महिला नागोबाला दुध,लाह्या,
उकडलेले कानवले, दोऱ्याचे पवते अर्पण करतात. मग पूजा आरती होते. संध्याकाळी
सहा ते सव्वा सहा दरम्यान उत्तरपूजा होते. यावेळेस चौघडा वाजवला जातो.
उत्तरपूजेनंतर नागोबाचे कल्लोळ तीर्थात विसर्जन होते.
तुळजाभवानी मंदिरात दोन नवरात्र मोठ्या धुमधडाक्यात साजरे होतात. शारदीय
नवरात्रौत्सव आणि शाकंभरी नवरात्रौत्सव. नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी
भाविकांची अलोट गर्दी होते. उत्सवानिमित्त मंदिर परिसर धुवून काढला जातो.
मंदिरातील महाद्वारांना केळ्याचे फड आणि आंब्याच्या पानांची तोरणे बांधली
जातात. नवरात्राआधी देवीचा निद्राकाल असतो. तो निद्राकाल संपून देवीची
सिंहासनावर पहाटे एक वाजता प्राणप्रतिष्ठा केली जाते. दोन अडीच दरम्यान
देवीची अभिषेक पूजा होते. सहा वाजता पुजेचा घाट झाल्यानंतर नेहमीचे विधी
सुरू केले जातात. देवीची अभिषेक पूजा आणि नंतर वस्त्र अलंकार केले जातात.
त्यानंतर धुपारती होऊन अंगारा काढतात. यावेळेस महंत तुकोजीबुवा, देवीचे कदम
पुजारी भोपे आणि अन्य कर्मचारी हजर असतात.
देवीचा ,त्रिशूळाचा,मातंगीचा घट
|
यादरम्यान कुंभार तीन मातीचे घट आणून गोमुखाजवळ ठेवतात. इथे मंदिर
संस्थानचे व्यवस्थापक, महंत, सेवेकरी, पुजारी घटाची पुजा करतात. देवीच्या
मुख्य गाभाऱ्याच्या ईशान्य कोपऱ्यात घटस्थापनेसाठी माती आणून वेदिका तयार
केलेली असते. पुजा केलेले घट मग वाजता गाजत मंदिराकडे नेले जातात. निंबाळकर
दरवाजात मातंगी देवीचा घट थांबवितात. हा घट मांतगी मंदिरात नेतात.
त्रिशूळाचा घट पाच पायऱ्या उतरून प्रदक्षिणा मार्गाने त्रिशूळाकडे पाठवतात.
आणि मुख्य घट गाभाऱ्यात नेतात. अशाप्रकारे एक कलश तुळजाभवानी मंदिरात, एक
कलश मातंगी देवी जवळ आणि एक त्रिशूळ ओवरीत स्थापन केला जातो.
घटाची मिरवणूक
|
नंतर पुजारी, महंत, अध्यक्ष गोमुख आणि कल्लोळ तीर्थाला प्रदक्षिणा करून,
घाटीखाली सभामंडपात जाऊन गणपती पूजा करतात आणि ब्रम्हवृंदास अनुष्ठानाची
वरणी देतात. घटावर लावण्यासाठी लागणाऱ्या माळेला फुले पुरवण्याचे काम
चिलोजीबुवा मठाकडे, घाटाजवळ अखंड जळणाऱ्या दिव्याला तेल पुरवण्याचे काम
तेलकठ्यांकडे तर घटाची पुजा महंत तुकोजीबुवा आणि कदम घराण्यातील
पुजाऱ्यांकडे असते.
मंदिरातील घटस्थापना
|
प्रतिपदेपासुन धर्मशाळा येथे ब्राम्हण भोजन, अन्नदान सुरु होते. प्रतिपदा
ते नवमी देवीस आणि गावातील सर्व देवतांना नैवेद्य दाखवला जातो. वरणीसाठी
म्हणजे नवरात्रीत पाठ, जप, अनुष्ठान करणारे ब्राम्हण नेमले जातात. वरणाच्या
ब्राम्हणाला घटे म्हणतात. मंदिरात सप्तशती पाठ, तुळजा सहस्र नाम,
नवग्रहजप, देवी पुराण, मुळ मंत्र जप वगैरे आयोजन होते. मंदिरातील
घटास्थापनेनंतर मंदिर पररिसरातील उपदेवतांसोबत काळभैरव, टोळभैरव, पापनाशक
तीर्थ, मठातील अन्नपुर्णा देवी, रामवरदायीनी, घाटशीळ येथेही घटस्थापना
होते. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने गावातील मुख्य पुजारी, सेवेकरी,
गोंधळी आणि इतर मानकऱ्यांना छोट्या कलशांचे वाटप केले जाते. नवरात्रात रोज
रात्री छबिना निघतो. छबिना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. नवरात्र
उत्सवात देवीची अलंकार महापुजा पाहण्यासारखी असते. गुढीपाडवा, शिराळतळी,
ललितापंचमी ते अष्टमी, बलिप्रतिपदा, रथसप्तमी या दिवशी अलंकारपूजा होते
नवरात्रात अलंकार पूजा खास बांधली जाते
रथ अलंकार महापुजा
|
अश्विन शुद्ध ४ रथ अलंकार महापुजाः- सुर्यनारायणाने त्रिलोक भ्रमणासाठी देवीस आपला रथ दिला. याची आठवण म्हणून ही पूजा बांधतात.
मुरली अलंकार महापुजा
|
अश्विन शुद्ध ५ मुरली अलंकार महापूजाः- देवीस श्रीकृष्णाने मुरली अर्पण केली होती. त्यानिमित्ताने ही पूजा होते
शेषशय्या अलंकार महापुजा
|
अश्विन शुद्ध ६ शेषशय्या अलंकार महापूजाः- श्री विष्णु योगनिद्रेत असताना
त्यांच्या कानातून मधु आणि कैटभ हे राक्षस निर्माण झाले. त्यांंनी विध्वंस
आरंभला. त्यांना रोखणे ब्रम्हदेवास अशक्य होते त्यानी देवीची आराधना करून
देवीला श्री विष्णुस जागे करण्याची विनंती केली. पुढे विष्णुने या
दैत्यांचा वध केला आणि देवीस शेषशय्या अर्पण केली यामुळे देवीची ही पूजा
केली जाते.
भवानी तलवार अलंकार महापुजा
|
अश्विन शुद्ध ७ भवानी तलवार अलंकार महापूजाः- शिवाजी महाराजांना देवीने
भवानी तलवार दिली ही मान्याता आहे. त्यामुळेच ही पूजा केली जाते.
भवानी अलंकार महापुजा
|
अश्विन शुद्ध ८ महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजाः- देवीने
महिषासुराचा वध केला. त्यासाठी ही पूजा करतात. या दिवशी अष्टमीचा होम होतो.
होमकुंडावर ब्रम्हवृंद होमाची सज्जता करतात. यजमान अध्यक्ष सपत्नीक
होमासाठी बसतात. समीधा, चंदन, धूप याने होम प्रज्वलीत केला जातो. होमात
शुद्ध तूप, भात, तीळ, पायस यांची आहुती होते. सप्तशती, तुळजासहस्त्रनाम,
भवानीसहस्त्रनाम इत्यादींचे स्वाहाकार झाल्यानंतर पुर्णाहुती होते.
अष्टमीचा होम होमकुंड
|
पुर्णाहूतीसाठी एका कोहळ्यास तांबडा तापता गुंडाळलेला असतो. तो वेळुच्या
सुपात ठेवतात. ब्राम्हणांनी सप्तशतीचा चौथा अध्याय पुर्ण केला आणि
पुर्णाहुती झाली की हा कोहळा होमात अर्पण केला जातो. यादिवशी अजाबळी दिला
जातो.
अजाबली विधी होमकुंड
|
होमसमाप्तीस एक मेंढा होमकुंडावर आडवा धरुन मधोमध कापला जातो. हे दृष्य
अंगावर काटा आणणारे असते. नंतर नारळ, भोपळे, काशीफळे, काकडी आहुती म्हणून
होमात टाकतात. आसुरी शक्तींना संतुष्ट करण्यासाठी हा बळी असतो. बळीसाठी
मेंढा मौजे सिंदफळ येथील लांडगे हे धनगर देतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी
अनेक भाविक गर्दी करतात. बळी आणि होमाच्या पुर्णाहूती नंतर नवरात्राचा
उपवास सोडतात.
अश्विन शुद्ध नवमीला देवीची नित्यपूजा झाल्यावर होमावर धार्मिक विधी होतात. दुपारी बाराला घटोत्थापन होते.
वरील कालावधीत रात्री प्रक्षाळपूजेनंतर पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला जातो.
पानघर पूजा
|
देवीला विड्याच्या दोन हजार पानांचे घर बांधतात. याला पानघर पूजा म्हणतात.
मंदिरात सुवासिनी हळद कुंकवाचा सडा घालतात. सौभाग्य बळकट रहावे ही भावना
यामागे असते.
देवीची पालखी
|
यादिवशी विजयादशमीला देवीची मिरवणूक ज्या पालखीतून निघते ती पालखी देवीच्या
माहेरहून म्हणजे नगर भिंगार येथील बुऱ्हाणनगर येथून येते. पालखी आणण्याचा
मान भिंगारच्या जनकोजी भगत या तेली घराण्याकडे आहे. जनकोजीस प्रसन्न होऊन
देवीने त्याच्या घराण्याकडून आलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करीन आणि तु
आणलेल्या पलंगावर निद्रा घेईन. असा आशिर्वाद दिला होता. यांचे वंशज आजही
पालखी आणण्याची कामगिरी पार पाडतात. जनकोजीने पालखीचा मान स्वकुटुंबाकडे
ठेवला आणि पलंगाचा मान बहिण हडकोबाई हिच्या कुटुंबाकडे दिला. हेच ते नगरचे
सबजेल चौकात राहणारे पलंगे कुटुंब. पालखी राहूरीतच बनवली जाते. फार पुर्वी
पालखी नगरजवळील हिंगणगावला तयार व्हायची. पण अहिल्याबाई होळकरांचे एक सरदार
घोगरे यांनी तो मान आपल्याकडे घेऊन, स्वतःच्या जहागिरीत राहूरीत पालखी
बनवायची प्रथा सुरु केली. पालखी बनवण्याचे काम पवार या सुतार घराण्याकडे
आहे. पालखीची खिळेपट्टी करणे रणसिंग घराण्याकडे आहे. पालखीसाठी लागणारे खास
लाकूड मेहेत्रे घराणे पुरवते, तर पालखी ठेवण्यासाठी घोंगडी खेडेकर घराणे
पुरवते. पालखीच्या दांड्याचे लाकूड शेख कादर बादशहा यांचे घराणे देते.
पालखीचे उभे लाकूड ज्याला शिपाई म्हणतात ते लाकूड कदम देतात. पालखीच्या
खालच्या बाजूस बोरीचे लाकूड असते आणि बाकीची पालखी सागवानी असते. लाकडाची
कताई करण्याचे काम भांड हे धनगर घराणे करते. पालखी तेथून प्रस्थान करते
समयी पानसुपारीचा कार्यक्रम होतो. पान पुरवण्याचे काम तांबोळी करतात.
पुर्वी मुळा नदीस मोठा पूर येई. त्यावेळी पालखी नदीपार करण्याचा मान लोहारे
आणि कोळी यांच्याकडे होता. तेथून पालखी पलिकडे देसवंडे गावात डोहार घराणे
नेतात. पालखी पूजन करून फेटा स्विकारण्याचा मान शेते या मराठा घराण्याचा
आहे. धोंडीबा घोगरे यांनी पालखी मंदिरासाठी जागा दिली होती या पूजेत
त्यांचे मानाचे स्थान आहे. तिळवन तेल्यांच्या येथे सार्वजनिक भोजन होऊन
सुपा, पारनेर, हिंगणगाव ते नगरपर्यंत पालखी पायी जाते. नगरवरून पालखी
रेल्वेने आणि पुढे गाडीतून तुळजापूरात आणली जाते.
देवीच्या पलंगाच्या अहमदनगर ते तुळजापूर प्रवास
|
याच वेळी शिलांगणानंतर देवी श्रम निद्रेसाठी ज्या पलंगावर असते तो पलंगही
तुळजापूरात आणला जातो. हा पलंग आणण्याचा मान अहमदनगर मधील पलंगे घराण्याचा
असतो. हा पलंग तयार करण्याचा मान आंबेगाव-घोडेगाव मधील ठाकूर घराण्याकडे
आहे. पलंग जोडण्याचा मान भागवत घराण्याकडे आहे. पलंग बनवण्याचे सर्व
साहित्य पलंगे पुरवतात. खरे तर पलंगेच पुर्वी पलंग बनवत होते. पण राजमाता
जिजाऊ यांच्या नवसपूर्तीनंतर हा मान ठाकूर कुटूंबाला मिळाला. पलंग तयार
झाल्यानंतर वाजता गाजत तुळजापुराकडे निघतो हा प्रवास जुन्नर, नारायणगाव,
आळेफाटा, पारनेरमार्गे नगर असा होतो. जुन्नरला पलंग पोहोचल्या नंतर
शिवनेरीच्या पायथ्याला तेली बुधवारपेठ येथे आणतात. इथे पलंगावर गादी
स्थापना होते. अशा प्रकारे महिनाभराच्या प्रवासानंतर पलंग तुळजापूरात येतो.
शुक्रवार पेठेतील पलंग विसाव्याचा कट्टा
|
शुक्रवार पेठेतील जनकोजी देवकर तेली यांच्या समाधीजवळ रात्री बारा वाजता
पलंग आणि पालखीची भेट मंदिर संस्थानचे अध्यक्ष कलेक्टर यांच्या छबिना
पूजनाने होते. मग सवाद्य पलंग पालखी मंदिराकडे आणतात.
माय मोहर्ताब मुखवटा आणि मानकरी क्षिरसागर
|
तुळजापुरातून कर्जतला माय मोरताब मंदिरात सीमोल्लंघनाचे आमंत्रण जाते. देवी
लहानपणी कर्जतच्या क्षिरसागर कुटुंबात अंबिका नावाने राहिली होती. तिथून
त्यांना मुळ रूपात दर्शन देऊन देवी अंतर्धान पावली. तीचे माय मोरताब नाव
झाले. घटाच्या पाचव्या माळेला माय मोरताब (काठीला बांधलेला देवीचा मुखवटा)
तुळजापूरला यायला निघते. तुळजापूरात देवीचे जिल्हाधिकारी स्वागत करतात आणि
वाजत गाजत तीला मंदिराकडे घेऊन जातात. देवी मंदिराबाहेर थांबते. माय
मोरताब सीमोल्लंघन मिरवणुकीत अग्रभागी असते. तिला अंबादास क्षिरसागर घेऊन
येतात. यामागे जगदंबेची पालखी मग पलंग आणि नंतर दिवटी असा मिरवणूकीचा क्रम
असतो
श्रीदेवीस १०८ सुती साड्यांचे दिंड
|
अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा. नवरात्राची सांगता होते आणि मंदिर परीसर
विजयदशमीच्या धामधुमीत जागा होतो. भल्या पहाटे देवीची नित्यापुजा होते.
मंदिरात जगदंबेच्या शिलांगणाची तयारी सुरु होते. देवीस १०८ सुती साड्यांचे
दिंड बांधतात. देवीमुर्तीच्या सुरक्षिततेसाठी हे दिंड असते. भक्तांना
दर्शनासाठी फक्त देवीचे मुख उघडे ठेवतात. देवीच्या मुर्तीसमोर जनकोजी
तेल्याचे वंशज सिमोल्लंघनाला निघण्याची प्रार्थना करतात. महंत, पुजारी,
सेवेकरी देवीची मुर्ती गाभाऱ्यातून बाहेर आणून पालखीत बसवतात. बार्शी
तालुक्यातील आगळगाव आणि गोमाळ्याचे लोक पालखी उचलतात. अपसिंगे गावचे डांगे
श्रींच्या मस्तकी छत्र धरतात. सोबत अब्दागिऱ्या असतात. सेवेकरी चवऱ्या ढाळत
असतात. पालखी प्रदक्षिणेस निघते. "आई राजा उदो उदो", "तुळजाभवानी की जय"
असा गजर उठतो. कुंकवाची उधळण होते. फुलांचा वर्षाव होतो. वाद्यांचा कल्लोळ
उठतो. पालखी पुढे माय मोरताब घेऊन क्षीरसागर चालतात. पालखी मागे दिवटी घेऊन
राम सुतार चालतात. आराधी भुत्ये पोत नाचवित देवीची गाणी म्हणत चालतात.
भालदार चोपदार, भाट ललकाऱ्या देतात. देवीस दृष्ट लागू नये म्हणून भोपे
पुजारी घरातल्या महिला लिंबलोण करतात. मंदिराभोवती प्रदक्षिणा झाल्यावर
पालखी
श्रीचा पालखी सोहळा
|
होमकुंडाजवळील पिंपळाच्या पारावर विसावते. यावेळी देवीस ओवाळून भोपे पुजारी
मानाच्या आरत्या म्हणतात आणि साखरभाताचा नैवेद्य दाखवतात. यावेळेस मंदिर
संस्थानाकडून क्षिरसागर आणि सुतार यांना पुर्ण पोषाख सत्कार होतो. इतर
मानकऱ्यांचेही सत्कार होतात. देवीची मुर्ती उचलून मंदिरात नेतात. देवीस
केलेले दिंड सोडतात आणि अहमदनगर वरून आणलेल्या पलंगावर देवीस निजवले जाते.
इथून पुढे देेेवीचा पाच दिवसांचा श्रम निद्राकाल सुरु होतो. शेवटी पालखीचा
दांडा काढून जूनी पालखी आणि पलंग मोडून होमकुंडात टाकतात. पालखीचा दांडा
सोडून या वस्तू दरवर्षी नवीन बनवल्या जातात. हा दांडा
दर्शनासाठी बुऱ्हाननगरला ठेवला जातो. अशा थाटात जगदंबेचे सीमोल्लंघन पार
पडते.
मागच्या भागात आपण तुळजाभवानी मंदिरात साजऱ्या होणाऱ्या नवरात्राचा थाट अनुभवला. आता पुढे इतर सणांचाही आनंद घेऊ.
कोजागरीची फुलांची सजावट
|
तुळजाभवानी मंदिरात होणारा शारदीय नवरात्रौत्सव आपण पाहिला. शिलांगण खेळून
देवी पाच दिवस अहमदनगर वरून आलेल्या पलंगावर श्रमनिद्रा घेते. अश्विन शुद्ध
पौर्णिमेला (कोजागरी पौर्णिमा) देवीचा निद्राकाल संपतो. पहाटे तिची
सिंहासनावर प्रतिष्ठापना होते आणि नित्यपूजा उपचार पार पाडले जातात. या
दिवशी आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर परीसर खुलून जातो. ही सजावट
पुण्याचे फुलांचे व्यापारी आर. आर. खिरात करतात. सातशे ते हजार किलो फुले
या सजावटीस लागतात.
कोजागिरी निमित्त देवीच्या गाभाऱ्याची सजावट
|
तुळजापूरात कोजागिरी पौर्णिमा महत्त्वाची मानतात. या दिवशी लाखो भाविक
कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून देवीच्या दर्शनासाठी येतात. बार्शी,
उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील भाविकांचा मेळाही त्यात असतो.
सोलापूरच्या शिवलाड काठ्या
|
याच वेळेस सोलापूरच्या जगदंबा देवी देवस्थानच्या मानाच्या शिवलाड तेली
समाजाच्या काठ्यांचे तुळजापूरात आगमन होते. या काठ्या ३० फूट उंच असतात.
काठीचे वजन अंदाजे १०० किलो असते. काठीला चांदीच्या ९ हारड्या ९ पाटल्या
आणि कळस असतो. काठीला कमरे भोवती चादर आणि पटाव लावून उभे धरले जाते. काठी
वाहकांचा शुभ्र धोतर, बाराबंदी, डोक्यावर फेटा, कमरेला पटाव असा पारंपरिक
पोषाख असतो. काठ्यांचे घाटशिळासमोर मान्यवरांच्या हस्ते स्वागत केले जाते.
तुळजापूर नगराध्यक्ष काठ्यांच्या मानकऱ्यांचा सन्मान करतात. घाटशिळावरून या
काठ्या वाजत गाजत पाटीलवाड्यावर येतात. तेथे काठ्यांचे परंपरेनुसार स्वागत
होते. रात्री काठ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. देवीच्या
छबिन्यात या काठ्या सहभागी होतात. छबिन्यात तृतीय पंथी आराधी मंडळी
देवीच्या गाण्यावर ठेका धरतात. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक
गर्दी करतात.
दिपावली
|
तुळजापूरात दिवळी सणाची धुम निराळीच असते "दसरा दिवाळी सण मोठा नाही
आनंदाला तोटा" याची इथे प्रचीती येते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे
नेहमीच्या वेळेआधी महंत आणि व्यवस्थापकांनी ठरवून दिलेल्या वेळेवर चरणतीर्थ
होते. देवीच्या अभिषेक पुजेवेळी अभ्यंगस्नानाचा कार्यक्रम होतो. देवीला
केशरसहीत कोमट पाण्याने स्नान घातले जाते. सुगंधी तेल अत्तर लावून गुलाल,
बुक्का, चंदन पावडर देवीच्या अंगास लावले जाते. कोमट पाण्याने स्नान घालून
अभिषेक पुजा सुरु करतात.
दिवाळी पाडव्याला चरणतीर्थ लवकरच उरकून, देवीला मंदिर संस्थानच्या वतीने
फराळाचे लाडू, अनारसे, करंज्या आणि नेहमीचा नैवेद्य दाखवला जातो. महाआरती
आवटी यांच्याकडून मंदिर व्यवस्थापकांकडे येते. सवाद्य आरती मंदिरात
आल्यानंतर, महंत चरणतीर्थास येतात. त्यावेळी मंदिर संस्थान प्रतीनीधी आणि
कर्मचारी उपस्थित असतात. नंतर नंदादीप प्रज्वलीत करून नैवेद्य दाखवतात.
काळभैरव
|
अश्विन अमावस्येला सकाळी काळभैरव आणि टोळभैरवास तेलाचा अभिषेक केला जातो.
कोंडबळाच्या माळा आणि खारा नैवेद्द अर्पण केला जातो. गरीबनाथ मठाचे महंत
मावजीबुवा सायंकाळी वाद्याच्या गजरात मिरवणुकीने मठातील दिपमाळ पेटवून
नगरप्रदक्षिणा करण्यास बाहेर पडतात. ते मंकावती तीर्थात पाय धुवून
तुळजाभवानी मंदिरात येतात. गोमुख आणि कल्लोळ तीर्थात पाय धुवून मंदिरात
जातात, देवीचे दर्शन घेतात. त्यांना फक्त हा एकच दिवस मंदिरात प्रवेश करता
येतो. इतर दिवस मठाची सीमा ओलांडून मंदिरात जातात येत नाही. गरीबनाथास
देवीने दिलेला शाप हा त्यामागचे कारण आहे. ते देवीची सालंकृत पूजा करतात.
त्यांना मंदिर संस्थानच्या वतीने भरपेहेराव आहेर केला जातो. यावेळेस
दशावतार मठाचे महंतही सवाद्य मिरवणुकीने मंदिरात येतात. या मठाकडून देवीला
आहेर म्हणून पांढरी साडी अर्पण करतात. हे वैराग्याच प्रताक मानले जाते.
दशावतार मठाचे महंत आणि काळभैरव मंदिराचे पुजारी यांना भरपेहेराव आहेर केला
जातो. त्यांना देेेवीला नेसवलेल्या साडीचा फेटा बाांंधला जातो.
भेंडोळी
|
तुळजापूरात भेंडोळीचा आगळावेगळा उत्सव होतो. हा काय प्रकार आहे तर त्याच
असं आहे की, तुळजाभवानी मंदिराच्या पश्चिमेस कड्यावर काळभैरवाच मंदिर आहे.
काळभैरवाची भारतात अनेक मंदिरे आहेत. काशीतील काळभैरवाला काशीचा कोतवाल
मानलं जातं. अगदी तसाच हा काळभैरव तुळजापुरचा कोतवाल आहे. हा तुळजापूराचे
रक्षण करतो. वर्षातून एकदा म्हणजे अश्विन अमावस्येला तुळजाभवानी परीसरात
पाहणी करायला काळभैरव निघतो. त्याचे फिरणे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा
म्हणून हा भेंडोळी उत्सव साजरा करतात. भारतात काशी आणि तुळजापूर या दोनच
ठिकाणी भेंडोळीचा उत्सव होतो.
भेंडोळीची ज्वालायात्रा
|
महंत मावजीनाथ मंदिरात पोहोचल्याची वर्दी मिळताच, मंदिराचे व्यवस्थापक
काळभैरव मंदिरात जाऊन भेंडोळीची पूजा करतात. ही भेंडोळी म्हणजे मोठ्या सोळा
फूट लांब लाकडाला केळीची पाने गुंडाळलेली असतात. लाकडाच्या मध्यभागी
कापडाचे गोल पलिते करून साखळीत गुंफून लावलेले असते. भेंडोळी प्रज्वलित
केल्यानंतर तरूण मंडळी तिला खांद्यावर घेऊन "भैरवनाथाच्या नावान चांगभलं",
"तुळजाभवानीचा उदो उदो" असे गर्जत भैरवनाथाच्या कड्यावरून नागझरी मार्गे
शिवाजी महाराज दरवाजातून मंदिरात आणतात. देवीच्या सिंंहासनाला भेंडोळीचा
दांडा टेकवतात. देवीच्या गाभाऱ्यातले तेल महंत भेंडोळीवर सोडतात आणि मग
देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा करून निंबाळकर दरवाजातून भेंडोळी महाद्वार
चौकात येते. पुढे आर्य चौक पार करून कमानवेस येथे येते इथे पुजारी
भेंडोळीचा दाह कमी करण्यासाठी भेंडोळीवर दुध टाकतात. नंतर येथील डुल्या
मारूती मंदिराला प्रदक्षिणा करून येथे जवळच अहिल्याबाई यांंनी बांधलेल्या
विहिरी जवळ भेंडोळी पुजारी क्षीरसागर पाणी मारून विझवतात. भेंडोळी डुल्या
मारूती मंदिराजवळील पारावर विसावते. भेंडोळी मंदिराबाहेर जाताच महंत
मावजीनाथ यांच्या उपस्थितीत देवीस पंचामृताचा अभिषेक होतो. मठाकडून देवीस
नैवेद्य दाखवला जातो. नंतर पजारी, सेवेकरी,भाविकांना भोजन देण्यात येते.
भेंडोळीचा हा उत्सव पहायला लोक तुफान गर्दी करतात आणि या ज्वालायात्रेचा
थरार अनुभवतात. अरूंद गल्लीबोळातून भेंडोळी जाते पण या भेंडोळीमुळे कुणाला
इजा झाल्याचे उदाहरण नाही. भेंडोळी उत्सवानंतरच घरोघरी आणि व्यापाऱ्यांकडे
लक्ष्मीपूजन होते.
त्रिपुरी पौर्णिमा मंदिरातील दिपोत्सव
|
त्रिपुरी पौर्णिमेला कल्लोळ तीर्थ स्वच्छ धुवून त्यात ताटवा पूजनाचा सोहळा
होतो. या पूजेत कडब्याचा ताटवा तयार करतात. त्यावर खण नारळ ठेवून हळदकुंकू,
फुले, खारीक, हळकुंड,खोबरे, बदाम, खडीसाखर, सुपारी हे साहित्य वाहतात.
नारळ फोडून, तो फोडलेला नारळ तेथेच सोडून पुजा करतात. नंतर आरती म्हणतात.
ताटवा पूजनास साडेसातशे पणत्या प्रज्वली केलेल्या असतात. त्यापैकी काही
द्रोणात ठेवून पाण्यावर तरंगत सोडतात. दोन्ही ताटव्यावर पाच पाच पणत्या
ठेवतात. बाकीच्या पणत्या कल्लोळाच्या भोवतीने मांडतात
दरवर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा उत्सव इथे मोठ्या भक्तिभावाने साजरा
होतो. शारदीय नवरात्र देवीच्या शक्ती तत्वाचे प्रतीनीधीक आहे तर शाकंभरी
नवरात्र पालक तत्त्वाचे. या नवरात्रातील पूजाविधी, अलंकार पूजा आणि इतर
धार्मिक विधी सारखेच असतात. पण या नवरात्रातले आकर्षण म्हणजे मंदिर संस्थान
वतीने दरवर्षी नाटक, संगित जलसा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक
ख्यातनाम गायक, वादक, रंगभूमीवरील कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतात.
गणेश ओवरीतील शाकंभरी नवरात्र घट
|
पौष शु ८ यादिवशी मंदिराच्या गणेश ओवरीत शाकंभरी देवीच्या प्रतीमेसमोर
घटस्थापना होते. संध्याकाळी ७ वाजता शाकंभरी देवीची आरती होते. रात्री
छबिना काढला जातो.
पौष शु १० देवीची नित्यपूजेनंतर रथ अलंकार महापूजा होते.
पौष शु ११ देवीची नित्यापूजेनंतर मुरली अलंकार महापूजा होते.
शाकंभरी देवीची रथातील मुर्ती
|
पौष शु १२ देवीची नित्यपूजेनंतर शेषशय्या अलंकार महापूजा होते. या दिवशी जलयात्रा असते. हे या नवरात्रातले खास वैशिष्ट्य आहे.
पापनाश तीर्थ जलपूजा आणि कलशपूजा
|
यादिवशी पापनाश तीर्थावर इंद्रवरदायनी देवीची पूजा होते. त्यानंतर तीर्थाचे जलपूजन
होते. मग तीर्थातील पाण्याने भरलेले नऊ जलकुंभ, मुख्य जलकुंभ, शाकंभरी
मुर्ती, तुळजाभवानी प्रतीमा यांचे पूजन होते. यानंतर मुख्य जलकुंभ, शाकंभरी
देवीची मुर्ती आणि तुळजाभवानीची प्रतिमा सजवलेल्या रथात ठेवतात. या वेळेस
हजारो स्त्रिया आणि कुमारिका तीर्थातील पाण्याने कलश भरून, त्यावर नारळ
ठेवून ते कलश डोक्यावर घेतात. मग जलयात्रा सुरु होते. डोक्यावर कलश
घेतलेल्या स्त्रिया आणि कुमारिका या यात्रेत सहभागी होतात.
जलयात्रा
|
या यात्रेत महंत तुकोजीबुवा, चिलोजीबुवा, शासकीय उपाध्ये, व्यवस्थापक,
धार्मिक व्यवस्थापक, मंदिराचे कर्मचारी, पुजारी मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी
उपस्थित असतात. आराधी मंडळी देवीची गाणी म्हणत असतात. फटाक्यांची
आतिषबाजी, कुंकवाची उधळण आणि संबळ तुतारीच्या निनादात ही रथयात्रा भवानी
मंदिरात पोहोचते. स्त्रिया आणि कुमारिकांनी आणलेल्या कलशातील पाण्याने
मंदिर परीसर आणि देवीचा गाभारा धुवून काढला जातो. यानंतर यात्रेतील सहभागी
स्त्रियांची खणा-नारळाने ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. भाविकांसाठी
अन्नदानाचे आयोजन केले जाते.
पौष शु १३ देवीची नित्यपूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा होते.
पौष शु १४ देवीची नित्यपूजेनंतर महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा होते. या
दिवशी होमासाठी अग्निस्थापना केली जाते. शाकंभरी नवरात्री निमित्त वरणी
घेतलेले ब्राम्हण उपस्थित राहून होमहवनाचा कार्यक्रम विधीवत सुरु करतात.
होमातील पुर्णाहुती, कोहळा अर्पण
|
पौष शु १५ या दिवशी चरणतीर्थ पूजा लवकर केली जाते. अभिषेक पूजेस मंदिर
संस्थानचा प्रतिनीधी हजर असतो दुपारी बारा वाजता आरती, धुपारती होते. होमास
फळे आणि कोहळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. पुर्णाहूती झाल्यावर घटोत्थापन
होते. यानंतर महाप्रसाद आणि अन्नदान होते.
मकरसंक्रांतीला मंदिरात स्त्रियांचा वोवसा घेण्याचा कार्यक्रम होतो.
रथसप्तमीला अभिषेक पूजेनंतर देवीची रथ अलंकार महापुजा करतात या दिवशी स्त्रियांचा वाणवसा आणि वाण घेण्याचा कार्यक्रम होतो.
होळीचे पूजन
|
होलिकोत्सवात तुळजाभवानी मंदिरासमोर होळीचे आयोजन होते. सायंकाळी सात वाजता
पंचामृत अभिषेक झाल्यानंतर संबळाच्या नादात अंगारी विधी संपन्न होतो.
त्यानंतर महंत तुकोजीबुवा, पाटील भोपे पुजारी,भोपे मंडळाचे अध्यक्ष,
सेवेकरी, धार्मिक व्यवस्थापक यांच्या हस्ते होळीचे विधीवत पूजन होते. नंतर
नैवेद्य दाखवून, धुपारती केली जाते व होळी पेटवली जाते. यावेळेस
हा सोहळा पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. वाद्यांच्या गजरात आईच्या
उदोकारात भाविक होळीभोवती फिरत बोंब ठोकतात. मंदिरातील होळी पेटल्यानंतर
गावातील इतर होळ्या पेटवल्या जातात.
श्रींच्या मूर्तीवर रंगांची उधळण
|
रंगपंचमी दिवशी देवीला अभिषेक पूजेनंतर, देवीस पांढरे शुभ्र वस्त्र
नेसवतात. देवीला चंदनाचा मळवट लावून त्यावर विविध रंगाचे आकर्षक ठिपके
लावतात. देवीच्या मुर्तीवर कोरडे रंग टाकतात. यावेळेस महंत तुकोजीबुवा,
हमरोजीबुवा, धार्मिक व्यवस्थापक, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष, सेवेकरी,
पाळीकर पुजारी, छत्रे, पलंगे, पोहेकर, चोपदार उपस्थित असतात.
बैलपोळा- देवी मंदिरात बैलजोडीची पूजा
|
याव्यतिरिक्त तुळजाभवानी मंदिरात गोपाळकाला, आषाढी एकादशी, राष्ट्रीय सण असे सण साजरे केले जातात.
बैल पोळ्याला देवीच्या मंदिरात बैलजोडी वाजत गाजत आणली जाते. निजाम सरकारने
काही जमीन देवी संस्थानला दिली होती. त्यातून येणारे उत्पन्न देवीच्या
सेवेस वापरले जाई, म्हणून बैलपोळ्याला बैलजोडीची मंदिरात पूजा होते.
देवीच्या गाभाऱ्यात महंत तुकोजीबुवा, वाकोजीबुवा, चिलोजीबुवा आणि
हमरोजीबुवा यांच्या हस्ते बैलजोडीची यथासांग पूजा होते. महाआरती नंतर
बैलजोडीला घुगऱ्या भरवल्या जातात. महंत देवीला "पाऊस चांगला पडू दे,
बळीराजाची शेती चांगली पीकू दे" असं साकडं घालतात.
सातारा जिल्ह्यातील शिरवळवरून तुळजापूरला जाणारी सासनकाठी
|
तुळजाभवानीची यात्रा चैत्र पौर्णिमेला असते. या दिवशी लाखो भाविक
तुळजापूरात दाखल होतात. चैत्र शुद्ध ११ या दिवशी शिखर शिंगणापूची यात्र
असते. या यात्रेला यात्रेकरु कावड आणि सासनकाठ्या आणतात. यात्रेनंतर हेच
यात्रेकरून सासनकाठ्या आणि कावड घेऊन तुळजापूरास देवीच्या दर्शनासाठी
येतात. याशिवाय तुळजाभवानीच्या यात्रेला उमरगा (उस्मानाबाद), शिरवळ आणि
नायगाव या सातारा जिल्ह्यातील गावामधून कावड आणि सासनकाठ्या तुळजापूरास
येतात. रात्री देवीच्या छबिन्यात या सर्व कावड आणि सासनकाठ्यांंना सर्वात
पुढे राहण्याचा मान असतो.
छबिन्यातील वाहनांची क्षणचित्रे
|
तर असा हा देवीच्या दरबारातील सण सोहळ्यांचा थाट. वर्षभर देवीच्या दारात
अशा सुख सोहळ्याची रेलचेल असते. भाविक आपल्या डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी
या सोहळ्यांना हजेरी लावतात. डोळे भरून आपल्या कुलदेवतेचा, आराध्य दैवताचा
कौतुक सोहळा पाहतात आणि तृप्त मनाने देवीचा निरोप घेतात असा हा महन्मंगला
तुळजाभवानी देवीचा थाट आपण नक्की अनुभव घ्यावा.
आतापर्यंत आपण तुळजाभवानी मंदिराची माहिती, मंदिरातील धार्मिक विधी,
पुजा,नित्यक्रम आणि साजरे होणारे सण उत्सव यांचा आढावा घेतला. आता आपण
वळणार आहोत मंदिराच्या सभोवताली असणाऱ्या काही महत्वाच्या मंदिरांकडे, आणि
जाणून घेणार आहे तुळजापुरातील मुख्य मठांची आणि जलतीर्थांची माहिती.
तुळजापुरात काही लहानमोठे मठ आहेत. त्यांच्या परंपरा आणि नियम जरी वेगळे
असले तरी, त्यांना एका सुत्रात बांधणारी गोष्ट म्हणजे देवीच्या चरणी असणारी
श्रद्धा या मठातील मुख्य मठांंचा आपण परामर्श घेऊ.
गरीबनाथ मठ
|
गरीबनाथमठ :- भवानी मंदिराच्या उत्तरेस खडकाळ गल्लीत हा नाथपंथी मठ आहे.
अकराव्या शतकापासून हा मठ अस्तीत्वात आहे असे सांगितले जाते. या मठाचे
संस्थापक गरीबनाथांची कथा आपण गायमुख तीर्थाच्या संबंधाने पाहिली होती.
गरीबनाथ देवीचे निस्सीम भक्त होते. काशीला जाण्याचा त्यांचा निश्चय, देवीचे
समजावणे, तरीही जाण्याचा हट्ट आणि देवीने दिलेल्या वस्तू ज्या त्यांनी
काशीला गंगार्पण केल्या होत्या, त्या गोमुख तीर्थातून बाहेर येणे, यामुळे
गरीबनाथाला देवीच्या महिम्याची प्रचिती येते. पण देवी मात्र गरीबनाथावर
क्रुद्ध होते. देवीने तुला वर्षातून फक्त एकदाच अश्विन अमावस्येला माझे
दर्शन करता येईल, इतर वेळेस मठाची सीमा ओलांडून तुला मंदिरप्रवेश करता
येणार नाही हा शाप दिला. गरीबनाथ आणि त्यांच्या नंतर आजही या मठाचे
मठाधिपती देवीच्या या शापरूपी आज्ञेचे तंतोतंत पालन करतात. या मठात सध्या
अठरावे वंशज कार्यरत आहेत. त्यांच नाव महंत मावजीनाथ या मठातील मठाधिपतींची
नावे प्रकाशनाथ, तुकनाथ, मावजीनाथ अशीच रोटेशन पद्धतीने ठेवली जातात. मठात
मठाधिपतींची गादी आहे. तसेच हिंगळाज (हिंगुळजा) मातेचे मंदिर आहे.
गरीबनाथ समाधी
|
या मंदिराच्या डाविकडे महंत गरीबनाथांची समाधी आहे आणि या समाधी समोर
त्यांचे प्रथम शिष्य प्रकाशनाथ आणि बाजूला नंतरच्या इतर मठाधिपतींच्या
समाधी आहेत.
हिगळाज माता
|
हिंगळाज मातेच्या समोर नाथसंप्रदायाची एक अखंड जळत राहणारी धुनी आहे. मठ
पहाटे चार वाजता उघडतो. सहा वाजता देवीला अभिषेक, गरीबनाथ समाधी पूजा असे
नित्यपूजाविधी, आरती होते. मठातील विहीरीच्या पाण्याने गरीबनाथ समाधीस
अभिषेक केला जातो. दहा ते अकरा दरम्यान मठात अन्नदान असते. या मठात नाथपूजा
(नादी आणि शिंगी) पद्धतीने देवांना वंदन पूजन केले जाते. मठाचा परीसर
सुंदर आहे. मठात चौसोपी वाडा आहे येथे भिंतीतील देवळ्यांमध्ये विष्णुच्या
दशावतार मुर्त्या आहेत. म्हणून या मठाला दशावतार मठही म्हणतात. मठाला इनाम
मिळालेल्या जमिनीवर मठाचे उत्पन्न चालते.
आरण्यबुवा मठ
|
आरण्यबुवा मठ :- तुळजापूर शहराच्या उत्तरेला बालाघाट कड्यावर हा मठ आहे.
ह्या मठाचे मुळ स्थान हरीद्वार आहे. आरण्य गोवर्धन मठाचे शिष्य तुका
जनार्दन आरण्य हे या मठाचे संस्थापक होते. आधी या मठाचे मठाधिपती ब्राम्हण
असायचे. नंतर भावसार (शिंदे) क्षत्रिय यांच्याकडे मठाधिपतीत्व आले. हा बदल
नक्की कधी झाला ह्याची नोंद नाही. या मठात रामवरदायिनी देवीची मुर्ती आहे.
तसेच १९६८ मध्ये एक दत्त मंदिर स्थापन करण्यात आले. या मठाजवळच चंद्रकुंड
आणि सुर्यकुंड आहे या मठात गुरुपौर्णिमेला पादुका पूजन होते. ह्या मठात
महंत आणि शिष्य ब्रम्हचर्याचे पालन करतात.
वाकोजीबुवा मठ
|
वाकोजीबुवा मठ :- शिवाजी महाराज महाद्वारातून बाहेर आल्यावर, डावीकडे
असलेल्या वाटेने गेल्यावर गल्लीत हा मठ आहे. मठात मुख्य मठ, सभागृह, निवास
अशी रचना आहे.
अन्नपूर्णा
|
मठात अन्नपूर्णा देवीची मुर्ती आहे. हा मठ नियामक संस्थेचे काम करतो. भवानी
मंदिराची चावी याच मठाकडे असते. देवीची चरणतीर्थ पुजा आणि प्रक्षाळ पूजा
याच मठाकडे असते. देवीच्या स्नानासाठी पाणी हाच मठ आणतो. या सेवेसाठी
सरकारकडून ठराविक रक्कम मठास मिळते. वाकोजीबुवा मठाची गादी अविवाहिताची
आहे. त्यामुळे दत्तक घेऊन उत्तराधिकारी निवडतात. या मठात महंतांचा
मृत्यूनंतर दहनविधी होत नाहीत. तर गार म्हणजे एका खोल खड्ड्यात मीठ टाकून
त्यात देह पुरला जातो. याला गार भरणे म्हणतात.
हमरोजीबुवा मठ :- हा मठ देवी मंदिराच्या पश्चीमेस आहे. हा मठ सहाशे
वर्षांपूर्वीचा आहे असे मानले जाते. या मठाचे मूळ हरीद्वार येथे आहे.
देवीला चंदनाचा गंध पुरवण्याचे काम या मठाकडे आहे. शिवाय देवीला अलंकार
करणे, अलंकार काढून जामदारखान्यात जमा करणे याची जबाबदारी या मठाकडे आहे.
या मठातही अन्नपुर्णेची मुर्ती आहे तीन तळघरे काही मठाधिपतींच्या खोल्या
आणि भक्त निवास असे मठाचे स्वरूप आहे. या मठात एक भुयार आहे जे भारतीबुवा
मठात असलेल्या भुयारास जोडले आहे असे मानले जाते. देवी याच भुयारातून
भारतीबुवा मठात सारीपाट खेळायला जायची अशी मान्यता आहे.
भारतीबुवा मठ
|
भारतीबुवा मठ :- हा मठ शिवाजी महाराज महादरवाज्यातून आराधवाडीत उतरून
अंदाजे अर्धा किमी अंतरावर सोलापूर तुळजापूर हायवे जवळ आहे. मठ वैष्णव
पंथीय आहे. मठाचे बांधकाम एखाद्या गढीसारखे आहे. हे बांधकाम पाहता ३५०
वर्षे जूने असावे. मठासमोरच मारुतीचे छोटे मंदिर आहे. हा मठ अन्नछत्रासाठी
होता. पुर्वी तुळजापूरला येणारे भाविक, गोरगरीब, तडीतापसी साऱ्यांना
अन्नदान केले जाई. मठाचे संस्थापक रणछोड भारती होते. मध्ययुगात राजे आणि
सरदारांचे मुक्कामाचे हे स्थळ होते. खुद्द शाहु महाराज आणि बाजीराव या मठात
राहिले होते अशी नोंद आहे. पंचवीस एकर शिवारात मठाचा विस्तार साडेतीन एकर
आहे. मठाच्या परीसरात उजवीकडे काही पडीक ओसऱ्या आहेत. मठात प्रवेश केल्यावर
प्रथम दर्शन होते गणरायाचे. याभागात काही खोल्या आहेत. गणपती बाजूला
असणाऱ्या कमानीतून पुढे आलो की समोर समाधी मंदिर दिसते.
समाधी मंदिर
|
इथे गणेशभारती, गोविंद भारती आणि मठाचे संस्थापक रणछोड भारती ( संजीवन
समाधी ) यांच्या समाध्या आहेत. या समाध्यांच्या डाव्या बाजूस एक भुयारी
मार्ग आहे. असं म्हणतात की हा मार्ग हमरोजीबुवा मठातील भुयाराशी जोडलेला
आहे आणि देवी याच मार्गाने भारतीबुवा मठात सारीपाट खेळण्यासाठी येत असे.
खरे तर हे भुयाराचे नक्की काय आणि कशासाठी आहे यावर संशोधन व्हायला हवे.
मठातील देवीची मूर्ती
|
या समाध्यांपासून पुढे गेल्यावर मठात देवीचे मंदिर आहे आणि त्या बाजूलाच देवीचा सारीपाट आहे.
सारीपाट
|
भारतीबुवा सोबत देवी इथे येऊन सारीपाट खेळायची. मठात एक विहीर आहे तसेच
मागच्या बाजूस काशीकुंड आहे. या कुंडावर एक शिवलिंग आहे. श्रावणात कुंडातले
पाणी शिवलिंगास स्पर्श करून पुन्हा खाली जाते. हे पाहणारा भाग्यवंत अशी
मान्यता आहे.
काशीकुंड
|
या कुंडाच्या बाजूला थोडेसे पुढे चिंतामणी आहे. जसा तुळजाभवानी मंदिराच्या
मागे कौल देणारा चिंतामणी आहे तसाच हा. या मठात ज्याला इच्छा असेल त्याला
पंथाची दिक्षा घेता येते. ह्या मठाचे मठाधिपती ब्रम्हचारी असतात. इथे
गुरुसत्ताक परंपरा आहे मठाधिपती आपला उत्तराधिकारी निवडताना त्याला नविन
नाव देतात. त्यानंतर एक दोन वर्षात आचार विचारांची ओळख झाल्यावर, मठाधिपती
आपल्या या शिष्याला कानमंत्र देतात आणि पंथाशी एकनिष्ठ राहण्यासाठी मीठ
खायला देतात. त्याला भगवी वस्त्रे देतात. हा मठ वैष्णव असला तरी
शैवपंथीयांनीही इथे दिक्षा घेतली आहे गत चार-पाच पिढयांपासून इथले मठाधिपती
मराठा आहेत.
बारालिंग मठ
|
बारालिंग मठ :- हा मठ शिवाजी महाराज महाद्वाराच्या खालील बाजूस दरीत दाट
झाडीत आहे. सोलापूर हायवे या मठापासून जवळ आहे. मठात मोठे शिवलिंग आहे.
पावसाळ्यात वरून येणाऱ्या पाण्यामुळे मठातील शिवलिंग पाण्यात जाते. या मठात
बारा शिवलिंग आहेत. गोविंद नाथांना दृष्टांत झाल्यावर त्यांनी ही शिवलिंगे
शोधून काढली.
बारा लिंग
|
या शिवलिंगांमुळेच मठाला बारालिंग मठ म्हणतात. या मठाचे मठाधिपती उत्तर
भारतीय आहेत. महंत गोविंदनाथ यांच्या मृत्यूनंतर या मठाचे मठाधिपती
पंजाबमधील जालोर जिल्ह्यातील शर्मा घराण्यातील अम्मा बनल्या. वयाच्या
सोळाव्या वर्षी त्या नेकनाथ नाव धारण करून मठाधिपतीच्या गादीवर विराजमान
झाल्या. त्या १२५ वर्ष जगल्या त्यांचे कर्तुत्व मोठे होते. मठात त्यांची
समाधी आहे.
वरील मठाव्यतिरीक्त तुळजापुरात चिलोजीबुवा मठ,सोमवारगिरी बुवा मठ, रोहिदास महाराज मठ, नामदेव महाराज मठ इत्यादी मठ आहेत.
तुळजाभवानी परीसर आणि तुळजापूर शहरात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत. यात
देवीच्या भोवताली असणारी दैवतं तर आहेच, पण मंदिराच्या परीसरातही अनेक
मंदिरे आहेत. ज्यात काही प्रमुख मंदिरे आपण पाहणार आहोत.
मातंगी देवी
|
मातंगी देवी मंदिर :- हे मंदिर तुळजाभवानी मंदिराच्या ईशान्य बाजूस आपण
मुख्य मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समोरच दिसते. नवरात्रात मुख्य मंदिरात,
त्रिशूल ओवरी आणि मातंगी इथे एकत्र घटस्थापना होते. मातंगसुराचा नाश करणारी
ही मातंगी देवी. इथे पुजारी महार मांग समाजाचे आहेत.
काळभैरव मंदिर
|
काळभैरव मंदिर आणि टोळभैरव :- तुळजापूरात अष्टभैरवांचा वास आहे. त्यापैकी
काळभैरव आणि टोळ भैरव हे देवीचे सेनापती होते. त्यांनी देवी आणि महिषासुर
संग्रामात देवीला सहाय्य केले होते. त्यांची मंदिरे मुख्य मंदिरापासून जवळच
आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिण बाजूस नागझरी तीर्थाजवळ हे मंदिर आहे.
शिवाजी महाराज महाद्वारातून बाहेर डाव्या बाजूने गल्लीतून एक वाट
वाकोजीबुवा मठापुढून बाहेर निघते. या वाटेने बाहेर आल्यावर डावीकडे वळून
काळभैरव मंदिराकडे जाता येते.
काळभैरव आणि बालभैरव
|
या मंदिरात काळभैरव आणि बालभैरव मुर्त्या आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण दिपमाळ
|
मंदिरासमोरची दिपमाळ वेगळ्यांच धाटणीची आहे मंदिराशेजारी गणपती आहे तसेच
मंदिरासमोर उजवीकडे दोन समाध्या आहेत कालभैरवाला तिळाच्या तेलाचा अभिषेक
असतो आणि मांसाचा नैवेद्य दाखवला जातो. देवाला चिलिम (हुक्का) आणि मदिरा
देण्याची प्रथा आहे. कालभैरव जयंतीला मंदिर सजवले जाते. मंदिरात होम होतो
अश्विन अमावस्येला नगराची पहाणी करायला काळभैरव निघतो. त्याला प्रकाश
मिळावा म्हणून भेंडोळी काढतात. तिची सुरूवात या मंदिरापासूनच होते.
भेंडोळीची माहिती आपण या आधीच्या भागात घेतली आहे.
टोळभैरव मंदिर
|
टोळ भैरवाचे मंदिर तुळजाभवानी मंदिर संस्थानची धर्मशाळा आणि मंदिराची
तटबंदी या दरम्यान एक चिंचोळी गल्ली आहे. या गल्लीतून थोडे आत गेलो की
मुख्य मंदिराच्या तटाला लागूनच आहे.
टोळ भैरव
|
याला ही तेलाचा अभिषेक असतो. या मंदिरातले खांब आणि गर्भगृहाचे द्वार सुंदर
आहेत. या मंदिराला लागून जी मुख्य मंदिराची भिंत आहे त्या भिंतीत गजशृंखला
शिल्प आहेत.
गजशृंखला
|
अभ्यासकांचे मत आहे की ही शिल्पे यादवकालीन असावी. या भिंतीवरच, भिंत उंच करण्यासाठी नवीन काम करण्यात आले आहे.
मुद्गलेश्वर मंदिर
|
मुद्गलेश्वर मंदिर :- हे मंदिर घाटशिळापासून जवळच दाट झाडीत एका ओढ्याच्या
काठावर आहे. मंदिर यादवकालीन आहे या मंदिराचे गाभाऱ्याचे द्वार कलापुर्ण
आहे. याच्या उंबरठ्यावर दक्ष राजाचे बोकडाचे मस्तक असलेले शिल्प आहे.
मुद्गलेश्वर शिवलिंग
|
श्रावणात या मंदिरात बरेच भाविक येतात. येथील शिवलिंगावर पुजाऱ्यांनी फुलांनी केलेली सजावट पाहण्यासारखी असते.
डुल्या मारूती मंदिर
|
डुल्या मारूती :- हा मारूती कमान वेस जवळ आहे. मंदिर उंच चौथऱ्यावर आहे.
मारूती काळ्या पाषाणातला आहे. हनुमान जयंतीला इथे मोठा उत्सव असतो.
मारूती
|
तुळजापूरात होणाऱ्या भेंडोळी उत्सवाची सांगता या मंदिराला फेरी मारून, जवळच
असलेल्या होळकर विहीरीजवळ विझवून होते. या मंदिरासमोरील वडाच्या पाराला
टेकून दोन गद्धेगाळ ठेवलेल्या आहेत. या आधी कमान वेस जवळ होत्या. पण १९८९
साली कमानवेस पाडल्यानंतर या पाराजवळ आणून ठेवल्या
मंदिरासमोरील गद्धेगाळ
|
या गद्धेगाळ वरील लेखाचे वाचन इतिहास अभ्यासक कै. क. भ. प्रयाग यांनी केले होते. पण सध्या त्याची माहिती उपलब्ध नाही.
मंदिराजवळील होळकर विहीर अहिल्याबाई होळकरांनी १७०७ साली बांधली आहे.
अहिल्याबाई होळकर विहीर आणि शिलालेख
|
विहीरीत उतरायला ५५ पायऱ्या आहेत सुंदर कमानी आणि उत्कृष्ट बांधकाम हे या
चिरेबंदी विहिरीचे वैशिष्ट्य. या विहिरीतील भिंतीवर लेख आहे त्यातील मजकूर
असा आहे.
श्री देवी पदीतोषणार्थ मतुलं विख्यात किर्तीक्षितौ ।
मल्हाराति वधुशच कर्तृमधुना रेवतरे संस्थिता ।।
खंडेराय वधुशचकार जगतक्षेमाय वापी परी ।
सारा मान मरेंद्र वंद्य सलीलो नाम्ना आहिल्या सती ।।
शके सत्राशे सात नृपशालिवाहन शके
सध्या यावरील अक्षरांची झीज झालेली आहे. विहीर वापरात नाही त्यामुळे
विहीरीत खूप कचरा झाला आहे. असा ऐतिहासिक ठेवा पण स्थानिकांच्या उदासीनतेला
बळी पडला आहे.
धाकटे तुळजापूर मंदिर
|
तुळजापूरला येणारे भाविक बरेचदा मुख्य देवीचे दर्शन घेऊन परतात. पण इथून जवळच धाकटे तुळजापूर आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसते
देवीची मुर्ती शेतात जिथे सापडली ती जागा सध्या तिथे छोटे मंदिर आहे.
|
तुळजापूरापासून साधारणपणे पाऊण किमी वर धाकटे तुळजापूर आहे. गावात देवीचे
मंदिर आहे. देवीची मुर्ती तुळजाभवानी मुर्तीशी साधर्म्य दाखवणारी आहे.
देवीची मुर्ती
|
ही मुर्ती गंडकी शिळेची असून पावणेतीन फूट उंच आणि एक फूट आठ इंच रुंद आहे.
ही मुर्ती राम विठोबा माळी यांच्या शेतात शके १८६१ मध्ये माघ कृष्ण
पक्षातील सप्तमी गुरूवार. म्हणजे ५ फेब्रुवार १९४० साली त्यांचा नोकर
अब्बास अलाउद्दीन शेख याला शेत नांगर असताना सापडली.
मुर्ती पादपीठावरील शिलालेख
|
या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मुर्तीच्या पादपीठावर " चंद्रात्र गोत्री हरि गोविंद महाजन अधिस्टा १८"
असा लेख आहे . मुर्तीला १९६४ साली गावकऱ्यांनी शेतातून काढून, गावात मंदिर
बनवून तिथे स्थापना केली पण ही मुर्ती शेतात का लपवली गेली असेल किंवा
तिचा इतिहास काय हे मात्र गुपित आहे. या देवीचे नित्य पूजाविधी मुख्य
तुळजाभवानी मंदिराप्रमाणेच होतात.
तुळजापूरच्या नैऋत्येला टेकडीवर खंडोबा मंदिर आहे. या मंदिरावर चार मीनार
आणि घुमटामुळे इस्लामी स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. मंदिरात खंडोबाचा तांदळा
आहे मंदिरासमोर एक समाधी आहे.
खंडोबा मंदिर
|
या मंदिरांव्यतिरीक्त तुळजापुरात गोमाजी वाड्यातील रेणुका, रामवरदायिनी
मंदिर, नवशा गणपती, व्यास वाड्यातला अंगातला गणपती अशी मंदिरे आहेत
१) गोमाजी वाडा-रेणुका २) रामवरदायिनी देवी
३)व्यास वाड्यातला आडातला गणपता
|
वसाहत करायची म्हणजे पहिला शोध पाण्याचा होतो. आपल्याकडे अनेक गावे
नद्यांच्या कुशीत विस्तारली. पुढे माणसाने विहीरी बारव, कुंडे अशा रूपाने
पाण्याचे कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण केले. अशाच विहीरीत, बारवी आणि कुंडे
पुढे त्या- त्या गावाचे आकर्षण झाल्या. काहींचे तीर्थ बनले तर अशी तीर्थे
तुळजापूरातही आहेत त्यापैकी प्रमुख जलतीर्थे पाहू गायमुख आणि कल्लोळ
तीर्थाचा परामर्श आपण आधीच्या भागात घेतला आहे.
पापनाश तीर्थ
|
पापनाश तीर्थ :- हे बालेघाट रस्त्याने तुळजापूर वरून सोलापूर कडे जाताना,
उजवीकडे विवेकानंद महाविद्यालय च्या रस्त्याने थोडे पुढे गेलो की दिसते.
हे चारी बाजूने भिंतीने बंदिस्त आहे. एक दरवाज्यातुन आत गेलो की मधोमध
पाण्याचे कुंड आहे.
रामवरदायिनी
|
कुंडासमोर इंद्रवरदायिनी देवीचे मंदिर आहे. चारही बाजूने ओवऱ्या आहेत.
आहिल्येचे शील हरण केल्यामुळे गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला होता. तो
देवीला शरण आला आणि या तीर्थात स्नान करून पापमुक्त झाला अशी कथा आहे. आणखी
एक कथा अशी सांगतात की व्रतासुराच्या वधानंतर इंद्राने दोषमुक्त
होण्यासाठी इथे तपश्र्चर्या केली होती. शाकंभरी नवरात्रात जलयात्रेची
सुरूवात येथील पाण्याची पूजा करून आणि पाण्याचे कुंभ भरून होते.
मंकावती तीर्थ :- तुळजाभवानी मंदिराच्या पुर्वेला वरच्या बाजूस अवघ्या ५०
मीटरवर हे तीर्थ आहे. याला विष्णुतीर्थ असेही म्हणतात. तुळजापूरातील सर्वात
मोठे कुंड आहे. त्याचे क्षेत्रफळ सहा हजार चौरस फूट आहे हे फार जुने तीर्थ
मानले जाते या तीर्थाला तीन प्रवेशद्वार आहेत. हे कुंड बंदिस्त आहे.
आतल्या बाजूने ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांना तीस कमानी आहेत पुर्वी तुळजापूरला
येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी हे कुंड होते. दुष्काळातही हे कुंड आटत
नाही, त्यामुळे पुर्वी यातल्या पाण्याचा वापर होत असे. गोमुख तीर्थाला
इथूनच पाणीपुरवठा होतो अशी एक मान्यता आहे. या कुंडासंबंधी देवी दर प्रदोष
काळी ६४ योगिनींसह इथे जलविहारासाठी येत असे अशी कथा सांगितली जाते. अश्विन
अमावस्येला भारतीबुवा मठचे अधिपती नगरप्रदक्षिणेला निघाल्यानंतर इथे येऊन
चरण धुतात. सध्या या कुंडाची बरीच दुरावस्था झाली आहे. कचरा आणि कुंडाच्या
भिंतीवर वाढलेल्या झाडोऱ्याने कुंडाची रया घालवली आहे.
नागझरी तीर्थ :- हे तीर्थ तुळजापूर शहराच्या उत्तरेला काळभैरव मंदिराकडे
जाताना डावीकडे आहे या तीर्थासमोर नागशिल्प आणि मारूती आहे. स्थल पुराणात
रावणाचा भाऊ अहिरावणाने वासुकीचे राज्य अपहार केल्यानंतर ते राज्य परत
मिळवण्यासाठी वासुकीने इथे देवीची तपश्चर्या केली होती अशी कथा आहे. या
तीर्थावर नारायण बली आणि नागबली हे विधी केले जातात.
या तीर्थांशिवाय भारती बुवा मठशेजारी काशीकुंड, रामवरदायिनी मंदिराजवळ रामकुंड, आरण्य मठाजवळ चंद्र आणि सुर्य कुंड आहेत.
परंडा किल्ला :-
मूळची ही प्रत्यंडक नगरी! काही ठिकाणी याचा उल्लेख परमधामपूर, प्रकांडपूर, पलियंडा
असाही झाला आहे. कल्याणीच्या चालुक्यांचे हे शहर आणि त्यांचीच ही
दुर्गनिर्मिती, ज्याला पुढे मुस्लीम राजवटींनी अधिक बुलंद केले.
कर्नाटकातील धारवाड जिल्हय़ातील हावेरी तालुक्यातील होन्नत्ती गावी शके १०४६
म्हणजे इसवी सन ११२४ सालचा एक शिलालेख मिळाला आहे, ज्यामध्ये या पलियंड
गावचा उल्लेख आला आहे. चार हजार गावांचे मुख्य केंद्र असलेल्या या पलियंड
नगरावर महामंडलेश्वर सिंघणदेव राज्य करत असल्याचा हा उल्लेख! हा पलियंड
पुढे पलांडा, मग परिंडा आणि आताचा परांडा होत गेला!
परांडा
|
किल्ल्याबाहेरील खंदक
|
राजहंसाची नक्षी असलेला दगड
|
मारगिरीच्या छिद्रातून डोकावणारी तोफ
|
कोट-परकोट आणि त्याभोवती खंदक अशी या भुईकोटाची रचना! एका मागे एक तीन दरवाजे.
या नागमोडी मार्गातील पहिला दरवाजा त्याच्या त्या तुटलेल्या दरवाजांसह
आपले स्वागत करतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत तीन हंस कोरलेली शिल्पपट्टी आणि त्याखाली दोन व्याल पाहायला मिळतात. आत यावे तो सर्व बाजूने तट-बुरुजांचे बांधकाम अंगावर येते. वर निमुळते होत गेलेले ते अर्धगोल-अष्टकोनी बुरूज, त्याच्या टोकाकडील ते गवाक्ष, तोफांच्या खिडक्या, अंगावर बाण सुटावेत त्याप्रमाणे त्या तटातून विविध कोनांतून बाहेर येणाऱ्या जंग्या (मारगिरीची छिद्रे),
संपूर्ण तटातून जागोजागी डोकावणाऱ्या तोफा.. हे सारेच दृश्य एका बुलंद
वास्तुची दहशत निर्माण करते. या दहशतीच्या छायेखालीच पुढे दुसऱ्या दरवाजाची
कडी वाजवावी. याचाही दरवाजा अद्याप शाबूत. त्याला ओलांडून पुन्हा एक वळण
घेत तिसऱ्याच्या दारात उभे ठाकावे. या दरवाजाच्या दारात एक चौकोनी आकाराची छोटीशी विहीर आहे. या विहिरीला आजही पाणी आहे. जणू हे पाणी पायांवर घेतच प्रवेश करायचा.
या दरवाजाच्या लाकडी फळय़ा, त्यावरील पोलादी सुळे, साखळदंड अद्याप शाबूत
आहेत. याच्या कमानीवर मध्यभागी डोळय़ाच्या आकारात एक फारसी लिपीतील शिलालेख
बसवलेला आहे. याचे वाचन झाले नसल्याने त्याचा अर्थ लागत नाही, पण बहुधा या
परांडय़ाला हे बुलंद रूप देणाऱ्या कुठल्यातरी शाही राजवटीचाच यावर उल्लेख
असणार! हा गड मूळचा हिंदू राजवटीचा! त्याच्या खाणाखुणा आजही इथल्या
बांधकामावर जागोजागी दिसतात. त्याची पुनर्उभारणी केली बहमनी सत्तेचा प्रधान
महमद गवान याने. पुढे निजामशाही, मुघल, आदिलशाही आणि पुन्हा मुघल असा या
गडाने बराच काळ मुस्लीम राजवटींचाच अनुभव घेतला. यामुळे इथल्या
स्थापत्यशैलीवरही त्यांचाच प्रभाव जाणवतो.
तटबंदीतुन चालताना संरक्षक पाकळी भिंती व त्यातून मारगिरीची छिद्रे
|
पंचधातूची तोफ
|
खंदक व आतील संरक्षक अभेद्य बुरुज
|
फांजी व त्याखाली असलेल्या सैनिकांच्या देवड्या
|
सैनिकांच्या देवड्या
|
तोफेवर असलेल्या सिंहाचे शीर पळवून नेल आहे
|
ढालकाठी बुरुजावरील तोफ
|
विरगळीचे दगडाचा वापर तटबंदीत केलेला दिसतो
|
पुरातत्व खात्याची सुरू असलेली काम
|
|
डागडुजी केलेली तटबंदी व सावलीत निवांत बसलेले कामगार
|
महादेव मंदिर
|
उत्तराभिमुख दरवाजा पाहून तटबंदीवर आलो आणि उजव्या बाजूला वळत महाकाय तोफा पाहत हवामहाल पाहून फांजीवरून खाली उतरलो व गणपती मंदिर पाहून या भागातच कमानींची रचना असलेली बहुमजली अष्टकोनी विहीरकडे
आलो. एका कमानीखालील भुयारी मार्गातूनच या विहिरीत आपण उतरतो. प्रत्येक
मजल्यावर उतरण्यासाठी बांधकामातच जिन्यांची रचना केलेली आहे. या जिन्यांनी
या मजल्यावर आलो, की अष्टकोनातील प्रत्येक भागातील कमानींच्या त्या रचनेतून
विहिरींचे सौंदर्य निराळे भासू लागते. आजही या विहिरीला भरपूर पाणी आहे.
असे म्हणतात, या विहिरीचे पाणी हत्तीद्वारे उपसले जाई. कमानींची रचना,
बांधकामातील जिने, खोल्या, गच्ची, गवाक्ष या साऱ्यांमुळे गुजरातमधील
शिल्पजडित विहिरींची आठवण होते. विहीरीत बऱ्यापैकी पाणी असल्याने आम्हाला
खाली उतरता आले नाही. गडाचा आतील भाग पाहून मग त्याच्या तटावर चढलो.
परांडय़ाचे खरे वैभव हे या बुलंद तटबुरूज आणि बुरुजांवरील त्या प्रचंड
तोफांमध्ये! गडाला २६ बुरूज आणि या प्रत्येक बुरुजावर धडकी भरवणाऱ्या २६ मोठाल्या तोफा ! यातील सहा तर पंचधातूच्या, उर्वरित पोलादी! यांची नावेही दहशत बसवणारी- मलिक-मैदान ऊर्फ रणरागिणी, अझदहपैकर ऊर्फ सर्परूप, लांडा कासम, खडक अशी एकापेक्षा एक! निजामशाहीची शान असलेली ‘मलिका-ए-मैदान’ (जिचा आपण सारे ‘मुलूख-ए-मैदान’ असा चुकीचा उल्लेख करतो.) ही तोफ या गडावर काही काळ होती. इथून ती मुरार जगदेव
याने आदिलशाहीच्या संरक्षणासाठी विजापूरला नेली. गडावरील या तोफांवर ती
ओतणाऱ्या, घडवणाऱ्यांचे लेखही आहेत. दरवाजाशेजारील ढालकाठीच्या बुरुजावरील
पंचधातूची तोफ अशीच बलदंड, आक्रमक! सारा बुरूज तिने व्यापलेला आहे,
जिच्यावर तीन ठिकाणी लेख कोरलेले आहेत. तसेच मध्यभागी वीतभर उंचीची
सिंहांची एक जोडीही विसावलेली आहे. पश्चिम तटाच्या कोपऱ्यावरील बुरुजावरील
तोफेला मगरीचा चेहरा दिलेला असून तिच्या त्या अक्राळविक्राळ जबडय़ात तो
तोफेचा गोळाही दाखवला आहे. या तटावरच एका तोफेवर ईस्ट इंडिया कंपनीचा
मोनोग्राम आणि १६२७ सालचा उल्लेख आहे. पोलादी तोफाही अशाच भल्यामोठय़ा
आकाराच्या आहेत. यातील उत्तरेकडील बुरुजांवरील दोन अजस्र पोलादी तोफा
पाहूनच दडपण यायला होते. त्यांचा आवाज, विध्वंस वृत्ती याची कल्पनाही करवत
नाही. परांडय़ाचा हा बुलंद दुर्ग पाहताना त्याच्या या धडकी भरवणाऱ्या तोफा
कायमच्याच लक्षात राहतात. परतीच्या वाटेत उजव्या हाताला दारूगोळा आणि तोफांनी
भरलेले एक कोठार होते. हे दारुकोठार सध्या वटवाघळांच्या राहण्याचे ठिकाण
झाले आहे. प्रचंड कुबट वास. छोट्या उखळी तोफा आणि दारुगोळ्यांवर त्यांची
विष्टा पडून पडून दुर्दशा तर झालीच आहे आणि उंदरांनी ठिकठिकाणी उकरल्याने
बरेच तोफगोळे ढिगाखाली बुजत आहेत. याकडे तेथील पुरातत्व खात नक्कीच लक्ष
देईल हि इच्छा.
परांडय़ातील या
तोफा, तोफगोळे, हिंदू देवतांची शिल्पे, प्राचीन शिलालेख या साऱ्या
ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वस्तू आहेत. पण हा सारा ऐवज आज
ऊन-वारा-पावसात धूळ खात पडून आहे. चोरा-लुटारूंचे त्याला भय आहे. यातील
काही तोफांच्या कडय़ा, छोटेमोठे भाग कापून चोरल्याचेही दिसते. परांडय़ाच्या
तटावरून फिरताना गडाच्या अन्य स्थापत्याकडेही लक्ष जाते. भल्या जाडजूड
रुंदीच्या या तटावरून खालीवर करण्यासाठी जागोजागी जिने, भुयारी मार्ग
ठेवलेले आहेत. या गडाच्या प्रत्येक बुरुजापुढे अन्य एका बुरुजाचे चिलखत
घातलेले आहे. या तटाला वरच्या बाजूने पाकळय़ांची झालर
लावलेली आहे. ही खास मुस्लीम स्थापत्यशैली. या तटावरून फिरत असतानाच
त्याच्या लगतच्या खंदकाकडेही आपले सतत लक्ष जात असते. पाण्याने भरलेला खंदक
हा कुठल्याही भुईकोटाची पहिली संरक्षक फळी असते. परांडय़ाला असा हा संपूर्ण
किल्ल्याभोवतीने भला लांब-रुंद खंदक आहे. पण तिथे आज गावभराचे गटार सोडले
आहे. उकिरडा आणि वेडय़ा बाभळीच्या झाडांचे जंगल माजलेले आहे. सर्वात
महत्वाचं म्हणजे पुरातत्व खात्याचं या किल्ल्यावर युद्धपातळीवर संवर्धन व
नव्याने बांधकाम चालू आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही हा किल्ला सरस ठरेल.(काही भिंतीवर कोरलेली नावे सोडून) किल्ल्यावर सुरु असलेल्या कामामुळे ३६ खांब असलेले पूर्वीचे माणकेश्वर मंदिर म्हणजेच आताची मशीद आणि हमामखाण्यातील पुरातन मूर्ती व शिल्पे पाहता आली नाहीत.
माणकेश्वर हेमांडपंथी देवालय :-
मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक अशीही ओळख आहे.
शिव-सटवाई ह्या ग्रामदैवताची हेमाडपंथी मंदिरे विश्वरूपा नदीच्या डाव्या तीरावर, माणकेश्वर गावापासून
पूर्वेस, एक-दीड किलोमीटर अंतरावर आहेत. शिव आणि सटवाई या दोन देवतांच्या
उत्सवप्रसंगी धार्मिक विधी सामुहिक स्वरूपात पार पाडले जातात.
ग्रामस्थांमध्ये त्या निमित्ताने ऐक्य व सामंजस्य या भावनांचा सागर ओसंडून
वाहताना दिसतो. माणकेश्वरची ख्याती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर
कर्नाटक – आंध्रापर्यंत पसरलेली दिसून येते.
नदीतीरावर उगमापासून अस्तापर्यंत अनेक शिवालये आहेत. मात्र शिवालयांसंदर्भात आणि तेथे सुरू असणाऱ्या सण-उत्सवासंदर्भात
व तेथील देव-देवता यांच्या संदर्भात लिखित स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही.
जी माहिती समोर येते ती तेथील पुजाऱ्यांनी मौखिक स्वरूपात सांगितलेल्या आख्यायिकांवरून.
माणकेश्वर येथील शिव-सटवाई मंदिर आणि माणकेश्वर गाव यांच्या
नावासंदर्भात काही आख्यायिका आहेत. माणकेश्वर येथील शिव-उत्सव आणि
सटवाई-उत्सव यांचे स्वरूप भिन्न-भिन्न आहे. ते वेगवेगळ्या तिथींना करण्याची
प्रथा
आहे. शिव-उत्सव श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी आणि महाशिवरात्र या दिवशी
केला जातो. सटवाईचा उत्सव बाराही महिने असतो. सटवाईची पूजा आणि तिचा उत्सव
प्राचीन मातृसत्ताक समाजव्यवस्थेतून निर्माण झाला. तिच्या उत्सवाकरता
कोणताही दिवस ठरलेला नसतो. मात्र मंगळवार, शुक्रवार, चैत्रशुद्ध पौर्णिमा
आणि विशेष करून नवरात्र यावेळी सटवाईचा उत्सव थाटामाटात साजरा होतो.
‘बोकडांचे बळी’ हा उत्सवाचा खास विशेष. सटवाई हे जागृत देवस्थान मानले
जाते. उत्सव सुगी-सराईचे दिवस संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात भरतो. तिच्या
उत्सवाचे खरे स्वरूप नवरात्रात अनुभवण्यास मिळते. इतर वेळी, वर्षभर केला
जाणारा उत्सव म्हणजे सटवाईला केलेले नवस फेडण्याचा कुलाचार असतो.

नवरात्र महोत्सव सटवाई मंदिरात घटस्थापनेपासून - आश्विन शुद्ध
प्रतिपदेपासून - सुरू होतो. त्या नऊ दिवसांमध्ये पहाटेपासून देवीची
सिंहासनसदृश पूजा बांधून तिची नित्यपूजाअर्चा व आरती
असा कार्यक्रम सुरू होतो. मंदिरात अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. आसपासचे
आणि गावातील आराधी देवीची भक्तिगीते तन्मय होऊन गातात. दसऱ्याच्या दिवशी
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असंख्य भक्तगण हातात परडी, पाजळण्यासाठी
पोत घेऊन उभे राहतात. आराधी तेल जाळून, मंडळास पैसे दान करून सटवाई मातेचे
दर्शन घेतात. रात्रभर भक्तिगीतातून आई अंबाबाई सटवाईचा महिमा गायला जातो.
पहाटे, देवस्थानच्या ट्रस्टींच्या हस्ते सपत्निक होमाची पूजा केली जाते.
‘आई राजा उदो ऽ उदो ऽ ऽ’ म्हणून देवीच्या नावाचा गजर होतो. शेवटी, ‘दुर्गे
दुर्गट भारी तुजविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी’ ही आरती म्हटली
जाते. माणकेश्वरमधील शिव आणि सटवाई यांची मंदिरे कोणी बांधली? कधी बांधली?
मंदिरावरील मूर्तीची भग्नावस्था कोणी केली? प्राचीन कालखंडात तेथे किती
मंदिरे अस्तित्वात होती? मल्लिकार्जुन हे स्वयंभू शिवलिंग आहे का? सटवाई
तेथील लोकजीवनात कशी रूढ झाली? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे
आख्यायिकांवरूनच संकलित करावी लागतात. माणकेश्वर येथील शिव-सटवाईविषयी
मंदिर, दातकोणीचे झाड, समाधी, देवळाली ते माणकेश्वर भुयारी मार्ग, गायनागोबा, पुरलेले धन, बळी प्रथा व विश्वरूपा नदी यांविषयीची आख्यायिका आहेत.
लोकवाङ्मयाच्या अभ्यासकांनी आख्यायिकांचे
भटकी दंतकथा (आख्यायिका) आणि स्थानिक आख्यायिका अशा दोन प्रकारांमध्ये
वर्गीकरण केले आहे. स्थानिक आख्यायिकेचे (दंतकथा) पूजाविधी संदर्भातील
आख्यायिका, ऐतिहासिक आख्यायिका, देव-देवतांविषयक आख्यायिका, मंदिर
स्थापत्यकलाविषयक आख्यायिका, भगतांच्या गद्यपद्यमिश्रित आख्यायिका आणि
नवसपूर्तीच्या आख्यायिका अशा उपप्रकारांत वर्गीकरण केलेले आहे. येथे मी
केवळ देव-दैवतविषयक, उत्सवविषयक आणि मंदिर-स्थळविषयक आख्यायिकांचेच विश्लेषण प्रमाण ठेवले आहे.
बाबासाहेब अंधारे नामक ग्रामस्थाने सांगितले, की “मणिकेश्वर या नावावरून
आमच्या गावास माणकेश्वर हे नाव पडले असावे.” तसेच र.आ. अंधारे यांनी
औरंगाबाद येथील दैनिक ‘समाचार’मधून ‘राजा दक्ष’ने “यहाँ माणिक लिंग की
स्थापना की थी| इस लिए इस गाँव का नाम माणकेश्वर कहलाया” अशी माहिती दिली
आहे.
सटवाई मंदिर आणि सटवाईविषयक काही आख्यायिका प्रा. डॉ. नवनाथ शिंदे लिखित
‘माणकेश्वराचे शिव-सटवाई’ या ग्रंथामध्ये उपलब्ध होतात. त्या अशा :
• माणकेश्वर येथील शिवमंदिर आसुरी शक्तीद्वारे एका रात्रीत बांधले गेले व नंतर दिवस उगवण्याच्या आधी असुर नाहीसे झाले!
• देवळाली ते माणकेश्वराचे शिवमंदिर यांच्या दरम्यान एक भुयार आहे. देवळाली येथील ग्रामस्थ आबा शंख हे यवनकाळात त्या भुयारी मार्गाचे तीन किलोमीटर अंतर रोज चालत येऊन महादेव मंदिरात तेलाचा दिवा लावत असत.
• महादेव मंदिराजवळच दातकोरणीचे झाड आहे. त्या झाडाला लागणाऱ्या फळांच्या बियांना महादेवाच्या पिंडीचा आकार निसर्गत: प्राप्त झाला आहे. झाडाचा पाला अनेक रोगांवर गुणकारी समजला जातो.
• चालुक्य काळातील राजा दक्ष याने माणिक लिंगाची स्थापना केली होती. म्हणून त्या गावास माणकेश्वर असे नाव पडले.
• देवळाली ते माणकेश्वराचे शिवमंदिर यांच्या दरम्यान एक भुयार आहे. देवळाली येथील ग्रामस्थ आबा शंख हे यवनकाळात त्या भुयारी मार्गाचे तीन किलोमीटर अंतर रोज चालत येऊन महादेव मंदिरात तेलाचा दिवा लावत असत.
• महादेव मंदिराजवळच दातकोरणीचे झाड आहे. त्या झाडाला लागणाऱ्या फळांच्या बियांना महादेवाच्या पिंडीचा आकार निसर्गत: प्राप्त झाला आहे. झाडाचा पाला अनेक रोगांवर गुणकारी समजला जातो.
• चालुक्य काळातील राजा दक्ष याने माणिक लिंगाची स्थापना केली होती. म्हणून त्या गावास माणकेश्वर असे नाव पडले.
प्रभाकर देव यांनी ‘Temples of Marathwada’ या शिवमंदिर व शिवविषयक
ग्रंथामध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ती अशी “Mankeshwar is a
small village located at the distance of few miles from Osmanabad, a
district headquarter of the region. Right in the village is a beautiful
antiquarian remain in the form of chalukyan architecture. It is Mahadev
Temple.” त्यांच्या मते, शिव म्हणजे मंगल व कल्याण स्वरूप देवता. त्याला
महादेव, महेश, नीलकंठ, शंकर अशा अनेक नावांनी संबोधतात. शिवाच्या अशा
नामाभिधानावरून मंदिरासही विविध नावे मिळाली असली तरी भाविक भक्तगण त्या
मंदिरास शिवमंदिर असेच संबोधतात.
सटवाईच्या नावासंदर्भात शैव पुराणात सांगितलेल्या आख्यायिकेचा संदर्भ
असे निर्देशित करतो, की शिवाचे दहा अवतार होते. त्या दहाही अवतारांत शिवाला
वेगवेगळ्या दहा बायका होत्या. त्यांतील नवव्या अवतारात शिव मातंग आणि
पार्वती मातंग अशा रूपाचा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात सटवाई
या नावाचे श्रद्धेचे स्थान आहे. शब्दकोशातील अर्थाप्रमाणे सटवी हे
स्त्रीलिंगी नाम असून षष्टी देवता, शूद्र देवता, सटी, सट, सठी, दुर्गा
देवता, रान सटवाई, संतुबाई, सुभान, मेहमाता, जातमातृ, छटी, ब्राह्मी,
कुमारी, बहुपुत्रिका, वारुषी, यानिका, रौंद्री, घोडा सटवाई अशा तिच्या
नावांसंदर्भात आख्यायिका आहेत. पैकी शैव पुराणातील आख्यायिकेस विशेष
महत्त्व आहे. मातंग समाजातील शिव आणि मातंगी समाजातील सटवाई पूर्वी एकाच
मंदिरात होती. परंतु सटवाईला बकरू (देवीला सोडलेला बोकड) लागतो, म्हणून
तिला बाजूला ठेवण्यात आले. सटवाई ही मातंग ऋषींची मुलगी असून महादेव हा
मातंग समाजाचा जावई आहे. बकरे पडत असूनसुद्धा दोघे जवळ हायती. मग ती कोण
हायती? तर सटवाई आणि महादेव नवरा-बायकोच हायती.
देवीच्या मंदिर स्थापत्याबाबतही काही आख्यायिका सांगितल्या जातात.
सटवाईचे मंदिर मूळ पार्वतीमातेचे मंदिर असले पाहिजे. प्रा. रजनी जोशी यांनी
ती मंदिरे एकाच वेळची असून जेथे शंकराचे मंदिर असते तेथे पार्वतीचेही
मंदिर असलेले दिसून येतेच असे मत नोंदवले आहे. त्यांनी देवी ही एकच असते.
तिने अनेक रूपे धारण केलेली असतात अशा ग्रामस्थांच्या सूरात-सूर मिसळलेला
आढळतो, तर पुरातत्त्व विद्या शाखेच्या अभ्यासक डॉ. माया पाटील यांनी
सटवाईला मातृका म्हटले जाते असा त्यांचा अभिप्राय नोंदवला आहे. माणकेश्वर
येथे मातृदेवतेची पूजा-उपासना प्राचीन काळापासून केली जात असली पाहिजे.
त्या देवळांशेजारी जगदंबेचे देवालय आहे. ती देवी म्हणजे सटवाई हीच देवी होय
असे कुमार जोशी यांना वाटते.
सटवाई देवीबरोबरच तिच्या पायाखाली असणाऱ्या दैत्याच्या अनुषंगानेही
सुरेश जगदाळे यांनी सांगितलेली आख्यायिका अशी, “देवीने दैत्याला मारले.
त्यावेळी देवीला दैत्याची दया आली. त्याला देवी म्हणाली, ‘बाबा, शेवटचे
मागणे काय असेल तर माग.’ दैत्याने मागणी घातली, की ‘माझा जो मांसाहार आहे
तो मला शेवटपर्यंत पुरव.’ देवीने ‘हो’ म्हणून दैत्याला वचन दिले. देवीच्या
पायाखाली दैत्याची मूर्ती आहे. त्यावरून देवीसमोर बकरे कापले जाते. देवीला
मात्र शिवाप्रमाणे गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.”
येरमाळयाची येडाई:
येरमाळा हे गाव उस्मानाबाद पासून ५० कि. मी. अंतरावर आहे. प्रभुरामचंद्राना वनवासाला जाताना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सतीचे रुप घेउन भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला येडी आहेस. असे म्हंणटले. तेव्हापासून हि देवी इथे राहिली व तिचे नाव येडाई उर्फ येडेश्वरी झाले. या आख्यायिकेचा उल्लेख रेणुका स्त्रोत्रात असल्याचे पुजारी सांगतात. येरमाळा हे सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर आहे.
हे मंदिर गावच्या दक्षिण बाजूस ३०० ते ४०० फूट बालाघाटाच्या पर्वतीय रांगेत डोंगर माथ्यावर असून या मंदिरात जाण्यासाठी भक्तमंडळींना ४०० ते ४५० पाय-या चढून वर गेल्यानंतरच पुरातन कालीन हेमाडपंथी बांधकाम करण्यात आलेल्या मंदिराच्या आतमध्ये तीन-चार फूट व्यास असलेली यावर शेंदूर लेपून केलेल्या आणि डोक्यावर मुकूट, नाकात नथ, गळ्यात माळ अशा अलंकाराने नटविलेल्या श्री देवी येडेश्वरी तांदळ्याचे भाविकांना दर्शन होते.
देवीसमोर पुत्र परशुरामाची चांदीची मूर्ती आहे. मदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी, हवन होम, श्री गणेश, श्री दत्त, महादेव आणि काळभैरवनाथांचे छोटी मंदिरे आहेत. मंदिरात पाच डिकमल आणि मंदिराच्या मागील डोंगरावर तुळजाभवानी मातेचे मंदिर व एक डिकमल आहे.
या ठिकणी देवीचे स्नानगृह असून देवी येडेश्वरी पार्वतीचे रुप असून रेणुका, अंबा, जगदंबा, तुकाई अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या असंख्य भक्तांचे देवस्थान म्हणजेच ग्रामीण भागातील येडाई होय. परंतु या देवीच्या कोनाशिला स्थापनेबाबत पुरातत्त्व खात्याकडे कोणतीही नोंद नाही. या देवीबाबात अख्यायिका सांगितली जाते.
एकदा प्रभू राम सितेच्या शोधात या भागात भटकंती करीत असताना देवी पार्वतीने विश्रांतीसाठी थांबलेल्या रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करुन येताच रामाने ‘तुकाई तू तर माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सितेचे रुप धारण केलेली तू तू माझी वेडी आई (वेडाई) आहेस’ असे म्हटले. यामुळे देवीस वेडाई या नावाने ओळखले जाते.
आबाजी पाटलांचे कुलदैवत माहूर गडची रेणुका देवी असल्याने त्यांना त्याठिकाणी देवीला वारंवार जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी येरमाळा येथे डोंगरावरच माहूरगडाप्रमाणे देवीचे हुबेहुब मंदिर बांधले. श्री येडेश्वरी देवीच्या तांदळा माहूरच्या रेणुका देवी प्रमाणेच असून येथील एकमुखी दत्तमंदिर आणि कल्लोळ याचे पुरावे म्हणून भक्तांना पाहवयास मिळतात. चालत आलेल्या परंपरेनुसार आजही नवरात्रामध्ये देवीला भल्यापहाटे पाच दिवस भक्तगण खेटे प्रदक्षिणा पाठीमागे न पाहता घालतात. आजही खेटे घालताना थुंकणे, पाठीमागे पाहणे अनिवार्य मानले जाते. यावेळीच भाविक पांढरा दोरा वाहून डोंगराभोवताली देवीच्या पायथ्यापासून नवसाचे साकडे घालतात. नवमीच्या दिवशी देवीला पहाटे अजाबळी देण्याची प्रथा रुढ झाली असून नवमीच्या पहाटे होमहवन तर अश्विन शुध्द दशमीस सिमोल्लंघन केले जाते. येथील देवी राज्यासह इतर राज्यातही प्रसिध्द असून भाविक, लोकप्रतिनधी यांच्या निधीतून सभामंडप, पाय-या कठडे आदी उभे करण्यात आले असून श्री देवी येडेश्वरी देवथान ट्रस्ट येरमाळ (ता. कळंब) यांच्या माध्यमातून भक्तांच्या सोयीसुविधांसाठी आणि त्यांना रांगेतच उभे राहवे लागते यासाठी उड्डाण पुलाची व्यवस्था आणि त्यावरील निवारा करण्यात आला आाहे. मलाकूर येथील पाझर तलावातून पाईपलाईन करून ती उपळाई येथील शेतक-यांच्या विहिरीत पाण्याची साठवण करून मंदिरात आणि मंदिर परिसरात कामयस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात आला आहे. भाविकांसाठी शौचालय व्यवस्था, मंदिरासह परिसरात प्रकाश व्यवस्थाही केली आहे.
ट्रस्टच्यावतीने प्रसाद केंद्र चालविले जात असून, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासठी जाण्यासाठी देवी ट्रस्टच्या माध्यमातून सिमेंट रस्ता व प्रकाश योजना राबविण्यात आली आहे.
सोनारीचा कालभैरव:
परंडयाच्या उत्तरेस ७ कि.मी. अंतरावरील सोनारी या गावी श्री. कालभैरवनाथ मंदिर आहे. स्कंद पुराणात याचा उल्लेख आढळतो. चंड नावाच्या दैत्याचा मुलगा प्रचंड हा गोदावरीच्या दक्षिण भागात दंडकारण्यात (हल्लीचे परंडा) राहत होता. त्याच्या त्रासाने सर्व पीडित शंकराला शरण गेले. शंकराने काशी क्षेत्राच्या रक्षणासाठी जे ८ भैरव आपल्या नेत्रातून निर्माण केले होते. त्यापैकी कालभैरव याने या प्रचंड दैत्याचा तसेच सुवर्णसूर, भैमकासुराचा वध केला. त्यानंतर शंकराने त्याचा सुवर्णपुरी उर्फ सोनारीत राहण्याची आज्ञा केली. त्यामुळे कालभैरव सोनारीत वास्तव्य करू लागले. अशी आख्यायिका सांगितली जाते.
कल्याण स्वामीचा मठ:
महापुरुषांच्या वास्तव्याचे एक ठिकाण परंडा तालुक्यात डोमगाव येथे आहे. एका आड वाटेला, सोनारी जवळ असलेल्या या गावात समर्थ रामदासाचे पट्टशिष्य पूज्य कल्याणस्वामीचा यांचा मठ आहे. या कल्याणस्वामीच्या हस्ताक्षरातील दासबोधाची सुरेख अक्षरातील प्रत व खुद्द रामदासांनी त्यात केलेल्या दुरुस्त्या या स्थानाला आगळे महत्व आहे.
काटीची मशिद:-
येरमाळयाची येडाई:
येरमाळा हे गाव उस्मानाबाद पासून ५० कि. मी. अंतरावर आहे. प्रभुरामचंद्राना वनवासाला जाताना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सतीचे रुप घेउन भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला येडी आहेस. असे म्हंणटले. तेव्हापासून हि देवी इथे राहिली व तिचे नाव येडाई उर्फ येडेश्वरी झाले. या आख्यायिकेचा उल्लेख रेणुका स्त्रोत्रात असल्याचे पुजारी सांगतात. येरमाळा हे सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर आहे.

कळंब
तालुक्याती येरमाळा हे गाव मुख्य राज्यमहामार्गावर येत असून बालाघाटाच्या
कुशील वसले आहे. येथील श्री येडेश्वर देवी जागृत देवस्थान असून
महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्तगणांचा मोठा जनसागर नारळी पौर्णिमा आणि
नवरात्रात याठिकाणी हजेरी लावतो.
हे मंदिर गावच्या दक्षिण बाजूस ३०० ते ४०० फूट बालाघाटाच्या पर्वतीय रांगेत डोंगर माथ्यावर असून या मंदिरात जाण्यासाठी भक्तमंडळींना ४०० ते ४५० पाय-या चढून वर गेल्यानंतरच पुरातन कालीन हेमाडपंथी बांधकाम करण्यात आलेल्या मंदिराच्या आतमध्ये तीन-चार फूट व्यास असलेली यावर शेंदूर लेपून केलेल्या आणि डोक्यावर मुकूट, नाकात नथ, गळ्यात माळ अशा अलंकाराने नटविलेल्या श्री देवी येडेश्वरी तांदळ्याचे भाविकांना दर्शन होते.
देवीसमोर पुत्र परशुरामाची चांदीची मूर्ती आहे. मदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी, हवन होम, श्री गणेश, श्री दत्त, महादेव आणि काळभैरवनाथांचे छोटी मंदिरे आहेत. मंदिरात पाच डिकमल आणि मंदिराच्या मागील डोंगरावर तुळजाभवानी मातेचे मंदिर व एक डिकमल आहे.
या ठिकणी देवीचे स्नानगृह असून देवी येडेश्वरी पार्वतीचे रुप असून रेणुका, अंबा, जगदंबा, तुकाई अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या असंख्य भक्तांचे देवस्थान म्हणजेच ग्रामीण भागातील येडाई होय. परंतु या देवीच्या कोनाशिला स्थापनेबाबत पुरातत्त्व खात्याकडे कोणतीही नोंद नाही. या देवीबाबात अख्यायिका सांगितली जाते.
एकदा प्रभू राम सितेच्या शोधात या भागात भटकंती करीत असताना देवी पार्वतीने विश्रांतीसाठी थांबलेल्या रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करुन येताच रामाने ‘तुकाई तू तर माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सितेचे रुप धारण केलेली तू तू माझी वेडी आई (वेडाई) आहेस’ असे म्हटले. यामुळे देवीस वेडाई या नावाने ओळखले जाते.
आबाजी पाटलांचे कुलदैवत माहूर गडची रेणुका देवी असल्याने त्यांना त्याठिकाणी देवीला वारंवार जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी येरमाळा येथे डोंगरावरच माहूरगडाप्रमाणे देवीचे हुबेहुब मंदिर बांधले. श्री येडेश्वरी देवीच्या तांदळा माहूरच्या रेणुका देवी प्रमाणेच असून येथील एकमुखी दत्तमंदिर आणि कल्लोळ याचे पुरावे म्हणून भक्तांना पाहवयास मिळतात. चालत आलेल्या परंपरेनुसार आजही नवरात्रामध्ये देवीला भल्यापहाटे पाच दिवस भक्तगण खेटे प्रदक्षिणा पाठीमागे न पाहता घालतात. आजही खेटे घालताना थुंकणे, पाठीमागे पाहणे अनिवार्य मानले जाते. यावेळीच भाविक पांढरा दोरा वाहून डोंगराभोवताली देवीच्या पायथ्यापासून नवसाचे साकडे घालतात. नवमीच्या दिवशी देवीला पहाटे अजाबळी देण्याची प्रथा रुढ झाली असून नवमीच्या पहाटे होमहवन तर अश्विन शुध्द दशमीस सिमोल्लंघन केले जाते. येथील देवी राज्यासह इतर राज्यातही प्रसिध्द असून भाविक, लोकप्रतिनधी यांच्या निधीतून सभामंडप, पाय-या कठडे आदी उभे करण्यात आले असून श्री देवी येडेश्वरी देवथान ट्रस्ट येरमाळ (ता. कळंब) यांच्या माध्यमातून भक्तांच्या सोयीसुविधांसाठी आणि त्यांना रांगेतच उभे राहवे लागते यासाठी उड्डाण पुलाची व्यवस्था आणि त्यावरील निवारा करण्यात आला आाहे. मलाकूर येथील पाझर तलावातून पाईपलाईन करून ती उपळाई येथील शेतक-यांच्या विहिरीत पाण्याची साठवण करून मंदिरात आणि मंदिर परिसरात कामयस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात आला आहे. भाविकांसाठी शौचालय व्यवस्था, मंदिरासह परिसरात प्रकाश व्यवस्थाही केली आहे.
ट्रस्टच्यावतीने प्रसाद केंद्र चालविले जात असून, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासठी जाण्यासाठी देवी ट्रस्टच्या माध्यमातून सिमेंट रस्ता व प्रकाश योजना राबविण्यात आली आहे.
परंडयाच्या उत्तरेस ७ कि.मी. अंतरावरील सोनारी या गावी श्री. कालभैरवनाथ मंदिर आहे. स्कंद पुराणात याचा उल्लेख आढळतो. चंड नावाच्या दैत्याचा मुलगा प्रचंड हा गोदावरीच्या दक्षिण भागात दंडकारण्यात (हल्लीचे परंडा) राहत होता. त्याच्या त्रासाने सर्व पीडित शंकराला शरण गेले. शंकराने काशी क्षेत्राच्या रक्षणासाठी जे ८ भैरव आपल्या नेत्रातून निर्माण केले होते. त्यापैकी कालभैरव याने या प्रचंड दैत्याचा तसेच सुवर्णसूर, भैमकासुराचा वध केला. त्यानंतर शंकराने त्याचा सुवर्णपुरी उर्फ सोनारीत राहण्याची आज्ञा केली. त्यामुळे कालभैरव सोनारीत वास्तव्य करू लागले. अशी आख्यायिका सांगितली जाते.
कल्याण स्वामीचा मठ:
महापुरुषांच्या वास्तव्याचे एक ठिकाण परंडा तालुक्यात डोमगाव येथे आहे. एका आड वाटेला, सोनारी जवळ असलेल्या या गावात समर्थ रामदासाचे पट्टशिष्य पूज्य कल्याणस्वामीचा यांचा मठ आहे. या कल्याणस्वामीच्या हस्ताक्षरातील दासबोधाची सुरेख अक्षरातील प्रत व खुद्द रामदासांनी त्यात केलेल्या दुरुस्त्या या स्थानाला आगळे महत्व आहे.
काटीची मशिद:-
katichi Masjid, kati, Osmanabad dist
|
उस्मानाबाद जिल्ह्यात, तुळजापूर तालुक्यात तुळजापूर पासून २४ किलोमीटर काटी
नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात हिजरी १०१२ (इसवीसन १६०४) मध्ये
अहमदनगरचा निजाम बुर्हाणशहा याच्या काळात बांधलेली प्रसिध्द जामा मशिद
आहे. बुर्हाणशहाचा सरदार याकुतच्या बायकोने मेहेरच्या पैशातून या मशिदीची
निर्मिती केली होती. काळ्या बेसॉल्ट मध्ये बांधलेली ही मशिद म्हणजे दख्खनी
शैलीच्या इस्लामी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.
Entrance gate of Kati Masjid
|
काटी गाव हे मध्ययुगात अहमदनगर - तुळजापूर - सोलापूर व्यापारी मार्गावरील
गाव असावे. त्यामुळे या गावात भव्य जामा मशिदीची निर्मिती करण्यात आली
असावी. मराठवाड्यातल्या इतर गावंप्रमाणे काटी हे छोटेसे गाव आहे. गावच्या
बाहेरच्या परिघावर शेत आहेत तर गावात दाटीने बांधलेली घरे आहेत. या
घरांच्या मध्ये त्यांना फ़टकून असलेली भव्य आणि सुंदर जामा मशिद उभी आहे.
Minar, Kati
|
पूर्वाभिमुख भव्य अशा सदर दरवाजातून आपला मशीदीच्या परीसरात प्रवेश होतो.
दरवाजाच्या चारही बाजूला सडपातळ मिनार आहेत. मिनारांवर फ़ुलांची आणि
पाकळ्यांची नक्षी आहे. मिनाराच्या वर छोटे घुमट असून घुमटा खाली उठावदार
पाकळ्या आहेत. सदर दरवाजाच्या आतील भाग अनेक कमानींचा बनवलेला आहे.
कमानींच्या बाजूला फ़ूल कोरलेली आहेत. दरवाजातून प्रांगणात प्रवेश केल्यावर
समोरच वजू करण्यासाठी बांधलेला तलाव आहे. तो भरण्यासाठी मशिदीच्या आवारात
एक विहिर आहे. तलावाच्या समोर मशिदीची तीन कमान असलेली इमारत आहे.
मशिदीच्या चौकोनी इमारती भोवती फ़िरवलेल्या फ़ुलांच्या पट्टीमुळे (cornice)
इमारत दोन मजली असल्याचा भास होतो. इमारतीच्या बाहेरच्या बाजूने एक सुंदर
जीना आहे. मशिदीचा आतील भाग कमानींनी बनलेला आहे.
मशिदीच्या पश्चिमेच्या भिंतीत असलेल्या मेहराबावर आणि त्यावरील अर्ध
घुमटावर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे. मशिदीच्या आतील भिंतींवर कुराणातील
आयात आणि सुविचार फ़ारसी भाषेत कोरलेले आहेत. आश्चर्याचा भाग म्हणजे भिंतीवर
कोरलेली ही अक्षरे सहजासहजी दिसत नाहीत. त्यावर पाणी मारल्यास ती अक्षरे
दिसतात.
Beautiful steps, Kati
|
मशिदीच्या बाहेरच्या बाजूला सुंदर आणि उठावदार फ़ूलं कोरलेली आहेत.
मशिदीच्या चारही कोपर्यात चार मिनार आहेत. त्यांना जोडणारी नक्षीदार
कठडापट्टी आहे. मशिदेचा मुख्य घुमट गोलाकार पायावर आहे. या घुमटाखाली नाजूक
आणि उठावदार पाकळ्या आहेत. मशिदीच्या आवाराच्या चारही बाजूला रिवाक
(तटबंदी) आहे. पूर्णपणे दगडात बांधलेली आणि दगडातील अप्रतिम कोरीव कामासाठी
ही आडवाटेवर असलेली मशिद एकदा तरी नक्की पाहायलाच हवी.
पाणी मारल्यावर दिसणारी अक्षरे
|
जाण्यासाठी :- काटी गाव तुळजापूर पासून २४ किलोमीटर आणि सोलापूर पासून ७० किलोमीटरवर आहे.
तेर (TER)
तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या
तेर उर्फ़ तगर येथे इसवीसन पूर्व चौथ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे
सापडतात. इसवीसनाच्या दुसर्या शतकात सातवाहन काळात तेर हे महाराष्ट्रातील
व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणुन उदयाला आले. येथुन भडोच या बंदरा
मार्गे रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. याप्रदेशात पिकणार्या कापसा
पासून बनवलेले सुती तलम कापड, लाकूड, शंखाच्या बांगड्या, इत्यादी वस्तूंना
रोमन साम्राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी होती. या व्यापारामुळे तगर नगराची
भरभराट झाली. परदेशी प्रवासी टॉलेमी आणि ग्रीक खलाश्याने लिहिलेल्या
"पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन सी" या प्रवास वर्णनात तगर नगराचा उल्लेख
सापडतो. त्याच कलावधीत बौध्द धर्मियांनी तगर येथे धार्मिक केंद्र उभारले.
सातवाहनांनंतर आलेल्या गुप्त चाकुक्यांपासून ते यादवांपर्यंत सर्व
राजवटींनी या नगरात अनेक मंदिरे बांधली. मध्ययुगीन कालखंडात इतर व्यापारी
केंद्रे उदयास आल्याने तगर विस्मृतीत गेले. इसवीसन १९०१ मध्ये हेन्री कझिन
यांनी तेर येथे सविस्तर पाहाणी करून वृत्त्तांत प्रसिध्द केला. त्यानंतर
तेर येथे वेगवेगळ्या कालखंडात पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले.

तेर येथे कै. रामलिंगअप्पा लामतुरे वस्तू संग्रहालय आहे. उस्मानाबाद पासून
२२ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. कै. रामलिंगअप्पा लामतुरे यांनी चौकस
बुद्धीने व ऐतिहासिक वस्तू जमवण्याचा छद या जोरावर वस्तू जमावल्या व हा
लाखो रुपयांचा संग्रह त्यांनी २२ जानेवारी १९७१ रोजी शासनाकडे सुपूर्द
केला. शासनाने तेथे भव्य वास्तू उभी केली असून अभ्यासक व पर्यटकांना हि
वास्तू उपयुक्त ठरली आहे.
रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय (Ramlinga Khandappa Lamture Museum)
तेर गावात शिरल्यावर प्रथम लागते
ते रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय. आपल्या गावात परदेशी प्रवासी
येतात आणि इथल्या पांढरीच्या टेकाडावरून जून्या पुराण्या वस्तू घेऊन जातात
हे पाहून लहान रामलिंगप्पाच कुतुहल चाळवल. त्याने हेडमास्तरांना याबद्दल
विचारल्यावर त्यांनी तेर गावच्या इतिहासाबद्दल आणि इथे मिळणार्या
वस्तूंच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल रामलिंगप्पला माहिती सांगितली. त्यानंतर
रामलिंगप्पांनी अशा वस्तू जमवायला सुरुवात केली. हळूहळू गावकर्यांनीही
आपल्याला सापडलेल्या वस्तू त्यांना आणुन द्यायला सुरुवात केली. अशाप्रकारे
रामलिंगप्पांचा संग्रह वाढत गेला. आयुष्यभर जमवलेला संग्रह त्यांनी १९७१
मध्ये शासनाच्या हवाली केला. तोच २२८९२ वस्तूंचा संग्रह आपल्याला
रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयात पाहायला मिळतो. यामध्ये सातवाहन,
चालुक्य कालिन नाणी, मातीची भांडी, दगडात, मातीत बनलेल्या मुर्ती, प्राणी
प्रतिमा, पदक, दगडात कोरलेले शिलालेख, गध्देगाळ, नक्षीकाम, शंखाच्या
बांगड्या, वस्तू, हस्तीदंती वस्तू, पाण्यावर तरंगणारी वीट इत्यादी अनेक
गोष्टी पाहायला मिळतात. या संग्रहालयातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे
सहाव्या सातव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिराची लाकडी चौकट. मंदिराच्या
गर्भगृहाची ही चौकट चिखलात पडून राहील्याने इतक्या वर्षानंतरही तशीच्या तशी
होती. पुरातत्व खात्याने त्यावर काम करुन ती संग्रहालयात ठेवलेली आहे.
त्यावरील मुर्ती, नक्षीकाम, कोरीवकाम पाहाण्य़ासारखे
आहे. (वस्तुसंग्रहालयात छायाचित्रण करण्यास मनाई आहे.)
काळेश्वर मंदिर
|
संत गोरोबा मंदिर आणि काळेश्वर मंदिर (Goroba Mandir & Kaleshwar Mandir)
वस्तू संग्रहालय पाहून त्याच
रस्त्याने पुढे गेल्यावर आपण गोरोबाकाकांच्या मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणी
वारकरी आणि भक्तांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. गोरोबा काकांच्या
मंदिराच्या बाजूला चालुक्य काळातले काळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दोन
सुंदर वीरगळ पाहायला मिळतात. मंदिराचा कळस आणि गर्भगॄह ढासळलेला आहे त्याची
पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. पण त्याभोवती सिमेंटचा विचित्र कट्टा
बांधून सध्या कळसाला आधार दिलेला आहे. पण त्यामुळे कळसाची शोभा गेलेली आहे.
मंदिर परीसरात अनेक पिंडी, सतीशिळा आणि समाधी पाहायला मिळतात.
उत्तरेश्वर मंदिर (Uttareshwar Mandir,Ter)
उत्तरेश्वर मंदिर
|
गोरोबाकाका मंदिर पाहून तेरणा नदी
ओलांडून गेल्यावर दाट वस्तीत असलेल्या उत्तरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. ६-७
व्या शतकात कलचुरी राजवटीत संपूर्णपणे वींटांमध्ये बांधलेले हे एकमेव
मंदिर आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. मंदिराच्या बांधकामात शोभा
आणण्यासाठी विविध प्रकारच्या नक्षीकाम, मकरशिल्प असलेल्या वीटा खास बनवून
वापरलेल्या आहेत. मंदिराच्या पाया व भिंतींसाठी भरीव आणि जड वीटा
वापरलेल्या असून कळसासाठी मात्र हलक्या वीटा वापरलेल्या आहेत. जेणेकरून
कळसाचे वजन कमी होईल. कळसासाठी ज्या वीटा बनवल्या आहेत त्या इतक्या हलक्या
(त्याचवेळी शिखराचे वजन पेलण्या इतक्या मजबूत) आहेत की त्या पाण्यावर
तरंगतात. वस्तूसंग्रहालयात आपल्याला अशाप्रकारची वीट पाण्यावर तरंगणारी वीट
पाहायला मिळते. वजनाने हल्की आणि तरीही मजबूत अशी वीट बनवण्यासाठी मातीत
मोठ्या प्रमाणावर तुस मिसळले जाते. ही वीट उच्च तापमानाला भाजल्यावर
त्यातील तूस जळून जाते आणि सच्छिद्र पोकळ्या तयार होतात. अशाप्रकारे हलकी
आणी मजबूत वीट बनवली जात असे. उत्तरेश्वर मंदिराच्या बाहेर काही वीरगळ
पाहायला मिळतात.
उत्तरेश्वर मंदिर
|
त्रिविक्रम मंदिर
|
त्रिविक्रम मंदिर (Trivikram Mandir,Ter)
उत्तरेश्वर मंदिरापासून ५ मिनिटाच्या अंतरावर चैत्य गृहासारखी गजपृष्ठाकार
रचना असलेले त्रिविक्रमाचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिरही पूर्ण
वीटांध्ये बांधलेले असून मंदिरात श्री विष्णूची त्रिविक्रम मुर्ती आहे.
मुर्तीच्या पायाशी बळी, शुक्राचार्य आणि बळीच्या पत्नीची मुर्ती असून
बाजूला भैरवाची मुर्ती आहे. मंदिरातील कानडी शिलालेखानुसार शके १००० मध्ये
कळचुर्य घराण्यातील महामंडळेश्वर जोगम्रस याचा उल्लेख आहे. मंदिरा समोर
असलेल्या मंडपात गरुडाची मुर्ती आहे.
त्रिविक्रम मंदिर
|
जाण्यासाठी :- उस्मानाबाद रस्त्याने आणि रेल्वेने इतर शहरां जोडलेले आहे.
उस्मानाबादहून २५ किमी आणि तुळजापूरहून ५० किमी अंतरावर तेर गाव आहे. गावात
खाण्या पिण्याची सोय आहे.
तेर गावाची सफ़र करुन उस्मानाबादकडे मोर्चा वळवावा. उस्मानाबाद म्हणजेच
पूर्वीचे धाराशिव. या नगराकडे येणार्या मार्गावर धाराशिव लेणी आहेत.
संत गोरोबा काका मंदिर – Shree Sant Goroba Kaka Temple
1267 मधे जन्म झालेल्या संत गोरोबा काकांचे मंदिर या जिल्हयात असुन या
ठिकाणी दर्शन करण्याकरता ग्रामीण भागातुन भाविक मोठया प्रमाणात येत असतात
हे भाविक या यात्रेनंतर परतीच्या वाटेत पंढरपुर आणि तुळजापुरची यात्रा
करतात.
संत गोरोबा काकांच्या 1317 मधे झालेल्या मृत्युनंतर 13 व्या शतकात हे
मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर संपुर्ण दगडांनी बांधलेले असुन वास्तुकलेचे
एक उत्तम उदाहरण आहे. धार्मीक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांकरता येथे एक
सभामंडप देखील बांधला आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील ‘तेर’ हे ठिकाण संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ
असुन याच ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे. पुर्वी या ठिकाणाचे नाव तगर असे
होते, तेरणा नदीच्या तिरी हे गांव वसले असुन या ठिकाणी फार जुने असे जैन
मंदिर देखील आहे आणि या ठिकाणचे कोरीव काम अतिशय देखणे आणि सुबक असे आहे.
या ठिकाणची काही मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत, या ठिकाणी
श्री नृसिंहाचे जुने मंदिर आहे शिवाय गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाचे जुने
मंदिर असुन त्यात त्रिविक्रमाच्या मुर्तिसमोर भगवान विष्णुची देखील मुर्ती
विराजमान आहे.
उस्मानाबाद
पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या
पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध
असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे
महाराष्ट्रला ज्ञात आहे. या गावात जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर
त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. तर येथील कांही मंदिरे
स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला
श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या
भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र:
भारतात जैन धर्मीयांची अनेक तीर्थक्षेत्र (धर्मीकस्थाने) आहेत. या तीर्थक्षेत्रचे सिद्धक्षेत्र,(निर्माणभूमी) कल्याणक्षेत्र व अतिशय क्षेत्र असे तीन प्रकार समजतात. ज्या तीर्थक्षेत्रावर चोवीस तीर्थकर किंवा मुनी यापैकी कानोनितरी मोक्षाला गेलेले असतात.त्याला सिद्धक्षेत्र म्हणतात. दक्षिण भारतातील एकमेव दिगंबर जैन सिद्धक्षेत्र म्हणजे कुंथलगिरी उसमानाबाद – औरंगाबाद रस्त्यावर ६० कि.मी. व सरमकुंडी फाट्यापासून डावीकडे २ कि.मी. अंतरावर पहाडावर हे तीर्थक्षेत्र आहे.
Temple of Lord Mahaveer is situated in this town. It is said that Samavsharan of Lord Mahaveer came here. This temple is about 800 or more years old. An ancient temple of Lord Parsvanath is also here, during reconstruction 20, ancient idols of Teerthankars were found. Idols of Lord Mahaveer and Lord Parsvanath are very well sculptured
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र:
भारतात जैन धर्मीयांची अनेक तीर्थक्षेत्र (धर्मीकस्थाने) आहेत. या तीर्थक्षेत्रचे सिद्धक्षेत्र,(निर्माणभूमी) कल्याणक्षेत्र व अतिशय क्षेत्र असे तीन प्रकार समजतात. ज्या तीर्थक्षेत्रावर चोवीस तीर्थकर किंवा मुनी यापैकी कानोनितरी मोक्षाला गेलेले असतात.त्याला सिद्धक्षेत्र म्हणतात. दक्षिण भारतातील एकमेव दिगंबर जैन सिद्धक्षेत्र म्हणजे कुंथलगिरी उसमानाबाद – औरंगाबाद रस्त्यावर ६० कि.मी. व सरमकुंडी फाट्यापासून डावीकडे २ कि.मी. अंतरावर पहाडावर हे तीर्थक्षेत्र आहे.
Temple of Lord Mahaveer is situated in this town. It is said that Samavsharan of Lord Mahaveer came here. This temple is about 800 or more years old. An ancient temple of Lord Parsvanath is also here, during reconstruction 20, ancient idols of Teerthankars were found. Idols of Lord Mahaveer and Lord Parsvanath are very well sculptured
Shri Digambar Jain Siddha Kshetra, Kunthalgiri, Maharashtra (Siddha Kshetra)
No of Temples: 11, Pahaad/Mountain: yes,
(150 steps). Doli available. Historical importance: It is salvation
place of Munishree Deshbhushanji and Kulbhushanji. There is
self-immolation place with foot carving of the great Aacharyashri
Shantisagarji near Shantinath Temple, 07 Temples are on mountain while
04 are at its base. It is amazing, mind calming and miraculous kshetra
worth to visit. It is must famous Jain Tirth Kshetra in Maharashtra.
Annual Fair: Margshish Shukla Poornima, Bhadrapad Shukl-2 (Aacharya Shri
Shantisagarji Mahapunya day).
Tirth Location Details:
A/P:- Kunthalgiri |
Tal:- Bhoom |
Dist:- Osmanabad |
State:- Maharashtra |
Pin Code:- 413503 |
Tirth Lodging Facilities:
Rooms:- yes |
Hall:- yes |
Guest House:- yes |
Ground For Tent:- |
Mess:- yes |
Transportation Facilities:
Railway Station:- Kurduwadi: 75km, Solapur:120km. |
Bus Stand:- Kunthalgiri: 02km, Bhoom: 12km. |
Straight Root:-Solapur: 120km, Aurangabad: 200km. |
Nearest City:- Beed, Barshi, Osmanabad: 60km. |
Contact No:-02478-276860, 07721053995
बार्शीतील प्राचीन भगवंत मंदिर :-
सोलापूर ते बार्शी ७० किमी असे दीड तासाचे अंतर आहे. १०:३० वाजता आम्ही भगवंत मंदिरात पोचलो. विष्णूदेवाचे मनोभावे दर्शन झाले.
या मंदिराबद्दल मिळालेली माहिती अशी कि, भगवंत
मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील
एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर
बांधण्यात आले. या मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार
पूर्वमुखी आहे. गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी व
कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस
गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पुर्णिमेस छबीना
बाहेर नेह्ण्यात येतो. पुराणात इथे अंबरीश राजा राज्य करत असल्याचे उल्लेख
इथे सापडतात. "दहा खंड पृथ्वी, अठरा खंड काशी, बार्शीत नांदतो अंबऋषी.."
तसेच पुराणातील आणखी एक उल्लेख म्हणजे भगवान विष्णूच श्री भगवंत या
अवतारातलं मंदिर फक्त बार्शीतच आहे इतर कुठेही नाही. पंढरपूरला जाऊन केलेला
एकादशीचा उपवास बार्शीत येऊनच सोडावा लागतो असे येथील लोक मानतात. म्हणून
बरीच भाविक लोक पंढरपूरच्या वारीनंतर बार्शीत येऊन द्वादशी दिवशी उपवास
सोडतात.
भगवंत मंदिर
|
भगवंत मंदिर
|
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य असे कि. भगवंत
देवाची मूर्ती हि शाळीग्राम च्या दगडात घडवलेली आहे. भगवंत देवाच्या
पाठीमागे लक्ष्मीदेवीची मूर्ती आहे जी सहसा लगेच नजरेत पाहता येत नाही.
भाविकांना देवीचे दर्शन व्हावे म्हणून उजव्या बाजूस आरसा लावलेला आहे
त्यामुळे आरशातूनच दर्शन घेता येते. मंदिरांच्या आतील बाजूस, गाभाऱ्यात
बरीच अप्रतिम नक्षीकाम व विविध शिल्प आपणास पाहायला मिळतात. पुरातन दगडी
बांधकाम केलेली मंदिराभोवतालची भिंत तसेच मंदिरातील लाकडी बांधकाम शैलीमुळे
हे देवस्थळं लक्ष वेधून घेते व मन प्रसन्न करते. मंदिराच्या जवळ असलेली सुदर्शन विहीर आम्हाला काही कारणास्तव पाहता आली नाही.
मंदीरात असलेले नागशिल्प
|
एक राजा महादेवाची पूजाअर्चा करतानाचे शिल्प
|
गणपती बाप्पा
|
खांबावर असलेलं हत्तीचं कोरीव शिल्प
|
समोर दिसतेय ती भगवंताची मूर्ती व आरशात दिसणारी लक्ष्मी देवीची मूर्ती
|
मुरली वाजवणारा कृष्ण, घागर घेतलेली गवळण व गाई
|
मंदिराबाहेरील सुंदर नक्षीकाम
|
भगवान विष्णूची शेषशायी मूर्ती
|
मंदिराबाहेरून काढलेलं छायाचित्र
|
कोरिव नक्षीकाम केलेले दगडी खांब
|
बार्शीतील
या अप्रतिम मंदिरास व येथील मित्रांना निरोप देत आम्ही निघालो
परांडयाकडे.... आबाच्या कुलदैवत असलेलं ठिकाण परांडा रस्त्यावर होत.
रस्त्यावरच असणाऱ्या श्री क्षेत्र सोनारीच्या काळभैरवनाथ जोगेश्वरीचे दर्शन घेतले. मंदिर फार पुरातन असले तरी अलीकडे जीर्णोद्धार केला गेला असावा. मंदिरातील काळ्या पाषाणातील मूर्ती महाराष्ट्रातील सर्व "कुलदैवत" म्हणजेच खंडोबा, जोतिबा, सिदोबा, नाईकबा वैगेरे देवांच्या साजेशी मिळतीजूळतीच अशी आहे. मंदिराबाहेर देवाचा पुरातन लाकडी रथ आहे. ज्याचा वापर अजूनही रथोत्सव दरम्यान होतो.
नळदुर्ग किल्ला - ऐतिहासिक पार्श्वभूमी :
उस्मानाबाद पासून ४६ कि.मी. अंतरावर असलेले नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल
प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. हा प्रंचड किल्ला अडीच कि.मी.घेराचा असून
अजूनही सुस्थितीत आहे. या किल्ल्याजवळून वाहणा-या बोरी नदीचे पाणी अडवून
त्याचा उपयोग दुर्ग राक्षणासाठी केलेला फक्त येथेच आढळतो. तीन – चारशे
वर्षापूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते. याचा हा सबळ
पुरावाच आहे. पावसाळ्यात या पाणी महालावरून पडणा-या पाहण्याचे विहंगमदृश्य
पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात.
नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे –
हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैद्राबादकडे
निघाल्यावर सोलापूर पासुन ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव आहे. या गावातच
नळदुर्ग हा अप्रतिम बांधकामाचा हा अजोड किल्ला आहे.नळदुर्ग हा
महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी
जवळजवळ ३ कि.मी लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरुज आहेत्.
महाराष्ट्राचे गिरीदुर्ग, जलदुर्गाबरोबरच अनेक महत्त्वाचे असे
वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट
किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा आणि वेगळा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग
होय.इतिहासनळदुर्ग कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो
बहमनी सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. बहमनी राज्याची शकले उडाली व त्यातुन
ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर
कब्जा मिळवला. दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून
पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात
बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे. पुढे औरंगजेब या मोगल
बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैद्राबादच्या निजामाकडे
सोपवली.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेसध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची बांधणी
आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या
भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या
बाजुच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि
नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे.
पाणी बोरी नदीचा प्रवाह वळवून या खंदकात आणण्यात आहे, हे पाणी कायम रहावे
म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधार्या सारखी भिंत
बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरुपी पाणी साठून रहाते.
त्यामुळे या बाजुने शत्रुला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. खंदक आणि
नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली
भक्कम तटबंदी आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे
बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपुर्ण असलेला नवबुरुज
आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजुला असलेल्या तटबंदीमध्ये
हा बुरुज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला
नवबुरुज म्हणतात. असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही.नळदुर्ग
किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.
रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्या बंधार्यामध्ये जलमहाल आहे. या
बंधार्याची उंची २० मीटर उंच आहे. बंधार्यामध्ये चार मजले आहेत.
बंधार्याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे.
बंधार्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या
खिडक्या नक्षीदार महीरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील
शिलालेख आहे. याचा अर्थ असा होतो की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास
मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रुचे डोळ्यापुढे अंधारी येईल.
पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधार्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग
ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत. नळदुर्ग किल्ला त्याची
रचना, संरक्षण व्यवस्था, टेहाळणीचा उपळ्या बुरुज, त्यावरील लांब तोफ
दरवाजाचा वक्राकार मार्ग यामुळे चांगलाच लक्षात रहातो.
नळदुर्गचा मुख्य दरवाजा (हुलमुख/हुरमुख)
|
आणि समोरील दोन्ही, उजव्या आणि डाव्या बाजूंची तटबंदी
|
![]() |
अनोख्या रचनेचा नरनारी धबधबा (छायाचित्र आंतरजालावरून साभार )
|
इथलं सौंदर्यीकरण : एक छोटंसं उदाहरण
|
मुख्य प्रवेशद्वार :
किल्ल्यात प्रवेश केल्यावर दिसणाऱ्या देवड्या.
एक मोठ्या बुरुजावरून पाणीमहालाचे दृश्य.
फोटोत दिसणाऱ्या बंधाऱ्यावरून जाऊन आपण पाणीमहालात उतरतो. उजव्या हाताला दिसतोय तो उपळ्या बुरुज. किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज.
पाणीमहालाकडे जाताना :
वरती उल्लेख केलेली खंदकाची दुहेरी तटबंदी ती हीच. या दुहेरी तटबंदीतून आपण चालत खाली बंधाऱ्यावर उतरतो.
कमाल आर्किटेक्चर :
सुस्थित तटबंदी आणी बॅटरीची गाडी :
पाहीमहालातून घेतलेले दृश्य.
जास्तीचे पाणी बंधाऱ्यातुन वाहून पुढे नदीत जाते.
उपळ्या बुरुजाकडून मुख्य प्रवेशद्वारा कडे जाणारी भक्कम तटबंदी. या फोटोवरूनच किल्ल्याच्या अभेद्यतेची कल्पना येईल.
पाणीमहालाकडून उपळ्या बुरुज :
१५०-२०० पायऱ्या असाव्यात. 

उपळ्या बुरुजावरून दिसणारा किल्ला परिसर
उपळ्या बुरुजावरील मगर-तोफ : देवगिरी किल्लावर पाहिलेल्या मेंढा तोफेशी साधर्म्य वाटते.
बोरी नदीचा प्रवाह व दूरवर दिसणारा बुरुज. यावरून किल्ल्याचा आकार लक्षात येईल.
उपळ्या बुरुजावरून दिसणारा धान्य / दारुगोळा कोठार.
पाणीमहाल, उपळ्या बुरुज पाहून परत येताना मध्ये एक बोटिंग स्पॉट आहे.
किल्ल्यातील अडवलेल्या पाण्यात बोटिंगची सोय कंपनीने केली आहे. भर दुपारी
साडे तीनच्या उन्हातही एक हौशी कुटुंब बोटिंग करत होते.
मशीद, बोटिंग स्किप करून परतीचा रस्ता धरला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ
असलेल्या बुरुजावर चढून तेथील हत्तीशिल्प पाहून पुण्यनगरीच्या दिशेने
निघालो. वाटेत अक्कलकोट ला जाऊन स्वामी समर्थांचे आशिर्वाद घेऊन रात्री घरी
पोहोचलो.
हत्तीशिल्प
पावसाळ्यातील नर-मादी धबधब्याचे विलोभनीय दृश्य.

कायमस्वरूपी धबधबा
नळदुर्ग येथील ऐतिहासिक ‘नर-मादी’ हा धबधबा पावसाळ्यामध्ये ठराविक काळातच असतो. पर्यटन विभागाकडून या धबधब्याच्या वरील बाजूस विद्युतनिर्मिती करून दिवसा धबधबा व रात्री ते पाणी पुन्हा धरणात टाकल्यास धबधबा कायमस्वरूपी सुरू राहण्यास मदत होईल. यासोबत मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. पुरातत्व विभागानं आता या किल्ल्याची डागडुजी सुरू केली असुन अनेक सुसहय बदल करण्यात येत आहेत. किल्ल्याला भेट देण्याची वेळ सकाळी 9 ते 5 अशी आहे.
नळदुर्ग येथील ऐतिहासिक ‘नर-मादी’ हा धबधबा पावसाळ्यामध्ये ठराविक काळातच असतो. पर्यटन विभागाकडून या धबधब्याच्या वरील बाजूस विद्युतनिर्मिती करून दिवसा धबधबा व रात्री ते पाणी पुन्हा धरणात टाकल्यास धबधबा कायमस्वरूपी सुरू राहण्यास मदत होईल. यासोबत मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. पुरातत्व विभागानं आता या किल्ल्याची डागडुजी सुरू केली असुन अनेक सुसहय बदल करण्यात येत आहेत. किल्ल्याला भेट देण्याची वेळ सकाळी 9 ते 5 अशी आहे.
सोलापूर – हैद्राबाद राष्ट्रीय मार्गावर अणदूर हे गाव आहे. त्या काळात त्याचे आनंदवूर हे नाव होते. मनिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने मल्हारी मार्तंड भैरवनाचा अवतार धारण केला. त्यानंतर भक्त व मुनीच्या प्रर्थनेनुसार भैरवरुपी शंकर अरीमैलार येथे स्वयंभू लीन्गृपणे प्रगट झाले. हे मंदिर हेमाडपंथी असून आवारात अनेक दीपमाळा आहेत. अनदुरला मार्गशीष ६ ला इ मैलापुरला पौष शुद्ध १५ ला यात्रा भरते. इथे प्राण्यांचा नाही तर पुरणाचा नैवेद्य दिला जातो हे विशेष.
अणदूरच्या खंडोबाचा करार
मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला.या अवतारांतील खंडोबाच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत.अणदूरच्या खंडोबाचीही अशीच अख्यायिका आहे.अणदूरपासून चार कि.मी.अंतरावर असलेल्या नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नळ - दमयंती राजा - राणी राहात होते.दमयंती राणी श्री खंडोबाची निस्सीम भक्त होती.ती दररोज पहाटे उठून स्नान केल्यानंतर श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आदि - मैलार ( कर्नाटक राज्यातील बीदर या शहरापासून आठ कि.मी.अंतरावर हे ठिकाण आहे) येथे जात होती.तेथे जाण्यासाठी किल्ला परिसरात एक वडाचे झाड मदत करीत होते, त्या झाडाच्या पारंब्यावर बसल्यानंतर हे झाड उडत असे व ते आदि - मैलारपर्यंत जात असे व दर्शन झाल्यानंतर परत हे झाड नळदुर्गला येत असे. नित्यनियमाने एक वर्षे सेवा केल्यानंतर नळ राजाला पहाटे जाग आली तर जवळ दमयंती राणी नव्हती.तोपर्यंत राजाला ही खबर नव्हती.राजाला संशय आला.दुस-या दिवशी त्याने गुपचूप राणीच्या पाठीमागे जावून तोही दुस-या बाजूला पारंब्यावर बसून आदि - मैलारला गेला. तेथे गेल्यावर नळ राजाला सर्व उलघडा झाला व त्याने खंडोबाची माफी मागून नळदुर्गला प्रगट होण्याची विनंती केली, श्री खंडोबाने तथास्तू म्हटले व किल्ल्यातील एक जागा सांगून तेथे आपण प्रकट होणार असल्याचे सुचित केले.नळ राजाने दुस-या दिवशी काही मजूर लावून खंडोबाने दर्शविलेली जागा उकरण्यास सुरूवात केली. ( ती जागा म्हणजे नळदुर्ग किल्ल्यातील उपल्या बुरूजामागील पाठीमागील भाग ) पाच ते सहा फूट खड्डा घेतल्यानंतर रक्ताची चिळकांडी बाहेर पडली. नंतर पाहिले तर एक स्वयंभू तांदळा (दगडाचा अंडाकृती भाग ) निघाला. तो राजाने मोठया भक्तीभावाने पुजला. नंतर किल्ल्यापासून काही अंतरावर श्री खंडोबाचे मंदिर बांधण्यात आले व या ठिकाणी श्री खंडोबाची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. दमयंतीच्या भक्तीसाठीच श्री खंडोबा आदि - मैलारहून नळदुर्ग या ठिकाणी प्रगट झाले. राजा - राणीच्या निधनानंतर हजारो वर्षानंतर श्री खंडोबा मंदिरात कोणत्या तरी समाज कंटकाने गाय कापली, त्यामुळे नळदुर्गचे मंदिर भ्रष्ट झाले.त्यामुळे श्री खंडोबा कोपला म्हणून त्या काळातील लोकांनी पाच कि.मी.अंतरावरील अंनंदऊर या ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिर बांधले, व श्री खंडोबाचा तांदळा या ठिकाणी नेवून श्री खंडोबाची या ठिकाणी प्रतिष्ठापणा केली. त्याकाळचे अंनंदऊर म्हणजेच आजचे अणदूर होय.
अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराच्या देखभालीसाठी कोल्हापरच्या शाहू महाराजांनी हजारो एकर जमिन दान केली आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरासमोर सभागृह बांधले.त्यामुळे अणदूरचे मंदिर तीन वेगवेगळया भागात बांधल्याचे दिसून येते.काही वर्षानंतर नळदुर्गच्या लोकांनी खंडोबा आमचा आहे, असा वाद सुरू केला.या वादावर श्री खंडोबा अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे पावणेदोन महिने ठेवण्याच्या तोडगा निघाला.त्यानुसार मैलारपूर येथे जुन्या मंदिराच्या पाचशे फुटाच्या अलिकडे नविन मंदिर मंदिर बांधण्यात आले व तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.अनेक वर्षे लोटून गेल्यानंतरही ही प्रथा गुण्या - गोविंदाने सुरू आहे.
सोमवारी अणदूरच्या खंडोबाची यात्रा पार पडली, त्यावेळी श्री खंडोबाचा करार करण्यात आला, हा करार कशासाठी केला जातो, हे नव्या पिढीला सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच केला आहे.
दिवसभर यात्रा पार पडल्यानंतर रात्री श्रीचा वाजत- गाजत छबिना काढला जातो.पहाटे दोन वाजता नळदुर्गच्या मानक-यांचे अगमन होते, त्या अगोदरच अणदूरचे मानकरी व ग्रामस्थ जमलेले असतात.दोन्ही गावांच्या मानक-यांत गळाभेट झाल्यानंतर चहा-पान केला जातो.नंतर एका साध्या कागदावर लेखी करार करून तो श्री खंडोबा देवाजवळ एका ताटात ठेवला जातो.त्याच्यावर भंडार टाकून तो मोठ्याने वाचण्यात येतो.आम्ही श्री खंडोबाची मुर्ती पावणे दोन महिन्याच्या वास्तव्यासाठी नळदुर्ग येथे नेत असून तेथील यात्रा पार पडल्यानंतर परत अणदूरला आणून देवू , असा त्यात उल्लेख असतो.नंतर मुख्य मानक-यांचा फेटा बांधून सत्कार केला जातो तर अन्य मानक-यांचा नारळ प्रसाद व फुलांचा तुरा देवून सत्कार केला जातो.त्यानंतर श्री खंडोबाची मुख्य मुर्ती एका पालखीत घालून वाजत - गाजत नळदुर्गला नेली जाते व नळदुर्गची यात्रा संपल्यानंतर वाजत - गाजत अणदूरला परत आणली जाते. हा सोहळा अणदूर - नळदुर्गच्या लोकांचे ऐक्याचे प्रतिक असून, डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
No comments:
Post a Comment