जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा
विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२
रोजी वेगळा केला गेला.
जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे, जिल्हा संकरीत
बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी
प्रसिध्द आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्वाच्या संकरीत बियाणे
उद्योग जिल्ह्यात आहेत. शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना
जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- जालना, अंबड, भोकरदन,
बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठा व जाफराबाद. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ
पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या
खो-यात येतो. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते
महत्वाचे हॅंडलूम व पॉवरलूम हातमाग केंद्र आहे.
जिल्ह्यातील प्रसिध्द व्यक्ति- समर्थ रामदास स्वामी, जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवळे, दासू वैद्य इत्यादी.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- राजूर येथील श्री गणेश मंदीर, अंबड येथील मत्स्योदारी देवी, जळीचा देव (जयदेववाडी).
जालना जिल्ह्यातील बस डेपोचे संपर्क क्रमांक
Sr. No Designation Functioning Area STD Code No. Telephone No. Email_id
Office
1 Divisional Controller Jalna bus stand depot contact number, 02482 220532 statjln@rediffmail.com
1 Divisional.Traffic Officer Jalna Division. 02482 221102
2 Divisional. Accounts Officer Jalna Division. 02482 221008
3 Divisional. Personnel Officer Jalna Division. 02482 220602
4 Labour Officer Jalna Division. 02482 220602
जालना जिल्हा पर्यटन
जालना
जिल्हयात महत्वाची/प्रसिध्द पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत त्यातील काही
धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मंमादेवी,
आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर प्रसिघ्द असुन, अंबड येथे मस्त्याच्या
आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे
जवळपास 400 वर्षापूर्वीचा चौघाडा व कल्याणस्वामींचा मृदंग तसेच वेणूबाईचा
तानपूरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. मराठवाडयातील
अष्टविनायकापैकी एक गणपती राजुर येथे आहे. जाम तालुका घनसांवगी येथे समर्थ
रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदीर ही आहे. हेलस तालुका मंठा
हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील
अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पही
आहेत. शिवाय रऊनापराडा ता. अंबड येथे प्रसिध्द दर्गा असुन तेथे दरवर्षी
मोठा ऊरुस भरतो.
आनंदीस्वामी मंदीर, जालना
श्री.आनंदी
स्वामी म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेय अवतार ई. सन १७५२ मध्ये कार्तिक
शुद्ध दशमीला देवळगाव राजा येथे बालाजी मंदीरात प्रगट झाले.तेथून कृष्णासा
पटवी यांचे भक्तीपोटी जालना येथे आले ५१ वर्ष वास्तव्य केले.त्यांचे काळात
जवळ पास २५० वर्षा पूर्वी नामदेव पाटीलबा म्हणून चारठाना येथील भक्त होते.
त्या काळी ते पंढरपूरला चारठाना येथून पायी दिंडी घेवून जात. पंढरपूरला
जायची तयारी करताना साक्षात पांडुरंगानी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन
सांगितले की आनंदीनाथ व पंढरीनाथ एकच आहेत. या पुढे तू पंढरीला न येता
जनकपुर (जालना)येथे जाऊन आषाढी उत्सव सुरू करावा. नामदेव पाटीलबा जालना
येथे दिंडी ने आले व स्वामींचे परवानगी ने आषाढी महोत्सव सुरू केला जवळ पास
त्या परंपरेला जवळपास २५० वर्ष झालीत. स्वामींच्या समाधी नंतरही अव्याहत
पने ती चालू आहे.
आनंदी
स्वामी मंदीर हे 250 वर्षापुर्वीचे मंदीर आहे. हे मंदीर मराठा
साम्राज्याचे महादजी शिंदे यांनी तयार केले होते.
जुना जालना या
ठिकाणी श्री संत आनंदी स्वामी यांनी समाधी घेतली होती. प्रत्येक
आषाढी एकादशीनिमीत्त येथे मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत
असतात
आषाढी
एकदशीनिमित्त स्वामींची पालखी निघते मोठी यात्रा भरते. स्वामींचे दर्शन
म्हणजेच साक्षात पांडुरंगाचे दर्शन ही अनुभूती येते. !!
मम्मादेवी मंदीर, जालना
हे मंदीर जुना जालना येथे
मस्तगड भागामध्ये आहे. मंदीरामध्ये रोज किर्तन, भजन व धार्मीक कार्यक्रम
होत असतात. विशेषतः अनेक लोक नवरात्रामध्ये दर्शनासाठी हजेरी लावतात.
जालना शहरातील मम्मा देवी मंदीर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे देवी
दुर्गेचे एक रूप म्हणुन मम्मा देवी पुजनीय आहे. देवीच्या नवरात्रा
व्यतिरीक्त चैत्र महिन्यातील नवरात्रात देखील येथे मोठया प्रमाणात
भाविकांची गर्दी होते.
मनपसंत वर मिळण्याकरता आणि पतिला दिर्घायुष्य मिळण्याकरता देखील महिला या ठिकाणी दर्शनाला येतात.
संभाजीउद्यान (मोती बाग), जालना
जुना जालना मध्ये नगर पालिकेचे असलेले
संभाजी उद्यान हे मोती बाग या नावाने प्रसिध्द आहे. हे उद्यान जालना शहरवासियांसाठी एक आकर्षनाचे ठिकाण आहे.
उद्यानामध्ये सुंदर हिरवळीने युक्त
बगीचा आहे तसेच रंगीबेरंगी फुलांची झाडे व इतर अनेक प्रकारची झाडे आहेत.
लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी असून झुकझुकगाडीचे
मुख्य आकर्षण मुलांना उद्यानाकडे
आकर्षीत करते. उद्यानाच्या मागे व उत्तरेस मोती तलावाचा सुंदर किनारा
आहे. तसेच उद्यानामध्ये संगीत कारंजे असून ते देखील उद्यानाचे
मुख्य आकर्षन आहे
कालीमस्जीद, जालना
जुना जालना मधील कचेरी रोड
परिसरामध्ये अत्यंत जुनी असलेली मस्जीद आहे, जी काली मस्जीद म्हणून
ओळखली जाते.
मुस्लीम समाजामधील लोक रोज
नियमीतपणे नमाज पडण्यासाठी येथे एकत्र येतात. त्याचप्रमाणे ईदच्या दिवशी
देखील नमाज व धार्मीक कार्यक्रम आयोजीत केले जातात.
ही मस्जीद जवळपास 400
वर्षांपुर्वीची असून ती काळया दगडांमध्ये धार्मीक गुरू जमशेद खान यांनी
बांधलेली आहे.
श्री बालाजी मंदिर
जुना जालना परिसरातील कचेरी
रोड येथे, श्री. बालाजीचे दोनशे वर्षे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा
जिर्णोध्दार (नुतनीकरण) सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये
संस्थानचे विश्वस्त आणि सर्व भाविकांच्या मदतनिधीतून दि. १२ मार्च,
२०१५ रोजी पूर्ण करण्यांत आले. या मंदिरातील पंचधातुंच्या मुर्ती मंदीर
विश्वस्तांच्या पुर्वजांनी तिरुपती बालाजी येथून आणून त्यांची
प्रतिष्ठापना केली. या पंचधातूंच्या श्री. बालाजी, श्री लक्ष्मी व श्री
पद़मावती यांच्या असून त्या १७व्या शतकातील आहेत.
याचे प्रमाणपञ
भारतीय पुरातत्व विभागाने मंदिराचे विश्वस्तांना दिलेले आहे. या
मंदिरामध्ये नवराञ उत्सवात याञा भरते तसेच विजयादशमीचे (दसऱयाचे ) दिवशी
श्री. बालाजींची पालखी मिरवणूक राञी काढण्यांत येते.
या मंदिराचा जिर्णोध्दार
प्रसिध्द वास्तु शिल्पविशारद श्री. चंद्रप्रकाश शर्मा यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यांत आलेला आहे.
हे मंदिर बांधताना ते नागरी
शैलीमध्ये बांधण्यात आले आहे. एकूण १६०० चौ. फुटावर मंदिराची उभारणी
करण्यांत आली असून मुख़्य गाभारा, अंतराल, सभागृह, अशी रचना आहे.
मंदिराचे तीन स्वतंञ कळस आहेत, ज्यांची उंची ३५ फुटांपर्यंत जाते.
मंदिरातील कोरीवकाम हे प्राचीन मंदिराच्या रचनेनुसार राजस्थानमधील
कलाकारांच्या चमुने पुर्ण केले आहे. दरम्यान मंदिराचा जिर्णोध्दार
पूर्ण झाला असला तरी, अद्यापही या मंदिराचे दोन सभागृह मंदिर परीसरातच
उभारण्याचे काम शिल्लक आहे. या मंदिराची नोंदणी न्यास नोंदणी
कार्यालयाकडेकेलेली असून याचा नोंदणी क्रमांक J-११८४ असा आहे.
गुरू गणेश तपोधाम
जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश भवन हे एक महत्वाचे
पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश भवन हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले
जाते. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्टमार्फत या
धार्मीक स्थळाची देखरेख व विकासाची कामे केली जातात. या ट्रस्टमार्फत
शालेय संस्थान, महाविद्यालय, अंधांची शाळा, ग्रंथालय, गोशाला चालविल्या
जातात. संस्थानची गोशाला ही मराठवाडयामध्ये सर्वात मोठी गोशाला आहे.
मस्तगड किल्ला:
जालना शहराच्या मध्यभागी मस्तगड नावाचा अपरीचीत किल्ला आहे.
निजाम उल मुल्क याने १८ व्या शतकाच्या सुरवातीस जालना शहरात बांधलेल्या या
किल्ल्याचा आज केवळ बालेकिल्ला शिल्लक आहे.
हा भाग मस्तगड या नावानेच ओळखला
जात असल्याने आपण येथे येऊन पोहोचतो पण किल्ला मात्र कुणालाही ठाऊक नाही
त्यामुळे येथे आल्यावर नगरपालिकेचे जुने कार्यालय अशी चौकशी करावी.
जालना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
विष्णूच्या शक्तींचे मंदिर : अन्वा
शक्तिपूजा ही अगदी आदिम काळापासून सर्व भारतभर केली जाते. विविध रूपामधील
शक्तिदेवतेची आराधना करण्याची पद्धत देशभर प्रचलित आहे. दुर्गा, भवानी,
महालक्ष्मी, महाकाली या आणि अशा अनेक शक्तिदेवातांचे पूजन आपण करत आलो
आहोत. शक्ती म्हणजे सामथ्र्य, ताकद, ऊर्जा अशीसुद्धा भावना शक्ती या
नावापाठीमागे आहे. पुराणामध्ये अंधकासुर वधाची एक कथा येते. अंधकासुराच्या
वधाच्या वेळी शंकर भगवानांनी सर्व देवांकडे त्यांच्या शक्ती मागितल्या. आणि
त्यानुसार सर्व देवांनी त्या शक्ती शिवाला बहाल केल्या. त्या शक्ती म्हणजे
ब्रह्माची-ब्राह्मणी, इंद्राची-इंद्राणी, कार्तिकेयाची-कौमारी अशा होत. त्या
बहुधा संख्येने ७ असतात म्हणून त्यांना सप्तमातृका असे संबोधले जाऊ लागले.
भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीिलगी शब्द येतो आणि त्याचा अर्थसुद्धा
वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तिशास्त्रानुसार शक्ती जर दाखवायची असेल
तर त्या संबंधित देवाची स्त्रीरूपातील प्रतिमा दाखवली जाते. जसे की
भुलेश्वरच्या मंदिरात गणेशाची शक्ती दाखवताना स्त्रीरूपातील गणेशप्रतिमा
दाखवली आहे. ती काही गणेशाची पत्नी नाही तर ती गणेशाची शक्ती असते तिलाच
गणेशी अथवा वैनायकी असे म्हणतात. त्याचप्रमाणे विष्णूच्या शक्तींचे
मूर्तिरूपातील दर्शन आपल्याला एका सुंदर मंदिरावर पाहायला मिळते.
औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा इथले मंदिर होय.
चतुर्भुज
विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्म अशी चार आयुधे असतात. या आयुधांचा
त्यांच्या हातातील क्रम बदलला की गणिती शास्त्रानुसार २४ कॉम्बिनेशन्स
होतात. त्या प्रत्येक प्रकाराला केशव, माधव, नारायण अशी संध्येत येणारी २४
नावे आहेत. औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव
लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे
ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले,
इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मुळात
वैष्णव मंदिर होते. तारकाकृती पीठावर असलेले हे मंदिर खजुराहोच्या
कांदारिया महादेव मंदिराच्या पीठाची आठवण करून देते. मंदिराला एकूण ५०
स्तंभ आहेत. मंदिरावरील सर्व शिल्पे ही वैष्णव आहेत. हे लक्ष्मीचे मंदिर
असावे. मुख्य कोनाडय़ातसुद्धा वैष्णव शिल्पे आहेत. अत्यंत सुंदर अशा पाच
द्वारशाखा असलेले गर्भगृह आहे. दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव
द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिविपडी आहे. मंदिराच्या
बाह्यभागावर चोवीस वैष्णव शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या
प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या
प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या
विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. जसे विष्णूची केशव, माधव, नारायण, अशी
नावे आहेत त्याचप्रमाणे या शक्तींची सुद्धा कीíत, कांती, तुष्टी, पुष्टी,
धृती अशा प्रकारे चोवीस नावे आढळतात. अग्निपुराण, पद्मपुराण,
चतुर्वर्गचिंतामणी या ग्रंथांच्या आधारे ही माहिती मिळते.
विष्णूच्या
शक्तींचे या स्वरूपातील बहुधा हे एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही
प्रमाणात झीज झालेली आहे तरीसुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा
डौल, चेहऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. अजिंठय़ाला जाताना
मुद्दाम, आवर्जून अन्वा या ठिकाणी थांबून हे मंदिर पाहून घ्यावे. वैष्णव
शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर
भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे या
दर्जाचे आहे. या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते
फेब्रुवारी हा होय.
श्री गणपती मंदीर, राजूर
गणपती मंदीर, राजूर हे जिल्हयाच्या उत्त्ारेस 25 कि.मी. अंतरावर
स्थीत आहे. प्रत्येक चतुर्थीला अनेक भावीक दर्शनासाठी येतात. अंगारकी
चतुर्थी निमीत्त बहुतांश भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये
हजेरी लावतात.
राजूर हे गणेशाचे एक पूर्ण पिठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले गेले आहे.
तसेच इतर पिठ म्हणून मोरगाव, चिंचवड (पुणे) असून राहिलेले अर्धे पिठ
पदमालय हे आहे. राजूर मंदिराचे नुतनीकरणाचे काम सुरू असून सध्या ते
अखेरच्या टप्यामध्ये आहे.

राजुरला जाण्यासाठी जालन्यावरुन वाहन सेवा उप्लब्ध आहे.
१) एस.टी. बस सेवा
जालना ते भोकरधन
जालना ते सिल्लोड
२) याशिवाय जालना स्टँडपासून खाजगी सेवा उपलब्ध आहे
मत्स्योदरी देवी मंदिर, अंबड

अंबड येथील मत्स्योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्या दक्षीणेस 21
कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्या टेकडीवर स्थित आहे त्या
टेकडीचा आकार मासोळी (मत्स्य) सारखा आहे. त्यामुळे या देवीस
मत्स्योदरी देविचे मंदिर म्हणून ओळखले जाउ लागले. हे मंदिर जवळपासच्या
क्षेत्रातील अत्यंत जुन्या मंदिरांपैकी एक आहे.
यादव काळामध्ये भरभराटीला आलेल्या मराठवाडय़ाला अनेक पलू आहेत. इथे विविध
देवस्थाने आहेत, लेणी आहेत, मूर्तिकला आहे आणि उत्तमोत्तम मंदिरे आहेत.
शिल्पस्थापत्यामधून या प्रदेशाची संपन्नता ध्यानात येते. अनेक महत्त्वाची
देवस्थाने इथे आजही नांदती आहेत. मग ते औंढय़ा नागनाथसारखे ज्योतिìलग असो
अथवा पानगाव, निलंगा, धर्मापुरीसारखी शिल्पजडित मंदिरे असोत. जालना
जिल्ह्यतील अंबड हे तालुक्याचे गाव आणि इथे वसलेली मत्स्योदरी देवी
हेसुद्धा त्यातलेच एक उदाहरण. दुधना आणि गोदावरी या नद्यांच्या दुआबात
वसलेला अंबड तालुका हा मराठवाडय़ातला एक संपन्न तालुका म्हणून गणला जातो.
अगदी इ.स.च्या १८ व्या शतकातही सरकार जालनापूरमधील अंबड हा एक प्रधान परगणा
राहिला होता. अंबडच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी बरीच पेशवेकालीन
कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यात साखरे घराण्यातील काही कागद, अंबड
ताम्रपट, तसेच नाईक अशी पदवी असलेल्या काळे यांच्या घराण्यातील ‘उचापती’ या
सदरातली कागदपत्रे यांचा समावेश होतो. अंबडच्या मत्स्योदरी देवीबद्दल बरीच
माहिती त्यातून उपलब्ध होते. या गावाची मत्स्योदरी देवी अगदी प्राचीन
काळापासून प्रसिद्ध असून तिचे स्थान हे गावाच्या अग्नेय दिशेला असलेल्या
डोंगरावर आहे. ‘मत्स्यश्वरदरम यास्यासामत्स्योदरी’ या उक्तीप्रमाणे या
डोंगराचा आकार माशासारखा असल्यामुळे या देवीला हे नाव पडले असावे. समोरून
तोंड उघडलेल्या माशासारखा हा डोंगर दिसतो. मागच्या बाजूला हा निमुळता होत
जाऊन माशाच्या शेपटीसारखे याचे टोक आहे.
स्कंद्पुरानातील सह्यद्री
खंडांतर्गत उपलब्ध कथेनुसार अंबरीश ऋषींनी कठोर तपश्चर्या करून आणि
अनुष्ठाने करून महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन स्वरूपात इथे
देवीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. सध्याचे मंदिर अभावी असून होळकर
यांच्या काळातील आहे. अंबड परगणा हा होळकरांच्या खासगी दौलतीचा एक भाग
होता. ही खासगी दौलत पेशव्यांकडून मल्हारराव होळकरांना एक विशेष अधिकार
म्हणून मिळाली होती. आपले राज्य वृद्धिंगत व्हावे
यासाठी अनेक सेवा, इनामे होळकरांनी दिली होती. अंबड येथील मत्स्योदरी
देवीला त्यांनी दिलेली इनामे, जमिनी, वर्षांसने हे याचेच द्योतक आहे. 

सध्याचे मंदिर हे एका डोंगरावर वसले असून तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या
बांधून काढल्या आहेत. पायऱ्या चढून वरती गेले की एक देखणे प्रवेशद्वार
लागते. त्याच्या आतील दोन्ही बाजूस देवडय़ा आहेत. पुढे एक चौक आहे आणि नंतर
मुख्य मंदिरामध्ये प्रवेश होतो. मंदिरात तीन तांदळे असून त्याच महाकाली,
महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून इथे पुजल्या जातात. मंदिर प्रदक्षिणा
मार्गावर एक देवनागरी लिपीमधील शिलालेख कोरलेला आढळतो. बाजूला काही
खोल्यासुद्धा आहेत. उंचावर मंदिर असल्यामुळे इथून खालचा परिसर तसेच अंबड
शहराचा देखावा फारच सुंदर दिसतो. मंदिराच्या मधल्या चौकट िभतीवर एक सुंदर
शिल्प कोरलेले आहे. तीन मासे आणि त्यांचे एकच तोंड असे हे शिल्प आहे.
त्याला शिल्पश्लेश असे म्हणतात. डोंगराच्या पायथ्याशी एक छोटीशी समाधी असून
त्यात दगडात कोरलेले दोन मानवी पाय दिसतात. अंबरीश राजाची समाधी असे याला
म्हणतात. देवस्थान परिसर खूप प्रशस्त असून या ठिकाणी शारदीय नवरात्रामध्ये
खूप मोठी जत्रा भरते. माशाच्या आकाराच्या डोंगरावर वसलेली ही मत्स्योदरी
देवी नक्कीच आगळीवेगळी आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमीत्ताने दरवर्षी या मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते
पुष्करणी बारव, अंबड
पुष्करणी बारव, अंबड ता.अंबड जि.जालना (महाराष्ट्र)
श्रीमंत महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेली हि बारव
महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बारव म्हणून नावलौकिक आहे व या बारवेचा साधा
पुरातत्व खात, महाराष्ट्र कार्यालयात नोंद हि नाही. संपूर्ण दगडी पाषाणात
बांधकाम असलेल्या या बारवेमध्ये आराम करण्यासाठी राजमहाल पाहावयास मिळतो व
त्या राजमहालात समस्त धनगर समाजाचे काळीज श्रीमंत महाराणी पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांनी हि काही काळ वास्तव केला होता तसेच या बारवेमधील
राजमहालातील दगडी खांब व त्यावरील नक्षीकाम हे सुबक असून या बारवेपासून ५
ते ५० किलोमीटर पर्यंत श्रीमंत राणी अहिल्यादेवी होळकर यांनी कशाप्रकारे
जमिनी खालून पाण्याची व्यवस्था निर्माण केली होती हे जाणून घेण्यासाठी व
तिची सद्याची अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी हा Video नक्की पहा व्याख्याते
मा.श्री.अविनाश धायगुडे यांच्या समवेत.
जांबसमर्थ, घनसावंगी

जांबसमर्थ येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. हे ठिकाण जालना
जिल्हयातील घनसावंगी तालुक्यामध्ये आहे. समर्थ रामदास स्वामी यांचा
जन्म चैत्र शुक्ल नवमी शके 1530 (हिंदू दिनदर्शिकेनुसार) सायं. 12 झाला
होता. अगदीरामजन्माचे वेळी. राम मंदिरामध्ये दर वर्षी राम नवमी निमीत्त
यात्रा भरते. हे राम मंदिर रामदास स्वामी यांच्या घरामध्ये स्थीत आहे.
समर्थ मंदिर हे संत रामदास स्वामी यांच्या आठवणीमध्ये बनविण्यात आले
आहे.
एका संस्थेमार्फत या मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते. ज्याची
स्थापना 1943 साली नानासाहेब देव यांनी केली. 55 सदस्य व 11 ट्रस्टी या
संस्थेव्दारे करण्यात आले. आता संस्थेची स्वतःची 240 हेक्टर जमिन
आहे. संस्थेमार्फत येथे राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही ईमारत माता राणी होळकर, इंदोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवी
अहिल्याबाई होळकर यांनी दिलेल्या देणगीमधून बनविण्यात आली आहे.
जाळीचादेव (श्री चक्रधर स्वामी), जयदेववाडी
जाळीचा देव हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्वाचे धार्मीक ठिकाण
आहे. या धार्मीक ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे काही काळ
वास्तव्य होते. हे ठिकाण भोकरदन तहसील कार्यालयाच्या उत्तरेकडे
आहे.
श्रीजगदंबा देवी मंदीर, मंठा
मंठा
शहरापासून उत्तरेकडे दोन कि.मी. अंतरावर उंच टेकडीच्या ठिकाणी
श्री जगदंबा माता मंदीर स्थीत आहे. हे मंदीर 300 वर्षांपुर्वीचे
आहे. विशेषतः दर मंगळवारी भावीक दर्शनासाठी येतात. मंदीरामध्ये दर
वर्षाला नवरात्र व चैत्र पोर्णीमाच्या निमीत्ताने यात्रेसाठी
भाविकांची गर्दी होते
हेलास :-जालना
जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हेलास हे गाव हेमाद्रीपंताचे मुळ गाव मानले
जाते. हेलास गावात हेमाद्रीपंताच्या काळातील बारव आपण आजही पाहु शकतो.
हि बारव शिवमंदीरासमोर असून तीचे क्षेत्रफळ ३० स्क्वेअर फुट आहे. अगदी उन्हाळ्यातही या बारवेत पाणी असते.
रोहिलागड
स्थापत्यशिल्प
: रोहिलागड नावावरून रोहिले या पश्तुनी अफगाण लोकांशी संबंध असावा हे
नक्कीच. मात्र, काय ते इतिहासालाच ठाऊक!!! या लढाऊ जमातीच्या लोकांना
औरंगजेबाने सतराव्या शतकात भारतात राजपूत व इतरांशी लढण्यासाठी आणले आणि
आजच्या उत्तर प्रदेशातील बरेली शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशात वसवले.
मराठवाड्यातील
किल्ल्यांविषयीची आपली मालिका पुढे सुरू ठेवताना लोंझा आणि
लहुगड-नांद्रासारख्याच अजून काही छोट्या किल्ल्यांचा आपण आढावा घेऊया. असाच
एक किल्ला आहे आजच्या जालना जिल्ह्यातील रोहिलागड. औरंगाबाद शहरापासून
दक्षिण-पूर्वेला अंबड शहरापर्यंतचा सगळा परिसर शुष्क आणि खुरट्या
डोंगररांगांनी व्यापलेला आहे. अशाच एका अवतरणचिन्हासारखा आकार असलेल्या
छोट्या डोंगरावर औरंगाबाद शहरापासून सुमारे ५० किलोमीटरवर अंबड तालुक्यात
हा किल्ला वसलेला आहे. पायथ्याशी वसलेले गावही किल्ल्याच्या नामसाधर्म्याने
ओळखले जाते.
गावात सापडणारे मंदिरांचे अवशेष तसेच देवगिरी, पैठण,
अंबड, जामखेड या यादवकालीन बाजारपेठांना जोडणाऱ्या मार्गावरील स्थान पाहता
गावाचा यादवकालीन संबंध अधोरेखित करता येऊ शकतो. मात्र, गाव आणि
किल्ल्याच्या निर्मितीविषयी याहून अधिक इतिहास अजूनही मौन बाळगून आहे.
लहुगडसारखा रोहिलागड किल्ल्याचा वापर ही देवगिरी किल्ल्याच्या संरक्षक
फळीतील टेहळणी आणि पहाऱ्याचे स्थान म्हणून वापर होत असावा. त्यानंतरच्या
मुस्लिम राजवटीच्या काळातील इथल्या इतिहासाविषयी काहीच पुरावा मिळत नाही.

कच्च्या रस्त्यालगत असणारे फिरंगी मातेचे मंदिर
मंदिरा शेजारून रोहिलागड गावाकडे जाणारा कच्चा रस्ता व उवीकडे किल्ला
नकाश्याद्वारे रोहिलागडावरील आमच्या भटकंती मार्ग व किल्ल्यावरील वास्तू अवशेष दाखवण्याचा एक प्रयत्न
छोटेखानी गिरिदुर्ग - रोहिलागड
रोहिलागड
नावावरून रोहिले या पश्तुनी अफगाण लोकांशी संबंध असावा हे नक्कीच. मात्र,
काय ते इतिहासालाच ठाऊक!!! या लढाऊ जमातीच्या लोकांना औरंगजेबाने सतराव्या
शतकात भारतात राजपूत व इतरांशी लढण्यासाठी आणले आणि आजच्या उत्तर
प्रदेशातील बरेली शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशात वसवले. हा भाग आज रोहिलखंड
म्हणूनच ओळखला जातो. अफगाणिस्तानातील कमालीच्या शुष्क डोंगरदऱ्यांमधील
शूरवीर लढवय्ये म्हणून हे रोहिले त्यानंतर भारताच्या इतिहासात गाजले.
मराठवाड्यातील या भागातील त्यांचा इतिहास अजून तेवढासा ज्ञात नाही.
गावाच्या पूर्वेला वसलेल्या किल्ल्यावर जाताना दोन छोट्या-मोठ्या लेणी
पाहावयास मिळतात. मोठ्या लेणीचे छत ८-९ कोरीव खांबांवर तोललेले आहे. कोरीव
कामाच्या शैलीवरून ही लेणी पूर्व-मध्ययुगीन काळातील असावीत. इथून पुढे काही
उंचीवर काही तटबंदीचे अवशेष आढळून येतात.
गडाच्या उत्तरेला एका
बुरुजाचे अवशेषही शिल्लक आहेत. मात्र, त्यांची कालनिश्चिती करणे अवघड आहे.
गडाच्या पठारावर घराची काही जोती, पाण्याचा साठा आणि दगडी रांजण आदी अवशेष
दिसतात. दक्षिणेला माची भागाकडे जाताना एका खांबांवर तोललेले; पण आज कोरडे
पडलेले पाण्याचे टाके आहे. आधी म्हटल्याप्रमाणे गाव व परिसरातील तटबंदी,
इमारती व मंदिरांचे भग्नावशेष पाहता रोहिलागड परिसर इतिहासात महत्त्वाचे
स्थान बाळगून होता हे नक्कीच. यासंदर्भात अधिक माहिती मिळावी आणि रोहिलागड
ही इतिहासाच्या नकाशावर यावा यासाठी रोहिलागडवासीय प्रयत्नशील आहेत. आपण
गडप्रेमीही गडाला एकदा तरी भेट देऊन त्यांच्या या प्रयत्नात सहभागी
होऊया...
लेखन सौजन्य- तेजस्विनी आफळे
फोटो सौजन्य- श्री. विनीत दाते
मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ

मौलया नुरुद्दीन यांची समाधी मजार-इ-मौलया, डोणगांव ता. अंबळ, जि. जालना
येथे आहे. मौलया नुरुद्दीन यांची “वली अल-हिंद” (भारतीय प्रतिनिधी /
काळजीवाहू) या पदावर “दाऊदी बोहरा दावत”, येमेन केंद्रातर्फे नियुक्त
करण्यात आले होते. मौलया नुरुद्दीन हे शिक्षण घेण्यासाठी, कैरो, इजिप्त
गेले. ते 467 AH मध्ये भारतात परत आले आणि डेक्कन गेला. त्यांचा मृत्यू
“जुमादी-अल-उला 11” मध्ये डोणगांव ता. अंबड, जि. जालना येथे मृत्यू झाला.
विमानाने
जालना शहरामध्ये हवाई सुविधा नाही. सर्वात जवळचे विमानतळ चिकलथाना औरंगाबाद आहे.
जालना पासुन 64 किमी दूर चिकलथाना विमानतळ (आयएक्सयू), औरंगाबाद आहे.
जालना पासुन राजुर साठी दर तासाला बस ची व्यवस्था आहे.
रेल्वेने
देशातील इतर प्रमुख शहरांमधून जालना येण्या – जाण्यासाठी नियमित गाड्या सहजपणे मिळू शकता.
रेल्वे स्थानक: जालना
जालना पासुन राजुर साठी दर तासाला बस ची व्यवस्था आहे.
रस्त्याने
देशातील इतर प्रमुख शहरांपासून जालनापर्यंत नियमित बस आहेत.
बस स्थानक: जालना
जालना पासुन राजुर साठी दर तासाला बस ची व्यवस्था आहे.
जालना शहरात रहाण्याची सोयः-
१) Hotel Badgia
२) The Hotel Galaxy Deluxe
३) The Hotel Madhuban
४) The Hotel Saffron
५) The Hotel Flora Inn
६) Hotel Green Olive
७ ) Hotel Gurjas
८) Hotel Panchvati
९) Hotel Raviraj
संदर्भ :-
१) जालना जिल्हा गॅझेटीयर
२) दै. लोकसत्ता
२) दै. लोकमत
३) https://www.jalnazp.mahapanchayat.gov.in
४) https://www.tourmyindia.com
५) https://jalna.gov.in
No comments:
Post a Comment