Saturday, September 5, 2020

ईंदोर

प्रत्येक शहराची एक बोली असते. ‘काय करून राह्यलाय भाऊ?’ असे शब्द जरा रेंगाळलेल्या स्वरात कानी आले की, बोलणारी व्यक्ती नागपूरकर आहे, हे ओळखता येते. ‘काय बी’ची भाषा ओठावर असेल, तर तो सोलापूरचा हे समजते. वाक्याच्या शेवटी ‘म्हणून म्हटलं’ असेल आणि वाक्यात शिवी डोकावली तर तो नक्की कोल्हापूर परिसरातला. पु.ल. तर गमतीने म्हणाले होते की, कोल्हापुरात ‘रांडीच्या’ म्हणणे ‘गुड मॉर्निंग’इतके सहज उच्चारले जाते. वाजवीपेक्षा जास्तच शुद्ध आणि स्पष्ट, तेदेखील तिरकसपणाकडे झुकलेले मराठी असेल तर तो हमखास पुणेकर! दुर्दैवानं हल्ली पुणेरी रिक्षावाल्यांच्या तोंडीही ‘हिंदी’ डोकावू लागलेय. हिंदीची छाप मध्य प्रदेशातल्या मराठी मंडळींच्या बोलण्यात जाणवते. हिंदी भाषिक प्रदेश असल्याने ते स्वाभाविकही आहे. ‘हॅ नं’ने वाक्याचा शेवट इंदुरात ऐकू येतो.
      खात खात गप्पांची ‘बढिया’ अड्डेबाजीही इंदुरात चालते. करेला, बेसन, बुंदी रायता, पापडाची इथली चव तर उत्तम; पण मराठी, गुजराती, पंजाबी - कुठल्याही पदार्थाची ऐन वेळी केलेली फर्माईश इथे पुरी केली जाते. ‘खानेपिने के चटोरे लोग यहाँ हैं.’ किशनच्या रवी अल्पाहारची, आलू की कचोरी, पलासिया एरियातल्या ‘छप्पन दुकान’ची भजी-चाट, उत्तररात्रीही प्रशांत हॉटेलमध्ये मिळणारे ताजे पोहे खायलाच हवेत आणि बहुचर्चित रात्रीची ‘सराफा’मधली खादाडी पालकुआँ ते भुट्टे का किस, चाट, बासुंदी, आईस्क्रीम, तसेच ‘प्रकाश’मधल्या दही-वड्यावर पाच बोटांतून पडणारी पाच प्रकारची मसाला पावडर. हा अनुभव देण्यासाठी इंदुरात आलेल्या पाहुण्याला सराफ्यात रात्री नऊनंतर नेऊन खिलवण्याची रीतच आहे.
इथे जवळच बक्षी गल्लीतल्या सरदाराला मराठी पोथ्या पाठ आहेत. दुíमळ-धार्मिक पुस्तक इथे हमखास मिळणार, कोठारी मार्केटला नवा कपडा घेण्यासाठी तुम्ही डोकावणार. निरखीवाल्यांना विचारलेत तर अस्सल माहेश्वरी साडी कुठे मिळेल ते कळेल.
         रामबाग-नारायणबाग ही पूर्वीपासूनची मराठी वस्ती. वाडे आणि चाळवजा बिल्डिंग असलेली. आता इंदूर जरा अघळपघळ विस्तारलेय. अस्ताव्यस्तपणे चालवल्या जाणार्‍या वाहनांनी वाहतुकीचे बारा वाजवलेत. पटकथा - संवादकार सलीम किंवा गायक अरुण दाते यांच्या तोंडून ऐकलेले इंदूरचे वैभव मात्र आता काहीसे पुसले गेलेय. ‘चौराहे’ पे रस्ता क्रॉस करणे मुश्कील बनून गेलेय. पेशव्यांची तलवार समजल्या जाणार्‍या होळकर राजांचा राजवाडा (शीशमहल- कांचमहलसह) मात्र पुरातन वैभवाची साक्ष टिकवून आहे. विमानातून उतरताक्षणी दिसणारी ‘रानी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा’ ही पाटी मराठी मान उंचावते. माई मंगेशकरांच्या नावाने उभारलेल्या मराठा समाजाच्या वास्तूकडे मात्र मंगेशकर परिवाराचे आणि मराठी रसिकांचे लक्ष गेलेले नाही. अन्यथा एक हक्काचे मराठी थिएटर दिमाखात उभे राहिले असते.
       इंदूर शहराला फार मोठा इतिहास आहे. या संस्थानाचे संस्थापक मल्हारराव होळकर (१६९४ ते १७६६) यांनी आपल्या मामाच्या मदतीने पेशव्यांच्या सन्यात प्रवेश केला. इंदूर हे मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. इंदूर म्हटले की, मराठी इतिहासांतील कितीतरी जुन्या आठवणी जाग्या होतात. इंदूर हे नाव इंद्रेश्वर मंदिरावरून पडलेले आहे. हे मंदिर १७ व्या शतकातील आहे. सरदार मल्हाराव होळकर, अहिल्याबाई यांच्यामुळे इंदूर महाराष्ट्राला जवळचे वाटते. भौगौलिकृष्टयाही इंदूर महाराष्ट्राला जवळ आहे. इंदूरच्या उत्तरेला ग्वाल्हेर, पूर्वेला देवास व भोपाळ, दक्षिणेला पूर्वीचा मुंबई इलाखा आणि पश्चिमेला बडवानी व धार ही शहरं आहेत.
त्याने पेशव्यांकडून मनसब, माळव्याची जहांगीर व नर्मदेच्या उत्तरेकडील मराठयांच्या हालचालींचं सेनापतीपद हे अधिकार क्रमाक्रमाने मिळवलं. त्याच्या हयातीतच त्याचा मुलगा खंडेराव मृत्यू पावल्याने खंडेरावाचा मुलगा मालेराव यास गादीवर बसवण्यात आलं. तथापि मालेरावाच्या अकाली निधनामुळे खंडेराव यांच्या पत्नी अहिल्याबाई यांनी १७५४ ते१७९५ पर्यंत इंदूर संस्थानाची जबाबदारी सांभाळली. धार्मिकता, औदार्य, देवळांचे जीर्णोद्धार, न्याय व राज्यकारभाराची उत्तम व्यवस्था यासाठी अहिल्याबाई इतिहासात प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंनीच इंदूर शहराची भरभराट केली. २० एप्रिल १९४८ रोजी हे संस्थान मध्य भारत संघात विलीन झाले.
     भोपाळ ही मध्य प्रदेशची प्रशासकीय राजधानी असली तरी सांस्कृतिक राजधानी आहे ती इंदूर. स्थानिक भाषेत इंदौर. मुंबई-पुण्याहून १४ तासांचा ट्रेनचा प्रवास करून इंदूर गाठता येते, तर औरंगाबाद, जळगाव येथून रात्रभराच्या बसच्या प्रवासानंतर आपण इंदूरला पोहोचतो. मुंबई-पुण्याहून इथं विमानसेवाही आहे. इंदूरचा विमानतळ हा भारतातला एकमेव असा विमानतळ असावा, की जिथून मुख्य शहर फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
       मुंबईहून संध्याकाळी अवंतिका एक्स्प्रेसमध्ये बसायचं, सकाळी येणा-या स्थानकांवर खास ताजे इंदुरी पोहे खायचे की साडेनऊच्या आत आपण इंदूरला पोहोचलेले असतो. ट्रेन शिवाय आता बससेवाही सुरू झाली आहे.
इंदूरची खाद्यसंस्कृती तर प्रसिद्ध आहे. इथले लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदूरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि त्यात कणभरही अतिशयोक्ती नाही, हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेला बांधील नाही, त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं कारण नाही. इंदुरी लोकांचा दिवस सुरू होतो (आणि संपतोही) तो पोहे आणि जिलबीने. जिथे जाल तिथे पोहे दिसतात. केव्हाही गेलात तरी गरम पोहे मिळतात. या पोह्यावर विविध प्रकारची शेव, मसाला घालून ते दिले जातात. काही ठिकाणी जिलेबीही मिळते. सकाळी नाष्टा म्हणजे पोहे, हे इथं समीकरण आहे. एवढया प्रचंड प्रमाणात पोहे खपणारं हे भारतातील एकमेव शहर असावं. या विधानात कणभरही अतिशयोक्ती नाही.
इंदूरमध्ये आलात आणि बडा सराफ्याला गेला नाहीत तर तुम्ही इंदूर पाहिलंच नाही, असं म्हटलं जातं. कारण सराफा हा इंदूरच्या खाद्यसंस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे. इथं ‘जिवंत’ या शब्दाला फार अर्थ आहे. इंदूर शहराच्या मधोमध होळकरांचा जो राजवाडा आहे त्याच्या मागच्या भागात अतिशय दाटीवाटीने असलेली दुकानं आहेत. यात कपडे, सराफांची दुकानं अर्थातच जास्त आहेत. थोडं पुढे गेल्यास सराफ बाजारच लागतो. या बाजारालाच सराफा म्हणतात. पण हा सराफा सोन्यापेक्षाही तेथील खाद्यसंस्कृतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहे.
सराफी दुकानं बंद झाली की, रात्री साडेनऊनंतर विविध खाद्यपदार्थाची दुकानं लागण्यास सुरुवात होते. ही दुकानं रात्रभर उघडी असतात. तिथली स्पेशालिटी असलेले गराडू, साबुदाणा खिचडी, कचोरी, दहीवडा, गुलाब जाम, गोलगप्पा अशी यादी न संपणारी आहे. पोटात जेवढी जागा असेल आणि विविध चवी घेण्याची जिभेची तयारी असेल तेवढे विलक्षण चवींचे पदार्थ इथं मिळतात. या भागात रात्रभर चहलपहल असते आणि ही काही यात्रेतल्यासारखी एका रात्रीची दुकानं नसतात, तर वर्षातील ३६५ दिवस हे चित्र असंच असतं. सराफा कधीही झोपत नाही. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.
       आधी ईंदुरात आलेले आहोत तर आधी पर्यटनस्थळांना भेट देउया आणि मग खादाडीसाठी सराफा गाठूया.
 इंदूर : प्रेक्षणिय स्थळ
 इंदूरचे खजराना गणपतीचे मंदिर
khajaran mandir,indore

ऊँ गं गाणपत्ये नमो नमः
सिद्धी विनायक नमो नमः
अष्ट विनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया...
     इंदूरचे खजराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे.
    पंडितजींनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या दरबारात स्वप्नकथन केले. पंडितजींना स्वप्नात दिसलेल्या जागी खोदकाम करण्यात आले. खोदकामानंतर निघालेल्या गणपतीच्या मूर्तीची येथील मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर अल्पावधीतच मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ख्याती पसरली. मंगलमूर्ती मोरयाचे येथील जागृत वास्तव्य भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे. मनोकामना करून भक्तीभावाने येथे धागा बांधल्यास भक्ताची इच्छापूर्ती होते.
     मनोकामना पूर्तीनंतर येथे बांधण्यात आलेल्या हजारो धाग्यांमधून भक्त कोणत्याही एका धाग्याची गाठ सोडते. मंदिर परिसर भव्य व मनोवेधक आहे. मुख्य मंदिराव्यतिरिक्त इतर देव-देवतांची लहान-मोठी 33 मंदिर येथे आहेत. मुख्य मंदिरात गणपतीच्या प्राचीन मूर्तीसहित भगवान शंकर व दुर्गामाता यांच्या मूर्त्याही आहेत. इतर 33 मंदिरातून अनेक देव-देवतांचे वास्तव्य आहे. मंदिराच्या विस्तृत पसरलेल्या आवारात पिंपळाचा प्राचीन वृक्षही आहे.
      वृक्षास मनोकामना पूर्ण करणारा मानण्यात येते. मंदिरात येणारे श्रद्धाळू या वृक्षास प्रदक्षिणा जरूर घालतात. वृक्षावर हजारो पोपटांचे वास्तव्य आढळते. संध्याकाळच्या प्रसन्न, स्वर्गीय वातावरणात आपल्या मधूर वाणीने अधिकच भर घालतात. सर्वधर्मसमभाव या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कोणत्याही धर्मीयास येथे प्रवेश वर्ज्य नाही. हिंदुप्रमाणेच इतरधर्मीयही येथे येवून नतमस्तक होतात. वाहन खरेदीनंतर अनेकांची वाहन घेऊन पहिली भेट असते ती खजराना मंदिराचीच.
   भगवान विघ्नहर्त्याशी निगडीत सर्वच उत्सव येथे तेवढ्याच उत्साहाने पार पडतात. दर बुधवारी येते यात्रा भरते. यावर्षी गणेशोत्सवास येथे अकरा लाख मोदकांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. मंदिराच्या निर्माणापासून पंडित मंगल भट्ट कुटुंबीयच मंदिराची सेवा व देखरेख करत आहेत.
     काही वर्षांअगोदर वाद उद्भवल्याने जिल्हा प्रशासनाकडे व्यवस्थापन सोपवण्यात आले होते. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत भट्ट कुटुंबीयांचे सक्रीय योगदान आहे. सद्या भालचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेख, व्यवस्था सांभाळण्यात येते. मंदिराच्या पुननिर्माणासाठी त्यांनी कित्येक वर्ष उपवास पाळला आहे. वयोवृद्ध भालचंद्र महाराज प्रमुख प्रसंगी आजही पूजाअर्चा करतात.
    कधी जायचे - मंदिराच्या दर्शनासाठी आपण कधीही जाऊ शकता. मंदिरास लागूनच प्रत्येक बुधवारी यात्रा भरते. मंदिरातील विशेष आयोजन बघायचे झाल्यास गणेश चतुर्थीस अवश्य भेट द्या. यावेळी विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. गणपतीस विशेष नैवद्य अर्पण करतात.
   पोहचायचे कसे - इंदोर मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी आहे. आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गाने हे शहर जोडलेले आहे. देशभरातून येथे पोहचण्यासाठी रस्तामार्ग, रेल्वे व हवाई सेवा उपलब्ध आहे.
गीताभवन -
ही वास्तू शहरातच आहे .सिंधमधून फाळणीच्या वेळी भारतात आलेल्या एका सिंधी गृहस्थाने ही वास्तू उभारली आहे . हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे .प्रवेशद्वार दक्षिणेतील गोपुराच्या पद्धतीचे आहे. अनेक देवतांच्या सुंदर मूर्तीची मंदिरे आहेत .
सभागृहात इतिहासकालीन दृश्यांची तैलचित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वार चार पूर्णाकृती दगडांवर उभारलेले आहेत .गीता भवन हे इंदूरमधील एक धार्मिक मंदिर आहे परंतु हे कोण्या एका धर्माचे मंदिर नाही आणि सर्वधर्मीय श्रद्धा असणारे लोक मनशांतीच्या शोधात येथे येतात.
जुना राजवाडा - 
    इंदूरच्या प्रसिद्ध काजूरी मार्केट जवळ राजवाडा हा एक भव्य आणि ऐतिहासिक राजवाडा आहे. सुमारे 200 वर्षांपूर्वी होळकरांनी तो बांधला होता. छत्रीजवळील ही एक सात मजली रचना भव्यता आणि स्थापत्य कौशल्यांचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
   काजुरी बाजाराच्या गर्दीच्या रस्त्या दरम्यान आणि शहराच्या मुख्य चौकाकडे असलेल्या या राजवाड्यात एक सुंदर बाग असून त्यामध्ये राणी अहिल्याबाईचा पुतळा, एक कृत्रिम धबधबा आणि काही सुंदर कारंजे आहेत. इतक्या वर्षानंतरही, हा राजवाडा इंदूरमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि सर्वात प्राचीन वास्तूंपैकी एक आहे.
मल्हारी मार्तंड मंदिर -शिवलिंग, मध्यभागी गणेशमूर्ती व नटराजमूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
इंदूरची बिजासन देवी -वैष्णोदेवीप्रमाणे येथेही देवी पाषाणातील पिंडरूपात आहे. मंदिराच्या पुजार्‍यांच्या मते, या पिंडी स्वयंभू आहेत. त्या येथे कधीपासून आहेत, याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही. आम्हीच अनेक वर्षांपासून त्यांची पूजा करत आहोत, असे पूजारी सांगतात.
या देवी सर्वभूतेषु माँ शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नम:।
  इंदूरच्या बिजासन देवीचे दर्शन घडवित आहोत. मंदिरात चैत्र नवरात्रातील 9 दिवस रोज शतचंडी महायज्ञ होत आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होत आहे. मंदिरात देवीच्या पाषाण मूर्ती आहेत. वैष्णोदेवीप्रमाणे येथेही देवी पाषाणातील पिंडरूपात आहे. मंदिराच्या पुजार्‍यांच्या मते, या पिंडी स्वयंभू आहेत. त्या येथे कधीपासून आहेत, याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही. आम्हीच अनेक वर्षांपासून त्यांची पूजा करत आहोत, असे पूजारी सांगतात.  
     आधी ही टेकडी होळकरांच्या राज्यात होती. एकदा शिकारीसाठी आलेले असताना राजघराण्यातील लोकांची दृष्टी ह्या मंदिरावर पडली. त्यानंतर मग सन 1920 मध्ये येथे पक्के मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत येथे भाविकांची अपार गर्दी असते. येथे केलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या प्रांगणात एक तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत. या माशांना अन्न घातले तर पुण्य प्राप्त होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतात, असे भाविक मानतात. इथली मातेची शक्ती इतकी प्रबल आहे की, आंधळ्यांच्या डोळ्यांमधे दृष्टी परत येते असा भाविकांना विश्वास आहे!
      मंदिरात प्रत्येक नवरात्रीला यात्रा भरते. टेकडीवरून बघितल्यावर इंदूर शहराचे नयनरम्य दृश्य दिसते. मंदिरच्या जवळच गोम्मटगिरी आणि हिंकारगिरी नावाचे जैनांचे पवित्र स्थळ आहे. येथे दरवर्षी चातुर्मासात जैन मुनी येतात.
कसे पोहचाल ?
इंदूर मध्यप्रदेशची औद्योगिक राजधानी आहे. मुंबई-आग्रा महामार्ग इंदूरमधूनच जातो. देशाच्या कुठल्याही भागातून येथे रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गे पोहचता येते. हे मंदिर इंदूर विमानतळापासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे.
      लालबाग महाल - हा खूप मोठ्या विस्ताराचा राजवाडा आहे.पण बाहेरून अतिशय सामान्य अशी वास्तू वाटते. आता होळकर घराण्यातील कोणीही व्यक्ती तेथे राहत नाही .शेवटच्या वंशज (उषा राजे मल्होत्रा)विवाहानंतर मुंबईला १९६० च्या सुमारास स्थायिक झाल्या .त्यांनतर महालाची देखभाल पुरातन तत्व विभागाकडे आली आहे .
 होळकर घराण्याचे राज्यकर्ते राहत असलेल्या लाल बाग पॅलेस हा उत्तम आणि भव्य वास्तु आहे. हा राजवाडा २ एकरांवर पसरलेला आहे आणि होळकर घराण्याच्या राज्यकर्त्यांची उच्च अभिरुची ईथे दिसून येते.वास्तुरचनेच्या भव्यतेचे उदाहरण असलेल्या या वाड्यात देशातील सर्वात उत्तम गुलाब बाग आहे.
   जरी इंदूरच्या प्रवासाच्या अवश्य पहावे असे हे एक ठिकाण आहे. एकेकाळी होळकर घराण्याच्या समृध्दीचा साक्षीदार असलेला हा राजवाडा खान नदीच्या काठावर मुख्य शहरापासून ३.२ किमी दूर अंतरावर वसलेला आहे. .१८८६ मध्ये तुकोजीराव होळकर यांच्या काळात हे बांधकाम सुरू झाले होते, आणि १९२१ मध्ये त्यांचा वारसदार असलेल्या तुकोजीराव होळकर यांनी 35 वर्षांनंतर हे काम पूर्ण केले. १९७८ पर्यंत सत्ताधारी होळकर घराण्याचे निवासस्थान बनल्यानंतर आता ते संग्रहालय म्हणून जास्त आहे. मराठा साम्राज्य आणि होळकर घराण्याची काही अत्यंत कलाकृती दुर्मिळ असून याशिवाय मुघलकालीन दुर्मिळ नाणे संग्रह आहे.
इटालियन संगमरवरी स्तंभ, भव्य झुम्बर, अलिशान पर्शियन कार्पेट्स, बेल्जियम स्टेन्ड ग्लास असलेल्या काचेच्या खिडक्या, ग्रीक पौराणिक शिल्प, इटालियन शैलीने रंगवलेली भिंत,चित्रे, पेंढा भरलेले बिबट्या आणि वाघ इ.  या असंख्य मिश्रणामुळे या राजवाड्याच्या अंतर्भागातील या गोष्टींमुळे आपण भारतात आहोत हे विसरायला होते. जर तुम्ही इंदोरमध्ये असाल तर लाल बाग पॅलेसला भेट दिलीच पाहिजे. सोमवारी वगळता तुम्ही सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० च्या दरम्यान या वाड्यात कधीही भेट देऊ शकता.
    गोमतगिरी -जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.
    नखराली ढाणी- ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
अन्नपूर्णा मंदिर
- येथे प्रशस्त वेदपाठशाळा (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप वेद आहेत. येथील अन्नपूर्णा देवीची यात्रा त्र्यंबकेश्वर येथे जाते. ह्या मंदिराची बांधणी मथुरेच्या मीनाक्षी मंदिरासारखी आहे.
 प्रवेशद्वारात चार पूर्णाकृती हत्ति आहेत व द्वार प्लास्टरचे आहे दगडाचे नाही. मंदिरात अन्नपूर्णादेवीची मूर्ती आहे व इतर काही छोटी मंदिरे आहेत .
अन्नपूर्णा देवीला समर्पित असलेल्या अन्नपूर्णा मंदिर हे ईंदूरचे एक आकर्षण आहे.अन्नाची देवता या मंदिरात शिव, हनुमान आणि काळभैरव यांचीही मंदिरे आहेत.
काच मंदिर
- संपूर्ण इमारत बाहेरच्या बाजूला रस्त्यावरून( आत येण्याच्या भाग सोडून)प्रवेशद्वारापासून आत सर्वत्र रंगीत काचांच्या तुकड्यांची बांधलेली आहे. हुकूमचंद शहा या गृहस्थाने ती बांधली आहे. 
यात भिंतीवर, छतावर मूर्ती आहेत. त्यातून महाविराच्या जैन धर्मातील दृश्ये आहेत. चित्रात बारकावे स्पष्ट दिसतात. (फोटो काढायला परवानगी नाही ) ही वास्तू गावातच भर वस्तीत आहे. 
 रॉयल संग्रहालय:-
इंदूरचे रॉयल संग्रहालय एक छोटेसे संग्रहालय आहे. तेथे सिंहासने, छायाचित्रे आणि शस्त्रे इत्यादींचा संग्रह आहे. यापैकी बहुतेक कला १ thव्या शतकातील आहे जे सेरफोजी II च्या अधिपत्याखाली होते.
 बडा गणपती:-
हिंदीमध्ये 'बडा' चा शाब्दिक अर्थ मोठा आहे आणि गणपती हत्तीच्या चेहर्‍यावरील भगवान भगवान गणेश यांचे उपनाव आहे. या मंदिराचे नाव भगवान गणेशांच्या मूर्तीच्या आकारामुळे आहे - मुकुट ते पायापर्यंत सुमारे 25 फूट उंच मुर्ती हि जगातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक असल्याचे म्हटले जाते. देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रातील चुनखडी, गूळ, विटा आणि पवित्र माती आणि पाण्याच्या मिश्रणाने हि मुर्ती बनवली आहे. इंदोर शहरातील शांत परिसरातील एका गल्लीच्या शेवटी असलेले, बडा गणपती एक साधारण मंदिर वाटते, परंतु केवळ मुर्तीच्या विशालता हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.
   १८७५ मध्ये श्री दादिच यांनी स्थापन केलेल्या बडा गणपती मंदिराचे बांधकाम तेथील राज्यकर्ते होळकर राजवंश यांच्या कुटुंबियांनी केले. 100 वर्षांपूर्वी राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची उभारणी केली. गणपती आनंद आणि समृद्धीची देवता आहे असे म्हणतात. संपूर्ण देशातील कोणत्याही नवीन कार्यक्रम, उपक्रम किंवा पूजाच्या सुरूवातीस गणेशाची पूजा केली जाते. अतिशय धार्मिक महत्त्व असलेल्या या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक इंदूरला येतात.
कान्हा संग्रहालय:-
कान्हा संग्रहालय हे इंदूरमधील एक लहान संग्रहालय आहे, विशेषत: वन्यजीव, सरपटणारे प्राणी अभ्यास इत्यादींना समर्पित आहे त्या व्यतिरिक्त, त्यात इंदूरच्या भूतकाळातील आणि इतिहासाशी संबंधित कलाकृती देखील आहेत.सर्व होळकर घराण्याचा इतिहास मांडला आहे. अगदी त्यांच्या मूळ पुरुषा पासुन ची चित्रे / तत्कालीन फोटो तिथे मांडले आहेत.तिथे त्यावेळची म्हणजे साधारण २५० वर्षांपासून ते १०० वर्षे पुर्वी पर्यंतची नाणी , तलवारी ( गंजलेल्या), ठासणीच्या बंदुका, त्या बंदुकांचे गोळे (हो हो ! गोळेच ), १८९० मधला रूम हीटर, इमर्जन्सी लाईट, दोन छोट्या तोफा ( साधारण लांबी ३ फूट ) , चीन वरुन आलेली (की मागावलेली) भांडी, फुलदाणी (फ्लॉवर पॉट ),
गोमटगिरी:-
 इंदूर विमानतळापासून १० मिनिटांच्या अंतरावर गोमटगिरी हे जैन लोकांचे तीर्थस्थान आहे. श्रावणबेलगोळ येथील बाहुबलीच्या विशाल पुतळ्याची प्रतिकृती असलेल्या गोमतेश्वरची २१ फूट मूर्ती हे मुख्य आकर्षण आहे. गोमाटेश्वरची मूर्ती डोंगरावर आहे. 
याखेरीज २४ मंदिरे आहेत ज्यातून प्रत्येक जैन धर्माच्या 24 तीर्थंकरांचे प्रतिनिधित्व करतात. गोमाटगिरी हा एक पिकनिक स्पॉट आहे जिथुन आपल्याला परिसराचे विहंगम दृष्य दिसते.
छत्री 
 खान नदीच्या काठावर होळकर घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या येथे बांधल्या आहेत.
मराठी वास्तुकलेचा यात उत्कृष्ठ नमुना बघायला मिळतो.
कमला नेहरू पार्क:-
 
 कमला नेहरू पार्क, ज्याला चिडिया घर म्हणून ओळखले जाते, हे इंदूर शहरापासून बाहेरील बाजूस उभारलेले प्राणीसंग्रहालय आहे ज्यामध्ये परदेशी मांसाहारी, उभयचर व चित्रविचित्र प्राणी आहेत. येथील नवीन आकर्षण म्हणजे एक पांढरा वाघ आहे आणि तिचे तीन बच्चे! आपण येथे बग्गी राईड्स, पोनी राइड्स, हत्तीची स्वारी आणि उंटांच्या स्वारीचा आनंद घेऊ शकता. प्राणीसंग्रहालय लवकरच पृथ्वीवरील सर्वात मोठ्या सरीसृपांपैकी एक अ‍ॅनाकोंडाची  भर पडणार आहे.
गांधी हॉल :-
 आपले महान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या सभागृहाचे गांधी हॉल असे नामकरण केले गेले. पांढर्‍या संगमरवरी आणि सिवनी आणि लाल दगडांनी बनविलेल्या या स्मारकाची भव्यता बघत राहावी अशीच आहे. मोठ्या सार्वजनिक उत्सवाचे हे ठिकाण, येथील सभागृहामध्ये 2000 हून अधिक लोक एकत्र येउ शकतात आणि येथील मनोरे प्रेक्षणीय आहेत. 
सेंट्रल म्युझियम:-
प्रागैतिहासिक कालखंडातील प्राचीन तसेच अलिकडच्या काळातील नवीन सापडलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन असलेले इंदूरचे सेंट्रल म्युझियम हे इतिहासाच्या अभ्यासकांसाठी नंदनवन आहे. या संग्रहालयात पौराणिक कोरीव काम, वेगवेगळ्या कालखंडातील नाणी, विविध कालखंडातील शस्त्रे आणि ११ व्या शतकाची शिल्पे आहेत. प्रदर्शनात दुर्मिळ जीवाश्म देखील न चुकता पहा.
मेघदूत गार्डन:- 
मेघदूत गार्डन किंवा मेघदूत उपवन इंदूरच्या सर्वात जुन्या बागांपैकी एक आहे, परंतु काळ बदलेल तसे त्याच्या वैभवात भर पडलेली आहे. हिरव्या रंगाच्या असंख्य छटा असणारी बागेच्या परिसरातील दाट लँडस्केप्स  सजवतात हे येथील विशेष आकर्षण आहे. या पार्कमध्ये सुंदर कारंजे असून ते मुलांचे मन रमवण्यासाठी आणि एक संध्याकाळ छान जाणारी असे हे ठिकाण आहे,
क्लाथ मार्केट -
खुद्द इंदूरमध्ये सुती कपडे, साडया अतिशय स्वस्त आणि विपुल प्रमाणात मिळतात. त्यामुळे जाताना एक मोठी रिकामी पिशवी घेऊन जाणं सोयीस्कर.
पाताळपाणी धबधबा:-
५०० मीटर उंचीवरुन खाली पडणारा पाताळपाणी धबधबा इंदूरमधील सर्वात निसर्गरम्य फोटो स्टॉप आहे. पाण्याचा गर्जना करणारा आवाज आणि दाट धुके यामुळे हा ईंदुरकरांचा आवडता पिकनिक स्पॉट आहे.
 पावसाळ्यात या धबधब्यामुळे पाण्याचा लोंढा वहात असतो आणि त्यामुळे ईथे काही दुर्घटना झाल्या आहेत. पावसाळ्यात धबधबा लांबूनच बघणे चांगले.
पिपलियापाला प्रादेशिक उद्यान:-
पिपलियापाला प्रादेशिक उद्यान तब्बल १२२ एकर क्षेत्रावर पसरलेले असून त्यातील ८० एकर जमीनीत तलाव आहे.
 हे मोठ्यांना आणि मुलांसाठी आनंद घेण्यासाठी उत्तम स्थान आहे. पॅडल-बोटिंग आणि मोटर-बोटिंगसारख्या काही सुविधा ईथे आहेत आणि म्युझिकल फाउंटेन, फ्रेंच गार्डन्स, लॅबर्निंग्ज, आर्टिस्ट व्हिलेज इत्यादींचा विशेष आकर्षण आहेत.ईथल्या फास्ट फूड झोनमध्ये मिळणार्‍या चविष्ट पदार्थांचा नक्कीच आस्वाद घ्या.
मोहाडी धबधबा:-
इंदूरपासून फक्त ३० कि.मी. अंतरावर असलेला मोहाडी धबधबा हे कौटुंबिक सहलीसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे . उंचीवरून खाली पडणार्‍या पाण्याचे दृश्य नेहमीच रोमांचकारी, चित्तथरारक असते. नेहमीच्या रुटीनमधून ब्रेक शोधत असाल आणि आपल्या कुटुंबासमवेत छोटी पिकनिक करायची असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे.
इस्कॉन मंदिर :-
श्रीकृष्णाच्या जयघोषांच्या जयघोष एकण्यासाठी आणि मनशांतीसाठी इंदूरच्या इस्कॉन मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी.
राधा आणि कृष्णाच्या पूर्णपणे संगमरवरीपासून बनविल्या गेलेल्या सुंदर मुर्ती प्रेक्षणीय आहेत आणि आपल्यात मनात एका शांततेची भावना निर्माण करतात. इस्कॉन इंदूर येथे साजरा केला जाणारा जन्माष्टमी उत्सव नक्कीच अनुभवावा असा असतो.
इंदूर व्हाइट चर्च:-
स्वातंत्र्यपूर्व काळातील इंदूरमधील ब्रिटीशांच्या अस्तित्वाची खुण म्हणजे इंदूर व्हाइट चर्च. हि चर्च शहरातील एक वैशिष्ट्यपुर्ण वास्तू आहे.चर्चची संपूर्ण रचना युरोपीयन वास्तुकलाची साक्ष असून, पांढर्‍या संगमरवरी दगडाने हिची उभारणी झालेली आहे. ख्रिसमसच्यावेळी चर्चच्या नखशिखांत सुशोभित केलेली असते.
रलामंडल वन्यजीव अभयारण्य:- 
मध्य प्रदेशातील सर्वात प्राचीन अभयारण्य, रलामंडल वन्यजीव अभयारण्य वन्यजीव आणि वनस्पती अभ्यासक लोकांसाठी एक पर्वणी आहे. गंगा नदीपेक्षा १ दशलक्ष वर्षापूर्वीपासून नर्मदा नदीचे अस्तित्व आहे. तीच्याच काठावर हे प्राचीन वनउद्यान आहे. हरिण, वन्य घोडे, वाघ आणि मोठ्या प्रमाणात विविध पक्षी असलेले हे अभयारण्य वन्यजीवप्रेमींसाठी स्वर्गच आहे.
टिंचा धबधबा:-
इंदूर शहरापासून २५ कि.मी. अंतरावर टिंचा धबधबा हा या भागातील सर्वाधिक लोकप्रिय धबधबा आहे. तिंचा गावाजवळ दुधाळ रंगाचे पाणी पडणारा हा धबधबा आहे, तिंचा गावावरुनच त्याचे नाव पडले. प्रामुख्याने पावसाळी पर्यटनाचे ठिकाण असलेला हा धबधबा म्हणजे 300 फूट उंचीवरुन गर्जना करत पडणार्‍या पाण्याचा प्रचंड ओघ आहे आणि हा परिसर चारही बाजूंनी हिरव्यागार वनस्पतींनी वेढलेले आहे. टिंचा फॉल्स परिसरातील असंख्य पर्यटकांना आकर्षित करतो.धबधब्याच्या पायथ्याजवळ एक छोटा डोह आहे,
खजराना गणेश मंदिर
 टींचा धबधब्यापासून 25 किलोमीटर अंतरावर  हे एक प्राचीन मंदिर आहे .१७३५ मध्ये होळकर घराण्याच्या राणी अहिल्या बाई होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली होती. असे मानले जाते की एका ऋषींच्या स्वप्नात या ठिकाणी गणेश मुर्ती जमीनीखाली आहे असे दिसले आणि तेथेच राणी अहिल्याबाई होळकर यांनी खोदकाम करुन मुर्ती बाहेर काढली. या ठिकाणाला नंतर भगवान खडना गणेश मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. सध्या जिथे मूर्ती सापडली त्या जागेवर एक विहीर बांधली गेली आहे आणि गर्भगृहातील दरवाजे आणि भिंती चांदीच्या पत्र्याने सुशोभित केल्या आहेत. मुर्तीचे डोळे हिर्‍याचे आहेत. स्थानिकांचा असा विश्वास आहे की हि मुर्ती नवसाला पावते.
शेल सिटी वॉटर पार्क
हे पार्क टिन्चा धबधब्यापासून १६ किलोमीटर अंतरावर असून २२ एकर क्षेत्रावर पसरलेले आहे आणि १९९० मध्ये बांधण्यात आलेला या परिसरातील हा पहिला वॉटर पार्क होता. हा पार्क नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो आणि ईथे विविध प्रकारचे तलाव व वॉटर स्लाइड आहेत. वॉटर स्लाइड्स व्यतिरिक्त, या पार्कमध्ये आर्केड झोन, कार्ड रूम, टॉय ट्रेन आणि फेरि व्हील देखील आहे. या पार्कमध्ये एक रेस्टॉरंट आणि बार आहे जिथे भारतीय, चीनी, कॉन्टिनेंटल पदार्थ आणि स्नॅक्स मिळतात. पर्यटकही पूलसाईड बसून खाणे खाउ शकतात. वॉटर पार्कमध्ये एक आइस्क्रीम पार्लर आणि एक जूस सेंटर देखील आहे आणि येथे व्हॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन आणि इतर खेळांसाठी सुविधा आहेत. हे पार्क स्थानिकांमध्ये एक दिवसाच्या भटकंतीसाठी खूप लोकप्रिय आहे. 
 मां वैष्णो धाम
टिंचा धबधबापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर वैष्णोदेवीचे हे मंदिर आहे. हे मंदिर जम्मूमधील प्रसिद्ध वैष्णो देवी मंदिराची एक छोटी प्रतिकृती आहे, हे मंदिर कृत्रिमरित्या तयार केलेल्या गुहेत बांधले गेले आहे. भाविकांना गुहेतून देवीच्या मूर्ती उभ्या असलेल्या गाभार्‍यात जावे लागते. 
बामनिया कुंड:-
बामनिया कुंड हा मध्य प्रदेशातील इंदूरपासून ५० कि.मी. अंतरावर आकर्षक धबधबा आहे. 300 फूट उंचीवरून खाली पडणारे निळे पाणी, तपकिरी खडकांचे आणि हिरवीगार झुडुपे असलेला असा हा सुंदर परिसर आहे. इंदूरजवळील मालिंदी प्रदेशात घनदाट जंगलांत असलेला हा धबधबा गर्दीपासून दुर आहे. ईथे जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नाखरी धरणापर्यंत पोहचावे आणि झाडीतून चढण पार करत आपण धबधब्यापाशी पोहचतो. या प्रदेशातील अनेक पक्षी, प्राणी आणि वनस्पती पाहु शकतो. वेळ असल्यास आपण या ठिकाणी नक्कीच भेट द्या.
ट्रेकिंग, रॅपेलिंग, फ्लाइंग फॉक्स, कॅम्पिंग आणि उत्कृष्ट छायाचित्रण यासारख्या अनेक आक्टीव्हीटींसाठी बामनिया कुंड धबधबा हे परिपूर्ण ठिकाण आहे.
1. ट्रेकिंग
आपण धबधब्याकडे जात असताना देखील, आपल्याकडे खाण्यापिण्याच्या साहित्यासारख्या आवश्यक गोष्टी बरोबर हव्यात. चोरल धरणापासून बामनिया कुंड अवघ्या ४ कि.मी. अंतरावर आहे. एकदा आपण बामनिया गावात पोहोचल्यावर तिथून आपण धबधब्याच्या जागी पायी जाण्याचा आनंद घेउ शकतो. बामनिया कुंड मेहंदी कुंड पासून १ किमी अंतरावर आहे आणि आपण मेहंदी कुंड ते बामनिया धबधब्यापर्यंत चालत देखील जाऊ शकतो. ट्रेक मार्गावर लवंगेची झाडे दिसतात. ट्रेकचा रस्ताअंदाजे 1 किमी आहे.
2. फ्लाइंग फॉक्स
या साइटवरील आपण साहसी क्रिडाप्रकारांचा आनंद देखील घेउ शकतो. फ्लाइंग फॉक्ससाठी आपल्याला आधीची बुकींग करावे लागेल. फ्लाईंग फॉक्स करताना धबधबा पहाणे हा एक वेगळा अनुभव आहे.
3. कॅम्पिंग
धबधब्यापासून थोड्या अंतरावर आपण आपला तंबू उभारु शकता. असे करण्यासाठी आधी कोणतीही परवानगी आवश्यक नाही. परंतु येथे तंबु ठोकणे आपल्या स्वतःच्या जोखमीवर आहे कारण संपूर्ण परिसरात भिंती किंवा संरक्षक कुंपण नाही. आपण किमान पाच किंवा अधिक लोकांच्या मोठ्या गटामध्ये बामनिया कुंड धबधब्याला भेट देत असल्यास,तंबु ठोकून मुक्काम करणे शक्य आहे. तसेच आपल्या स्वत: च्या पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्स / खाण्यायोग्य वस्तू घेऊन जाणे आवश्यक आहे कारण त्या जागेवर काहीही उपलब्ध नाही. आपण परिसरातून लाकूड गोळा करू शकता आणि मित्रांसह बोनफायरचा आनंद घेऊ शकतो.
धरमपुरी:-
धरमपुरी हे नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एक छोटेसे शहर आहे. नर्मदाची मुलगी रूपमती हिची हि जन्मभूमी.तीने मांडूचा राजा बाज बहादूरशी लग्न केल्याचेही म्हटले जाते. युधिष्ठिराने या शहराची स्थापना केली होती अशी आख्यायिका आहे. अनके शतकांपासून येथे वास्तव्यास असलेल्या राजे व राणींच्या  निवासस्थानांचे अवशेषांचा धरमपुरी हा एक खजिना आहे.
कोरल धरण:-
 जर आपण दैनंदिन जीवनाच्या रहाटगाडग्याला कंटाळले असल्यास आणि बदल म्हणून दूर जायचे असल्यास,ईंदूरजवळचे कोरल धरण आपल्यासाठी फक्त एक उत्तम ठिकाण आहे. नर्मदा नदीवर कोरल धरण बांधलेले आहे. मोठ्या संख्येने हिरवीगार झाडे आणि लहान टेकड्यांनी त्या जागेला आणखी आकर्षक झाली आहे. सूर्यास्त किंवा सूर्योदयाचा आनंद इथून जरुर लुटावा. कोरल डॅम हे शनिवार व रविवारच्या सहलीसाठी एक आदर्श ठिकाण आहे.आपण कोरल धरणाच्या निर्मळ पाण्यात काही वेळ पॅडलिंग बोटीने नौकाविहाराचा आनंद लुटू शकता.
चिदिया भडक धबधबा:-
इंदूरमधील एक न सापडलेले आणि गुप्त रत्न आहे. हिरव्यागार हिरव्यागार आणि खडकाळ चट्टानांनी भरलेले हे धबधबे हे पाहण्याजोगे एक मंत्रमुग्ध करणारे ठिकाण आहे आणि ते पकडण्यासारखे आहे. धबधबा देखील उत्तम ट्रेकिंग आणि हायकिंगच्या संधी देतात.
जनपाव:-
माळवा प्रदेशातील डोंगरांमधील वसलेले, जनपाव किंवा जनपाव कुटी, निसर्ग प्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. जर आपण मध्य भारतीय जंगलात फिरण्यासाठी एखादे निवांत हिल स्टेशन असाल तर हेच ते ठिकाण. मुंबई-इंदूर महामार्गावर आणि इंदूर जिल्ह्यातील महू  तालुक्यात जनपाव वसलेले आहे. ईथे पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो.
    हे ठिकाण इंदूर शहरापासून 45 कि.मी. अंतरावर असून 881 मीटर उंचीवर आणि जंगलाने दाट वेढलेले आहे. शुद्ध हवा फुफ्फुसात भरुन घ्यायची असेल आणि शांती अनुभवायची असेल तर जनपाव हे नेमकी जागा आहे.ईथे मोठ्या प्रमाणात आयुर्वेदीक वनस्पती आहेत.दिवाळीनंतरची पहिली पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला दरवर्षी ईथे मोठी जत्रा भरते.
जानपाव हिल:-
 हे ठिकाण ८८१ मीटर उंचीवर घनदाट जंगलांनी वेढलेले असून हा पर्वत माळव्यातील दुसर्‍या क्रमांकाचे उंच शिखर आहे या डोंगरावर चढाई करणे आणि ईथली ताजी हवा यामुळे ईथे आपण निश्चितपणे पुन्हा पुन्हा भेट देण्याचा विचार कराल. लांबवर पसरलेल्या नद्या, जंगले आणि सूर्यास्त असा नयनरम्य नजारा प्रेक्षणीय आहे. या परिसरात आयुर्वेदिक वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत.
जमदग्नि आश्रम:-
जानपाव टेकडीच्या शिखरावर प्राचीन जमदग्नी आश्रम आहे. पौराणिक कथेनुसार हिंदू धर्मातील देवता भगवान परशुराम यांनी या आश्रमाची स्थापना केली होती. परशुरामची आई रेणुका मातेने या संपूर्ण प्रदेशात औषधी वनस्पतींची लागवड केली असल्याचे म्हटले जाते.
हनुवंतिया:-
इंदिरा सागर नदीतील द्वीपसमूहांपैकी हनुवंतिया हे एक बेट आहे. शहर दगदगीपासून ब्रेक हवा असेल तर हा उत्तम पर्याय ठरेल. हनुवंतिया बेट निसर्गरम्य सौंदर्याने परिपूर्ण असून ईथे काही साहसी क्रिडाप्रकार करता येतात. जल महोत्सवाच्या वेळी ही जागा लोकांच्या गर्दीने फुलून गेलेली असते त्यावेळी ईथे पतंग महोत्सव भरवतात. आकाशात उडणारी रंगीबेरंगी पतंग आणि गरम हवेचे फुगे हे एक प्रेक्षणीय दृष्य असते.
जैवविविधता :-
हनुवंतिया बेट वन्यजीवनाने परिपूर्ण आहे. या बेटावर उंच झाडे आहेत आणि त्यांच्या मुळ्या पाण्यामध्येही खोलवर गेलेल्या दिसतात. बरेच स्थलांतरित पक्षी येथे वीणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी येतात.हरणांसारखे प्राणी ईथे सहजपणे शेतात फिरताना दिसतात.
भेट देण्यासारखी ठिकाणे
१. संत संतजी धाम
हनुवंतिया बेटाजवळील सिंग सिंगजी धाम हे अवघ्या दहा कि.मी. अंतरावर वसलेले आहे.स्वच्छ निळ्या पाण्याने वेढलेले बेटावर हे मंदिर वसलेले आहे ज्यामुळे ती जागा आणखी रम्य वाटते. दर्शन घेण्यासाठी अनेक लोक या मंदिरास भेट देतात.
२.इंदिरा सागर धरण
इंदिरा सागर धरण हे आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण आहे.ईथून संपूर्ण परिसराचे सुंदर दर्शन होते.निळ्या गर्द पाण्याने भरलेले धरण आणि हिरव्यागार झाडाच्या दाटीने भोवतालचे वातावरण अदभुत वाटते.विश्रांती घेण्यासाठी आणि निंवातपणा अनुभवण्यासाठी या धरण परिसराला भेट देणे आवश्यक आहे.
श्री. दादाजी दरबार
श्री दादाजी दरबार हा आदराने दादाजी म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका आध्यात्मिक व्यक्तीला समर्पित आहेत. त्यांनी अनेक चमत्कार केले आणि आजारी लोकांना बरे केले असा विश्वास आहे. त्यांना पुढे बरेच अनुयायी मिळाले आणि दरवर्षी या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक येतात.
 बोर्यामाल बेट
बोरियामाल बेट हनुवन्तीया बेटाजवळ आहे आणि निसर्गरम्य सौंदर्य आणि मुबलक वन्यजीवनामुळे येथे भेट दिली जावी. हे बेट हिरवेगार हिरवेगार जंगले, प्राणी आणि रंगीबेरंगी किलबिलाटांनी भरलेले आहे. या ठिकाणचे सौंदर्य शोधून काढण्यासाठी एक दिवस घालवा आणि या शांत वातावरणात गहाळ व्हा.
करण्याच्या गोष्टी1. जेट स्की
इंदिरा सागरच्या शांत पाण्यात मोटारच्या वेगावर जेट स्की करणे हा एक रोमांचकारी अनुभव आहे. जेट स्कीचा दर साधारणत: रू. 750, पण जो रोमांचकारी अनुभव मिळतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहिल असा असतो.
2. स्नॉर्केलिंग
स्नॉरकेलिंगमध्ये आपल्याला नदीच्या पाण्याखालील  सजीवांचे रंगीबेरंगी जीवन पहाण्याची संधी मिळते. हा नक्कीच एक वेगळा अनुभव असतो.
3. स्कूबा डायव्हिंग
   जर आपण पाण्याचा आरामात पोहु शकत असाल तर स्कुबा डायव्हिंग या साहसक्रीडेचा अनुभव घ्यावा असाच आहे. हनुवंतीया बेटाजवळील पाण्यात स्कुबा डायव्हिंग करताना आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होतो आणि पाण्याखाली राहणारे चमकदार आणि विविध प्रकारचे मासे आणि वनस्पती पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
4. वॉटर झोरबिंग
हनुवंतीया बेटात आपण अनुभवू शकता असा एक खेळ म्हणजे वॉटर झोर्बिंग. आपल्याला एका मोठ्या हवेच्या बॉलमध्ये पॅक कराल आणि पाण्यावर तरंगण्यासाठी सोडले जाते. नक्कीच घ्यावा असा हा रोमांचक अनुभव आहे.
5. बिग क्रूझ
बिग क्रूझ अशा लोकांसाठी आहे ज्यांना या ठिकाणच्या  निसर्गसौंदर्याचा आनंद लुटून बोटीत मौजमजेत वेळ घालवायचा आहे.
6. वॉटर पॅरासेलिंग
ज्यांना एकाच वेळी पाणी तसेच हवेचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठीच वॉटर पॅरासेलिंग आहे. साहसी मनोवृत्तीच्या चिरतरुण लोकांनी नक्कीच भाग घ्यावा असा ही साहसक्रीडा. पाण्यावरुन जाताना आपण हवेत उडत आहात असे आपल्याला वाटेल. वॉटर पॅरासेलिंगचा दर साधारणत: रू. 1000
 7. वॉटर सर्फिंग
    आपण सर्फ करण्यात तरबेज नसलात तरीही वॉटर सर्फिंगचा अनुभव घेता येतो. यामध्ये सर्फ बोट मोटरबोटला जोडलेले असतो आणि हे पूर्णपणे सुरक्षित असते. आपल्याला फक्त आपले संतुलन राखयचे असते. वॉटर सर्फिंगसाठी दर साधारणत: रू. 1500
8. हॉट एअर बलून
      आपल्याला पाण्याच्या संबधीत साहसक्रीडा नको असल्यास आपण गरम हवेच्या बलूनची सवारी घेऊ शकता ज्यामुळे आपल्याला हा संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या दॄष्टीकोनातून बघता येतो. हॉट एअर बलून राइडमुळे तुम्हाला हवेत उडाल्याचा अनुभुती घेता येते.
जल महोत्सव:-
जल महोत्सव हा एक उत्साही वातावरणात साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे जो दहा दिवसांपर्यंत चालतो. सरकारने मध्य प्रदेश राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उत्सव साजरा केला सुरु केला. जल महोत्सव एक मौजमजेने परिपुर्ण असलेला कार्यक्रम आहे ज्यात बरेच पाण्याच्या संबधीत खेळ आणि स्पर्धा असतात. प्रवाश्यांना राहण्यासाठी सुंदर तंबू बसविण्यात आले असतात,जिथे उत्कृष्ट सुविधा असतात. रात्रीच्या वेळी कॅम्पिंग, झिप-अस्तर आणि बर्‍याच घरगुती आणि मैदानी खेळ, मुलांसाठी उपक्रम यामध्ये देखील आपण सहभागी होउ शकतो. पतंग उडविण्याचा खेळदेखील आयोजित केला जातो ज्यामुळे संपूर्ण आकाश रंगीबेरंगी दिसते. क्राफ्ट बाजारमध्ये  विवीध हस्तकलेच्या वस्तूंचा मिळतात.ईथे भेट देणारे प्रवासी स्मृतिचिन्हे म्हणून खरेदी करू शकतात. या कार्निवलचा आनंद आबालवृध्द सगळेच घेतात आणि  किमान एकदा तरी भेट द्यावी असा हा उत्सव असतो.
   हनुवन्तीया बेट अनेक पाणी आणि जमीनी वरच्या साहसीखेळांसाठी एक उत्तम जागा आहे. हे स्थान निसर्गरम्य सौंदर्याने परिपूर्ण आहे आणि वनस्पती आणि वन्यजीवांचे वैविध्य यामुळे हे ठिकाण एक संपूर्ण पॅकेज आहे आणि येथे सहलीला जायला प्रत्येकाला नेहमीच आवडेल.
 गिडिया खोह धबधबा:-
 इंदूरपासून जवळ असलेला हा पावसाळ्यात भरात असतो. म्हणूनच धबधब्याला भेट देण्याचा सर्वात योग्य वेळ म्हणजे पावसाळ्यात त्यावेळी धबधब्याचे खरे सौदंर्य अनुभवता येते.
 जोगी भडक:-
 हा धबधबा इंदूरजवळील ढळ येथे आहे. शहराजवळ असलेला सर्वात भन्नाट आणि मंत्रमुग्ध करणारा हा धबधबा आहे. धबधब्याजवळच विविध ट्रेकिंग आणि हायकिंगच्या जागा आहेत.

इंदौरचा सराफा

सराफा असं म्हटलं कि ताबडतोप सोन्या –चांदीचे दागिन्यांच दुकान असंच आपल्याला माहित आहे पण इंदूर ह्या शहरात ‘ सराफा ‘ म्हणजे दिवसा दागिने खरेदी चे स्थान आणि रात्री खाण्याचे स्थान. रात्री जेंव्हा दागिन्यांची दुकानं बंद होतात त्या नंतर तिथे खाण्याची दुकानं लागतात .सराफा बाझार हा पुण्यातल्या तुळशीबागे इतका प्रसिद्ध आहे. दिवसा तिथे सराफ बाझार असतो म्हण्जे सराफांची दुकाने आहेत णि रात्री खाद्यपदार्थांचे ठेले (स्टॉल) !तिथल्या सराफांनी रात्री आपली दुकाने सुरक्षित असावीत म्हणून दुकानांच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत या ठेल्यांना परवानगी दिली. हे केव्हापासुन चालू झाले ते माहिती नाही.पण इंदौरला बरेच जण जातात ते इथे येउन खाण्यासाठीच !
         इंदोर म्हणजे राजवाडा हे तर नक्कीच आहे. मात्र तसाही इंदोरच्या कुठल्याही भागात खवैय्यांची काळजी घेणारी अनेक स्थळे आहेत. चाट आणी चटपटासाठी राजवाडा आणि ५६ भोग (एम.जी. रोड) हे उत्तम आहेत. या ५६ च्या बा़जूच्या चौकात स्वा. सावरकरांचा मस्त पुतळा आहे. मुळात एकदा मला इंदोर मध्ये एकूण पुतळे किती हे मोजावे अशी परिस्थिती आहे. प्रत्येक चौकात एक पुतळा या प्रमाणात पुतळे आहेत येथे.
मांसाहारी खाण्याचे शौकीन असाल तर पलासीया चौकातील नफीस, विजय नगर ते सुखलीया दरम्यान सयाजीच्या समोरच्या बाजूच्या गल्लीत असलेल्या केसुर रावली सरोई उत्तम आहे.
        टावर चौकातील ( सपना संगीता थियेटराजवळ) पिशोरी हे पंजाबी ढाबा टाईप रेस्टॉरंट, एकदम झकास आहे. येथील बोटी चिकन, खास पाया सुप, फिश फ्राय, चिकन काटी कबाब अगदी लाजवाब.....
बाकी जैन नमकीन मधील वेगवेगळ्या स्वादाचे नमकीन छानच, अपना नमकीन नावाचे दूकान मस्तच आहे.
       तर सराफा बाझारात काय नाही. चाट - आलु टिक्की, छोले टिक्की, भुट्टे का कीस, गराडू, डोसा, भेळ, पाणीपुरी, गोड पदर्थात- चमच्याने खाता येईल इतकी घट्ट रबडी, मसाला दुधासारखा प्रकार- शिकंजी, गुलाबजामुन, काला जामुन, जिलेबी, हाताच्या पंज्याएवधी ईम्रुती, जिलेबी विथ रबडी. अजुन बरेच काही.
भुट्टे का कीस
bhutee ka kees
गराडू
garadu
चाट
chaat
गुलाबजामुन
gulab jamun
स्टॉल
stall
रबडी
rabadee 
म्हणजे हे सगळे पदार्थ एक एक करुन चाखायचे म्हटले तरी ४ दिवस रहावे लागेल.
        मुंबईतले गुजराती लोक कोनफळाला गोराडुं किंवा गोरा कंद म्हणतात. कोनफळातही दोन प्रकार असतात. एक जमिनीतला कंद आणि दुसरा म्हणजे या कंदातून उगवलेल्या वेलीवर पानाच्या अ‍ॅक्सिल मध्ये फुललेल्या फुलापासून तयार झालेले वेडेवाकडे कंदसदृश गोळे. (करांद्यासारखे.) याला काही लोक भेबडें म्हणतात. ही भेबडेसुद्धा कोनफळासारखीच लागतात. ऊंधियुंत कोनफळ वापरतात, सुरण नव्हे.
     काही खाण्याचे पदार्थ जे इंदूरला मिळतात आणि जी चव त्या पदार्थांना असते, जगात कुठेच मिळत नाही असं मला वाटतं . तर आपण बघू इंदूर ला काय –काय ‘स्पेशल “ मिळत .
१ मावाबाटी: हा गोडाचा प्रकार आहे. साधारण गुलाब जाम सारखाच पण आकाराने त्याचा दुप्पट असतो आणि त्यचात दुधाचा “ मावा “ हा ही जास्त प्रमाणात असतो त्यामुळे चवीला जास्त चांगला लागतो. पण मात्र एकच दिवस भराला पुरतो ह्याची मात्र नोंद घ्यावी!
२. रबडी: हा पण गोडाचाच प्रकार आहे आणि बासुंदी सारखा असतो . दुधाला जरा जास्त आटवतात आणि घट्ट झालं कि साखर टाकतात.
३ भूटयाचा कीस : हा प्रकार तिखटाचा आहे . मक्या च्या कणसाला किसून त्याचा पासून साधारण पोहे सारखा प्रकार आहे पण अतिशय चविष्ट आणि खमंग लागतो.भुट्टे का किस बाजूला उभे राहून आधी टेक्चर बघा, काही ठिकाणी त्यात पोहे घालतात असे वाटले.मऊ लुसलुशीत टेक्चर वाटले तर घ्या
४ कलाकंद : हा पण गोडा चा प्रकार आहे आणि मावा- दुध असं आटवून बनवतात.
५ मुगाची कचोरी : इंदूर ची कचोरी आकारानी मोठी [ पुरी ] सारखी असते आणि मात्र सबंद भरलेली असते . चांगली खूप तिखट आणि चटपटीत असते . आवडी प्रमाणे त्याचावर गोड चटणी आणि दही घालून खायची पद्धत आहे .
६. गराडू : हा प्रकार ही तिखटाचा आहे . गराडू हे एक प्रकार चे कंद आहे आणि थंडीत ते मार्केट मध्ये येत. त्याची कापं करून तळतात आणि त्याचावर एक स्पेशल मासला टाकतात आणि वरून लिंबू पिळून देतात .
गराडू, हा प्रकार फक्त थंडीत मिळतो, घेण्या अगोदर गाडीच्या बाजूला थांबून पाहावे, तो माणूस व्यवस्थित लाल झाल्यावर बाहेर काढत असेल तर घ्यावे, नाहीतर दुसरी गाडी पहावी,मस्त लाल, कुरकुरीत गराडू थंडीत खायला मज्जा येते Wink
७. मावा आणि खवा जिलबी : ही जिलबी मैद्याची नसून मावा आणि खाव्या ची असते, सुमारे १/२ पौंड प्रत्येकी असते म्हणून कॅलोरी मोजण्यात काहीच अर्थ नाहीये.
८. जोश्यांचे दहीवडे : फारच चविष्ट असतात आणि जेंव्हा ते तुम्हाला सर्व करतात तेव्हां चार बोटांमध्ये चार मसाले धरून असे गोल फिरकावतात कि तुमच्या वाटीत चार विभिन्न वर्तुळ दिसतात!
९. शिकंजी : तसं म्हटलं तर शिकंजी म्हणजे लिंबू शरबत हेच लक्षात येतं पण हा प्रकार अगदीच वेगळा आहे , हे दुध पासून बनलेलं पेय आहे , साधारण “लस्सी “ सारख दिसतं पण खूपच चविष्ट आणि गरिष्ट असं पेय आहे . ह्यात तीन –चार फ्लेवर असतात. मसाला शिकंजी , बदाम , आंबा , केसर असे प्रकार आहेत .
 १०.पाणीपुरी- बऱ्याच गाड्या असतात 7 स्वाद मै, 10 स्वाद मै वगैरे फ्लेवर्स असतात, गर्दी असेल ती गाडी निवडावी.पहिली प्लेट प्रत्येक फ्लेवरची एक, आणि आवडलेल्या 1 2 फ्लेवर्स ची हवी असल्यास दुसरी प्लेट अशी स्ट्रॅटेजी चांगली राहते. लसूण वगैरे प्रकार आवडत नसतील तर पहिल्यांदाच त्याला नको सांगा Happy
११.जिलबी गल्लीच्या शेवटी एक छोट्या देवळाजवळ एक जिलबीवाला आहे, किती जण खाणारे असे विचारून तितकी मोठी एकच एक जिलबी बनवून देतो. चांगली करंगळी इतकी जाड असते, पण तो प्रकार अति होतो, 2 जण असतील तर हा प्रकार टाळावाच.
इतके खाउन झाले आहे तर पचनाला सोयीचे म्हणून पान नको ?
पान 3 4 गाड्या दिसल्या पानाच्या,नॉर्मल पाने होतीच पण एक गुंडी पान म्हणून प्रकार होता, खाल्ल्यावर नाकातून एक्दम थंड वाफ निघतात. बाकी चॉकोलेट कोटेड पान वगैरे एक्दम बकवास 2 3 ठिकाणी कोकोनट क्रिम शेक च्या गाड्या दिसल्या,
शहाळे सोलून मलई, पाणी, साखर आणि दूध मिक्सर मध्ये खूप वेळ फिरवून हा शेक बनवतात,चव छान होती पण बनायला खूप वेळ लागतो, एक 5 6 ग्लास ची बॅच बनायला 5 6 नारळ सोलायचा वेळ+मिक्सर चा वेळ.
  जावे कसे :-
चालू होण्याची वेळ रात्री 8.45 ते 9 नंतर, रिक्षाने सराफा चौपाटी सांगून गल्लीच्या जवळ उतरावे आणि आत चालत जावे, टॅक्सी तिथं पर्यंत जात नाही,पालसिया, साऊथ तुकोगंज, RNT रोड इकडून अंदाजे 4 km च्या आत. इंदोर मध्ये ओला, जुगनूच्या अँप रिक्षा मिळतात.सो रिक्षाचा प्रॉब्लेम नाही.संपूर्ण एरिया अतिशय गजबजलेला आणि सेफ आहे महत्वाचे म्हणजे स्वच्छ आहे, सगळे फेरीवाले कचऱ्याचा डबा ठेवतात आणि वापरायला सांगतात.
56 दुकान:- 
          इंदूरला एक दुसरं ठिकाण आहे त्याला “ छप्पन दुकान ‘ असं म्हणतात . हे एरिया चे नाव आहे, खाऊ, कपडे, दागिने अशी सगळी दुकाने इकडे आहेत.एकाच लाईनित ५६ स्वादिष्ट खाण्याची दुकानं आहेत. गोड – तिखट सगळ्या प्रकार ची खाणी इथे मिळतात . इथे एक ‘विजय चाट हॉउस “ आहे , इथले पेटीस फारच चविष्ट असतात . जरा गोड- तिखट दोन्ही अशी मिश्रीत चव असते .खाण्याची दुकाने साराफाच्या तुलनेत थोडी मोठी आहेत, प्रत्येक दुकानात 1 2 बाकडी तरी आहेतच बसायला.पण इकडे सगळी सरमिसळ आहे, चाट, डोसा, पनीर आयटम, सँडविच hotdog सगळे मिळते.
    इंदोर मधल्या ओळखीच्या लोकांच्या सांगण्या नुसार इकडे इकडचे नॉनव्हेज hotdog इंदूर मध्ये वर्ल्ड फेमस आहेत.पण ते दुपार संध्याकाळ पर्यंत संपून जातात,मधुरम नावाचे एक मोठे दुकान आहे तिकडे व्यवस्तीत बसून खाता येते. डाळ बाफले 130 रु मध्ये 2 बाफले, डाळ, कढी, एक भाजी, ताक पापड असे भरलेले ताट समोर  येते. बाकी नॉर्मल मिठाया, चाट मिल्कशेक्स वगैरे आहेतच, पण आवर्जून नाव घेऊन सांगावे असे काही  नाही.
नमकीन
      इंदूर मध्ये नमकीन आणि थंडीत गजकची खूप दुकाने दिसतात, जवळपास सगळीकडे चांगले प्रकार मिळतात, शेवेचे सिंगल , डबल, ट्रिपल लॉंग शेव असे व्हेरिअशन आहेत तिखट प्रकारच्या चढत्या भाजणी नुसार. कोणावर खुन्नस काढायचा असेल तर ट्रिपल शेव आवर्जून घेऊन जावी Wink
सिंगल शेव पोह्यांवर घालून मस्त लागते, पुणेरी नायलॉन शेवापेक्षा तर 1000 पट छान.
बऱ्याच दुकानात आधी चव दाखवून मग गोष्ट विकतात, इतकी व्हरायटी असते की फक्त चव पाहून पोट भरेल.
गजक आवर्जून गुडवाला घ्यावे, काही ठिकाणे शक्करवाला देतात ते तितके खमंग नसते.
 सकाळच्या नाश्त्यासाठी पोहा जलेबी आणि रस्त्यावर ठेल्यावर मिळणारी साबुदाणा खिचडी. पोहे तर सगळा माळवाभर. म्हणजे रतलाम स्टेशनपासून ते इंदूर भोपाळ रस्ते प्रवासात.
छोले टिकी. कानातून धूर काढणारी तिखटजाळ भेळ.
शिवाय सराफ्याच्याच रांगेत असलेल्या मिठायांच्या दुकानातल्या विविध रंगसंगतीच्या, आकारांतल्या, पीस ऑफ आर्ट वाटाव्या अशा मिठाया.
संक्रातीला लाडू छान नाही मिळाले, पण गजक आणि रसपापडी मस्त.
सोनपापडी (यात खोबरे, आंबा चॉकलेट असे वेगवेगळे फ्लेवर्स आणून वाट लावलीय )
वेगवेगळ्या प्रकारचं नमकीन - रतलामी शेव, पोह्यांवर घालायची बारीक शेव.
जुन्या इंदूरात एक हॉटेल आहे जिथे फक्त दालबाटी असे. म्हणजे दालबाटी, बटाट्याची कोरडी भाजी, चटणी, कढी आणि चुरमे का लड्डू. बहुतेक घरगुती विशेष प्रसंगीही हाच बेत असे.
ईंदूरमधील भटकंतीचे नियोजन असे करा:-
१) पहिला दिवसः- ईंदूरला पोहचल्यानंतर दुपारी थोडी विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी सितामाता बाजारमध्ये भटकंती करुन कपड्यांची खरेदी करु शकता. किंवा एम.जी. रोडवरच्या ट्रेझर आयलंड मॉलला भेट देउन. ज्यांना खादाडीची आवड आहे त्यांनी छप्पन दुकान परिसरात भटकून जीभेचे चोचले पुरवायला हरकत नाही.
२) दुसरा दिवस :- सुरवातीला लाल बाग पॅलेसला भेट देउन मोघलकालीन आणि होळकरांच्या काळातील वस्तु पहाता येतील.यानंतर येथून ३.१ कि.मी दुर असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या राजवाड्याला भेट देता येईल.
३) तिसरा दिवसः- या दिवसाची प्रसन्न सुरवात अन्नपुर्णा देवी किंवा बडा गणपतीच्या दर्शनाने करता येईल. साधारण तासाभराच्या प्रवासानंतर आपण रलामंडल वन्यजीव अभयारण्याला भेट देउ शकतो. याठिकाणी आपण काही दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव पाहु शकतो.
   ईंदूरवरुन परतीच्या प्रवासात आपल्यासोबत रम्य आठवणी असतील अशी हि ईंदूरची सहल. मांडू तिथून जवळ आहे. मांडूला रात्रीची वस्ती केल्यास किल्ला छान फिरून होतो. मांडूला शक्यतो पावसाळ्यानंतर, हिवाळ्यात जावं. तिथला उन्हाळा सहन होण्याजोगा नसतो. इंदूरपासून तासाभराच्या अंतरावर कुमार गंधर्वाचं देवास आहे. जमल्यास तिथे चक्कर मारावी. जवळ उज्जनला महांकाळेश्वराचं मंदिर आहे. ते बारा ज्योतिर्लिगांपैकी एक आहे. मंदिर वेगळ्याच धाटणीचं, नक्की पाहण्याजोगं आहे. महाराष्ट्राबाहेरचं मराठी जग पाहायचं असेल तर इंदूरला नक्की भेट द्या.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...