Saturday, September 5, 2020

ओंकारेश्वर ममलेश्वर ज्योतिर्लिंग

 भारतमातेच्या ह्र्दयस्थानी वसलेल्या मध्य प्रदेशातील एक मुख्य आकर्षण म्हणजे ओंकारेश्वर. हे एक बेट आहे.उंचावरुन या परिसराचे दृष्य पाहिल्यास आपल्याला ओम आकार स्पष्ट दिसतो. हिंदु धर्माचे एक पवित्र प्रतिक निसर्गाने या स्थानी निर्माण केले आहे. या बेटावर दोन उंच पर्वत आहेत ज्यामुळे या परिसराचे भाग पडतात. याच भौगोलिक परिस्थितीमुळे नदीने असे काही वळण घेतले आहे कि ओम हा आकार निर्माण झाला आहे. हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान असल्याने ईथे भाविकांची मोठी वर्दळ असते.
     ईथून अप्रतिम निसर्ग दृष्य दिसते.त्यातच नर्मदेचा प्रवाह या परिसराला एक वेगळे सौंदर्य बहाल करतो.ओंकारेश्वर मंदिर

ओंकारेश्वर मंदिर

   ओकांरेश्वर परिसराची भटकंती येथील मुख्य आकर्षण असलेल्या ओंकारेश्वराच्या मंदिरापासून करुया. नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते. या नदीवरच ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे. बारा ज्योर्तीर्लिगांपैकी ते चौथे ज्योर्तिलिंग आहे. येथील सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात आल्यावर भाविक शिवभक्तीत तल्लीन होतात. वैशिष्ट्य म्हणजे मंदिर असलेल्या डोंगराचा आकारही ॐ असा आहे आणि या डोंगरावरून पाहिल्यास माता नर्मदाही ॐ आकारात वाहत असल्याचे दिसते. इतरत्र वेगात वाहणार्‍या नर्मदा नदीचे शांत रूप येथे बघायला मिळते. वैशिष्ट्य म्हणजे येथे एक नव्हे तर दोन शिवलिंग आहेत. ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर. दोन्ही शिवलिंग जागृत असल्याचे मानण्यात येते. संथपणे वाहणार्‍या नर्मदेच्या भिन्न किनार्‍यांवर ती वसली आहेत.
 मंधाता नावांच्या दिव्य पुरूषाची अंबरिष व मुषुकुंद ही दोन मुले होती. त्यांनी कठोर तपस्या केल्याने येथे दोन शिवलिंग असल्याचे मानले जाते. यामुळेच येथील पर्वत मंधाता पर्वत म्हणून विख्यात आहे. शिव पुराणानुसार ओंकार बाबा व ममलेश्वरजी ओंकारेश्वराचे अधिपती असल्याचे मानले जाते. प्रत्येक सोमवारी प्रजेचे सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी ते शहरात फिरत असतात. भगवान ओंकारास वाजत गाजत नावेत बसवून ममलेश्वर मंदिराच्या घाटावर आणण्यात येते. येथूनच दोन्ही देवता नगर भ्रमणासाठी निघतात. 
  दर सोमवारच्या या पालखीला श्रावण सोमवारी विशेष स्वरूप प्राप्त होते. आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी शहरभर भक्तांची गर्दी होते. शेवटचा श्रावणी सोमवार तर मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येतो. या दिवशी येथे गुलालाची होळी खेळली जाते. सर्व रस्ते गुलालाने न्हाऊन निघत असतात. जयजयकाराच्या घोषणा आणि गुलालाने आसमंत दुमदुमून जातो. हे सर्व पाहण्यासारखे असते. ओंकार महाराजांची चांदीची पंचमुखी प्रतिमा फुलांनी सजवून पालखीतून घाटावर आणण्यात येते. नगर भ्रमणानंतर दोन्ही लिंगे थाटात नौकाविहार करतात. संपूर्ण वातावरण शिवमय होऊन जाते. 
मामलेश्वर मंदिर

मामलेश्वर मंदिर

 ओंकारेश्वराच्या दर्शनाबरोबरच आपण येथे मामलेश्वराचे दर्शनही करु शकता. ईथे आपण प्रत्यक्ष शिवपिंडीला हात लाउन पुजा करु शकतो. याठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या मागच्या बाजुला माता पार्वतीची मुर्ती आहे. हे मंदिर नर्मदा नदीच्या किनार्‍यावरच आहे.काजल रानी गुफा

काजल रानी गुफा

 ओंकारेश्वरला आल्यानंतर केवळ धार्मिक यात्रा न करता आपण काही वेगळ्याप्रकारच्या जागांना भेट देउ शकतो. यापैकी एक म्हणजे "काजल राणीची गुंफा". या परिसरात गेल्यानंतर आपण फक्त भुतकाळात हरवून जात नाही तर ईथला अदभुत परिसर थक्क करतो. ओंकारेश्वरपासून साधारण ९ कि.मी. दुर काजल राणीची गुहा हि इतिहासप्रेमी आणि निसर्गसौंदर्याची आवड असणार्‍या पर्यटकांसाठी एक आदर्श जागा आहे. ईथे आल्यानंतर आपल्या परिश्रमाचे नक्कीच सार्थक झाल्यासारखे वाटते.
सिद्धनाथ मंदिर

सिद्धनाथ मंदिर

  ओंकारेश्वर आणि मामलेश्वर याशिवाय या परिसरातील सिध्दनाथ मंदिराचेही दर्शन करता येइल. उत्तम वास्तुकलेसाठी हे मंदिर प्रसिध्द आहे. ब्राम्ही शैलीचे हे मंदिर फक्त भाविकांनाच नाही तर इतिहासात रुची असणार्‍या अभ्यासकांना आणि कलाप्रेमी व्यक्तीनांही आकर्षीत करते. मंदिरावर केलेली कलाकुसर आणि शिल्पकाम आवर्जून पहावे असेच आहे.
 कैसे करें प्रवेश

Omkareshwar Mamleshwar Jyotirling
 असे मानले जाते की वराह अवताराच्या वेळी जेव्हा पुर्ण पृथ्वी जलमय झाली होती, तेव्हा या ओंकारेश्वर परिसरात असलेला मार्केंडेय ऋषींचा आश्रम सुरक्षित होता. ओंकारेश्वर हे तीर्थ नर्मदा मातेच्या कृपेने स्वयंभु आहे. एक अशीही समजुत आहे कि एखाद्या भाविकाने जरी देशातील सर्व तीर्थयात्रा केल्या तरी जो पर्यंत तो भाविक ओंकारेश्वरला येउन त्या तीर्थजलाचा ईथे अभिषेक करत नाही तोपर्यंत त्याची तिर्थयात्रा अपुरी मानली जाते.
Omkareshwar Mamleshwar Jyotirling
   ओंकारेश्वरमध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाबरोबरच अमलेश्वरही आहे. या दोन्ही शिवलिंगाला मिळून एक शिवलिंग मानले जाते. पर्वतराज विंध्याने केलेली कठोर तपश्चर्या आणि सर्व देवता आणि ऋषीमुनी यांच्या विनंतीवरुन भगवान शिवजींनी या परिसरात निवास करण्याचे ठरविले. भगवान शंकरानी हे ईथे दोन शिवलिंगात विभागून स्थिर झाले अशी समजूत आहे. एक लिंग ओकांरेश्वर म्हणून सुस्थापित झाले तर एक ज्योती एका शिवलिंगात रुपांतरीत झाली ज्याला अमलेश्वर म्हणले जाउ लागले.
Omkareshwar Mamleshwar Jyotirling










जाण्याचा मार्ग - ओंकारेश्वरला विमाऩ, रेल्वे किंवा बसने जाता येते.
विमानाने जायचे झाल्यास येथून 77 किलोमीटरवर इंदूर विमानतळ आहे. दिल्ली, मुंबई व भोपाळहून येथे विमानांची व्यवस्था आहे.
     रेल्वे- येथून बारा किलोमीटरवर खांडवा- रतलाम रेल्वे स्टेशन आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असल्याने भरपूर गाड्या आहेत. 
उज्जैन…. ऐतिहासिक क्षिप्रा नदीच्या तटावर वसलेलं पवित्र शहर आणि प्राचीन अवंतिका नगरीची राजधानी, जिथे ऋषीमुनींनी हजारो वर्षे घोर तपश्चर्या केली. जिथे सांदीपनी ऋषींनी भगवान श्रीकृष्ण, बलराम व सुदाम्याला घडवलं. जिथे पुरातन काळापासून अनेक राजांनी राज्य केलं. जिथे दर १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला अफाट जनसागर लोटतो. आणि हेच ते ठिकाण जिथे नवग्रहांचा सेनापती मंगळाचीही उत्पत्ती झाली. एवढंच नाही काही, जिथे मंगळ ग्रहाचा जन्म झाला तिथे मंदिर बांधलं व त्यालाच आपल्या देशाचं नाभीस्थळही म्हणतात. शिवाय मंगळाला पृथ्वी व भगवान शिव यांचा पुत्र मानलं जातं, म्हणूनच इथे शिवलिंगाच्या स्वरूपातही मंगळाची उपासना व पूजाअर्चा केली जाते.
    मंडळी, मंगळाच्या जन्माची कथाही खूप रोचक आहे. स्कंदपुराणातील अवंतिका खंडानुसार अंधकासुर नावाच्या दैत्याला भगवान शंकरांनी वर दिला होता. त्यानुसार त्याच्या रक्तातून शेकडो राक्षसांचा जन्म होणार होता. वरदान मिळाल्यानंतर अंधकासुराने अवंतिका नगरीमध्ये हाहाकार माजवला. तेव्हा सगळ्यांनी भगवान शंकरांची आराधना केली. त्यांना अंधकासुराच्या अत्याचाराची कथा सांगितली. त्यावेळी क्रोधित झालेल्या शंभूमहादेवाने स्वतः अंधकासुराला ललकारलं. दोघांमध्ये घमासान युद्ध सुरु झालं. तेव्हा रुद्राच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या व त्या उष्णतेमुळे धरती दुभंगली. तिच्यातून मंगळग्रहाचा जन्म झाला. मग मंगळाने अंधकासुराच्या शरीरातून पडणाऱ्या रक्ताचे थेंब स्वतःमध्ये शोषून घेतले. त्यामुळे नव्याने तयार होणाऱ्या राक्षससेनेची उत्पत्ती थांबली व शंभूमहादेवाने अंधकासुराचा संहार करून सगळ्यांची त्याच्या त्रासापासून सुटका केली. आता कळलं, मंगळावरची माती लालभडक का आहे ते ?
    मंडळी, उज्जैनमध्ये ज्या ठिकाणी मंगळ ग्रह पृथ्वीतून वर आला तिथेच आताचं मंगलनाथ मंदिर आहे. हे मंदिर हजारो वर्षे जुनं आहे. १८०० च्या काळात ग्वाल्हेरच्या मराठा राजघराण्याने (सिंधिया परिवाराने) या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पूर्वी संपूर्ण मंदिर सफेद संगमरवरी दगडाने केलेलं होतं, पण आता त्याचं रूप पालटलंय. मंगळ ग्रहाचा आवडता रंग लाल आहे, म्हणून पूर्ण मंदिर लाल विटांनी बांधलंय. शिवाय ते भव्यही आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मंगळाची मूर्ती किंवा प्रतिमा नाही. तर शिवलिंगाच्या स्वरूपातच त्याची पूजाअर्चा केली जाते. मुख्यतः मंगळवारी मंदिरात भाविक खूप गर्दी करतात. मार्च महिन्यात येणाऱ्या अंगारखी चतुर्थीला तर मंगलनाथ मंदिरात भाविक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. या दिवशी मंगळाचं दर्शन घेतल्याने तो प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवाय इथे करण्यात येणाऱ्या भातपूजेलाही विशेष महत्त्व आहे. पत्रिकेत मंगळ असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कोपीष्ट असतो. त्याच्या विरुद्ध भात म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. त्यामुळे इथे भातपूजा केल्याने मंगळदोष दूर तर होतोच, पण व्यक्तीचा स्वभावही शांत होतो. म्हणून कुंडलीमध्ये मंगळदोष असणारी अनेक नवविवाहित जोडपी पूजेसाठी इथे येतात. मंदिरात सकाळी ६.०० वाजल्यापासून आरती सुरु होते. आरती झाल्यानंतर लगेच मंदिराबाहेर शेकडो पोपट गर्दी करतात. त्यांना प्रसादाचे दाणे मिळेपर्यंत ते तिथेच थांबून राहतात आणि थोडा उशीर झाला तर लगेच गोंगाट करायला सुरुवात करतात. लोकांचा असा विश्वास आहे कि पक्ष्यांच्या स्वरूपात मंगलनाथ स्वतः तिथे प्रसाद ग्रहण करण्यासाठी येतात. मगकाय विचार करताय जायचं का उज्जैनच्या या अद्भुत मंगलनाथ मंदिरात भारताचं नाभीस्थळ पाहायला ?
जायचं कसं?
मंडळीमंगलनाथ मंदिर उज्जैनमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे तिथे जाण्यासाठी उज्जैनमधून बसरिक्षा व टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे.  
राहायचं कुठे ?
उज्जैनमध्ये वास्तव्यासाठी धर्मशाळाडॉर्मिटरीजपासून आलिशान हॉटेलांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. धर्मशाळा व भक्तनिवासांची देखभाल मंदिर समित्या करतात. त्यामुळे कौटुंबिक सहलीसाठी हा एक स्वस्तमस्त आणि वेगळा अनुभव देणारा पर्याय आहे. तिथे झगमगाट, भव्यता नसतेपण समाधान आणि शांतता मात्र असते. म्हणून मंडळी एका रात्रीसाठी तरी या वाजवी दरात उपलब्ध होणाऱ्या भक्तनिवासात राहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा. आपल्या गाठीशी अशी एकतरी आठवण असायलाच हवी.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...