Wednesday, November 16, 2022

ओडीशा राज्य माहिती ( भाग २)

 पर्यटन : अपरिचित ओडिशा

    ओडिशा म्हटले की आपल्याला कोणार्कचे सूर्यमंदिर आणि जगन्नाथपुरी एवढेच माहीत असते. पण त्यापलीकडेदेखील ओडिशात खूप काही बघण्यासारखे आहे आणि ते नितांतसुंदर आहे. ओरिसा हे भारतातील एक सुंदर राज्य आहे जे आकर्षक समुद्र किनारे, निसर्गरम्य मंदिरे, सुंदर पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. जगन्नाथ पुरी मंदिर आणि कोणार्क सूर्य मंदिर ही ओडिशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.मंदिरांचे राज्य म्हणूनसुद्धा त्याची ओळख सांगता येते. रमणीय किनारे, शिल्पसमृद्ध मंदिरे आणि इतिहासाचा वारसा जपणारी धौली, उदयगिरी, खंडगिरीसारखी ठिकाणे, गर्द जंगलात वसलेले कोरापुट, तर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध अशी नंदनकानन, सिमलीपालसारखी अभयारण्ये अशा सर्वच गोष्टींनी संपन्न असलेले हे ओडिशा राज्य. राईस बाउल ऑफ इंडिया अशी प्रौढी मिरवणारा हा प्रदेश. नजर जाईल तिकडे भाताची शेती डोळ्याचे पारणे फेडते.

ओडिशाचा इतिहास इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. सम्राट अशोक, महान राजा खारवेलपासून ते अगदी गंगवंशीय राजवटीपर्यंतचे पुरावे आणि संदर्भ इथे पाहायला मिळतात. इथे नांदलेल्या राजवटी या संपन्न होत्या, समृद्ध होत्या, विजिगीषू वृत्तीच्या होत्या. आपल्या राज्याच्या सीमा सर्वदूर कशा पसरतील याची जाणीव ठेवूनच त्यांचा कारभार चालत असे. राज्यविस्ताराबरोबरच कला आणि संगीत या क्षेत्रांना मोठे पाठबळ देणारी अशी इथली राजघराणी होती. निसर्गाचा वरदहस्त जसा या भूमीवर आहे तसाच या राजघराण्यांचादेखील वरदहस्त इथल्या प्रजेवर, कलेवर, संस्कृतीवर आजही दिसतो. पुरी-कोणार्क म्हणजेच ओडिशा एवढाच हा प्रदेश संकुचित नसून पर्यटनाच्या दृष्टीने अनेक आश्चर्यकारक गोष्टी इथे आहेत. त्यामुळे भुवनेश्वरपासूनच वेगळ्या गोष्टी पाहायला सुरुवात करावी.
           प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तर ओडिशा म्हणजे एक नंदनवन आहे. धौली इथे असलेले अशोकाचे शिलालेख किंवा उदयगिरी-खंडगिरी या जैन लेणी आणि तिथे असलेले राजा खारवेलाचा शिलालेख आवर्जून पाहण्यासारखा आहे. इथे माकडे मात्र खूप असतात आणि खाण्याचे पदार्थ जर हातात असतील तर ते हिसकावून घेतात. अन्यथा या माकडांचा काही उपद्रव नाही. हाथीगुंफा आणि राणीगुंफा या इथल्या खास लेणी आहेत. त्याचबरोबर नागाच्या तोंडाच्या आकाराची नागगुंफासुद्धा मुद्दाम पाहण्याजोगी आहे. इथे प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणची सुंदर माहिती लिहिलेली आहे. ओडिशाला खाण्या-पिण्याचा काही त्रास नाही. सर्व प्रकारचे पदार्थ इथे आता मिळतात. पण भुवनेश्वरमध्ये काही ठिकाणी खास ओडिशा थाळी मिळते ती मुद्दाम चाखून पाहण्याजोगी आहे. सगळीकडे तवा रोटी म्हणजे आपल्या फुलक्यांसारख्या पोळ्या उपलब्ध आहेत. अगदी कोणार्कलासुद्धा असलेल्या हॉटेल्समध्ये आता राजस्थानी, गुजराथी पद्धतीचे जेवण मिळते.  एक सुंदर पदार्थ आवर्जून खावा तो म्हणजे इथे अगदी रस्तोरस्ती मिळणारे दहीवडे! २० रुपयांत ६ उडदाचे वडे त्यावर दही, चिंचगुळाचे पाणी, पिवळ्या वाटाण्याची उसळ, चाट मसाला आणि बटाटय़ाचा रस्सा असे घालून डिश तयार होते. अत्यंत चविष्ट असा हा पदार्थ मुद्दाम खाऊन पाहावा. रस्त्यावर अगदी महामार्गावरसुद्धा सायकलला दोन मोठी तपेली लावलेली दिसतात. त्यात हे दहीवडे विकतात. अनेक माणसे सकाळचा भरपेट नाश्ता म्हणूनसुद्धा हे दहीवडे खातात. कोणार्क-पुरीच्या बाहेरसुद्धा खूप समृद्ध असलेला हा ओडिशा प्रदेश खासकरून पाहण्याजोगा आहे. इथल्या प्रत्येक भागाला स्वत:ची एक ओळख आहे. जसे नुसत्या कटकमध्ये चांदीच्या तारेपासून केलेले फिलीग्रीचे दागिने विकणारी शेकडो दुकाने आहेत. संबळपुरी सिल्क तर जगप्रसिद्ध आहे. महानदीवर बांधलेले हिराकूड धरण. बालासोरचे क्षेपणास्त्र परीक्षण केंद्र आणि कोरापुट, जेपोर, राजगड इथली विपुल वनसंपदा. ओडिशा अगदी सर्वागसुंदर आहे. 

भुवनेश्वर

भुवनेश्वर हि ओडीशाची राजधानी आहे आणि २५०० वर्षांपेक्षा जुना वारसा असलेला परिसर आहे. प्राचीन स्मारके आणि आधुनिक बांधकामांचे यांचे मिश्रण इथे पहायला मिळते. याच शहराला टेम्पल सिटी म्हणजे मंदीराचे शहर असे म्हणले जाते. भुवनेश्वर शहर महानदीच्या काठावर वसले आहे.असे मानले जाते की भुवनेश्वरमध्ये पूर्वी २००० हून अधिक मंदिरे होती. त्यापैकी बरेच मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले, परंतु कृतज्ञतापूर्वक, लिंगराजा मंदिरासारखे काही महत्त्वाची मंदिरे अजूनही उभी आहेत. हे मंदिर कलिंग शैलीत बांधले गेले आहे.भुवनेश्वर, पुरी आणि कोणार्क हा पर्यटकांच्या दृष्टीने सुवर्ण त्रिकोण मानला जातो.
भुवनेश्वर, कलिंग के पूर्व प्रांत की प्राचीन राजधानी शिशुपालगढ़ के अवशेषों के पास स्थित है।
                 कलिंग देशाची आधीची राजधानी शिशुपालगड जवळच भुवनेश्वर वसले आहे.भुवनेश्वरजवळच धौली हे ठिकाण आहे, जिथे इ.स.पुर्व २६१-२६२ दरम्यान मौर्य सम्राट अशोकने कलिंग देशावर आक्रमण केले होते. भुवनेश्वरजवळच सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे. मौर्य साम्राज्याचे पतन झाल्यावर हा परिसर  महामेघवाहन वंशाच्या ताब्यात आला.याच वंशातील राजा खारवेल हा प्रसिध्द आहे.यांचा शिलालेख भुवनेश्वरजवळील दयगिरि आणि खंडगिरी लेण्यातील हातीगुंफेत आहे.यानंतर या परिसरावर सातवाहन, गुप्त, मठर आणि शैलोद्भव यांचे शासन आले. यानंतर या भागावर सातव्या शतकात सोमवंशी किंवा केशरी वंशाची सत्ता होती. पुढे १४ व्या शतकापर्यंत या परिसरावर गंग वंशाची राज्य होते.त्यांची राजधानी भुवनेश्वरजवळ कलिंगनगर येथे होती.याच्यानंतर भोइ वंशाच्या मुकुंद देव ते मराठ्यांची सत्ता प्रामुख्याने या राज्यावर राहीली. भुवनेश्वर परिसरावर शैव पंथाचा प्रभाव असल्यामुळे आठव्या ते बाराव्या शतकाच्या कालावधीत इथे मोठ्या प्रमाणात शिवमंदीर उभारली गेली. भुवनेश्वरमध्ये अनंत वासुदेव हे एकमेव प्राचीन विष्णु मंदीर आहे.
इ.स. १५६८ मध्ये अफगाणी वंशाच्या करराणी घराण्याने भुवनेश्वरपरिसराचा ताबा घेतला.यांच्याच कारकीर्दित अनेक प्राचीन मंदीरांचा विनाश केला गेला. सोळाव्या शतकात इथे मोघल राजवटीने पाय रोवले तर पुढे अठराव्या शतकात इथे मराठी साम्राज्याची सत्ता प्रस्थापित झाली.पुढे मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली आणि १८०३ मध्ये इंग्रजांनी इथे पाउल रोवले.१९१२ ला बंगाल तर १९१२ ते १९३६ दरम्यान बिहार व ओरिसा प्रांत असा भाग होता.ब्रिटीश काळात ओरिसाची राजधानी कटक होती.मात्र इथे सतत पुराचा धोका असायचा तसेच जागाही अपुरी होती. त्यामुळे ३० सप्टेंबर १९४६ मध्ये राजधानी नवीन जागी हलवावी असा प्रस्ताव ओरिसा विधानसभेत मांडला गेला. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर १३ एप्रिल १९४८ मध्ये पंतप्रधान नेहरुंनी नव्या राजधानीची कोनशीला उभारली. नव्या राजधानीचे नाव लिंगराज मंदिराचे अधीपती त्रिभुवनेश्वर म्हणजे तिन्ही लोकांचे परमेश्वर या अर्थाने भुवनेश्वर ठेवले गेले.सन १९४९ मध्ये कटकमधून विधानसभा भुवनेश्वरला हलवली गेली.यानंतर आधुनिक भुवनेश्वरची उभारणी जर्मन वास्तुकार ओटो कोनिग्सबर्गर यानी केली,पुढे भुवनेश्वर खुपच वेगाने विकसित झाले.
   भुवनेश्वर हे मंदिरांचे शहर म्हणून अगदी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. ओडिशा स्थापत्य शैलीतील संक्रमणाची स्थिती दाखवणारी आणि त्या कलेमध्ये बांधलेली मजबूत आणि अत्यंत दिमाखदार मंदिरे या ठिकाणी पाहता येतात. लिंगराज मंदिर म्हणजे या सगळ्याचा मेरुमणी आहे. भव्यदिव्य असे हे मंदिर आपल्याला लांबूनसुद्धा दिसते. त्याला लागूनच असलेले भले मोठ्ठे तळे या परिसराची शोभा अजूनच वाढवते. अत्यंत सुंदर मूर्तिकला आणि ओडिशा स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून हे मंदिर जरूर पाहावे. या मंदिर परिसरात अनेक लहान-मोठी मंदिरे पाहायला मिळतात. मात्र गाभाऱ्यात असलेली शिविपड ही नोटांनी झाकून गेलेली दिसते. असंख्य नोटांनी मढवलेली शिविपड आणि आशाळभूतपणे आपल्याकडे पाहणारे पंडे अगदी अंगावर शिसारी आणतात. पण एवढे एक सोडले तर खूपच भव्य आणि देखणे मंदिर पाहण्याचे भाग्य आपल्याला इथे लाभते. अभ्यासकांसाठी तर हे मंदिर म्हणजे पर्वणीच आहे परंतु सामान्यजनांनीसुद्धा मुद्दाम इथे थांबून या मंदिरावर शिल्पांकित केलेली अनेक शिल्पे मनसोक्त पाहून घ्यावीत. या मंदिराच्या परिसरात अगदी चालत फिरता येतील अशी बरीच मंदिरे एकामागे एक अशी उभी आहेत. ज्यात अनंत वासुदेव मंदिर, केदारेश्वर मंदिर, वेताळ मंदिर अशी काही नावे घेता येतील. परशुरामेश्वर मंदिर आणि त्याला लागूनच असलेले मुक्तेश्वर मंदिर हे अत्यंत देखणे आणि अत्यंत सुंदर असे म्हणावे लागेल. अगदी टुमदार असलेल्या या मुक्तेश्वर मंदिरासमोर एक दगडी कमान आहे ज्यातून आपला या परिसरात प्रवेश होतो. मंदिर छोटेखानी आहे पण त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. प्रदक्षिणा मारताना मंदिरावर काही ठिकाणी एक खिडकी आणि त्यातून डोकावणारी एक स्त्री दाखवली आहे. तिच्या खिडकीवर कावळ्यासारखा पक्षी दाखवला आहे. ते पाहून ‘पल तो गे काऊ कोकताहे.. शकून गे माये सांगताहे..’ याचा काही संदर्भ असेल का, असे उगीचच वाटते. मंदिर पाहायला आलेल्या लोकांमध्ये आपल्या माहेरचे कोणी आले असेल आणि म्हणून तो कावळा ओरडतोय हे बघायला ती स्त्री बाहेर डोकावत असेल का? कल्पनेला खूप वाव आहे. पण हे मंदिर मात्र अगदी सुंदर आहे. प्रत्येक प्रदेशाला एक समृद्ध भाषा असते आणि त्या भाषेची काही वैशिष्टय़े असतात. ओडिशामध्ये कळसाला देऊळ असा शब्द आहे आणि सभामंडपाला जगमोहन. मुख्य गर्भगृहावर असलेल्या कळसाला रेखा देऊळ म्हणतात, तर जगमोहनावर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात. खूप वेगळी आणि आकर्षक अशी ही नावे वाटतात.
        भुवनेश्वरमधील काही महत्वाची मंदीर म्हणजे लिंगराज मंदिर, राजरानी मंदिर, केदार गौरी मंदिर, अनंत बासुदेव मंदिर, चिन्तामणिस्वर मंदिर, इस्कॉन मंदिर आणि मुक्तेश्वर मंदिर. यापैकी लिंगराज आणि अंनत वासुदेव मंदीर येथील महाप्रसाद महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. येथील इतर पर्यटन स्थळ म्हणजे राज्य संग्रहालय, बिंदु सरोवर आणि नंदनकानन झु, चंदका वन्यजीव अभ्यारण्य आणि तेथील गरम पाण्याचे झरे. पर्यावरण प्रेमीसाठी इथे बरीच उद्याने आहेत.त्यात बीजू पटनायक पार्क, बुद्ध जयंती पार्क, आईजी पार्क, फॉरेस्ट पार्क, गांधी पार्क, एकाम्र कानन, आईएमएफए पार्क, खारावेला पार्क, एसपी मुखर्जी पार्क, नेताजी सुभाष चंद्र बोस पार्क हि प्रमुख उद्याने आहेत. विज्ञान प्रेमी पर्यटकांसाठी रीजनल सायन्स सेंटर, पठानी सामंत तारांगण आहे.लहान मुलांसाठी नंदनकानन प्राणीसंग्रहालय आहे. याशिवाय पीपली गाव, देरास बांध, बाया बाबा मठ, शिशुपालगढ़, बीडीए निक्को पार्क, फॉर्चून सिटी, इंफो सिटी अशी बरीच आकर्षणे आहेत.
    भुवनेश्वर हे शहराचे नामकरण होण्यासाठी मुख्य कारण म्हणजे इथे असणारा भगवान शंकराच्या वास्तव्याचा प्रभाव !या नावाची उत्पत्ती त्रिभुवनेश्वरपासून झाली असे मानले जाते.संपुर्ण शहरात आपल्याला शिवमंदीर नाही असे क्वचितच बघायला मिळेल. प्रमुख शिवमंदीरात अष्टसंभू मंदिर, भृंगेश्वर शिव मंदिर, गोकर्णेश्वर शिव मंदिर, गोसागरेश्वर शिव मंदिर, जालेश्वर शिव मंदिर, कपिलेश्वर शिव मंदिर, सर्वत्रेश्वर शिव मंदिर, शिवतीर्थ मठ, स्वपनेश्वर शिव मंदिर, उत्तरेश्वर शिव मंदिर और यमेश्वर मंदिर
आहेत. भुवनेश्वरमधील प्राचीन मंदीरात  ऐसनयेश्वर शिव मंदिर, अष्टसंभू मंदिर, भृंगेश्वर शिव मंदिर, भारती मठ मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, भ्रुकुटेश्वर शिव मंदिर, बयामोकेश्वर मंदिर, भस्कारेश्वर मंदिर, चंपाकेश्वर चंद्रशेखर महादेव मंदिर, चक्रेश्वरी शिव मंदिर और दिशिश्वर शिव मंदिर हि मंदीर आहेत. इतर मंदीरात चिंतामनीश्वर शिव मंदिर, गंगेश्वर शिव मंदिर, गोकरनेश्वर शिव मंदिर, जालेश्वर शिव मंदिर, कपिलेश्वर शिव मंदिर, लबेश्वर शिव मंदिर, लखेश्वर शिव मंदिर, मदनेश्वर शिव मंदिर, मंगलेश्वर शिव मंदिर, नागेश्वर मंदिर, पुव्रेश्वर शिव मंदिर, सर्वत्रेश्वर शिव मंदिर, शिवतीर्थ मठ, गोसागरेश्वर शिव मंदिर, सुबरनेश्वर शिव मंदिर, सुकुतेश्वर मंदिर, स्वपनेश्वर शिव मंदिर और यमेश्वर मंदिर .मात्र शिवमंदीर सोडून इतर देवतांची मंदीर भुवनेश्वर शहरात आहेत. त्यामध्ये भगवान कृष्ण आणि देवी चंडी  मंदिर प्रसिध्द आहे.याखेरीज अतंता वासुदेव मंदिर, अखड़चंडी मंदिर, ब्राह्मा मंदिर, देवसभा मंदिर, दुलादेवी मंदिर, कैंची मंदिर, विष्णु मंदिर, गोपाल तीर्थ मठ, जनपथ राम मंदिर, रामेश्वर डुला, सुका मंदिर, वैताल डुला आणि विष्णु मंदिर प्रसिद्ध आहेत.
            इथे तुम्ही रिक्षा घेऊन फिरणे अगदी सोयीस्कर. सगळी मंदिरे एकमेकांच्या जवळजवळ अशीच आहेत. ओल्ड टाऊन नावाचा जो भाग आहे तिथेच ही प्राचीन मंदिरे पाहता येतील.   
          इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, याचे नामकरण बिजु पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ असे केले आहे. भुवनेश्वरमध्ये मुक्कामासाठी ५-स्टार होटेल, ३-स्टार होटेल, बजेट होटल्स आणि  लॉजिंग मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर भटकंतीसाठी शहरात कॅब, ऑटो रिक्शा, सिटी बस उपलब्ध आहेत. तसेच जेवणासाठी भरपुर पर्याय उपलब्ध आहेत.
भुवनेश्वर येथे साजरे केले जाणारे सण :-
   मंदिर कार महोत्सव, रथ-यात्रा, शिवरात्रि, दिवाळी, गणेश पूजन, नुआखाई आणि सरस्वती पूजा, ईद, क्रिसमस, आदिवासी मेला, तोशाली राष्ट्रीय शिल्प मेला, राजधानी पुस्तक मेला आणि खंडगिरी उत्सव
स्मारक
   भास्करेश्वर मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, कपिलेश्वर महादेव मंदिर, लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, ओबेरॉय होटल, परशुरामेश्वर मंदिर, राजारानी मंदिर, रामेश्वर मंदिर, बैताल देउल (मंदिर)
विशेस। आकर्षण :-
    लिंगराज मंदिर, नंदनकानन जूलॉजिकल पार्क, उदयगिरि आणि खंडगिरी गुफाएं, धौली, राजारानी मंदिर इत्यादी
खरेदीसाठी :-
   बापूजी नगर, यूनिट 2 आणि 3 बाजार, अशोक नगर, जनपथ , कटक-पुरी रोड, शहीद नगर, सत्य नगर
भुवनेश्वर मध्ये खरेदीसाठी भरपुर पर्याय उपलब्ध आहेत. इथे आपल्याला सहलीचे स्मरण म्हणून वस्तु खरेदी करायची असेल किंवा सजावटीच्या वस्तु घ्यायच्या असतील तर सर्वप्रकारच्या वस्तु इथल्या बाजारात उपलब्ध आहेत. इथे अ‍ॅप्लीक वर्क, हँडबॅग, छत्र्या, दागिने मिळतात. लाकडी वस्तु, धातुच्या वस्तु, विणलेल्या वस्तु ज्या ओडीशाची ओळख मानल्या जातात. हे सर्व भुवनेश्वर भेटीत घ्यायलाच हवे.भुवनेश्वर शहरात एकाम्र-हाट : क्राफ्ट मार्केट : अत्यंत दर्जेदार कलाकुसरीच्या वस्तू मिळण्याची जागा. सरकारने इथल्या ग्रामीण-शहरी-वनवासी सगळ्याच कलाकारांना उत्तम बाजारपेठ इथे बनवून दिली आहे. ओडिशाचे ताड-पत्रावरील कोरीव काम, पिपलीचे रंगीत कापडी कंदील, वारली सारखी सावरा आदिवासी चित्रकला, ढोकरा पितळी दिवे व मुर्त्या, अद्वितीय कलाकुसरीच्या रेशमी बोम्बकाई, बिचित्रपुरी व पसापाल्ली साड्या, संबळपूर सिल्क आणि सुती साड्या, टसर रेशीम व साध्या रेशमाची सुरेख जरीकाठी सोवळी, संगमरवरी दगडातील कोरीव मूर्ती व डबे हे विशेष उल्लेखनीय. येथील मूर्तिकला फार विशेष आहे, शहराच्या आसपास अनेक शिल्पशाला असून उच्च दर्जाची आणि त्या तोलाची किंमत असणारी सुरेख शिल्पे लाईफ साईज आकारापर्यंत मिळतात, वाहतूक आणि किंमत जमत असेल तर जरूर जाऊन घेण्याइतकी विशेष.
हॉटेल:-
   जिंजर हॉटेल, द क्राउन, हॉटेल ग्रांड सेंट्रल, हॉटेल आर्य पैलेस, हॉटेल पुष्पक, हॉटेल स्वास्ती, हॉटेल एक्सेलेन्शन भुवनेश्वर, एम्पर्स हॉटेल, द न्यू मैरियन, द रॉयल मिडटाउन इत्यादी
भेट देण्यासाठी योग्य काळः-
 ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा भुवनेश्वर इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. 
ओड़ीशा स्टेट म्यूजियम :-
प्रोफेसर घनश्याम दास आणि प्रोफेसर एन.सी. बनर्जी या दोन प्राध्यापक इतिहासकार यांच्या प्रयत्नाने ओडीशा स्टेट म्युझियमची उभारणी झाली. सन १९३२ पासून इथे वस्तुंचा संग्रह करण्यास सुरवात झाली. इ.स. १९४७-४८ मध्ये हे संग्रहालय कटकमधून भुवनेश्वरला हलविले गेले.त्यावेळी याचे नाव प्रांतीय म्युझीयम होते.पुढे १९६० मध्ये याचे नाव बदलून स्टेट म्युझीयम ठेवले गेले.१९३८ मध्ये ओडीशा राज्य सरकारने या संग्रहलयाला ताब्यात घेतले. पुढे हे संग्रहालय खुप लोकप्रिय झाले. सध्या इथे दुर्मिळ चित्र्,शिल्प, टेराकोटा वस्तु, तांब्याची भांडी, आणि अश्या बर्‍याच वस्तु बघायला मिळतात. तसेच इथे काही दुर्मिळ नाणी आहेत.स्टेट म्यूझियम

भुवनेश्वरमध्ये आतापर्यंत दिसलेली घाण बकालपणा याचा मागमूस कुठे नाही. वाटले नंदनवनातच आलो.
म्यूझियमचे देखणे आवार

  संग्रहालयाला प्रशस्त, विस्तीर्ण आवार आहे. आवारात विविध आकारांच्या चौकटीत सीमित केलेली, सुरेख राखलेली हिरवळ आणि व्यवस्थित कातरलेली झाडे दिसतात.
व्यवस्थित राखल्यामुळे आवाराचा प्रचंड विस्तार अंगावर येत नाही. मुख्य बाब म्हणजे जमीन उगीचच सपाट करून त्यावर हिरवळ वाढवली नव्हती. जमिनीतले मूळचे नैसर्गिक उंचवटे तस्सेच ठेवून हिरवळीचा साज त्यावर चढवला आहे.
म्यूझियमच्या आवारात

देखणी शिल्पे

देखणी शिल्पे

अधूनमधून आकर्षक शिल्पे आणि पुतळे.

देखणे आवार

देखणी शिल्पे

संग्रहालयाचे प्रथमदर्शन आकर्षक आहे. संग्रहालयाच्या आतली सजावट कलापूर्ण दिसते. स्वागत दालनात उत्सवी भडकपणाचा चमकदार स्पर्श असलेली सजावट.
स्वागतक्षाची सजावट

ही सर्वव्यापी श्रीकृष्ण, बालभद्र आणि सुभद्रा यांची त्रिमूर्ती आणि त्यांचे ते ओदिशी शैलीतले वैशिष्ट्यपूर्ण टप्पोरे डोळे.
सर्वव्यापी त्रिमूर्ती आणि टप्पोरे डोळे

आतली मांडणीही सुबक. जमीन, भिंती, काचा, खिडक्यांची स्वच्छता चकाचक. रंगसफेती नीटस आणि आकर्षक. काचखिडक्यात वस्तू टापटीपीने व्यवस्थित मांडलेल्या. उडिया, देवनागरी आणि इंग्रजीत पाट्या लिहिलेल्या आहेत.






काचघर

प्रकाशचित्रणाला प्रतिबंध नसल्यामुळे मनसोक्त फोटो काढता येतात.
काचघर

संग्रहालयाच्या आतल्या खिडकीतून दिसणारी संग्रहालयाची नीटनेटकी इमारत
इमारत आतून

इमारत आतून

इमारत आतून

काचघर

लिपीचा विकास

एके ठिकाणी उडिया लिपी प्राचीन लिपीवरून कसकशी विकसित झाली ते दाखवले आहे.  ब्रह्मी लिपी उडियाशी फारच मिळतीजुळती वाटली. यांगूनच्या एखाद्या दुकानाची पाटी भुवनेश्वरच्या बाजारात लावली तर आपल्याला कळणार देखील नाही.आदिवासी

आदिवासी

आदिवासी

आदिवासी

आदिवासी

ओदिशातील विविध आदिवासी जमातींच्या जीवनशैलीचे दर्शन घडवून माहिती देणारी काचघरे आहेत.

कारंजे

कारंज्याने सजीव केलेले वातावरण

रीजनल म्युझियम ऑफ़ नॅचरल हिस्टरी :-

  भुवनेश्वरला गेल्यावर नक्की भेट द्यावी, असं हे म्युझियम आहे. 
प्रादेशिक निसर्ग संग्रहालय
 निसर्ग संग्रहालय
गेंदेदार झेंडू
प्रवेशद्वार
 या संग्रहालयाचा परिसरही उत्तम राखला आहे. सोनटक्क्यासारखा दिसणारा पण जास्त मोठा आणि जास्त मोहक हेलिकोनिया.हिरवळ, सुंदर झाडे, शिल्पे वगैरेंच्या जोडीला टेनिस चेंडूएवढ्या मोठ्या आकाराचे मोठ्ठे झेंडू ठिकठिकाणी फुललेले. झुळझुळणार्‍या वार्‍याने त्या सजीव वातावरण यामुळे उत्साह भरतो.
देखणे आवार
देखणे आवार
देखणे आवार
देखण्या आवारात
प्रवेशद्वारातून

प्रवेश केल्याबरोबर समोर हत्तीचा हाडांचा सापळा ठेवला आहे.
हत्तीचा सांगाडा

खर्या ह्त्तीचा, देवमाशाचा सांगाडा इथे पहायला मिळतो. विविध प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींबद्दल भरपूर माहिती देणारं असं हे संग्रहालय आहे. विशेषतः ज्या हत्तीचा सांगाडा आहे, त्या शंकरची कहाणी चटका लावून जाते.
IMG-20181226-WA0006.jpg
हा शंकर नावाचा हत्ती ओडिसामध्ये गावात शिरून त्रास देऊ लागला, दोन माणसांचा मृत्यूही ओढवला, फॉरेस्ट खात्याने त्याला पकडून ठेवलं होतं. पुढे त्याला काही इन्फेक्शन होऊन तो मेला. नंतर त्याचे शवविच्छेदन करताना खूप पूर्वी त्याला लागलेली बंदुकीची गोळी हाडात अडकून बसलेली दिसली. शंकरच्या हिंसक वृत्तीचे कारण म्हणजे हा बंदुकीचा हल्ला असू शकतो. आजही त्याच्या हाडांच्या सापळ्यात ती गोळी दिसते. 
IMG-20181226-WA0007.jpg
देवमाशाचा सांगाडा
काचघर


सापळ्यांचे युगुल

मोर

जंगलचा राजा

जगातले सर्वात मोठे अंडे
टिप्पणीची गरज आहे?

पक्षी आणि त्यांची अंडी

गवा

नंदनकानन प्राणीसंग्रहालय

प्राणीसंग्रहालय म्हटल्यावर नाके मुरडली जातात. मरतुकडे आणि गलितगात्र झालेले प्राणी असे चित्र डोळ्यांसमोर येते. पण नंदनकानन मात्र फार फार वेगळे आहे बरे का. खूप छान राखलेले आणि प्राण्यांसाठी मोठा परिसर आणि मोकळी हवा असलेले हे नंदनकानन प्राणीसंग्रहालय भुवनेश्वरपासून फक्त १८ कि.मी वर आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे उघडे असते. इथे आत फिरण्यासाठी सफारी आहेत. माणशी ५० रुपये असा सफारीचा दर असून अंदाज १ तासाची फेरी मारून आणतात. पांढरा वाघ, सिंह, पट्टेरी वाघ, अस्वले, हरीण, चितळ, सांबर, जिराफ, झेब्रा असे अनेक प्राणी आपल्याला खूप जवळून पाहता येतात. इथे आपण बसमध्ये आणि प्राणी उघडय़ावर असे असल्यामुळे मोकळेपणाने वावरणारे प्राणी पाहता येतात. अस्वले तर पुढचे दोन पाय गाडीला टेकवून आत डोकावून पाहतात. फारच भारी वाटते हे पाहायला. 





























   शक्यतो दुपारी ३ वाजता जर इथे गेले तर खूप प्राणी पाहता येतात. कारण ही प्राण्यांना खाणे देण्याची वेळ असते. त्यामुळे इथे प्राण्यांचा वावर खूप मोठय़ा प्रमाणावर असतो. तसेच विविध देशांतून येणारे स्थलांतरित पक्षी इथे दिसतात. खूप मोठय़ा संख्येने मोर इथे आहेत. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे एक छोटेसे दालन इथे केलेले असल्यामुळे त्यांचे दर्शनसुद्धा जवळून आणि नीट होते.
   नंदनकानन झु आणि बोटॅनिकल पार्क ४०० हेक्टरमध्ये पसरले आहे. हे प्राणीसंग्रहालय १९७९ मध्ये जनतेसाठी खुले करण्यात आले.भुवनेश्वरमधील हे एक पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. जर आपण सहकुटुंब भुवनेश्वरला भेट देणार असाल तर इथे जायलाच हवे. चंदका -दंपारा अभयारण्याच्या आणि कंजिया सरोवराच्या परिसरात वसलेल्या या प्राणीसंग्रहालयाचे नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे आहे. इथे १२६ प्रकारचे वन्यजीव आणि काही दुर्मिळ वृक्षसंपदा पहायला मिळते. 
नेताजी सुभाष चंद्र बोस पार्क :-
भारतभुमीचे महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे उद्यान उभारले आहे.भुवनेश्वरमधील हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे

.हे उद्यान खुपच उत्तमरित्या राखलेले आहे.चालण्यासाठी पथ, प्रकाशव्यवस्था, जॉगिंग ट्रॅक आणि कारंजे यामुळे येथील शोभा वाढलेली आहे,पर्यटकांना बसण्यासाठी खुप बेंचची व्यवस्था केलेली आहे.इथेली नयनरम्य हिरवळ आणि ताजी हवा यामुळे इथे आलेली व्यक्ती खुपवेळ उद्यानात घालवते.आरामात छान वेळ घालवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात स्थानिक व्यक्ती व पर्यटक येतात. तसेच इथल्या खेळण्यामुळे मुलही इथे रमतात. सकाळी ५ ते ८ व संध्याकाळी ४ ते रात्रॉ ८ अशी या उद्यानाची वेळ आहे.

बिजु पटनायक पार्क
बिजु पटनायक पार्क हे भुवनेश्वरमधील सुंदर बाग आहे.हे उद्यान बेरहामपुरमधील संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या जवळच आहे.ब्रिटीश सराकरचे डीएफआईडी ऑफिस याला लागूनच आहे.हे उद्यान ओरिसाचे माजी मुख्यमंत्री बिजु पटनायक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारले आहे.हे उद्यान जवळपास सात एकरमध्ये पसरले आहे.इथे बोटींगची सोयही आहे.इथे एक म्युझिकल फाउंटनदेखील आहे.
बुध्द जयंती पार्क
 
गौतम बुह्दच्या विचारांना समर्पित केलेले हे पार्क आहे.कलिंगच्या युध्दानंतर ओडीशाच्या इतिहासात एक नव्या युगाची सुरवात झाली. हिंसेला कंटाळलेल्या लोकांना गौतम बुध्दाच्या विचारांचे आकर्षण वाटू लागले. या विचारांना आणखी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी भुवनेश्वर विकास प्राधिकरणाने या उद्यानाची निर्मिती केली. चंद्रशेखरपुरमध्ये ४४ एकर जागेत हे उद्यान आहे. हे उद्यान एका चौथर्यावर उभा केलेले आहे आणि याच्या एका बाजुला चंदकाचे अभयारण्य आहे. इथे वृक्षवल्लींच्या छायेत आपण निवांत बसून पक्ष्यांचे कुजन एकु शकता.
इंदीरा गांधी पार्क 
इंदीरा पार्क म्हणजेच आय.जी. पार्क हे भुवनेश्वरमधील आणखी एक सुंदर बाग. ११ एकरात पसरलेल्या हे उद्यान पर्यटकांचे आकर्षण आहे.हे उद्यान भुवनेश्वरमधील ए.जी. चौकाजवळ आहे.या बागेच्या मागेच ओडीशाचे सचिवालय आणि विधानसभा आहेत.याआधी हे पार्क म्हणजे मैदान होते.इथे परेड आयोजित केली जाई. पुढे सर्वसामान्य जनतेसाठी इथे पार्कची उभारणी झाली. या पार्कला एतिहासिक महत्व आहे.याच ठिकाणी ३० ऑक्टॉबर १९८४ ला स्वर्गीय श्रीमती इंदीरा गांधीची पंतप्रधान म्हणून शेवटची सभा झाली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे एक पुतळा उभा करण्यात आला आहे. इथे आपण वर्षभर भेर्‍ देउ शकतो.
फॉरेस्ट पार्क
भुवनेश्वरमधील आकर्षक उद्यानापैकी एक म्हणजे फॉरेस्ट पार्क. हि बाग कॅपिटल हॉस्पिटलजवळ आहे.इथे स्थानिक लोक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात.इथे खेलण्यासाठी मोठे मैदान, बरीच वृक्ष्संपदा आहे. तसेच हिरवळचे पट्टे आहेत.त्यामुळे सकाळी फेरफटका मारण्यासाठी किंवा जॉगिंगसाठी हि आदर्श जागा म्हणता येईल. मुलांना खेळण्यासाठी हे उद्यान हा उत्तम पर्याय आहे.
जनजातीय कला और शिल्पकृति संग्रहालय
  या संग्रहालयाला जनजातीय संग्रहालय असेही नाव आहे. हे संग्रहालय भुवनेश्वर रेल्वे स्टेशनपासून जवळपास ३ कि.मी. लांब आहे. इथे आपल्याला ओडीशातील आदिवासी लोकांचे जीवन, संस्कृती याची ओळख होते. यालाच जनजातीय शोध संस्थान संग्रहालय या नावाने देखील ओळखले जाते. या संग्रहालयातील संशोधन केंद्रात आदिवासी लोकांसदर्भात माहिती गोळा केली जाते. आणि या संशोधनाचे निष्कर्श इथे दाखवले जातात. ओडीशामध्ये जवळपास आदिवासींच्या साठ जमाती आहेत. या संग्रहालयात लाकडी मुर्ती, धातुच्या वस्तु, वस्त्रप्रावरण आणि दागिन्याचा मोठा संग्रह आहे. तसेच इथे एक छोटा झु आणि लायब्ररी आहे.सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशी याची वेळ आहे.इथे फोटोग्राफीला मात्र परवानगी नाही.
खारवेल पार्क
खारवेला पार्क हे भुवनेश्वरमधील एक उत्कृष्ट उद्यान आहे. इथे जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाक, प्रशस्त हिरवळ अश्या सुविधा आहेत.इथे मोठ्या प्रमाणात लोक भेट देत असल्यामुळे हे उद्यान अतिशय स्वच्छ ठेवले आहे आणि सोयीही उत्तम आहेत. इथे असलेली वनराई, ओढा, कारंजे, तलाव यामुळे या पार्कला शोभा आलेली आहे. भुवनेश्वर शहराची भटकंती करताना कंटाळ्यास इथे येउन थोडा वेळ विश्रांती घ्यायला हरकत नाही. बहुतेकदा सकाळी आणि संध्याकाळी इथे गर्दी असते. भुवनेश्वर विकास प्राधिकरण (बीडीए) या बागेची छान निगा ठेवतात. आम जनतेसाठी हे उद्यान सकाळी ५ ते ८ व संध्याकाळी ४ ते ८ पर्यंत खुले असते.

एसपी मुखर्जी पार्क
भुवनेश्वरमधील आणखी एक सुंदर उद्यान म्हणजे एसपी मुखर्जी पार्क. इथे जॉगिंग ट्रॅक, चालण्यासाठी पथ, फुलांचे ताटवे यामु़ळे हे आकर्षक ठिकाण आहे. सकाळी ५ ते ८ व संध्याकाळी ४ ते रात्री ८ अशी या बागेत प्रवेश करण्याची वेळ आहे.
बीडीए निक्को पार्क :-
  भुवनेश्वरमधील हे एक अम्युझमेंट पार्क आहे. याची उभारणी १९९७ मध्ये झली. हे एका प्रशस्त जागेत उभारले आहे. इथे एक कृत्रिम सरोवर पहायला मिळते. इथे अनेक खेळ व राईड उपलब्ध आहेत. सहकुटूंब पुर्ण एक दिवस निवांत घालवता येईल अशी जागा म्हणजे हे पार्क.
गांधी पार्क:-
   हे उद्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित आहे. या उद्यानाची उभारणी भुवनेश्वर विकास प्राधिकरणाने केली आहे. हि बाग सवोस्टी प्लाजा जवळ आहे. इथे महात्मा गांधींची प्रार्थनेच्या मुद्रेतील पुतळा आहे. याशीवाय जॉगिंगसाठी, मोकळ्या हवेसाठी आणि काही न करता निवांत बसण्यासाठी हि एक आदर्श जागा आहे. आधी याठिकाणी जनता मैदान नावाचे एक मैदान होते. त्याजागी या उद्यानाची उभारणी केली आहे.
आईएमएफए पार्क :-
  भुवनेश्वरमधील आणखी एक देखणे उद्यान म्हणजे आईएमएफए पार्क. हे उद्यान भुवनेश्वरच्या शहीदनगर परिसरात आहे. इथे भरपुर झाडी, फिरण्यासाठी प्रशस्त आवार, खेळण्यासाठी सोयी आहे.यात बास्केटबाल कोर्ट आहे.तसेच जॉगिंग आणि वॉकिंग साठी ट्रॅक आहेत.
इस्कॉन मंदीर :-
   हे मंदीर भुवनेश्बर शहराच्या मधोमध उभारले आहे.जगभर पसरलेल्या इस्कॉन मंदिराच्या मालिकेतील हे एक मंदिर. या मंदिररात कृष्ण, बलराम, जगन्नाथ, गौरा नेताई आणि सुभद्रा यांच्या मुर्ती आहेत. इस्कॉन पंथाची भुवनेश्वरमध्ये दोन केंद्रे आहेत. एक शहरात स्वर्ग धारा क्षेत्रात आहे, तर दुसरे शहराच्या बाहेर आहे.इस्कॉन मंदिरात रोज भाविकांची प्रचंड गर्दी असते. विशेषतः कृष्ण आणि जगन्नाथ यांच्या उत्सव काळात अधिक गर्दी असते. इथे रोज भजन आणि पुजा होते. मंदिर परिसराची स्वच्छता आणि वातावरण अतिशय उत्तमरित्या राखले जाते,.



शिशुपालगडः-
   हा एक प्राचीन किल्ला आहे.मात्र सध्या इथे फक्त भग्नावशेष बघायला मिळतात. हा भारतातील सर्वात मोठा किल्ला असल्याचा स्थानिकांना विश्वास आहे.याची आता उत्तम देखभाल केली जाते,शिह्सुपालगडाचे जुने अवशेष भुवनेश्वर शहराच्या जवळच पहायला मिळतात. ते बघण्यासाठी इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. इथेले भग्नावशेष बघून हा मुळ स्चरुपात कसा असेल ? याची आज फक्त कल्पनाच करु शकतो. आता हा परिसर संरक्षित स्मारक आहे.

भारताच्या ओडिशा राज्यातील एक प्राचीन स्थळ. ते भुवनेश्वर या राजधानीपासून ९ किमी. अंतरावर आहे. गंगावती नदीने वेढलेल्या या तटबंदीयुक्त नगराचा आकार १.१ चौ. किमी. इतका असून, प्रत्येक दिशेस दोन-दोन अशी एकूण ८ भक्कम प्रवेशद्वारे आहेत. या शहराच्या तटबंदीची बाहेरून उंची ९ मी. इतकी आहे.

शिशुपालगड येथील उत्खनन (१९४८).

या स्थळाचे उत्खनन सन १९४८-४९ साली बी. बी. लाल यांनी केले होते. सदर उत्खनन भारतातील स्वातंत्र्यानंतरचे पहिले मोठे उत्खनन होते. लाल यांनी पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराचे आणि लगतच्या परिसरात उत्खनन केले, त्यात त्यांना विविध रंगाची मृद्भांडी, भाजलेल्या मातीच्या मूर्ती, धातूची नाणी आणि इतर पुरावशेष प्राप्त झाले. सदर पुरास्थळाचा काळ त्यांनी इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. चौथे शतक असा निश्चित केला.

या पुरास्थळाचे पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक महत्त्व, आंतरिक स्थापत्य, तत्कालीन नगरवासियांची जीवनपद्धती, घरांची रचना आणि स्थळाचा कालानुक्रमिक विकास इत्यादी बाबी जाणून घेण्याच्या दृष्टीने येथे पुरातत्त्व विभाग, डेक्कन कॉलेज पुण्याचे रबिन्द्र कुमार मोहंती आणि कॉटसेन पुरातत्त्वीय संस्था आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ (लॉस अँजेल्स, अमेरिका) येथील मोनिका स्मिथ यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा उत्खननकार्य हाती घेण्यात आले (२००५-०९). तत्पूर्वी तटबंदीयुक्त शहराचा विशाल आकार आणि तत्कालीन सुनियोजित यंत्रणा लक्षात येण्याकरिता येथे विस्तृत भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले (२००२-०५). सदर उत्खनन हे तटबंदीच्या आत पश्चिमेकडे, पूर्वेकडील तटबंदीच्या वर, स्तंभ असलेल्या परिसरात, उत्तरी प्रवेशद्वार व लगतच्या परिसरात आणि तटबंदीच्या बाहेर करण्यात आले. उत्खननात प्राप्त पुराव्यांनुसार आणि कालमापन तिथीनुसार या स्थळाची प्राचीनता इ. स. पू. सहाव्या-सातव्या शतकापर्यंत गेली. या प्राचीन नगराविषयी अनेक नवीन बाबी उघडकीस आल्या. शिशुपालगडचा कालानुक्रमिक इतिहास स्तरशास्त्राप्रमाणे तीन कालखंडांमध्ये अनुक्रमे १) प्रारंभिक ऐतिहासिक काळ (इ. स. पू. आठवे ते  इ. स. पू. चौथे शतक), २) ऐतिहासिक काळ (इ. स. पू. तिसरे ते इ. स. चौथे शतक) आणि ३) उत्तर ऐतिहासिक काळ (इ. स. पाचवे शतक) मध्ये विभागला आहे.

शिशुपालगड येथील स्तंभ असलेल्या परिसराचे उत्खनन (२००८).

प्रारंभिक ऐतिहासिक काळामध्ये लोक उच्च प्रतीची, उत्कृष्ट भाजणीची काळ्या आणि तांबड्या रंगाची मूठ असलेली मृद्भांडी वापरत होते. तटबंदीच्या बाहेरील उत्खननात मातीचा भराव घातलेले तीन वर्तुळाकार आकाराचे दगडी अवशेष प्राप्त झाले. तटबंदीच्या बाहेर घराचे अवशेष प्राप्त झाले आहेत जे तटबंदीच्या आतल्या भागापेक्षा आकाराने मोठे आणि मोकळे आहेत, ज्यामध्ये मृद्भांडी, धातू इत्यादी पुरावशेष प्राप्त झाले. नगराच्या तटबंदीचे निर्माणकार्य इ. स. पाचव्या शतकापूर्वी झाले होते, असे या उत्खननामुळे लक्षात आले.

शिशुपालगडच्या दुसऱ्या ऐतिहासिक कालक्रमात वसाहतीमध्ये बराच बदल दिसून येतो. या काळात, लोकांच्या घरांच्या रचनेमध्ये बदल दिसून येतो. घरबांधणीकरिता पहिल्यांदा भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो आणि छताकरिता भाजलेले कवेलू वापरात आल्याचे पुरावे प्राप्त झाले. या काळात, लोकांच्या आवडीनिवडी मध्येही परिवर्तन दिसून येते. यांमध्ये रूलेटेड, काळी चकाकीयुक्त आणि तांबडी चकाकी असलेल्या मृद्भांड्यांचा वापर, लोकांच्या वैयक्तिक अलंकारामध्ये वृद्धी आणि गतकाळापेक्षा नवीन वस्तू दृष्टिगोचर होतात. सांस्कृतिक स्तर क्रमातील हा बदल शिशुपालगड येथील तत्कालीन काळातील सामाजिक आणि आर्थिक विकास दर्शवतो. महत्त्वाचे म्हणजे याच काळात मौर्य सम्राट अशोक याने कलिंगवर आक्रमण केले होते, परंतु त्याच्या विजयाने शिशुपालगड येथील तत्कालीन परिस्थितीवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. इ. स. पू. पहिल्या शतकातील चेदी नरेश खारवेल याच्या उदयगिरी येथील हाथीगुंफा अभिलेखात वादळाने कमकुवत झालेल्या ‘कलिंगनगरीʼ या राजधानीच्या तटबंदी आणि प्रवेशद्वाराची दुरुस्ती केल्याचे नमूद केले आहे. शिशुपालगडच्या उत्खननांमध्येही तटबंदीच्या पश्चिम आणि उत्तर प्रवेशद्वाराची डागडुजी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे तटबंदीच्या आत उभे असणारे अठरा स्तंभ आणि उत्खननात प्राप्त लगतचे चापाकार स्थापत्य याच कालखंडातील आहे. अशा प्रकारे ‘कलिंगनगरीʼ हे स्थळ आजचे शिशुपालगड असल्याचे भक्कम पुरावे प्राप्त झाले आहेत.

उत्तर ऐतिहासिक काळामध्ये लोकांनी तटबंदीच्या आत उत्तरेकडे वस्ती केल्याचे पुरावे प्राप्त  झाले. प्रथम या काळातील लोकांनी चाक आणि पुष्पाची छाप असलेली मृद्भांडी वापरली व नंतर राखडी रंगाची खोबणीयुक्त नवीन पद्धतीची मृद्भांडी वापरात आणल्याचे प्रमाण प्राप्त झाले. ओडिशाच्या इतर पुरास्थळांमध्ये या राखडी मृद्भांड्यांना मध्ययुगीन कालखंडात समाविष्ट केले जाते. या काळातील स्थापत्य बांधकामाचा कोणताही पुरावा मात्र उत्खननांत आढळला नाही.

उत्खनन आणि सर्वेक्षणांमुळे शिशुपालगड या सुनियोजितपूर्ण नगराच्या आत प्रवेशद्वारापासून काटकोनात छेद देणाऱ्या रस्त्यांची व्यवस्था, राजवाडा, राजतंत्रीय किंवा प्रशासनिक भवनाचे स्थापत्य, सामान्य लोकांची निवासस्थाने, नाणी आणि इतर महत्त्वपूर्ण पुरावे प्राप्त झाले. उत्खननात प्राप्त एकूण पुरावशेषांच्या आधारावर असे दिसून येते की, प्राचीन शिशुपालगड या नगराचा आवाका मोठा होता व नगरात विपुल लोकसंख्या व आर्थिक स्थैर्य होते. शिशुपालगड हे पूर्व भारतातील महत्त्वाचे राजकीय, आर्थिक, व्यापारी आणि क्षेत्रीय केंद्र म्हणून कार्यरत होते. या उत्खननामुळे शिशुपालगड पासून ९ किमी. अंतरावर असलेल्या अशोकाच्या धौली येथील अभिलेखात नमूद ‘तोसलीʼ हे स्थळ शिशुपालगड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इ. स. सहाव्या शतकानंतर येथील वस्तीचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले. येथील वस्ती साधारणतः १.५ किमी. पश्चिमेकडे मंदिर परिसरात स्थानांतरित झाल्याने हे पुरास्थळ ओस पडण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत हे पुरास्थळ भुवनेश्वर शहराचा भाग बनलेले असून अतिक्रमणामुळे सदर स्थळ नष्ट होण्याचा मार्गावर आहे.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...