Friday, December 9, 2022

ओडीशा राज्य माहिती ( भाग ५)

 जगन्नाथ पुरी

 जगन्नाथ पुरी हे हिंदू धर्माचे प्रार्थना स्थळ आहे. जगन्नाथ पुरी याचं वर्णन पृथ्वीवरील स्वर्ग असा केला जातो. इथे भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम नीलमाधव या रूपात अवतार घेतला होता. हे स्थळ हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेच आणि भावनेचं स्थळ आहे. ह्या स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभला असल्यामुळें भारतातील प्राचीन परंपरा आणि संस्कृती मध्ये हे स्थळ खूप महत्त्वाचे आहे.जगन्नाथ मंदिर हे भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अतिशय पवित्र मानले जाते. शिवाय हिंदू धर्माच्या चार धामांपैकी हे एक धाम आहे. भगवान विष्णूची मनोभावे येथे पूजा केली जाते.  हिंदु धर्मातील समजुतीनुसार चारधामापैकी पहिल्या बदरीनाथला भगवान विष्णु सर्वप्रथम गेले आणि तिथे स्नान केले, त्यानंतर ते गुजरातमध्ये द्वारकेला गेले आणि तिथे कपडे बदलले. यानंतर ओडीशातील पुरीला जाउन तिथे त्यांनी भोजन केले आणि शेवटी तामिळनाडुतील रामेश्वरला जाउन विश्रांती घेतली.
जगन्नाथ पुरीचा इतिहास :-
    जगन्नाथ पुरीला हिंदु पुराणानुसार शाक क्षेत्र, शंखक्षेत्र, श्रीक्षेत्र, पुरुषोत्तम क्षेत्र, नीलांचल आणि नीलगिरी अशी नावे आहेत.प्राचीन काळी हा भुभाग उत्कल म्हणुन ओळखला जात होता. इथे महत्वाचे बंदर होते आणि इथून जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, थायलँड आणि इतर देशांशी व्यापार होत होता. हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या जगन्नाथ पुरीला पुराणात श्रीक्षेत्र वा पुरुषोत्तम क्षेत्र असेही म्हटल्या गेले आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा आकार शंखासारखा आहे म्हणून या ठिकाणाला शंख क्षेत्र असेही म्हटले जाते. प्राचीन काळापासून देवता भगवान नीलमाधव यांची पुजा करित होते.नीलांचल पर्वत भुमीमध्ये समाविष्ट झाल्यावर भगवान नीलमाधव यांची मुर्ती या पर्वतावर आणली व इथे स्थापन करुन त्याची पुजा करु लागले. त्यामुळे या ठिकाणाला नीलांचल पर्वत नाव मिळाले. 
      हि कथा स्कंद पुराणात येते. नीलमाधव शबर लोकांचे प्रमुख दैवत बनले. यामुळेच भगवान जगन्नाथांचे रुप असे आदिवासी दैवतांसारखे आहे असे मानले जाते.शबर लोक आपल्या दैवतांच्या मुर्ती लाकडापासून बनवत. जगन्नाथांची नित्य पुजा करण्यासाठी ब्राम्हणांबरोबर शबर लोकही आहेत. जेष्ठ पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा या काळात शबर लोकच भगवान जगन्नाथांचे सर्व पुजाविधी करतात. पुराणातील समजुती प्रमाणे निलीगिरी स्थित मुर्ती पुरुषोत्तमाची असून ते स्वतः भगवान रामाचे रुप आहेत.या पुरुषोत्तम क्षेत्राची देवी विमला असून तीचीहि इथे पुजा होते. उत्तर रामायणानुसार भगवान रामांनी बिभिषणाला इक्ष्वाकु वंशाचे कुलदैवत भगवान जगन्नांथाची आराधना करण्यास सांगितले. यामुळे आज देखील पुरीच्या जगन्नाथ मंदीरात बिभीषणांसाठी पुजा केली जाते. महाभारतातील वनपर्वात या मंदीराचा उल्लेख मिळतो. शबर जातीचा राजा विश्ववसु याने भगवान जगन्नाथांची सर्वप्रथम पुजा केली असा समज आहे. या मंदिरात पुजा करणार्या शबर लोकांना दैतापती असे म्हणतात. विशेष म्हणजे कोणत्याही वैष्णव मंदीरात अशी परंपरा नाही. 
     तसेच या क्षेत्राचा उल्लेख कुर्म पुराण, नारद पुराण, पद्म पुराण यात देखील आला आहे. हे मंदीर वैष्णव पंथाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या पंथाचे संस्थापक चैतन्यप्रभु भगवान जगन्नाथाच्या भक्तित तल्लीन झाले आणि इथे पुरीत अनेक वर्ष राहिले. आदि शंकराचार्यांनी आपल्या भारत यात्रेत पुरीत प्रदीर्घ काळ घालवला. त्यांनी आपल्या तीक्ष्ण बुद्धीने इथल्या बौध्द मठाच्या महंताचा पराभव केला आणि सनातन धर्माचा प्रसार केला. शंकराचार्यांनी इथे गोवर्धन पीठाची स्थापना केली. या पीठाचे प्रमुख म्हणून शंकराचार्यांनी आपलया चार प्रमुख शिष्यांपैकी एक पद्मपदाचार्य यांना पुरी पिठाचे शंकराचार्य म्हणून नेमले. शंकराचार्यांनी गीतेतील पुरुषोत्तम रुप म्हणजे जगन्नाथ अशी मान्यता दिल्यामुळे शंकर किंवा पदमपाद यांच्या मुर्ती जगन्नाथाच्या रत्नसिंहासनात स्थापित केल्या आहेत. मात्र मंदीरात असलेल्या शिलालेखाप्रमाणे राजा दिव्यसिंहदेव द्वितीय ( इ.स. १७६३-१७६८) या काळात त्या दोन मुर्तींना काढून टाकले गेले. पुढे १२ व्या शतकात पुरीमध्ये रामानुजाचार्य यांचे आगमन झाले.त्यांच्या विद्वत्तेच्या प्रभावाने ६०० वर्ष महेश्वर असलेल्या राजा चोलगंगा देव यान वैष्णव धर्म स्विकारला.   
lord 1 im
         श्रीकृष्ण हा अनेक भक्तांचा लाडका देव. श्रीविष्णुचा अवतार आणि भागवत संप्रदायाची आराध्यदेवता. श्रीकृष्णाची पूजा अनेक स्वरूपात भारतात ठिकठिकाणी केली जाते. गोव्यात माशेल गावात तो देवकीचा कृष्ण असतो, तर कर्नाटकातल्या उडूपीला गोकुळातला रांगता बाळकृष्ण. उत्तरप्रदेशातल्या वृंदावनात तो राधेचा सखा असतो तर आपल्या राज्यात अर्थात पंढरपूरला रुक्मिणीचा पती. उज्जैनला सांदिपनी आश्रमात श्रीकृष्ण आपल्याला दिसतो तो सुदाम्यासमवेत, गुरुकुलातला एक विद्यार्थी म्हणून. तामिळनाडूमधल्या ट्रीपलीकेनच्या मंदिरात अर्जुनाचा मित्र, सखा आणि सारथी असा पार्थसारथी असतो तर गुजरातमधल्या द्वारकेला तो असतो द्वारकेचा स्वामी, द्वारकाधीश. जणू आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या नात्यांमध्ये आपण भारतीय श्रीकृष्णाचेच प्रतिबिंब पहात असतो.
   या सर्व नात्यांमधले एक अनोखे नाते म्हणजे श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा ह्या बहीण-भावंडांचे. पुरीच्या मंदिरातला जगन्नाथ आपल्याला दिसतो तो बलरामाचा धाकटा भाऊ आणि सुभद्रेचा थोरला भाऊ. जगन्नाथपुरीचे हे मंदिर म्हणजे कलिंग मंदिरस्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर आत्तापर्यंत १८ वेळा लुटलं गेलं आहे. इतकं लुटून सुद्धा आजही ह्याच्या खजिन्यामध्ये जवळपास १२० किलोग्राम सोनं तर २२० किलोग्रॅमपेक्षा जास्त चांदी आहे. ज्याची किंमत कित्येक कोटी रुपयांमध्ये आहे. ह्याशिवाय अनेक अमूल्य रत्ने ही त्याच्या खजिन्याचा भाग आहेत.
jagannath temple information in marathi
प्रवेशासाठी वेळ: फक्त हिंदूंना प्रवेश: पहाटे ०५.३० ते १५.०० आणि १६.०० ते २२.०० जाण्यासाठी सुयोग्य वेळ आहे सकाळी ०६.०० ते ०७.००
कॅमेरा, मोबाईल, टोप्या, कमरपट्टा, चामड्याची कोणतीही वस्तु निषिद्ध आहे.
अहिंदूंसाठी बाजूच्या इमारतीतील रघुनंदन ग्रंथालयाच्या गच्चीतून सोय केली जाते.
दूरध्वनी: ०६७५२-२२२००१-०२

मुख्य द्वाराचे नाव स्वर्गद्वार असे अर्थपूर्ण आहे. गर्दी होऊं नये म्हणून सावधगिरी म्हणून भक्तांना पटापट दर्शन देऊन ढकलून दूर केले जाते.
मंदिराचा इतिहास:
  सध्याचे मंदिर हे जरी सातव्या शतकात बांधले गेले असले तरी हे मंदिर इ.स.पू. दुसर्‍या शतकामध्येच बांधले गेले होते. तसेच येथे असलेल्या मंदिराची तीन वेळा मोडतोड झाली आहे .असे मानले जाते की, जगन्नाथ पुरी येथील मंदिर बाराव्या शतकात कलिंगचा राजा अनंतवर्मन चोडगंगा आणि अनंग भीमदेव यांनी बांधले.अनंतवर्मन चोडगंगाच्या कारकिर्दीत (१०७८ ते ११४८) मंदिराचे जगमोहन आणि विमान भाग बांधले गेले. त्यानंतर ११९७ मध्ये ओडिसा शासक अनंगा भिमा देव यांनी या मंदिराला सध्याचे स्वरूप दिले.या मंदिरात भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्याचे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मुर्त्या आहेत. या मुर्तींना फक्त डोळे,नाक, आणि तोंड एवढेच अवयव आहेत. दर बारा वर्षांनी या मुर्त्या नवीन तयार केल्या जातात.  राजा आनंग भीम देव याला मंदीराची उभारणी करायला १४ वर्षाचा कालावधी लागला. पुढे १८६३,१९५०,१९६६, आणि १९७७ मध्ये बलभद्र जगन्नाथ आणि सुभद्रा यांच्या काषठ मुर्तींची पुन्रस्थापना केली गेली.
जगन्नाथ अर्चना मंदिरात १५५८ पर्यंत सुरू राहिली. याच वर्षी बंगालचा सेनापती काला पाहाडने ओडिशा वर हल्ला केला आणि मूर्ती आणि मंदिराचे काही भाग नष्ट केले. पूजा बंद केली आणि चिलिका तलावातील एका बेटावर देवतांना गुप्तपणे ठेवण्यात आले. नंतर रामचंद्र देब यांनी खुजडा येथे स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर मंदिर व त्यातील मूर्ती पुनर्स्थापित केल्या.
शीख महाराजा रणजीत सिंहानी या मंदीराला मोठ्या प्रमाणात सुवर्ण दान दिले होते. असे मानले जाते कि हे सुवर्नदान त्यांनी अमृतसरला दान दिलेल्या सोन्यापेक्षा अधिक होते.महाराजा रणजित्सिंहानी त्यांच्या मृत्युपत्रात कोहिनुर हिरा या मंदीराला दान दिला होता. परंतु तोपर्यंत ब्रिटीशांनी पुर्ण पंजाबवर अंमल बसविल्यामुळे महाराजा रणजितंसिंहांची संपत्ती जप्त केली, त्यामुळे कोहीनुर हिरा भगवान जगन्नाथांच्या मुकुटात विराजीत होउ शकला नाही. काही इतिहासकारांच्या मते इथे बौद्ध स्तुप होता आणि त्यामध्ये भगवान बुध्दांचा दात होता. पण सध्या हा दात कँडी, श्रीलंका येथे आहे. सातव्या शतकात बुध्द धर्मातील वज्रयान परंपरेची सुरवात इंद्रभुतीने जगन्नाथ पुरीमधूनच केली असे मानले जाते. यामुळे पुरी पुर्व भारतातील वज्रयान परंपरेचे मोठे केंद्र बनला. 
 
 जगन्नाथ पुरी आणि मराठे :-
        अनेक वर्षे इथे मुघलांनी राज्य केले. इथून मिळणाऱ्या यात्रा कराच्या उत्पन्नामुळे त्यांनी जगन्नाथ पुरीकडे वक्रदृष्टी फिरवली नाही. पण कट्टर धर्मवेडा औरंगजेब जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्याने हिंदूधर्म स्थळांची विटंबना करण्यास सुरवात केली. त्याने आपल्या ओरिसामधल्या अधिकाऱ्यांना जगन्नाथाच मंदिर फोडायचा फर्मान काढला होता. पण कसंबसं तिथल्या पुजाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना लाच देऊन मंदिर वाचवलं.याच काळात औरंगजेब बादशाह दक्षिणेत मराठ्यांशी युद्धाच्या धामधुमीत गुंतला होता त्यामुळे त्याच त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष झालं. यामुळे अप्रत्यक्षरित्या मराठ्यांमुळे जगन्नाथ पुरीचं रक्षण झालं.पण औरंगजेबाच्या मृत्यू पर्यंत हे मंदिर बंदच राहिलं.
            पुढे शंभूपुत्र शाहू महाराज छत्रपती बनले आणि मराठा राजसत्तेला स्थैर्य आलं. पेशव्यांनी महाराष्ट्रात कारभाराला घडी बसवली. याच स्थैर्यामुळे बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबाहेर मराठी घोडे दौडू लागले.होळकर शिंदे अशा पराक्रमी सरदारांच्या मुळे संपूर्ण भारतभरात मराठ्यांचा वचक निर्माण झाला. रघुनाथराव पेशव्याने तर अटकेपार झेंडा लावला.नागपूरच्या बेरार प्रांतात रघुजी भोसलेंचा उदय झाला होता. याच काळात शेजारच्या बंगाल प्रांतामध्ये मात्र परिस्थिती गोंधळाची होती. तिथला नवाब अलीवर्दी खान याच्यावर त्याचे सरदार नाखूष होते. अशाच एका नाखूष सरदाराने मीर हबिबने नागपूरच्या भोसल्यांना अवतान धाडले. सुरवातीला रघुजी भोसल्यांनी भास्कर पंडितच्या नेतृत्वाखाली सैन्य देऊन बंगाल प्रांतात पाठवलं. भास्कर पंडित आणि त्याच्या सैन्याने तिथल्या मुघल व्यापाऱ्यांची लूट आणली. तेव्हा ओरिसा बंगाल प्रांताचाच भाग होता.जवळपास १० वर्षे मराठ्यांच्या धाडी बंगाल आणि ओरिसा मध्ये सुरू असायच्या.मराठा सैनिकांची दहशत एवढी मोठी होती की तिथल्या आया आपल्या मुलांना झोप नाही तर मराठा येतील या कथा सांगायच्या.
        रघुजी भोसलेंनी बंगालच्या नवबाला एवढे जेरीस आणले की अखेर त्याने मराठ्यांशी तह केला आणि ओरिसाचा हिस्सा त्यांच्या कडे सोपवला. हे वर्ष होत १७५१. जवळपास दीडशे वर्षांनी ओरिसामधली परकीय राजवट संपुष्टात आली होती.मराठ्यांच्या हातात सत्ता आल्यावर अनेक बदल घडवून आणले. अनिल धीर या अभ्यासकांच्या मते मराठ्यांनी ओरिसाच्या राजकारभाराची घडी बसवली. बऱ्याच काळानंतर या भागात स्थैर्य व शांतता लाभली होती. रघुजी भोसलेंनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. जगन्नाथपुरी मंदिराकडे विशेष लक्ष दिले. या मंदिराला दानधर्म केला. इथल्या पूजेसाठी जमिनी दान दिल्या. रघुजी भोसले यांची आई चिमाबाई हिने देवाला मोहनभोग चढवण्याच्या परंपरेला सुरवात केली.मराठ्यांनी ब्रजदेव गोस्वामीना इथला मठ प्रमुख बनवलं. एका मराठी गोसावीने सोन्या चांदीच्या मूर्ती दान दिल्या.
पुरीचे जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेचे मुख्य देवस्थान आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी कृष्णा सोबतच  त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा देखील  पूजा करतात. मंदिराच्या गर्भगृहात भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत, ज्या दर 12 वर्षांनी बदलल्या जातात.
रघुजी भोसलेंनी जगन्नाथपुरीची रथयात्रा धुमधडाक्यात साजरी करण्यास सुरवात केली. या यात्रेसाठी मोठा निधी दिला जाऊ लागला. यात्राकरातून येणारा पैसाही मंदिराच्या विकासासाठी वापरला जात होता.
       रघुजी भोसलेंच्या नंतर आलेल्या मराठा सुभेदारांनी देखील जगन्नाथ मंदिराची व्यवस्था चोख ठेवली. इतर अनेक जमीनदारांना राजा महाराजांना जगन्नाथाला जमिनी दान देण्यास भाग पाडलं. मराठ्यांनी कोणार्क मधून अरुण स्तंभ उखडून जगन्नाथ पुरीच्या मंदिरात उभारला. अस म्हणतात की, जगन्नाथ मंदिरातील दुसरी महत्वाची झुलना ही यात्रा मराठ्यांनी सुरू केली. या यात्रांना भारतभरातून भाविक गर्दी लागले याच प्रमुख कारण म्हणजे इथे असलेल मराठ्यांच राज्य.त्यांच्या पराक्रमाने आपल्या धार्मिक कार्याला संरक्षण आहे ही समजूत दृढ झाली.मराठ्यांमुळे कोणत्याही धर्मांध राजसत्तेला जगन्नाथ मंदिराकडे पाहण्याची टाप नव्हती. फक्त मंदिरच नाही तर मराठ्यांनी संपूर्ण ओरिसाचा विकास घडवून आणला. पुरीला बंगालशी जोडणाऱ्या जगन्नाथ सडकची निर्मिती केली.राजाराम पंडित आणि सदाशिवराव पंडित अशा अनेक सुभेदारांनी अनेक ठिकाणी रस्ते, धर्मशाळा,विहिरी उभारल्या. यात्रेकरूंना सोईसुविधा बनवल्या. करांमध्ये सुधारणा केली, शेतीवर विशेष लक्ष पुरवले. जमिनीचे रेकॉर्ड बनवले.मराठ्यांनी बनवलेल्या सैनिकांच्या बराकी आजही ओरिसामध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळतात.
       आज अनेकदा बंगाली इतिहासकार मराठ्यांच लुटारू म्हणून चित्र रंगवतात पण याच मराठी राजसत्तेने ओरिसाला आपल्या पायावर उभे केले होते हा इतिहास त्यांच्या नजरेत येत नाही.पुढे दुसऱ्या रघुजी भोसलेंनी इंग्रजांशी करार करून या प्रांतावरील हक्क गमावला. मराठ्यांचे राज्य संपुष्टात येताच सर्व प्रथम इंग्रजांनी जगन्नाथाच्या मंदिरावर हल्ला करून तिथला खजिना लुटला.
 
 विसाव्या शतकाच्या पुर्वाधात काढलेले जगन्नाथांचे पट्टचित्र
 
  १८८० - १९१० चे बलराम, सुभद्रा तसेच जगन्नाथ, चित्र
 
जगन्नाथ मंदिर रहस्या कथा:
      चारण परंपरेमध्ये असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी आपल्या देहाचा त्याग केल्यावर, त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.त्यावेळी शरीराचा काही भाग सोडून उरलेला भाग पंचतत्वात विलीन झाला. तसेच त्यांचे ह्र्दय जिवंतच होते. भगवान द्वारकाधीश यांचे जळलेले मृतदेह पुरीच्या समुद्र किनार्‍यावर आले होते. अग्नि दिल्यावर समुद्राला तुफान आलं आणि त्यामुळे तिन्ही देह अर्ध जळलेल्या स्वरूपात किनार्‍यावर आले त्याच्यानंतर पुरीच्या राजाने ह्या देहांना वेगवेगळा रथामध्ये ठेवलं (कारण जर ते जिवंत असते‌ तर एकाच रथामध्ये ठेवण्यात आला असत) त्यानंतर संपूर्ण शहरातील लोकांनी रथाला खेचायला सुरवात केली आणि शेवटी मृतदेहा सोबत वाहत आलेल्या लाकडाची एक पेटी बनवली आणि ती पृथ्वीला समर्पित केली.
कथा काय आहे ?
जगन्नाथ पुरीसंदर्भात काही कथा सांगितल्या जातात. त्याचा आपण आढावा घेउ.
   सत्य युगात इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता. हा राजा भगवान विष्णूंचा परम भक्त होता. आपल्या आराध्य दैवताचं एक मंदिर बांधावं अशी त्याची इच्छा होती.भगवान विष्णूंच्या मूर्तीचा आकार कसा असावा? याचं ज्ञान राजाकडे नव्हतं. हे ज्ञान मिळवण्यासाठी त्याने ब्रह्माची उपासना केली. काही काळ भक्ताची परीक्षा घेऊन देव प्रसन्न झाले. पण, त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ब्रह्माजींनी इंद्रद्युम्न राजाला भगवान विष्णूंची उपासना करून त्यांच्याकडूनच मंदिरासाठी अपेक्षित असलेल्या मूर्तीची माहिती घेण्याचा सल्ला दिला. इंद्रद्युम्न राजाने भगवान विष्णूंची आराधना केली. कालांतराने भगवान विष्णू हे इंद्रद्युम्न राजाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी राजाला सांगितलं की, “तू बंकामूहाना नावाच्या जागेला भेट दे आणि तिथून कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडाचा ओंडका शोधून आण आणि त्यापासून माझी मूर्ती तयार कर.”
vishnu 1 im
       इंद्रद्युम्न राजाला झालेल्या दृष्टांता नंतर तो बंकामूहाना या जागेवर गेला आणि तो लाकडाचा ओंडका घेऊन आला. पण, त्या लाकडापासून मूर्ती कोण साकारणार ? हा राजासमोर मोठा प्रश्नच होता. त्याने कित्येक कारागिरांवर ही कामगिरी सोपवली, पण कोणालाच ते काम जमत नव्हतं.मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न करत असतांना काही कारागिरांची अवजारं तुटली. भगवान विष्णूंची मनासारखी मुर्ती तयार होत नसल्याने इंद्रद्युम्न राजा नाराज झाला होता. हे बघून देवांचे ‘आर्किटेक्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान ‘विश्वकर्मा’ तिथे प्रसन्न झाले आणि त्यांनी या कामासाठी राजासमोर ‘अनंत महाराणा’ या कारागिराला हजर केलं.भगवान विश्वकर्मा स्वतः या कामावर लक्ष ठेवून होते. त्यांनी मंदिराची रचना करून दिली. पण, मुर्ती तयार करत असतांना त्यांनी इंद्रद्युम्न राजासमोर ही अट ठेवली होती की, “आम्ही मुर्त्या तयार करून देऊ. पण, आमचं काम होईपर्यंत माझ्या परवानगी शिवाय मंदिराचं दार कोणीही उघडायचं नाही. आणि तसं झालं तर आम्ही त्या क्षणी जितकं काम झालं आहे ते सोडून अदृश्य होऊ.”
      काही दिवस हे काम सुरू होतं. काम संपत नव्हतं. भगवान विश्वकर्मा यांनी या कामासाठी कोणतीच कालमर्यादा निश्चित केली नव्हती. राजा आपल्या लाडक्या देवाची मुर्ती बघण्यासाठी अधीर झाला होता. एक दिवस न राहून त्याने त्या मंदिराचं दार उघडलं. दार उघडताच राजाला जगन्नाथ, बलभद्र आणि सौभद्र यांच्या तीन अर्धाकृती मुर्ती दिसल्या. इंद्रद्युम्न राजाला भगवान विश्वकर्मा यांची अट न पाळण्याचा पश्चात्ताप झाला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
        इंद्रद्युम्न राजाने परत एकदा ब्रह्नदेवाची उपासना केली आणि त्यांच्याकडे भगवान विश्वकर्मा यांची तक्रार केली. ब्रह्माजींनी तयार झालेल्या मूर्त्यांची माहिती भगवान विष्णूला दिली.भगवान विष्णूला त्या तयार झालेल्या मुर्ती आवडल्या त्यांनी ब्रह्माजींना याच मूर्त्यांची आपण स्वहस्ते प्रतिष्ठापना करावी असे आदेश दिले. ब्रह्मदेवांनी ही माहिती इंद्रद्युम्न राजाला दिली आणि ते मंदिराच्या पूजेच्या, लोकार्पणाच्या दिवशी स्वतः हजर राहिले.इंद्रद्युम्न राजाच्या मनात स्वप्नात दिसलेलं मंदिर पूर्ण झाल्याची भावना आली आणि तो धन्य झाला. आपण इच्छा व्यक्त केलेलं हे मंदिर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तयार झालं आहे याचं राजाला समाधान वाटलं.
        ब्रह्मदेवाने इंद्रद्युम्न राजाला आश्वस्त केलं की, भगवान विष्णूंचे मोठे डोळे असलेल्या या मूर्ती जगभरात लोकांना आवडतील.अर्धवट किंवा भंगलेल्या मुर्त्यांची पूजा करणं हे हिंदू धर्मात जरी अशुभ मानलं जात असलं तरीही या मुर्ती साक्षात भगवान विष्णूंना आवडलेल्या असल्याने त्यांची पूजा करावी असं हिंदू ग्रंथांमध्ये लिहिण्यात आलं आहे. हिंदू धर्मात मान्यता असलेल्या चार धामांपैकी जगन्नाथ पुरी हे सर्वात महत्वाचं धाम म्हणून मानलं जातं.
 आणखी एका कथेनुसार असे सांगितले जाते कि,राजा इंद्रद्युम्न हा माळव्याचा राजा होता, त्याच्या वडिलांचे नाव भरत आणि आईचे नाव सुमती होते. इंद्रद्युम्न राजाला स्वप्नात जगन्नाथाचे दर्शन झाले व त्यानंतर राजाने अनेक मोठे यज्ञ केले आणि तलाव बांधला. एका रात्री भगवान विष्णूंनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, की निलांचल पर्वतातील एका गुहेत माझी एक मूर्ती आहे, तिचे नाव नीलमाधव आहे. तुम्ही मंदिर बांधा आणि त्यात माझी ही मूर्ती बसवा. राजाने आपल्या नोकरांना नीलांचल पर्वताच्या शोधात पाठवले. त्यापैकी एक ब्राह्मण विद्यापती होता. विद्यापतीने ऐकले होते, की सबर कुळातील लोक नीलमाधवची पूजा करतात आणि त्यांनी ही मूर्ती निलांचल पर्वताच्या गुहेत लपवून ठेवली होती. सबर कुळाचा प्रमुख हा नीलमाधवाचा उपासक आहे आणि त्याने ही मूर्ती गुहेत लपवून ठेवली होती हेही त्याला माहीत होते. हुशार विद्यापतीने सरदाराच्या मुलीशी लग्न केले व शेवटी पत्नीच्या माध्यमातून तो नीलमाधवच्या गुहेत पोहोचू शकला. अत्यंत शिताफीने त्याने मूर्ती चोरून राजाकडे आणली.
      आपल्या प्रिय देवतेची मूर्ती चोरीला गेल्याने विश्ववसुला खूप दुःख झाले. आपल्या भक्ताच्या दुःखाने भगवानही दुःखी झाले. भगवान गुहेत परतले, परंतु त्याच वेळी राज इंद्रद्युम्नाला वचन दिले, की तो एक दिवस त्याच्याकडे परत येईल, जर तो त्याच्यासाठी एक मोठे मंदिर बांधेल. राजाने मंदिर बांधले आणि भगवान विष्णूंना मंदिरात बसण्यास सांगितले. देव म्हणाले, की माझी मूर्ती बनवण्यासाठी समुद्रात तरंगणाऱ्या झाडाचा एक मोठा तुकडा आण, जो समुद्रात पोहत द्वारकेहून पुरीला येत आहे. राजाच्या सेवकांना त्या झाडाचा तुकडा सापडला, पण सर्व लोक मिळून ते झाड उचलू शकले नाहीत. तेव्हा राजाला समजले, की नीलमाधवचा अनन्य भक्त, सबर कुळाचा प्रमुख विश्ववसुची मदत घ्यावी लागेल. म्हणून त्याने त्याची मदत घेतली आणि विश्ववसूने अगदी सहजरित्या जड लाकूड उचलून मंदिरात आणले. हे पाहून तिथे जमलेले सगळेच आश्चर्यचकित झाले.
      आता देवाची मूर्ती लाकडापासून बनवण्याची पाळी होती. राजाच्या कारागिरांनी खूप प्रयत्न केले पण कोणीही लाकडात छिन्नीने तासु शकले नाही. तेव्हा तिन्ही लोकांचे कुशल कारागीर भगवान विश्वकर्मा वृद्धाच्या वेशात आले. त्याने राजाला सांगितले, की आपण नीलमाधवची मूर्ती बनवू शकतो. परंतू २१ दिवसात मी ही मूर्ती एकटाच बनवणार अशी अटही त्यांनी घातली तसेच त्यांना मूर्ती बनवताना कोणीही पाहणार नाही. या सर्व अटी मान्य करण्यात आल्या व मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरूवात झाली. लोकांना करवतीचे, छिन्नीचे, हातोड्याचे आवाज ऐकू येत होते. परंतू थोड्या दिवसांनी हे सगळे आवाज बंद झाले. त्यामुळे राजा इंद्रद्युम्नची राणी गुंडीचा स्वतःला रोखू शकली नाही. ती दाराजवळ गेली. तिथे गेल्यावर तिला कोणताच आवाज आला नाही. ती घाबरली. तिला वाटले म्हातारा कारागीर मेला. तिने राजाला याची माहिती दिली. आतून आवाज येत नव्हता त्यामुळे राजालाही तसेच वाटले. सर्व परिस्थिती आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून राजाने खोलीचा दरवाजा उघडण्याचा आदेश दिला.
     खोली उघडली असता म्हातारा बेपत्ता होता आणि त्यामध्ये तीन अपूर्ण मूर्ती पडलेल्या आढळल्या. त्यामध्ये भगवान नीलमाधव आणि त्यांच्या भावाचे हात लहान होते, परंतु त्यांचे पाय नव्हते, तर सुभद्राचे हात आणि पाय अजिबात बनलेले नव्हते. देवाची इच्छा मानून राजाने या अपूर्ण मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत तिन्ही भावंडे या रूपात अस्तित्वात आहेत आणि अशाप्रकारे जगन्नाथ मंदिर स्थापन झाले.

jagannath puri mandir story and history in hindi

 मंदिर आणि पुरीचा समुद्र :-
एका पुराणकथेनुसार असं म्हटलं जातं जेव्हा जगन्नाथ मंदिराची स्थापना झाली तेव्हा‌ प्रत्येक भक्तांची देवाचं दर्शन घेण्याची इच्छा‌ होती. असाचं समुद्र देखील एक भगवान जगन्नाथ यांचा भक्त होता. त्यामुळे समुद्राने जगन्नाथ मंदिराला तीन चार वेळा भेट दिली आणि त्यामुळे मंदिराचा नुकसान व्हायचं. म्हणूनच एकदा भगवान जगन्नाथ यांनी भक्त हनुमान यांना समुद्रावर लक्ष ठेवायला पाठवलं.
        तेव्हा हनुमान यांनी समुद्राला बेडींनी बांधून ठेवलं तेव्हा समुद्राने हनुमानाला विचारलं तुम्ही पण तर त्यांचे भक्त आहात तुम्हाला नाही होत का इच्छा त्यांनच दर्शन करण्याची. तेव्हा हनुमान यांनी भगवान जगन्नाथ यांना भेट देण्याचं ठरवलं तेव्हा हनुमान यांच्या सोबत समुद्र देखील भेट देण्यासाठी आले. हे दोघं बेडीने बांधले असल्यामुळे हनुमान‌ जेव्हा जेव्हा भगवान जगन्नाथ यांनाच दर्शनासाठी यायचे तेव्हा तेव्हा समुद्र‌ सुद्धा त्यांच्या सोबत जायचा.‌ यामुळे मंदिराचे नेहमीच नुकसान व्हायचं त्याचमुळे भगवान जगन्नाथ यांनी हनुमान आणि समुद्र‌ दोघांना स्वर्ण बेडीने बांधून ठेवलं आणि हेच कारण आहे ज्यामुळे जगन्नाथ पुरी येथील समुद्र नेहमी शांत असतो.
    
मंदिर वास्तुकला:
पुरीचे हे मंदिर अगदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या नीलाचल पर्वत नामक टेकडीवर स्थित असून मंदिराच्या महाद्वारापुढे आठ मीटर उंचीचा काळ्या पाषाणाचा अरुणस्तंभ आहे. तिथल्या एका पुजार्‍याने सांगितलेल्या माहितीवरून हा स्तंभ आधी कोनार्कच्या सुर्यमंदीरापाशी होता. अठराव्या शतकात मराठ्यांनी आपल्या एका ओरीसास्वारी दरम्यान हा क्लोराईटने बनलेला अरुणस्तंभ कोनार्कहून आणून पुरीला जगन्नाथाच्या दारात उभा केला म्हणे. असे म्हणतात की या स्तंभावरील अरुणाची मुर्ती अगदी श्री जगन्नाथाच्या मंदीरातील मुळ मुर्तीच्या पातळीत येते. ...
 मंदिराचे चार लाख चौरस फुटांचे प्रचंड क्षेत्रफळ चारी बाजुंनी सहा मीटर उंचीच्या दगडी तटबंदीने वेढलेले आहे. पूर्वेकडील तटबंदी १९५ मी. तर दक्षिणेकडील तटबंदी ८० मी. लांब आहे. या तटबंदीच्या आतील भागात आणखी एक तटबंदी आहे आणि त्यानंतर आत मुख्य मंदिर आहे.हे मंदिर एकुण ४००००० चौरस फुट आहे.या मंदिराची उंची २१४ फुट आहे.म़दिरा सभोवती चौकार भिंती आहेत. हे मंदिर भारताच भव्य स्मारकांपैकी एक आहे. कलिंग शैलीतील मंदिराच्या आर्किटेक्चर आणि हस्तकला यांचा आश्चर्यकारक वापर करून हे मंदिर उभारले गेले आहे. मुख्य मंदिर वक्र रेखीय आहे ज्याचा शीर्षस्थानी विष्णूंचे श्री सुदर्शन चक्र सुशोभित केलेले आहेत. त्याला नीलचक्र असेही म्हणतात. हे अष्टधातुने बनवलेले आहेत,आणि अतीशय पवित्र मानले जातात. मंदिराची मुख्य रचना २१४ फूट म्हणजेच ६५ मीटर उंच दगडी व्यासपीठावर बांधली गेली आहे.तटाला चारी दिशांनी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यातले पूर्वेकडील प्रवेशद्वार सिंहद्वार म्हणून ओळखले जाते. हेच ते महाद्वार. ह्यातून प्रवेश करून अनेक पायऱ्या चढून गेलो की दुसरी एक तटबंदी लागते. या तटबंदीच्या आत मुख्य मंदिर समूह आहे. देवालयाच्या आवारात जगन्नाथाशिवाय अनेक देवतांची मिळून १२० मंदिरे आहेत. त्यांत तेरा शिवमंदिरे असून एक सूर्यमंदिरही आहे.मुख्य प्रवेशद्वार समोरुन एक भव्य सोळा बाजू असलेला अखंड स्तंभ उभा आहे. ह्या प्रवेशद्वाराच रक्षण दोन सिंहांनी केले आहे. 
ओडिशा (Odisha) की प्रसिद्ध जगन्नाथपुरी की रथ यात्रा (Rath Yatra) 1 जुलाई को निकलेगी. यात्रा के लिए तैयारियों जोरों पर है.भगवान जगन्नाथ (Lord Jagannath), भाई बलभद्र और बहन सुभद्रा के रथ को अंतिम रूप दिया जा रहा है. रथ यात्रा के मौके पर देश-दुनिया के लोग यहां पहुंचते हैं और इसमें शामिल होते हैं. दुनियाभर में जगन्‍नाथ मंदिर जितना प्रसिद्ध है, उतने ही चर्चे इसके उन रहस्‍यों के भी होते हैं, जिनका जवाब विज्ञान भी नहीं ढूंढ पाया है. जानिए इस मंदिर से जुड़े 5 दिलचस्‍प रहस्‍य…
 
   कलिंग स्थापत्य शैलीच्या संकेतांनुसार मंदिराचे चार स्वतंत्र भाग आहेत. ते म्हणजे सर्वांत बाहेरचा भोगमंडप, त्यानंतरचा नृत्यमंडप, त्या नंतरचा जगमोहन किंवा भव्य सभामंडप आणि देऊळ म्हणजे गर्भगृह. गर्भगृहाच्या भिंतीवर ६१ मीटर उंचीचे खास ओडिसी शैलीचे उंच निमुळते शिखर असून त्यावर आमलक आहे. आमलकावर गरुडध्वज व सुदर्शनचक्र बसवलेले आहे. शिखरावर व मंदिराच्या भिंतीवरील देवकोष्ठातून विविध प्रकारच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांत काही कामशिल्पेही आहेत. मंदिर अत्यंत सुरेख आहे पण आत कायम गर्दी असल्यामुळे शिल्पे नीट निरखून बघता येत नाहीत. विशेष म्हणजे ऐन समुद्रकिनाऱ्यावर मंदिर असूनदेखील मंदिराच्या आवारात कुठेही समुद्राची गाज ऐकू येत नाही.मुख्य दैवतांची मूर्ती आतमध्ये गर्भगृहात स्थापित केल्या गेल्या आहेत. आजूबाजूच्या इतर भागांपेक्षा हा भाग अधिक प्रभावी आहे. मंदिरांची पिरामिड आकार छप्पर आणि त्यालगतचे मंडप अटा्लीकारुपी असून उंच आहेत. मुख्य इमारत २० फूट उंचीची आहे. तर दुसरी इमारत मंदिराला जोडलेली आहे.
 
  जगन्नाथ मंदीराचा १८९० मधील फोटो
 

 
  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याकडे असलेले १८९० च्या दशकातील पूर्णो चंद्र मुखर्जी यांनी घेतलेले पुरी के जगन्नाथ मंदिराचे छायाचित्र
  कोणार्क मंदिराला दर्यावर्दी लोक ब्लॅक पॅगोडा म्हणत तर पुरीच्या मंदिराला म्हणत व्हाईट पॅगोडा. म्हणजे दोन्ही मंदिरे समुद्रातून आता दिसतात की नाही ठाऊक नाही. नसल्यास शेदोनशे वर्षापूर्वी निदान शिखरे तरी दिसत असावीत आणि परिसरातल्या दर्यावर्दींना त्यांचा दिशादर्शनासाठी उपयोग होत असावा. अगदी अलीकडच्या काळापर्यंत संपूर्ण देवालय पांढर्‍या चुन्याने आच्छादित होते. युरोपियन दर्यावर्दी जसे कोणार्कला ब्लॅक पॅगोडा म्हणत तसे पुरीच्या देवालयाला व्हाईट पॅगोडा म्हणत. पवित्रातील पवित्र अशा या देवालयाला कोठलेच कोरीव काम वा चित्रे नसल्यामुळे उदिशातील कोरीवकामाच्या समृद्ध परंपरेचा स्पर्शही न झालेला साधा पृष्ठभाग पाहून दीर्घकाळपर्यंत संशोधक कोड्यात पडत असत. अखेर हे कोडे १९७५ मध्ये सुटले. जेव्हा पुराणवस्तु शास्त्रज्ञांनी पृष्ठभागावरचा पांढरा चुना काढून टाकायला सुरुवात केली तसतसे त्यांना उदिशातील कोरीवकामाच्या समृद्ध परंपरेतील सर्वोत्कृष्ट शिल्पकलेच्या मंदीरस्थापत्याला आव्हान देणारे कोरीवकाम केलेली कलाकृती दिसून आली.

जगन्नाथपुरी मंदीर

जगन्नाथपुरी मंदीर

  १८व्या शतकातील शासकानीं असे चुनालेपन करण्यामागे तर्काला अनुसरून एकच कारण दिसते ते म्हणजे समुद्राच्या खार्‍या हवेपासून मंदिराच्या कोरीवकामाचे रक्षण करणे. त्यानंतरच्या शासकांनी तीच प्रथा चालू ठेवली असावी. जुना चुन्याचा लेप काढण्याचे काम चालू असतांनाच पुराणवस्तूशास्त्रज्ञ बांधकामातील गंजलेल्या लोखंडी सळया देखील बदलत आहेत आणि तुटकेफुटके दगडी भागही बदलत आहेत. शेवटी हे मंदीर यानंतर शतकानुशतके टिकावे यासाठी एक पातळ पारदर्शक थर चढवण्यात येत आहे.
 दर बारा वर्षानी नवीन मुर्ती घडवल्या जातात :-
          ज्यावर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्यावर्षी जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती घडवल्या जातात. मूर्तींना ’ कलेवर’ असा शब्द वापरतात. नवीन मूर्ती म्हणजे नवकलेवर ( नबकलेबर). अधिक आषाढ दर आठ, बारा किंवा अठरा वर्षांनी येतो. नवीन मूर्ती बनवण्याचाही एक ठरलेला विधी आहे. विशिष्ट लक्षणं असलेलं ( रंग, फांद्यांची संख्या, खोडावरची चिन्हं इत्यादी) कडुनिंबाचं झाड त्या त्या मूर्तीसाठी निवडलं जातं. त्या लाकडाला ’ दारु ब्रह्म’ म्हणतात. दारु म्हणजे लाकूड. ते झाड प्रथम सोन्याच्या, नंतर चांदीच्या आणि शेवटी लोखंडी कुर्हाडीने तोडतात. वाजतगाजत ही लाकडं मंदिराच्या परिसरात आणतात. त्यांच्या मूर्ती घडवतात. जुन्या मूर्तींसमोर या नव्या मूर्ती ठेवतात आणि त्यांना रंगरंगोटी केली जाते. हा विधी ’ अनवसर’ म्हणून ओळखला जातो. नवीन मूर्तींमधे जुन्या मूर्तींमधला प्राण काढून घालण्याचा विधी डोळे बांधून केला जातो असं म्हणतात. जुनी मुर्ती बदलून नवीन मुर्ती स्थापित करताना एक गोष्ट मात्र तशीच असते, ते म्हणजे ब्रम्ह पदार्थ ! मुर्ती बदलताना या ब्रम्हपदार्थाला जुन्या मुर्तीतून काढून नवीन मुर्तीत स्थापित केले जाते. हे करणार्‍या पुजार्‍यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा डोळे बंद करुन हा ब्रम्ह पदार्थ नवीन मुर्तीत घातला जातो, तेव्हा काहीतरी जिवंत वस्तु असावी असा आभास होतो. हा ब्रम्ह पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे अस्तित्व मानले जाते. अर्थातच हा ब्रम्ह पदार्थ आजअखेर कोणीही पाहिला नाही.
 
 जुन्या मूर्तींना ’ कैवल्य वैकुंठात' नेतात, म्हणजेच स्मशानात. तिथे त्यांना एका कूपात ठेवून वरून माती घातली जाते. ’ वासांसि जीर्णानि यथा विहाय...’
   इरावती कर्व्यांनी परिपूर्तीमधल्या ’ नवकलेवर’ या कथेत/ लेखात हा सगळा विधी वर्णन केला आहे. कलेवर हा शब्द, प्राण काढून नवीन कलेवरात घालण्याची पद्धत, जुन्या मूर्तींना पाण्यात विसर्जित न करता मातीखाली पाठवणं हे सगळं गूढ वाटतं. शिवाय काही अंधश्रद्धाही या सर्वाशी निगडित आहेत. त्याही पुढे जाऊन त्यांनी जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे होणार्या हस्तांतरणाशी याचा संबंध जोडला आहे. जगात रोज हा नवकलेवराचा उत्सव चालू असतो. कीटकांमधे जुन्या आणि नव्या कलेवरांची भेटच होत नाही. अंडी घालून पतंगाची मादी मरून जाते. उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांवरच्या प्राण्यांमध्ये मात्र हा ’ अनवसर’ काळ बराच मोठा असतो. कारण आचार-विचारांचा, संस्कृतीचा आत्मा नवीन कलेवरांमध्ये ओतायचा असतो. हे काम झालं की मात्र सन्मानाने निवृत्त होणंच श्रेयस्कर असतं. तसे जे निवृत्त होत नाहीत, घरात काय, बाहेर काय, सत्तेला चिकटून राहतात, त्यांना शेवटी अपमान, अवहेलना सहन करावी लागते. असा हा एवढा व्यापक विचार सांगणारी ही कथा मनावर वेगळाच परिणाम करून जाते. 
 मंदिर की रसोई से जुड़ा एक रहस्‍य है. रसोई में भगवान का प्रसाद बनाने के लिए मिट्टी के बर्तनों का प्रयोग किया जाता है. ये बर्तन एक के ऊपर एक रखे जाते हैं. चौंकाने वाली बात यह है कि सबसे ऊपर रखे बर्तन में मौजूद पकवान सबसे पहले पक जाता है. मंदिर में कितने भी भक्‍त आए प्रसान न तो कम पड़ता और न ही खत्‍म होता है. आज भी प्रसाद के पकने की गुत्‍थी को समझा नहीं जा सका है.
 
 भगवान जगन्नाथजींची मूर्ती आणि त्यांच्या मंदिरावर फडकणारा ध्वज यांसारख्या प्रसादासाठी तयार केलेले स्वयंपाकघर ही आश्चर्यकारक आहे. या पवित्र स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथजींचा सर्व प्रसाद मातीच्या भांड्यांमध्ये तयार केला जातो, ज्यासाठी सात भांडी एकमेकांच्या वर ठेवली जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रसादाचे सर्वात वरचे भांडे आधी शिजते आणि खालचे भांडे सर्वात शेवटी शिजवले जाते.
जगन्नाथ पुरी किचन
जगन्नाथ मंदिरात पंचामृताभिषेक, अग्निपूजा, महापूजा, महानैवेद्य, वस्त्रालंकारादी राजभोग इ. कार्यक्रम अहोरात्र चालू असतात.  मंदिरात बनवला जाणारा प्रसाद, म्हणजेच ’ भोग’ हा एक स्वतंत्रच विषय आहे. मातीच्या भांड्यांमधून भात आणि कडधान्याचा हा प्रसाद प्रचंड प्रमाणात रोज शिजवला जातो. पुरीला रोज सरासरी चार हजार भाविक भेट देतात.  जगन्नाथ मंदिराचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे येथील प्रचंड स्वयंपाकघर. या विशाल स्वयंपाकघरात ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० सहाय्यक श्री जगन्नाथ आणि इतर देवतांना रोज अर्पण करण्यात येणारा महाभोग तयार करण्याचे काम करतात.हे स्वयंपाकघर भारतातील सर्वात मोठं स्वयंपाकघर म्हणून देखील ओळखल जात.हिंदू पौराणिक कथांमध्ये अन्न वाया घालवणे हे एक वाईट लक्षण मानले जाते. मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद शिजवण्यासाठी सात भांडी एकमेकांच्या वर ठेवल्या जातात आणि हा प्रसाद मातीच्या भांड्यात लाकडावर शिजविला ​​जातो. अशाप्रकारे वैज्ञानिकदृष्ट्या सर्वात खालच्या भांड्याचे अन्न प्रथम शिजवले पाहिजे, तर जगन्नाथ पुरीमध्ये, सर्वात वरच्या भागाचे अन्न, उलट, आधी शिजवले जाते.
जगन्नाथ पुरी रथयात्रा :
           जगन्नाथपुरीला एक अस्पष्ट गूढतेचं वलय आहे. मंदिरात जगन्नाथ ( श्रीकृष्ण), बलभद्र ( बलराम) आणि सुभद्रा या तीन देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती दगडी किंवा धातूच्या नसून लाकडी असतात. दरवर्षी आषाढात प्रचंड मोठ्या लाकडी रथांतून त्यांची यात्रा निघते.  जगन्नाथ पुरी हे ओडिसा मधील एक श्रीकृष्णाच मंदिर आहे. त्याच्यामध्ये श्री कृष्णाच जगन्नाथ ह्या अवताराची पूजा केली जाते. या मंदिरामध्ये भरणारी रथयात्रा भाविकांना आकर्षित करते.सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू यांच्या एका अवतारात त्यांनी जगन्नाथ यांचं रूप धारण केलं होतं, तेव्हा त्यांना बलभद्र नावाचा भाऊ आणि सुभद्रा नावाची बहीण होती. जगन्नाथ पुरीची यात्रा ही तीन भावांची असते. देव जगन्नाथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचं प्रतीक आहे हे अशी देखील मान्यता आहे.जगन्नाथाची रथयात्रा ही जगप्रसिध्दआहे.  ही रथयात्रा आषाढ शु. दितीयेला सुरु होते.भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा या तिघांच्याही रथांची यात्रा निघते. लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी या यात्रेकरिता या ठिकाणी येतात. भाविकांची अशी श्रध्दा आहे की या रथाखाली सापडून मृत्यु आल्यास मोक्ष प्राप्त होतो. परंपरेनुसार कोणत्याही कारणाने जर एखाद्या वर्षी रथयात्रा स्थगित झाली तर पुढील बारा वर्षे रथयात्रा करता येत शकत नाही. जगन्नाथाचा जड रथ हजारो लोक ओढून नेतात, यावरून पुष्कळ लोकांच्या श्रमांमुळेच पूर्ण होऊ शकणाऱ्या कामाविषयी ‘जगन्नाथाचा रथ’ असा वाक्‍प्रचार रूढ झाला.
पुरीच्या या पवित्र मंदिराशी संबंधित सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यावरून ना विमान उडत आहे ना पक्षी. देशाशी जोडलेल्या सर्व मंदिरांमध्ये हे कुठेच दिसत नाही. मंदिराच्या शिखरावर असलेल्या चाकाला सुदर्शन चक्र म्हणतात. या पवित्र वर्तुळाकडे कोणत्याही कोपऱ्यातून पाहिल्यास ते आपल्याच बाजूने फिरत असल्याचे दिसते.

Puri Jagannath Temple २०२१
lord im

jagannath puri mandir story and history in hindi
     फाल्गुन शुद्ध द्वादशीला गोविंद द्वादशी म्हणतात व तो जगन्नाथाचा जन्मदिवस मानतात. या तिथीला पुष्य नक्षत्र असल्यास पुरीला समुद्रस्नानासाठी मोठी यात्रा जमते. मार्कंडेय सरोवर, कृष्णवट, बलराम समुद्र, इंद्रद्युम्न कुंड ही येथील मुख्य तीर्थस्थाने होत.
    पुरी रथयात्रा उत्सव हा ओडिशा राज्यातील पुरी येथे होणारा वार्षिक उत्सव आहे. रथयात्रेचा संबंध विश्वाचा देव जगन्नाथ यांच्याशी आहे. असे मानले जाते की भगवान जगन्नाथ (सुभद्रा) च्या बहिणीने पुरी (ओडिशाचे राज्य) येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा हा उत्सव सुरू झाला. सुभद्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांच्यासह रथात बसून पुरीला रवाना झाले. तेव्हापासून हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी जगन्नाथ उत्सव साजरा केला जातो.
     जगन्नाथ उत्सवावर, भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा त्यांच्या रथात बसून गुंडीचा मंदिराला भेट देण्यासाठी निघतात. ते गुंडीचा मंदिरात आठ दिवस मुक्काम करतात.आठव्या दिवसानंतर, देवता (भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा) गुंडीचा मंदिरातून निघतात आणि या कालावधीला बहुदा यात्रा म्हणतात.
असे मानले जाते की भगवान जगन्नाथ दरवर्षी त्यांच्या जन्मस्थानाला भेट देतात. या उत्सवाशी विविध कथा निगडीत आहेत त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
    भगवान कृष्णाचे मामा कंस यांनी बलराम आहि श्रीकृष्ण त्यांना मारण्यासाठी मथुरेला बोलावले. कंसाने अक्रूरला रथासह गोकुळात पाठवले. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम रथावर बसून मथुरेला निघाले. प्रस्थानाचा हा दिवस भाविक रथयात्रा म्हणून साजरा करतात.
    दुसरी कथा सांगते की द्वारकेतील रथयात्रा उत्सव भगवान कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्याशी संबंधित आहे. एके काळी, भगवान श्रीकृष्णाच्या आठ पत्नींना आई रोहिणीकडून कृष्ण आणि गोपी यांच्याशी संबंधित काही दैवी कथा ऐकायच्या होत्या. पण आई गोष्ट सांगायला तयार नव्हती. बराच वेळ विनंती केल्यानंतर, तिने मान्य केले परंतु सुभद्रा दारावर पहारा ठेवेल जेणेकरून कोणीही ऐकू नये. रोहिणी माता कथा सांगत असताना सुभद्रा एवढ्या मोहात पडल्या की, तितक्यात भगवान कृष्ण आणि बलराम दारात आले आणि सुभद्राने त्यांच्यामध्ये हात पसरून उभे राहून त्यांना थांबवले. त्या वेळी नारद ऋषी आले आणि त्यांनी तीन भावंडांना एकत्र पाहिले आणि त्यांनी या तिघांना कायमचा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण ने नारदांची इच्छा पूर्ण केली आणि म्हणून द्वारकामध्ये, भक्तांनी तो दिवस साजरा केला जेव्हा भगवान कृष्ण, बलरामांसह, सुभद्राला, शहराचे सौंदर्य दर्शविण्यासाठी रथावर स्वार करण्यासाठी घेऊन गेले.
rath-yatra_072320051024.jpg

jagannath-puri-yatra-new_072320051244.jpg

     संपूर्ण रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांचे तीन वेगळे रथ बनवले जातात. रथयात्रेत बलरामाचा रथ अग्रभागी असतो, त्यानंतर मध्यभागी देवी सुभद्राचा रथ आणि मागच्या बाजूला भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचा रथ असतो. हे त्यांच्या रंग आणि उंचीवरून ओळखले जाते.भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत वापरले जाणारे रथ भव्य आहेत. हे रथ संपूर्ण लाकडी आहेत. या रथांमध्ये कोणताही धातु वापरल्या जात नाही. जेव्हा रथयात्रा निघते तेव्हा बलराम हे वडिल बंधू असल्याने त्यांचा रथ सर्वात समोर असतो. या रथाला तालध्वज असे नाव आहे. हा रथ ४५ फुट उंच असतो. त्यानंतर सुभद्रेचा रथ असतो. त्याला पद्मरथ किंवा दर्पदलन म्हटले जाते. हा रथ ४३ फुट उंच असतो. नंतर सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो. या रथाला नंदीघोष  किंवा गरुड ध्वज म्हणतात. जगन्नाथ यांचा रथ सोळा चाकी असलेल्या लाकडी रथ आहे. हा रथ ३५ फूट लांब, ३५ फूट रुंद आणि ४५ फूट उंचीचा आहे. बाकीचे दोन रथ तसे आकारमानाने थोडे लहान आहेत.
     असे म्हणतात या यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या भाविकांना मोक्षप्राप्ती मिळते. हे तिन्ही अवजड रथ दरवर्षी हजारो लोक जाड दोरखंडाने ओढून नेतात. यावरूनच पुष्कळ लोकांच्या श्रमांमुळेच पूर्ण होऊ शकणाऱ्या कामाला ‘जगन्नाथाचा रथ’ असे नाव पडले. इंग्रजीमधला ‘जुगरनॉट’ हा शब्दही इथूनच आला. श्री जगन्नाथाचे आणि त्याच्या भावंडांचे हे अनोखे मंदिर हिंदू धर्मात सर्वांत पवित्र मानल्या गेलेल्या चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक असून जगन्नाथपुरीचे हे देखणे मंदिर सर्वांनी भेट दिलेच पाहिजे असे सुंदर आहे.
जगन्नाथ पुरीचे मंदीर आणि इथली रहस्य :-
भारतातील अनेक मंदिरांना खूप मोठा इतिहास आहे. काही मंदिरांचा इतिहास तर त्यांच्या निर्मितीच्याही आधीचा आहे. मंदिर कुठे उभारायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक बाबींचा सखोल विचार आणि अभ्यास केला गेला.
     ज्या ठिकाणी मंदिर बांधायचं तिथलं वातावरण, तिथल्या नैसर्गिक गोष्टी तसेच पुढे येणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींचा अभ्यास केला गेल्यावर ज्या ठिकाणी ह्या गोष्टी जुळून येतील अशा ठिकाणी भव्य दिव्य मंदिरांची निर्मिती केली गेली.ही निर्मिती करताना कळलेल्या तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड देऊन अशा ठिकाणांचं महत्त्व धार्मिक दृष्टीने वाढवलं गेलं. खंत एकच की ह्यातलं तंत्रज्ञान ह्या श्रद्धेमुळे येणाऱ्या पुढच्या काळात लुप्त झालं आणि परकीय आक्रमणांनी भारताच्या अनेक पिढ्यांच्या तंत्रज्ञानातील समृद्धीची वाट लावली.
श्रीकृष्णाला आणि त्याच्या भावंडांना वाहिलेलं एक मंदिर भारतात गेल्या ९०० वर्षाहून जास्ती काळ उभं आहे. जगन्नाथ, बलराम, सुभद्रा ह्या तीन देवतांना समर्पित असलेलं पुरी, ओरिसा इथलं जगन्नाथ मंदिर!
आपल्या रथयात्रेसाठी जगभर प्रसिद्ध असणारं हे मंदिर अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेलं आहे. 
       भारतातल्या मंदिरांची शिखरं ही वर निमुळती होतं जाणारी आणि साधारण चपटी असलेली बांधली जातात.पण जगन्नाथ मंदिर ह्याला अपवाद आहे. हे मंदिराचं शिखर थोडफार गोलाकार स्वरूपात बनवलं गेलं आहे.भारताच्या ज्या भागात पुरी मधलं जगन्नाथ मंदिर आहे तो भाग शंखाच्या आकाराच्या आहे.शंख आणि चक्र ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी विष्णूच्या मूर्तीत आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. म्हणूनच ह्या भागाला शंख क्षेत्र म्हटलं जातं.  येथील काही रंजक गोष्टी आहेत; ज्‍या माहिती झाल्‍यानंतर आश्चर्य वाटेल.
मंदिर के शीर्ष पर लगा चक्र और झंडा भी कई रहस्‍य समेटे हुए है. जैसे- मंदिर का झंडा कभी उस दिशा में नहीं उड़ता, जिस दिशा में हवा चलती है. यह हमेशा विपरीत दिशा में उड़ता है. कई बार इस रहस्‍य को समझने की कोशिश की गई, लेकिन जवाब नहीं मिल पाया. इसलिए आज भी यह बात रहस्‍य बनी हुई है.

ध्वज फडकतो उलट दिशेने

जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असणारा ध्वज या नियमाला सणसणीत अपवाद आहे. हा विशिष्ट ध्वज वार्याच्या उलट दिशेने उडतो. आजपर्यंत त्याचे वैज्ञानिक कारण शोधले गेले नाही; परंतु हे आश्चर्य निश्चितच आहे. ह्या जागेची निवड करताना इथल्या काही नैसर्गिक गोष्टींवर खूप अभ्यास केला गेला आहे. जगात कुठेही दिवसा हवा समुद्रावरून जमिनीच्या दिशेने वाहते तर रात्री ह्याविरुद्ध म्हणजे जमिनीवरून समुद्राकडे वहाते.पण ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिकडे नेमकं उलट घडतं. जगन्नाथ मंदिराच्या इथे दिवसा हवा जमिनीवरून समुद्राकडे वहाते तर रात्री उलट्या दिशेने म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वहाते. 
        देवळाच्या शिखरावर फडकणारा झेंडा उलट दिशेला फडकण्यामागे ह्या मंदिराचा आकार कारणीभूत आहे. ह्या मंदिराच्या आकारामुळे इथे ‘कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट’ बघायला मिळतो.एकसंध वाहणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या प्रवाहात जर आपण टोकेरी नसलेली साधारण गोलाकार एखादी गोष्ट आणली तर त्याच्या प्रवाहात त्या वस्तूमुळे बदल होतो आणि हा बदल अगदी विरुद्ध दिशेने असतो. त्यामुळे हवा वाहताना मंदिराच्या साधारण गोलाकार असणाऱ्या शिखराला आदळून ‘कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्ट’ तयार करते. ज्यामुळे काही भागात हवा उलट्या दिशेचा प्रवाह निर्माण करते. हाच विरुद्ध दिशेचा प्रवाह झेंड्याला हवेच्या अगदी विरुद्ध दिशेला फडकवतो.
      A Kármán vortex street (or a vonKármán vortex street) is a repeating pattern of swirling vortices, caused by a process known as vortex shedding, which is responsible for the unsteady separation of flow of a fluid around blunt bodies. Vortex shedding happens when the wind hits a structure, causing alternating vortices to form at a certain frequency. This, in turn, causes the system to excite and produce a vibrational load.

Wikipedia
असे मानले जाते विश्वकर्माने राजा इंद्रद्युम्नच्या काळात हे मंदिर बांधले होते. विश्वकर्माने . देवाची मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी राजा इंद्रद्युम्न यांच्यासमोर एक अट ठेवली होती की ती बंद खोलीत बनवावी आणि त्या खोलीत कोणीही प्रवेश करणार नाही. त्यात कोणी शिरले तर ते मूर्ती घडवणे बंद करतील. असे म्हणतात की एके दिवशी राजा इंद्रद्युम्नला त्या खोलीतून आवाज आला तेव्हा त्याने त्या खोलीचे दार उघडले. राजाने असे करताच भगवान विश्वकर्मा अपूर्ण मूर्ती तिथेच टाकून निघून गेले. तेव्हापासून आजतागायत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अपूर्ण आहेत.

ध्वज दररोज बदलतो
 या मंदिरावरचा कापडी ध्वज रोज संध्याकाळी बदलतात. एका विशिष्ट कुटुंबातील माणसेच पिढ्यानपिढ्या हे काम करत आलेली आहेत. दररोज एक याजक मंदिराच्या घुमटाच्या वरचा ध्वज बदलण्यासाठी ४५ मजल्यांच्या इमारतीच्या उंचीसह मंदिराच्या भिंतींवर चढतो. खरं तर हे जरा कठीणच आहे, परंतु मंदिर बांधल्यापासून हा विधी सतत चालू आहे. या प्रक्रियेस कोणत्याही संरक्षणात्मक साधनाचा वापर न करता याची दररोज पुनरावृत्ती केली जाते. असा विश्वास आहे की जर दिनदर्शिकेतील एका दिवसासाठीही हा विधी वगळण्यात आला, तर मंदिर १८ वर्षांसाठी बंद राहील. इतक्या उंचावर त्या माणसाला चढून जाताना आणि ध्वज बदलताना बघून जरा भीतीच वाटते, पण त्यांच्यासाठी तो सवयीचा भाग असणार. मंदिर में 20 फीट ऊंचाई पर लगा चक्र (Sudarshan Chakra) का वजन एक टन से भी ज्‍यादा है. यह चक्र बेहतरीन इंजीनियरिंग का नमूना है. इसकी खासियत है कि इस चक्र को किसी भी तरफ से देखेंगे तो यह आपकी तरफ ही घूमा हुआ दिखाई देगा.

सुदर्शन चक्रांचे रहस्य
मंदिराच्या शिखरावर सुदर्शन चक्रच्या रूपात दोन रहस्ये आहेत. पहिली विषमता त्या शतकाच्या मानवी ताकदीसह कोणतीही यंत्रसामग्री न घेता, कठोर धातूचे वजन सुमारे एक टन कसे होते या सिद्धांताभोवती फिरते. एक चक्र ज्याला नील चक्र असंही बोललं जातं ते बसवलेलं आहे. हे नील चक्र अष्टधातूंनी बनवलेलं आहे.११ मीटर चा घेर आणि ३.५ मीटरची उंची असलेलं हे चक्र जवळपास वजनाने १००० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. हे चक्र ९०० वर्षापूर्वी ६५ मीटर उंचीवर कसं नेलं गेलं असेल हे अजूनही एक रहस्य आहे.  दुसरा एक चक्र संबंधित वास्तु तंत्राचा आहे. आपण प्रत्येक दिशेने पाहता, चक्र त्याच स्वरूपासह दिसतो. जणू प्रत्येक दिशेने एकसारखे दिसण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आपण ज्या दिशेने हे चक्र पहाण्याचा प्रयत्न कराल, आपण आपल्यासमोर तो दिसेल.ह्याच्या शिखरावर आधी म्हटलं त्याप्रमाणे मंदिराची जागा निवडताना अनेक गोष्टींचा अभ्यास त्या काळी केला गेला होता. ह्या मंदिराच्या शिखरावर जे नील चक्र आहे ते पूर्ण पुरी मधून बघताना कुठूनही तुम्हाला ते समोरून बघत आहात असंच दिसून येते. ह्या मागे कारण आहे ते पुरी शहराची रचना आणि त्याला अनुसरून मंदिराचं केलेलं बांधकाम. ज्या भागातून ह्या चक्राचा बाजूचा भाग दिसण्याची शक्यता आहे. त्या सर्व भागात एकतर तुरळक वस्ती आहे किंवा मंदिराच्या आसपास असणाऱ्या इतर इमारतींमुळे मंदिराचं शिखर दिसत नाही. त्यामुळेच जिथे लोकवस्ती अथवा जिथून मंदिराच्या शिखराचं दर्शन होतं त्या सर्व भागातून चक्र आपण समोर बघत आहोत असा भास होतो. नील चक्र जे मंदिराच्या शिखरावर बसवलं गेलं आहे, ते अष्टधातूंच्या संयुगातून बनवलं गेलं आहे. त्यामुळे आज ९०० वर्षानंतर ही समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या हवेला मात देत टिकून आहे.

भगवान जगन्नाथाच्या मंदिराशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे उत्तर आजपर्यंत विज्ञानालाही सापडलेले नाही. मंदिरावर फडकणार्‍या ध्वजाप्रमाणे, जो आजही नेहमी वार्‍यावर फडकताना दिसतो. जगन्नाथ मंदिराच्या ध्वजाशी संबंधित विशेष गोष्ट म्हणजे दररोज एक पुजारी चढून तो बदलतो. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आजही थांबलेली नाही.पुरीतील भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर कलिंग शैलीत बांधलेले आहे. या अतिशय सुंदर मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिरावर दिवसा कधीही सावली पडत नाही. काही लोक याला भगवान जगन्नाथाचा चमत्कार मानतात तर काही लोक याला सर्वोत्तम बांधकाम शैली मानतात.

पक्षी उडत नाहीत
 आपण पक्षी आपल्या डोक्यावर नेहमी विश्रांती घेत आणि उडताना पाहतो. परंतु, या विशिष्ट क्षेत्राला पक्षी उडत नाहीत. मंदिराच्या घुमटाच्या वर एकही पक्षी नाही, अगदी विमानदेखील मंदिराच्या भोवती फिरत नाही. ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येतं असावी. त्यामुळेच ह्या शिखराच्या आसपास पक्षी उडताना दिसत नाहीत.

भगवान जगन्नाथजींचे हे भव्य मंदिर पुरीच्या समुद्राच्या बाजूला आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सिंहद्वार आहे. असे मानले जाते की जोपर्यंत तुम्ही तुमची पावले गाभाऱ्यात ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेरून समुद्राचा आवाज ऐकू येतो, पण तुम्ही तुमची पावले टाकून गर्भगृहात प्रवेश करताच समुद्राचा आवाज बंद होतो.

शांत पाणी
 मंदिराच्या सिंघ दारातून प्रवेश करताच कानावर आदळणारा लाटांचा आवाज अचानक नाहीसा होतो. जेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू तेव्हा लाटांचा आवाज आपल्या कानावर पडतो. असं होण्यामागे मंदिराच्या निर्माणात वापर केलेल्या दगडी तंत्रज्ञानांचा समावेश आहे. इकडे दगड असे वापरले गेले आहेत की ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या ध्वनीलहरी आतमध्ये शिरत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या सिंहाच्या प्रवेशद्वारापासून आत शिरताच आपल्याला अचानक आवाज नाहीसा झाल्याचा अनुभव येतो. मंदिर सोडल्यावर आवाज परत येतो. स्थानिक आख्यायिकेनुसार मंदिरातील प्रवेशद्वारांत शांती मिळावी अशी दोन राजांची बहीण सुभद्रा मेची इच्छा होती. म्हणूनच त्याची इच्छा पूर्ण झाली जी आजही अबाधित आहे.

jagannath puri mandir story and history in hindi
    कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट असो वा पुरी च्या कोणत्याही भागातून दर्शनी दिसणार नील चक्र असो. ह्या मंदिराची निर्मिती करताना त्याच्या बांधकामाची सावली ही त्याच्या बांधकामावर पडते. त्यामुळे जमिनीवर सावली दिसणार नाही अश्या पद्धतीने केलेलं बांधकाम. प्रत्येक गोष्टीची निवड ही पूर्ण विचारांती मंदिर निर्माण करताना केली गेली आहे. 
     ह्या गोष्टींना जगन्नाथाच्या शक्तीचं रूप दिलं असलं तरी मंदिर उभारताना वापरलेले गेलेल्या उच्च तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. जागेची निवड ते मंदिराचा आकार आणि ते उभारताना वापरल्या गेलेल्या विज्ञानामुळे आजही इतके वर्षानंतर हे मंदिर आपल्या सोबत अनेक रहस्य घेऊन दिमाखात उभं आहे. रथयात्रेसारखी जवळपास १८०० वर्षाची परंपरा असलेली यात्रा जितकी जगभरात जगन्नाथ पुरी ची शान आहे तितकंच ह्या मंदिराच्या निर्मिती मागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान!!!
jagannath puri
जगन्नाथ मंदीरात दर्शन घेताना घ्यायची काळजी :-
      मंदिरात खूप गर्दी असते. फोन, कॅमेरा, चप्पल, कुठलीही चामडी वस्तू (पाकीट, पट्टा वगैरे) देवळात नेऊ देत नाहीत. बाहेर पैसे घेऊन या वस्तू सांभाळणारे दुकानदार अर्थातच आहेत, पण हे सगळं गाडीतच ठेवून अनवाणीच गेलेले योग्य ठरते. गाड्याही मंदिरापासून लांब पार्क कराव्या लागतात. चालत जाता येतं, किंवा सायकलरिक्षाही असतात. वस्तू गाडीत ठेवण्याचा निर्णय शहाणपणाचा ठरतो, कारण त्या वस्तू ठेवायला आणि परत घ्यायलाही प्रचंड गर्दी होती आणि नेमकी जागा सापडणेही कठीण होते. तिथले पंड्ये त्रास देतात, पाठीशी लागतात, पैसे उकळतात असे अनुभव येउ शकतात. ज्या प्रमाणात गर्दी तिथे रोजच्या रोज असते, त्या मानाने स्वच्छता मात्र खरंच चांगली दिसते. मंदीरात, आत कॅमेरा नेण्याची परवानगी नसल्याने बाहेर आल्यावर बाहेरूनच मंदीराचे काही फोटो काढणे शक्य होते. 
   मंदिराचे पावित्र्य राखण्य़ासाठी तसेच पवित्र परंपरा जपण्यासाठी अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाही. मंदीर आणि आवार नीट पाहाता यावे म्हणून इतर पर्यटकांसाठी रस्त्यासमोरील रघुनंदन ग्रंथालयाच्या छपरावरून पाहाण्याची सोय केलेली आहे.
     मदिराभोवतालच्या बाजार विभागातील शेकडो दुकानातून जगन्नाथाचा बंधू बलभद्र म्हणजे बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या समवेत जगन्नाथ असलेल्या त्रिमूर्ती विकत मिळतात. वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैलीतले टप्पोरे डोळे असलेल्या त्रिमूर्ती. जगन्नाथ संप्रदायाचे प्राबल्य ओदिशातील इतर भागातून पर्यटन करतांना देखील जाणवते. पाहावे तिथे जगन्नाथाची मूर्ती दिसते. मोहक आकार आणि दृष्टी खिळवणारे सामर्थ्य यांच्या संयोगामुळे असेल कदाचित पण अगदी धार्मिक नसणार्‍या नजरेला देखील जगन्नाथाची मूर्ती आकर्षक वाटते.
     अगदी हिंदू नसणार्‍या पर्यटकाला देखील या अलोट गर्दीच्या यात्रास्थानाचे सामर्थ्य जाणवते. मंदिराभोवतालची दुकाने गर्दीने फुलून गेलेली असतात. पण या अलोट गर्दीतही जाणवते ते सौजन्य आणि पावित्र्य. दिवेलागण होताहोताच बाजारात एक फेरफटका मारा. घाबरू नका, तुमच्या टॅक्सीच्या किंवा रिक्षाच्या चालकाची नजर तुमच्यावर असेल आणि तुम्ही निघतांना तो जादू केल्यासारखा बरोब्बर अवतीर्ण होईल. विष्णुदेवतेचा ध्वज वार्‍यावर फडकत असलेल्या भव्य आणि सुंदर कळसाकडे एक नजर टाका. मंदिरात प्रवेश करणार्‍या आणि मंदिरातून बाहेर येणार्‍या भाविकांचे चेहरे जरा न्याहाळून पाहा. तळल्या जाणार्‍या खाऊचा, मिठाईचा, अगरबत्त्यांचा, फुलांचा आणि धुपाचा संमिश्र गंध श्वासात भरून घ्या आणि पावले वळतील तिथे जा. अगदी निधर्मी व्यक्तीला पण वाटेल की आपण वैशिष्ट्यपूर्ण अशा एकमेवाद्वितीय यात्रास्थानी आलेलो आहोत.
         पुरीच्या वाटेवर अपण काही काळजी घेणे अपेक्षित आहे.
१. कोणत्याही पुजार्‍याला जवळ येऊ देऊ नका. काही पुजारी देखील चोर आणि खिसेकापू आहेत तर काही चोर - खिसेकापू पुजार्‍यांच्या वेषात उपस्थित असतात. फक्त मंदीर-अधिकृत पुजार्‍यांशी व्यवहार करा. आपल्या वस्तूंची चोरीपासून काळजी घ्या.
२. कॅमेरे,भ्रमणध्वनी आत न्यायला परवानगी नाही. तेव्हा ते बरोबर घेऊ नका.
३. फक्त हिंदूंना प्रवेश. इतर धर्मीयांना बाजूच्या इमारतीतून अवलोकन करायची सोय आहे.
४. दोन तासात बसमध्ये परत या.
५. पुरीच्या मंदिरातील कोरीवकाम निवांतपणे पाहणे अशक्यच आहे. 
पुरीची पंचतीर्थे
 रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच आहे. पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. बनारसप्रमाणे पुरीला देखील पंचतीर्थे आहेत. रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच विमला मंदिरासमोर आहे. पुरीच्या पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. श्वेतगंगा, नरेंद्र सरोवर, इंद्रद्युम्न सरोवर, मार्कंडेय सरोवर आणि तीर्थराज महानदी म्हणजे पुरीचा समुद्रकिनारा यापैकी इतर चार तीर्थे आहेत. या पंचतीर्थांत स्नान केल्यामुळे पापक्षालन होते असे भाविक मानतात. साहाजिकच इथे येण्यापूर्वी मनसोक्त पापे करण्यास हरकत नाही.
रोहिणी कुंडातील जल हे करण जल म्हणजे पापक्षालन करून आपल्याला पावन करणारे आहे असे मानतात.
पवित्र अशा शंख क्षेत्रात हे कुंड वसलेले आहे. या पवित्र अशा रोहिणी कुंडात एकदा एक देवदाराचा लाकडी ओंडका तरंगतांना मिळाला. या ओंडक्यातूनच मूळची जगन्नाथाची मूर्ती कोरून तिची प्रतिष्ठापना पुरीच्या मुख्य मंदिरात केली होती. त्या मूळ मूर्तीबरहुकूमच सध्याची मूर्ती कोरली आहे.
 विमला, कमला सर्वमंगला आणि उत्तराई अशा चार देवींनी प्रणितोदक कुंड, दोन वृक्ष स्थळे गरुड आणि निलगिरी पर्वताचे शिखर या ठिकाणांबरोबरच रोहिणी कुंडापाशी वास्तव्य केले.

नरेंद्र सरोवर

नरेंद्र सरोवर.

मूळचे रोहिणी कुंड विमलादेवी मंदिराच्या प्रवेशापाशी आहे. त्या कुंडात निर्माणजल आहे असे म्हणतात. कैक वर्षापूर्वी ते कुंड जराजर्जर झाले. परंतु सन २००७ मध्ये दीन बंधु दास या श्री प्रभुपादस्वामींच्या शिष्याने एक लेख सन या नियतकालिकामध्ये लिहिला आणि कुंडाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
   सध्या जगन्नाथ मंदिरात रोहिणी कुंड म्हणून एका छोट्याशा पात्रात पवित्र जल ठेवलेले आहे. पात्राच्या तळाशी भुशुंडी काक याची मूर्ती ठेवलेली आहे. एका पुराणकथेनुसार एक कावळा रोहिणी कुंडात पडला आणि अचानक त्याचे रूपांतर विष्णूनारायणाच्या शंखचक्रगदापद्मधारी अशा चतुर्भुज भक्तात झाले. तो हा भुशुंडी काक = कावळा.
     स्कंदपुराणात देखील ‘भुशुंडी काक’ची कथा सांगितली आहे. मोमस ऋषींनी भुशुंडीला एक शाप दिला. मरणासन्न अवस्थेत उडत उडत तो कावळा शंखक्षेत्री पोहोचला. रोहिणी कुंडातील पवित्र जलाने स्नान करून तो जगन्नाथाचे दर्शन घ्यायला मंदिराजवळ आला. योगायोगाने तो एका कल्पवटवृक्षाच्या शाखेवर बसला. आपल्याला ठाऊकच आहे की कल्पवृक्षाखाली मनांत धरलेली इच्छा पूर्ण होते. त्या कावळ्याच्या मनांत शापमुक्त व्हावे अशी इच्छा सतत तेवत होतीच. अचानक कावळ्याच्या रूपातील भुशुंडी मरून रोहिणी कुंडात पडला आणि त्याचे रूपांतर चतुर्भुज अशा दिव्य रूपात झाले. तेव्हापासून त्याची वटनारायण म्हणून पूजा करतात.
     रोहिणीकुंडाच्या जरा पुढे गेले की सुदर्शनक्राच्या आकाराचे नाभिचक्र आहे. त्याच्या बाजूला चार फूट उंचीची कावळ्याची मूर्ती आहे. हा कावळा इंद्रद्युम्नाच्या काळी अस्तित्वात होता. जगन्नाथाचे मंदीर बांधून पूर्ण झाल्यावर त्याला त्याच्या पवित्र अशा गतकाळाचे फळ मिळाले. राजा गलमाधवाने दावा केला की मंदीर त्याचे आहे. मग ब्रह्माने तिथे येऊन तोडगा काढला. राजा इंद्रद्युम्नाशेजारी कावळा आणि चक्र हे साक्षीला ठेवले. गलमाधवाचा आत्मा अजूनही रोहिणी कुंडात वास्तव्य करतो आणि रोज जगन्नाथाची प्रार्थना करतो असे मानतात.
  मूळ रोहिणी कुंड विशाल जलाशय होता. त्याच्या किनार्‍यावरून पाण्यात उतरायला स्फटिकाच्या पायर्‍या होत्या असा वेदांत उल्लेख आहे. स्कंदपुराणात विद्यापति नीलशैलहून परत आल्यानंतरचे संभाषण आहे. त्यात तो इंद्रद्युम्नाला म्हणतो,
       नीलगिरीच्या शिखरावर एक सदाहरित असा वटवृक्ष आहे. त्या वृक्षाच्या पश्चिमेला रोहिणी कुंड आहे आणि कुंडाभोवती स्फटिक मणिमाला आहे. शंखचक्रगदापद्मधारी, नीलवर्णी इंद्रनीलमणिमाया, नीलमाधव हे वटवृक्षाच्या शीतल छायेखाली या वेदीवरील सोनेरी कमलावर आसनस्थ आहेत, नीलमाधव वेणुवादन करताहेत आणि अनंतनागाने त्यांच्या मागून आपल्या शरीराने छत्र धरले आहे. समोर सुदर्शन दृश्यमान आहे आणि त्यांच्या समोर गरूड हात जोडून बसलेला आहे.
      नीलमाधव आणि इंद्रद्युम्न यांना या पवित्र जागी आलेले विद्यापतीने पाहिल्यानंतरच्या काळात नीलमाधवाची आणि रोहिणी कुंडाची ही प्रतिमा एका भयंकर अशा वादळात वाळूमध्ये आता नष्ट झाल्याचे मानतात. तथापि श्री नरसिंहाने एका अगुरू वृक्षाखाली या पवित्र स्थळी नीलशैलाचे मंदीर उभारले. नीलमाधव अंतर्धान पावल्यानंतर आता एवढेच राहिले आहे.
  रोहिणीकुंडाच्या पूर्वेला आपल्याला थोर ऋषी मार्कंड यांच्या पावलाचे ठसे दिसतात. त्यावरून दुसर्‍या पंचतीर्थाचे नाव ठेवले, मार्कंडेय सरोवर.

 जगन्नाथ पुरीतील मुख्य मंदीराची माहिती घेतल्यावर परिसरातील बाकीच्या मंदीरांची माहिती घेउया.
श्री विमलांबा शक्तिपीठ :-
या मंदीराची स्थापना गोवर्धन मठाच्या शंकराचार्यांनी केली असे मानले जाते. सतीच्या मृत्युनंतर तीच्या शरीराचे पन्नास भाग विखरुन पडले, त्यातील नाभी स्थान इथे आहे, असे मानले जाते.

साखी गोपाल मंदीर :-
   हे ओडीशातील एक महत्वाचे मंदीर आहे. इथल्या भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे हि मुर्ती अत्यंत दुर्मिळ अश्या वज्र दगडापासून बनलेली आहे.

बाट मंगला मंदीर :-
पुरीच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या या मंदीरात मंगला देवीची मुर्ती आहे.

श्री गुंडीचा मंदीर :-
दरवर्षी भगवान जगन्नाथांची यात्रा भरते, तेव्हा जगन्नाथांचा रथ या मंदीरापाशी आला कि यात्रा पार पडली असे मानले जाते. जगन्नाथ मंदीरापासून हे मंदीर तीन कि.मी. वर आहे.

इंद्रध्युम्न सरोवर तीर्थ :-
गुंडीचा मंदिरापासून अर्ध्या कि.मी.वर हे सरोवर आहे.या सरोवराभोवती चार-पाच मंदीरे आहेत.

मौसी माँ मंदीर
या मंदीरामध्ये देवी अर्धासिनी देवीची मुर्ती आहे, त्यामुळे मंदीराला अर्धासिनी मंदीर म्हणतात. भगवान शिव आणि देवी अर्धासिनी हे जगन्नाथ पुरीचे रक्षण करतात अशी भाविकांची श्रध्दा आहे.
 
श्री राधानयनमणी मंदीर :-
भक्ति सिध्दांत सरस्वरी प्रभुपाद यांच्या जन्मस्थानावर चैतन्यप्रभु यांनी या मंदीराची निर्मिती केली. भगवान श्रीकृष्णाचे विचार आणि महती याचा प्रसार व्हावा या उद्देशाने या मंदीराची निर्मिती करण्यात आली.

सिध्द महावीर मंदीर, पुरी :-
रमभक्त हनुमानाचे हे मंदीर गुंडीचा मंदीरापासून साधारण एक कि.मी. अंतरावर आहे.

रामचंडी हनुमान मंदीर :-
सीतामाईच्या शोधात लंकेला जाताना हनुमान या ठिकाणी माता रामचंडी देवी यांच्या सानिध्यात काही काळ थांबले होते अशी समजुत आहे. इथे हनुमानाची पंचमुखी मुर्ती आहे.
इस्कॉन मंदीर :-
जगभर पसरलेल्या अनेक इस्कॉन मंदीरापैकी एक म्हणजे हे जगन्नाथ पुरीमधील इस्कॉन मंदीर. इथे भगवान श्रीकृष्णाबरोबरच भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मुर्ती आहेत. 

जगन्नाथ पुरीचा समुद्रकिनारा :-
पुरीचा सोनेरी समुद्रकिनारा अर्थात गोल्डन बीच. भल्यामोठ्या फेसाळणार्‍या लाटांनी वातावरण जिवंत केलेले.किनारा तसा बर्‍यापैकी प्रशस्त रुंद. पण तुलना केली तर तसा अनाकर्षकच. असे दिसते की समुद्र जमिनीत घुसून किनारा चंद्राकृती झाला की दोन्ही बाजूंना जमिनीची माडांची भरगच्च गर्दी असलेली टोके आत घुसलेली असली, थोडेफार खडक समुद्रात दिसत असले तरच तो सुंदर दिसत असावा.  कोकण, गोवा, केरळ वगैरे किनार्‍यापुढे हा अगदीच फिका वाटतो. विक्रेत्यांची गर्दी, कोलाहल अजिबात नसल्यामुळे निवांत वाटते.
पुरी गोल्डन बीच


पुरी गोल्डन बीच

किनारा 
 
jagannath puri mandir story and history in hindi
जावे कसे ?
विमानमार्गे :-
   पुरीमध्ये विमानतळ नाही.सगळ्यात जवळचा विमानतळ भुवनेश्वरला आहे.पुरीपासून हे अंतर ५३ कि.मी. आहे. दुसरा जवळचा विमानतळ विशाखापट्टणला आहे जो इथून ३७२ कि.मी. लांब आहे.
रेल्वेमार्गे :-
   मंदिरापासून रेल्वे स्टेशन फक्त सहा कि.मी. अंतरावर आहे, त्यामुळे रेल्वेने पुरीला जाणे सोयीचे आहे.
रस्त्याने :-
   पुरी शहर रस्याने बहुतेक सर्व महत्वाच्या शहराशी जोडले गेले आहे.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...