महाभारताच्या घटनाक्रमात सर्व पांडव व कुंती कचापर्यंत पोहोचले. तो आसामशी आलेला पहिला संबंध नजरेत भरतो. नंतर श्रीकृष्णाच्या दोन स्वा-या झाल्याचे कळून येते. पहिली स्वारी नरकासुराच्या वधासाठी प्राक्ज्योतिषपूरवर व दुसरी तेजपूरच्या (शोणितपूर) बाणराजावर. अर्जुनाच्या स्वा-या तीन. पहिली मणिपूपर्यंत (चित्रांगदेशी विवाह), दुसरी प्राक्ज्योतिषपूरच्या भागदत्तास आव्हान दिले ती व तिसरी अश्वमेध यज्ञासाठी मणिपूपर्यंत. या सर्वाना गंगा-ब्रह्मपुत्रा हा जलमार्गच सोयीचा होता.
आसामच्या इतिहासावर एक ओझरती नजर टाकली तरी महाभारताने तिथे आगळा इतिहास घडवून आणल्याचे प्रकर्षाने जाणवते. रामायणाचे कथानक उत्तरेकडून दक्षिणेकडे तर महाभारताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत जाते. यात बराच अर्थ भरलेला दिसतो. एक तर साम्राज्यविस्ताराची दिशा कळून येते. दोन्ही मिळून संपूर्ण भरतखंड व्यापतात. एवढेच नव्हे तर विशिष्ट वैष्णव संस्कृतींचा प्रसारही घडवून आणतात. मनोवेधक अद्भुत कथा नव्या मातीत व मनांत पेरत जायचे व तिथे त्या जशा उगवतील तशा स्वीकारायच्या हे हिंदू धर्माचे धोरण त्यामध्ये दिसून येते.
महाभारत फ्लॅशबॅक पद्धतीने सादर होते. अभिमन्यूचा नातू जन्मेजय याला ते वैशंपायनाने कथन केले. पण आसामसंबंधीच्या घटनांचा विचार प्रस्तुत असल्यामुळे प्रारंभ ययातीपासून न करता कंसवधापासून केला. त्यातही आधी काय व नंतर काय घडले, या ऐतिहासिक दृष्टीला प्राधान्य देऊन फक्त महत्त्वाच्या घडामोडींचा क्रम लावला. तो सोबत जोडलेला आहे. असा प्रयत्न विवाद्य राहणार. कारण त्यात महाभारतकथेवर काही पुराणे, तंत्रग्रंथ, स्थानिक दंतकथा यांचे झालेले संस्कार विचारात घेतले आहेत.
इथे आसाम शब्दात संपूर्ण ईशान्य भारत अभिप्रेत आहे. आज त्यात सात राज्ये असली तरी ब्रिटिशकाळात त्याला आसामच म्हटले जाई. देशाच्या फाळणीमुळे हा प्रदेश भारताच्या मुख्य भूमीपासून बराचसा तुटलेला असला तरी प्राचीन काळापासून संलग्न होता. त्याच्या सीमा सुस्पष्ट होत्या. ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश उत्तर, दक्षिण व पूर्वेकडे पर्वतराजींनी वेढलेला आहे. गारो टेकड्यांना वळसा घालून दक्षिणेकडे वळणारी ब्रह्मपुत्रा आणि उत्तरेकडून पद्मा नदीला म्हणजे एकत्रित गंगा-ब्रह्मपुत्रेला येऊन मिळणारी करातोय नदी एकेकाळी आसामची पश्चिम सीमा होती. गंगा-ब्रह्मपुत्रा हा जलमार्ग असून त्यांच्या उपनद्यासुद्धा वापरातल्या जलमार्ग होत्या. या प्रदेशाला प्राक्ज्योतिष व नंतर कामरूप म्हटले जाई. तो वैदिक आर्याच्या दृष्टिपथात होता. गृह्यसूत्रात त्याचा उल्लेख प्राक्ज्योतिष असा येतो. पण तेव्हा तो शब्द उगवत्या सूर्याचा प्रदेश या अर्थाने होता. वैदिक वाङ्मयात त्याला व्रात्यांची भूमी म्हटले आहे.
ईशान्य भारताइतकी वांशिक, भाषिक, भौगोलिक, धार्मिक व सांस्कृतिक विविधता देशात अन्यत्र कोठेही आढळणार नाही. येथे आपसात संघर्ष होते. तरी याच प्रदेशाच्या पहाडी भागातील मंगोलॉइड जनजाती, मैदानी प्रदेशातील आसामीभाषी व आहोम या जनसमुदायांनी इस्लामी आक्रमणाशी निकराचा लढा दिला. ११८६ ते १२०६ या वीस वर्षात घोरींचे राज्य गझनीपासून बंगालपर्यंत पसरले. बख्त्यार खिलजीने नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला, बिहार गिळला व बंगालचा शेवटचा हिंदू राजा लक्ष्मणसेन याला संपविले (११९८). नंतर त्याने (१२०६) आसाममधून चीनवर स्वारी करण्याचे मनसुबे रचले, पण त्याचे सर्व सैन्य कामरूपने कापून काढले. बख्त्यारचा मृतदेहही सापडला नाही. त्यानंतर मुसलमानांनी आसाम जिंकण्यासाठी निकराने प्रयत्न चालू ठेवले. १२०६ ते १६७० या काळात आसामने एकूण सतरा इस्लामी आक्रमणांना प्रभावीपणे तोंड दिले व इस्लामी राज्याला आपल्या प्रदेशात कायमचा थारा मिळू दिला नाही.
ईशान्य भारतातील भिन्न भिन्न जनसमुदायांना एकत्र येऊन जिद्दीने लढण्याची स्फूर्ती देणारा सामायिक स्रेत होता तो धर्माचा. ते स्वत:ला हिंदू म्हणविणारे होते. हे एक लक्षणीय ऐतिहासिक घटित असून भारतीय इतिहासात त्याची पुरेशी दखल घेतली जात नाही, याची आसामी इतिहासकारांना खंत वाटते.
एक इतिहासकार म्हणतो,
...there is probably no part of India about whose past less is generally known. In the history of India, as a whole, Assam is seldom mentioned, and few writers are found to have devoted more than dozen lines to the treatment of the history of this provience. - N. N. ACHARYYA, 1966
बौद्धांसारखे धर्मप्रचारक हिंदूंकडे नव्हते. तरी हे आश्चर्य घडून आले याचे कारण ते महाभारताने घडवून आणले. हे दाखवून देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. महाभारताच्या घटनाक्रमात सर्व पांडव व कुंती कचापर्यंत पोहोचले. तो आसामशी आलेला पहिला संबंध नजरेत भरतो. नंतर श्रीकृष्णाच्या दोन स्वा-या झाल्याचे कळून येते. पहिली स्वारी नरकासुराच्या वधासाठी प्राक्ज्योतिषपुरवर व दुसरी तेजपूरच्या (शोणितपूर) बाणराजावर. अर्जुनाच्या स्वा-या तीन. पहिली मणिपूपर्यंत (चित्रांगदेशी विवाह), दुसरी प्राक्ज्योतिषपूरच्या भागदत्तास आव्हान दिले ती व तिसरी अश्वमेध यज्ञासाठी मणिपूपर्यंत. या सर्वाना गंगा-ब्रह्मपुत्रा हा जलमार्गच सोयीचा होता. बंगालमधून झालेल्या सर्व इस्लामी स्वा-या याच मार्गाने झाल्या. शिवाय नद्यांच्या दोन्ही किना-यांवरून रस्ते उपलब्ध होते.
आता उलट दिशेने पाहिले असता भागदत्त व जैतियांचा राजा, हे दोघे राजसूय यज्ञात पांडवांच्या बाजूने हजर होते. पण पुढे अर्जुनाने दिग्विजयाच्या वेळी त्याला आव्हान दिल्यामुळे भागदत्त भारतीय युद्धात कौरवांच्या बाजूने लढून मरतो, पण आसामात अमर बनतो. आसामच्या इतिहासावर झालेला त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे.
पांडवांना पूर्व दिशेवर लक्ष केंद्रित करावे लागले. कारण त्यांचे मुख्य शत्रू-विरोधक तिकडे होते. त्यांना पराभूत करून मांडलिक बनवणे व प्रसंगी राजकीय विवाह रचून युती पक्की करणे, ही शिष्टसंमत राजनीती होती. सत्तासंघर्षाचा खेळ होता. भारतीय युद्धातसुद्धा सत्पक्ष-असत्पक्ष असा भेद नव्हता. पांडव जिंकले म्हणून त्यांना सत्पक्षी ठरविण्यात आले. जास्त राज्ये कौरवांच्या बाजूनेच लढली. गुजराथ, मध्य प्रदेश, गंगा-यमुनामधील पांचाळ, सातपुड्याच्या पश्चिमेकडील विराट पांडवांकडे होते. पंजाबातील मद्रदेश अनुकूल असला तरी सिंधचा जयद्रथ शत्रू होता. वायव्य सरहद्दीकडून धोका नसला तरी गांधार कौरवांच्या बाजूला होता. रुक्मिणीहरणानंतर विदर्भ व जरासंध वधानंतर मगध पांडवांच्या बाजूला आले, पण मगधला लागून असलेले अंग तर कर्णाचे राज्य. अंग, वंग, कलिंग, कुंद्र ही पूर्वेकडील बाणराजाच्या पुत्रांनी स्थापन केलेली दैत्य राज्ये पांडवांची शत्रू होती. कोसल म्हणजे अवधचा संबंधसुद्धा दैत्यांशी जोडला जातो. महाभारतात वैष्णव-वैदिक संस्कृती न मानणा-या पूर्वेकडील पांडवविरोधी राज्यांना दैत्य म्हटले आहे. ही राज्य शिवभक्त आहेत.
दैत्यांखेरीज पांडवांना परके असलेले तीन जनसमुदाय होते. निषाद, नागच, किरात.
निषाद हे येथील ऑस्ट्रॉलॉइड, भिल्ल, गोंड वगैरे वनवासी. नाग म्हणजे नागपूजक वन्य जमाती. किरात हा शब्द मंगोलॉइड लोकांसाठी वापरलेला आहे. ईशान्य भारतात हिमालयाच्या पायथ्याशी राहणारे. निषाद व नाग शत्रू नसले तरी पांडवांना परके व खालच्या दर्जाचे आहेत. लाक्षागृहात कुंती व पांडव जळून मेले असे भासविण्यासाठी सहा निषाद व्यक्तींचा बळी दिला गेला. अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरवण्यासाठी एकलव्याची करियर बरबाद करण्यात आली. असे प्रकार आजही घडतात. शेती, नागरीकरण, रस्ते, सुरक्षा यासाठी जंगलतोड अपरिहार्य होती. म्हणून खांडववन जाळण्यात आले. पण त्यापूर्वी त्यातील वनवासींना विश्वासात घेता आले नसते का? विकासविरुद्ध विकासपीडितांचे जीवन, हा प्रश्न आजही नीट सोडवला जात नाही. खांडववनाच्या आगीतून वाचलेल्या तक्षकाने अखेर सूड उगवला. त्यात निरपराध परिक्षिताचा बळी गेला. नागपूजक संख्येनेही मोठय़ा प्रमाणावर होते. म्हणून अखेर नागपूजेला शैव व वैष्णवांनी आपल्या धर्मात सन्मानाने सामावून घेतले. कसे ते सांगण्याची आवश्यकता नाही. किरातांना महाभारतात मान आहे. त्यांच्या परंपरांचा आदर केला जातो. त्यांच्याशी सोयरिक होऊ शकते. अर्जुनाला पाशुपत अस्त्र देणारा शिव मंगोलॉइड रूपात प्रकटतो. दुर्दैवाने या शिवाच्या मंगोलॉइड चेह-याला शिल्प व चित्रकलेने कधीच स्वीकारले नाही. घटोत्कचाचे उदाहरण अत्यंत हृदयद्रावक आहे. अर्जुन वाचला पाहिजे म्हणून त्याचा बळी आवश्यक होता. आजच्या शब्दात घटोत्कचाला ‘कॅनन फॉडर’ बनवण्यात आले. पण महाभारत अशा गोष्टी लपवून ठेवत नाही.
आसामवरील सतरा इस्लामी आक्रमणे
१) १२०६ = बख्त्यार खिलजी
२) १२२७ = घियासुद्दीन तुघलक
३) १२५७ = तुघ्रिलखान
४) १३३७ = मुहम्मदशाह
५) १४९८ = पश्चिम आसाम तात्पुरता काबीज.
६) १५२७
७) १५३१
८)१५३७ = पहिल्या आहोम राजाने तिन्ही आक्रमणे परतवून लावली. आसामींचा भरपूर फायदा झाला. तोफा व बंदुका चालवायला ते शिकले.
९) १५६८ = युद्धनौकांचा पहिला हल्ला, पण धुव्वा.
१०) १६१५ = नौदल-घोडदळ-पायदळ पराभूत.
११) १६१९ = शत्रूचा तात्पुरता विजय
१२) १६३५ = हल्ला परतवला
१३) १६३५ = पुन्हा हल्ला. सराईघाटच्या लढाईत विजय
१४) १६३७-३८ = दोन्ही पक्ष थकल्यामुळे तात्पुरती सीमारेषा ठरली.
१५) १६६२ = मीरजुमलाला प्रथम यश पण शत्रूची हकालपट्टी.
१६) १६६९-७० = रामसिंगाची मोहीम. त्याच्या पदरी अपयश
१७) १६८२ = मदाधर सिंहने गोहाटीहून मोगलाना हाकलून लावले.
मध्ययुगीन भारतात मातृभूमीविषयी प्रेमाचा अभाव, दुफळी, फितूरी अशा अनेक कारणांनी आपली बरीचशी भूमी परकीयांच्या ताब्यात गेली. काही प्रांतातल्या राजांनी तर स्वतःची कातडी वाचावी म्हणून खुशाल आपल्या घरांतल्या स्त्रिया आक्रमकांना देऊ केल्या आणि मांडलिकत्व पत्करून ऐषोआरामात जीवन जगले. या सगळ्यातून सर्वात प्रबळ कुणी झाले असेल तर ते म्हणजे मुघल ! औरंगजेबाच्या काळात हिंदुस्थानच्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त भूभागावर त्यांचा कब्जा होता. अनेक राज्ये गिळंकृत केली होती. शिवाजी महाराजांनी त्याच्याशी उभा दावा मांडला असल्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नसला तरी त्याचे सावट महाराष्ट्रावर होतेच. या अशा शक्तिशाली कालखंडात मुघल पंजापासून बचावलेला एकमेव भाग होता तो पूर्वोत्तर राज्यांकडील आसाम व पलीकडचा प्रांत. आसाममध्ये राज्य होते अहोम घराण्याचे. भारतभर एवढ्या बादशाह्या फोफावलेल्या असूनही हा प्रांत अजूनही स्वातंत्र्याची चव चाखत होता. हळूहळू औरंगजेबाची वक्रदृष्टी तिकडे वळलीच. आसामला लागून असलेला बंगाल प्रांत मुघलांच्याच ताब्यात असल्याने स्वाभाविकच तिथून आसामच्या दिशेने आक्रमण झाले. मीर जुमला याने केलेल्या आक्रमणाने प्रथमच अहोमांच्या राज्याला सुरुंग लागला. मुघल आणि अहोम यांच्यामधल्या तुंबळ रणसंग्रामात गुवाहाटी मुघलांच्या हातात पडले. या घनघोर लढाईच्या वर्णनानेच या पुस्तकाची सुरुवात होते. अहोमांची राजधानी गरगाव ही गुवाहाटीच्या पूर्वेला. ‘आपल्या अंगणात मुघल फौजा येऊन थांबल्या आहेत, त्यांनी राज्य गिळंकृत न करता तह केला असला तरी त्यांचा या भागावर पूर्ण वचक असणार आहे, एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध काहीही हालचाली करणेही अशक्य आहे’ या विचारांनी राजा जयध्वजसिंह याच्यावर प्रचंड ताण आला. इतकी वर्षं अहोम राजवटीचा झेंडा डौलाने फडकत असलेल्या सर्वस्वी स्वतंत्र राज्यावर पारतंत्र्याचे गडद सावट पसरताना पाहून तो कणाकणाने झिजत गेला आणि त्यातच त्याचा अंत झाला. मृत्यूपूर्वी त्याने आपल्या चुलत भावाला सिंहासनारूढ होण्याची इच्छा वर्तवली. चुलतभाऊ चक्रध्वजसिंह राज्यपदी आरूढ झाला, तेव्हा तो मुघलांनी आपल्या पवित्र भूमीचा केलेला अपमान विसरला नव्हता. कामाख्या देवीचे मंदिर, पूर्वजांची समाधीस्थळे यांची नासधूस त्याच्या स्मरणात होती. आपले पूर्वज व पुण्यात्मे यांचे स्मरण करून त्याने एकच निर्धार केला - आपल्या भूमीवरचे दास्याचे सावट दूर करून मोकळा श्वास घेण्याचा आपल्या प्रजाजनांचा हक्क अबाधित ठेवण्याचा !
खरेतर तेव्हा त्याच्यासमोरचे संकट तीव्र झाले होते. पश्चिमेच्या इताखुलीच्या किल्यात तळ ठोकून त्यांच्या राज्यावर बारीक नजर ठेवण्याचे काम मुघल करत होते. अशा कठीण प्रसंगी सैन्याचे नेतृत्व एका युद्धनिपुण, धाडसी व सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत निष्ठावंत व्यक्तीकडे असावे असे वाटल्याने चक्रध्वजसिंहाने राज्याचा प्रधान अतन बुरगोहेन यांच्या सल्ल्यावरून राजाच्या अंगरक्षक दलाचा प्रमुख असणाऱ्या 'लचित'ला सैन्याचा 'बरफुकन' (सेनापती) बनवले. या पुढचा इतिहास अतिशय रोमहर्षक आहे. मुघलांचा डोळा चुकवून दूर रानावनात बोटी बांधणे, निरनिराळ्या जातीजमातींना स्वराज्यासाठी लढण्यास संघटित करणे, मुघलांच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकण्यासाठीच्या कठीण योजना आखणे अशा अनेक अंगांनी राजा चक्रध्वजसिंह, प्रधान अतन आणि सेनापती लचित यांनी सर्वांच्या मनात स्वराज्याची ठिणगी जिवंत ठेवली आणि योग्य वेळ येताच तुटून पडले, गनिमी काव्याचा वापर केला, काही भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली. परंतु मुघल म्हणजे एका मदमस्त गजराजासारखे शक्तिमान ! अनेक शूर सरदार, लाखांच्या संख्येने खडी फौज, अद्ययावत व मोठी जहाजं व त्यावर नौकानिपुण डच कप्तान आणि विरुद्ध बाजूला छोट्या नावा, कमी सैन्य आणि प्रचंड आजारी पडलेला सेनापती लचित बरफुकन.
कुठल्याही देशाचा वा जमातीचा इतिहास त्याच्या संस्कृतीच्या माहितिशिवाय अपुर्ण असतो. राजकिय कारणाने कालपरत्वे त्या सीमा कदाचित बदलतीलही पण सांस्कृतिक सीमा या अबाधित असतात. पश्चिम पाकिस्तानातील पश्चिम पंजाब आणि भारततील पुर्व पंजाब आणि बंगला देशातील व भारतातिल पुर्व व पश्चिम बंगाल हे याचे जिवंत उदाहरण आहे. ही एक सततची व स्वयंनिर्धारीत प्रक्रिया असते. आणि यामुळे त्या वंशपरंपरेला एक विशिष्ठ ओळख मिळत असते जेणेकरुन ती इतरांपासुन वेगळि जाणवते. हे निसर्गाने मानवजातीला दिलेले एक वरदान आहे.
अनादिकालापासुन ब्रम्हपुत्रेच्या खोर्याचा भाग असलेल्या प्रदेशाला कामरुप म्हणुन ओळखल्या जाते. याला पौराणिक आधार आहे. हे काही एक राज्य नव्हते तर भारताचा संपुर्ण इशान्य प्रदेश हा कामरुप समजल्या जातो. या आधी यास प्रागज्योतिषपुर म्हणुन ओळखल्या जात असे. याचा उल्लेख ऋग्वेद व रामायणातही आढळतो.
इथे प्रचलित असलेली गाणी आणि कथा या प्रदेशाशी निगडित आहेत. पण इंग्रज राजवटीत त्यांच्या लेखकांनी इथल्या इतिहासामध्ये स्वत:च्या स्वार्थापोटी ढवळाढवळ करुन तसेच बुध्दी भ्रंश करुन इथला इतिहासच नामशेष करुन टाकला. त्यांनी येथील लोकांच्या मनात हे भरवले की हे मुळचे इथले नसुन मंगोलीया, चीन, बर्मा आणि इतरत्र ठिकाणाहुन आले आहेत तसेच इथली प्रत्येक लहान अथवा मोठी जमात ही स्थानिक नसुन परक्या ठीकाणाहुन स्थलांतरित झाली आहे आणि त्यांचे या देशाशी काहिही घेणे देणे नाही . खरे तर एखादी गोष्ट ही इंग्रजीत सांगितली म्हणजे ती अस्सल होउ शकत नही त्यासाठी पुरावा आवश्यक असतो. त्यातील माहिती चा आधार सांगावा लागतो. त्याप्रदेशातील शिलालेख, आख्यायीका, फोल्क साँग्स, फोल्क टेल्स, धार्मिक विधी त्या जमातीतील विधी निषेध या सर्व गोष्टींमुळे त्या प्रदेशातील ऐतिहासीक घटनांची नोंद होते. कुठलाही इतिहास ज्याला या गोष्टीचा आधार नसतो तो असत्य व काल्पनिक असतो. त्यामुळे भारतिय इतिहासातील वसाहतवादाचा सिध्दांत हा वरिल एकाही गोष्टीशी साधर्म्य नसल्यामुळे व आपल्या धर्मग्रंथातील कथनाशी विसंगत असल्यामुळे फोल ठरतो. रामायण व महाभारतातील घटनामध्ये इशान्य भारतातील संबध ओतप्रोत भरले असल्याने येथील लोक हे बाहेरुन येउन स्थाईक झाले या ईंग्रजी इतिहासकारांचा सिध्दांत किती फोल आहे हेच दर्शविते.
या भागातील लोकांची चेहरे पट्टी, त्यांचे शब्द, स्वयंपाकातील भांडे किंवा शिक्के याचे साधर्म्य जर बाहेरील देशाशी असेल तर त्याचा अर्थ असा होतो की येथील लोक त्या काळात इतके समृध्द व विकसित होते कि त्यातील काही विद्वान हे जगात इतरत्र आपल्या संस्कृतीचा व शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पसरले. आपल्या देशाच्या समृध्द संस्कृती बाबत अनेक शिलालेख आपल्याच नव्हे तर परदेशात इतरत्र आढळले आहेत. ब्रिटीशांनी मोठ्या चतुराईने मोंगोलाईड' चा उपयोग चेहरेपट्टीवरुन जगातील लोकांची विभागणी करण्यासाठी केला. त्यांना या गोष्टीचा विसर पडला की उस्क्रांती च्या सिध्दांतानुसार त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितिनुसार, वातावरणानुसार लोकांच्या राहणीमानात तसेच त्यांच्या शरीरयष्टी मध्ये फरक पडत असतो. शिलाँग मध्ये असतांना मी स्वत: तिथे सदाफुलीचे झाड बघितले पण त्याची पाने आपल्या कडील झाडांसारखी मोठी नसतात तर फारच लहान असतात. तसेच पहाडात राहणारी माणसे ते इशान्य भारत असो अथवा हिमाचल प्रदेश त्याचे पाय हे आपल्या पायांसारखे लांब नसतात. सारखे पहाडी प्रदेशात राहण्यामुळे त्यांचे पाय लहान असणे तेथील वातावरणात आवश्यक असते. हिमाचल प्रदेशात गेल्यावर आपण लवकर थकतो ते आपले पाय लांब असल्याने तेच तेथील लोक सरसर चढायी चढुन जातात.
आमच्या देशावर परकियांची इतकी आक्रमणे झाली की आमचे शिलालेख आमचा इतिहास त्यात नष्ट झाला हाच प्रकार इशान्य भरतात झाला. आहोम राजवट तेथे ६०० वर्षे होती. त्याकाळातील वैभवशाली परंपरेची साक्ष देणारी अनेक ठिकाणे तिथे आहेत.
नागालाँड च्या डिमापुर शहरात एक ऐतिहसीक पार्क आहे तेथे बुध्दिबळाचे प्यादे असतात त्या प्रकारचे मोठं मोठे कोरलेले दगड त्या ठिकाणी आहेत. त्याल माज्या आठवणी प्रमाणे हिडींबा पार्क म्हणतात. त्या दगडी प्याद्याचे काय महत्व आहे याबाबत मला दुर्दैवाने माहिती मिळाली नाही. आजही तो दुर्लक्षितच आहे. आपले राज्य असतांना ही आपण इतके उदासिन आहोत तर ब्रिटिश राजवटित या भागावर काय काय अन्याय झाले असतिल याची कल्पना न केलेलीच बरी.
इतके असुनही तेथील जनजाती आज संघटित पणे आपली संस्कृती जपण्याची पराकाष्टा करित आहेत आणि त्यासाठी सर्व इशान्य भारतातील जनजाती एका व्यासपीठावर येउन जन जागृती करित आहेत यावरुन एक गोष्ट नक्किच स्पष्ट होते की बाहेरील शक्ती इमारतील रंग देउन जरी आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करित असले तरी इमरतीची रचना बदलविणे त्यांना शक्य नाही. ती रचना संरक्षीत करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना आपला खारीचा वाटा जरी आपण उचलला तरी ते एक मोठे कार्य होइल आणि भावी पिढीसाठी तो एक आदर्श होइल यात शंका नाही.
याच दृष्टीनी पूर्वांचलातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना आपल्याकडे आणून शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांचे एकूण तेरा छात्रावास चालतात. या छात्रावासातून शिक्षण घेणारे विद्यार्थी उद्याच्या शांत. एकात्म, संपन्न पूर्वांचलाचे प्रवक्ते बनतील ही अपेक्षा आहे. महाराष्ट्रात चालणार्या या सर्व छात्रावासांचे एकत्रीकरण दरवर्षी पूर्वांचल छात्र शिबीरातून होते. सैनिकसंत गुरुगोविंदसिहजींच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या गोदाकाठी वसलेल्या नंदीग्राम नगरीत यावर्षीचे शिबीर संपन्न झाले. त्यानिमित्ताने सर्व सामान्यापर्यंत हा विषय पोहचावा, त्यावर चिंतन व्हावं आणि कृतीतुन एकात्मतेचं, सामाजिक संवेदनेचं दर्शन घडावं, या उद्देशाने स्मरणिकेची निर्मीती. यातील लेख माहिती पुर्ण तर आहेतच पण तेथील संस्कृती व इतिहास याची ओळ्ख सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशाने डॉ. शरद हेबाळकर यांनी लिहिलेला एक लेख साभार, उपक्रमींसाठी देत आहे.
कामरुप आणि भगवान शिव
सार्याच देवता अत्यंत सामर्थ्यवान. प्रत्येक देवाच्या शक्तीचं वेगळं वैशिष्ट्य-सारेच महाविनाशकारी अस्त्रांनी संपन्न होते. तरीही दुष्टांचा संहार करतांना देवेंन्द्राचंही कुशल नेतृत्व कमी पडत होतं. आणि ही समस्या सुटण्याचा एकच मार्ग होता. भगवान शिव आणि जगज्जननी उमा यांना संतती झाली तरच अद्वितीय नेतृत्व देणार्या महान योध्द्याची प्राप्ती होऊ शकत होती.
योगीराज शिवांना समाधी अवस्थेतुन बाहेर आणायचं आणि शिवपार्वति मिलन घडवून आणायचं हे तर कर्मकठीण कार्य. पण दुसरा उपाय नव्हता. अखेर देवेंन्द्रानं ते साहस केलं. शिवांना समाधी स्थितीतून बाहेर काढून त्यांच्यात कामवासनेचा संचार व्हावा ही कामगीरी कामदेवांवर सोपविण्यात आली. देवेन्द्राची आज्ञा आणि सगळ्या देवांची विनवणी यामुळे या कामाच्या भयंकर परिणामाची कल्पना असूनही कामदेव आपल्या कामगिरीवर निघाला.
आपले धनुष्य सरसावून पहिला अरविंद हा कामबाण कामदेव 'मदनाने' भगवान शिवाच्या दिशेने सोडला. त्याचा काही परिणाम झाला नाही. अशोक आणि आम्र हे आणखी दोन बाण सोडले. शेवटी नवमल्लिका आणि निलोत्पळ हे प्रभावी बाण सोडले. भगवान शंकर ताडकन उठले. थरथर कापत उभ्या असलेल्या कामदेवाकडे पाहून त्यांनी संतापून आपला तिसरा नेत्र उघडला. क्षणार्धात कामदेव अग्निजाळांनी लपेटला गेला. उरला एक राखेचा ढिगारा. कामदेव मदनाची पत्नी रती अक्षरशः वेडी झाली. तिचा आक्रोश भगवान शंकरानाही पाहवेना. रती त्यांच्या पायावर कोसळली. भगवान शिवांनी तिला उठवून म्हटले. विलाप करु नकोस, कामदेवाची रक्षा घेउन प्रगज्योतिषपुरला जा, आणि आश्चर्य घडले. शिवकृपा झाली. कामदेव मदनाला तिथे नवीन रुप प्राप्त झाले. कामदेव आणि रती तिथेच राहून शिवार्चनेत मग्न झाले.
हे प्रागज्योतिषपुर म्हणजेच आजचे गुवाहाटी आणि आजचा पुर्वांचल म्हणजे कामदेव आणि रतीच्या वास्तव्यामुळे यथोचित नाव प्राप्त झालेला कामरुप. वर्तमान अरुणाचल, नागालैंड, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा मणिपुर आणि आसाम हा सारा भुप्रदेश कामरुप मध्येच होता.फार फार वर्षांपुर्वी पूर्व बिहारमधील पूर्णिष्ठा आणि बांगला देशातिल रंगपुर व मैमनसिंह जिल्हे कामरुपचेच भूभाग होते. हा कामरुप रत्नपीठ,कामपीठ, स्वर्णपीठ आणि सीदार पीठ असा चार पीठात विभागलेला होता. योगिनीतंत्रात त्याचे वर्णन आहे. कामरुप हे नाव तर प्राचीन आहे. कालिकापुराणात त्याचा उल्लेख आहे. "हाम्भुनेत्राळीनिर्दग्धः कामशम्मोर्नुग्रहात् म्हणुन हा कामरुप - भारतमातेच्या पूर्वाचल-उगवत्या सूर्याचे पहिले सोनेरी किरण इथे पडतात.
किरातांची भूमी
कामरुप ही किरातांची भुमी आहे. सारे किरात शिवोपासक आहेत. बोझे, कछारि, दिमासा, कोच, ळाळुंग, गारो, राभा, पहाडीतील खासि, जयंतिया, कार्बी, नागा, मिझो, मिकीर सार्या जनजाती किरात आहेत. किरात हा वंश नाही ते या सार्यांचे गौरवास्पद विशेषनाम आहे. कामरुप किरातांचा आहे. आणि या सार्या जनजाती कुठल्या ना कुठल्या रुपात शिवपार्वतीच्याच उपासक राहिल्या आहेत. बायौ बुढा हा बोडोंचा शिव तर शयौ बुढी ही पार्वती. बा म्हणजे पाच यौ म्हणजे तत्व. सिनू वृक्ष म्हणजे पंचत्वाचे प्रतीक. त्याच्या पाच शाखा असतात. डिमासा तर महान नदीचे पुत्र. धनशिरी नदीचे डिमासा भाषेतील नाव डिसा आहे. डि म्हणजे पाणी मा म्हणजे महान आणि सा म्हणजे संतान. त्यांचे मूळ पुरुष डिलोओब्रा आणि सांग्रीबा नद्यांच्या संगमस्थानी रहात होते.
सार्या जनजातींच्या आपल्या सुंदर श्रुती आहेत. खासी जनजाती तर अधिकच भाग्यवान आहे. मेघालयातील सोपेसेवंश पर्वतावर एक सुंदर वेल होती. इतकी उंच की धरतीमध्ये तिचे मूळ होते तर वरचे टोक थेट आकाशात गेले होते. आकाशातील देवता त्या वेलीवरुन धरतीवर यायच्या. विहार करायच्या आणि परत जायच्या. एका देवाच्या मनात स्वार्थी विचार आला. आपण राजा बनण्याच्या इच्छेने त्याने वेलच कापून टाकली. आकाशातून येणार्या जाणार्यांचा मार्ग बंद झाला. झिलय देवाला हे पसंत पडले नाही. त्याने दापाहशिन्यु या दैवी कन्येला धरतीवर पाठविले. खासी जन तिचीच संतान आहेत. खासी मध्ये एक म्हण आहे. "लौंगयेङ ना का दिंथेर" म्हणजे स्त्री पासुन ही (खासी) जनजाती निर्माण झाली. खासी आणि पूर्वांचलातील अन्य अनेक जनजातीत स्त्रीचा सन्मान आहे. या जनजाती मातृसताक आहेत.
कामरुपची धारणा किरातांनी दिली. किरातांचा धर्म तो कामरसाचा धर्म. दिसंतांची संस्कृती भारतिय म्हणूनच कामरुपची म्हणजेच पूर्वांचलाची संस्कृती भारतीय. योगिनीतंत्रात किरातांच्या जीवन पध्दतीचे वर्णन आले आहे. किरातांमध्ये संन्यासविधी नाही. दीर्घकालीन व्रते नाहीत. संसर्ग दोष नाही. म्हणजे जातीभेद नाही. मत्स्यमांस निषेध नाही. हंस, कबुतर, कासव, सुवर इत्यादी सर्व प्राणी भक्ष्य आहेत. तरीही बहुतेक सार्या जनजाती एकादशी, पौर्णिमा, व पवित्र तिथीला मांस मच्छ खात नाहीत.
किरात मुळातच अत्यंत अतिरुपशील आहेत. सत्यवादी आणि प्रामाणिक आहेत. कष्टाळू आणि दीर्घोद्योगी आहेत. शूर आणि स्वातंत्र्यपिय आहेत. पूर्वांचलाच्या सार्या जनजातीत हे गुण आहेत.
पहाडी प्रदेशातील मनू - मिझो
मिझोचा प्रदेशही पर्वतीय आहे. उत्तर दक्षिण पसरलेल्या समांतर अशा पर्वतांच्या रांगा आणि त्यातील खोल दर्या-उंच बांबूची दाट वने, मिझोचा अर्थच पहाडी प्रदेशातील मनू. 'मि' म्हणजे मनुष्य आणि 'जो' म्हणजे पहाडी प्रदेश. लुशाई आणि हमार या त्यांच्या जनजाती. लुसाई ज्या टेकड्यातून रहातात त्या डोंगराचे नाव पण लुशाईच. त्यांची पांशिअन हा देव सृष्टिचा निर्माता. त्याच्या अंकित असलेला खुआबांग हा देव त्याच्या भक्तांच्या अंगात येतो अशी त्यांची श्रध्दा आहे. भटके लुसाइ मणिपुरच्या प्रदेशात आहेत. आज बहुसंख्य मिजो ख्रिश्चन शाळेत पण त्यांची स्वतःची एक परंपरा आहे. भाषा आहे.
शूर आणि बुध्दिमान नाग
नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, लेंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा सार्या किरातांची 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचे कुलचिन्ह आहे. या प्रामाणिक , बुध्दिमान आणि शूर जनजातीचा प्रमुख देव सूर्य, पण प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाण स्वरुप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष . रैंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर चंद्र हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद हा नागभुमीचा जावई होता.
परशुराम आणि अरुणाचल
अरुणाचल देखील हिमालयाच्या पर्वतशृंखलेतच आहे. कुण्डिल आणि विदर्भ ही अरुणाचल मधील प्राचीन राज्यांची नावे. परशुरामकुण्ड अरुणाचलात आहे. पिता जमदग्नी यांच्या आज्ञेने परशुरामांनी परशुने त्याच्या मातेचा वध केला. प्रसन्न झालेल्या जमदग्नी ऋषींनी त्याला वर मागायला सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचा वर मागितला. परशुरामांची माता जिवंत झाली. पण आपण मातृहत्या केली याचे शल्य कायमच होते. परशुराम अस्वस्थ होते. आपले पाप धुवून काढण्यासाठी अखेर ते लोहित मध्ये आले. तेथील कुंडात स्नान करुन पापमुक्त झाले. आजही मकरसंक्रांतीला हजारो भाविक परशुराम कुण्डात स्नान करण्यासाठी येतात. महाभारतकालीन प्रसिध्द भीष्मकनगर ही लोहीत जिल्ह्यातच आहे. अरुणाचलमधील जनजाती सामान्यपणे नम्र आणि सरळ आहेत. काही बौध्द धर्मीय आहेत. लुंगचांग, योगली, सोसांग, रोनरोग, खेमसिंग, मोकलुंग, लोंगकी, लुंग्री इत्यादी जनजाती तांगसा आहेत. सिकिया, आ किंवा रांग काड हवा हा त्याचा सर्वश्रेष्ठ देव आहे. ते सूर्याची पण पूजा करतात.
मातृशक्ती आणी पौरुषाचं प्रतिक धान
कामरुपाच्या लोकपरंपरेचं अभिन्न अंग म्हणजे धान. ते मातृशक्ती आणि पौरुष दोन्हीचं प्रतिक आहे. धानाच्या गर्भातूनच तांदुळ बाहेर येतो. यासंदर्भात एक सुंदर जनश्रुती आहे. पूर्वी तांदळावर आवरण नव्हते. एकदा एक हावरट ब्राम्हण झाडाचे नांदूळ तसेच ओरबाडून खाऊ लागला. लक्ष्मी देवीने ते पाहिले. तिला ते सहन होईना. तिने त्यामुळे तांदळावर त्वचा चढवली. तेव्हापासून तांदूळ हातसडिने मोकळा करुन त्याचा उपयोग करु लागले. तांदूळ साठवायच्या कोठीघरात दिवा लावून ठेवतात. कोठीतुन प्रथम धान बाहेर काढतात तेव्हा एक शराईत (विशिष्ठ थाळीत) लक्ष्मीदेवीसाठी गुळ, केळी यांचा नैवेद्य ठेवतात. तांबूल ठेवतात. तांबूल कच्चा सुपारीचा असतो. कामरुपच्या स्त्रियांना तांबूल फारच प्रिय असतो.
रत्नभुमी मणिपुर
मणिपुरचा प्रदेशही मूळ किरातांचाच. कमाल, लुआंग, मोइरंग आणि मेईयेई या मूळ जनजाती मेईमेई म्हणुनच ओळखल्या जातात. तंगखुळ, काबुई, कोईराव, मारिंग या नागजनजाती या शिवाय कुकी आहेत, फुंगनाई आहेत. पाखेंबा हा सर्वश्रेष्ठ देव. तो विश्वपिता आहे. प्रत्येक गावाची एक रक्षक देवता असतेच. या ग्रामदेवतेला लासनई म्हणतात. उमंगलाई ही वनदेवता तर इमुंगळाई ही गृहदेवता. याशिवाय पानथोयबी, नौंगशाबू, युमथाईलाई अशा अनेक देवता आहेत. धार्मिक सण , उत्सव, रथयात्रा या बाबतीत तर मणिपुरी खुपच उत्साही आहेत. माड शांग (होळी) उत्सव म्हणजे तर आनंदाची पर्वणीच. मणिपुरी नृत्य ही तर मानवी सृष्टीला मिळालेली कलेची अपूर्व देण्गी आहे. महाभारत कालात अर्जुन मणिपुरला आला होता. मणिपुर्च्या राजकन्येशी, चित्रांगदेशी त्याचा विवाह झाला. बभ्रुवाहन हा त्यांचा पुत्र. माता, पिता दोघांकडुनही त्याला शौर्य, साहस, आणि बुध्दिमत्तेची देण्गी मिळाली होती.
रुक्मिणीहरण
सारा पुर्वांचल प्राचीन ऐतिहासीक घटना पौराणिक कथा, आध्यात्मिक जनश्रुती आणि सांस्कृतिक परंपरा या दृष्टीने भारतिय संस्कृतीचा अभिन्न अंग आहे. कामरुप ही जशी किरातभूमी, नागभुमी तशी असुर भुमी पण होती. असूर शुर होते , देखणे आणी सुंदर ही होते. भगवान शिवांचे उपासकही होते. पण महत्वाकांक्षी आणि विलासता यामुळे समाजाला त्रासदायक ठरत असत. महाभारताच्या काळापुर्वी महिरंग दानवाचा वंश कामरुपच्या राज्यावर होता. त्याच्यानंतर इटकासुर, शंबरासुर, रत्नसुर आणि घटकासुर हे राजे झाले. भुमीपुत्र नरक घटकासुराला ठार मारुन राज्यावर आला. मिथिलेच्या जनकाने त्याचे पालन केले होते. तो विष्णुभक्त होता. विदर्भ राजकन्या मायादेवी ही त्याची पत्नी. तिच्यापासुन भगदत्त हा मुलगा झाला. युधिष्टिराने राजसूय यज्ञ केला त्यावेळी भगदत्त हस्तिदंत, गेंड्याच्या कातडीच्या ढाली, विविध आकाराची वस्त्रे इत्यादी घेउन इंद्रप्रस्थास गेला होता. त्याच वेळी त्रिपुरा नरेश चित्रयुध्द पण इंद्रप्रस्थास गेला होता. युधिष्ठिराने चित्रासुरास सन्मानदर्शक श्वेतछत्र दिले होते. त्रिपुराच्या राजघराण्यात त्या श्वेतछत्राची पुजा होत होती.
नरकाचे दुसरे नाव भौमासुर. तो नंतर इतका दुष्ट प्रवृत्तीचा झाला की अखेर श्रीकृष्णांना स्वतःला त्याच्यावर स्वरी करुन त्याला ठार मारावे लागले. श्रीकृष्णांनी भगदत्ताला प्रागज्योतिष्च्या सिंहासनावर बसविले. नरकासुराने हजारो राजवंशी कन्यांना बंदी केले होते. त्यांना मुक्त करुन कृष्णाने प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली व त्यांचे पुनर्वसन केले. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी पूर्वांचल कन्या मानली जाते लोहित जिल्ह्यात कुण्डिल नदीच्या काठी भिष्माकाची राजधानी भीष्मकनगर होती. तेथून द्हा कि.मी वर राम्रेश्वरीचे मंदिर आहे. रुक्मिणीहरणाची घटना तिथे घडली. रुक्मीला-रुक्मीणीच्या भावाला ते पसंत नवहते. त्याने कृष्णाला अडवले. युध्दात तो पराजित झाला. श्रीकृष्णानी त्याला जिवदान दिले पण त्याचे मुण्डन करुन सोडुन दिले. या भुप्रदेशात इंदुनिशनी ही जनजाती आहे. ही जनजाती रुक्मिणीशी आपला संबंध जोडते. इंदुमिशनी आपल्या डोक्यावरचे मागचे केस काढतात. पुढच्या केसाचा बुचडा बांधून त्या त एक लाकडाचा तुकडा खोचतात. या क्षेत्रातील पुटिया राज्याचे वंशज आजही स्वत्;ला भीष्मकाची संतान म्हणवतात.
अनिरुध्द उषाचा प्रणय
दुर्योधन प्रागज्योतिषच्या भगदत्ताचा जावई. भानुमति ही त्याची पत्नी भगदत्ताची मुलगी होती. कौरव पांडवाच्या युध्दात भगदत्ताने दुर्योधन चा पक्ष घेतला. श्रीकृष्णांनी त्याच्या पित्याचा वध केलेला होता. या युध्दात भगदत्त मारला गेला. दुर्योधनाचा आणखी एक विवाह ब्रम्हपुत्रेच्या उत्तर किनार्यावरील कुरुबा येथील राजकन्या 'लक्ष्मणा' हिच्याशी झाला होता. श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युन्म याचा विवाह मामाच्या मुलीशी म्हणजे रुक्मीची कन्या रुक्मावति हिच्याशी झाला होता. अनिरुध्द हा प्रद्युन्म आणि रुक्मावतिचा पुत्र.
वर्तमान तेजपुर हे त्या काळातील शोणितपुर. बाणासुर हा तिथला राजा होता. तो शिवभक्त होता. बाणासुरची कन्या 'उषा' अनिरुध्दावर प्रेम करीत होती. उषाची चित्रलेखा नावाची सखी होति. बाणासुराचा अमात्य कुमांड याची ती मुलगी. चित्रलेखाला मायावी विद्या अवगत होती. तिने अनिरुध्दला शोणीतपुरला आणले. अनिरुध्द व उषाचा गांधर्व विवाह झाला. बाणासुराला हे समजले तेव्हा तो संतापला. त्याने अनिरुध्दाला कारागृहात डंबले. आपल्या नातवाला सोडविण्यासाठी श्रीकृष्णाना यावे लागले. बाणासुर शिवभक्त होता. कृष्णाना प्रत्यक्ष शिवाशी युध्द करण्याचा प्रसंग आला. या सार्या घटनांशी संबंधित स्थाने आजही तेजपुरमध्ये दाखविली जातात.
कामरुपच्या इतिहासाची अखण्डता
महाभारत काळापासुन कामरुपच्या इतिहासाची अखण्डता लक्षात येते. भौमासुर( नरकासुर) पासून १८ पिढ्याम्ची माहिती मिळते. त्यानंतरची माहिती उपलब्ध नसली तरी एका सुबाहू नामक राजाला ठार मारुन त्याचा मंत्री सुपवी हा राजा झाला. त्याने 'बर्मा' राजवंशाची स्थापना केली. सातव्या शतकातील प्रसिध्द राजा भाल्करबसी त्याचा वंशज होता. डिमापुर येथील हैडम्ब वंशाची १८० पिढ्यांची वंशावाळ उपलब्ध आहे. भीमाने हिडिम्ब या असुराशी युध्द करुन त्याचा वध केला. त्याची बहीण् हिडिंबा शूर होती. सदगुणी आणी सुंदर होती. भीम आणी हिंडींबा यांचा मुलगा घटोत्कच याच्यापासुन हैडम्ब वंश सुरु झाला. घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक हाही अत्यंत शुर होता. श्रीकृष्णांनी नरकासुराशी युध्द केले त्यावेळी त्याचा अमात्य मूर यालाही मारले. मूरची कन्या मौर्वी पण शूर होति. तिचे दुसरे नाव होते कामकण्टकटा. आपल्या पित्याच्या वधाचा सुड घेण्यासाठी ती स्वतः रणांगणात उतरली. अखेर कामाख्या देवीच्या मध्यस्थीने युधद थांबले. देवीच्या साक्षीने भीम पुत्र घटोत्कच आणि मौर्वी यांचा विवाह झाला. बर्बरिक मध्ये या दोघांचेही शौर्य एकवटले होते. भारतिय युध्दाचे वेळी त्याने म्हटले होते. "जो पक्ष पराजित होताना दिसेल त्याच्याकडुन मी लढेन व एकच दिवसात युध्द जिंकून देईन. अखेर श्रीकृष्णांनी भेदनीतीचा अवलंब करुन त्याचा नाश केला.
पूर्वांचलाचा जावई - अर्जुन
अर्जुनाच्या तर तीन पत्नी पूर्वांचल कन्या होत्या. मणिपुरची राजकन्या चित्रांगदा हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. तिच्यापासुन बभ्रुवाहन हा मुलगा झाला. दुसरी पत्नी होती उत्खुषी ती नागकन्या होती. तिचा पुत्र इरावान. जयंतीया हे स्त्री राज्य होते. अर्जुनाशी जयंतीयाची शूर राजकन्या प्रमिला हिने युधद् केले. त्या प्रसंगातून त्यांचा विवाह झाला. पूर्वांचलातील हे सारे संबंध कुरु वंशाशी संबंधित आहेत.सार्या जनजातींचे क्षत्रियत्व, शौर्य, स्वतंत्र वृत्ती यांचाच तो इतिहास आहे.
स्वतंत्र पूर्वांचल
त्यामुळेच मुस्लीम आक्रमकांशी शेकडो वर्षे संघर्ष करुन पूर्वांचल स्वतंत्र राहिला. बंगालपर्यंत धडक देणार्या बाख्तियार खिलजीचा सर्वनाश ब्रम्हपुत्रेच्या तीरावरच झाला. ब्रम्हपुत्रेच्या उत्तरेस 'कानाइ बरसी बोरा' येथील १३ व्या शतकातील शिलालेख त्यांची साक्ष देतो. या शिलालेखात म्हटले आहे.
शके तुरग युक्मेशे मधुमास त्रयोदशे - कामरुपे समागत्य तुरस्कः क्षयमाणयु:
(शके ११२७(सन १२०६)मध्ये चैत्र त्रयोदशीला तुरुष्कांचा विनाश झाला.) सतराव्या शतकापर्यंत हे संघर्ष चालू होते. अहोम वंशी राज्यांचाही यात महत्वाचा वाटा होता. १६८२ मध्ये झालेल्या संघर्षात प्राप्त झालेल्या तोफेवर असाच एक महत्वपुर्ण लेख आहे. त्यात म्हटले आहे.
"श्री श्री स्वर्गनारायणदेव गदाधरसिंन यवनं जिला गुवाकहृद्यामिदम् प्राप्तं शके १६०४
((१६०४ म्हणजे सन १६८२ मध्ये यवनांना (मुस्लिमांना) जिंकून ही तोफ प्राप्त केली)
ब्रिटीशांबरोबर पूर्वाचलातील जनजातीच्या राज्यांनी आणी वनवासी बंधुंनी केलेला संघर्ष हेही भारताच्या इतिहासातील एक सुवर्णपानच आहे.
परिणामस्वरुप पूर्व पाकिस्तानातून घुसखोरी ही चालू राहिली. देशाची सुरक्षितता कुठल्या थरापर्यंत संकटात आली हे या एकाच वस्तुस्थिती वरून लक्षात येईल की जेव्हा चीन ने १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले तेव्हा बहुतांश घुसखोर लोकांनी त्यावेळी पाकिस्तान चा ध्वज फडकवला. या घटनेमुळे प्रिव्हेंशन ऑफ इनफिल्ट्रेशन या नावाने एक योजना तयार करण्यात आली. या योजनेत ट्रीब्युनल द्वारे नैशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स, १९५१ च्या आधारे घुसखोरांना हुडकून काढण्याची व्यवस्था होती. हि योजना तत्कालीन मुख्यमंत्री श्री बि. पी. छलिया यानी सक्षम पणे अंमलात आणली. १९६४ ते १९७० या काळात २,४०,००० घुसखोर शोधून काढण्यात आले. तसेच अजून २०८०० घुसखोरांना १९६७ ते १९७० दरम्यान हुडकून काढण्यात आले. पण दुर्दैवाने नंतर कोत्या राजकीय वृत्तीचा खेळ सुरु झाला. श्री फकरुद्दिन अली अहमद यांच्या नेत्रुत्वाखाली आमदारांच्या एका गटाने असा प्रसार सुरू केला की अशा कृती ने काँग्रेस पक्ष आसाम मध्ये च नव्हे तर संपुर्ण भारत्तात मुस्लीम वोटांपासून वंचित होईल. आणि शेवटी वोट बैंक राजकारणाचा विजय झाला. प्रिव्हेंशन ऑफ इंफिलट्रेशन योजना सोडून देण्यात आली आणि ट्रिब्यूनल बरखास्त करण्यात आले. हि कृती म्हणजे घुसखोरी समर्थकांचा विजय होता.
२४-२६ आक्टोबर १९७८ रोजी उटकंमंड येथे मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्य निर्वाचन आयुक्त श्री एस. एल शकधर यांनी खालील विधान केले होते.
१९६१ च्या तुलनेत १९७१ मध्ये आसामच्या लोकसंख्येत ३४.९८% वाढ झाली असून या वाढीचे मुख्य कारण शेजारी देशातून होणारी घुसखोरी आहे. १९७१ च्या तुलनेत १९९१ मध्ये ही वाढ ५२.४४ इतकी होती आणि परदेशीय नागरिकांचे प्रमाण हे स्थानीय लोकांच्या तुलनेत सतत वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणुक आतुक्तांनी भारत सरकारकडे अशी शिफारस केली की या घुसखोरांची निश्चिती करण्यासाठी भारतीय रहिवाशांना ओळख पत्रे देण्यात यावीत पण या शिफारसीकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आसामी जनतेच्या असंतोषात भर पडली.
मार्च १९७९ मध्ये मंगलडोई लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या वेळी मुख्य निवडणुक आयुक्तांनी राज्य सरकारला या मतदार संघाची मतदार संघाची यादी दुरुस्त करण्याचे आदेश दिले. ट्रिब्यूनल ला या मतदार संघात ४५००० घुसखोर आढळले होते. ही वस्तुस्थिती उघड झाल्याने आसामची जनता संतापली. त्यांच्या मते जर एकाच मतदार संघात जर इतके घुसखोर आढळले आहेत तर संपूर्ण आसामात ही संख्या लाखोंच्या घरात जाईल. या सर्वावर कळस म्हणजे सत्तेत असलेल्या घुसखोर समर्थकांनी तत्कालीन बोर्बोरा मंत्रिमंडळ पाडले. त्यावेळी केंद्रात असलेल्या मोरारजी देसाई सरकारने देखिल या बाबत काहीच कृती केली नाही. परदेशीय नागरिक देशातच राहिले आणि मतदार यादीत देखिल कायम राहिले.
सप्टेंबर १९७९ मध्ये गोलप बोर्बोरांचे मंत्रिमंडळ गडगडले. त्यानंतर लगेचच आसाम मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. आणि १९७९ या मतदार यादीनुसार लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. या सर्वांचा परिणाम म्हणजे आसामी जनतेत असंतोषाची ठिणगी पडून आंदोलनाची सुरुवात झाली.
जानेवारी १९८० मध्ये इंदिरा गांधी सरकारसोबत ऑल आसाम स्टुडंटस युनियन च्या वाटाघाटी फसल्या आणि आसामध्ये हिंसा, अत्याचार आणि दंगलीच्या हिंसक पर्वाला सुरुवात झाली. तेलाची वाहतूक बंद करण्यात आली रेल्वे लाइन उखडण्यात आल्या रेल्वे पुलांना उध्वस्त करण्यात आले, अपहरण आणि हिंसेला उत आला. १९८३ चे निल्ली व गोहपुर मधील कुप्रसिद्ध हत्याकांड देखील याच दरम्यान झाले.
या दरम्यान देखिल केंद्र सरकार आपले कोते व्होट बैंक राजकारण सोडण्यास नाखुष होते. आणि बेकायदेशीर नागरिकांना कायदेशीर संरक्षण देण्याची केविलवाणी धडपड करतानाच दिसत होते. १९८३ मध्ये दि इल्लिगल (डिटरमिनेशन बाय ट्रिब्युनल) कायदा पास करण्यात आला. हा कायदा अशा प्रकारे करण्यात आला की त्याद्वारे घुसखोरांना हुडकून काढणे व त्यांची परत मायदेशी पाठवणी करणे अतिशय कठिण झाले.
साभार - श्री जगमोहन यांचे नॉर्थ ईष्ट त्रैमासीक मधील लेखावरुन.
आसाम, नागालैंड, त्रिपुरा, मणीपुर, मेघालय, मिझोराम, व अरुणाचल प्रदेश हा प्रदेश सर्वसाधारण पणे ईशान्य भारत संबोधल्या जातो. सिक्किम व पश्चिम बंगाल चा दार्जिलींग जिल्हा जरी भौगोलीक दृष्ट्या इशान्येस असला तरी त्याचा इशान्य भारत या सज्ञेत अंतर्भाव होत नाही. नॉर्थ इस्ट इंडिया ख्रिश्चन कौन्सील मात्र वरील संपुर्ण भुभागाचा ईशान्य भारतात समावेश करते. मणीपुर व त्रिपुरा राज्य वगळता इतर संपुर्ण भाग पुर्वी आसाम राज्य म्हणुन ओळखला जात असे. त्रिपुरा चा अपवाद वगळता सर्व भाग हा डोंगरांनी व्याप्त आहे. भारताची ही राज्ये म्यानमार, बांगला देश, चीन व तीबेट या देशांच्या सीमांना लागुन आहेत.
गेल्या १०० वर्षात या राज्यांच्या लोकसंख्येच्या धार्मीक प्रोफाईल मध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. या काळात ख्रिश्चन धर्मातरणाच्या तीव्र चळवळीला वेग आलेला पहावयास मिळतो. खरे तर काही राज्ये संपुर्ण पणे ख्रिश्चन झालेली आढळतात या भागात १९०१,१९५१(स्वातंत्र्य प्राप्तीनंतर) व १९६१ मध्ये ख्रिश्चन लोकसंख्येची टक्केवारी पुरेशी बोलकी आहे
१९०१ ------------ १९५१---------------- १९६१
अरुणाचल प्रदेश Not Available -- 0.051 ------------ 10.29
आसाम ----------- 0.40 ------------ 2.00 ---------------- 3.32
मणीपुर ---------- 0.016---------- 11.84 ------------- 34.12
मेघालय ------------6.16 ----------- 24.66 ------------- 64.58
मिझोराम ----------0.05 ------------ 90.52 ------------- 85.73
नागालैंड -----------0.59 ------------ 46.05 ------------- 87.47
त्रिपुरा ---------------0.08 -------------- 0.82 -------------- 1.69
ख्रिश्चन मिशनरींनी आपल्या सोबत शिक्षण व इतर नागरी सुविधा आणल्या हे जितके खरे असले तरी, जगातल्या अनेक भागात त्यांनी त्या भागातली जीवनशैली, शेकडॉ वर्षापासुन चालत आलेल्या परंपरा, आचारविचार, व तिथले ज्ञ्यान याचा देखिल समुळ नाश केला. त्यांनी तेथील लोकांचा आपल्या धर्मावरचा अनादर वाढवुन पश्चिमेकडिल परक्या संस्कृती कडे त्यांना आकर्षित केले. इशान्य भारतात त्यांनी नविन ख्रिश्चन झालेल्यांना त्यांच्या ख्रिश्चनेतर बांधवाच्या विरुधद लढ्यासाठी उभे केले. या दुफळीमुळे ह्या धर्मांतरीत झालेल्या जमाती भारतीय समाजापासुन दुरावल्या व त्या ख्रिश्चन मिशनर्यांच्या हातचे बाहुले बनल्या. भारतातील बहुतांश मिशनर्यांनी फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचाच प्रयत्न केला. येथिल धर्मांतरीत जमातीना देशाबद्दल अभिमान बाळगणे तर सोडाच देशातुन फुटण्याबाबतच चिथावणी दिली जाते. आज ख्रिश्चन अतिरेकी ख्रिश्चन होण्यास नकार देणार्या लोकांना बंदुकीच्या जोरावर धर्मांतरण करण्यास भाग पाडण्यात धन्यता मानतात.
इशान्य भारतात सर्वप्रथम प्रवेश चर्च चा झाला नाही तर ब्रिटिश प्रशासनाचा झाला. अमेरिकन बाप्टिस्ट मिशन हे सुरुवातीला ब्रम्हपुत्रेच्या खोर्यापुरतेच सिमीत होते व त्याचा प्रवेश नागा हिल्स मध्ये १८७२ मध्ये ब्रिटिश सरकार चे प्रशासन तेथे आल्यानंतर झाला. मणिपुरच्या आदिवासी भागात पहिले ख्रिश्चन मिशन, अमेरिकन बाप्टिस्ट १८९४ मध्ये म्हणजे मणीपुरमध्ये ब्रिटिश प्रशासन तिथे आल्यानंतर तीन वर्षानंतर आले. १८६६ मध्ये गारो हील्स मध्ये ब्रिटिश प्रशासन आले व त्यामागोमाग अमेरिकन बाप्टिस्ट १८६७ मध्ये प्रवेश करते झाले. मिझो हिल्स मध्ये ख्रिश्चन मिशनरी १८९० मध्ये ब्रिटीश प्रशासन आल्यानंतर प्रवेश करते झाले. कैथोलीक मिशन चा प्रवेश गारो हील्स मध्ये १९३० मध्ये गवर्न्रर मायकेल कीन यांच्या मदतीने सुकर झाला. एका जुन्या ख्रिश्चन इव्हीन्जीलीस्ट च्या म्हणण्यानुसार त्याकाळी तेथे ख्रिश्चनिटीला इतका तीव्र विरोध होता की धर्म प्रचारकाला गावात राहण्यासाठी जागा मीळणे व जेवण देखील मिळण्याची मारामार होती तसेच गॉस्पेल शिकवण्यासाठी जागा ही मिळत नसे. त्यावेळी ग्राम प्रमुखाने(गाव बुढा) यांची जागेची सोय केली. हा ब्रिटीश प्रशासनाकडुन नियुक्त असे त्यामुळे गावकरी त्यावर आक्षेप घेउ शकत नसत.
१८२२ चे सुमारास सर्वप्रथम कुच बिहार चा गवर्नर डेव्हीड स्कॉट च्या मेंदुत आसाम मधील गारो हील्स च्या लोकांचे ख्रिस्तीकरण करण्याची कल्पना आली. त्याने तात्कालीन सेक्रेटरी टू गवर्नमेंट बेली ला लिहीले." I am satisfied that nothing permanently good can be obtained by other means (than sending a missionary) and that, if we do not interfere on behalf of the poor Garo, they will soon become Hindu or half-Hindu." यावर बेली ने तितक्याच उत्साहपुर्वक उत्तर पाठविले त्यात शेवट त्याने असे लिहीले "I do not think the favorable opportunity for making this interesting experiment should be lost. ब्रिटीश राजवटीत ख्रिश्चन धर्माप्रचारकांना मानव जातीचे साम, दाम, दंड भेद या सर्व मार्गाने धर्मांतरण घडवुन आणण्याचा जणु परवानाच मिळालेला होता.
ख्रिश्चन धर्माप्रसारकांनी इशान्य भारतात असा प्रचार सुरु केला की येथील जनजातीला कुठलाच धर्म नाही. खरे तर या जनजातींची निसर्ग पुजेवर असिम श्रध्दा होती आणि आहे. त्या जनजातींचा आत्म्याच्या अमरत्वावर व मनुष्याच्या पुनरजन्मावर विश्वास आहे. तसेच त्यांच्यातील धार्मीक विधी त्यांचे धर्मगुरु करतात. जसे खासी मध्ये लिंगडोह, आओ मध्ये पुतीर, मीझो मध्ये पुयीथॉम, गारोमध्ये कमल नोक्मा.
आद्य वसाहतकार जे. एच लोरेन याने तर गारो मिझो मानत असलेले देव व जिझस ख्राईस्ट हे जणु एकच आहेत हे निरनिराळ्या उदाहरणावरुन पटवुन भ्रम निर्माण करण्याचे कार्य केले.आजही धर्मांतरण करतांना ते जनजातीच्या श्रध्दा स्थानाला जिझस सोबत सरमिसळ करुन त्यांना भ्रमीत करतात. आसामच्या संत सनारदेवांच्या लोकप्रिय बारगीतामध्ये राम व कृष्णाच्या नावाऐवजी जिझसचे नाव टाकुन ते प्रचलित करण्याचा उपद्व्याप केला होता. स्थानिक वैष्णव सभेनी यावर तिव्र आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी तो प्रकार बंद केला.
स्थानिक चर्च मध्ये चमत्कार पेटी ठेवणे हा तर तेथील नियमीत प्रकार आहे. गावातिल लोकांना आपल्या मनोकामना लिहुन त्यात टाकण्यात सागितले जाते. कुणी कर्ज, पक्के घर तर कुणी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे अशा गरजा लिहून टाकतात. काही आठवड्याने त्यांना त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याइतके पैसे देण्यात येतात. साहजिकच संपुर्ण कुटुंब च्या कुटुंब धर्मांतरित होते.
संपुर्ण नागांना ख्रिश्चन करण्यामध्ये तेथे पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात हे मुख्य धोरण होते. रोमान कैथोलिक ख्रिश्चन हे प्रोटेस्टंट ब्रिटिशांच्या काळात नागालैंड मध्ये प्रतिबंधित होते. पण स्वातंत्र्य प्राप्तिनंतर ते देखील नागालैंड मध्ये प्रवेश करते झाले. त्यांच्या धर्मांतरणाच्या यशाची किल्ली म्हणजे त्यांचे शिक्षण विषयक धोरण होते.Father Thomas Menamparambil लिहीतात :- "शिलांग, गुवाहाटी व दिब्रुगड येथील boarding houses नी या प्रदेशाच्या धर्मांतरणात प्रमुख भुमिका पार पाडली. त्यांनी उत्तम प्रशिक्षीत धर्म शिक्षक आणी lay leaders तयार केले. दरवर्षी मोठ्या संख्येत जेष्ट विद्यार्थी निवडुन त्यांना बाप्तिस्मा देण्यात येत असे. आणि याच तरुण विद्यार्थ्यांच्या मदतीने गारो हिल्स, नागालैंड, मणिपुर आणी काहि प्रमाणात मिझोराम मध्ये चर्च ची निर्मीती करण्यात आली.
धर्मांतरणाचे कामाच्या सुरुवातीला त्यांनी जनजातीला रोमन लिपी दिली. सुरुवातीला खासि व गारो ही भाषा बंगाली/आसामि या लिपित लिहीली जात असे त्याबदल्यात ती रोमन लिपीत लिहीण्याचे आवश्यक करण्यात आले व त्याचाच प्रसार करण्यात आला व त्यांना बायबल चे साहित्यच सहज पणे उपलब्ध करण्यात आले. १९७० पासुन चर्च ने उघडपणे आसामच्या त्रिपुरातील व बोडो जनजातींसाठी रोमन लिपीचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. तेंव्हा त्रिपुरा सरकार मधील दोन मर्क्सिस्ट मंत्र्यानी या चर्चच्या उघड कृतीला जातीय राजकारण म्हणुन तिव्र विरोध केला. पण चर्च ने रोमन लिपी लादण्यासाठी बंदुकीचा देखील वापर केला. २१/८/२००० रोजी बोडो साहित्य सभेचे अध्यक्ष श्री बिनेश्वर ब्रम्ह यांची चर्च पुरस्कृत National Democratic Front of Bodoland च्या अतिरेक्यांकडुन हत्त्या करण्यात आली. त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी बोडों भाषेसाठी देवनागरी चा पुरस्कार केला. आज मणीपुर सोडल्यास सर्व इशान्य भारतातील राज्यांची अधिकृत राजभाषा ही इंग्लीश आहे याची नोंद घेतली पाहिजे.
ख्रिश्चन धर्मांतरणानंतर या जनजाति चे लोक आपल्या स्थानीक उत्सवापासुन स्वत:ला दुर ठेवतात कारण हे उत्सव आता त्यांचे नाहीत असे ते मानतात किंबहुना हे त्यांच्या मनात बिंबवल्या गेले आहेत. यामुळे आज मेघालयातील ख्रिश्चन खासी हे त्यांच्या सद सुक मीन्स्तेम उत्सवात किंवा नॉन्गक्रेम उत्सवात भाग घेतांना दिसत नाहित. अरुणाचल प्रदेशातील धर्मांतरीत जनजाती त्यांच्या शोलुंग किंव मोपीन उत्सवापासुन दुर राहतात किंवा त्यांना तेथे जाण्यापसुन मज्जाव केला जातो. गारो धर्मांतरीत ख्रिश्चन त्यांच्य पारंपरिक वांगला नृत्य उत्सवात भाग घेत नाहीत. हा प्रकार या प्रदेशातील संपुर्ण जनजाती ख्रिश्चन धर्मांतरीत झाल्या आहेत तेथे प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे आचार विचार , त्यांची नावे देखील इंग्लीश असतात, वेषभुशा देखील ते पाश्चीमात्यां प्रमाणे करतात. इतकेच काय पण संगीत देखील पाश्चात्यच असते. त्यांची नावे देखील गमतीदार असतात जसे -first born, last born, Tractor, Engine.etc.
१९६२ पर्यंत ख्रिश्चन धर्मांतरणाची धामधुम ही अरुणाचलात नगण्य होती किंवा अजिबात नव्हती असे म्हटले तरी वावगे होणार नाही. मात्र ही अराष्ट्रीय व फुटिरतावादी तत्वे विभिन्न नावानी व वेगवेगळ्या स्वरुपात निरनिराळ्या माध्यमाद्वारे आसाम-अरुणाचल सिमे वर कार्यरत होती. पण हळुह्ळु व गुप्तपणे त्यांनी अरुणाचल प्रदेशात आपला कली प्रवेश करुन घेतला. या कामी.त्यांनी अरुणाचलचे विद्यार्थी जे आसाम व मेघालयातील मिशनरी शाळेत शिकत होते व तेथे ख्रिश्चन झाले द्या, त्यांची मदत घेतली. १९७० पर्यंत आसाम-मेघालय सीमेवरील राज्याच्या ८ टक्के लोकांना ख्रिश्चन करण्यात त्यांना यश आले होते. तरि अरुणाचल प्रदेशात त्यांना मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करण्यात यश आले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गैर - अरुणाचली लोकांना या राज्यात प्रवेशासाठी सरकारने घातलेले इनर लाईन परमीट चे प्रतिबंध. तरी देखिल अरुणाचलात चर्च चे स्थानीक लोकांमध्ये असलेले पगारी दलाल व भरपुर पैशाचे आमीष यामुळे अरुणाचल मध्ये धर्मांतरण हे वेगाने नसले तरी संथ गतीने सुरुच आहे.
छळवणुक व पिळवणुक व इतर धाक दपटशा या द्वारे चर्च चे धर्मांतरण हे अव्याहत सुरु आहे. एखाद्या कुटुंबात धर्मांतरीत न झालेले सदस्यांचे जमिनीचे वाद धर्मांतरीत झालेल्या सदस्यासोबत तिथे कायम असतात. त्यामुळे त्याचि परिणती कलहात होत असते, तसेच कुटुंबातील जेष्ट सदस्याचे निधन झाले असल्यास त्याचे दहन करायचे की ख्रिश्चन परंपरेने करायचे हा वाद देखील असतो अशे अनेक वाद व त्याचे संघर्षा त झालेल्या रुपांतराला antiChristian म्हणुन प्रसिध्दी माध्यमात भरपुर प्रसिध्दी दिली जाते. वास्तवीक हे वाद कौटुंबीक स्वरुपाचे असतात. पण त्याचा लाभ मात्र लगेच ख्रिश्चन चर्च उकळते.
The National Socialist Council of Nagaland (NSCN), या अतिरेकी संघटनेचे दोन गट आहेत. या दोन्ही गटाचे प्रमुख हे ख्रिश्चन आहेत. आणी या दोन्ही गटांना चीन मधील World Council of Churches,ही धर्मप्रसारक संस्था शस्त्रे व दारुगोळा पुरविते. NSCN चे कार्यालये न्युयॉर्क, जिनेवा व हेग येथे असुन या कार्यालयावरील बोर्ड वर Peoples Republic of Nagaland चे चिन्ह असते. या संघटनेने दोनदा संयुक्त राष्ट्र सभेत स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आहे. NSCN चे स्वतंत्र सरकार नागालैंड मध्ये कार्यरत आहे. आणी हे सरकार स्थानीक लोकांकडुन पैसे गोळा करते. सरकारी कर्मचार्यांच्या वेतनातुन एक तृतियांश हिसा वितरणाच्या अगोदर "नागालैंड टैक्स" म्हणुन वसुल केल्या जातो. या संघटनेने अमाप पैसा पिळुन काढल्यामुळे नागालैंड मधील बहुतेक बैंकानी आपल्या शाखा येथुन बंद केल्या.. या अनधिकृत सरकारच्या लेटर हेड व स्टैंप वर "Nagaland for Christ" असे लिहिलेले असते..याभागातील बहुतेक अतिरेकि संघटना या याच धर्तीवर कार्यरत असतात. इशान्य भारतातील चर्च देखील सिमावर्ती तस्करी व बनावट नोटाच्या व्यवसायाशि निगडीत असल्याबद्दल प्रसिध्द आहे. डिसेंबर १९९८ मध्ये बेडांग तामजेन नावाचा जेमीनाग धर्मप्रसारकास बनावट नोटा बनविण्यासंदर्भात अटक झाली होती.
त्रिपुरा येथील बाप्टिस्ट चर्च ची स्थापना ६० वर्षापुर्वी न्युझीलंड च्या धर्मप्रसारकानी केली होती. १९८० पर्यंत काही हजारच धर्मांतरण होउ शकले. तेंव्हा तेथील हिंदू व बौध्द धर्मीय जमातींचा सफया करण्यसाठी एक मोठ्या प्रमाणात वांशीक दंगा पधदतशीर पणे येथील चर्च ने अमलात आणला. हजारो स्त्रियांवर अतिरेक्यांकडुन बलात्कार करण्यात आला व तितक्याच स्त्रीया पळवण्यात येवुन त्यांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात बाटविण्यात आले. या अतिरेक्यांना आस्ट्रेलीया व न्यु़झीलैंड येथील अतिरेकी ख्रिश्चन गटांकडुन लष्करी मदत मिळाली. या अतिरेक्यांची अविरत देवाणघेवाण ही इस्लामीक अतिरेक्यांशी व आय. एस.आय.सोबत सुरु असते. त्यांच्याकडुन त्यांना बांगलादेश सीमेवरुन शस्त्र पुरवठा देखील होत असतो.
त्रिपुरा राज्याच्या एकुण लोकसंख्येपैकी ३० टक्के लोक हे जनजातिचे आहेत व त्यातील १० टक्के हे १९९१ पर्यंत ख्रिश्चन झालेले होते. ह्या धर्मांतरीत झालेल्या जमाति हिंदु जनजातींना जबरदस्तीने ख्रिश्चन करण्यास प्रवृत्त करीत असतात. आणि या कामी ते National Liberation Front of Tripura (NLFT) ची मदत घेतात. एन.एल.एफ.टी हा एक ख्रिश्चन अतिरेकी गट असुन त्याचि स्थापना डिसेंबर १९८९ मध्ये झाली. या गटाच्या वरीष्ट पातळीवरील फळीतील ९० टक्के लोक हे ख्रिश्चन आहेत. NLFT चे संबंध हे पाकिस्तानच्या ईटर सर्विसेस इंटलीजन्सेस एजेन्सी (ISI ) external intelligence agency आणी तीची बांगलादेश मधील शाखा, Directorate General of Field Intelligence (DGFI) यांच्याशी आहेत.
१९९७-९८ मध्ये NLFT चे पुढारी ISI कडुन प्रशिक्षण व शस्त्रे मिळविण्यासाठी पाकिस्तानात गेल्याच्या बातम्या होत्या.. ISI ने NLFT च्या पुढार्यांच्या पासपोर्ट व विसा ची व्यवस्था केल्याचे बोलले जात होते. त्रिपुरा पोलीसाच्या हवाल्यानुसार NLFT चे संबंध हे नागालैंड स्थित National Socialist Council of Nagaland- Isak-Muivah (NSCN-IM), मणीपुर स्थीत Kanglei Yawol Kanna Lup (KYKL) आणी आसाम मध्ये कार्यरत असलेली National Democratic Front of Bodoland (NDFB) यांच्याशी होते. NLFT तिच्या स्थापनेपासुनच त्रिपुराचे ख्रिश्चन राष्ट्र स्थापण्यासाठी सशस्त्र संघर्ष करित होती. जबरदस्तीने धर्मांतरण करण्या पाठोपाठोपाठच तेथील पुजार्यांच्या हत्या, हिंदु उत्सवांवर जबरद्स्तीने बंदी, अपहरणे आणी हत्या याचे सत्र सुरु करणारी हीच संघटना होती.
सुरुवातिपासुनच बाप्टिस्ट चा वरदहस्त असल्यामुळे या संघटनेला आपला पाया मजबुत करण्यास मदत झाली तिच्या अतिरेकी कारवायांमुळे सरकारने १९९७ मध्ये तिच्यावर बंदी घातल्यावर संघटनेने आपल्या कारवाया बांगलादेश सीमेपलिकडुन सुरुच ठेवल्या. बाप्टिस्ट चर्च चे धर्मगुरु या अतिरेकी बंडखोरांना शस्त्रे व दारुगोळा पुरवितात. CRPF ने एप्रिल २००० मध्ये त्रिपुरा येथील नौपाडा बाप्टिस्ट चर्चचा सचिव नागमन्लाल हलम याला घुसखोरांना मदत करणे व मोठ्याप्रमाणात विस्फोटक सामग्री बाळगल्याबद्दर अटक केली होती. या विस्फोटकात ६० जिलेटीन स्टीक्स, ५ किलो पोटैशियम, २ किलो सल्फर आणि बॉम्ब बनविण्याची अन्य सामग्री सापडली होती. याच चर्च चे अन्य कनिष्ट सदस्यांना यापुर्वी अटक केल्यानंतर त्यांनी ही माहीती दिलि होती. हे विस्फोटक पुढे NLFT ला पुर्विण्यासाठी खरेदी करण्यात आल्याचे या सर्वांनि कबुल केले होते. जतना कोलाइ नावाच्या चर्च च्या एका अन्य अधिकार्याला अटक झाल्यावर त्याने आपण गोरिला प्रशिक्षण घेण्यासाठि NLFT base ( 8 ) या कैंप वर गेल्याचे कबुल केले होते.
वरिल सर्व बाबीवरुन हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते की बंदुकीच्या नोकावर ख्रिश्चन कन्वर्शन करणे हा बाप्टिस्ट चर्च चा एकमेव अजेंडा त्रिपुरामध्ये आहे. NLFT ने त्यांच्या अखत्यारित असलेल्या प्रदेशात हिंदुं जिवनपध्दतीचा संपुर्ण नाश व त्यांचे ख्रिश्चन धर्मांतरण हेच ध्येय ठेवले आहे.
गेल्या अनेक दशकांपासुन त्रिपुरातील स्थानिक जमातीच्या लोकांना त्यांच्या घरातुन ओढुन काढुन बळजबरीने त्यांचे धर्मांतरण घडवुन आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. जेंव्हा येथील जनजाती हिंदु उत्सवांमध्ये सहभाग घेतात तेव्हा अतिरेकी गट त्या समुहावर आक्रमण करुन त्यात सहभागि होणार्याची हत्या करवुन आणतात. त्रिपुरातील पहाडातिल जनजाती जमातिया हे मार्च मध्ये ते मानत असलेल्या त्यांच्या पारंपरिक देव गादिया याची पुजा करतात. गादिया हा भगवान शंकराचा ते अवतार मानतात. हि पुजा मार्च मधे केली जाते. अतिरेक्यांनी असे फरमान त्यावे ळी काढले की ही पुजा फक्त ख्रिस्मस लाच करावी.
ऑगस्ट २००० मध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री शातिकली महाराज यांची हत्या करण्यात आली. जमातीया जमातिचा धर्मगुरु लवकुमार जमातिया याची डिसेंबर २००० मध्ये हत्या करण्यात आली.२००१ मध्ये ८२६ अतिरेकी हल्ले करण्यात आले त्यात ४०५ लोकांची हत्या करण्यात आली व ४८१ लोकांचे अपहरण केले गेले. हे सर्व करण्यामागे असलेले कारण म्हणजे जमतिया जमात ही संघटित जमात असुन धर्मांतरणाला त्यांचा प्रखर विरोध आहे. बाप्टिस्ट चर्च त्यांचे धर्मांतरण करण्यात पुर्ण पणे अपयशि ठरली आहे.
ख्रिश्चनिटी म्हणजे प्रेम आणी अनुकंपा हा बुरखा इशान्य भारतात तरी फाटला असुन त्यांचे नग्न रुप तिथे पहावयास मिळते. सुदैवाने तेथील जनजातींना हे कळावयास लागले आहे की त्यांच्या धर्मातरणाने ते त्यांचे पारंपरिक अस्तित्वच गमावुन बसले आहेत. त्या आपल्या बांधवांना आपला सक्रिय आधार हवा आहे. आपण त्यासाठी त्यांना प्रतिसाद द्यायला हवा. त्यांच्या पाठीशी तिथे कार्यरत असलेल्या अनेक ज्ञ्यात अज्ञ्यात व्यक्तीना कोणत्याही प्रकारे आपला हातभार लागला तरी हे फाटलेले आभाळ शिवण्यास मदत होईल यात शंका नाही.
साभारःhttp://www.christianaggression.org/item_display.php?id=1141970933&type=a...
ब्रह्मपुत्रा नदीकाठ
आसाम पक्षीजीवन : blue-throated barbet निळकंठी चंडील
आसाम पक्षीजीवन : blue-throated barbet निळकंठी चंडील
आसाम पक्षीजीवन : coppersmith तांबट
आसाम पक्षीजीवन : coppersmith तांबट
आसाम पक्षीजीवन : bee-eater भृंगभक्षी
नदीकडे जाणारी पायवाट
सुआलकूचीमधले एक 'सत्र' (मठ)
लाकडावरील कोरीवकाम, सत्राची जुनी इमारत
नव्या जुन्याची जोड, रेशीम कातण्यासाठीचा चरखा.
कामाख्या मंदिर
मंदिरातील शिल्पे
मंदिरातील शिल्पे
उग्र तारा मंदिराचे तोरण
भुवनेश्वरी मंदिराजवळून दिसणारे नदीपात्र व आय आय टी परिसर
संग्रहालयाची रचना फार आवडली
संग्रहालय
उमानंद बेटावरचे सुवर्ण वानर
उमानंद बेटावरची कातळातील शिल्पे
'गामोसा'
पाट रेशमी साडी, मुगा रेशमी मेखला चादोर व इरी रेशमाची शाल
मुगा रेशमाची साडी, जरीची झगमग नसूनही अतिशय उंची व कलात्मक वस्त्र, पदर निऱ्या व अंगातली वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर. शंभर टक्के हस्तनिर्मित.
मुगा रेशमाची साडी
पाट रेशीम कलाकुसर
पाट रेशीम कलाकुसर
आसाम थाळी
काय पाहाल : बिहूचा उत्साह; खेड्यातील दैनंदिन जीवन; साधे सोपे लोकनृत्य व नृत्यप्रधान उत्सव संस्कृती, वस्रोद्योगाचे महत्वाचे सांस्कृतिक स्थान. पारंपरिक मेखला चादोर पेहेराव व त्यात मुख्य गायिकेने केलेला आधुनिक बदल; अलंकार काय ऐकाल: पेपा वाद्य, गोगोना वाद्य
आसाम रेजिमेंट गीत
काय पाहाल : आसामची व्हर्चुअल सफर, फुल स्क्रीन पहा. ती चोप्रा सोडून सगळं पहा :-) काय ऐकाल: लक्ष्मीनाथ बेझबरुआ रचित "ओ मुर आपुनार देश" हे आसामचे राज्यगीत
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला काझीरंगाच्या राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता संशोधन प्रकल्प मिळाला आणि त्या निमित्ताने मला अंदाजे एक महिना (नोव्हेंबर व डिसेंबर २०१५) आसामात राहावे लागेल अशी माहिती मिळाली. त्या दरम्यान मी तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी घ्यावयाच्या होत्या. म्हणजे माझे आवडते काम!
एकदा का पावसाळा सुरु झाला की काझीरंगा वन विभाग केवळ वन्यजीव आणि पूर व्यवस्थापन ह्या कामात गुंतून जातो. ज्याठिकाणी उन्हाळ्यात टूरिस्ट भरलेल्या जिप्सी भटकतात त्याचठिकाणी पावसाळ्यात बोटीतून पॅट्रोलिंग केले जाते. जून महिन्यापासून तर जवळपास ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण काझीरंगाचे जंगल, गवताळ पट्टे जलमय झालेले असते. काझीरंगाचे हे जंगल म्हणजे सपाट, सखल भागात असलेली दलदल आणि थोड्या उंच भागात असलेले घनदाट सदाहरित जंगल ह्याची सरमिसळ आहे.नोव्हेंबर मधील माझी काझीरंगाची भेट अगदी कडाक्याच्या थंडीत घडली. आमचा मुक्काम बोकाखात ह्या छोट्याशा शहरात होता. खुल्या जिप्सीत स्वतःला जमेल तेवढ्या कपड्यात लपेटून आम्ही सायंकाळी मुक्कामाला परतत असू.
माझा सहकारी समीर बजरू हा सस्तन प्राण्यांचा शास्त्रज्ञ आहे. तर डॉ.
स्वप्ना प्रभू एक उत्कृष्ट वनस्पतीशास्त्रज्ञ आहे. अनेकदा स्वप्ना, समीर
आणि स्थानिक चालक जून दास नेहेमी सोबत सर्वेला जात असे. समीरला दुसरीकडे
जायचे असल्यास मी आणि स्वप्ना दुसरा एक चालक सोबत घेत असू. माझ्या डिसेंबर
मधील काझीरंगाच्या दुसऱ्या मुक्कामाच्या वेळी मात्र केवळ समीर सोबत होता.
प्रत्येक वेळेस सर्वेला जंगलात जाताना जिप्सीमध्ये एक रायफलधारी जवान (कमांडो) आणि वन विभागाचा रक्षक (गार्ड) घेणे आवश्यक होते.
नियमाप्रमाणे आम्ही तो घेत असू. परवानगी असली तरीही कामाशिवाय जिप्सीच्या
खाली उतरायचे नाही असा आमचा अलिखित नियम. काझीरंगाच्या जंगलात वन्यजीवांची
खूप रेलचेल आहे. मोठ्या वन्यजिवांपैकी हत्ती, एकशिंगी गेंडा, रानडुक्कर,
रानम्हैस, वाघ, आणि बिबट या सहा वन्यजीवांपासून आपल्याला सावध राहणे आवश्यक
असते. वाघ आणि बिबट सहजपणे दिसत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल विशेष कुणी
बोलताना दिसत नाही. बाकीचे चार वन्यप्राणी तर येथे सर्वत्र मुबलक दिसतात.
मजेदार गोष्ट म्हणजे समीरने लावलेले ‘कॅमेरा ट्रॅप’ आणि पाऊलवाटेवर
उमटलेल्या पाऊलखुणा आम्हाला पुराव्यानिशी हे दाखवीत होते की ज्या भागात
आम्ही पायी भटकतोय तेथून थोड्या वेळापूर्वीच वनराज वाघाची प्रभातफेरी
झालीय.
***
एक दिवस आम्ही सर्वे करून परतत होतो. रस्त्यात एका चौकीजवळ एक हत्तीचे
पिल्लू दिसले. जिप्सी जवळ गेली तेव्हा दिसले की हत्तीचे पिल्लू साखळीने
बांधून ठेवलेले होते. जिप्सी जवळ गेली तरी ते बाजू देईना. त्याने रस्ता
अडवून ठेवला होता. गार्डने फोन करून तिथल्या चौकीदाराला बोलावले तेव्हा
कुठे ते रागावलेले हत्तीचे पिल्लू बाजूला झाले आणि त्याने आम्हाला जाऊ
दिले.
****
असेच एक दिवस आम्ही सर्वे करीत असताना एक प्रचंड हत्ती दलदलीत पडून असलेला
दिसला. पाच दहा मिनिटे थांबून आम्ही निरीक्षण केले. जमेल तशी मी छायाचित्रे
घेतली. एखादा म्हातारा हत्ती मरण पावला असावा असे आम्ही एकंदरीत अनुमान
काढले. आमचा सर्वे चालू असताना आणखी एक शास्त्रज्ञ तरुणी दूसरे संशोधन करीत
होती. तिच्या नजरेतून सुद्धा हे सुटले नव्हते. ‘संध्याकाळी परत येऊन बघते’
असे म्हणून ती आणि आम्ही आपापल्या कामावर निघून गेलो. दुसर्या दिवशी त्या
परिसरात मला एक धिप्पाड आणि चिखलाने माखलेला हत्ती दिसला. दलदलीतला हत्ती
जागेवर पडलेला नव्हता. तर असे अनुमान निघाले की हाच हत्ती काल स्वतःला
चिखलात माखून घेऊन छान लोळत झोपला होता. बाकी काही सीरियस नव्हते!
****
अतिसंरक्षित क्षेत्रात फिरत असताना एका विशिष्ट ठिकाणी मला घाणेरीची छान
फुलं आलेली झुडुपे दिसली. त्यावर भरपूर फुलपाखरांनी गर्दी केली होती. मी
चालकाला आवाज देऊन जिप्सी थांबविली. पटकन उडी मारून फुलपाखरांची छायाचित्रे
घेऊ लागलो. चालकाने हळूच जिप्सीचे इंजिन बंद केले. कमांडो आणि समीरसुद्धा
खाली उतरले. तेवढ्यात वनरक्षक ओरडला,
‘साब, हाथी!’
पुढल्या एका क्षणात आम्ही सर्वजण जिप्सित उड्या मारून बसलो होतो. कसे ते आठवत नही. सांगायचे असे की हत्तींचा कळप अगदीच जवळ पण गर्द झाडीत चरत होता. जिप्सीच्या आवाजामुळे आणि फुलपाखरांच्या नादात आम्हाला हत्तींच्या आवाजाचे अजिबात भान राहिले नव्हते.
हाऊ टु ट्रेन युवर गेंडा?
समीरला आज अगदी काझीरंगाच्या आतल्या भागात ‘कॅमेरा ट्रॅप’ लावायचे होते.
मी, समीर, जून (चालक), वनरक्षक व बंदुकधारी जवान असे पाच जण सोबत होतो.
प्रवाश्यांच्या गाड्या फिरायला राखून ठेवलेला ‘टूरिस्ट झोन’ संपला तेव्हा
तेथील रक्षकाने आमच्या कागदपात्रांची पुन्हा एकदा शहानिशा करून घेतली.
ह्याच्या पलीकडे ‘कोर झोन’मधील (अतिसंरक्षित क्षेत्रातील) वन्यप्राण्यांना
टूरिस्ट जिप्सींची जास्त सवय नसते. ते बुजरे असतात तसेच वेळप्रसंगी आक्रमक
होतात.
खूप वेळपर्यंत नोंदी घेत आम्ही मार्गक्रमण करीत होतो. मध्ये एका सपाट
गवताळ परदेशात दोन रान हेल्यांची जुंपलेली होती. पण आमची जिप्सी जवळ येताना
दिसल्यावर त्यापैकि एकाने भांडण सोडून आमच्या जिप्सीवर लक्ष केन्द्रित
केले व फुरफुरायला सुरुवात केली. जिप्सीवर चालून आल्याचे नाटक पण केले.
अर्थात आम्ही त्याच्याकडे न जाता दुसरीकडे जिप्सी वळवल्यामुळे त्याने
आक्रमक पवित्रा सोडून दिला.
काझीरंगाच्या जंगलातील टेहळणी चौक्या (चेक पोस्ट) ह्या जमिनीवर सीमेंटचे खांब बांधून त्यावर बांधलेले घर अशा स्वरूपाच्या असतात. पावसाळ्यात सगळं जलमय झाल्यावर पहिल्या मजल्यावरील वन कर्मचारी सरळ बोटीत बसू शकतात! अधिक पाणी वाढल्यास घराच्या स्लॅबवर चढून रेस्क्यू टिमला वायरलेस संदेश पाठविला जातो.
तर दुपारी आमची जिप्सी अशा एका चौकीवर पोहोचली. जिप्सीतून उतरणार तर जवळच एक धिप्पाड गेंडा फुरफुरत होता. जिप्सीमधील कमांडोने त्याला हातातली रायफल दाखविली आणि
‘जाओ उधर. चले जाओ!’
असे काहीसे आसामी भाषेत ओरडू लागला. त्याने रायफल छातीशी धरून जिप्सीतून खाली उडी मारली. लगोलग समीरने उडी मारली. आता मी आणि वन रक्षकच जिप्सित उरलो होतो. तो मला उतरायला सांगत होता. पण माझी हिम्मत होत नव्हती. चौकीवर (पहिल्या माळ्यावर) असलेले सगळे गार्ड पण मला
‘डरो मत. ओ हमारा इधरका गेंदा है. कुछ नही करेगा. उसका टेरिटरी है’.
असा धीर देत होते. पण गेंड्याने आमच्याकडे चार पावलं पुढे टाकली. तेव्हा
माझी फा.... म्हणजे फारच घाबरगुंडी उडाली होती म्हणजे टरकलीच होती म्हणा
ना.
तेव्हा माझ्या लक्ष्यात आले की गेंड्याच्या चेहेर्यावर संपूर्ण कातडे असल्यामुळे त्याचे हावभाव आपल्याला अजिबात वाचता येत नाहीत.
जिप्सितला वन रक्षक म्हणाला,
‘डरो मत. इसको अभी भगाता है’.
त्याने खिशातून बेचकी आणि छोटे खडे काढले. आता हा बेचकीने काय करणार? (म्हणून मी जीव मुठीत धरून थरथरत उभा होता, हो असेच घडले असेल कदाचित!). तर गड्याने बेचकीत खडा टाकून जोरात गेंड्यावर नेम धरून मारला. गेंडा फुरफुरत आमच्याकडे आणखी चार पावलं धावला. तोपर्यंत दूसरा खडा त्याच्या नाकाडावर आदळला होता. आता मात्र गेंडा तिरक्या चालीने आमच्यापसुन दूर पळायला लागला! युरेका!! हत्तीसारख्या धिप्पाड गेंड्याला बेचकीने घाबरवता येऊ शकतं हा मोठा शोध मला लागला होता. अरे, हे आधी माहीत असतं तर मुंबईवरुन निघतानाच एक बेचकी घेऊन नसतो का आलो. तर सांगायचे काय की, माझ्याजवळ बेचकी नसल्यामुळे मी गेंड्याला घाबरत होतो.
तरी सुद्धा मी कॅमेरा ट्रॅप लावायला समीरसोबत जाऊ शकलो नही. समीर आणि शस्त्रधारी कमांडो दूर निघून गेले होते (म्हणजे किमान शंभर तरी फूट एवढ्या प्रचंड दूर ते निघून गेले होते!). मी चौकीच्या पायर्या चढून काळ्या चहाचे भुरके घेत ‘टेरिटरी’चा मालक असलेल्या गेंडयाकडे आणि त्याच्या साम्राज्याकडे (आजूबाजूला त्याचे खूप सारे गेंडाबंधु शांतपणे चरत होते) बघत सुरक्षितपणे बाल्कनीत बसून राहिलो. नजर पोचेल तिथपर्यंत चारही दिशांना पसरलेला काझीरंगाचा गवताळ प्रदेश. मध्येच दलदली. दूर टेकड्यांवर हिरवी आणि ब्रोकोली सारखी सजलेली घनदाट सदाहरित जंगलं. समीरनी त्या दिवशी काय ‘मीस’ केलं ते मी त्याला एकदा सांगणारच आहे!!
डॉ. राजू कसंबे
मुंबई
No comments:
Post a Comment