११/११/२०११ला हा योग मैय्याने आणला.ओम्कारेश्वरपासुन परिक्रमा सुरु केली.जितेन्द्रशास्त्री गुरुजीनी सन्कल्प पुजा सान्गितली,पुजा कढई कन्यापुजन करुन नर्मदेहर केले,नगरपालिकेच्या कार्यालयातुन प्रमाणपत्र घेउन चालायला सुरवात केली.
वाटेत श्रीराम महाराज भेटले.{ गोन्दवलेकर महाराजान्चे भक्त;मैय्याच्या उत्तर किनार्यावर नावघाटखेडीला त्यान्चा आश्रम आहे.} ते म्हणाले, मोरटक्क्याला भोजनप्रसाद घेऊन येतो.पाठीवर जड पाठपिशवी,भरदुपारचे रणरणते उन पहिल्याच दिवशी दम निघाला.जैनधर्मशाळेत पोहोचेपर्यन्त सन्ध्याकाळ झाली.कबुल केल्याप्रमाणे महाराज भोजनाचा भलामोठा डबा घेउन आले छान भोजन झाले.आमच्याकडील बोजा बघुन महाराजानी काही सामान कमी करावे असे सुचवले,त्यानुसार काही सामान त्यान्च्या जवळ ठेवले.खुप दमलो होतो,सन्ध्याकाळची मैय्याची पुजारती करुन विश्रान्ती.
पहाटे उठून विहिरीवर थन्ड पाण्याने स्नान आटोपले,पुजारती करुन प्रस्थान ठेवले.रेल्वे पुलाखालुन मैय्याच्या किनार्याने वाटचाल सुरु केली.वाटेत एका भल्या माणसाने आधारासाठी काठी हवीच असे सान्गुन बाम्बुच्या काठ्या आम्हा उभयताना दिल्या.परिक्रमेत त्यान्चा खुपच उपयोग झाला.
टोकसरला गोमुखआश्रमात भोजनप्रसाद,प्रमाणपत्रावर शिक्का घेउन पुढे निघालो. हा गोमुखाआश्रम खुप सुन्दर आहे,निसर्गरम्य.येथे एका कुन्डात गोदावरी प्रकट झालेली आहे. पीतनगर,कान्करिया,मढी,अशी गावे पार करत वेळोवेळी गावकर्याकडुन होणारे आदरातिथ्य स्वीकारत सन्ध्याकाळी रावेरखेडीला श्रीमन्तान्च्या आश्रयाला पोहोचलो.श्रीमन्त थोरले बाजिराव यान्च्या समाधीचे दर्शन घेउन समोरच राहणार्या सरपन्चान्कडे आसन लावले.वान्गी-बटाटा भाजी भाकरी असे गावरान चवीचे सुग्रास भोजन मैय्याच्या क्रुपेने मिळाले.पुजापाठानन्तर गावकर्यान्बरोबर गप्पागोष्टी करुन बिनघोर झोपलो,प्रत्यक्ष पेशवे सरक्षणास असताना भीती कसली?
सान्गी गावात गावकर्यानी केलेले स्वागत स्वीकारुन पाच कि.मि.वरील बकावा या गावी आलो,या गावात शिवलिन्ग बनविण्याचे कारखाने आहेत,नर्मदेत मिळणार्या शाळिग्राम शिळेपासुन ही बनवली जातात सर्व भारतवर्षात येथुनच शिवलिन्गे पाठवली जातात.
सितारामबाबान्च्या आश्रमात गेलो,दर्शन घेउन निघणार तर महाराज म्हणाले,चहा घेतल्याशिवाय जायचे नाही. तिथे पुण्याच्या सॉ.काळेबाई भेटल्या पुण्याचे एकोणीसजण परिक्रमेत आहेत असे कळले,काळेबाईन्चे पाय सुजले होते म्हणुन त्या मागे थाम्बल्या होत्या.महाराज त्याना गाडीने सोडणार होते ह्या तीन दिवसात माणुसकीचे जे दर्शन घडले त्याने आम्ही भारावुन गेलो होतो.
बकावाहुन मर्दानाला हरिहरकुटीत पोहोचलो. मर्दाना गाव मोरध्वज राजाची राजधानी् हरिहरकुटी मैय्याच्या किनार्यावरील निसर्गरम्य आश्रम आहे.घनदाट झाडी रन्गिबिरन्गी फुलानी बहरलेला बगिचा मैय्याच्या पात्राजवळ जाण्यासाठी बान्धलेला सुरेख घाट्.आणि आतिथ्यशील सेवेकरी.खुपच छान.
२/३कि.मि. गेलो तेलिभट्यान गाव आले.मैय्याच्या किनारी सितारामाआश्रमात आलो,मोठ्यापिम्पळाच्या पारावर पाठपिशवी काढुन विसावतोनविसावतो तोच हसतमुख सिताराम बाबा पाणी घेउन आले.वयवर्षे१००च्यापुढे,कमरेला फक्त लन्गोटी.लगबगीने बाबा चहा घेउन आले,खुप बरे वाटले.चहा घेतला,थोडी विश्रान्ती घेउन २५/३० पायर्या उतरुन मैय्याच्याजवळ गेलो,छान थन्डगार नर्मदाजल.तोन्डावर मारल्यावर सारा शिणवटा क्षणात पळाला.
वर आलो तोच बाबा सदाव्रत घेऊन आले,सदाव्रतात डाळ-तान्दुळ,साजुक तूप,साखर,बिस्किटचापुडा,उदबत्या,माचिस एवढे होते.आम्हाला दोघाना स्वतन्त्र सदाव्रत दिले,मी एकच पुरे असे म्हटले तर हसुन खुणेनेच असुदे असुदे म्हणाले.त्यान्चे मॉनव्रत असते.
सितारामबाबान्बद्दल गावकर्यानी असे सान्गितले की,बाबान्चा हा आश्रम धरणाच्या डुबक्षेत्रात येतो,सरकार त्याना दुसरीकडे जागा देत आहे पैसेही देत आहे पण बाबा म्हणतात मला काय करायचे पैसे?मैय्या सर्वकाही देते.मी इथुन कुठेही जाणार नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात खुप मोठा पुर आला होता पाणी सारखे चढतच होते,बाबा पारावर रामायण वाचत होते लोकानी त्याना गावात चलण्याचा आग्रह केला पण बाबा नाही म्हणाले मैय्या जो चाहेगी वही होगा असे म्हणून तिथेच बसले नाईलाजाने लोक निघुन गेले.रात्रभर पाऊस पडतच होता,सकाळी लोक आले त्याना वाटले होते बाबान्चे काय झाले असेल कोण जाणे.बघतात तर काय, बाबा बसल्याजागीच होते रामायणाची पोथी किन्चितही भिजली नव्हती.बाबान्चे फक्त पाय भिजले होते.लोकानी विचारले कसे काय झाले? बाबा म्हणाले,मैय्या आयी;श्रीरामजीके दर्शन किये ऑर चली गयी.लोकानी हर्षभराने श्रीरामाचा आणि मैय्याचा जयजयकार केला. बाबान्च्या पायावर लोटान्गण घातले
दुपारचे ४च वाजले होते त्यामुळे सर्वानुमते पुढे जावे असे ठरले,वाटचाल सुरु झाली. ३/४कि.मि. गेलो सन्ध्याकाळ झाली होती,छोट्याशा टेकडीवर गॉदाही आश्रम होता तिकडे गेलो,नन्दनभारती महाराजाना विचारून तिथे आसन लावले.घनदाट अरण्यात निसर्गरम्य आश्रम आहे. महाराज,त्यान्च्या शिष्या नर्मदामाताजी वयोव्रुद्ध आहेत.छोटेसे शेत,गायीगुरे,काही फळाची-फुलाची बाग असे सगळे सुन्दर आहे.
आज तुलाच चुलीवर स्वयम्पाक करावा लागेल सगळे मला चिडवत होते,मैय्या आहे;देखेन्गे मी म्हटले.स्नानादि आवरुन पुजारती करुन मी स्वयम्पाक घरात गेले.माताजी म्हणाल्या,बैठो! तुम्हे आदत नही चुल्हेपर खाना बनानेकी मै बनाती हु. मी मदत करते म्हटले,कणिक मळून दिली. मला ओम्कारेश्वरला भेटलेल्या महाराजान्ची आठवण झाली,चुलीवर स्वयम्पाक करण्याची गोष्ट निघाल्यावर ते मला म्हणाले होते,बेटा! मैय्याने तुम्हारेलिये अलग काम दिया है रुग्णसेवाका चुल्हेपर खाना बनाना तुम्हारा काम नही,परिक्रमामे तुम्हे हमेशा बनाबनाया खानाही मिलेगा.आज त्याची प्रचिती आली.
पहाटे स्नान पुजारती करुन निघालो,महाराजानी सर्वाना गायीचे धारोष्ण दुध दिले ते पिउन महराज माताजीना प्रणाम करुन आमची विनोबा एक्स्प्रेस प्रस्थान करती झाली.
३/४कि.मि. चाललो असू. पायवाट जन्गलात वळली आणि व्हायचे तेच झाले,वाट चुकलो.दोनएक तास भरकटलो अभिमान;आम्ही मार्ग शोधुच हा गर्व गळून पडला,नर्मदेहर! हाक मारली,प्रतिसादही त्वरीत मिळाला हरनर्मदे! आम्ही टेकडीवर होतो,खालच्या बाजुला काही गुराखीमुले होती.त्यानी खाणाखुणानी आम्हाला खाली या म्हटले,हळूहळू टेकडी उतरून खाली गेलो.त्यानी रस्ता दाखवला त्यान्चे आभार मानुन पुढे निघालो तेलियागाव गेले अमलथा आले.फुलकुमारी पवार यानी आग्रहाने चहा दिला. त्यान्च्याकडे भारती ठाकूर यान्ची चॉकशी केली,त्या अमलथा येथेच शाळेत शिकवतात.मग भारतीताईना फोन केला त्यानी शाळेत बोलावले पण आम्ही रस्ता चुकलो आणि पुढे गेलो.भारतीताईन्चा फोन आला त्याना झालेले सान्गितले मग त्यानी लेपाघाटला थाम्बा मी येते असे म्हटले.२कि.मि. वर लेपाघाट गावात शाळेजवळ पारावर थाम्बलो.थोड्याच वेळात भारतीताई आल्या.सरकारी नोकरीत व्हालेन्टरी रिटायरमेन्ट घेउन नाशिकचे सुखवस्तु जीवन सोडुन भारतीताई येथे आदिवासी मुला-मुलीला शिकवण्याचे सेवाकार्य विनामोबदला करीत आहेत. भारतीताई,निवेदिता खान्डेकरताई,उषःप्रभा पागेताई या तिघीनी २००५मध्ये पायी नर्मदापरिक्रमा केली होती.भारतीताईन्चे नर्मदापरिक्रमा एक अन्तर्यात्रा हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
भारतीताईन्चा निरोप घेउन मरकटी-नर्मदा सन्गमाजवळ मरकटिवरील पुलावरुन महेशश्वरधरणाजवळुन शान्तिनगर मार्गे माकडखेडा येथे डोन्गरेमहाराज सदाव्रतीस्थळी आलो. पडवीत आसन लावले सदाव्रत घेउन बरोबरच्या मन्डळीनी तिक्कड[कणकेच्या जाड जाड पोळ्या] आणि डाळ केली,मिरच्या भाजुन ठेचा केला.मला चतुर्थीचा उपास होता मी शेन्ग्दाणे खाल्ले.सर्वान्चे भोजन झाल्यावर थोडी विश्रान्ती घेउन २५/३० पायर्यान्चा घाट उतरुन मैय्याच्या किनार्याने पुढे वाटचाल सुरु केली.शेतीसाठी लावलेले पाण्याचे पाइप,वायरी यान्च्या जन्जाळातुन चिखल तुडवत चालत होतो,मैय्याच्या समोरील किनार्यावर महेश्वर देवी अहिल्याबाई होळ्करयान्चा राजवाडा मन्दिरे घाट दिसत होते.मैय्याच्या सानिध्यामुळे गार वारा होता त्यामुळे ऊन जाणवत नव्हते.
थोड्यावेळाने एक छोटी पण बिकट वाट असलेली टेकडी चढुन गेलो रस्ता दिसतच नव्हता काय करावे? एक शेतकरी महिला दिसली तिने मार्गदर्शन केले त्याप्रमाणे टेकडीच्या उतारावरील मोहरीच्या शेतातुन वाट काढत उतरलो,एक छोटा नाला होता एक्मेकाना आधार देत चिखलात फसत तो नाला पार केला,बरबटलेले पाय धुवुन पलिकडली टेकडी चढलो,सन्ध्याकाळ झाली होती टेकडी उतरलो पुन्हा एक चढ होता पण वर गाव दिसत होते.ते पाहुन थकवा पळाला.ते होते बडगाव.
गावात शिरताक्षणी गावकर्यानी हर्षौल्ल्साने आमचे स्वागत केले.२/३ ग्रुप मिळूण २५/३० जण झालो होतो.मग ४/५ घरात पाहुण्यान्ची विभागणी झाली.आम्ही श्री.राधेश्याम पाटिदार यान्च्याकडे राहिलो.योगायोगाने त्यान्च्या मुलीचे सासर नाशिकला आहे.मुलीच्या सासरची मन्डळी म्हणून आमचे आदरातिथ्य खास होते.स्नानाला गरम पाणी,भोजनाला खिरपुरी अगदी थाट होता आमचा.
काही ओळखपाळख नाही केवळ मुलीच्या सासरगावचे म्हणून एवढा पाहुणचार आम्ही अगदी भारावुन गेलो.गावातील बरेचजण मुलीच्या सासरकडच्याना आवर्जुन भेटायला आले.खुप गप्पा झाल्या.
बडगावलाच पुण्याच्या भागवत पती-पत्नी,माढेकरकाका,अम्बरनाथचे श्री. गोसावी भेटले.
मैय्याकिनार्याने वाटचाल सुरु झाली साधारण तासाभराने नावडाटोलीला पोहोचलो.शालिवाहन आश्रम.शककर्ता राजा शालिवाहन,मातीचे सैन्य तयार करुन त्यात प्राण फुन्कुन त्याने शक-हुण यान्चा पराभव केला असी आख्यायिका आहे. येथेच मार्कन्डेय गुफा आहे,त्यानी येथे तप्स्चर्या केली असे सान्गतात. सध्याचे महन्त खुप आतिथ्यशिल आहेत.त्यानी नास्त्याला पोहे दिले.काही सत्सन्गही झाला.
पुढे निघालो,बुथगाव,ढालखेडा { येथे सुप्रसिद्ध सहस्त्रधारा धबधबा आहे पण आता महेश्वर धरणातुन पाणी सोडले तरच असतो. आज नव्हता.} मार्गे बलगावला मुना आश्रमात आलो. १२ वाजत आले होते.ओले कपडे वाळत घातले,भोजन प्रसादास थोडा अवकाश होता म्हणुन फिरुन आश्रमाचा परिसर पाहिला,मोठमोठी आम्ब्याची,चिन्चेची झाडे,फुलानी बहरलेला बगिचा सेवाभावी महन्त आणि त्यान्चे शिष्य सारेच सुन्दर. येथे पुण्याचे रानडे,शिरगोपीकर,श्रीमती वेलणकर श्री वेलणकर भेटले.
भोजनप्रसादाला मुगाची खिचडी गोड अदमुरे ताक असा बेत होता.दमलेला जीव त्रुप्त झाला. ३वाजत आले होते,पुढे निघालो,रोजचे ३०/३५ कि.मि. चालणे होत होते पायाना फोड आले होते त्यातील एक फुटला.म्हटले डायबेटीस आहे नसते दुखणे व्हायचे एका झाडाखाली बसलो बुटमोजे काढुन पायाचे ड्रेसिन्ग केले.आमच्या बरोबरील मन्डळी पुढे निघुन गेली. रस्ता नव्हताच आम्ही टेकडीवर होतो आमच्या डाव्या बाजुला तुरीची शेते होती,उजव्या बाजुला खाली मैय्या वाहत होती.टेकडीची माती बुलडोझर लावुन काढण्याचे काम चालु होते.रस्ता दिसतच नव्हता,नर्मदे हर! शेतात काम करणार्याने सान्गितले,मिट्टीके ढेरपरसे निचे उतरके किनारे किनारेसेही रस्ता है.ठीक है नर्मदे हर उतरलो ढिगारा ,बुटामध्ये माती भरली,ड्रेसिन्ग करायची बुद्धिच दिली मैय्याने नाहीतर फुटलेल्या फोडाचे काही खरे नसते.रस्ता कसला,नुसते खडक होते ,अस्ताव्यस्त वाढलेल्या बाभळी ,मैय्याला मिळणारे ओढे जागोजाग निसरडे झालेले होते.आणि जे व्हायचे तेच झाले एक ओढा पार करताना अस्मादिकानी लोटान्गण घातले.पाय घरुन अशी आपटले की विचारता सोय नाही.पाठिवर पाठपिशवी होती म्हणुन नाहितर फ्रक्चर स्पाइन नक्की होते.
ह्यान्च्या आधाराने कशीबशी सावरले.मैय्याजवळ जावुन चिखलाने भरलेले कपडे धुतले,हात-पाय धुतले मैय्याची प्रार्थना केली.मैय्या तुझ्या क्रुपेनेच परिक्रमा पुर्ण होईल,आम्हाला हिम्मत दे. पुढे निघालो, एकजण भेटला त्याने खडकावरुन चढुन कसे जायचे ते सान्गितले.
अकबरपुरा गाव लागले,मुस्लिम वस्ती होती पण आदरातिथ्य तेच बडगावात होते तसेच.चहा-पाणी घेउन निघालो.सन्ध्याकाळी ६ वाजता खल्बुजुर्ग येथे श्रीराम मन्दिरात पोहोचलो. महन्तानी स्वागत केले.मन्दिराचे काम सुरु आहे त्यामुळे पिम्पळाच्या पाराखाली आसन लावले.
मैय्याच्या घाटावर जाउन स्नान केले,कपडे धुतले.पुजारती केली.येथे बरेच मराठी परिक्रमावासी भेटले.बहुतेक सर्व सत्तरीच्या पुढचे पण उत्साह तरुणाना लाजवणारा.गरम गरम मुगाची खिचडी भोजनप्रसादात मिळाली. खुप थन्डी पडली होती,ओझे नको म्हणुन स्लिपिन्गबॉगज मागे श्रीराम महाराजान्कडे ठेवल्या होत्या,अन्थरायला बेडशीट आणि पान्घरायला पातळ शाल, जाम कुडकुडलो.
भरीतभर माझे पोट बिघडले,पायाचा फोड फुटल्याने आग होत होती.परिक्रमेचा फक्त एक आठवडा होत होता कशी होणार परिक्रमा पुरी? परिक्रमेला आलो हे आपले चुकले तर नाही ना? विचारान्चा गोन्धळ उडाला होता. झुन्जुमुन्जु झाले,पिम्पळावर किलबिलाट सुरु झाला.आश्रम जागा झाला,लगबग सुरु झाली.मन्दिरात काकडारती सुरु झाली,परिक्रमावासी नर्मदा स्नान उरकु लागले,ग्रुप ग्रुपने मैय्याची पुजारती सुरु झाली.आश्रमाच्या सेवेकर्यानी सर्वाना चहा दिला तो पिवून सारे पुढच्या वाटचालीला लागले.
माझी परिस्थिती अवघड झाली होती,बरोबरच्या लोकाना पुढे जायला सान्गितले,महन्त म्हणाले; इतकी घाई करण्याची खरच गरज आहे का? थोडी विश्रान्ती घ्या बरे वाटले की पुढे जा,आम्ही थाम्बलो.८/९ वाजता नास्ता करुन मी कोरा चहा घेतला. निघालो,मुम्बई-आग्रा हायवेला लागुन बालाजी मन्दिरात गेलो,इकडे मारुतीला बालाजी म्हणतात निसर्गरम्य परिसर आहे. स्वयमभू कचरेश्वराचे दर्शन घेतले.या पिन्डीवर निसर्गतः बिल्वपत्र उमटलेले आहे.
माझ्या अन्गात चालायचे बळ नव्हते,पायाला पट्टी बान्धुन मोजे घालुन बुट घातल्यावरही पाऊल टेकवत नव्हते,मन्दिरातील महाराजानी ज्यादा शहाणपणा न करता बसने बडवानीला जा असे सान्गितले.आम्ही त्यान्चा सल्ला मानला,हायवे वर बस मिळाली,सन्ध्याकाळी बडवानीला गुरुद्वारात मुक्कामाला आलो.
बडवानी जिल्ह्याचे ठिकाण आहे. मेडिकल मधुन गोळ्या आणल्या,पायासाठी मलम घेतले. दोन दिवस बडवानीलाच राहिलो.बडवानीतील वैष्णोदेवी मन्दीर,गणपती मन्दीर पाहिले. तिसर्यादिवशी ५कि.मि. वरील राजघाटला गेलो.इथे महात्मा गान्धीन्चे अस्थीविसर्जन झाले होते म्हणून हा राजघाट,पण त्यान्चे स्म्रुतीस्थळ आता डुबले आहे. एकमुखी दत्तमन्दिर आहे.तेही डुबणार आहे.अगदी बडवानी गावापर्यन्त पाणी चढणार आहे. सर्वाना पर्यायी जागा दिलेल्या आहेत.पोट जागेवर आले,पायही बरे होते उद्या पुढे निघायचे ठरवले.
परिक्रमा सुरु करण्या आधी आम्ही शुलपाणीच्या झाडीतिल घोन्गसा येथील लखनगिरिबाबान्च्या आश्रमाला भेट देण्यास गेले होतो.मोठा अवघड प्रवास होता. बडवानी ते मोरकट्टा फक्त २५कि.मि. जायला आमच्या मारुतीव्हनला ३ तास लागले होते तिथे आम्हाला नेण्यासाठी मोटरबोट आली होती.तिच्यात चढणे ही मोठी कसरत होती. पण २ तासान्चा तो प्रवास मोठा रमणीय होता.बाबान्चा आश्रमही खुप सुन्दर हा सर्व भागही सरदार सरोवराच्या पाण्यात डुबणार आहे. बाबा नर्मदापरिक्रमा करत असताना त्याना या शुलपाणी झाडीत भिल्लमामालोकानी लूटले होते,तेव्हा परिक्रमेचा विचार पुढे ढकलून लखनगिरिबाबानी येथेच वास्तव्य केले.त्यानी आदिवासी बान्धवान्साठी शाळा काढली आहे.जवळजवळ १५०० फळा-फुलान्ची झाडे लावली आहेत,शेती-भाजीपाला लागवड केलेली आहे. सायकलपम्पाच्या सहाय्याने नर्मदेचे पाणी वर खेचुन टाक्यात साठवुन कुडूभोपळ्याच्या फळाना बारीक छिद्रे पाडुन ठिबक सिन्चन करुन झाडे वाढवली आहेत.गोशाळा उभारुन मुलाबाळान्च्या दुधा-तुपाची सोय केली आहे.पाणचक्कीच्या सहाय्याने पिठाची गिरणी चालवली जाते.उत्तम सेवाकार्य.
नुकतीच नाशिकला आमच्याच एका होस्पिटलमध्ये लखनगिरिबाबाना देवाज्ञा झाली.पण त्यान्चे शिष्य नर्मदागिरिबाबा हे सेवाकार्य पुढे नेत आहेत्.आळन्दी येथील वारकरी आणि नर्मदाभक्त श्री. चन्द्रकान्त माधवराव पवार आणि मन्डळीही हे सेवाकार्य पुढे नेत आहेत्.तर सान्गायची गोष्ट अशी की,नर्मदागिरिबाबानी त्यान्ची सर्वतोपरी मदत होणार असुनही केवळ जन्गलातील वाट खुप अवघड असल्याने शुलपाणीच्या झाडीतुन परिक्रमेत न जाण्याचा सल्ला दिला होता.त्यामुळे आम्ही झाडीतिल तुलनेने सोप्या जन्गल रस्त्याने जाण्याचे ठरवले.
बडवानीपासुन ८कि.मि. बावनगजा या जैन तीर्थक्षेत्री जाण्यासाठी सकाळी ६ वाजता गुरुद्वारात गुरुग्रन्थसाहिबान्समोर माथा टेकुन निघालो. गावाबाहेर पडल्याबरोबर तुरळक जन्गल झाडी सुरु झाली. पहिले नानी बडवानी गाव लागले.एका शेतकर्याने आग्रहाने चहा दिला,तो घेउन निघालो.आता घाट सुरु झाला.पक्षान्चा किलबिलाट अॅकत,हलका गारवा अनुभवत चालताना शिणवटा वाटत नव्हता,पायाचे दुखणेही जाणवत नव्हते.९ वाजता बावन गजाला पोहोचलो.डोन्गरात बावनगज उन्चीची भगवान पार्श्वनाथान्ची मुर्ती आहे. दर्शन घेउन खाली आलो.१० वाजुन गेले होते.झाडाखाली बसुन जवळची बिस्किटे खाल्ली.आता भैरू घाट पार करायचा होता.
डोन्गरावर वनविभागाचा सुन्दर बन्गला होता,पायथ्याशी वनविभागाचे वनोद्यान होते,सुन्दर नीट निगराणीने राखलेले.पाटीगाव जवळ आले,हायस्कुल समोर प्रल्हाद प्रजापती यानी दुकानात बोलावले,चहा दिला.मनोज मालवियला फोन केला आजचा मुक्काम त्याच्या घरी असणार होता. हा मनोज स्वतःचा व्यवसाय साम्भाळून लखनगिरिबाबान्च्या कामात मदत करत असतो,त्यानेच आम्हाला घोन्गशाला नेले होते. फोन केल्याबरोबर मनोज आला.त्याने मार्गदर्शन केल्याप्रमाणे गोई नदीवरील पुल पार करुन पाटीगावातील बाजारपेठेतील मनोजच्या घरी गेलो.
त्याचे वडील श्री.सुखदेव दुकानात होते.दुकानाच्या मागेच घर आहे. मनोजची आई,पत्नी आणि दोन गोगिरवाणी मुले रोशनी आणि पार्थ.मुले आम्हाला लगेच चिकटली नानाजी-नानीजी म्हणून.दोन वाजुन गेले होते,जेवण करुन विश्रान्ती. आज मुक्काम पाटीगाव.
रोशनी आणि पार्थ तर आमची नातवन्डे असल्यासारखी आमच्याशी समरस झाली होती.ते आम्हाला घेउन गावातील साईबाबा मन्दिरात गेले लहानसे सुबक मन्दीर सुन्दर मुर्ती दर्शनाने समाधान झाले. नन्तर मारुती मन्दिरातही दर्शन घेतले.त्यान्ची शाळा बघितली.रोशनी शाळेच्या स्नेहसम्मेलनात डान्स करणार आहे,आम्ही तेव्हा आलेच पाहिजे असे तिने सान्गितले.आम्हीही हो नक्की येऊ म्हटले.
रात्री गावातील काही मन्डळी भेटायला आली. पाटीगाव या भागातली कापसाची मोठी बाजारपेठ आहे,आदिवासी भाग असुनही शिक्षणाचा भरपुर प्रसार झाला आहे,९०टक्के जनता साक्षर आहे.वगैरे गोष्टी समजल्या.आता पर्यन्तच्या प्रवासात मध्यप्रदेशातील लोक खुपच आतिथ्यशील आहेत्,परिक्रमावासी म्हणजे देवाचे रुप असतात अशी त्यान्ची धारणा आहे. नर्मदामैय्याचा नदी असा उल्लेख केलेला त्याना मुळीच आवडत नाही नदी मत कहो वो माता है हमारी,असे म्हणतात.समोर कुणी अनोळखी व्यक्ति आली तर साधे स्मितहास्यही न करणार्या मग आदरातिथ्य तर दुरची गोष्ट,अशा आपल्या सारख्या मराठी माणसाना तर माणुसकीने कसे वागावे याचा चान्गला धडा मिळतो परिक्रमेत.असो
पहाटे उठलो कारण आज बराच लाम्बचा पल्ला गाठायचा होता.स्नान पुजारती करुन खाली आलो तर पराठे दलियाची खीर असा नास्ता तयार होता.मुले झोपली होती त्याना जाग आली तर जाऊ देणार नाहीत म्हणुन अगदी गुपचुप नास्ता केला,सर्वान्चा निरोप घेउन निघालो पण... पार्थ उठलाच पाठोपाठ रोशनीही उठली मग काय जाऊ नका म्हणून भोकाड पसरले दोघानीही कमरेला मिठी मारली काहीकेल्या अॅकेनात,कसेबसे मनोजने त्याना बाजुला केले आम्ही लगेच परत येऊ असे आश्वासन दिले तेव्हा कुठे निघता आले.अगदी दिसेनासे होईतो नानाजी-नानीजी अशा हाका अॅकू येत होत्या आम्हालाही गलबलुन आले होते,मी तर रडतच होते.आम्ही दिल्लीहुन नाशिकला यायला निघालो की असेच द्रुश्य असते,खुशी आमची नात भोकाड पसरते,गुडिया मोठी आहे ती मुळूमुळू रडते,लग्नाला एवढी वर्षे झाली तरी राणीच्या {आमची मुलगी गीता} डोळ्यात पाणी तरारलेले असते,आमची अवस्थाही काही वेगळी नसते,असो खुपच विषयान्तर झाले.
भावपुर्ण निरोप घेऊन चालु लागलो.पाटी ते बोखराटा असा प्रवास करायचा होता.आवली,सावरियापानी ही गावे पार केली.जन्गल तुरळक होते ,रस्ताही चान्गला होता झपझप चालत होतो.साधारण १०कि.मि. चाललो असू,घाट सुरु झाला. खडा घाट दमछाक व्हायला लागली.उठत बसत पाणी पित मार्गक्रमणा करत होतो रस्त्यावर आम्हा दोघाशिवाय कुणी नव्हते १२ वाजले होते सकाळी केलेला नास्ता केव्हाच जिरुन गेला होता. मनोजच्या आईने बरोबर पराठे दिले होते,एका ओढयावर्च्या पुलाच्या कठड्यावर बसुन ते खाल्ले,थोडी विश्रान्ती घेउन चालु लागलो. झाडी कमी असल्याने उन खुप लागत होते बोखराटा ५कि.मि. पाटी दिसली,मी बसकणच मारली दुपारचे २ वाजुन गेले होते दोघेही खुप दमलो होतो डाम्बरी रोडमुळे बुटातही पाय पोळत होते बोखराटा येईपर्यन्त सन्ध्याकाळ झाली असती.मैय्या! नाही चालवत, कसे पोहोचणार? पाय ओढत चालत होतो कारण कुठे वस्तीचा मागमुसही नव्हता.आणि मागुन एक प्राथमिक आरोग्य केन्द्राची जीप आली,थाम्बली.ड्रायव्हर रवी कुमावत आणि विजय यादव उतरले,नमस्ते माताजी,नमस्ते बाबाजी .आम्ही बोखराटाला जात आहोत चला बसा गाडीत खुप दमला आहात आम्ही काही अॅकणार नाही तुम्हाला आमच्या बरोबर आलेच पाहिजे,असे म्हणून त्यानी आमच्या पाठपिशव्या त्यानी काढुन घेतल्या आणि आम्हाला जीपमधे बसायला भाग पाडले.त्यान्ची आपुलकी पाहुन काही बोलायला सुचलेच नाही. फक्त नर्मदे हर.
जिथे आम्ही जीपमध्ये बसलो तिथुन पुढचा घाट फारच कठीण होता,योग्यवेळी जीप पाठवली मैय्याने असेच म्हणावे लागेल.कितिही नाही म्हटले तरी तिच्या क्रुपेचा प्रत्यय आम्हाला पदोपदी येत होता.४ वाजता बोखराटाला पोहोचलो.रविने चहा दिला आणि गजानन मालवीय यान्च्या घरी सोडले.गजानन मालवीय यान्चे नाव बडवाणीला सन्जय पुरोहित यानी सान्गितले होते. आज मुक्काम बोखराटा.
झुन्जुमुन्जु झाले होते पायाखालचा रस्ता दिसु लागला होता. पक्षान्चा किलबिलाट मनाला सुखावत होता.आम्हाला आजही खुप मोठा पल्ला गाठायचा आहे,हा भागही शुलपाणीझाडीचाच आहे पण त्यातल्या त्यात सोपा आणि लुटालुटीचा धोका ह्या बाजुला नसतो.
५कि.मि.वरील बारिफल्या या गावी पोहोचलो.रस्त्यालगत एक आश्रमशाळा,प्राथमिक आरोग्यकेन्द्राचे उपकेन्द्र होते,एक टपरीवजा झोपडी होती.चहा आहेका विचारले तो माणूस म्हणाला करतो मी नास्ता मिळेल का विचारले,त्याने पोहे चालतील का विचारले.मी हो म्हटले.बाजुच्या दगडावर बसलो. यथावकाश चहा घेतला,पोहे बान्धुन घेतले बिस्किटेही घेतली.आदिवासी गरीब बन्धू पैसे घेईना.परिक्कम्मा वासीसे कैसे पैसे? असा म्हणाला. नर्मदे हर! मैय्या कशी आहेत ही तुझी लेकरे,महान! हा एकच शब्द .जबर्दस्तीने त्याच्या खिशात ह्यानी पैसे कोम्बले.
गावा बाहेर पडताच रस्ता हरवला.दगडधोन्ड्यानी भरलेली वाट सुरु झाली. थोड्याच वेळात समोर खडा घाट उभा ठाकला. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे! स्वतःला समजावले आणि पुढे पाऊल टाकले. पण तो चढ छोटासाच होता.मग उतार लागला,भरभर उतरलो समोर ठाकला एक ओढा.बुट्मोजे काढुन हातात घेतले,साम्भाळुन ओढा पार केला.पुन्हा बुट चढवले.थोडे पुढे जावुन एक वळण घेतले समोर ओढा दत्त म्हणुन तयार,पुन्हा सगळे सोपस्कार,कमीतकमी १०/१२ वेळा एकच ओढा वळवळणाने समोर येत होता.मजा वाटली.आताच्या ठिकाणी पाणी कमी होते म्हणून बुट न काढता दगडा दगडा वरुन ओढा ओलान्डु लागलो हे नीटपणे पल्याड गेले पण माझे पाय भिजलेच. एक बरी जागा बघुन बसलो, बूट मोजे सुखायला ठेवले आणि पोह्यान्चा नास्ता करायला घेतला. एक आदिवासी भगिनी आपल्या मुला-मुलीला घेउन आली ,चालली होती जन्गलात कामासाठी, आम्ही मुलाना हाक मारली,आधी आली नाहीत पण आईने सान्गितल्यावर आली.गोड मुले जवळच्या लिमलेटच्या गोळ्या दिल्या अशी खुश झाली म्हणुन सान्गू. त्यान्च्या निरागस हास्याने शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला.
परत एक थोडा अवघड घाट चढलो,२ आदिवासी बन्धू भेटले,त्याना भागल अम्बा किती दुर विचारले,ते भागल अम्बाच होते.गजानन मालवीयनी सान्गितलेल्या कैलास राठोड या अन्गणवाडी चालकाचे झोपडीवजा घर रस्त्या लगतच होते पण ते घरी नव्हते घरात लहान मुलेच होती मग फक्त पाणी पिउन,त्याना खाऊ देउन पुढे निघालो.आता गाठायचे होते अम्बापाडा.
जन्गल घनदाट होऊ लागले होते रस्ता असा नव्हताच तरीही खचाखच भरलेल्या दोन जीप भेटल्या धन्य ते जीप ड्रायव्हर आणि धन्य ते प्रवासी. आज खेतियाचा बाजार होता म्हणून ही गर्दी.मोटरसायकलवालेही दामटवत होते गाडया. आम्बापाडा आले पावणेबारा वाजले होते,सखाराम रन्गारीकडे भोजनाची व्यवस्था होईल का विचारले आधी विचारु की नको असा विचार केला पण खुप भुक लागली होती,विचारले.खिचडी देतो म्हणाला,पडवीत बसलो.आम्हाला बघायला सारा पाडा जमला, पन्जाबीड्रेस घातलेली बाई आणि पायजमा-झब्बा घातलेला बाबा म्हणजे त्यान्च्या साठी प्रदर्शनीयच , आम्हीही त्याना नावे विचारली,शिक्षण विचारले.त्या छोट्याशा पाड्यावरही शाळा आहे,आदिवासीच शिक्षक आहे.मेधा पाटकरान्च्या ट्रस्टचे काम आहे हे. सखारामने भरपुर खिचडी आणली आम्ही एकच ताटली घेतली. हातसडीच्या तान्दुळाची खिचडी खुप चविष्ट होती.बळेबळे त्याच्या हातात पैसे दिले,घेतच नव्हता. या आदिवासी बान्धवान्च्या आमच्या अन्नदाता असलेल्यान्च्या उपकारात राहाणेच आम्हास आवडते. सखारामचा निरोप घेऊन निघालो.अजुन तसा बराच पल्ला गाठायचा होता.
आम्बापाडाचा घाट चढला आता पुन्हा जन्गल विरळ होऊ लागले,पण उतार होता त्यामुळे चालण्याचा त्रास कमी. ५ वाजले.बायगोर आले.इथे वनविभागाचे ठाणे आहे.टपरीवर चहा घेतला.अजुन खेतिया ८/१० कि.मि. दुर होते.सन्ध्याकाळ होऊ लागली होती.रस्ताही डाम्बरी झाला होता.पाय उचलायला हवे होते पण पाय नाही म्हणत होते. नेहेमीप्रमाणे मैय्याला दया आली. एक टेम्पो खेतियाला जात होता.बसलो त्यात आणि भुर्कन पोहोचलो खेतियाला.
खेतिया मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर आहे.दोन्ही सीमान्च्या बरोबरमध्ये बजरन्गकुटी या हनुमानाच्या मन्दिरात आसन लावले.आजुबाजुला चॉकशी केली.एकजण डबा देतात कळले,निरोप दिला ते लगेच आले.३० रु.डबा आम्ही देण्यास सान्गितले.
पायान्ची वाट लागली होती.फोड आले होते,सुजही आली होती.आज खुपच म्हणजे ४०कि.मि. चाललो होतो जवळजवळ. 8) बजरन्गकुटी सोयीस्कर नव्हती,पायाचे फोडही बरोबर नव्हते दोन दिवसतरी विश्रान्ती घेणे जरुरी होते म्हणून तिथुन मुक्काम हलवला आणि सुरभि हॉटेलमध्ये आलो.जेवणाचा डबा खुपच छान होता.दुसर्यादिवशी तर त्या भाऊने खीरपुरी दिली पैसे मात्र फक्त ३० रु. घेतले मी विचारले तर म्हणाला,ये तो सेवा है माताजी आप परिक्रमावासी हो इसलिये आज खीर पुरी बनायी,धन्य तो मध्यप्रदेश आणि धन्य तिथले लोक. सन्ध्याकाळी महाराष्ट्राच्या बस स्थानकावर गेलो म्हटले बघावे शहादा किती दुर आहे,जवळ जवळ पन्धरा तीन वारानी महाराष्ट्राच्या भुमीवर पाय ठेवत होतो मनात भावनान्चा कल्होळ उठला होता.बस जवळ कन्डक्टर साहेब उभे होते भाऊ! मी हाक मारली,एक नाही दोन नाही; पुन्हा हाक मारली तरी तेच एक नाही दोन नाही.भाऊ !! थोडी जोरात हाक मारली, क्काय्य आहे? कन्डक्टर साहेब एकदम खेकसले,आलो महाराष्ट्रात, मी म्हटले.म्हणजे काय म्हणजे काय?कन्डक्टर उवाच.काही नाही दोन पावले दुर मध्यप्रदेश्,तिथे इतके आदरातिथ्य,इतका मान.आणि इथे माझा महाराष्ट्र माझी मराठी तर अशी वागणुक.भाऊ,मला फक्त शहादा किती लाम्ब आहे हे विचारायचे होते मी काही तुमच्या बसमधुन फुकट न्या म्हणत नव्हते. मराठी म्हणुन आपुलकीच्या भावनेने भाऊ अशी हाक मारली होती कन्डक्टर साहेब. असो.असे आहोत आपण मराठी लोक.शिष्ठ्, दुसर्याची जराही कदर न करणारे.
पाय थोडे ठीक झाले होते,पहाटे स्नान पुजा आटपुन सुरभिचा निरोप घेतला.टपरीवर चहा घेउन विनोबा एक्सप्रेस निघाली स्वतःच्या राज्यातुन परिक्रमेच्या मार्गावरुन. वाटेत काही मोर्निन्गवाकला निघालेले लोक भेटले,थोड्या गप्पा झाल्या त्यानी बळेबळे १००रु. ह्यान्च्या खिशात कोम्बले तेवढीच मैय्याची सेवा ही त्यान्ची भावना.थोडावेळ आमच्या बरोबर चालले,थोडे पुण्य मिळेल असे म्हणाले,अशावेळी काय बोलावे हे सुचत नाही.डॉक्टर,वकील असलेले ते श्री अग्रवाल,चॉधरी भर रस्त्यात आमच्या पाया पडले.नर्मदामैय्याबद्दलचा हा भक्तीभाव आम्हाला मध्यप्रदेश्,गुजराथ मध्ये सर्व ठिकाणी पहायला मिळाला.दराखेड{ महाराष्ट्र सुरु}, रायखेड,सुखीनदी.सुलतानपुर फाटा,ब्राम्हणपुरी,चान्दसैली गावे गेली.९वाजले होते एका ढाब्यावर जवळच्या शेन्गदाणे गुळाचा नास्ताकेला चहा घेतला. शहादा अजुन १० कि.मि. होते. चला पुढे.धडगाव फाटा येथे गोमाई नदीवर धरण आहे. मनोई लोनखेडा आले,शहादा ५कि.मि. राहिले होते १२ वाजले होते,पोलिसचेकपोस्ट आले.बन्द होते,ओट्यावर थोडावेळ बसलो.कडक उन होते निघालो,पोहोचलो शहाद्याला.इथे परिक्रमावासीन्साठी काहीच निवास व्यवस्था नाही.सरदार सरोवर झाल्या पासुन आणि शुलपाणिच्या झाडितिल लुटीच्या आणि कठीण चढाईच्या रस्त्यामुळे ९५टक्के परिक्रमावासी शहादा-प्रकाशा मार्गेच जातात,वर्षातील ८ महिने लोक परिक्रमा करत असतात तरीही महाराष्ट्रात फक्त प्रकाशा येथे दगडूमहाराजान्ची धर्मशाळा आहे.सरकारने आणि धनिक मन्डळीनी याचा विचार करावयास हवा. असो. शहाद्याहुन प्रकाशा जवळजवळ २०कि.मि. आहे,तेवढे चालणे तेही कडक उन्हात शक्य नव्हते,रिक्षाने प्रकाशाला आलो.दगडुमहाराज भक्तनिवासात १२५रु.भरुन खोली घेतली.
भक्त निवास चान्गले आहे. एकादशी होती,भन्डार्यातील माताजी म्हणाल्या पटकन हातपाय धुवुन या.फराळाचे तयार आहे. अनायसे प्रकाशा या दक्षिणकाशी क्षेत्री उपवास घडला. ४ नम्बरच्या खोलीत आसन लावले,हातपाय धुवुन भन्डारग्रुहात गेलो.भगर दाण्याची आमटी,खिचडी,बटाट्याची भाजी,ताक असा छान बेत होता. खुपच दमलो होतो म्हणुन विश्रान्ती.
सन्ध्याकाळी केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि पुष्पदन्तेश्वराचे दर्शनास गेलो. पुष्पदन्त गन्धर्वाने शिवमहिन्म स्तोत्राची रचना येथेच केली,त्यानी स्थापिलेले शिवलिन्ग म्हणजे पुष्पदन्तेश्वर. तापीनदीच्या तीरावर ही दोन्ही मन्दिरे आहेत. जवळच मुस्लिम प्रार्थनास्थळ आहे.दोन्ही धर्मातील अॅक्यतेचे प्रतिक. सुर्यास्तसमयी दोन्ही प्रार्थनास्थळान्वर सुर्य आपलीसोनेरी किरणे सारखीच पसरत होता जणू सन्देश देत होता,सर्वधर्म समानत्व स्वदेशी स्पर्श भावना. इतके सुन्दर आकाश.रात्रीच्या थन्डीचा मुकाबला करण्यासाठी प्रुथ्वीला दिलेली जणू सुन्दर,उबदार सोनेरी शाल. खुप खुप सुन्दर नजारा.किती डोळ्यात साठ्वू किती नको असे झाले होते. पुन्ह:पुन्हा देवचित्रकारापुढे नतमस्तक होत होतो कारण हा सुन्दर नजारा,हा सुन्दर आमचा देश पाहण्यासाठी त्याने आम्हाला डोळे आणि हे निरोगी शरीर दिले आहे.
9) पन्च पन्च उषःकाली केदारेश्वर,पुष्पदन्तेश्वराचे दर्शन घेउन विनोबा एक्स्पप्रेस निघाली. निम्भोरा पार केले खान्डसरी आले, येथेच खान्डसरी साखर कारखाना आहे.खान्डसरी साखर पान्ढरीशुभ्र नसते,पुरळ म्हणजे अगदी बारीक आणि किन्चित तपकिरी रन्गाची असते पण पान्ढर्या साखरेपेक्षा ही साखर पॉष्टीक असते हिचे दुष्परिणाम नसतात.तर खान्डसरी या गावाच्या नावावरुन या साखरेला खान्डसरी हे नाव पडले. हिलाच गावाकडे गुळी साखर म्हणतात.चला पुढे;बरेच विषयान्तर झाले. ५कि.मि. चाललो होतो ८ वाजले होते,कारखान्याच्या बाहेरच टपरीवर पाववडा-चहा असा नास्ता केला.रोजच्यापेक्षा लवकर,कारण काल एकादशी असल्याने रात्री भोजन नव्हते.
खान्डसरी गुजराथ मध्ये आहे म्हणुन आम्हाला वाटले गुजराथ सुरु झाले पण काही वेळाने परत महाराष्ट्राची हद्द लागली. थोडावेळाने परत गुजराथ,अशी गम्मत बरेच कि.मि. आहे. टपरीवर नास्ता करताना कळले होते की १०/१२ कि.मि.वर अमलाड येथे श्री. काशिनाथ पटेल यान्च्या घरी परिक्रमावासीन्साठी भोजन-निवासाची व्यवस्था आहे. निघालो,अमलाडला पोहोचलो गावाबाहेरच पटेल भेटले त्यानी आग्रहाने घरी जाण्यास सान्गितले,त्यानी सान्गितल्याप्रमाणे आम्ही गेलो.अजुन ८/१० दुसरे परिक्रमावासीही तिथे होते.स्वतः काशिनाथ पटेल बरेच व्रुध्द आहेत. त्यान्च्या मुलान्ची बहुदा वेगवेगळी घरे होती.आम्ही एका घरी होतो आणि बाकी परिक्रमावासी दुसर्या घरी होते.त्याना सदाव्रत दिले होते आणि ते स्वयम्पाक करत होते. प्रथम आम्हाला चहा-पाणी दिले.भोजन तयार होत होते,तो पर्यन्त आम्ही प्रमाणपत्रावर शिक्का मारुन घेतला. भोजनासाठी बोलावणे आले म्हणून गेलो तर आम्हाला घराच्या मागील बाजुला धुणे-भान्डी करायच्या जागेजवळ बसण्यास सान्गितले,तिथे चुलीवर त्यान्चा घरगडी आमच्या साठी वरण-भात बनवत होता.त्यानेच आमच्यापुढे वरण-भाताची भान्डी ठेवली ताटल्या पाण्याचा गडवा ठेवला आणि तो निघुन गेला,आम्हाला समजेना असे काय आम्हीच वाढुन घ्यायचे की नाही? मोठा अपमान वाटला,उठून जावे असे वाटले पण अन्नाचा अनादर करु नये म्हणून वाढुन घेतले भात सम्पत होता तोच घरातुन एक मुलगी आली तिने आमच्यापुढे ठेपल्यान्ची ताटली अशा प्रकारे ठेवली कि,घ्या खा एकदाचे,कुठुन कुठुन येतात कोण जाणे,आणि ती आली तशी घरात निघुन गेली,अपमान सहन करण्याची हद्द झाली.आम्ही उठलो ताटल्या घासुन तिथे उपड्या घातल्या आणि येतो असे सान्गुन लगेच निघालो.
कुठे मध्यप्रदेशातिल आदरातिथ्य आणि कुठे महाराष्ट्रातील ही मानभावी सेवा. जमत नसेल तर करु नये,परिक्रमावासी भिकारी नसतात,काही व्रत म्हणुन ते स्वतःचे सुखाचे घर सोडून परिक्रमेसाठी निघालेले असतात. आणि पटेलतर आग्रह करकरुन परिक्रमावासीना घरी घेउन येतात,आणि मग त्यान्च्या घरच्या स्त्रियान्चे अतिथी बरोबर असे वर्तन? मैय्या जीवनाचे वेगवेगळे रन्ग दाखवत होती. नाहीतर असा अनुभव आम्हाला कधी आणि कसा आला असता?
ह्या सगळ्या प्रकारात खुप वेळ गेला होता.दुपारचे २ वाजले होते.रस्ता चान्गला होता दुतर्फा मोठी झाडे होती त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नव्हता पण गरममात्र खुप होत होते. वाटेत मनोज शहा भेटले त्यान्चा तळोदा येथे पेट्रोलपम्प आहे,त्याच्या मागे कनकेश्वराचे मन्दिर आहे त्याचे दर्शन घ्या असे सान्गितले,पम्पावर माझे वडील आहेत तुम्ही पुढे व्हा मी येतोच असे म्हणाले. नुकताच पटेलान्कडचा अनुभव चान्गला नव्हता त्यामुळे नुसते हो म्हणुन आम्ही पुढे चालु लागलो.
शहा यान्चा पेट्रोलपम्प आला.मनोजचे वडील बाहेर आमची वाट बघत उभे होते,मनोजने त्याना फोन केला होता. त्यानी आमचे स्वागत केले,मन्दिराचा रस्ता दाखवला आणि दर्शन घेउन या असे सान्गितले.आम्ही गेलो,दाट वनराईत कनकेश्वराचे शान्त मन्दिर आहे,सुबक बान्धकाम आहे.गाभार्यात स्वयम्भू शिवपिन्डी आहे. हात-पाय धुवुन दर्शन घेतले,अपमानाने झालेला मनाचा क्षोभ शान्त झाला.मन्दिराच्या प्रान्गणात बसलो,मनोज चहा-बिस्किटे घेउन आला.मोठ्या आदराने आम्हाला दिला. आज मुक्काम आमच्या घरी करा असे म्हणाला, आम्ही वाण्याविहिरला कन्हैयालाल परदेशी यान्च्या घरी जाणार आहोत असे म्हटले तर म्हणाला सर्वजण त्यान्च्याच घरी जातात,आम्हाला मैय्याची सेवा करण्याची सन्धी कधी मिळणार?आम्ही ठिक आहे तुमच्याकडे राहू असे म्हटले.त्याचे घर अक्कलकुवा येथे होते,म्हणजे जवळजवळ २५कि.मि.दुर.तो म्हणाला तळोदा येथुन बसने अक्कलकुवाला जा मी बस स्टन्डवर येतो.मग त्याप्रमाणे केले .
बसस्टन्डपासुन साधारण अर्धा कि.मि. अलीकडे मनोजचे घर होते.मनोज रस्त्यावर उभाच होता मग तिथेच उतरलो.मनोजचे घर म्हणजे बन्गला होता. मोठ्या आपुलकीने त्याच्या पत्नीने,आईने स्वागत केले. आमच्या सायम्प्रार्थनेतही सर्व कुटुम्बिय सहभागी झाले.रात्री भोजनप्रसादाला गुजराथी कढी-खिचडी होती,भोजनाला काय करु विचारले आम्ही सान्गितले म्हणून कढी खिचडी.चुरम्याचे लाडु मिष्ट्टान्न होते,आमच्या पन्गतीला मनोज त्याचे वडील बसले होते,आग्रह तर विचारुच नका. मनातील मैय्या म्हणाली मग आता कसे वाटते राग गेला ना? हो! तुझी क्रुपा आहे. झोपायची व्यवस्था राजेशाही होती. सारा थकवा शिणवटा छू मन्तर झाला. नर्मदे हर.
10) सकाळी सहा वाजता मनोजचा निरोप घेउन निघालो,साधारण एक कि.मि. वर अक्कलकुव्याचे बसस्थानक आले.तिथे चहाच्या टपरीवर सुनिल मराठे आणि त्यान्चे दोस्त भेटले.एकमेकाचीचॉकशी झाली,परिक्रमेबद्दल बोलणे झाले,त्यानी आग्रहाने चहा दिला.त्यान्चा निरोप घेउन विनोबाएक्सप्रेस निघाली.
रस्ता चान्गला होता.१०कि.मि. वरील खापर या गावी पोहोचायला ९ वाजले.बाजाराचा दिवस होता खुप गर्दी होती एका टपरीवर नास्ता केला आणि पुढे निघालो.साधारण ७कि.मि. आलो,मागुन वाण्याविहिरचे कन्हैय्यालाल परदेशी त्यान्च्या मारुती गाडीतुन आले,आम्हाला पाहुन गाडी थाम्बवली,विचारले काल कुठे मुक्काम केला?आम्ही म्हटले तुमच्याकडेच येणार होतो पण मनोज शहाने आग्रह केला म्हणुन अक्कलकुवाला त्यान्च्याकडे राहिलो. काही हरकत नाही आजचा मुक्काम कुठे? गव्हाळीला पान्दुरन्गशास्त्री आठवले यान्च्या अम्रुतालयम मध्ये.तेव्हा ते म्हणाले उन झाले आहे,बसा गाडीत तेवढीच मैय्याची सेवा,बसलो गाडीत.गव्हाळीला पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजुन गेला होता.
आश्रमात पोहोचलो,पण तिथे कुणीच नव्हते आता काय करायचे? पुढे निघालो,एका अन्गणात नाना नावाचे व्रुद्ध बसले होते,त्याना विचारले ते म्हणाले येथे हल्ली सोय नाही आदिवासी लोक प्रार्थने साठी फक्त येतात,आता काय करायचे नाना याना त्रास देणे योग्य नव्हते. नानाच म्हणाले थोडे पुढे पुलावरुन पलिकडे गेलात की उजव्या बाजुला एक हॉटेल आहे तिथे तुमची व्यवस्था होईल. साधारण एक कि.मि.वर नदीवरील पुल लागला तो ओलान्डून पलिकडे गेलो उजव्याबाजुला टेकाडावर स्वागतढाबा होता.आम्हाला पाहुन श्री.सुनिल चॉधरी पुढे आले,त्यानी ढाब्याच्या मागच्या बाजुला परिक्रमावासीन्साठी बागेत सोय केली आहे. भोजनप्रसाद घेतला,सुनिलने १००रुपये दक्षिणा दिली.तिथे राहण्याची सोय नव्हती पुढे जाणे क्रमप्राप्त होते.
दुपारचे ३ वाजले होते,डोक्यावर ऊन मी मी म्हणत होते खुप थकलो होतो पण चालत राहण्याशिवाय गत्यन्तरच नव्हते.साधारणपणे ५कि.मि. चाललो असू, धनशेरा आले.तिथे गुजराथ राज्याचे चेकपोष्ट होते,५ वाजले होते,चेकपोष्टवरील इन्स्पेक्टरना विचारले ते म्हणाले चिन्ता करु नका झाडाखाली बसा एखाद्या गाडीत तुम्हाला लिफ्ट मिळवुन देतो तुम्ही डायरेक्ट राजपिपलाला जा कारण इथुन पुढे जन्गलाचा भाग सुरु होतो इथुन १०/१५ कि.मि.तरी मुक्कामाची सोय नाही दिवस लहान आहेत लवकर रात्र होते,आम्हाला त्यान्चे म्हणणे पटले आम्ही एका झाडाखाली थाम्बलो,पोलिसानी आम्हाला चहा-पाणी दिले. थकवा थोडा कमी झाला.
एक गाडी इन्स्पेक्टरनी थाम्बवली,त्याना आमची ओळख करुन दिली,पिशव्या डिकित टाकुन गाडीत बसलो,इन्स्पेक्टरान्चे आभार मानले आणि निघालो.गाडी शहाद्याच्या श्री.एकनथ पाटील,ब्रिजलाल पाटील, भगवान चॉधरी यान्ची इन्डिका होती.ते सर्वजण अम्बाजीदेवीच्या पायी वारीला गेलेल्या त्यान्च्या मुलाना भेटायला चालले होते,राजपिपलाच्याही पुढे त्याना जायचे होते.थकल्या भागलेल्या आमची व्यवस्था मैय्याने केली होती. सरळ राजपिपला येथे जाणार असल्यामुळे आमचा ३/४ दिवसान्चा प्रवास वाचला होता. आज पर्यन्तच पदोपदी हा अनुभव येतो आहे,२०/२५ कि.मि. चाल झाली,खुप दमायला झाले की मैय्या वाहनाची व्यवस्था करते आणि पुढचा मुक्काम सुलभ होतो.
आजच्या प्रवासात अक्कल्कुवा येथे वरखेडी नदी,खापरला देहली नदी,पेचरीदेव जवळ कान्जी नदी,गव्हाळीला जिरानदी आणि डेडियापाडा राजपिपलाला करसन नदी एवढ्या नद्या पार केल्या अर्थात या सगळ्या नद्यान्वर पुल होते.गव्हाळी नन्तर चिचली या गावापासुन गुजराथ राज्य सुरु झाले.आज ३०कि.मि. पायी चाललो आणि ७० कि.मि. इन्डिका गाडीने असा अक्कलकुवा ते राजपिपला १०० कि.मि. प्रवास झाला. पाटील मन्डळीनी आम्हाला राज्पिपला येथे सन्तोष चॉकडी{ सन्तोष चॉक} येथे सोडले.
सन्तोषचॉकडी ला हरसिद्धीमाता गायत्रीमाता मन्दिराची चॉकशी केली आणि तिकडे गेलो.भक्तनिवासात फक्त रात्रीपुरतीच जागा मिळाली कारण दुसर्यादिवसापासुन पुढचे ४/५ दिवस सर्व भक्तनिवास मुख्यमन्त्री नरेन्द्र मोदी यान्च्या दॉर्यासाठी आरक्षित केलेले होते.ठीक आहे.आज खुप दमलो होतो रात्रीचा निवारा गरजेचा होता.येथे भोजन प्रसादाची व्यवस्था नव्हती त्यामुळे पुरोहित भोजनालयात भोजन घेतले. अर्थात सायम्पुजारती केल्या नन्तर. आता विश्रान्ती.उद्या गोराग्रामकडे प्रस्थान.
धनशेरा पासुन दाट जन्गल सुरु झाले होते.वळणावळणाचा नागमोडी रस्ता चान्गला होता.खाचखळगे,खड्डे अजिबात नव्हते गुजराथ मध्ये झालेला विकास दिसतो. एक सम्रुद्ध प्रदेश आहे गुजराथ. जन्गलही सुन्दर होते.वाटेत जानकी आदिवासी कन्या आश्रमशाळाही दिसली,पण वेळ नसल्याने बघता आली नाही.पुढच्या परिक्रमेत पाहू असा विचार केला.
11) राजपिपला हे जिल्हामुख्यालयाचे ठिकाण आहे.शहरात किल्ल्यासारख्या अॅतिहासिक वास्तु आहेत. हरसिद्धमाता मन्दिर हे पार्वतीचे आहे. सन्गमरवरी वास्तु आहे.आवारात चारीबाजुनी भक्तनिवासाच्या दुमजली इमारती आहेत. शेजारी गायत्रीमातेचेही भव्य मन्दिर आहे. मन्दिरासमोर तलाव आहे.
या मन्दिरात देवीला सोडलेल्या खुप कोम्बडे-कोम्बड्या आहेत्.पुर्वी देवीला बळी देण्याची पद्धत होती आता सोडुन देतात. कोम्बड्या मन्दिराच्या आवारातच नव्हे तर देवीच्या गाभार्यातही फिरतात,आवारातील झाडावर,शिखरावरही त्यान्चा मुक्त सन्चार असतो.
देवीच्या आवारातील झाडाना पाणी देण्यासाठी ठिबकसिन्चनाची व्यवस्था आहे. त्याची पाइपलाइन प्रान्गणाच्या फरशीखालुन नेलेली आहे आणि प्रत्येक झाडाच्या बुन्ध्यापाशी ठीबकसिन्चनाची तोटी उघडलेली आहे.उत्तम व्यवस्था.
भक्तनिवासात स्नानासाठी सोलरच्या गरम पाण्याची सुविधा आहे. स्नानादी उरकुन मैय्याची पुजारति केली,हरसिद्धीमातेचे दर्शन घेतले पुजा नैवेद्दयासाठी पावती केली आणि निघालो. सन्तोषचॉकडीला आलो,टपरीवर चहा घेतला.शुलपाणिश्वरमन्दिर गोराग्रामला २५कि.मि. दुर आहे.परिक्रमेचा मार्ग राजपिपलावरुनच पुढे आहे म्हणून दर्शन घेऊन परत यावे या विचाराने १०रु.सिटने रिक्षाने गोराग्रामला आलो.
पान्डवकालीन प्राचीन शुलपाणेश्वराचे मन्दिर सरदार सरोवराच्या पाण्यात बुडाले म्हणून येथे टेकडीवर गुजराथ सरकारने नवीन मन्दिर बान्धले आहे.मन्दिराच्या सभोवती सुन्दर बगिचा फुलवलेला आहे.सुन्दर परिसर आहे. पायथ्यापासुन ३०/४० पायर्या चढुन आपण मन्दिर प्रान्गणात येतो. मन्दिर सन्गमरवरी आहे. भव्य गाभार्यात शिवपिन्डीचे प्रसन्न दर्शन होते. मानसपुजा करुन शिवस्तोत्र म्हटले. नर्मदामैय्याचे पिता शिवशम्भो आपल्या क्रुपेने ही परिक्रमा पुर्ण होवो अशी प्रार्थना केली.
मन्दिर परिसरात भक्तनिवासाचे बान्धकाम चालु आहे.तेथिल महन्ताना प्रणाम करुन निघालो. मन्दिरापासुन काही अन्तरावर नर्मदामैय्यावर केवडियाला जाणारा पुल आहे. पुला खालुन मैय्याच्या पात्राजवळ जाण्यासाठी सिमेन्टचा रस्ता आहे,यावर्षी पावसाळ्यात प्रचन्ड पुर आला असताना सन्तापलेल्या मैय्याने हा रस्ता उखडुन टाकला होता.तरीहि थोडा फार भाग जाण्यासाठी होता,मैय्याजवळ गेलो.सुन्दर मैय्या दर्शन. खलबुजुर्ग,राजघाट सोडल्या पासुन मैय्याच्या जलाने स्नान झाले नव्हते.स्वच्छ नितळ पाणी,स्नानासाठी चान्गली जागाही होती म्हणुन स्नान केले.छान वाटले.
पोटपुजेची वेळ झाली होती,हरिहरकुटीबद्दल कळले,२कि.मि. चालुन तिथे पोहोचलो. निसर्गरम्य ठिकाणि हा आश्रम आहे. येथिल व्यवस्थापक एक माताजी आहेत. भोजनप्रसादाला अवकाश होता,चहा घेउन परिसर बघायला निघालो. गोशाळा आहे.आदिवासी मुलीन्ची शाळा आहे. परिक्रमावासीन्साठीच्या दालनात आसन लावले.तिथे एक तरूण सन्यासी भेटला,बी.कॉम. शिकलेला होता.
भोजनप्रसाद घेतला,माताजीना प्रणाम करुन निघालो. आनन्दाआश्रयधाम बद्दल अॅकले होते तिकडे जाणार होतो पण नन्तर विचार केला आज इथे राहिलो तर उद्या इथुन राजपिपला आणि नन्तर पुढे जाण्यास उशीर होईल तेव्हा आज जर राजपिपलाला राहिलो तर उद्या पुढचा प्रवास लवकर सुरु करता येइल,म्हणून रिक्षाने राजपिपलाला आलो, हरसिद्धीमाता मन्दिरात जागा मिळणार नाही हे माहीत होते म्हणून गावात एखादे हॉटेल पहावे म्हणून गेलो.एवढे जिल्हयाचे ठिकाण पण फक्त ३/४ हॉटेल होती पण तिही मोदीन्च्या लोकान्साठी राखीव ठेवलेली होती. ह्या सगळ्या खटाटोपात खुप उशीर झाला ४ वाजुन गेले,उन्हाचा त्रासही होताच.शेवटी पुन्हा गोराग्रामला जायचा निर्णय घेतला.रिक्षाने पुन्हा गोराग्रामला आलो.
स्टॉप पासुन २कि.मि. दुर आनन्दाआश्रयधाम होते,गेलो. इतका निसर्गसुन्दर आश्रम आहे.बघुनच खुप छान वाटले.परिक्रमावासीन्साठी स्वतन्त्र इमारत आहे,पण तेथिल व्यवस्थापकानी आम्हाला मुलान्च्या वसतिग्रुहातील एक स्वतन्त्र खोली दिली सर्व सुखसोयीनी युक्त खोली. आसन लावले,हातपाय धुवुन मन्दिरात दर्शनाला गेलो.श्रीम्रुत्युन्जयेश्वराचे मन्दिर भव्य आहे. शिवपिन्डी व्यतिरिक्त राम क्रुष्ण देवी गणपती यान्चीही मन्दिरे आहेत.मन्दिर सन्गमरवरी आहे.समोरच नर्मदामैय्याचे शान्तशीतल दर्शन सतत होते. रमणीय मन्दिर परिसर.सुन्दर भव्य गोशाला.खुपच आवडले.
दिवेलागणीच्या वेळी सर्व मन्दिरपरिसरात ,घाटाच्या मार्गावर पणत्या लावतात. इतके सुन्दर शान्त द्रुश्य.सन्थ वाहणारी मैय्या जणू आम्हाला म्हणत होती असे सगळे सुन्दर पवित्र ठिकाण न बघता तुम्ही पुढे जाऊ नये म्हणुनच तुमची राजपिपलाला व्यवस्था केली नाही.
रात्री भोजनप्रसादाच्यावेळी महन्त म्हणाले,आता दोन दिवस रहा,इथला नित्यक्रम पहा नन्तर पुढे जा. आम्हालाही हे सर्व खुप आवडले होते,आम्ही त्याना होकार दिला. भोजना नन्तर प्रत्येकाला एक मोठा पेला भरुन गायीचे दुध देतात.
12) स्नान,पुजारती करुन देवदर्शन केले,चहा घेउन आणि सर्वान्चा निरोप घेउन नर्मदे हर म्हणून विनोबा एक्स्प्रेस निघाली .पिशव्यान्मधल्या सामानाचे रीसटीन्ग केल्यामुळे ओझे थोडे हलके वाटत होते.२कि.मि.वरील बसस्टॉपवर आलो,लगेचच रिक्षा मिळाली राजपिपलाला सन्तोष चौकडीला उतरलो.परिक्रमेच्या रस्त्याची चौकशी केली आणि चालु लागलो. हरसिद्धीमाता मन्दिरात दर्शन घेउन काळाघोडा मार्गे ओरीच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
करसन नदीवरील पुल ओलान्डून वरपाडा गावात आलो.आठ वाजुन गेले होते चहा घ्यावा असे वाटत होते कुठे मिळेल असे बघत होतो तर तिथे कामावर जाण्यासाठी उभे असलेले एका ग्रुहस्थानी नर्मदे हर म्हटले,स्वतःची ओळख सान्गितली मी नगीनभाई तुम्हाला आमच्याकडचा चहा चालेल का? मी मुस्लीम आहे म्हणून विचारतो.मी म्हटले,न चालायला काय झाले अहो चालेलच नाही तर धावेल. हिन्दू-मुसलमान दोघेही बाबा बर्फानीअमरनाथचे सन्तान.द्यावा आम्हाला चहा.तिथे मागच्या बाजुलाच त्यान्चे घर होते,नगीनभाईनी पत्नीला चहा देण्यास सान्गितले आणि कामावर जायचे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा नर्मदे हर म्हणून ते गेले.सबिनाभाभीनि नर्मदेहर म्हणून आम्हाला चहा आणि बिस्किटे दिली.त्यान्चामुलगा ;समीर त्याचे नाव,नर्मदे हर म्हणून आमच्या पाया पडला. नर्मदामैय्या सर्वान्चीच माता आहे. चहा घेउन आम्हीही नर्मदे हर म्हणून त्यान्चा निरोप घेतला.
साधारणपणे २/३कि.मि. चाललो असू,दोन रस्ते लागले हायवे अन्कलेश्वरला जात होता ह्याच रस्त्याने ओरी असेल कारण नन्तर आम्हालाही अन्कलेश्वरला जायचेच होते असा विचार करुन चालु लागणार तोच काही परिक्रमावासी त्या दुसर्या रस्त्यावरुन जाताना दिसले,मग एकजणाला विचारुन त्या दुसर्या रस्त्याने चालायला सुरवात केली.
या रस्त्याला फारशी झाडे नव्हती उन लागायला लागले होते दहा वाजले साधारणपणे बाराएक कि.मि. चाललो असु.वरखड गाव आले.रसिकभाई भेटले सरपन्च आहेत या गावाचे.रस्त्याच्या कडेलाच त्यान्चे घर होते त्यानी घरी चला म्हटले आम्हालाही तहान लागली होती,जवळचे पाणी सम्पले होते गेलो. रसिकभाई देवभक्त होते बराच मोठा देव्हारा होता बर्याच तसबिरी होत्या.घरात म्हातारी आई,पत्नी मुले होती. नर्मदेहर म्हणून सर्वजणानी नमस्कार केला.चहा-पाणी झाले.रसिकभाई म्हणाले जेवण येथेच करा पटकन भाजी-भाकरी तयार होईल.पण जास्त उशीर झालेला नव्हता म्हणून नको म्हटले आणि ओरीही आता फक्त ३/४कि.मि.च राहिले होते म्हणून पुढे निघालो.
रस्ता कच्चा होता पण मधुन मधुन झाडाची सावलीही मिळत होती त्यामुळे जीवाची अगदी काहिली होत नव्हती पण उनतर लागतच होते.ओरी बर्यापैकी मोठे गाव होते.कोटेश्वर मन्दिराची चौकशी केली,मन्दिर गावाबाहेर होते.थोडे चालुन उजव्या हाताला मन्दिराकडे जायला वळलो,दुतर्फा केळीच्या बागा होत्या जीवाला गार वाटले.केळी काढायचे काम चालले होते.
कोटेश्वर मन्दिर सुबक सन्गमरवरी आहे. तिथे एक माताजी व्यवस्थापक आहेत.गोड हसुन स्वागत केले आणि म्हणाल्या,आसन लावा हात पाय धुवुन घ्या भोजन वाढते. थन्डगार पाण्याने नळावर हातपाय धुतले बरे वाटले.भोजनाला आमटी,भात तिक्कड आणि मिरचिचे लोणचे होते.मी लोणचे तिखट असेल म्हटले तर वाढणारा मुलगा म्हणाला या मिरच्या तिखट नसतात,खरोखरच मिरच्या तिखट नव्हत्या लोणचे मोठे चविष्ट होते.स्वयम्पाक रुचकर होता,आत्माराम त्रुप्त झाला. भोजन झाल्यावर माताजीनी एक वही दिली आणि त्यात आमचे नाव पत्ता लिहायला आणि आमच्या वहीवर त्यान्चा शिक्का मारुन घ्यायला सान्गितले .
कोटेश्वरहुन निघालो तेव्हा दुपारचा दीड वाजला होता.आतापर्यन्त १४कि.मि. चाललो होतो सिसोदरा ४कि.मि. आणि तिथुन पुढे ८कि.मि. पुढे कार्तिकेश्वर{स्कन्देश्वर} मौनीबाबा आश्रम कान्दरोज. पाय उचलायला हवेत.उन खुप होते भोजनही झालेले त्यामुळे चालण्याचा वेग कमी झाला होता. सिसोदरा आले तेव्हा साडेतीन वाजले होते.गावाला छान प्रवेशद्वार होते,समोरच मोठा पिम्पळाचा पार होता,गार सावलीला बसलो.गावात कुणा मालदार आसामीकडे एखादा समारम्भ असावा,पाराखाली बर्याच गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. नर्मदेहर झाले,आम्हाला राहण्याचा आग्रहही झाला पण आम्ही आजचा मुक्काम कान्दरोजला ठरवला होता म्हणून नाही म्हटले.चहा घेउन विनोबाएक्स्प्रेस पुढे निघाली. रस्ता प्रवेशद्वारा बाहेरुन डाव्या बाजुला होता.
कच्चा रस्ता दुतर्फा शेते पण सावलीसाठी मोठी झाडे नसल्याने उन्हाचा त्रास खुप होत होता.साधारणपणे तीन चार कि.मि. चाललो असुनसु माझे डोके खुप दुखायला लागले कसेतरी होत होते सिसोदर्याला राहिलो असतो तर बरे झाले असते असे वाटायला लागले,पण आता सिसोदरा चार कि.मि. आणि कान्दरोजही चारच कि.मि. राहिले होते पुढे जाणेच इष्ट.मैय्या दमले ग बाई ! नर्मदे हर.
पाय ढकलत होतो आणि... एक जीप आली,नर्मदे हर माताजी नर्मदेहर बाबाजी जीपमधील माणसाने हाक मारली.कुठे जाणार? कार्तिकेश्वर मौनीबाबा आश्रमात आमचे उत्तर.बसा;मी सोडतो. ते होते अरुणभाई विठ्ठलभाई पटेल.बसलो.
आम्ही गाडीत बसलो तिथुन पुढचा रस्ता अतिशय खराब होता.थोड्याच वेळात एक नदी लागली तिला खुप पाणी होते,अरुणभाई म्हणाले समुद्राला भरती आली की हिला पाणी चढते.म्हणजे आता थोड्याच दिवसात आमचा दक्षिण किनार्यावरचा परिक्रमेचा भाग पुर्ण होणार याचा आनन्द झाला. अरुणभाईनी अगदी लीलया जीप त्या पाण्यातुन बाहेर काढली,आणि एक चढ चढुन थाम्बवली.म्हणाले या उजव्या बाजुच्या रस्त्याने जा तो बघा तो दिसतो आहे तोच मौनीबाबा आश्रम. नर्मदे हर.अशातर्हेने पुन्हा मैय्या आपल्या बालकान्ची किती काळजी घेते याचा प्रत्यय आला ऊर भरुन आलेंअर्मदे हर.
सन्ध्याकाळ झाली होती.आश्रमात पोहोचलो,महाराज बाहेर गेले होते सेवेकर्याने पडवीत आसन लावायला सान्गितले त्या पडवीत आधीच बरेच परिक्रमावासी बसले होते,विड्यान्च्या धुराने पडवी भरली होती तम्बाखुचा वास प्रचन्ड होता मला तिथे रहाणे शक्यच नव्हते,सेवेकर्याला मी तिथे राहण्यास नकार दिला आणि खोली द्यावी अशी विनन्ती केली ते म्हणाले महाराज आल्यावर तेच काय ते सान्गतील. आम्ही झाडाच्या पारावर बसलो,समजा खोली नाही मिळाली तरी पारावर रहाणे त्या पडवीपेक्षा कितितरी चान्गले असा विचार केला.हातपाय धुवुन चहा घेतो तोच महाराज आले,त्यानी आम्हाला खोली द्यायला सान्गितली.
महाराज खुप शिकलेले आहेत.आमच्याशी खुप वेळ बोलत होते. मौनीबाबानी या ठिकाणी तप केले होते.त्याकाळी या जागी दाट जन्गल होते,स्वयम्भू स्कन्देश्वरा बद्दल लोकाना काहिही माहित नव्हते,मौनीबाबानी या क्षेत्राचा विकास केला.आता मौनीबाबा नाहीत त्यान्ची समाधी बडोदा येथे आहे. रात्री भोजनानन्तर भजनाचा कार्यक्रम झाला.आता विश्रान्ती.
13) आनन्द आश्रय धाम गोराग्राम-राजपिपला सुन्दर आश्रम.पहाटे ४ वाजता मन्दिरात पुजाभिषेकाला सुरवात होते,रुद्रपाठ,शिवमहिन्म स्तोत्रपाठ होतो त्यानन्तर होतो मधुर शन्खनाद,आरतीला यावे असा सन्देश शन्खनादाद्वारे देतात.तबला पेटी म्रुदुन्ग डमरु आणि झान्जा यान्च्या तालावर सुरेल आरती सुरु होते. तेथिल वेदशाळेतील विद्यार्थी हे सर्व करतात. अत्यन्त शिस्तशीर वातावरण असते. पुजारतीनन्तर चहापान होते आणि सर्वजण आपापल्या कामाला लागतात.
आम्ही मैय्या किनार्याने फिरायला बाहेर पडलो कारण नास्ता ८ वाजता मिळणार होता. सुर्योदय नुकताच झाला होता. प्राची गुलाबी लालसर रन्गाने न्हाउन निघाली होती. छान गार वारा सुटला होता अर्थात थन्डीही वाजत होती पण वातावरणात उत्साह भरुन ओसन्डत होता. आश्रमाच्या बगिच्यातील फुले सुन्दर उमलली होती सुगन्ध वातावरणात दरवळत होता. घाटावर उतरलो मैय्याच्या पात्रात पाणी कमी होते,थोड्याच दुरीवर सरदार सरोवर असल्याने पाणी सोडले तरच पात्रात पाणी असते पण तरिही अधुनमधुन असलेल्या खडकान्च्या कपारीमधुन अवखळपणे दूडु दुडू धावणारी जलरुपी नर्मदामैय्या सोनेरी उन्हाचे चमचमते परकर पोलके घातलेल्या अवखळ बालिके सारखी गोजिरवाणी दिसत होती. पात्रातिल दगडा खडकान्च्या आश्रयाने उभ्या रानवेली आणि त्यान्च्यावर उमललेली छोटी छोटी रन्गिबिरन्गी सुन्दर फुले जणू तिच्या सोनेरी परकर चोळीवरचा कशिदाच. कितीतरी वेळ आम्ही अनिमिष नेत्राने भान हरपुन बघत होतो.
नन्तर तसेच किनार्याने शुलपाणेश्वराच्या मन्दिराकडे गेलो.वाटेत हरिधाम दिसले,काल दुपारी तिथे भोजनप्रसाद घेतला होता.आश्रमाची मागची बाजु होती ही. मोठमोठ्या व्रुक्षान्च्या दाटीत लपले होते हरिधाम.आम्ही खालच्या बाजुला होतो आणि आश्रम उन्च टेकडीवर पण कम्पाउन्डला लावलेल्या रन्गिबिरन्गी बोगन्वेली सुन्दर दिसत होत्या. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे शुलपाणेश्वराच्या मन्दिराकडे जाणारा रस्ता तुटला होता त्यामुळे मन्दिरात न जाता आम्ही आनन्दधाम मध्ये परत आलो. नास्ता तयार होता. तो करुन खोलीत परत आलो,आता १२ वाजता भोजनाची घन्टा होइपर्यन्त काही काम नव्हते. कपडे धुणे राहिले होते कारण घाईघाईने आरतीला जावे लागले होते,कपडे धुतले. नन्तर नातेवाईकाना फोन केले.
दुपारी भोजनप्रसाद घेतल्यानन्तर थोडावेळ सन्ध्याकाळच्या स्वयम्पाकाच्या कामात मदत केली,तान्दुळ निवडले,भाजी निवडली अशी काहीबाही मदत. नन्तर खोलीत आलो.थोडावेळ विश्रान्ती घेतली. ह्यान्च्या जवळच्या पिशवीत माझ्यामते जास्त सामान होते म्हणजे त्यान्ची पिशवी जड आणि माझी हलकी,म्हणून सेटीन्ग बदलले आता आपापले सामान आपापल्या पिशवीत केले. बघू उद्या चालताना कळेल किति वजन आहे ते.
४ वाजता चहाची घन्टा झाली,चहा घेतला.तिथे इन्दिराबेन या बुजुर्ग महिलेची भेट झाली,त्या आधी या आश्रमाचे व्यवस्थापन पहात असत. आता व्रुध्दापकाळामुळे त्या निव्रुत्त जीवन शान्तपणे याच आश्रमात व्यतित करत आहेत.त्या उत्तम मराठी बोलतात कारण त्यान्चे लहानपण महाराष्ट्रातील डहाणू येथे गेले होते,त्यान्चे वडील तिथे स्टेशनमास्तर होते. आम्ही बराचवेळ गप्पा मारत होतो,त्यानी भारती ठाकुर,निवेदिता खान्डेकर आणि उष्प्रभा पागे यान्ची आठवण काढली.
सन्ध्याकाळी मुख्यमहाराजान्ची महन्त वियोगानन्द सरस्वती यान्ची भेट झाली ते बरेच वयस्क आहेत. त्याना प्रणाम केला. दोन दिवसानी येथे मोठा रुद्रयाग होणार आहे,सजावटीच्या कामात आम्ही दोघानी मदत केली. महाराज म्हणाले याग होईपर्यन्त रहा पण ते शक्य नव्हते. आज कार्तिक अमावास्या आहे,सन्ध्याकाळी दिपोत्सव केला होता.शुद्धतुपातील पणत्यान्च्या शान्त प्रकाशात सारा आसमन्त,मैय्याचे पात्र उजळून निघाले होते.डोळ्यान्चे पारणे फेडणारा नजारा होता.
उद्या देवदिवाळी. पुढे प्रस्थान.
14) स्नान पुजारती करुन निघणार तोच महाराज म्हणाले,नास्ता केल्याशिवाय जायचे नाही,त्यानी स्वतः उभे राहुन पोहे बनवुन घेतले. स्कन्देश्वराची शास्त्रोक्त पुजा पहाटेच झाली होती.तिथे एक मामा आहेत थोडे अपन्ग आहेत पुजेच्या तयारीची जबाबदारी त्यान्ची असते. ह्यान्चे पोट दुखत होते दोनतीन दिवसापासुन.तर त्या मामानी त्यान्चा फोन नम्बर दिला आणि म्हणाले रस्त्यात जास्त त्रास झाला तर फोन करा मी गाडी घेउन येइन मग आपण दवाखान्यात जावू.दुखणे अन्गावर काढू नका.अशी सगळी प्रेमळ माणसे. नास्ता चहा घेउन विनोबाएक्स्प्रेस पुढे निघाली.
साधारण एक कि.मि.वर कान्दरोज गाव आहे.आमच्या बरोबर काल कार्तिकेश्वर आश्रमात वस्तीला असलेले एक बुजुर्ग परिक्रमावासी चालत होते,साधारण २/३कि.मि. चालल्यावर एका ठिकाणी त्यानी एका डेअरीतुन दुध घेतले आणि एका घरात फक्तदुधाचा फक्कड चहा करायला दिला,आम्ही पुढे निघालो होतो तर म्हणाले,मैय्याजी आप लोग पन्डीत हो {ब्राम्हण आहात} आपको चाय पिलाना बडा पुण्यका काम है इसलिये आपकेलियेही ये दुध लिया है चायपिकेही आगे बढिएगा. मग आमचा नाईलाज झाला.मध्यप्रदेश,गुजराथ मध्ये ब्राम्हणाना फार आदराने वागवले जाते.आमच्या सारख्या जात-पात न मानणार्यान्ची अशावेळी फार पन्चाईत होते. असो. नर्मदेहर.
साधारणपणे तीन कि.मि. चाललो नावडोगाव आले.दोन रस्ते फुटले होते,दुकानात चौकशी केली डाव्या हाताच्या रस्त्याने जायचे होते,त्याच दुकानात बिस्किटे,साबण वगैरे घेतले आणि पुढे निघालोंअन्तर तीन कि.मि.वर वडीयातलाव गाव आले,तिथे गौआश्रम आहे.श्रीक्रुष्णाचे मन्दिर आहे,दर्शन घेतले तेथिल दुकानदाराने आम्हाला थन्डपाण्याचे पाऊच दिले. नर्मदेहर. तिथुन पुढे एक कि.मि.वर वेलुग्रामला जाणारा फाटा लागला पण आमच्या लिस्ट मध्ये असलेला आशाघाटचा आसा आश्रम तर दिसला नव्हता त्यामुळे हे वेलुग्राम वेगळे असेल म्हणुन आम्ही तिकडे न जाता सरळ निघालो.तीनएक कि.मि. चाललो असु,हान्चे पोट खुपच दुखायला लागले,त्याना चालवेना.निर्मोही आश्रम अजुन बराच लाम्ब होता आणि एखाद्या मोठ्या गावात जाणेच अशा परिस्थितीत योग्य होते.
काहीजण तिथे उभे होते ते बसची वाट पहात होते, उमल्ला गाव येथुन १५कि.मि. होते त्या गावाहुन १०कि.मि.वर राजपारडी हे तालुक्याचे ठिकाण होते मग आम्हीही उमल्ला येथे जाण्याचे ठरवले.थोड्याच वेळात एक सहासिटर विक्रम रिक्षा आली तिने उमल्ला येथे आलो. आता राजपारडीला जायचे होते,एखादे वाहन मिळावे म्हणून वाट बघत रस्त्यावर उभे होतो,एक पोलिस जीप आमच्या जवळ येउन थाम्बली आणि त्यातील ट्राफिक इन्स्पेकटरने आम्हाला नर्मदेहर केले आणि विचारले पेहचाना नही क्या? आम्ही खरेच ओळखले नव्हते,एवढ्या दिवसाच्या प्रवासात कुणा पोलिसाची ओळख झाल्याचे स्मरत नव्हते,नाही आम्ही मान हलवली.ते इन्स्पेक्टर म्हणाले मै नगीनभाई आप हमारे घर आये थे.खरच की तेव्हा ते युनिफॉर्ममध्ये नव्हते आणि आता कडक युनिफॉर्म होता कसे ओळखणार?
त्यानी इकडुन कसे काय आलात विचारले ह्यान्च्या पोटदुखीबद्दल सान्गितले ते म्हणाले चला राजपारडीला मग बसलो जीपमध्ये.बोलता बोलता आम्हाला नन्तर भालोदला जायचे आहे असे म्हटले तर नगीनभाई म्हणाले राजपारडीहुन भालोद फक्त ७कि.मि. आहे तेव्हा तुम्ही आजच भालोदला जावू शकाल आम्ही ठीक आहे म्हटले,पोट दुखायला लागल्यावर लगेचच त्याना गोळी दिली होती त्यामुळे त्याना आता थोडे बरे वाटत होते म्हणुन राजपारडीला अजुन काही गोळ्या घेउन भालोदला जाण्याचे ठरवले.राजपारडीला नगीनभाईन्च्या पोलिसचौकीत पोहोचलो.
पाणी पिवुन मी समोरच्याच मेडिकल दुकानातुन गोळ्या घेउन आले.जेवण्याची वेळ झाली होती हलके अन्न म्हणुन नगीनभाईनी जिरा राइस मागवला आणि आम्हाला खायला लावला,बिसलरी पाण्याच्या दोन बाटल्याही दिल्या.एवढेच नाहीतर एका रिक्षावाल्याला पैसे देउन आम्हाला भालोदला सोडण्यास सान्गितले. अशी सज्जन,मोठ्या मनाची माणसे मैय्या आम्हाला वारन्वार भेटवीत होती.
राजपारडीला चौकीत बसलो असताना एक भयन्कर प्रकार बघायला मिळाला मन सुन्न करणारा. मोठा गडबड गोन्धळ उडाला आणि पोलिस एका माणसाला गच्ची पकडून घेउन आले,काय झाले आम्ही घाबरुनच गेलो.त्या माणसाने म्हणे एक गरिब आदिवासी मुलगी विकत घेतली होती अवघ्या ५०,००० रुपयाना.त्या मुलीच्या गावातील काही जणानी त्याला रन्गेहात पकडुन त्यान्च्यातील मध्यस्थासह पकडले होते.ती मुलगी तिचे कुटुम्बीयही होते,मुलगी फारतर १४/१५ वर्षान्ची असावी्आ प्रकार पाहुन आम्हीतर हादरुनच गेलो.गुजराथ सारख्या राज्यातही असले प्रकार होतात?बाप रे.
नगीनभाईनी आम्हाला रिक्षात बसवुन ताबडतोब रवाना केले.दोन वाजता भालोदला श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराजान्च्या दत्तकुटीरमध्ये पोहोचलो.महाराज नव्हते ते बदलापुरच्या बापट गुरुजीन्च्या परिक्रमे बरोबर गेले होते. महाराजान्चे शिष्य राहुल,सोमण,आणि नाशिकच्या विनयनगरमधील रहिवासी खगेन्द्रबुवा यानी स्वागत केले त्यानी महाराजाना फोन केला,महाराज म्हणाले परान्जपेना सान्गा मी आल्याशिवाय जायचे नाही.ते उजैनीला होते.
हात-पाय धुवुन जेवायला बसलो,वरण-भात भाजी गरमगरम पोळ्या.अगदी घरच्यासारखे मराठमोळे जेवण.अन्तरात्मा त्रुप्त झाला.
स्नान पुजारती करुन निघणार तोच महाराज म्हणाले,नास्ता केल्याशिवाय जायचे नाही,त्यानी स्वतः उभे राहुन पोहे बनवुन घेतले. स्कन्देश्वराची शास्त्रोक्त पुजा पहाटेच झाली होती.तिथे एक मामा आहेत थोडे अपन्ग आहेत पुजेच्या तयारीची जबाबदारी त्यान्ची असते. ह्यान्चे पोट दुखत होते दोनतीन दिवसापासुन.तर त्या मामानी त्यान्चा फोन नम्बर दिला आणि म्हणाले रस्त्यात जास्त त्रास झाला तर फोन करा मी गाडी घेउन येइन मग आपण दवाखान्यात जावू.दुखणे अन्गावर काढू नका.अशी सगळी प्रेमळ माणसे. नास्ता चहा घेउन विनोबाएक्स्प्रेस पुढे निघाली.
साधारण एक कि.मि.वर कान्दरोज गाव आहे.आमच्या बरोबर काल कार्तिकेश्वर आश्रमात वस्तीला असलेले एक बुजुर्ग परिक्रमावासी चालत होते,साधारण २/३कि.मि. चालल्यावर एका ठिकाणी त्यानी एका डेअरीतुन दुध घेतले आणि एका घरात फक्तदुधाचा फक्कड चहा करायला दिला,आम्ही पुढे निघालो होतो तर म्हणाले,मैय्याजी आप लोग पन्डीत हो {ब्राम्हण आहात} आपको चाय पिलाना बडा पुण्यका काम है इसलिये आपकेलियेही ये दुध लिया है चायपिकेही आगे बढिएगा. मग आमचा नाईलाज झाला.मध्यप्रदेश,गुजराथ मध्ये ब्राम्हणाना फार आदराने वागवले जाते.आमच्या सारख्या जात-पात न मानणार्यान्ची अशावेळी फार पन्चाईत होते. असो. नर्मदेहर.
साधारणपणे तीन कि.मि. चाललो नावडोगाव आले.दोन रस्ते फुटले होते,दुकानात चौकशी केली डाव्या हाताच्या रस्त्याने जायचे होते,त्याच दुकानात बिस्किटे,साबण वगैरे घेतले आणि पुढे निघालोंअन्तर तीन कि.मि.वर वडीयातलाव गाव आले,तिथे गौआश्रम आहे.श्रीक्रुष्णाचे मन्दिर आहे,दर्शन घेतले तेथिल दुकानदाराने आम्हाला थन्डपाण्याचे पाऊच दिले. नर्मदेहर. तिथुन पुढे एक कि.मि.वर वेलुग्रामला जाणारा फाटा लागला पण आमच्या लिस्ट मध्ये असलेला आशाघाटचा आसा आश्रम तर दिसला नव्हता त्यामुळे हे वेलुग्राम वेगळे असेल म्हणुन आम्ही तिकडे न जाता सरळ निघालो.तीनएक कि.मि. चाललो असु,हान्चे पोट खुपच दुखायला लागले,त्याना चालवेना.निर्मोही आश्रम अजुन बराच लाम्ब होता आणि एखाद्या मोठ्या गावात जाणेच अशा परिस्थितीत योग्य होते.
काहीजण तिथे उभे होते ते बसची वाट पहात होते, उमल्ला गाव येथुन १५कि.मि. होते त्या गावाहुन १०कि.मि.वर राजपारडी हे तालुक्याचे ठिकाण होते मग आम्हीही उमल्ला येथे जाण्याचे ठरवले.थोड्याच वेळात एक सहासिटर विक्रम रिक्षा आली तिने उमल्ला येथे आलो. आता राजपारडीला जायचे होते,एखादे वाहन मिळावे म्हणून वाट बघत रस्त्यावर उभे होतो,एक पोलिस जीप आमच्या जवळ येउन थाम्बली आणि त्यातील ट्राफिक इन्स्पेकटरने आम्हाला नर्मदेहर केले आणि विचारले पेहचाना नही क्या? आम्ही खरेच ओळखले नव्हते,एवढ्या दिवसाच्या प्रवासात कुणा पोलिसाची ओळख झाल्याचे स्मरत नव्हते,नाही आम्ही मान हलवली.ते इन्स्पेक्टर म्हणाले मै नगीनभाई आप हमारे घर आये थे.खरच की तेव्हा ते युनिफॉर्ममध्ये नव्हते आणि आता कडक युनिफॉर्म होता कसे ओळखणार?
त्यानी इकडुन कसे काय आलात विचारले ह्यान्च्या पोटदुखीबद्दल सान्गितले ते म्हणाले चला राजपारडीला मग बसलो जीपमध्ये.बोलता बोलता आम्हाला नन्तर भालोदला जायचे आहे असे म्हटले तर नगीनभाई म्हणाले राजपारडीहुन भालोद फक्त ७कि.मि. आहे तेव्हा तुम्ही आजच भालोदला जावू शकाल आम्ही ठीक आहे म्हटले,पोट दुखायला लागल्यावर लगेचच त्याना गोळी दिली होती त्यामुळे त्याना आता थोडे बरे वाटत होते म्हणुन राजपारडीला अजुन काही गोळ्या घेउन भालोदला जाण्याचे ठरवले.राजपारडीला नगीनभाईन्च्या पोलिसचौकीत पोहोचलो.
पाणी पिवुन मी समोरच्याच मेडिकल दुकानातुन गोळ्या घेउन आले.जेवण्याची वेळ झाली होती हलके अन्न म्हणुन नगीनभाईनी जिरा राइस मागवला आणि आम्हाला खायला लावला,बिसलरी पाण्याच्या दोन बाटल्याही दिल्या.एवढेच नाहीतर एका रिक्षावाल्याला पैसे देउन आम्हाला भालोदला सोडण्यास सान्गितले. अशी सज्जन,मोठ्या मनाची माणसे मैय्या आम्हाला वारन्वार भेटवीत होती.
राजपारडीला चौकीत बसलो असताना एक भयन्कर प्रकार बघायला मिळाला मन सुन्न करणारा. मोठा गडबड गोन्धळ उडाला आणि पोलिस एका माणसाला गच्ची पकडून घेउन आले,काय झाले आम्ही घाबरुनच गेलो.त्या माणसाने म्हणे एक गरिब आदिवासी मुलगी विकत घेतली होती अवघ्या ५०,००० रुपयाना.त्या मुलीच्या गावातील काही जणानी त्याला रन्गेहात पकडुन त्यान्च्यातील मध्यस्थासह पकडले होते.ती मुलगी तिचे कुटुम्बीयही होते,मुलगी फारतर १४/१५ वर्षान्ची असावी्आ प्रकार पाहुन आम्हीतर हादरुनच गेलो.गुजराथ सारख्या राज्यातही असले प्रकार होतात?बाप रे.
नगीनभाईनी आम्हाला रिक्षात बसवुन ताबडतोब रवाना केले.दोन वाजता भालोदला श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराजान्च्या दत्तकुटीरमध्ये पोहोचलो.महाराज नव्हते ते बदलापुरच्या बापट गुरुजीन्च्या परिक्रमे बरोबर गेले होते. महाराजान्चे शिष्य राहुल,सोमण,आणि नाशिकच्या विनयनगरमधील रहिवासी खगेन्द्रबुवा यानी स्वागत केले त्यानी महाराजाना फोन केला,महाराज म्हणाले परान्जपेना सान्गा मी आल्याशिवाय जायचे नाही.ते उजैनीला होते.
हात-पाय धुवुन जेवायला बसलो,वरण-भात भाजी गरमगरम पोळ्या.अगदी घरच्यासारखे मराठमोळे जेवण.अन्तरात्मा त्रुप्त झाला.
भालोद, तालुका राजपारडी जिल्हा राजपिपला-गुजराथ.एक लहानसे खेडेगाव.येथे श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराज हे मराठी व्यक्तिमत्व रहाते.वासुदेवानन्द सरस्वती स्वामीन्चे अनुग्रहीत दत्तभक्त आहेत्.मुर्ती लहान किर्ती महान असलेले प्रतापे महाराज साधे धोतर सदरा घातलेले असतात. हसुन मनमोकळे बोलणे,आदराने विचारपुस करुन आपल्याला हवे नको पहाणार.
त्यान्च्या दत्तमन्दिरातील एकमुखी दत्तमुर्ती काळ्या गन्डकी पाषाणाची असुन मुर्तीच्या छातीवर गोमुख आहे. ही मुर्ती भालोदला प्रतापे महाराजान्कडे कशी आली याची एक कहाणी आहे.बडोद्याच्या श्री. निरखे यान्च्याकडे ही मुर्ती होती,प्रसन्वशाने व्रुधत्व आल्याने पुजा होणे कठीण होते,त्या घरातील माताजीना स्वप्न द्रुष्टान्त झाला की एक ब्राम्हण येईल त्याला ही मुर्ती द्यावी तो भालोदला मुर्तीची प्रतिष्ठापना करुन तो पुजा करेल.ईकडे प्रतापे महाराजानाही स्वप्नात बडोद्याला जावुन मुर्ती आणावी असा द्रुष्टान्त झाला.मग महाराज बडोद्याला जावुन मुर्ती घेउन आले आणि मन्दिर बान्धुन मुर्तीची प्रतिष्ठापना केली.दत्तमुर्तीच्या पायापाशी वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्च्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.
पहाटे काकड आरतीने,भुपाळी म्हणून दत्तगुरुना जागवतात,नन्तर लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवतात. नन्तर पन्चाम्रुती पुजा करतात. गुरुचरित्र पठण करतात.दुपारी भोजनप्रसाद असतो,नैवेद्य दाखवल्यानन्तर देवाला सुन्दर रेशमीवस्त्र घालतात,दागिने घालतात.मोठे मनोहर दिसते रुप. सन्ध्याकाळी धुपारती होते धुपाच्या सुगन्धाने सारा परिसर दरवळतो. सकाळच्या आरतीच्यावेळी नर्मदामैय्याची वासुदेवानन्दसरस्वती रचित सन्स्कृत आरती म्हणतात,तर सन्ध्याकाळच्या आरतीच्यावेळी मैय्याची हिन्दी आरती म्हणतात. रात्री शेजारती होते,थन्डीचे दिवस असल्याने देवाला लोकरीचे कपडे घालतात.रुपडे इतके गोजिरवाणे दिसते की मनातली माया उमडुन येते,वाटते पटकन उचलुन कडेवर घ्यावे.वासुदेवानन्दसरस्वतीना लोकरी शाल पान्घरतात.
देवाच्या गाभार्यात एक लक्ष गायत्रीमन्त्राचा जप केलेल्या व्यक्तीलाच प्रवेश करता येतो.दत्तगुरु आणि वासुदेवानन्दसरस्वती यान्चे कडक सोवळे पाळावे लागते.भालोदला सगळे मराठी वातावरण आहे. पुजा करण्याची पद्धत मराठी,आरत्या मराठी,भोजनप्रसाद मराठी. भाषा मराठी,विचार मराठी.खुप दिवसानी घरी आल्यासारखे वाटत होते.
भालोदला मोर खुप आहेत. सन्ध्याकाळी अन्गणात येतात,त्याना चारा घालतात. अगदी आपल्या जवळ येतात. हातही लावुन देतात.जणू पाळलेले आहेत. महाराजान्च्या घरवजा आश्रमाचा मैय्याजवळ जाण्यासाठी स्वतन्त्र घाट आहे. स्वच्छ सुन्दर जल,भव्य पात्र आहे मैय्याचे भालोदला. राहुल येवल्याचा,खगेन्द्र तर नाशिकचा विनयनगर म्हणजे अगदी आमच्या घराजवळच. धनन्जय जोशी हा छोटा मुलगा धुळ्याचा म्हणजे नाशिक जवळचाच जणू आम्ही सर्व एकाच कुटुम्बातील सदस्य असे मिसळुन गेलो होतो.
भालोदला तीन दिवस मुक्काम होता,तिन्ही दिवस मी अन्गण झाडणे,सडा घालणे,रान्गोळी काढणे अशी माझी आवडती कामे करत होते खुप छान.आमचे घर पहिल्या मजल्यावर अन्गण सडा-रान्गोळी कुठली मिळते करायला,इथे ती हौस भागली.अगदी माहेरी आल्यासारखे वाटत होते.
दोन दिवसानी महाराज आले.साधी वामनमुर्ती,वाढलेली दाढी केस.मुखावर प्रसन्न हास्य. दत्तजयन्ती जवळ आली होती,महाराजान्चे आल्या आल्या उत्सवाच्या कामाबद्दल सुचना देणे सुरु झाले,नुसती लगबग. एकीकडे आमच्याशी गप्पाही मारत होते.प्रतापेमहाराजान्च्या दर्शनाने परिक्रमेला आल्याचे सार्थक झाले.
आजपर्यन्तच्या परिक्रमेत, ओम्कारेश्वरापासुन खेतिया पर्यन्त मध्यप्रदेश्,नन्तर शहादा,दक्षिणकाशी प्रकाशा,अक्कल्कुवा,गव्हाळी पर्यन्त महाराष्ट्र,धनशेरा-राजपिपला पासुन गुजराथ असा प्रवास चालु आहे,गुजराथ नर्मदासन्गम पार केल्यावरही बराच काळ आपल्याला सोबत करणार आहे. उद्या पुढे निघुया
भालोदला पुण्याच्या निखिल वाळिम्बेची भेट झाली.तसेच चन्द्रकान्तविचारे यान्ची भेट झाली,विचारे सायकलवर परिक्रमा करत होते.रात्रीच्या भोजनाच्या वेळी सर्वान्ची एक पन्गत करुन खिचडीचे पातेले मधोमध ठेवून बसलो,कुर्डया पापड,लोणचे,तळलेले मिरचीचे सान्डगे असा छान मराठमोळा बेत होता.महाराजही आमच्याच बरोबर बसले होते,मोठ्या मजेत हास्यविनोद करत जेवणे झाली नन्तर चान्दण्यात गप्पाही झाल्या.खुप मजा आली.
पहाटे उठलो,काकड आरती झाल्यावर अन्गण झाडुन सडा-रान्गोळी केली,स्नान पुजा आरती करुन नास्त्यासाठी पोहे केले. चहा-पोहे खाऊन निघालो,निखिल आज राहणार होता,विचारे सायकलवर जाणार होते त्यामुळे आम्ही दोघेच निघालो.
मैय्याकिनार्याने खुप दलदल असल्याने गावातुन रस्त्याने जाणे क्रमप्राप्त होते,महाराज आणि बाकी सर्वान्चा निरोप घेउन,नर्मदेहर म्हटले आणि विनोबाएक्स्प्रेसचा प्रवास पुढे सुरु केला.साधारणपणे ३कि.मि. गेल्यावर एक नदी लागली नदी ओलान्डून पलिकडे एक रस्ता दिसत होता आणि एक आम्ही उभे होतो त्या किनार्याने वरच्या बाजुने एक रस्ता होता कोणता रस्ता आमचा होता? नदीला गुढग्यापर्यन्त पाणी असावे असे वाटत होते,पाण्याला ओढही बर्यापैकी दिसत होती काय करावे ह्या विचारात होतो तितक्यात विचारे आले,त्यानी आधीही परिक्रमा केलेली असल्याने त्याना रस्ता माहित होता,नदीपलिकडचा रस्ता आमचा होता. बुटमोजे काढून हातात घेतले,मी एका हाताने विचारेन्ची सायकल धरली आणि नदी पार केली.आधी विचारे भालोदला राहाणार होते पण मग त्यान्च्या मनात विचार आला,वाटेत नदी आहे परान्जपे आणि वहिनी दोघेच आहेत,त्याना माहीत होते नदीला पाणी असते आणि म्हणुन त्यानी लगेच निघायचा विचार केला आणि ते आले. फक्त एक दिवसाची ओळख तरी त्याना आमच्याबद्दल एवढे वाटले,हीच मैय्याची क्रुपा.
नदी पार केल्यावर विचारे पुढे गेले,अर्थात मला जाऊ का? असे विचारुनच ते गेले. नदीपलिकडच्या रस्त्याला चिखल होता कारण नदीतुन ट्रक्टर,बैलगाड्या जात असल्याने चिखल झाला होता,बुट घालण्यासाठी बसायला जागा नव्हती म्हणुन थोडे अन्तर तसेच चालावे लागले.एक वस्ती लागली,झोपडीतिल माताजीना विचारुन त्यान्च्या ओट्यावर बसलो,हातपाय धुतले,तो पर्यन्त त्या माताजीनी चहा केला मैय्या तुझ्या लेकरान्चे कौतुक करावे तितके कमीच आहे. नर्मदेहर.
पुढे निघालो.४कि.मि.वर अविधा गाव आले.तिथे रामेश्वराचे प्राचिन मन्दिर आहे.दर्शन घेतले,ओट्यावर बसलो.तिथे डेअरीला दुध घालण्यासाठी आजुबाजुच्या गावातुन लोक आले होते,एका टेम्पोत डिग्री लावुन दुध सन्कलीत केले जात होते.रामेश्वर मन्दिराच्या आवारात एक खोली होती,एका ग्रुहस्थानी ती खोली उघडली आणि आम्हाला तिथुन भान्डे घेउन त्या शेतकर्यान्कडुन दुध घेउन चहा करुन प्या असे सान्गितले.ती खोली परिक्रमावासीन्साठी आहे,तिथे काही भान्डी,वातीचा स्टोव्ह होता पण आम्ही थोड्यावेळापुर्वीच चहा घेतला होता म्हणून नको म्हटले.
अविधा बर्यापैकी मोठे गाव आहे,पुढे निघालो. साधारणपणे ३/४ कि.मि. गेलो रस्त्याच्या कडेला एक बोर्ड दिसला मढी-तरई ३कि.मि. आम्हाला जगदीशमढीला जायचे होते आणि ते झगडियाला होते,हे वेगळे असेल म्हणुन आम्ही पुढे निघालो. नवीन रेल्वे लाइन टाकण्याचे काम चालु होते,एका बान्धकाम चालु असलेल्या पुलाजवळ थोडे विश्रान्ती घ्यावी म्हणुन थाम्बलो,उन चढायला लागले होते,थकवाही वाटू लागला होता.दहा वाजुन गेले होते.
कैलास प्रजापति नावाचा मुलगा आम्हाला पाहुन थाम्बला,आपुलकीने आमची चौकशी केली,म्हणाला मढीचा रस्तातर मागे राहिला,आम्हाला झगडियाला जायचे आहे म्हटल्यावर त्याने स्वतःचा मोबाईलनम्बर दिला आणि काही वाटले तर फोन करा असे सान्गुन गेला. थोडावेळ बसुन आम्ही पुढे निघालो. दोनेक कि.मि. नन्तर कराड गाव आले,रस्त्यावर कैलास प्रजापती आमची वाट बघत उभा होता,आग्रहाने आम्हाला घरी घेउन गेला त्याच्या आईने हसुन स्वागत केले थन्ड पाणी दिले.जेवण करण्याचा आग्रह केला पण ह्यान्चे पोट आज पुन्हा दुखायला लागले होते त्यामुळे नको म्हटले. मग चहा घेतला.कैलासने आमच्या पाण्याच्या बाटल्या थन्ड पाण्याने भरुन दिल्या,म्हणाला हन्डपम्पाचे पाणी पिऊ नका,अक्वागार्डचे पाणी देतो.अशी अगत्यशील माणसे आहेत.
कराडगावातुन कैलास प्रजापती आणि त्याच्या आईचा निरोप घेउन पुढे निघालो.दोनेक कि.मि. वर वाघपुरा गाव आले,इथुन जगदीशमढीचा रामधुन आश्रम आणखी तीन कि.मि. दुर होता.बारा वाजले होते,ह्यान्चे पोटही दुखत होते,वाघपुराला हायवे होता आणि इथुन अन्कलेश्वर १५कि.मि. होते.अन्कलेश्वरला आमची भाची राहते तिच्याकडेच आम्हाला नन्तर जायचेच होते,म्हणुन आम्ही आश्रमात न जाता सरळ अन्कलेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला.वाघपुराच्या बसस्टॉपवर उभे राहिलो. एका मारुती गाडीतुन अन्कलेश्वरला आलो.अन्कलेश्वरच्या राजपिपला चौकडीवर सदानन्द होटेलजवळ आमचे जावई श्री.ओन्कार कर्वे आम्हाला घेण्यासाठी आले. वाटेत एका ठिकाणी कोल्डड्रिन्क पिवुन दोन कि.मि. चालत आमच्या भाचीच्या मिनूच्या घरी आलो.
मिनूला खुप आनन्द झाला म्हणाली,मामाचा वाढदिवस आज माझ्या घरी साजरा होणार.अरेच्चा! खरेच की,आज ह्यान्चा वाढदिवस आहे.आम्ही विसरलोच होतो.
अन्कलेश्वरला घरच असल्याने मजाच होती. मिनुने ह्यान्च्या वाढदिवसानिमित्त श्रीखन्ड आणले होते पण पोटदुखिने तिचे मामा बेजार झाले होते थोडेसे खाल्ले.निशाला ,{ह्यान्ची बहीण मिनुची आई} फोन करुन अन्कलेश्वरला ये सान्गितले,रात्रीच्या बसने निघुन ती लगेच सकाळी आली सुद्धा.
सकाळी डॉक्टरकडे जाउन ह्याना तपासुन आणले,मी दिलेली औषधे बरोबर आहेत असे डॉक्टर म्हणाले.त्यामुळे बरे झाले. पुण्याच्या भागवतान्चा फोन होता,ते आणि त्यान्च्याबरोबरचे सहा जण मिनुच्याच घरी येणार आहेत.कारण अन्कलेश्वरला आश्रमासारखी काही सोय नाही.मिनुला ते येणार म्हणून खुप आनन्द झाला.मिनुचे घरमालक श्री. सिन्ग यानाही येणार्या पाहुण्यान्बद्दल सान्गितले.ते म्हणाले ,परिक्रमावासि लोगोन्की सेवा करनेका ये मौका सौभाग्यसे आया है,वे लोग हमारे घरमे रहेन्गे और आप सब लोग भोजन हमारे यहा करेन्गे. यावर काय म्हणणार? हो म्हटले.
ठरल्या प्रमाणे दुसर्यादिवशी भागवतान्चा फोन आला,मग हे आणि सिन्ग त्यान्ची गाडी घेउन त्याना घेण्यासाठी गेले.काहीजण रिक्षात आणि काही सिन्ग यान्च्या गाडीत असे घरी आले.श्री. अशोक भागवत,सौ. विद्या भागवत,सौ. लिला शिन्दे,श्री. अशोक माढेकर,श्री. गोवर्धन गोसावी,श्री. अरुण सवदी असे सहाजण आले.माढेकर,गोसावी,सवदी याना सिन्ग यान्च्या घरी आणि बाकी सर्व मिनुकडे राहिले.सन्ध्याकाळी भागवतान्चे मित्र श्री. जाधव हे औरन्गाबादहुन आले,ते रत्नसागर पार करुन पुढे भरुचपर्यन्त आमच्या बरोबर येणार होते,मग आम्ही निशाला म्हटले की तू सुद्धा चल.ती चालेल म्हणाली. रात्री सिन्ग यान्च्याकडे भोजनाचा बेत अगदी फक्कड होता,पुर्या खीर फ्लॉवरचा रस्सा जिरा राइस आणि चुरम्याचे लाडू्. हसत खेळत भोजन झाले,गप्पा झाल्या.उद्या कठपोर; नर्मदामैय्या आणि रत्नसागर{अरबी समुद्र} सन्गम.
सकाळी इतक्या जणान्च्या आन्घोळी,कपडे होईपर्यन्त दहा वाजुन गेले.एकीकडे स्वयम्पाकही झाला.साधा बेत,वरण-भात भाजी पोळी.जेवण झाल्यावर निघालो.आम्ही दहाजण होतो एक बारासीटर गाडी केली.प्रथम रामकुन्ड राममन्दिर पाहिले.खरेतर हा पुर्वीचा स्मशान घाट.आता कुन्डाच्या एका बाजुला राममन्दिर बान्धुन तिथे परिक्रमावासीन्साठी सोय केली आहे,आश्रमात अन्नक्षेत्र आहे. श्रीराम सीता लक्ष्मण यान्च्या सन्ग्मरवरी मनोहर मुर्ती आहेत.आम्ही गेलो त्यावेळी देवाची विश्रान्तीची वेळ होती पण तिथल्या महन्तानी पडदा बाजुला करुन आम्हाला दर्शन घडवले. नर्मदेहर.रामदर्शनानन्तर गेलो बलबला किन्वा बुलबला कुन्ड बघायला.एक छानसा बगिचा,त्यात एक हनुमान मन्दिर आणि थोड्या अन्तरावर आहे बलबला कुन्ड यामधील पाण्याचा रन्ग पाढुरका गढुळ आहे आणि पाण्यात असन्ख्य बुडबुडे फुटत असतात,उकळी फुटल्या प्रमाणे. पाणी गरम असेल असे वाटले पण नव्हते.भुगर्भवायूमुळे बुडबुडे येत असतात.भाबड्या लोकाना चमत्कार वाटतो. नन्तर गेलो हासोट येथे सुर्यकुन्ड दर्शनास.एक शिवमन्दिर आहे,पण कुन्डाबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.तिथुन खिचडीवालेबाबा आश्रम हनुमान मन्दिरात आलो.येथे परिक्रमावासीना राहण्याची सोय आहे.अन्नक्षेत्र आहे.तिथे चहा मिळाला,तो घेउन पुढे निघालो.
चार वाजता कठपोरला पोहोचलो.रिक्षातुन उतरुन दोन कि.मि. चालुन रैनबसेरात पोहोचलो.तेथिल महाराजानी आम्हा दहाजणाना एक स्वतन्त्र खोली दिली,खोलीच्या खिडक्या-दाराला दरवाजे नव्हते. नवीन बाम्धकाम असल्याने नुसत्या भिन्ती आणि वरती स्लाबचे छप्पर होते आणि थन्डीवार्या पासून बचावासाठी तेच महत्त्वाचे आणि पुरेसे होते.
हे ,जाधव गोसावी महाराजाना परिक्रमावासी लोकान्च्या नावान्ची लिस्ट करणे,नावेच्या प्रवासासाठी प्रत्येकी ५०रू.वर्गणी गोळा करणे वगैरे कामात मदत करायला गेले.महाराज शिकलेले नाहीत आणि उद्या पार जाण्यासाठी गर्दीही खुप आहे.त्यामुळे अशी मदत करणे खुप आवश्यक होते.
भरतीची वेळ झाल्यावर महाराज आले आणि त्यानी कोण कितीजण कोणत्या नावेत बसणार याची यादी करु लागले.एकेका नावेत ३०/४० जण नावेच्या क्षमतेप्रमाणे बसणार होते.आमचा सारा ग्रुप एकाच नावेत बसणार होता.एकुण आठ नावा होत्या. सर्व नावा मैय्याच्या काठावर ठेवलेल्या होत्या.भरती सुरु झाल्यावर पात्रातुन पाणी आणुन नावान्च्या खाली टाकुन जागा निसरडी करत होते,नन्तर सगळेमिळून त्या नावा ढकलत पात्रात घेउन गेले,खुपच मेहनतीचे काम होते.
त्यानन्तर आमची नावेत चढण्याची कसरत सुरु झाली. बुट काढुन पिशवीत टाकले आणि एकमेकाना साम्भाळत चिखलातुन नावेपर्यन्त गेलो,नाव बरीच ऊन्च होती,तिच्यात चढण्यासाठी एक टायर बान्धलेला होता त्यात पाय ठेवुन कसेबसे चढलो एकदाचे नावेत.कपडे चिखलाने बरबटले,थोडेफार भिजायलाही झाले.आमच्या नावेत ४३जण होतो.पण मजा आली.
सन्गमाच्या दिशेने जलप्रवास सुरु झाला.मैय्या कधी शान्त तर कधी उछलकुद करुन तिची नवनवीन रुपे दाखवत होती.भरतीच्या समेवरतर नाव थोडावेळ लाटान्वर नर्तनच करत होती,मोठमोठ्या लाटा उसळत होत्या,सर्वाना समुद्रस्नान घडले. एका ठिकाणी नावाड्याने सान्गितले सन्गम आला,पुजा करा म्हणून समजले नाहीतर मैय्या कोणती आणि रत्नसागर कोणता हे कळतच नव्हते. नावाड्याने सर्वान्च्या कुपीतिल अर्धे नर्मदाजल सागराला अर्पण करुन त्याच अर्ध्या कुपीत समुद्रजल भरुन दिले.लोकानी आणलेले नारळ नावाड्याने ठेवुन घेतले पण बाकी प्लास्टिकच्या थैल्यातील चुनरी वगैरे सामान आम्ही त्याना पाण्यात टाकू दिले नाही आमच्या नावेपुरतेतरी आम्ही सर्वानी मिळून जल प्रदुषण होणे टाळले.उदबत्ती लावुन मैय्याची पुजा आरती केली. नावाड्याला यथाशक्ति दक्षिणा दिली.अदल्या दिवशी नावेत बसण्यासाठी प्रत्येकी ५०रु. महाराजान्कडे दिले होते कारण नावान्चे व्यवस्थापन तेच बघतात,सरकारी मदत मिळत नाही.
दुपारी बारा ते चार असा प्रवास झाला.चार वाजता नावेतुन उतरण्याचा अवघड प्रकार झाला.जवळजवळ एक कि.मि. चिखलातुन एकमेकाना साम्भाळून कसेतरी बाहेर पडलो.त्यानन्तर खडकाळ रस्त्याने दोनएक कि.मि. चालुन रिलायन्सच्या गेट नम्बर २वर पोहोचलो. तिथे चिखलाने भरलेले हातपाय धुतले.थोड्याच वेळात श्री.अरुण मान्डके यानी गाड्या पाठवल्या. हायवेने ४५कि.मि. वरील भरुचला त्यान्च्या एबीसी एल कम्पनीक्वार्टरच्या बन्गल्यावर पोहोचलो.
श्री. अरुण मान्डके हे भागवतान्च्या ग्रुपमधील शिरगोपीकर यान्च्या भावाचे सासरे.एबीसीएल कम्पनीत मोठ्या हुद्दायावर आहेत.मोठे आदरातिथ्य झाले,चहा घेउन प्रथम स्नान कपडे धुणे करुन मग मैय्याची सायम्पुजा आरती केली.भोजनाला भरली वान्गी,फ्लावरबटाटा रस्सा,वरणभात पोळ्या आणि गोड शिरा असा छान बेत होता.मान्डकेन्चा बन्गला खुप मोठा आहे त्यामुळे सर्वान्ची आरामात सोय झाली.उद्यापासुन उत्तर किनार्याने परिभ्रमण परिक्रमा सुरु.
गायत्री मन्दिर नर्मदाकिनार्यावर एका टेकडीवर आहे.मन्दिरापासुन मैय्यापर्यन्त सुरेख बान्धीव घाट आहे.स्वामीनारायण मन्दिर अक्षरधाम मन्दिरा सारखेच आहे. निलकन्ठेश्वर मन्दिरही खुप सुन्दर आहे.इथेही मैय्याकडे जाण्यासाठी सुन्दर घाट आहे.परिक्रमावासीना राहण्याची आणि भोजन प्रसादाची सोय आहे.त्यानन्तर ओसारा या ठिकाणी महाकाली मन्दिरात आलो. हे मन्दिर फक्त मन्गळवारी दर्शनासाठी खुले असते.माता महाकाली पावागडला जातेवेळी येथे फक्त एक दिवस राहिली होती म्हणून फक्त मन्गळवारी दर्शन होते अशी आख्यायिका आहे.
त्यानन्तर शॉर्टकटने मन्गलेश्वरला आलो त्यामुळे शुक्लतीर्थला जाता आले नाही.मन्गलेश्वरला शशीबेन जोशी यान्च्या घरी आलो.स्वतः शशीबेन आता नाहीत पण ज्योतीबेन,कमलाबेन,बोनीबेन यानी अगदी हसतमुखाने सर्वान्चे स्वागत केले.कमलाबेन अन्ध आहेत पण सर्व काम अगदी केरवारे सुद्धा डोळस माणूस काय करेल इतके निगुतिने करतात.त्यान्च्या घरी ही परिक्रमावासीन्ची सेवा पिढ्यान्पिढ्या चालु आहे.येणार्या प्रत्येकाला भोजन मिळते,पडवीत राहण्याची सोयही आहे.आज एकादशी असल्याने फराळाचे होते.भगर,दाण्याची आमटी,साबुदाण्याची खिचडी,ताक आणि केळी असा बेत होता.आमचा उपास नव्हता तरीही फराळ दिलाच.सर्व भगिनी इतक्या प्रेमळ आहेत.खुप छान वाटले.या कुटूम्बाबद्दल सुहास लिमये यान्च्या नर्मदेहर हर नर्मदे या पुस्तकात वाचले होते अगदी तसेच हे कुटुम्ब अगत्यशील आहे.कमलाबेननी त्यान्च्या भावाकडे आवर्जुन जा असे सान्गितले आणि त्याना तसा फोनही केला.जोशी भगिनीन्चा भावपुर्ण निरोप घेउन विनोबा एक्सप्रेस पुढे निघाली.
आता आमचे लीडर होते पुण्याचे श्री. अशोक भागवत.त्यानी गेल्याच वर्षीही पायी परिक्रमा केलेली होती त्यामुळे त्याना रस्ते माहित आहेत.कबीरवडाचे दुरुन दर्शन घेतले कारण ते स्थान पात्राच्या मधोमध आहे आणि परिक्रमा करत असताना तिकडे नियमाप्रमाणे जाता येत नाही. नन्तर भारद्वाज आश्रम पाहिला.भारद्वाजमुनीनि येथे तपस्या केली.मोठी गो शाळा,परिक्रमावासीन्ची निवास व्यवस्था आहे.तिथुन कमलाबेनचे मामेबन्धू श्री. धनन्जय जोशी यान्च्या घरी गेलो.तिथे चहापाणी झाले त्यानी प्रत्येकाला नर्मदामातेचा फोटो,निरान्जनाच्या वातीसाठी कापसाचा पेळू आणि उदबत्या दिल्या.
विनोबा एक्सप्रेस निघाली मुक्कामाच्या ठिकाणाकडे.वाटेत फुलान्चीच शेते होती.झेन्डू,लालगुलाब,पायस,आपल्याकडील कुन्दा या सुवासिक पान्ढर्या फुलाना इकडे पायस म्हणतात.७/८कि.मि.वरील झणोरका परा धर्मशिला या गावी मिनी शिर्डी या साईधाम आश्रमात आलो.आश्रम खरोखरच आधीच्या शिर्डीतिल द्वारकामाईप्रमाणे आहे.खाली वीटा लावुन केलेली जमीन वरती पतर्याचे छप्पर. छोटासा सुन्दर बगिचा.सुन्दर निर्मळ वातावरण.वाटले इथेच राहावे,हीच खरी शिर्डी आणि हेच खरे साईधाम.साईबाबाना असाच आश्रम अभिप्रेत असणार कारण ते किती साधे होते.
हा आश्रम साईराम शिवकुमार उर्फ साईप्रेमावतार यान्चा आहे.ते नियमितपणे शिर्डीला उलटे चालत जातात.महाराज गावाला गेले होते पण त्यान्चि पत्नी आणि मुला-मुलीने छान स्वागत केले. त्यान्ची मुलगी एम कॉम एमसीए शिकली आहे आणि आता एमफिल ची तयारी करते आहे मुलगा बारावीत आहे. सन्ध्यारती झाल्यावर गरम गरम मुगाच्या खिचडीचा साईप्रसाद मिळाला.उद्या नारेश्वरला प्रयाण
झणोर पर्यन्त साधारणपणे सात कि.मि. चाललो,तिथे दोन मोटरसायकलस्वारानी लिफ्ट दिल्याने विद्याताई भागवत आणि लिलाताई गोजरे या नान्द पर्यन्त गेल्या.बाकी आम्ही सर्वजण पायी गेलो. नान्द पर्यन्तचा रस्ता चान्गला होता.तिथुन एका घराजवळून शेतातुन,टेकड्या चढत उतरत चालत होतो चालताना एक मोर आमच्या बरोबर जवळ जवळ दीडएक कि.मि. चालत होता त्याला जवळचे चणे दाणे घातले नन्तर चॉकलेटचे तुकडे घातले तर तेही खाल्ले मोठे नवल वाटले.वाटेत एक छोटी नदी लागली तिला फारसे पाणी नव्हते ती पार केल्यावर थोड्याच वेळात सोमज,दिलवाडा लागले तिथे चणे-गूळ,खाउन पुढे निघालो हायवे लागला होता. तीनएक कि.मि. चालल्यावर ओज गाव लागले तिथे रस्त्यालगतच मिरा आश्रम होता अकरा वाजले होते पण त्या आश्रमात काही व्यवस्था नव्हती पुढे जाणे क्रमप्राप्त होते.
उन चढायला लागले होते १४/१५कि.मि. चाल झाली होती विद्याताई दमल्या होत्या भागवत म्हणाले तुम्ही सर्वान्चे सामान घेउन रिक्षाने पुढे जाउन नारेश्वरला भक्तनिवासात खोल्या घ्या आम्ही मागुन चालत येतो,म्हणुन एक रिक्षा केली सर्वान्चे सामान आणि आम्ही दोघे,विद्याताई,लिलाताई असे नारेश्वरला श्रीरन्गावधुत आश्रमात आलो. दोन खोल्या घेतल्या. आमचे आवरेपर्यन्त बाकीसर्वजण आले. भोजनप्रसाद घेउन कपडे धुण्याचा कार्यक्रम पार पाडला.
सन्ध्याकाळी पुनित आश्रम पाहण्यासाठी गेलो.तिथे नर्मदा मन्दिर पन्चकुबेरेश्वर मन्दिर आहे.सन्गमरवरी मन्दिर समुह आहे.भक्तनिवासही आहे. मैय्याच्या समोरच्या तिरावर मणीनागेश्वर आणि भालोद दिसत होते.आठदिवसापुर्वी भालोदला श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराजान्कडे मुक्काम होता.
नारेश्वर महात्म्य.:- हे पवित्र ठिकाण म्हणजे पुराणकालीन कपर्दिकेश्वर महादेव तीर्थक्षेत्र. वेळोवेळी नर्मदेला आलेल्या पुरामुळे जमिनीत गाडले गेले होते.सरदार नारोशन्कर हे शिवभक्त होते त्याना लागोपाठ तीन दिवस स्वप्न द्रुष्टान्त झाला आणि मग त्याप्रमाणे खोदकाम केल्यावर ही शिवपिन्डी मिळाली. मग सरदार नारोशन्कर यानी त्यावर मन्दिर बान्धले,छोटेसे सुबक मन्दिर आहे. नारोशन्कर यान्च्या नावावरुन नाव पडले नारेश्वर.
कालान्तराने या स्थानाकडे दुर्लक्ष झाले आणि सभोवती जन्गल वाढले.जनलोकान्पासुन दुर जाउन साधना करावी म्हणून श्रीरन्गावधुत महाराज या घनदाट जन्गलात वास्तव्यासाठी आले.या भागाला त्या काळी देहरा म्हणत.आसपासच्या सात गावान्चे इथे स्मशान होते.महाराज आले त्यावेळी त्याना जन्मजात एकमेकान्चे हाडवैरी असलेले नाग आणि मोर इथे एकमेकान्शी खेळताना दिसले आणि हा शुभ सन्केत ही देवभुमी आहे असे म्हणुन महाराजानी मन्दिरा समोरील कडूनिम्बाच्या झाडाखाली झोपडी बान्धुन राहण्याचे ठरवले व त्याप्रमाणे ते राहु लागले.
महाराजाना तिथे पहाटे आणि सन्ध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घन्टानाद आरती अॅकु येत असे आणि भरजरी वस्त्रे घातलेले काहीजण न्रुत्य गायन करताना दिसत,महाराज आपल्या झोपडीच्या ओट्यावर पडून हे पहात पण मराराज उठून बसले की ते द्रुश्य नाहिसे होत असे.अशी आख्यायिका समजली. काही दिवसानी महाराजान्च्या मातोश्री त्यान्च्या जवळ राहण्यास आल्यावर तिथे मोठी झोपडी बान्धली.लोकाना भेटणे सत्सन्ग करणे सुरु केले.१९२५ साली मार्गशीर्ष वद्य चतुर्थीला महाराज या ठिकाणी रहाण्यास आले.
सध्या इथे महाराजान्चे भव्य समाधीमन्दिर आहे.मातोश्रीन्ची मुर्ती आहे सुन्दर बाग,ध्यानकुटीरे,भक्तनिवास,भोजन शाळा वगैरे वास्तू आहेत. बरेच उत्सव येथे होतात,भक्तान्ची मान्दियाळी सदैव लागलेली असते.
नारेश्वरला सान्गलीचे देशपान्डे हे बुजुर्ग ग्रुहस्थ सायकलवरुन परिक्रमा करणारे भेटले
साधारनपणे तीनएक कि.मि. चालल्यावर कोठिया गावात आलो.उन चान्गलेच वर आले होते.इन्दिरा आवास योजनेतील घरे लागली,एका घराच्या ओट्यावर बसुन पाणी प्यायलो,तिथल्या छोट्याशा दुकानातुन शेन्गदाणे-गूळ घेतला,दुकानदार आम्ही परिक्रमावासी म्हणून पैसे घेत नव्हता आम्ही बळेबळेच त्याला पैसे दिले. हातावर पोट असलेल्या गरीबान्कडे असलेली श्रद्धा किती मोठी आहे. नर्मदे हर.पुढे निघालो अशोकभाई पटेल यानी बोलावले,भागवत गेल्यावर्षीही त्यान्च्याकडे गेले होते,तिथे चहा घेतला आणि पुढे निघालो. गुजराथ वॉटर आणि गटर व्यवस्थापन यूनिटच्या मधुन बाहेर पडुन शेतान्च्या बान्धा-बान्धाने चालत तीनएक कि.मि. वरील राणापुर मधील रणछोडराय मन्दिरात आलो. साडेदहा वाजले होते.
पाळीपाळीने सर्वानी कपडे धुतले गवतावर वाळत घातले.इथे खिचडीचे सदाव्रत मिळाले,एका परिक्रमावासीजवळ टमाटे होते.लिलाताईनी चुल पेटवली,मी डाळ-तान्दुळ धुतले.टमाटे चिरुन दिले,विद्याताईनी खिचडी फोडणीस टाकली,परान्जपे आणि माढेकर काका यानी खिचडी शिजवली.तिथे पन्जाबमधील एक ग्रुहस्थ भेटले,ते परिक्रमेत नव्हते पण अशीच भ्रमन्ती करत होते.त्यानी गावातुन खुपसारे ताक आणले.भोजन झाल्यावर पावणेदोन वाजता निघालो.रस्ता दाखवायला ते पन्जाबी भाईसाब आले,त्यानी मैय्याच्या किनार्यावर आणून सोडले.
आता रणरणत्या उन्हात वाळवन्टातुन चालायचे होते,वरती आग ओकणारे ऊन आणि खाली पाऊल बुडेपर्यन्त गरम पुरळ वाळू,कसेतरी पाय उचलत चालत होतो.जवळुन मैय्या सन्थ वाहात होती,तिच्या कडून गार वार्याची झुळूक आली की अगदी स्वर्गसुख मिळत होते.वाटेत एक शेत झोपडी दिसली,ती आम्हा थकल्या जीवाना वाळवन्टातील ओअसीस सारखीच भासली.शेतातुन वाट काढत झोपडीत पोहोचलो,एक आजीबाई बसल्या होत्या;त्यानी हसतमुखाने स्वागत केले,माठातील थन्डगार पाणी सर्वाना दिले.आमची विचारपुस केली जेवण करा म्हणाली,आम्ही जेवण झाल्याचे सान्गितले हा आमचा सन्वाद म्हणजे गम्मतच होती,आजी गुजराथीत विचरायची आणि आम्ही हिन्दीत उत्तर द्यायचो आज हे कळले प्रेम आस्था असेल तर भाषा गौण ठरते विचार समजुन घेण्यासाठी भाषेची मुळीच गरज नसते.
साधारणपणे तीनएक कि.मि. चाललो असु. आजीबाइनी वर टेकडीवर चढुन रस्ता आहे असे सान्गितले होते,पण झाडी इतकी होती की कुठुन वर चढायचे हेच समजत नव्हते,पुढे काहीमुले मासे पकडत होती त्यान्च्या जवळ गेल्यावर विचारले एक मुलगा आम्हाला वाट दाखवायला बरोबर आला,त्याच्या मागून वर चढलो.आता झाडीतिल पायवाटेने चालु लागलो,दमायला झाले होते जवळचे पाणी सम्पले होते,झाडान्च्या सावलीत बसलो तो मुलगा सगळ्यान्च्या बाटल्या घेउन पाणी आणायला गेला.पाणी आल्यावर निघालो,पुन्हा साधारणपणे दोनेक कि.मि. चालल्यावर सुरसामल गावात पोहोचलो.त्या मुलाला खाऊसाठी पैसे दिले तो घेत नव्हता तरी दिलेच.बिस्किटेही दिली.
पाच वाजले होते,आजच्या मुक्कामाचे ठिकाण मालसर मोठ्या रस्त्याने ८कि.मि. आणि शॉर्टकट पण अतिशय खराब रस्त्याने ५कि.मि. होते.विद्याताई चालण्या सारख्या नव्हत्या,आम्हीही दमलो होतो,एक अगदी छोटा चढ चढुन पुलावर आलो आणि नेहेमीप्रमाणे मैय्या धावुन आली तिला का आपल्या लेकरान्चे कष्ट बघवतील? श्री. सुरेशभाई पटेल याना तिने पाठवले. नर्मदे हर. तुम्ही बसस्टॉपवर जावुन थाम्बा मी गाडीची व्यवस्था करतो,सुरेशभाई म्हणाले. कसेबसे बसस्टॉपवर गेलो. सुरेशभाईनी जीप आणली,सर्वजण जीपमध्ये बसलो.सुरेशभाईन्चे आभार मानले,ये मैय्याजीकी सेवा है इसमे आभार नही माने जाते.सिर्फ नर्मदे हर.खरेच आहे,नर्मदे हर.आठ कि.मि.मालसरला पोहोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते.
मालसरला पन्चमुखी हनुमान मन्दिराच्या भक्तनिवासात आसन लावले. हातपाय धुवुन दर्शन घेतले. पन्चमुखी हनुमान,श्रीराम लक्ष्मण सीता,जगन्नाथ बलभद्र सुभद्रा येथे स्थानापन्न आहेत. डोन्गरे महाराजान्ची समाधीचे मात्र काही दिसले नाही.महाराज म्हणाले डोन्गरेमहाराजानी जलसमाधी घेतली होती त्यामुळे समाधी वगैरे नाही. येथे अन्नछत्र असल्याने भोजन करुन पण त्याआधी मन्दिरातील सन्ध्यारती नन्तर आमची मैय्याची सायम आरती करुन आता विश्रान्ती
मैय्या किनार्याने चालत होतो मोठ्या मजेने,बेडीन्ग मिळाल्याने सारा तणाव सम्पला होता,विद्याताईन्ची कळीही त्यामुळे खुलली होती.मजेत थट्टामस्करी करत चालत होतो.एक परिक्रमावासी भेटले,त्यान्च्या मानेला भलामोठा लायपोमा {टयुमर.} दिसला,तो तसा बिनाइनच होता म्हणजे त्यात कर्करोगाची लक्षणे नव्हती,मी म्हटले बाबा ऑपरेशन करुन काढुन टाका छोटेसेच होईल ऑपरेशन सरकारी हॉस्पिटलमध्ये पैसेही लागणार नाहीत.तर ते बाबा म्हणाले,पाचकिलो वजन है इस गोलेका पुर्वजनम का पाप होगा भुगतके समाप्त करेन्गे,ऑपरेशन नही करेन्गे.काय म्हणावे या अन्धश्रधेला? त्या गोळ्यामुळे त्या माणसाची मान अक्षरशः वाकडी झालेली होती,आणि खरेतर तेच चान्गले नव्हते गोळा साधा होता पण वाकडी मान पुढे फारच त्रासदायक ठरेल.पण मी समजावत होते म्हणुन ते बाबा घाईघाईने पुढे निघून गेले. नर्मदे हर.
उन्चसखल कच्च्या रस्त्याने साधारण पाच कि.मि. चालुन क्रुष्णकान्त महाराजान्च्या नर्मदाआश्रमात आलो.क्रुष्णकान्त महाराज उच्चशिक्षित बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे. रामक्रुष्णमिशन प्रेरीत आश्रम आहे.साधेसे घर,आजुबाजुला बगिचा,छोटेसे नर्मदामन्दिर.परिक्रमावासी लोकान्साठी राहण्यासाठी खोल्या,स्वयम्पाकासाठी एक खोली असा सारा सुन्दर परिसर आहे. ओले कपडे वाळत घातले,खिचडीचे सदाव्रत मिळाले कालच्यासारखी खिचडी केली आश्रमातील लिम्बाच्या झाडाला खुप लिम्बे लागली होती,खुप पिकलेली लिम्बे जमीनीवर पडली होती मी ती गोळा केली प्रत्येकाजवळ ठेवायला दिली.परान्जपेनी बरेच फोटो काढले,शुटीन्ग केले. रामक्रुष्ण परमहन्स यान्च्या जीवनावरील प्रसन्गान्चे बरेच फोटो तिथे होते विषेशतः परमहन्सानी हिन्दुधर्मा व्यतिरिक्त मुस्लिम्,ख्रिश्चन' ,शीखधर्मान्चा अभ्यास केला तेव्हा ते त्या त्या धर्माप्रमाणे कसे वागत याबद्दलचे फोटो.
सव्वा वाजता मन्दिरातील नर्मदामैय्या आणि क्रुष्णकान्त महाराज याना प्रणाम करुन निघालो,थोड्याच दुरवर कन्जेठा गाव लागले तेथील सौभाग्यसुन्दरी देवीचे दर्शन घेउन मैय्या किनारी आलो.अगदी काश्मीर मधील गुलमर्ग,सोनमर्ग सारखे हिरवळीचे गालिचे किनार्यावर पसरलेले होते,उन कडक होते पण हिरवळ आणि मैय्याकडुन येणारा झुळझुळता गार वारा यामुळे त्याचा त्रास वाटत नव्हता.सगळ्यानी पायातले बूट काढुन हातात घेतले आणि त्या सुखद हिरवळीवरुन चालण्याचा आनन्द मजेत लुटत चालायला लागलो.मैय्या किनारीही किती विविधता आहे,काल तापत्या वाळूचे वाळवन्ट होते तर आज हे हिरवळीचे गालिचे.थोडे थाम्बुन मैय्याचे सुमधुर जल प्राशन केले,चेहर्यावर थन्डगार पाण्याचे हाबके मारले मस्त.उरलासुरला शिणवटाही पळून गेला.
दोनएक कि.मि. चालल्यावर पुन्हा कठीण रस्ता आला,बूट चढवले एक टेकडी चढली,झाडाझुडपातुन वाट काढत चालत होतो,टेकडीचा उतार आला थोडे अवघडच होते पण एकमेकान्च्या काठीचा आधार घेत उतरलो;परत दुसरा चढ चढलो.आता एरन्डाची शेते लागली.छान वाढलेल्या एरन्डाच्या बनातुन चालणे त्या कडक उन्हात मोठे आल्हाददायक होते.एरन्डीचे बन सम्पले आणि कापसाच्या शेतातुन वाटचाल सुरु झाली.थोड्याच वेळात अनसुया आश्रम परिसरात प्रवेश केला. वाटेत एक सुन्दर नवीनच बान्धलेले नर्मदामाता मन्दिर लागले,दर्शन घेउन जरा बसलो.
तीन वाजुन गेले होते.पायवाटेने एका पाणी नसलेल्या नदीवरील पुल पार करुन अनसुया मन्दिराच्या प्रान्गणात प्रवेश केला.ती एरन्डी नदी होती अनसुया आश्रम नर्मदा-एरन्डी सन्गमावर आहे.सर्व तीर्थक्षेत्री असतात तशी प्रसादाची,चहापाण्याची दुकाने सभोवार होती.चहा घेउन,पिशव्या,बुट त्याच दुकानात ठेवून दर्शनाला गेलो.
याच ठिकाणी सत्त्वपरीक्षा घेण्यास आलेल्या ब्रम्हा विष्णू महेश या तिन्ही देवाना अनसुया मातेने बाल रुप दिले होते. हे प्रसिद्ध सतीक्षेत्र आहे. येथे नवचन्डी याग करण्याचे महत्त्व आहे.आजही तिथे नवचन्डीयाग सुरु होता आम्हाला प्रसादाचा लाभ झाला.
अनसुया आश्रमातुन पाच वाजता रिक्षाने बारा कि.मि.वरील चान्दोदला जाण्यासाठी निघालो.रानडेबाई-राजवाडेबाईनी सान्गितल्यामुळे बद्रिकाश्रमला जायचे नाही असे ठरले होते म्हणून चान्दोदला जाणार होतो. गोसावी यान्च्या ओळखीचे उमेशगिरी नावाचे साधक चान्दोदला रहात होते त्यान्च्याच कडे आम्ही निघालो होतो.वाटेत रिक्षा पन्क्चर झाली त्यात वेळ गेला.सात वाजता चान्दोदला उमेशगिरी यान्च्या घरी पोहोचलो.उमेशगिरी वयाने लहान आहेत २२/२४ वय असेल,शिकलेले आहेत,सन्यास घेतला आहे.महाराजानी आम्ही येणार हे आधीच कळवलेले होते म्हणुन भात भाजी आमटी करुन ठेवली होती कणीक मळून ठेवली होती.फ्रेश होउन चहा घेतला आणि विद्याताई,लिलाताई यानी पोळ्या केल्या मी एकीकडे सर्वाना जेवायला वाढले,पुरुषमन्डळीन्चे झाल्यावर आम्ही तिघी जेवलो. नन्तर भान्डीकुन्डी आवरुन थोड्यावेळ गप्पा मारुन झोपलो.
नेहेमीप्रमाणे स्नान पुजा आरती करुन चहा घेउन उमेशगिरी महाराजान्चा
भावपुर्ण निरोप घेउन विनोबा एक्स्प्रेस निघाली.काल चान्दोदला पोहोचलो
त्यावेळी रात्र झाली होती त्यामुळे गाव बघायला मिळाला नव्हता,सकाळी चालता
चालता बघायला मिळाला.चान्दोदगावाला एक इतिहास आहे.चान्द्रवन्शी राजाची
राजधानी होती. इमारती सुन्दर नक्षीकाम केलेल्या आहेत सुन्दर कलाकुसर केलेले
दरवाजे तावदाने आहेत.
नर्मदेवर बान्धीव घाट आहे.इथे नर्मदा-ओरी{ओरसन्ग}-गुप्त सरस्वती असा
त्रिवेणी सन्गम आहे.पवित्र तीर्थक्षेत्र आहे.एक प्रसिद्ध श्लोक आहे .
सर्वत्र सुलभा रेवा,त्रिषु स्थानेषु दुर्लभा!
थोड्या अवघड वाटेने मान्डवा गावात आलो. वाटेत एक पिराचे स्थान दिसले,दादापीर. हिन्दु-मुस्लीम दोन्ही मानतात या स्थानाला. मान्डवा गावात प्राचीन राजवाडा आहे.अर्थात तो रिकामा आहे.राजा महाराज इन्दुरला राहतात. नर्मदा जयन्तीच्या उत्सवाच्या वेळी येतात.पुजेचा मान त्यान्चा असतो.एका अवघड घळीतुन उतरून सन्गमावर आलो. गुढग्या एवढ्या पाण्यातुन ओरिनदी पार केली,पाण्याला बरीच ओढ होती थन्डगार पाण्याचा स्पर्श मोठा सुखद होता.एकमेकान्चा आधार असल्याने नदी पार करणे सोपे झाले. नदीपार केली पण किनार्यावरील वाळूत पाय घोट्यापर्यन्त रुतत होते,कसेबसे किनारा पार करुन वर चढलो.पण रस्ताच दिसत नव्हता,कसे करणार? सगळीकडे कापसाची शेते होती,मग त्या कापसाच्या झाडान्ची धक्का लावण्या बद्दल मनोमन क्षमा मागुन हाताने त्याना बाजुला करत शक्यतो ती तुडवली जाणार नाहीत असे पहात पुढे निघालो.गोसावी आधी पुढे गेले आणि लाम्बवर दिसत असलेल्या घराजवळ वाट आहे का ते पाहुन घेतले,त्यानी इशारा केल्यावर बाकीसर्वजण गेलो.
कर्नाली गाव आले. हेही प्राचीन इतिहास असलेले गाव आहे.बराच मोठा मन्दीर समुह आहे.गणपती,हनुमान,शिव,देवी अशी मन्दिरे आहेत.एक गम्मत तिथे बघायला मिळाली,कोकणस्थ ब्राम्हणान्च्या नावाचे बरेच बोर्ड दिसले.त्यामागे कारण काय ते समजले नाही,बहुतेक लोक सध्या सान्गलीचे रहिवासी आहेत.कर्नाळी त्यान्चे मुळ गाव आहे किवा कसे ते समजले नाही.तिथे नळाच्या पाण्याखाली चिखलाचे पाय धुतले,भागवतान्च्या पायाचे ड्रेसिन्ग केले.टपरीवर चहा घेतला,बरेच फोटोही काढले नन्तर गावाबाहेर असलेल्या कुबेरभन्डारी मन्दिरात आलो.तिकडे जातानाच एका टेम्पोवाल्याशी लिम्बपुरा पर्यन्त जाण्याचे ठरवुन ठेवले.
या क्षेत्रस्थळी शिवशन्कर भगवान विष्णू च्या रुपात प्रगट झालेले आहेत.भन्डारेश्वराच्या शाळुन्केच्या ठिकाणी पाणी आहे.महाकालीचे मन्दीर आहे त्या मन्दिराच्या तळघरात योगी अरविन्द{पॉन्डेचरीचे} यान्चे तपस्या स्थळ आहे.शान्त ध्यान मन्दीर आहे.एक शिवपिन्डी आहे. योगीजीन्ची तसबीर आहे. या ठिकाणी नर्मदेला ७०/८० पायर्यान्चा छान बान्धीव घाट अहिल्याबाई होळकरनी बान्धलेला आहे. स्वच्छ सुन्दर घाट,शीतल सुन्दर स्वच्छ निर्मल नर्मदाजल. मन प्रसन्न झाले.भोजनाची वेळ होईपर्यन्त हे सारे बघितले,कपडेही वाळवले. भोजन झाल्यावर रिक्षाने लिम्बपुराला आलो. तिथे एका मारुतीगाडीतुन दोन वाजता गरुडेश्वरला आलो. जुन्या धर्मशाळेच्या कॉमन हॉलमध्ये आसन लावले.येथे रानडेबाई,राजवाडेबाई भेटल्या.त्या थोड्या आजारी झाल्याने चारपाच दिवसापासुन येथे मुक्कामाला होत्या आणि आता श्रीराम महाराज त्यान्ची परिक्रमेची बस घेउन आले की त्यान्च्या बरोबरच परिक्रमा पुर्ण करणार होत्या.त्यान्च्या सान्गण्यावरुन मी श्रीराम महाराजान्शी फोनवर बोलले,ते दोन दिवसानी गरुडेश्वरला येणार आहेत. इथेच भावसार,जोशी,सवदीही भेटले. नाशिकचे शिवानन्दस्वामी{शिव शिव बाबा} यान्चे दर्शन झाले,बाबा नी येथे दत्तयाग केला आज दत्तजयन्तीला त्याची पुर्णाहुती आहे.बाबानी आम्हाला दोघाना एकेक शाल दिली,भोजनप्रसादही मिळाला.आशीर्वादाचा मोठा भाग्याचा योग आज गरुडेश्वरसारख्या तीर्थक्षेत्री दत्तजयन्तीच्या पवित्र दिवशी आमच्या सारख्या अतिसामान्य भक्तान्च्या नशिबात होता,हे नक्की पुर्वजन्मीचे पुण्य. श्री.जगन्नाथ कुन्टेही भेटले,त्यान्चाही आशीर्वाद मिळाला.
आज चन्द्रग्रहण असल्याने रात्री भोजन नव्हते. वासुदेवानन्दसरस्वती महाराज यान्च्या समाधीचे दर्शन घेतले,अभिषेकाची पावती केली. काही परिक्रमावासी ग्रहण सुटल्यावर रात्री नर्मदास्नान करुन आले,तेवढया रात्री त्यानी पुजापाठही केला.
गरुडेश्वरला जानकीमाताजी नावाच्या एक माताजी प्रसिद्ध आहेत.त्या परिक्रमावासीन्ची सेवा करत असतात. परिक्रमावासीना हव्या असलेल्या वस्तू त्या देतात.त्या गावाला गेल्या होत्या त्यामुळे भेट झाली नाही याची चुटपुट लागली.असो. नर्मदे हर.
तासाभराचे चालणे झाल्यावर खडगदा गाव आले.तिथे रामसिन्गभाई मोतीभाई तडवी यान्च्या सत्यम शिवम सुन्दरम या घरी त्यानी आग्रह करुन नेले,चहा दिला.अर्धातास तिथे थाम्बुन पुढे निघालो. गरुडेश्वर पासुन केवडिया कॉलनी फाटा आठ कि.मि. होता.तिथे डाव्या बाजुच्या रस्त्याने जायचे होते,समोरचा रस्ता केवडिया कॉलनीला जाणारा रस्ता होता. झरिया येथिल बान्धकाम चालु असलेल्या मन्दिरात पोहोचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते.
हनुमान मन्दिरात विद्याताई,लिलाताई यानी खिचडी केली,मी हापशावर कपडे धुतले.भोजन झाल्यावर बागेतील मोठ्या झाडाच्या पारावर विश्रान्ती घेउन दीड वाजता पुढे निघालो. उन्हाचा कडाका वाढला होता,दमायला झाले होते,नर्मदे हर नर्मदे हर जप करत कसेतरी पाय ओढत चालत होतो.मुक्कामाचे ठीकाण अम्बाजी किती दुर आहे माहीत नव्हते.इतक्यात एक टेम्पो आला,त्याने अम्बाजीला सोडायचे कबुल केले मग सर्व सामान टेम्पोत टाकुन बसलो. अम्बाजीला जाणारा रस्ता खराब होता त्यातच अम्बाजीचे ठाणे उन्चावर असल्याने घाट चढायचा होता.अगदी वेळेवर टेम्पो मिळाला होता नाहीतर आज अम्बाजीला पोहोचणे अशक्य होते.
अम्बाजी दहा कि.मि. दुर होते.चार वाजता पोहोचलो. माता अम्बाजीचे हे क्षेत्र मोठे रमणीय आहे. चारी बाजुना दाट व्रुक्षराजीने भरलेले डोन्गर,मन्दिरामागे झुळझुळ वाहणारी छोटी नदी,सुबक बान्धणीचे मन्दिर,सन्गमरवरी पाषाणाची स्वरुपसुन्दर अम्बाजीची प्रसन्न हसतमुख मुर्ती.सुन्दर निसर्ग.
नवीनच बान्धलेल्या भक्तनिवासात एका हॉल मध्ये आसन लावले. वान्गी,बटाटे,कणीक सदाव्रतात मिळाले रस्सा-पोळ्या असा स्वयम्पाक केला.पुजा आरती केली नन्तर भोजन केले आज एका परिक्रमावासीलाही भोजन प्रसाद देण्याचा योग आला. आता विश्रान्ती.
नर्मदापरिक्रमा एक आनन्द यात्रा आहे. आजचा दिवस मजेत पार पडला,उद्या कुठे कधी कसे माहीत नाही तरीही सारा आनन्दीआनन्द. नर्मदे हर.
भुराभाईन्चा हार्दिक निरोप घेउन पुढे निघालो.भरवाडा गाव आले,तिथे विनोदचन्द्र भील या शिक्षकानी त्यान्च्या घरी बोलावले,त्यान्च्या घरातील सगळ्यानी अगदी म्हातार्या आजी-आजोबानीसुद्धा आम्हाला नमस्कार केला,आम्ही सर्वजण अगदी सन्कोचुन गेलो,कितीही भाबडी श्रद्धा. आम्ही नमस्कार करु गेलो तर ते मागे सरकले नही नही आप पन्डीत{ब्राम्हण} और परिकम्मावासी हमको पाप लगेगा. निरुत्तर होतो आपण अशावेळी.
पुढे मेणन नदी लागली.पोटरी एवढे पाणी आणि बरेच दगडधोन्डे होते,पाय निसटत होते,केली पार. नवग्राम आले.तिथे असवन नदी होती पण तिच्यावर सान्डवा होता.त्यामुळे प्रश्नच नव्हता.पुढचा रस्ता शेताशेतातुन होता.गढपुरिया गाव आले,रणछोडराय मन्दिरात दर्शन घेतले्ए गाव बर्यापैकी मोठे आहे. गावातुन हायवेवर आलो. तिथे जीप मिळाली,वागछा येथे शिवमन्दिरात आलो.छोटेसे सुबक मन्दीर आहे,सभोवती बाग आहे.येथे त्याबागेत एका ठिकाणि वेलीचा सुरेख मान्डव करुन चारी बाजुना सुद्धा वेली पसरवुन स्त्रियाना स्नाना साठी आडोसा तयार केला आहे.स्नान कपडे धुणे करुन मैय्याची पुजा आरती केली,वागेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.
येथे सुरेशचन्द्र महाराज नावाचे तरुण उच्चशिक्षीत सन्यासी आहेत.आमचे आवरेपर्यन्त भाजी करुन पोळ्यान्ची कणीक मळून ठेवली होती.दोघीनी पोळ्या केल्या,सर्वान्चे भोजन झाल्यावर निघालो. रस्त्यावर लगेच टेम्पो मिळाला.२५ कि.मि. वरील कवाट येथे कामनाथ महादेव मन्दिरात मुक्कामाला आलो. येथे अन्नक्षेत्र आहे.त्यामुळे पुजा-आरती,भोजन आणि झोपणे.
आजही अन्धारातच निघालो. वाटेत अजिबात न थाम्बता पाच कि.मि.वरील चिचबा गावातील निवासी कन्या आश्रम शाळेत आलो. तेथील शिक्षिका कोकिळाबेन यानी चहा दिला. अर्धातास थाम्बुन विनोबा एक्सप्रेस निघाली.८/९कि.मि. चालुन रेन्धवा गावाबाहेरील हनुमान मन्दीर,नर्मदा अन्नकुटीर मध्ये आलो. भारतीमहाराज म्हणाले,माताजी पाकसिद्धी हम करेन्गे आप आराम करो,थक गये हो.
मन्दिराजवळून बन्धोईनदी झुळुझुळू वाहात होती,स्वच्छ निर्मळ पाणी. सर्वानी स्नान -कपडे धुणे केले. हनुमानमन्दिरात मैय्याची पुजा-आरती केली.भोजनप्रसाद घेउन महाराजान्चा निरोप घेउन निघालो. दोन कि.मि.वर छ्कताल गाव आले. येथे गुजराथ राज्य सम्पुन मध्यप्रदेश सुरु झाले.
छकताल येथे जीप केली,उमराळी येथे आलो तिथे जीप बदलुन सोन्डवा येथे पोहोचलो,सन्ध्याकाळचे सहा वाजले होते.उत्तरतटावरील शुलपाणीच्या झाडीतील पहिले गाव.लक्ष्मीनारायण,हनुमान मन्दिरात आसन लावले.तिथे ओम्कारेश्वरचा रीतेश दुबे हा तेथिल रघुनाथ मन्दीर वेदपाठशाळेचा विद्यार्थी पुजापाठ करण्यासाठी येउन राहिला आहे.
भागवत गेल्या परिक्रमेच्यावेळी ज्या किराणादुकानदार राठोड यान्च्या कडे जेवले होते तेच आजही भोजनाची व्यवस्था करणार आहेत. श्री. परमानन्द धाकेड हे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर भेटायला आले.त्यानी त्यानी आदिवासी कन्या निवासी शाळेत झोपावे असे सान्गितले पण त्या मुलीन्ची गैरसोय होऊ नये म्हणुन आम्ही देवळातच रहाणे पसन्त केले.भोजन झाल्यावर आम्ही दोघे,भागवत दोघे आणि लिलाताई असे लक्ष्मीनारायणाच्या देवळात आणि गोसावी,माढेकरकाका रीतेश बरोबर त्याच्या खोलीत असे झोपलो. नर्मदे हर.
हा शुलपाणीच्या झाडीचा प्रदेश आहे,धोका नसला तरी दाट जन्गल आहे म्हणुन धाकेड साहेबानी पहाटे आमच्या साठी बोलेरो गाडी दिली,त्यान्च्या येथील एक शिक्षिका सौ.कुशवाह याना मिटीन्ग साठी बडवानीला जायच्याच होत्या म्हणुन त्यान्च्याच बरोबर त्यानी आम्हाला नीसरपुर पर्यन्त जाण्याचा सल्ला दिला,त्याप्रमाणे पहाटे पाच वाजता आम्ही निघालो,डही कडूनचा रस्ता खराब असल्याने अलिराजपुर कुक्षी मार्गे नीसरपुरला सकाळी सात वाजता पोहोचलो.
नीसरपुरला एक डॉ. कनोजिया हे.एम.डी. फिजिशियन आहेत.ते गेली ३५वर्ष ह्या अगदी खेडेगावात जनसेवा करत आहेत.त्या सेवाभावी मानवाला भेटुन धन्यता वाटली.तेथुन पाच कि.मि. वरील कोटेश्वरयेथील दगडूमहाराज अखन्ड रामधून आश्रमात आलो.आसन लावले. सुन्दर बान्धीव घाटावर नर्मदामैय्याच्या सुखकर जलाने स्नान केले.पुजापाठ केला. भोजन प्रसाद झाल्यावर सर्व परिसर पाहिला.मुळ कोटीनाथ मन्दिरात दर्शन घेतले,कनकबिहारी मन्दिरात गेलो.तेथील कमलदास महाराज १०० पेक्षा जास्त वयाचे आहेत,त्यान्च्याकडे वेदपाठशाळा आहे,मोठी गोशाला आहे. महाराजान्चे दर्शन घेतले. हे कोटेश्वर तीर्थही बुडीत क्षेत्रात आहे. आताच येथे मैय्याचे पात्र इतके प्रचन्ड आहे मग आणखी पाणी वाढले म्हणजे किती आणि कसे होईल?
पहाटे पाच वाजता उठलो स्नान पुजा आरती करुन आश्रमाचे व्यवस्थापक श्री.लालजीबाबा यान्चा निरोप घेउन दगडुमहाराज,नर्मदामाता,कोटेश्वरमहादेव याना प्रणाम करुन विनोबा एक्स्प्रेस निघाली. साडेसात वाजता नीसरपुरला पोहोचलो.चहा-नास्ता करुन साडेआठच्या बसने मनावरला निघालो. दहा वाजता मनावरला पोहोचलो,लगेच कालीबावडी साठी बस मिळाली. वाटेत लुन्हेरा बुजुर्ग येथे तेथील युवा कॉन्ग्रेसचे अध्यक्ष श्री. सुनील शर्मा यानी आम्हाला त्यान्च्या घरी नेउन सामोसे लाडू दिले,चहा दिला. आमचे होईपर्यन्त बस थाम्बुन राहिली होती,पुढार्याचा प्रभाव.
साडेबारा वाजता कालीबावडी येथे श्रीराम मन्दिरात पोहोचलो. मन्दीर सुन्दर आहे,मुर्ती मनोहर आहेत. पण मन्दीर बन्द होते तिथे काहीच सोय नाही.पण मन्दिरासमोरच गोस्वामी किराणा आणि मेडिकल स्टोअर आहे.तेथील माताजी सर्व परिक्रमावासीना सदाव्रत देतात.त्यानी खिचडीचे सदाव्रत दिले. ते घेऊन कालीबावडीचे सरपन्च श्री. हन्सराज चौहान यान्च्या घरी गेलो.भागवत गेल्यावर्षी त्यान्च्या कडेच गेले होते. सरपन्च घरी नव्हते पण त्यान्च्या बहिणीने खिचडी करुन दिली.भोजन प्रसाद घेउन पुढे निघालो.सरपन्चान्च्या घरी श्री. रामेश्वर चौहान भेटले.
दुपारचे दोन वाजले होते.उन मी मी म्हणत होते,पाय ओढत चालत होतो. थोड्याच वेळात तीन मोटर सायकल मिळाल्या विद्याताई,लिलाताई आणि गोसावी गेले.आणखी एक मोटारसायकल मिळाली तिच्यावरुन भागवत बडीछितरी पर्यन्त गेले.आम्ही दोघे,माढेकरकाका चालत होतो. बियाबानी दर्गा नन्तर बडीछितरी आले. दाट चिन्चेची झाडे गार सावली देत होती.भागवत तिथे आमची वाट बघत होते. नन्तर आणखी तीनएक कि.मि. चालुन मतलबपुरा येथे श्री.दिनेश सोळन्की या शिक्षकाकडे उतरलो.
मतलबपुरा गाव मान्डवगडाच्या पायथ्याशी आहे.इकडील गावान्मध्ये एक आजार पसरलेला आहे.येथील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण खुपच जास्त आहे,ते पाणी बरीच वर्षे प्यायल्यामुळे येथील माणसाना ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार जडला आहे. त्यान्चे दात पिवळे ,वाकडेतिकडे,किडलेले झाले आहेत,सन्धिवाताने हाडे ठिसूळ झाली आहेत. आता सरकार तर्फे उपाय योजना चालु आहेत.सुनील चौहान हा मुलगा तिथे आरोग्यसेवकाचे काम करतो.सेवाभावी गरीब मुलगा आहे. दिनेश सोळन्की सुद्धा फार सज्जन आहेत. आधी चहा नन्तर रात्री पोळी-भाजीचे भोजन मिळाले.आता विश्रान्ती.उद्या मान्डू.
सकाळी साडेआठच्या बसने मान्डूसाठी निघालो. वाटेत हनुमानमन्दिरात दर्शन घेतले.मान्डूचा रस्ता नुसता दगडधोन्ड्यान्चा होता.एवढे मोठे आन्तरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन स्थळ आहे पण रस्ता असा.पन्धरा मिनिटान्च्या प्रवासाला एक तास लागला. हाडे खिळखिळी होणे म्हणजे काय ते पुरेपुर समजले.दहा वाजता मान्डूला पोहोचलो. नास्ता करुन श्रीराम मन्दिराच्या भक्तनिवासात आलो. खोली घेतली. भागवत आणि मन्डळी मान्डूला मुक्काम करणार नव्हती ,रेवा कुन्डाला उजवी घालुन ते आजच महेश्वरला जाणार होते त्यामुळे त्यानी कॉमन हॉलमध्येच आसन लावले.इथुन पुढे परत आम्ही दोघेच.
मान्डू म्हणजेच मान्डवगड.राणी रुपमती आणि बाजबहाद्दुर यान्ची प्रेम कहाणी येथेच घडली असे सान्गतात. राणी रुपमती नर्मदामैय्याची भक्त होती,फक्त नर्मदाजलानेच स्नान करत असे तिच्या भक्तीनेच मैय्या येथे कुन्डात प्रकट झाली,तेच रेवाकुन्ड.परिक्रमेत नर्मदेचा छोटासा प्रवाहही ओलान्डायचा नसतो म्हणून परिक्रमाकरताना मान्डूला यावे लागते.
मान्डूमध्ये बर्याच अॅतिहासिक इमारती आहेत. बाजबहाद्दूरचा महाल,हिन्दोला महाल,जहाज महाल,होशन्गशहाचा मकबरा वगैरे. येथील दुरसन्चार यन्त्रणा फारच छान आहे,एको पॉइन्टवर काही वाक्य उच्चारले की त्याचा शेवटचा शब्द काही कि.मि. दुर असलेल्या मनोर्यात घुमतो,तिथे त्या पुढचे वाक्य उच्चारले की तिथुन पुढच्या मनोर्यात.या प्रमाणे सन्देश वहन होत असे. नीलकन्ठ मन्दिरातील बान्धकाम काश्मीर-श्रीनगर येथील चष्मेशाही उद्याना प्रमाणे आहे. येथे अकबर बादशहा राहिले होते असे म्हणतात. मान्डूमध्ये गोरख चिन्चेची खुप झाडे आहेत.प्रचन्ड आकाराची ही झाडे आहेत.या झाडाला ७० वर्षानन्तर फळे येतात.पपईच्या एवढे हे फळ असते,यातील गर वाळवुन ठेवतात, हा खाल्यावर बराचवेळ तहान लागत नाही.
मान्डूतील सर्वात महत्त्वाचे स्थळ आहे श्रीराम मन्दीर.याची आख्यायिका अशी आहे.साधारणपणे तीनशे-साडेतीनशे वर्षान्पुर्वी पुण्याच्या रघुनाथस्वामी नावाच्या सन्त महात्माना स्वप्नात द्रुष्टान्त झाला आणि मान्डवगडावर तळघरात आम्ही बन्द असुन लोकहितार्थ प्रकट होणे आहे असे श्रीरामानी सान्गितले.रघुनाथ स्वामी मान्डवगडावर आले,पण त्यावेळी तिथे दाट जन्गल माजलेले होते,एकट्याने शोध घेणे शक्य नव्हते,म्हणुन स्वामी धारच्या राणीसाहेब सकुबाई पवार याना जाउन भेटले आणि त्याना स्वप्नाची गोष्ट सान्गितली.राणीसाहेब त्यान्च्याबरोबर आवश्यक सामान आणि माणसे घेउन गडावर आल्या. जन्गल साफ करणे खोदकाम करुन मुर्तीन्चा शोध सुरु झाला,पण मुर्ती सापडत नव्हत्या. पुन्हा स्वामीना द्रुष्टान्त झाला गडाच्या इशान्य कोपर्यात एक टेकडी आहे तिच्यावर एक वडाचे झाड आहे आणि भैरवाचे ठाणे आहे.तिथे खोदकाम करावे,पायर्या दिसतील आणि तेवत असलेल्या दिव्याचा प्रकाशही दिसेल.उतरुन खाली जा,तिथेच आम्ही आहोत.द्रुष्टान्ता प्रमाणे खोदकाम केले,तळघरात एका चौथर्यावर चतुर्भुज श्रीराम,लक्ष्मण,सीता,गरुड,सुर्य,जैनान्चे भगवान आदिनाथ अशा मुर्तीन्चे दर्शन झाले,दीपकही शान्त प्रकाश देत तेवत होता.भगवन्ताचा किती मोठा चमत्कार.
सन्गमरवरी पाषाणाच्या साधारण चार फुट उन्चीच्या सुन्दर मुर्ती आहेत.चतुर्भुज श्रीराम कुठे बघायला मिळत नाहीत,हे एकच स्थान आहे. मुर्तीन्च्या पायाजवळ शके९०१ असे लिहिलेले आहे. म्हणजे या मुर्ती अकराशे वर्षापुर्वीच्या आहेत. भारतावर मुसल्मानी आक्रमण झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणापासुन वाचवण्यासाठी मुर्ती तळघरात लपवल्या असाव्या. नन्तर राजवटी बदलत गेल्या ,वसाहती उठल्या,जन्गल वाढले आणि सर्वच विस्मरणात गेले असावे. पण आपले सर्वान्चे मोठे भाग्य म्हणुन तीनशे-साडेतीनशे वर्षान्पुर्वी स्वामीना द्रुष्टान्त देउन भगवन्त प्रकट झाले.
धारच्या राणीसाहेबानी भव्य मन्दीर बान्धले आहे.आदिनाथ भगवानही जैन मन्दिरात स्थानापन्न आहेत.भागवत आणि मन्डळीन्बरोबर लगेच पुढे गेलो असतो तर हे काहीच बघता आले नसते.मन्दिराच्या आवारात ते तळघरही बघता येते.उद्या पुढे.
महेश्वरला पोहोचलो त्यावेळी बारा वाजले होते,मैय्याच्या घाटावर पोहोचलो,देवी अहिल्याबाई होळकर यान्चे पवित्र दर्शन घेउन रिक्शाने मन्डलेश्वरला आलो.आमचा अन्दाज होता त्याप्रमाणे दत्तमन्दिरात भागवत आणि मन्डळी भेटली पण ते लगेच पुढे खेडीघाटला जाणार होते,मग त्यान्च्याबरोबरचा देण्याघेण्याचा व्यवहार पुर्ण केला आणि त्याना निरोप दिला.दोघे सुखी हेच खरे.
दत्तमन्दिर साधेसुधे पण प्रशस्त आहे. वासुदेवानन्दसरस्वती स्वामीन्चे शिष्य श्री. जहागिरदार यानी ही वास्तु बान्धली.सुधाकर भालेराव हे येथील पुजापाठ वगैरे व्यवस्था पाहतात. पद्मजा केळकर,नन्दा भोपळे या भोजनाची व्यवस्था पहातात. भागवत मन्डळीन्साठी स्वयम्पाक केलेलाच होता त्यामुळे त्यानी लगेच आम्हाला भोजनप्रसाद दिला.आणि शाळेत जायचे असल्याने त्या गेल्या.
आज आम्ही दोघेच परिक्रमावासी मुक्कामाला आहोत. बहुदा फक्त मराठी परिक्रमावासी येत असावेत.चार वाजता चहा घेउन मन्डलेश्वर दर्शनाला निघालो. भारतीताई ठाकुर याना फोन केला पण त्या काही कामासाठी रावेरला गेल्या होत्या त्यामुळे त्यान्ची भेट होणार नव्हती. योग नव्हता.
काशीविश्वेश्वर मन्दिरात गेलो. येथेच वासुदेवानन्दसरस्वती स्वामी यान्चे वास्तव्य होते.बहुतेक सर्व ग्रन्थरचना स्वामीनी याच ठिकाणी केली.त्यान्च्या कुटीत पादुकान्चे दर्शन घेतले.त्यान्च्या वापरातील वस्तु येथे जतन केलेल्या आहेत. या सर्व वास्तुच्या मालकिणबाई सौ. जहागिरदार वहिनी भेटल्या.त्यानी आस्थेवाईकपणे आमची चौकशी केली,स्वामीन्बद्दल माहिती सान्गितली.पुन्हा आल्यावर त्यान्च्याचकडे मुक्काम करावा असा आग्रहही केला.
तिथून श्रीराम मन्दिरात गेलो.श्रीगोन्दवलेकरमहाराजान्च्या प्रेरणेने हे मन्दिर १९३२ मध्ये बान्धले आहे.भव्य मन्दिर आहे. सुन्दर श्रीराम लक्ष्मण सीता आहेत. नर्मदामैय्याचा प्रशस्त घाट आहे. श्री. मोडक येथील व्यवस्थापक आहेत.त्यानी चहापाणी करुन आमचे आदरातिथ्य केले.
सन्ध्याकाळी आरतीनन्तर दत्तबावनीचा पाठ केला. भोजनाला फक्त आम्ही दोघे आणि भालेरावगुरुजीच होतो पोळ्या शिल्लक होत्या म्हणून वान्ग्याबटाट्याची रस्सा भाजी आणि थोडा भात केला भोजन करुन आता झोपणे. उद्या खेडीघाट.
अन्कलेश्वरला घरच असल्याने मजाच होती. मिनुने ह्यान्च्या वाढदिवसानिमित्त श्रीखन्ड आणले होते पण पोटदुखिने तिचे मामा बेजार झाले होते थोडेसे खाल्ले.निशाला ,{ह्यान्ची बहीण मिनुची आई} फोन करुन अन्कलेश्वरला ये सान्गितले,रात्रीच्या बसने निघुन ती लगेच सकाळी आली सुद्धा.
सकाळी डॉक्टरकडे जाउन ह्याना तपासुन आणले,मी दिलेली औषधे बरोबर आहेत असे डॉक्टर म्हणाले.त्यामुळे बरे झाले. पुण्याच्या भागवतान्चा फोन होता,ते आणि त्यान्च्याबरोबरचे सहा जण मिनुच्याच घरी येणार आहेत.कारण अन्कलेश्वरला आश्रमासारखी काही सोय नाही.मिनुला ते येणार म्हणून खुप आनन्द झाला.मिनुचे घरमालक श्री. सिन्ग यानाही येणार्या पाहुण्यान्बद्दल सान्गितले.ते म्हणाले ,परिक्रमावासि लोगोन्की सेवा करनेका ये मौका सौभाग्यसे आया है,वे लोग हमारे घरमे रहेन्गे और आप सब लोग भोजन हमारे यहा करेन्गे. यावर काय म्हणणार? हो म्हटले.
ठरल्या प्रमाणे दुसर्यादिवशी भागवतान्चा फोन आला,मग हे आणि सिन्ग त्यान्ची गाडी घेउन त्याना घेण्यासाठी गेले.काहीजण रिक्षात आणि काही सिन्ग यान्च्या गाडीत असे घरी आले.श्री. अशोक भागवत,सौ. विद्या भागवत,सौ. लिला शिन्दे,श्री. अशोक माढेकर,श्री. गोवर्धन गोसावी,श्री. अरुण सवदी असे सहाजण आले.माढेकर,गोसावी,सवदी याना सिन्ग यान्च्या घरी आणि बाकी सर्व मिनुकडे राहिले.सन्ध्याकाळी भागवतान्चे मित्र श्री. जाधव हे औरन्गाबादहुन आले,ते रत्नसागर पार करुन पुढे भरुचपर्यन्त आमच्या बरोबर येणार होते,मग आम्ही निशाला म्हटले की तू सुद्धा चल.ती चालेल म्हणाली. रात्री सिन्ग यान्च्याकडे भोजनाचा बेत अगदी फक्कड होता,पुर्या खीर फ्लॉवरचा रस्सा जिरा राइस आणि चुरम्याचे लाडू्. हसत खेळत भोजन झाले,गप्पा झाल्या.उद्या कठपोर; नर्मदामैय्या आणि रत्नसागर{अरबी समुद्र} सन्गम.
सकाळी इतक्या जणान्च्या आन्घोळी,कपडे होईपर्यन्त दहा वाजुन गेले.एकीकडे स्वयम्पाकही झाला.साधा बेत,वरण-भात भाजी पोळी.जेवण झाल्यावर निघालो.आम्ही दहाजण होतो एक बारासीटर गाडी केली.प्रथम रामकुन्ड राममन्दिर पाहिले.खरेतर हा पुर्वीचा स्मशान घाट.आता कुन्डाच्या एका बाजुला राममन्दिर बान्धुन तिथे परिक्रमावासीन्साठी सोय केली आहे,आश्रमात अन्नक्षेत्र आहे. श्रीराम सीता लक्ष्मण यान्च्या सन्ग्मरवरी मनोहर मुर्ती आहेत.आम्ही गेलो त्यावेळी देवाची विश्रान्तीची वेळ होती पण तिथल्या महन्तानी पडदा बाजुला करुन आम्हाला दर्शन घडवले. नर्मदेहर.रामदर्शनानन्तर गेलो बलबला किन्वा बुलबला कुन्ड बघायला.एक छानसा बगिचा,त्यात एक हनुमान मन्दिर आणि थोड्या अन्तरावर आहे बलबला कुन्ड यामधील पाण्याचा रन्ग पाढुरका गढुळ आहे आणि पाण्यात असन्ख्य बुडबुडे फुटत असतात,उकळी फुटल्या प्रमाणे. पाणी गरम असेल असे वाटले पण नव्हते.भुगर्भवायूमुळे बुडबुडे येत असतात.भाबड्या लोकाना चमत्कार वाटतो. नन्तर गेलो हासोट येथे सुर्यकुन्ड दर्शनास.एक शिवमन्दिर आहे,पण कुन्डाबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.तिथुन खिचडीवालेबाबा आश्रम हनुमान मन्दिरात आलो.येथे परिक्रमावासीना राहण्याची सोय आहे.अन्नक्षेत्र आहे.तिथे चहा मिळाला,तो घेउन पुढे निघालो.
चार वाजता कठपोरला पोहोचलो.रिक्षातुन उतरुन दोन कि.मि. चालुन रैनबसेरात पोहोचलो.तेथिल महाराजानी आम्हा दहाजणाना एक स्वतन्त्र खोली दिली,खोलीच्या खिडक्या-दाराला दरवाजे नव्हते. नवीन बाम्धकाम असल्याने नुसत्या भिन्ती आणि वरती स्लाबचे छप्पर होते आणि थन्डीवार्या पासून बचावासाठी तेच महत्त्वाचे आणि पुरेसे होते.
हे ,जाधव गोसावी महाराजाना परिक्रमावासी लोकान्च्या नावान्ची लिस्ट करणे,नावेच्या प्रवासासाठी प्रत्येकी ५०रू.वर्गणी गोळा करणे वगैरे कामात मदत करायला गेले.महाराज शिकलेले नाहीत आणि उद्या पार जाण्यासाठी गर्दीही खुप आहे.त्यामुळे अशी मदत करणे खुप आवश्यक होते.
रात्री खिचडीचा भोजनप्रसाद होता.ओम्कारेश्वर ते कठपोर हा १४००कि.मि.अन्दाजे परिक्रमेचा पहिला टप्पा आज पुर्ण झाला.उद्या नावेत बसुन उत्तर किनार्यावर गेलो की परिक्रमेचा पुढचा टप्पा सुरु होणार.मैय्या! आपल्या लेकराना साम्भाळून तुच तो त्यान्च्याकडुन पुर्ण करुन घेणार आहेस. नर्मदे हर. वन्दे नर्मदाम
No comments:
Post a Comment