बाजीराव पेशवे ! मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय. एन पुणे शहरात असणार्या
शनिवार वाड्याला बहुतेक सर्वजण भेट देतात.अगदी हौशी इतिहासप्रेमी
बाजीरावांच्या सिन्नरजवळील डुबेर गावातील बाजीरावांच्या जन्मस्थानालाही भेट
देतात्,मात्र बाजीरावांनी ज्या ठिकाणी आपला देह ठेवला, त्या रावेरखेडीला
मात्र क्वचितच कोणी भेट देते. एकतर मध्यप्रदेशासारख्या थोड्या लांब ठिकाणी
असल्यामुळे बहुतेकांना तिथे जाते सोयीचे होत नाही.आज आपण या रावेरखेडीची
माहिती घेउया.
रावेरखेडीला महाराष्ट्रातून जायचे असेल तर सेंधव्यानंतर ठिकरी गाठायचे व
ठिकरीच्या थोडे पुढे कसरावद फाटयावरून कसरावदकडे (उजवीकडे) वळण घ्यायचे,
त्या फाट्यापासून कसरावद, डोगावण, बडी, कटोरा अशी छोटी छोटी गांवे टाकून
अरूंद आणि आणि ठीक ठाक अवस्थेतल्या रस्त्यांवरून हळूहळू पुढे जावू लागतो.
गावांची एकंदर धाटणी पश्चिम महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यासारखीच होती.
फक्त गावातून बाहेर पडल्यानंतर झाडे आणि शेतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी
होते. (NH3-कसरावद फाटा ते रावेरफाटा अंतर - ५० किमी)
दुसरा मार्ग जळगाव-मुक्ताईनगर -बुर्हाणपुर- सनावदला - बेडीयामार्गे कटोरा-रावेर असा आहे.
रस्ता नविनच बनवला गेला होता. आम्ही दर ५ कि.मी ला कुणाला ना कुणाला
रस्ता विचारत होतो. माझा अंदाज होता की समाधी बहुतेक लोकांना माहीत नसेल.
पण आम्ही ज्याला कोणाला विचारले त्याने प्रत्येकाने "पेशवा सरकार" बद्दल
व्यवस्थीत माहिती पुरवली. बेडीया हुन आम्ही पीपलगोन रोडला लागलो. २० चे ४०
किमी झाले तरी समाधी येईना म्हणून चालक थोडा वैतागला होता.
रस्ता नवीनच बनवला गेला होता. आम्ही दर ५ कि.मी ला कुणाला ना कुणाला रस्ता
विचारत होतो. माझा अंदाज होता की समाधी बहुतेक लोकांना माहीत नसेल. पण
आम्ही ज्याला कोणाला विचारले त्याने प्रत्येकाने "पेशवा सरकार" बद्दल
व्यवस्थीत माहिती पुरवली. बेडीया हुन आम्ही पीपलगोन रोडला लागलो. २० चे ४०
किमी झाले तरी समाधी येईना म्हणून चालक थोडा वैतागला होता.
वाटेत एका गावात थांबल्यानंतर पहिला प्रश्न आला "कै जारियो?" नेमाडी /
मालवी भाषेची पुरेपूर झलक मिळाली. त्यांना "पेशवा सरकार की समाधी" कडे
जाण्याचा मार्ग विचारला. नेमाडी भाषेत सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळाली.
सहमती दर्शवताना हो म्हणण्याऐवजी "हौ / हाऊ" असा प्रकार पहिल्यांदा ऐकला.
पुढे एका ठिकाणी "नर्मदाजी के तट पर है" अशीही माहिती मिळाली. या आधी
नर्मदामैया असे ऐकले/वाचले होते. नर्मदा"जी" हे पहिल्यांदाच ऐकले.
काही कि.मी जाताच आम्हाला म.प्र. सरकारचा हा मोठा फलक दिसला. ही पाटी
चुकणे शक्य नाही अशी मोठ्या आकाराची आहे.एकदम चकाचक पाटी बघून फोटो काढताना
पुढे रस्ता ठीकठाक असेल असे वाटले होते.ही तर फक्त सुरूवात होती. आपण
जसजसे आत जावू तशी रस्त्याची अवस्था आणखी खराब होत गेली. वाटेत एक नदी पार
करावी लागली. खुर्किया नदी.
गुगल मँप्स वर रस्ता

आम्ही पटापट गाडीतुन ऊतरून फलका जवळ सेल्फीस घेतल्या.मी ऐकून होतो की रस्ता खराब आहे पण
ह्या फलका पासुन ते रावेरखेडी पर्यंत रस्ता बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले होते.
रावेर येथून 8 की.मी. होते. लवकरच आम्ही खेडी ह्या गावी पोहचलो. इथे एक
माहिती भेटली रावेरखेडी ह्या अखंड नावाचे कुठलेही गाव नाही. रावेर व खेडी
ह्या वेगवेगळ्या नावाचे दोन गावे आहेत किंवा रावेरखेडी नावाचे एकच गांव आहे
याची माहिती कोठेही मिळाली नाही आणि तिनही प्रकारच्या पाट्या सगळीकडे
पाहिल्या.त्यापैकी बहूतेक रावेर ह्या गावात
समाधी आहे.
ते ह्या बोर्ड वरून पण लक्षात येईल.
आम्ही गावात विचारपुस केली. समाधी अजून 2 किमी पुढे आहे अशे कळाले.
त्याप्रमाणे एका चिंचोळ्या रस्त्यावरून गाडी वळवून पुढे निघालो. व
पोहोचलो. समाधीजवळ जाणारा रस्ता अगदीच वाईट अवस्थेतला आहे. चारचाकी जाईल की
नाही इतपत शंका यावी इतका खराब रस्ता आहे. गाडी अलीकडे लावून आम्ही पायी
निघालो. समाधीस्थळ महेश्वर धरण
प्रकल्पामुळे बूडणार आहे.तशा लाल खुणा येथील घरांवर घरांवर केल्या आहेत.
असं मी कुठेतरी वाचलं होत पण मला अश्या कुठल्याही खुणा येथील घरांवर
आढळल्या नाहीत समाधी जवळ पोहोचताच नजरेत भरेल असा फलक म.प्र. शासनाने
लावलाय.
त्याच्या बाजुलाच श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांची पुर्ण माहिती पुरवनारा आणखी एक मोठा फलक लावलाय.
जवळच काशीबाईंनी बांधलेले महादेव मंदिर आहे.
प्रवेशद्वाराबाहेरच विलक्षण बोलक्या डोळ्यांच्या मारूतीचे एक मंदिर
आहे. (हे मंदिर पेशवेकालीन असावे असा कुठेतरी उल्लेख वाचला आहे.)
समाधीस्थळाच्या दरवाजा उघडाच होता. बाहेरच पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या
मारोती चे दर्शन घेऊन आम्ही आंत प्रवेश केला. आत भरपूर मोकळी जागा आहे.
उजव्या बाजूला श्रीमंत पेशव्यांच्या अस्थींची छत्री आहे. माझी छाती
भारावलेली होती. एका खूप मोठ्या स्थळी आल्याचा खूप आनंद झाला होता. मी हात
जोडून छत्री समोर उभा राहीलो. महाराष्ट्राला नर्मदेपल्याड पोहचवणार्या,
जगातल्या शेवटच्या हिंदू राज्याला साम्राज्यात रुपांतरीत करणार्या,
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करणार्या श्रीमंत बाजीराव
पेशव्यांच्या समोर ऊभा असल्याचा मला भास झाला. सर्वांनी समाधीचे दर्शन
केले.

भक्कम परंतु कोरीव बांधकामातील ही समाधी अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आत
गेल्यानंतर एका बाजूला सिमेंटची वापरलेली पोती आणि लोखंडी ग्रील / गेट पडले
होते. गिलावा उडालेल्या कमानी आणि अनेक अनाम प्रेमवीरांनी आपआपली नावे
अजरामर करून ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
प्रवेशद्वारापासून
आत गेल्यानंतर मध्ये मोकळी जागा व चारही बाजुला बैठे बांधकाम आहे.मोकळ्या
भागात एका बाजूला बाजीराव पेशव्यांच्या अस्थी असलेली छत्री आहे.

एक
जीर्णावस्थेतील बोर्ड एका भिंतीला टेकून ठेवला आहे. (हा बोर्ड पूर्वी
एखाद्या लोखंडी आधारावर असावा.) सुबक कोनाडे आणि रेखीव कमानी दिसतात. एका
चिंचोळ्या जिन्यावरून वर जाता येते. येथून नर्मदा नदीचे विशाल पात्र दिसते.
त्या ठिकाणी नर्मदेत एक बेट आहे. आज ह्या ठिकाणी काही नसले तरी पुर्वी
नर्मदा फक्त येथूनच पार केली जायची. मराठ्यांनी येथे टोलनाका बसवला होता.
श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या १ लाख फौजेसह ह्या ठिकाणी असतांना सतत १२ तास
घोडदौड केल्याने अतीश्रमाने त्यांचे निधन झाले. ग्वाल्हेरच्या शिंदेंनी
त्यानंतर इथे समाधी बांधली. आम्ही संपूर्ण समाधीला चक्कर मारूण बाहेर आलो.

थोरले बाजीराव पेशवे (१७०० -१७४०)
नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही…
रणरणत ऊन भाजून काढत होतं…उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली
सापडत नव्हती…आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने देखील कधी
गाडी इतक्या आत आणली नव्हती…
शोध होतं तो एकच गोष्टीचा…पण ती देखील कुठे आहे कोणालाच माहित नव्हती…
आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच’ आपल्यावर येऊ शकते..
१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…
शिवाजी शिवाजी करत बसणारे आम्ही ….मराठ्यांच्या पूर्ण इतिहासाला शिवाजी पुरताच मर्यादित करून बसलो होतो!
हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर, त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!
बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू आम्हाला माहित होतं…पण त्यांची समाधी
कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार? आपलं सरकार तरी कुठे
मान्यता देतं? शिवाजी महाराजांचे समुद्रात पुतळे उभारतील, पण त्यांचे गड
किल्ले भाग्नावास्तेत पडू देतील, असलं हे विचित्र सरकार! शाळेतील
इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव खरोखर किती मोठा होता हे
आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा
‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!
ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!
"जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"
बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदाराखिलाफ
बाजीरावाची मदत मागितली. संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते. असे
म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव उठले आणि थेट घोड्यावरून
मोजक्या स्वारानिशी निघाले. बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.
“ उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून उशीर झाला!"
ह्याला म्हणतात मराठी बाणा! मैत्रीचं राजकारण खेळावं तर ते असं! पोकळ
दंडावर फुकटचे षड्डू थोपटत बसणाऱ्या राजकारण्यांनी आणि सरकारी यंत्रणेने
काहीतरी शिकावे ह्यातून!! ह्या कृत्यानंतर बाजीरावाने बंगाशाला पराभूत तर
केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…आणि
मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!
अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे
असे आम्हाला कळते काय आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार असल्याचे
कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय…सगळं अगदी
घाईघाईत घडलं…
इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात
एक विचार येऊन गेला.. जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल
बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली…घोड्यांच्या
टापांनी हादरून उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून
गेला होता!
बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल
होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका
आम्ही बलजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला….आणि नंतर लागल ते एक छोट
गाव! हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला! अगदी कोणीही न
सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात
आम्ही पटाईत! गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये विचारल,
" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?" असा प्रश्न विचारल्यावर
समोरचा कसा क्लीन बोल्ड होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली!
कोणालाच माहित नहीं! मग मूळ मुद्द्यावर आलो,
"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?"
रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही
पुढे निघालो…पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे कुणालाच ठाऊक
नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने
आम्ही कूच केली…
ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली… गावातील घरांचे दरवाजे
एकदम जुन्या पद्धतीचे…भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम…जणू
बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर असावीत! सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते
देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले
असतील! अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला, सरदारांचे डेरे, सैनिकांची
चाललेली धावपळ आणि आपल्या डेरयात मसलती करीत बसलेला एक दिमाखदार मराठी
तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा हाच तो!
गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत विचारशक्ती!
कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा पंतप्रधान! (नाहीतर आजकालचे पंतप्रधान!)
तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसता
सपाट जमीन! डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकी
भाजून काढणार ऊन!! आता काय करायच ह्या विचारत असताना एक उजवीकडे शेड दिसली!
शेतीच्या कामासाठी वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पहु इथे विचारून!
भात्यातील शेवटचा बाण उरले तो मारून पाहू! असे म्हटले आणि मी गाडीतुन
उतरलो!
पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची जाणीव त्या दिवशी झाली!
आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो! आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!
आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणूनदेखील घेत नहीं!
भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल आपण अपेक्षा ठेवत नहीं! तीच
गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!
महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून आम्ही कधीच, "पेशवा
बाजीराव की समाधी कहा है? " असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही
गोष्ट घडली खरी!
मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"
"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला! हा माणूस म्हणजे दादासाहब!
नाव
दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली आणि
साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता!
मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"
आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले, "समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."
पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!
इतका मान! इतका आदर!! ते देखील पुण्याहून शेकडो मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!!
मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या कडा पाणवल्या!
ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे देखील त्याला इतका मान नाही!
महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि
माहीत असला तरी "अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न विचारणारे
महारथी देखील आहेत!
आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे
आणी ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा गावठी ‘दादासाहब’ कुठे !
मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का असेना लाज वाटली! जणू ह्या
‘दादासाहब’ ने नकळत आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी
फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!
कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं, क्वीन एलीझबेथ म्हणतात.
अमेरिकेसारखा स्वार्थी देश, पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा
म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील
वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते! शिवाजी, संभाजी,
बाजीराव अशी राजरोस पाने आपण नवे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा
अभिमान? कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण कुठला ‘दादासाहब’!
त्याला काय घेणं देणं नसताना इतका आदर करतो!
ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि आम्ही ती पाहून देखील आलो!
महाराष्ट्राच्या पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या
घाटावर जाऊन स्नान करून आलो!
तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!
परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका
सच्च्या पण विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची, त्याच्या नावाला न साजेशी अशी
दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!
बाहेर वाऱ्यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता.
माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत परत ऐकू येत
होते!
थोरले बाजीराव पेशवे समाधी स्थळ
No comments:
Post a Comment