Monday, December 7, 2020

अरुणाचल प्रदेश

 अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील राज्यामध्ये आकाराने सर्वात सर्वात मोठे राज्य असुन त्याचे क्षेत्रफळ ८३७४३ चौरास किलोमिटर इतके आहे. हे राज्य म्हणजे भारताची संरक्षक भिंत असुन याच्या पश्चिमेस भुतान, उत्तरेस नेपाळ, इशान्येस चीन आणी पुर्वेला बर्मा हे देश आहेत. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सीमेनी (१६८० कि.मि) वेढलेले असे हे राज्य आहे. १९७२ पर्यंत या भुभागास (NEFA) North East Frontier Agency असे संभोधण्यात येत असे. २०/०१/१९७२ ला यास केन्द्र शासीत प्रदेश म्हणुन मान्यता मिळाली व २०/०२/१९८७ रोजी हे भारताचे स्वयंपुर्ण राज्य म्हणुन अस्तित्वात आले.

गर्द हिरवी जंगले, खोल नद्यांच्या दर्‍या आणि मनमोहक पठारे, उत्तरेस बर्फाच्छादीत पर्वत रांगा तर दक्षिणेस ब्रम्हपुत्रेचा सखल प्रदेश असा निसर्गानी भरभरभरुन वर्षाव केलेला अतिसुंदर प्रदेश म्हणुन याचे वर्णन करता येईल आकारमानाने सर्वात मोठे राज्य असुनही येथील लोकसंख्येची घनता मात्र प्रती चौरस कि.मी मागे केवळ १५ इतकी आहे. या विशाल प्रदेशाच्या निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटक येथे आकर्षित होतात.
इथे अनेक धार्मीक स्थळे आहेत. मोठ्या संख्येने यात्रेकरु येथील तवांग मधील बुध्दधर्मीयांसाठी सर्वोच्च असलेल्या मठापैकी एक असलेल्या मठात येत असतात. त्याच प्रमाणे लोहीत जिल्यातील परशुरामकुंड, दिबांग जिल्यातील रुक्मीणीचे जन्मस्थान असलेले भिष्मक नगर, पश्चिम सियांग जिल्ह्यातील मालिनिथान व इटानगर ही अरुणाचल ची राजधानी असलेल्या शहरातील इटाफोर्ट येथे यात्रेकरु व पर्यटक नियमीत येत असतात. झिरो जिल्यात नुकतेच २८ फुट उंच व २२ फुट व्यास असलेले विशाल शिवलिंग सापडले असुन तेथे ही पर्यटकांचा ओघ सुरु झाला आहे.
परशुरामकुंडात स्नान करण्यासाठी मकर संक्रांतीला इथे भाविकांची मोठि गर्दी उसळते. गेल्या वर्षी ही संख्य ६०००० होती. बहुतेक यात्रेकरु मणिपुर, महाराष्ट, राजस्थान, बिहार, आसाम, अरुणाचल, उत्तर प्रदेश या राज्यातुन आले होते.
कालीका पुराणात व महाभारतात देखिल अरुणाचल चा उल्लेख आहे. पुराणातील प्रभु पर्वत म्हणजे आजचे अरुणाचल. येथे व्यास मुनींनि ध्यान धारणा केली. परशुरामाने आपले पाप क्षालन केले तेही येथेच व कृष्णाचे रुक्मीणीशी लग्न झाले तेही येथेच.
प्रशासनीय दृष्ट्या या राज्याचे १६ जिल्हे आहेत. सगळ्या जिल्ह्याची नावे ही येथील नद्यांच्या नावाने दिली गेली आहेत. ति जिल्हे खालील प्रमाणे:- १) तिराप २) चांगलांग ३)लोहीत ४) आन्जॉ ५) दिबांग व्हैली ६) लोअर दिबांग व्हैली ७) ईस्ट सियांग ८)अप्पर सियांग ९) वेस्ट सियांग १०) अप्पर सुबानसिरि ११) लोअर सुबानसिरी १२) कुरुंग कुम्ये १३) पापुम्पारे १४) ईस्ट कामेंन्ग १५) वेस्ट कामेंन्ग व १६) तवान्ग
२००१ च्या लोकगणनेनुसार या राज्याची लोकसंख्या १० लाख ९७ हजार ९६८ इतकी होती. येथे २० उप-विभागीय केन्द्रे, १०८ सर्कल्स, २० मुख्य शहरे व ३८६३ गावे आहेत. येथील साक्षरतेचे प्रमाण ५४.७४% आहे.
अरुणाचलचे लोक
अरुणाचलमध्ये २६ मुख्य जनजाति तर १०७ पोट जमाति आहेत. मुख्य जनजातित ठळक अशा जनजाती म्हणजे मोन्पा, शेर्दुक्पेन, आका, मिजि, निशी, अपातानी, पहाडी मिरि, तागिन, गालो, आदि, मेम्बा, कम्बा, इदु, मिश्मि, दिगारु मिश्मि, मिजो मिश्मि , तन्ग्सा, तुसा, वान्चो, नोक्टे, खाम्प्ति, सिन्ग्पो इत्यादि. यातील मोन्पा, शेर्दुक्पेन, खाम्प्ति, सिन्ग्पो व मेम्बा या जमाती बुध्दिस्ट आहेत. हिनायना व महायना सारखे प्रवाह निरनिराळ्या जमातीत प्रबळ आहेत. आणि ते प्रामुक्याने तवान्ग, वेस्ट कामेन्ग , अप्पर सुभानसिरि, वेस्ट सियांग, अप्पर सियान्ग आणि लोहित व चान्गलन्ग जिल्ह्यातील काही भागात वसलेले आहेत. नेफा च्या काळापासुन ज्या चकमा जमातिचे पुनर्वसन तात्पुरते चान्ग्लान्ग जिल्ह्यात केले गेले होते ते बुध्द धर्मिय आहेत. तानी हे स्वत:ला आबोतानी चे वंशज मानतात व आबोतानी हे पृथ्वीवरिल प्रथम मानव होते असा त्यांचा विश्वास आहे. निशि, गालो, आदि, तागिन, पहाडी मिरी व आपातानी हे देखिल स्वतःला याच वंशावळीचे मानतात.
तानी जमातिचे लोक "दोनी" व "पोलो" म्हणजे सुर्य व चंद्र यांना सर्वोच्च देव मानतात.
तिरप जिल्ह्यातील वानजिल्ह्यातील, तुत्सा तर चांगलांग जिल्ह्यातील तांगसा, सिंग्फो या जनजातीत रंगफ्राईजम चळ्वळ जोरात सुरु आहे. रंगफ्रा हा त्यांचा सर्वोच्च निर्माता.. 'रंग' म्हणजे पृथ्वीचे संचालन करणारी शक्ती आणि 'फ्रा' म्हणजे विश्वास, शांती, त्याग, श्रध्दा. बुध्दाला मानणारे सोडले तर सर्वच जनजातींमध्ये पशुबळी हा धार्मीक विधिचा एक भाग आहे. घरातील आजारी व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्याच्या स्थानीक दैवतेला साकडे घालण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी त्यांच्या स्थानिक देवतेला संतुष्ट करण्यासाठी पशु बळी देणे ही सर्वच जनजातीमध्ये नियमीत प्रथा आहे.
प्रत्येक जनजातीमध्ये त्याचा स्वतंत्र धर्मगुरु असतो. आणी तो विशिष्ठ संप्रदाय त्या धर्मगुरुचा आदर करतो कारण त्याच्यामध्ये जन्मतःच काही दैवी शक्ती आहेत अशी त्यांची श्रध्दा असते. हे धर्मगुरु दैवी शक्ती असलेले, विशुध्द अंतःकरणाचे, आणि स्वर्गीय मनाचे असतात. ते कुठलेही लेखी साहित्या च्या आधारा शिवाय मंत्र पठण करु शकतात. आपल्या दैनंदिन समस्यासाठी या समुदायाचा मोठा वर्ग या धर्मगुरुंचा सल्ला घेतो.
येथील लोक शेतीशी संबंधीत सण हे उत्साहाने साजरे करतात. हे उत्सव ते देवाला भविष्यातील भरभराटीसाठी आणी भरघोस पिकासाठी आशिर्वाद मागण्यासाठी व आभार मानण्यासाठी असतात. या उत्सवाची वेगवेगळी नावे आहेत. जसे मोपीन, सोलुन्ग, लोस्सर, द्री, सि-डोनी, न्योकुम, रेह. इ. संपुर्ण जनजाति हे उत्सव साजरे करण्यासाठी येतात. यात पारंपारिक वेषभुशा करुन केलेले नृत्य, पशु बळी देणे, घरी बनविलेले पारंपारिक मद्य प्राशन, व सर्व समुदायाला जेवण ह्याचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो.
धर्मांतरण
ब्रिटिश राजवटित हे राज्य इतर इशान्यभारतातील राज्याच्या विपरित, ख्रिश्चन धर्मप्रचारकाच्या धर्मांतरण कारवायां पासुन पुर्णपणे मुक्त होते. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर धर्मप्रचारकांनी या पहाडी प्रदेशांतिल काही कप्प्यांना आपल्या कारवायांचे लक्ष्य बनविले. लगेच येथील जनजातींना आपल्या वेगळ्या संस्कृति वर व शांत सामाजिक जिवनावर धर्मप्रसारकांच्या होत असलेल्या आक्रमणाची जाणीव होउ लागली. त्यांनी या विरुध्द १९७४ मध्ये लढा उभारला आणि धर्मप्रसारकांना राज्यापासुन दुर ठेवण्यात पुढील २ दशके तरी यशस्वी झाले.
राज्याच्या पश्चिम व मध्य भागात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे अस्तित्व व धर्मांतरणाचा वेग हा या लढ्यामुळे नाममात्र राहीला. मिशनर्‍यांनी मग आपल्या या कामाच्या व्युहरचनेमध्ये बदल करुन अरुणाचल - आसाम या सिमावर्ती भागात अरुणाचली विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक संस्था स्थापन करण्याचा सपाटा लावला. त्यांनी ओडलगुडी जिल्ह्यातजिल्ह्यातील, नॉर्थ लखिमपुर जिल्ह्यातील हरमोती, सोनित्पुर जिल्ह्यातील बालिपारा , धेमाजी जिल्ह्यातील सिलापथार, तिन्सुखीया व दिब्रुगढ इत्यादी ठीकाणी वस्तिगृहाची स्थापना करुन विध्यार्थ्यांना त्यांच्या रानटी परंपरेपासुन तुम्ही कसे वेगळे आहात हे बिंबविण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांचा धर्म आधुनीकतेच्या नावाखाली बदलविण्यास भाग पाडले. मग या सुशिक्षीत झालेल्या नव ख्रिश्चनांनी येथील राजकारणी नेते व सरकारी अधिकार्‍यांवर प्रभाव टाकुन त्यांना ख्रिश्चन धर्मप्रचारकांच्या कारवायांबद्दल अनुकुल मत तयार केले.
यानंतर ख्रिश्चन मिशनर्‍यांना जरी राज्यात प्रवेश बंदी होती तरी देखील परिस्थीती इतकी बदलली कि राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी मदर टेरेसा यांना याचुली येथे चर्च संस्था उघडण्यास १९९८ मध्ये परवानगी दिली. आज अरुणाचल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात ख्रिश्चन मिशनर्‍यांचा वावर आहे. आज येथे धर्मांतरणाचा वेग वाढतो आहे. २००१ च्या जनगणनेनुसार ख्रिश्चनांचे प्रमाण हे राज्याच्या लोकसंख्येच्या २२% इतके आहे व ते आज सुमारे २५% पर्यंत पोचले आहे.
चर्च चे मुख्य लक्ष्य हे प्रामुख्याने येथील जनजातीचे धर्मगुरु हे असतात कारण त्यांचा जनजातिवर प्रभाव असतो. काही धर्मगुरुअ हे त्यांना दिल्या गेलेल्या आमिषाला बळी पडतात. धर्मांतरणाचा येथील वाढता वेग ही येथील गंभीर बाब आहे आणि हे असेच चालु राहीले तर हे राज्य ख्रिश्चन राज्य होण्यास विलंब राहणार नाही आणि तसे झाल्यास तो देशाच्या एकात्मतेला धोका होउ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.
The National Socialist Council of Nagalim (NSCN) या संघटनेने अरुणाचलच्या अर्ध्यी भागावर तो ग्रेटर नागालीम चा भाग असल्याचा दावा केला आहे. बंडखोर गटांनी तयार केलेल्या नकाशात अरुणाचलचे सहा जिल्हे हे त्याचे असल्याचे दर्शविले आहे. ही तीच सघटना आहे जीचे घोष वाक्य "Nagaland for Christ" आहे. त्यांना सभोवतालचा प्रदेश हा त्यांच्या राज्यात सामील करावयाचा आहे. या संघटनेने तिराप व चांगलांग जिल्ह्यातील बर्‍याच तरुणांना आपल्या संघटनेत भरती करुन घेतले आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ही काळजी करण्यासारखी आहे.
अरुणाचल प्रदेशाचे पहिले लेफ्ट. गवर्नर हे के.ए.ए.राजा हे होते. त्यांनी ख्रिश्चन मिशनर्‍यांपासुन या भुभागाचे संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच काळात येथे District Art and Curture Officer(DACO) चे पद निर्माण करण्यात आले आणि प्रत्येक जनजातीचे वेगळे सांस्कृतिक मंडळ निर्माण केले. या द्वारे प्रत्येक जमातिचा वैशिष्ट्यपुर्ण सांस्कृतीक वारसा जतन व विकसित करण्याला प्रोत्साहन मिळाले. त्यांनी रामकृष्ण मिशन व विवेकानंद केन्द्रांना अरुणाचलात आमंत्रित केले व त्यांना येथिल निरनिराळ्या भागात शाळा व वैद्यकिय प्रकल्प सुरु करण्यास प्रोत्साहीत केले.
"स्त्री सक्षम झाली तर घर सक्षम होईल" या विचाराने विवेकानंद केंद्र आज अरुणाचलमध्ये चार ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षण केंन्द्र चालवित आहे. शिवणकाम, विणकाम, लोणची, सॉस - जैम बनवणे, कापड विणने हे शिकवलं जाते. कोवळ्या बांबूचलोण्ण्चं इथे खुप प्रसिध्द आहे. या चार केन्द्रामधुन सुमारे ५०० च्या वर मुलींनी प्रशिक्षण घेतलं आहे.

दिवंगत तालोम रुक्बो

श्री तालोम रुक्बो हे येथील एक महान द्र्ष्टे व्यक्तिमत्व होते. त्याची येथील बदलत्या वातावरणावर बारीक नजर होती व येथील धर्मांतरणाच्या कार्यकलापाला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय करण्यात प्रयत्नशील होते. त्यांनी 'तानी' जनजाती मानत असलेली 'दोनी-पोलो' ही धर्मश्रध्दा लोकप्रिय करण्याचा निश्चय केला.त्यांनी जर्मनी येथे १९८६ मध्ये झालेल्या धर्मसभेत 'दोनी-पोलो" धर्माचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी पासीघाट येथे १९८९ मध्ये 'गांगीन' (प्रार्थना केंन्द्र) स्थापन केले व आपल्या भाषेत प्रार्थना गीताची रचना केली. त्यांनी 'आदि' जनजातीच्या स्थानीक श्रध्दा व संस्कृती जपण्यासाठी 'दोनी-पोलो' येलम केबान्ग' या' संस्थेची स्थापना केली.
अरुणाचलातील चांगलांग व तिरप या जिल्ह्याचे स्थान वैशिष्ट्यपुर्ण आहे. आसाम व नागालैंड या राज्यांमधील हा चिचोळा भूप्रदेश आहे. या दोन्ही जिल्ह्यांवर नागा भुमीगत संघटना दावा सांगत आहेत. तो प्रत्यक्षात यावा म्हणुन बंदूकीच्या जोरावर या जिल्ह्यातील जमातीचे पाश्चात्यीकरण करण्याचा विडाच, या भूमीगत संघटनेने उचलला आहे. या पाश्चात्यीकरणाचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने 'रंगफ्रा' चळवळीद्वारे होतो. या दोन्ही जिल्ह्यात रंगफ्रा' देवतेची ६२ मंदिरे उभारली गेली आहेत. ७० हजार नागरिक या चळवळीत सामील आहेत. रंगफ्रा मंदिरामध्ये दर रविवारी प्रार्थना होते, त्याचप्रमाणे घरोघरी पूज व रंगफ्रा देवतेच्या प्रतिमेपुढे आपल्या प्रथेप्रमाणे दिवाही लावला जातो. २००४ मध्ये एन.एस.सी.ए. च्या बंडखोरांनी २ रंगफ्र मंदिरे उध्वस्त केली. परंतु स्थानिक जनतेने दहशतीचे वातावरण असुनसुध्दा त्या मंदिरांची पुनर्बांधणी केली.
अरुणाचलमध्ये निशी जनजाती ही प्रमुख असुन ख्रिश्चन मिशनृयांची ती प्रथम लक्ष्य बनली . आज या जनजातीचे ५०% लोक हे ख्रिश्चन झालेले आहेत मात्र जनजागृती च्या विविध चळवळीने यांच्या मध्येही अस्तित्व गमावल्याची भावना निर्माण होत आहे. व त्यांचा परतिचा प्रवास सुरु झाल्याच्या बातम्या येत असतात. चर्च चा प्रयत्न अर्थात च याला मोडता घालण्याचा दिसुन येतो. त्या साठी ते कोणताही मार्ग अवलंबण्यास तयार असतात.
पंतप्रधान श्री मनमोहन सिंह यांची भेट या राज्याला झाल्यानंतर बराच विश्वास येथे निर्माण झाला आहे. पण ह्या भेटी वारंवार झाल्यास येथील लोकांच्या मनात भारत आपल्या पाठीशी आहे ही भावना दृढ होइल व येथील स्थानिक चळवळीला बळ मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री श्री दोरजी खन्डु यांनी देखिल पर्यटकाना मोठ्या प्रमाणात या सुंदर राज्याला भेट देण्याचे आव्हान केले आहे. भारतातील पर्यटकांचा ओघ जसजसा वाढेल तसतसा येथे सुरु असलेल्या चोरट्या कारवाया देखील पितळ उघडे पडण्याच्या भितीने कमी होतिल यात शंका नाही.

अरुणाचल प्रदेशाच्या वेस्ट कामेंग जिल्ह्यातील एक टुमदार शहर म्हणुन बोमडीला चे वर्णन करता येईल. समुद्र सपाटीपासुन अंदाजे ९००० फुटावर असलेले हे शहर सर्व बाजुने हिमालयाच्या रांगांनी वेढलेले आहे. बुध्द धर्मीयांचे प्राबल्या असल्याने येथील लोक हे सुशिक्षीत व संस्कृतीक दृष्ट्या खुपच समृध्द आहेत. मात्र येथे जायला केवळ रस्ता हाच एक उपाय आहे. याच्या उत्तरेस असलेल्या तवांग ला गुवाहाटी येथुन हेलीकॉप्टर सेवा आहे. माझ्या दोन दिवसांच्या येथील वास्तव्यात मला स्वर्गात असल्याची अनुभुती आली. भारताच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा अधिक म्हणजे ६९% साक्षरता येथे आहे. लोकसंख्या मात्र १०००० च्या आसपास आहे. येथे अन्य भागातुन येणार्‍या रस्त्यांची देखभाल ही मिलीटरी कडे आहे. येथे कायम पाउस येत असल्याने प्रवासात कायम २-३ फुट माती असते व ती साफ करण्याचे काम मिलीटरी सतत करुन वाहतुक सुरळीत करित असते.
अरुणाचलची राजधानी इटानगर होण्याआधी १० कि.मी. आधी नहरलगुन येथे शासकीय कार्यालये होती. त्यामुळे हे शहर मुख्य आहे. येथे हेलीपैड असुन केन्द्रीय मंत्री किंवा अन्य उच्चाधिकारि प्रथम येथे येतात. येथुन बोमडीला येथे जाण्यासाठी लहान बसेस जातात. संपुर्ण प्रवास हा रात्रीचा असतो. सकाळी ६ वाजता निघणारी बस ही बोमडीला येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता पोचते. अरुणाचल सिमेतुन निघुन ही बस आसाम च्या सखल प्रदेशात प्रवास करुन पुन्हा अरुणाचल सीमेत प्रवेश करते. त्यामुळे रात्री दोनदा चेकींग होते. अरुणाचल सीमेतुन पापेनपारे जिल्ह्यातुन बाहेर निघुन आसाम मधील सखल प्रदेशातील प्रवास केल्यानंतर पुन्हा बस वेस्ट कामेंग जिल्ह्यात प्रवेश करते. बुलढाण्याचे वन अधिकारी श्री बेडेकर यांचे अपहरण याच जिल्ह्यात झाले होते. हा जिल्हा पुर्ण पहाडी आहे. एका बाजुला कडा आणी दुसर्‍या बाजुला नदी यामधील लहानशा रस्त्यातुन बस मार्ग आक्रमण करीत असतांना झोप लागणे शक्य नसते. त्यात रस्त्यावर २-३ फुट चिखलात बस बरेचदा अडकते व चिखल साफ होत पर्यंत थांबुन राहते त्यामुळे संपुर्ण प्रवास हा थरारक असतो.
वाटेत दिसणारी झुम
हिमालयाच्या पर्वत रांगा
बोमडीला च्या ८ हजार फुट उंचीचा चढ चढत असतांना बसचा वेग १० कि.मी इतका असतो

बोमडिला सभोवतालची गावे व तेथे जाणारे वळणदार रस्ते
बोमडिला येथील उंच वसवलेला बुध्दाचा मठावरुन बोमडिला शहराचे विहंगम दृश्य

गावात जाणारे वळणदार रस्ते

विलोभनीय बोमडीला

 
 आमचा बोमडिला ला जाण्याचा प्रवास रात्रीचा असल्यामुळे फोटो काढता आले नाहीत परंतु परतीच्या प्रवासात हा प्रवास किती थरारक होता यासाठी मुद्दाम प्रपंच
एकी कडे खोल नदी व दुसरीकडे पहाड त्यात पाउस आणि वारंवार रस्त्यावर साचणारा चिखल यातुन मार्गक्रमण म्हणजे चालकाची कमाल होती.
बोमडिला हुन १५०० फुटावर बुधदाचा मोठा मठ आहे. या मठाद्वारे येथील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी शाळा चालविली जाते येथे त्यांच्या राहण्याची व जेवण्याची देखील मोफत सोय असते.

मठावरुन दिसणारी मनमोहक दृश्ये

मठधिपती व तेथील भिख्खुंचे निवास स्थान

महाराष्ट्राचे लाडके गायक सुधिर फडके यांचे मानस पुत्र दिपकजी यांची भेट बोमडिला येथे होणे हा एक दुग्ध सर्करा योग. त्यांच्या घरी जेवण व अण्णा(बाबुजी) यांच्या प्रतिभा आणि प्रतीमा मध्ये झालेल्या कार्यक्रमाची १ तासाची बैठक पहावयाला मिळाली ही तर मला मेजवानी च होती. दिपक जी हे शुध्द मराठी बोलतात हे वेगळे सांगणे न लगे. ते बोमडिला येथे राज्याच्या उद्योग विभागात जॉइंट डायरेक्टर आहेत् दोन वर्षानंतर ते त्यांच्या मुळ गावी तवांग येथे राहणार आहेत.

त्यांच्याच घरी पुण्याचा ह्रुषिकेश दिवेकर या तरुणाची भेट झाली. हा तिथे गेल्या ३ वर्‍शांपासुन हिन्दी शिकवतो व ९ आणि १० वि च्या विद्यार्थ्यांचे निषुल्क गणिताचे वर्ग घेतो हृषीकेश दिवेकर हा तेथील शाळेत प्राचार्य पदाचीही जवाबदारी सांभाळतो.

 
अरुणाचल प्रदेशात माझा प्रथम प्रवेश झाला तो २००९ मध्ये. नहरलगुन येथे वर्ध्याचे श्री प्रदिप जोशी यांच्या निमंत्रणानुसार मी गुवाहाटी येथुन रात्री च्या बस ने निघालो व दुसरे दिवशी नहरलगुन येथे पोचलो. मला घ्यावयास ते स्वतः आले होते. अरुणाचल वर श्री शशीधर भावे यांचे पुस्तक मी वाचले होते. त्यात श्री अशोक वर्णेकर यांच्या शाळेच्या प्रकल्पाबद्दल त्रोटक माहिती होती. एक मराठी माणुस इतक्या लांब येउन काही तरी भव्य काम उभारतॉ त्यामुळे त्यांना भेटण्याची व त्यांच्या बद्दल जाणुन घेण्याची मला कमालीची उत्सुकता होती.
शशीधर भावे यांची भेट ही माझी नुकतीच पुण्यात झाली होती व त्यांचेसोबत मुंबई ला मी इशान्य भारतातील विध्यार्थ्यांच्या वस्तिगृहाच्या व्यवस्थापकांच्या बैठकी साठी गेलो होतो व परत बसने येतांना त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. पंचाहत्तरीला पोचलेला हा उत्साही तरुण मला पाहताक्षणीच भावला. अरुणाचलला त्यांचा इतका प्रवास झाला होता की ते म्हणजे अरुणाचलचे चालते बोलते माहितीचे आगार.
नहरलगुन ला पोचल्या नंतर मी प्रदिपजींना वर्णेकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी स्वत; तिकडे आपण जाउ म्हणुन मान्यता दिली. माझे तेथील काम आटोपल्यानंतर मी त्यांना वर्णेकरांना भेटण्याबद्दल मी मोकळा असल्याबद्दल सांगितले. त्यांनी लगेचच तेथील एक कार्यकर्ते, चंद्रपुरचे उत्तम इंगळे यांना मला घेउन येण्यास सांगीतले.व ते स्वतः पुढे गेले.
नहरलगुन येथुन पार्वतीपुर ला जातांना लागणारी ब्रम्हपुत्रेचे उपनदी 'डिक्राम'



नहरलगुन हुन १० कि.मी.वर आसाम सीमेचे ठाणे आहे तेथुन १ कि.मी वर पार्वतीपुर गाव आहे तेथे श्री अशोक वर्णेकर यांची भेट झाली. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपण खुप जुने मित्र असल्याची माझी भावना झाली. आश्चर्य म्हणजे ते मुळचे नागपुरचे व त्यात ही मी जेथे १० वर्षे काढली त्या अभ्यंकर नगर मधील. मग काय बरीच मंडळि हि त्यांची व माझी कॉमन ओळखीची निघाली व गप्पा खुप रंगल्या. त्यात कळलेली माहिति रोचक तर होतीच पण ध्येयाने पछाडलेला माणुस काय करु शकतो ह्याचे मुर्तिमंत उदाहरण माझ्या समोर होते.
सुमारे वीस वर्षापुर्वी वर्णेकर दांपत्य मुंबईला एका॑ चांगल्या पगाराच्या प्राध्यापकाच्या पदावर कार्यरत होते. नुकतेच लग्न झालेले त्यामुळे संसार ही छान चालला होता. पण ध्येय वादी माणुस हा चाकोरीतील नोकरीत कायम अस्वस्थ असतो. तसेच हेही होते. त्यावेळी विवेकानंद केंन्द्राची अरुणाचल मध्ये काम करण्याची इच्छा असलेल्यांना नोकरी साठी अर्ज करण्याबद्दल जाहिरात पेपर मध्ये त्यांनी वाचली आणि दोघांनीही चांगल्या पगाराचि नोकरी सोडुन देण्याची तयारी दाखवित अर्ज केला. त्यांना लगेच नियुक्तीबाबत पत्र आले व दोघेही नहरलगुन ला रुजु झाले. २-३ वर्षातच त्यांना मनासारखे करता येत नसल्याची जाणीव झाली व स्वत; शाळा सुरु करण्याचे त्यांच्या मनाने घेतले. लगेच त्या अनुषंगाने जागेचा शोध सुरु झाला व सुदैवाने त्यांना हवी असलेली जागा त्यांना भाड्याने मिळाली. विवेकानंद केन्द्राची नोकरी सोडुन त्यांनी शाळा सुरु केली. शाळा मनासारखी सुरु झाली होती लोकांचा प्रतिसाद ही उत्तम होता पण २-३ वर्षानी जागा मालकांनी ती जागा चांगली ऑफर आल्याने विकायचा निर्णय घेतला. या दांपत्याने धीर सोडला नाही. त्यावेळी म्हणजे १३-१४ वर्षापुर्वी त्यांनी थोडे बहुत पैसे जमा केले होते. त्यांनी स्वत्;ची जागा घेण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या जागेचा शोध पुनः सुरु झाला. अरुणाचल सीमेपार आसाममध्ये पार्वतीपुर या छोट्या खेड्यात त्यांना मनासारखी १ एकर जागा नजरेत आली ती त्यांनि विकत घेतलि दहा हजार रुपयात. व तेथे राहण्यासाठी व शाळेसाठी अशी एक लांब लचक झोपडी शाकारली. विध्यार्थ्यांचा प्रश्न होता कारण ते एक लहानशे खेडे होते. त्यांच्या शाळेतील आज असलेल्या विध्यार्थ्याबाबत हि एक ईतिहास आहे.
ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांना आसाम मध्ये चहाचे मळे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता लागली. त्यांनी भारताच्या निरनिराळ्या आदिवासि भागातुन मजुर गोळा करुन त्यांना मळ्याच्या कामासाठी लावले. हे मजुर, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार उत्तरप्रदेश आदि राज्यातुन आणले गेले. त्यांना तेथेच वसवले गेले. कालांतराने अनेक वर्षे एकत्र राहिल्याने त्यांचे संक्रमण झाले. या संक्रमणातुन निर्माण झालेली आजची ही जमात 'समदी' म्हणुन ओळखली जाते. आजही हे चहाच्या मळ्यात काम करतात तसेच इतरही तत्सम काम करुन आपली उपजिवीका करतात.
वर्णेकरा दांपत्यानी या मुलांना शिक्षण देण्याचे ठरविले. आज या शाळेत १५०-२०० इतके विद्यार्थि असुन येथील शिक्षक देखील याच शाळेतुन शिकुन शिक्षक झाले आहेत. आज येथे त्यानी मुलासाठी निरनिराळे वर्गासाठी वेगळे कक्ष बांधले आहेत. शिक्षकांसाठी कक्ष, त्यांच्या श्रध्दास्थानाचे मंदीर वगैरे सुविधा केलेल्या आहेत.
त्यांची मुले देखील याच शाळेत शिकली. पुढील शिक्षण देखील इटानगर येथे पण इथुन जाउन येउन पुर्ण केले राहुनच त्यानी घेतले. त्यांची एक मुलगी पायलट असुन मुलगा हा बेंगलोरल इंजिनीअर त्यांची वृध्द आई नागपुर ला असते तीची सेवा व्हावी या उद्देशाने दोघांपैकी एक आलटुन पालटुन नागपुरला तिच्या जवळ राहतात. त्यावेळि शाळेचि व्यवस्था दोघांपैकी एक सांभाळतात. मी गेलो तेंव्हा सौ. वर्णेकर या पाहुण्यांसोबत गुवाहाटी ला गेल्या होत्या त्यामुळे त्यांची भेट होउ शकलि नाही.
श्री अशोक वर्णेकर आपल्या स्वप्नपुर्ती चे स्वरुप पहातांना

अशोक वर्णेकर व मागे त्यांचे कार्यालय व घर

सनदी मुले मधल्या सुट्टीत

शिक्षकांसाठी खोली

येथील लोक शिवाला मानतात त्यामुळे शाळेतील शिवमंदिर. विध्यार्थी या मदिराकडे तोंड करुन प्रार्थना म्हणतात.


या शाळेत शिकुनच तयार झालेला शिक्षक वर्ग.

इशान्य भारतात सेवा भारती पुर्वांचल ही संस्था आरोग्य , शिक्षण व स्वयंरोजगार या संदर्भात कार्य करते. पुण्यात सौ.पुनमताइ मेहता या व्यवसायाने उद्योगपती असलेल्या महिला तेथील भागाच्या प्रभारी म्हणुन काम पहातात. त्यांचा फोन नं ९४२२०८८६८४ आपण केव्हाही त्यांना फोन करुन आपण काय करु शकता याबद्दल चर्चा करु शकता.
 
 
नहरलगुन येथे मुक्कामास असतांना मला एक सुखद धक्का बसला तो श्री अविनाशजी बिनीवाले यांचे भेटीने. अकाउंट्स च्या कामासाठी मला अरुणाचलमधील पासीघाट येथे जाण्याचा योग आला. तेथे सियांग नदिच्या विशाल पात्रावर तेव्हढाच विशाल पुल बांधण्यात आला आहे. पासीघाट हे अरुणाचल मधील सर्वात जुने शहर आहे. नहरलगुन हुन बस ने इथे पोचण्यास सुमारे ५ तास लागतात अर्थात च आसाम मधुन जावे लागते. इशान्य भारतातील कुठल्याही एका राज्यातुन दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी आसाम मधुन जावेच लागते. पासीघाट ला संस्थेच्या गाडीने प्रवास झाला असल्याने अरुणाचलच्या खेड्याना भेटी देता आल्या व तेथील अंतरंगाची ओळख झाली. एक दिवस मुक्काम करुन आम्ही दुसरे दिवशी संध्याकाळी नहर लगुन ला परतलो.
पासीघाट चे फोटो.

सियांग नदिवरील राजीव गांधी पुलावरुन दिसणारे दृश्य




पासीघाट येथील आमचे यजमान एक अरुणाचली कुटुंब

अविनाशजी बिनीवाले नहरलगुन येथे मुलांचे इंग्लीश स्पिकींग चे वर्ग घेत असत. नहरलगुन ला दोन ठीकाणचे १५ दिवसांचे वर्ग आटोपुन ते पासीघाट व झ्रिरो ला जाणार होते. नहरलगुन चे मुक्कामात त्यांच्याशी त्यांच्या अनुभवांच्यास गप्पा ऐकणे हा एक सुखद व माहितीपुर्ण कार्यक्रम असावयाचा. दरम्यान च्या काळात मी ५ दिवसासाठी झिरो येथे विद्याभारतीच्या शाळेच्या कामासाठी जाउन आलो. झिरो म्हणजे सभोवती डोंगरांच्या रांगा व त्यात वसलेले हे शहर भाताच्या पेरण्या नुकत्याच आटोपल्या असल्याने निळ्या डोंगरांच्या प्रुष्टभागावर हे धानाची हिरवी गार शेते म्हणजे डोळ्यांना मेजवानीच होती.
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबानसिरी जिल्ह्यातील अत्यंत सुरेख थंड हवेच्या ठीकाणापैकी एक असलेले शहर म्हणजे "झिरो" समुद्र सपाटी पासुन सुमारे ५७०० फुटावर हे ठीकाण आहे. हे शहर ओल्ड व न्यु झीरो अशा दोन भागात विभागले असुन या दोन ठीकाणामधील अंतर ५ कि.मी इतके आहे.आपातानी जमातीचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जात असलेले हे शहर पाइन व बांबुंच्या जंगलानी वेढलेले असुन धानाच्या शेतांनी सुशोभित केलेले दिसते. कृषि व मासेमारी हे येथील प्रमुख उपजीविकेचे साधन असल्याने धानाची शेते व मासेमारीसाठी ठिकठीकाणी तळे हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपातानी या जनजातीचे वैशिष्ट्य असलेल्या खास डिझाइन असलेल्या शाली तयार करणे हे देखीलयेथील प्रमुख आकर्षण आहे.
झिरो येथील फोटो.


.
झिरो येथील शाळेची इमारत

शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत अस्मादीक.

२००४ मध्ये एका स्थानीक ट्रायबलला एक विशाल झाड तोडत असतांना त्या झाडाच्या पलिकडे एक विशाल शिवलीगाच्या आकाराचा खडक दिसला तेथेच बाजुला गणपतीची आक्रुती असलेला एक लहान खडक आढळला. लगेचे ही बातमी वार्‍यासारखी सर्वदुर पोचली. मला देखील तेथे जाउन फोटो काढण्याची इच्छा होती. मी शाळेच्या मुख्याध्यापकासोबत मोटारसायकल्ने त्या दुर्गम भागाला भेट दिली व तेथील फोटो घेतले. अरुणाचलच्या बहुतेक वरिष्ठ अधिकायांनी येथे भेट दिली असुन येथे नित्य पुजा होत असते. हा भाग विकसीत करुन येथे एक विशाल शिवमंदिर बांधावयाचा मानस असुन त्या संबधात स्थानीक बाहेरच्या धनिकांनी देणग्या देण्यास सुरुवात ही केली आहे. २ वर्षात येथे विशाल मंदिर होईल यात शंका नाही. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सिमेंटच्या पायर्या करुन हा प्रवास सोपा केल्या गेला आहे.
विशाल शिवलींग व परिसर



गणपतीचा आकार असलेला खडक


शिवलींगाकडे जाणारी वाट









ईशान्य भारत : त्रिपुरा

त्रिपुरा! एका फारशा माहित नसलेल्या राज्याची ओळख. खरं तर ईशान्य भारत एकल प्रवासावर विस्तृत वर्णनपर मालिका लिहायचा विचार होता, परंतु तेवढा वेळ मिळेल तेव्हा लिहू असे म्हणता राहूनच जाते, त्यामुळे थोडी पार्श्वभूमी देऊन प्रत्येक राज्याचा वेळ मिळेल त्याप्रमाणे वेगळा लेख करण्याचे ठरविले आहे.
अथांग पसरलेला सांस्कृतिक भारत एका जन्मी अनुभवणे हे शक्यकोटीतील काम नव्हे. परंतु जे जसे जमेल ते अनुभवावे अशा प्रेरणेने या वेळेस सुदूर ईशान्य प्रवास आखण्यास सुरुवात केली. मणिपूर व त्रिपुरा मुख्य आकर्षण व तेथे सर्वाधिक वेळ या खेपेस द्यायचा हे ठरले, परंतु भौगोलिक स्थान व प्रवासाच्या सुविधा हे सर्व लक्षात घेता प्रवास तसा इतर राज्यही समाविष्ट करत ठरल्यापेक्षा अजून थोडा वाढवून योजना पूर्ण झाली. 
रिपुराचा इतिहास मुस्लीम इतिहासकारांनी व ‘राजमाला’ इतिहासकाराने लिहून ठेवलेला आहे. महाभारत व पुराणातही त्रिपुराचे संदर्भ सापडतात. चौदाव्या शतकात बंगालचा राजा त्रिपुरा राज्याच्या मदतीला धावून गेला होता. त्रिपुराला बऱ्याच वेळा मोगल आक्रमणाला तोंड द्यावे लागले. बऱ्याच युद्धात त्यांनी बंगालच्या मुस्लीम सुलतानाला हरविले होत. एकोणिसाव्या शतकात महाराजा बिरचंद्र किशोर मानिक्य बहाद्दूरने ब्रिटीश राजवटीच्याच प्रणालीनुसार आपले राज्यशासन व धोरण आखले. त्यांच्या वारश्यांनी सुद्धा 15 ऑक्टोबर 1949 पर्यंत राज्य केले व शेवटी केंद्र शासनात विलीन केले. त्रिपुरा 1956 मध्ये केंद्र शासित राज्य म्हणून घोषित झाले. 1972 मध्ये त्रिपुराला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. त्रिपुरा म्यानमार व बांगला देश या देशातील नद्यांच्या खोऱ्यात वसलेले आहे. पूर्वोत्तर राज्यात ते आसाम व मिझोरामला जोडलेले आहे.

उदयपूर ही प्राचीन राजधानी, उज्जयंता पॅलेस, जगन्नाथचे देऊळ, लक्ष्मी नारायणाचे उमा माहेश्वरी देऊळ, बेजूबन बिहार, अजब बंगला, रविंद्र कानन (सर्व आगरतळातील) चौदा देवींचे आगरताळामधील देऊळ, ब्रम्हकुंड, कमलासागर, शिपाहीजला अभयारण्य, निरमहाल, मेलाघर मधील तृष्णा अभयारण्य पिलका डेटामूरा, तिर्थमुख, मंदिरघाट, डुंबर तलाव, पिलक येथील प्राचीन बौद्ध अवशेष, राधाकिशोरपूर, नारळाची झाडे, डुंबर तलावाचे डोंगर, जामपुरी टेकड्या, नरसिंगगड, उनाकोटी, जम्पुई हिल, मेलाघर, कैलाशहर, धर्मनगर, कुंजबन, कुमारघाट, सिपाहीजल इत्यादी स्थळे - दृश्य पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव देणारे आहेत. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात देशी व परदेशी पर्यटक त्रिपुरा राज्याला भेटी देत असतात.

त्रिपुराच्या प्रमुख भाषा बंगाली व कोकबराक या असल्यात तरी त्रिपुरात अनेक घटक बोली बोलल्या जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे सांगता येतील :

भाषा व ती कोण बोलतं पुढीलप्रमाणे –

भिल्ली- भिल; गारो – गारो; हलम- हलम-कैपेंग, मोलसोम; खारिया -खारिया; खासी- खासी; लुशाइ - मिझो-लुशाइ; माग/माघ/मोघ - माग/माघ; मुंडा – मुंडा; मिझो - मिझो-राल्ते; संताली – संताल.

या व्यतिरिक्‍त भील, भूतिया, चैमल, चकमा, गारो, हलाम, जामटीया, खासीया, कुकी, हजांगो आदी आदिवासी त्रिपुरात वास्तव्य करतात.

गोरीया नृत्य, हुक कैमानी नृत्य, लेबांग बुमानी नृत्य, होजागिरी नृत्य, बांबू नृत्य आदी लोकनृत्य प्रकार त्रिपुरात पहायला मिळतात. गोरीया नृत्य हे एप्रिलच्या मध्यात होत असून यात देवाची प्रार्थना असते. हे नृत्य सात दिवस सुरू असते. यात नाच आणि गाणे असे दोन्ही प्रकार समाविष्ट असतात. होजागिरी नृत्य हे रीयांग आदिवासी लोकांच्या महिलांचे नृत्य असते. शरीराचा खालचा अर्धा भाग विशिष्ट हालचाल करत संथपणे नाच केला जातो. हे नृत्य करताना डोक्यावर बाटल्या किवा दिवे घेतले जातात. आणि हे दिवे डोक्यावर प्रकाशित असतात. दिव्यांचा डोक्यावर तोल सांभाळत हे नृत्य केले जाते.

त्रिपुराचे लोक आपले लोकवाद्य बांबू, लाकूड आणि प्राण्यांच्या कातड्यापासून बनवतात. लोकवाद्यांवर त्यांचे खूप प्रेम असते. अशी अनेक वाद्य ती स्थानिक सापडणाऱ्या वस्तूंपासून बनवतात. सुमुई हे असेच एक लोकवाद्य आहे. ते बांबूपासून बनवतात आणि त्याला सात छिद्रे पाडतात. आपल्याकडच्या बासरी सारखेच हे वाद्य असते. हे वाद्य तोंडाने वाजवतात. सारींदा, दांगडो, डांगडो, खाम (ढोल), लेबांग- लेबांगटी, उआखरप अशा नावाचे काही लोकवाद्य त्रिपुरात पहायला मिळतात.

तिर्थमुखला आणि उनाकोटी येथील मकर संक्रांत, होली उत्सव, उनाकोटीची अशोक अष्टमी, ब्रम्हपूरचा सण, मोहनपूरचा राश सण, बोटेरस, मंसामंगल सण, केर व खुर्ची सण, सरद सण, जामपूरीतील ख्रिसमस, बुद्धपौर्णिमा सुद्धा साजरी करण्यात येते.

त्रिपुरा हे भारतातले लहान राज्य आहे. यात अनेक हिंदू आदिवासी राहतात. इथले उत्सव पाहण्यासारखे असतात. खारची नावाचा त्रिपुरातला लोकप्रिय उत्सव जवळजवळ संपूर्ण आठवडाभर साजरा केला जातो. या उत्सव पूजेमागे खूप दंतकथा सांगितल्या जातात.

केर उत्सव हा खारची पूजा नंतर पंधरा दिवसांनी पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधव साजरा करतात. केर म्हणजे विशिष्ट परिसराची सीमा. या परिसरातील देवतांची पूजा करण्याची पद्धत म्हणजे हा उत्सव. या पूजेसाठी बांबूच्या कामट्या वापरल्या जातात. गरीया पूजा नावाचा सण एप्रिल महिण्यात साजरा करण्यात येतो. लहान मुले आणि तरूण ढोल बडवत, तोंडाने गाणे गात व नाचत गरीया देवाची प्रार्थना करतात. बांबूंना फुलांनी सजवून ते उभे करून त्याला गरीया देवाची प्रतिमा समजून त्यांची पूजा केली जाते.धालाइ, फेनी, गोमती, खोबाई हाओरा, जुरी, कहोवाइ, लोंगाइ, मनू, मुहुरी, सुमली या नद्या त्रिपुरातून वाहतात तर डोंगराच्या त्रिपुरा रांगांचा पर्वत लक्ष वेधून घेतो.

ईशान्य भारत : उत्तुंग हिमालय रांगा पामीरपासून पूर्वेकडे विस्तारत जात ब्रह्मपुत्राचे वळण घेत दक्षिणेकडे ब्रह्मदेश-आराकान प्रांतात गंगासागरापर्यंत येऊन मिळतात. त्यातील पूर्वेकडच्या पट्ट्यात सिक्कीम-अरुणाचल-भूतान हे पूर्व-पश्चिम हिमालय विस्ताराच्या कुशीतले प्रदेश तर नागालँड-मणिपूर-मिझोराम- दक्षिण आसाम व त्रिपुरा हे उत्तर-दक्षिण पर्वतरांगा असलेले प्रदेश. मेघालय नेमका या दोघांच्या कोनात असल्याने सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश. या पर्वतरांगांच्या पश्चिमेस आसामपासून सुरु होणारे बंगालचे मैदान. गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना यांच्या सुपीक पात्राचा व मुखाचा प्रदेश. 
त्रिपुराचे भौगोलिक क्षेत्रफळ 10,496 चौरस किमी असून राजधानी अगरतळा हे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 3,671,032 इतकी आहे. त्रिपुराच्या प्रमुख भाषा बंगाली व कोकबराक या आहेत. उत्तरपूर्व राज्य म्हणून या राज्याची ओळख आहे. 21 जानेवारी 1972 ला या राज्याची स्थापना झाली. त्रिपुराचा संस्कृत अर्थ तीन शहरे असा होतो. राज्याची साक्षरता 87.75 टक्के इतकी आहे. राज्यात चार जिल्हे समाविष्ट आहेत. 
अशा या ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याविषयी या भागात. सध्याचे त्रिपुरा हे कमी उंचीच्या डोंगररांगात वसलेले असून तीन दिशांना बांगलादेश व पुर्वोत्तरेस आसाम व मिझोराम हि राज्ये आहेत. पूर्वेकडील दुर्गम भागास 'ढलाई' अशी संज्ञा असून तुलनेत कमी विकसित भाग. आगरतला, उदयपूर इत्यादी शहरे व विकसित भाग हा पश्चिमेकडे मैदानी इलाक्यात आहे. हे ईशान्य भारतातील एक प्राचीन राज्य. ब्रिटिश काळातही स्वातंत्र्य टिकवून ठेवलेले पुर्वोत्तरेतील मणिपूर व खासी (आजचे पूर्व मेघालय) हे दोन प्रदेश, व तिसरे म्हणजे त्रिपुरा. महाभारतादि साहित्यात याच नावाने उल्लेखित हा प्रदेश 'किरात राष्ट्र' म्हणवला आहे. पुढे प्राकृत अपभ्रंश त्विप्रा, ब्रिटिश अपभ्रंश तिप्पेरा इत्यादी झाले, परंतु मूळ नाव हजारो वर्षे टिकवून ठेवलेल्या काही मोजक्या प्रदेशांपैकी एक. पुरातन काळापासून स्वतंत्र ओळख जपणाऱ्या या प्रदेशावर बाराव्या शतकापासून "माणिक्य देव वर्मा" (अँग्लो-बांगला : देव बर्मन) घराण्याचे शासन आहे. (सुप्रसिद्ध संगीतकार आर डी व एस डी याच घराण्यातले.) कर्तृत्ववान राजांनी हा प्रदेश मुघल ते बंगालच्या मुसलमान नवाबांपासून मोठ्या पराक्रमाने अनेक शतके राखला. आजही राजघराणे नामधारी प्रमुख असून सध्याचे राजे 'प्रद्योत बिक्रम' उद्योजक व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. आधुनिक स्वातंत्र्योत्तर काळातही दोन वर्षे राज्याने आपले अस्तित्व राखले, परंतु ४९ साली केंद्रशासित 'क-वर्ग' राज्य म्हणून भारतात विलीन झाले. तसे मूळ त्रिपुरी लोक बंगाल्यांपेक्षा बरेच वेगळे, परंतु फाळणी व ७१ चे युद्ध या दोन मोठ्या पर्वांमध्ये हजारो बांगलादेशी हिंदू येथे आश्रयास आले व या प्रदेशाचे रूप बऱ्याच अंशी बंगाली रंगात रंगले. आजही काही प्रमाणात अल्पसंख्य भूमिपुत्र व बहुसंख्य बंगाली यातील तेढ कधीतरी उफाळून येते. डावी बाजू सत्तेत असलेले केरळनंतर दुसरे राज्य, व डाव्या परंपरेप्रमाणे गेली दोन दशके एकहाती सत्ता असलेले 'माणिक सरकार' हे सध्याचे मुख्यमंत्री. हि या प्रदेशाची थोडक्यात ऐतिहासिक, भौगोलिक व राजकीय ओळख.
भटकंती :
पर्यटनाच्या दृष्टीने पश्चिमेकडील भागातच बहुतेक सर्व महत्वाची ठिकाणे एकवटलेली असल्याने प्रवासाचे योजन सोपे पडते. आगरतला हे सर्वात मोठे शहर. विमानाने प्रवास केल्यास गुवाहाटी वा कोलकत्ता मार्गे येथे पोहोचू शकतो. रेल्वेने किंवा महामार्गाने सिल्चरमार्गे असामातून येथे पोहोचू शकतो. विमानसेवा तुलनेत स्वस्त व वेळेच्या दृष्टीने अत्यंत सोयीची आहे. राज्यांतर्गत प्रवास सार्वजनिक वाहतुकीने स्वस्त व सोपा आहे. निवासासाठी महत्वाच्या पर्यटन स्थळी सरकारी व्यवस्था अतिशय उत्तम आहे व तशी फारशी गर्दी नसल्याने काही काळ आधी आरक्षित केल्यास सहज उपलब्ध होते.
माझ्या भटकंतीत, मणिपूरमध्ये योजना गडबडली व प्राप्त परिस्थितीत आसाममार्गे न येता इंफाळहून विमानाने यावे लागले. त्यास कारण 'मणिपूरचे संप' याविषयी मणिपूरच्या भागात अधिक... असो. तर, विमानप्रवास वर उल्लेखिल्याप्रमाणे या भागाची दुर्गमतेमुळे आवश्यकता असल्याने तुलनेत स्वस्त आहे. आगरतला विमानतळ अगदी बांगलादेश सीमेवरच आहे, तेथून शहर साधारण अर्ध्या तासावर आहे. तिथला एक मजेशीर अनुभव, विमानतळावर एक तरुण विद्यार्थी भेटला. इथे हिंदी फारशी समजली व बोलली जात नाही, बंगाली व मोडक्या इंग्रजीत तो मला 'लिफ्ट' देऊ इच्छित होता. ऐकीव माहितीवर आपल्याला ईशान्य भारत अतिशय अस्थिर व असुरक्षित वाटतो, काही अंशी ते खरेही आहे. त्यामुळे थोडे संशययुक्त बरेच विचार त्या क्षणात येऊन गेले. तोपर्यंत बोलत विमानतळाबाहेर पडलेलो होतो, त्याने बाईक तिथेच उभी केली होती. माणसाची परीक्षा करता येणे, स्वतःची धोक्याप्रती संवेदनक्षमता जागृत ठेवणे, व त्याहीपेक्षा महत्वाचे, विश्वास टाकता येणे व जिंकताही येणे हे धडे घेण्यासाठी खरे एकल प्रवासाचे महत्व. मी त्याला चालेल म्हंटले. भाषा-प्रदेश ओळखीचे नाही, आधुनिक फोन असल्याने नकाशात मार्ग दिसत आहे, दिशा योग्य असली तरी मुख्य रस्ता सोडलेला दिसत आहे, ग्रामीण भागातून मातीच्या रस्त्याने चाललेलो आहे... विश्वास टाकला तरी तो आंधळा नसल्याने चौफेर लक्ष होतेच, पण त्याचबरोबर प्रश्नोत्तरे चालू होती, काहीही कुणकुण लागली तर पुढची चाल असाही एक विचार समांतर चालू होता. आता लिहिताना गंमत वाटते पण त्या थ्रिलची अनुभूती काही वेगळीच. स्वतःची नको इतकी माहिती द्यायची नाही पण तरीही संवाद चालू ठेवायचा व समोरच्याची पारख करत पुढची आखणी करत राहायची. एकदा का खात्री पटली कि मग बिनधास्त! थोडे विस्ताराने लिहायचे कारण, इतर कोणी असे प्रवास करत असतील तर त्यांना याची मजा लगेच कळेल. असो, साधारण वीस एक मिनिटांनी परत पक्का रस्ता आला, तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने मित्र झालेलो होतो. प्रदेशाचा तसा अभ्यास असल्याने बोलायला बरेच विषय होते, त्याच्याकडून नवी माहितीही मिळत होती. अर्ध्या तासात शहरात पोहोचलो. आधी काही बोलला नसला तरी पैशाची अपेक्षा होती याचा अंदाज आलेला होता. वाचलेली गरिबी आजूबाजूला पाहत होतो. परंतु शेवटपर्यंत त्याने स्वतःहून सांगितले नाही. त्याचे देणे त्याला दिले आणि मी पुढे मार्गस्थ झालो. साधारण माझ्या अनुभवात नवीन ठिकाणी पहिला प्रहर चांगल्या लोकांबरोबर गेला कि पुढे ती जागा नवी राहत नाही... त्या जागेची लय, स्पंदन आत्मसात व्हायला हे सुरुवातीला भेटलेले लोक खूप महत्वाचे.
आगरतला शहर :
ईशान्य भारतातील दुसरे सर्वात मोठे शहर. अजूनही पर्यटनाच्या दृष्टीने फारसे विकसित नाही. मध्यवर्ती भागात त्रिपुरा राजघराण्याचा राजवाडा दिमाखात उभा आहे. शहर अगदी बांगलादेश सीमेला लागूनच आहे. काही महत्वाची ठिकाणे:
"उज्जयंत प्रासाद"
माणिक्य घराण्याचा एक राजवाडा. अलीकडेच, स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली अत्यंत सुंदर शुभ्र वास्तू. अनेक शैलींचा मिलाफ यात पाहावयास मिळतो. काही काळ हे त्रिपुराचे विधानभवन होते. सध्या संग्रहालय आहे. समोरच मोठा तलाव व सभोवती उद्यान असल्याने दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी अतिशय सुंदर दृश्य दिसते.






जगन्नाथ मंदिर
राजप्रासादापासून जवळच जगन्नाथाचे मोठे मंदिर आहे. सुशोभित प्रवेशद्वार व भरपूर गर्दी असणारे देवस्थान.
The Jagannath temple, Agartala, Tripura - YouTube

आखोरा गेट (बांगलादेश सीमा)
बांगलादेश सीमेवरील चेकपोस्ट. काही वर्षांपासून वाघा-अटारी सीमेप्रमाणे येथेही ध्वजावतरण सोहळा होतो. पर्यटनाच्या दृष्टीने चांगला प्रयत्न आहे, परंतु तुलनेत अगदीच प्राथमिक अवस्थेत. रोज संध्याकाळी ६ वाजता दोन्ही बाजूंचे जवान घोषवाद्यांसहित ध्वज उतरवून एकमेकांना अभिवादन करतात. दोन्ही बाजूंना बऱ्यापैकी गर्दी जमते. थोड्या प्रमाणात खुर्च्या वगैरे यांची सोय केली जाते. दोन्ही बाजू बंगाली असल्याने काही गोष्टी भाषा कळत नसेल तर समजत नाहीत. शेवटी दोन्हीकडचे नागरिक अंतरावरून संवादही साधू शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे वस्तूंची देवाणघेवाण होणार नाही याची सक्त ताकीद दिली जाते. एकंदर फारच सौहार्दपूर्ण सोहळा.






उदयपूर:
साधारण बस ने आगरतल्याहून दोन तासांवर गोमती नदीच्या काठी हे छोटेसे गाव, त्रिपुरसुंदरी देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. याबरोबरच आणखी काही मंदिरेही या परिसरात आहेत. त्रिपुराच्या राजांनी येथे बरेच तलाव बांधले. नवीन प्रस्तावित रेल्वे चे बांधकाम बऱ्यापैकी पूर्णत्वास आले आहे.
त्रिपुरसुंदरी मंदिर:
तीर्थस्थानांच्या संकल्पनेतून भारतभूमीचे कल्पनाचित्र आपल्या प्राचीन वाङ्मयातून सहज दिसते. जरी लहान लहान राज्ये या भूमीत अस्तित्वात असली तरी धार्मिक श्रद्धेच्या द्वारे हि सर्व एकमेकांशी नेहमीच जोडलेली आहेत. परिव्राजकास या भूमीचे दर्शन घडविण्यास हि स्थाने कारणमुख्य तसेच दिशा दर्शक आहेत. १२ ज्योतिर्लिंगे म्हणा किंवा १०८ वैष्णव दिव्यदेश म्हणा, त्यांची स्थाने पाहता, सर्व भारतवर्षाच्या यात्रेची ती व्यवस्था वाटते. पण यापेक्षा ५१ शक्तिपीठांची संकल्पना त्यांच्या भौगोलिक स्थानांमुळे अधिक व्यापक व खऱ्या अर्थाने भारत'मातेचे' दर्शन घडविणारी वाटते. सर्वात उत्तरेकडील काश्मीर मधील 'शारदा पीठ' (गुगल नकाशावर पहा "34.79 74.19") सर्वात पश्चिमेकडे बलोचिस्तानात 'हिंगुला पीठ' (गुगल 25.513 65.513) दक्षिणेस श्रीलंकेत 'शृंखला पीठ' (8.575 81.234) व पूर्वेस त्रिपुरसुंदरी (23.508 91.50). त्यातील पूर्वेकडचे हे शक्तीस्थान. अक्षांश पाहून लक्षात आलेच असेल, स्थान कर्कवृत्तावर आहे.
महाराजा धन्य माणिक्य यांनी १६व्या शतकात सध्याचे मंदिर बांधून चतुर्भुजा मूर्तीची स्थापना केली. देवी ज्येष्ठा-कनिष्ठा अशा मूर्तीद्वय स्वरूपात आहे. मुख्य मूर्ती हि कसाच्या दगडाची आहे. मंदिर तसे लहान असून भोवती नव्याने बांधून काढलेला सभामंडप व बलीमंडप आहे. मंदिर हे लहानशा उंचवट्यावर असून त्याला 'कूर्मपीठ' अशी संज्ञा आहे. पाठीमागेच 'कल्याण सागर' बांधीव तलाव आहे.
देवी त्रिपुरसुंदरी
गुणवती मंदिरसमूह :
राणी गुणवतीने बांधलेली हि जुनी मंदिरे त्यांच्या वास्तुकलाविशेषसाठी महत्वाची आहेत व संरक्षित आहेत. खास बंगाली पद्धतीची विटांच्या बांधकामाची हि मंदिरे पाहण्यासारखी आहेत. जवळच भुवनेश्वरी देवीचे प्राचीन व दुर्मिळ स्थान आहे.




मेलाघर :
हे छोटेखानी गाव कधी काळी येथील राजघराण्याचे ग्रीष्मकालीन निवासस्थान असे. त्यासाठी येथे एक भव्य तलाव निर्माण करून त्यात सुंदरसा महाल बांधून काढण्यात आला. 'नीरमहल' नावाने प्रसिद्ध असलेला हा महाल निश्चितपणे भारतातील सर्वात सुंदर जलमहालांपैकी एक आहे. परंतु डागडुजीचे काम चालू असल्याने केवळ दुरूनच पाहता आला. पलीकडच्या तीरावर सरकारी विश्रामगृह आहे. जवळच्या मनोऱ्यातून महाल व तलावाचे दृश्य फार सुंदर दिसते.


राजवाड्याचे दिवसा व रात्रीचे मनोहर दृश्य

तळ्यावरची काही ओळखीची मंडळी








कसबा
कमला सागर : हे कालीमातेचे मंदिर अगदी सीमेवर आहे. मंदिराच्या समोरील तलावाच्या तीनही बाजूंनी आंतरराष्ट्रीय सीमेचे उंच कुंपण आहे. मंदिर आधुनिक काळात जीर्णोद्धार केलेले असले तरी पौर्वात्य बंगाली पद्धतीचा मूळ साचा जपला आहे. मंदिराच्या सभोवती जुने विशाल वृक्ष आहेत. जवळच दोन्ही देशांच्या सीमेवर तस्करी रोखण्यासाठी तसेच सीमावर्ती भागात रोजगार व आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी 'बॉर्डर हाट' हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. बांगलादेश सीमेवर एकूण १०-१२ ठिकाणी अशा प्रकारचा 'ट्रेड झोन' तयार करण्यात आला आहे. इथे दोन्ही बाजूंचे स्थानिक आपापला माल विकू शकतात. व आपल्यासारखे ग्राहक, व्हिसा शिवाय पलीकडल्या देशातील वस्तू विकत घेऊ शकतात. जामदानी कलाकुसर असलेली वस्त्रे बांगलादेशातील विशेष.

पांढऱ्या रेषेच्या डावीकडे बांगलादेश, उजवीकडे भारत.

कमलासागर काली मंदिर
सिपाहीजला अभयारण्य :
कधीही न ऐकलेले परंतु नितांत सुंदर असे हे ठिकाण. पाणथळ जागी पूर्वीच्या काळी असलेल्या सैनिकी छावण्यांवरून जागेला हे नाव पडले. वनविभागाची राहण्याची व्यवस्था आत जंगलात आहे हे तिथे गेल्यावर समजले व नंतर तिथेच मुक्काम ठोकला. बसने आगरतल्याहून तासाभरात इथे पोहोचता येते. मूळ जंगल अतिशय घनदाट आहे, त्याभोवती रबराची लागवड व त्याबाहे चहाच्या बागा त्यामुळे आगरतला सोडले कि दूरवर हिरवाईच दिसते. मुख्य रस्त्यापासून बरीच रपेट करत आतपर्यंत जावे लागते. सध्या प्राणिसंग्रहालय व प्राण्यांचे अनाथालय येथे चालवले जाते. प्रामुख्याने पर्यटक तेच पाहायला येतात, कारण तेथे प्राणी खात्रीने आणि आरामात पाहता येतात. आजतागायत भारतात पाहिलेल्या प्राणिसंग्रहालयातील सर्वोत्तम असे नक्कीच म्हणेन. परंतु मुख्य समृद्ध वनराई त्यापलीकडे बरीच पसरलेली आहे. येथील अधिकारी/अभ्यासकांबरोबर परवानगीने त्या भागास भेट देता येते.
अतिशय दुर्मिळ अशा अनेक प्रजातींचे प्रदेशात आश्रय स्थान आहे. त्रिपुरा राज्यात भारतातील मर्कट कुळातील सर्वाधिक प्रजाती आढळून येतात. काही मोजके शिल्लक सुवर्णवानर, चष्मेबंदर, व भारतातील एकमेव कपि (एप) हुलॉक गिबन हे सर्व या भागात नांदतात. हुलॉक दिसले नाहीत तरी त्यांचे जंगलातील अस्तित्व अगदी मैलोन्मैल जाणवते.
सकाळचे 'मंकी बिझनेस'

सकाळचे 'मंकी बिझनेस'

सकाळचे 'मंकी बिझनेस'

दुर्मिळ चष्मेबन्दर Spectacled Monkey

दुर्मिळ चष्मेबन्दर Spectacled Monkey

सुवर्णवानर Golden Languor

हुलॉक कपिसंगीत:



इथले सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्रांकित बिबळ्या. बिडाल वर्गातील हे जनावर भारतात फक्त दुर्गम ईशान्य राज्यातच आढळून येते आणि वन्य परिसरात केवळ २ आकडी संख्या आता शिल्लक आहे.

जंगलात हे जनावर पाहायचे म्हणजे सरावलेले लोकच बरोबर हवेत. वाघरांमध्ये हि जात झाडावर चढण्यात सर्वात तरबेज. आणि निशाचर असल्याने दिवसा कुठेतरी उंच झाडात स्वारी ढाराढूर असते. जेव्हा पहिल्यांदा बिबळ्या दिसला तेव्हा तर गाईड चक्क फेकतोय असेच वाटत होते, तो झाडाकडे दाखवतोय आणि मला काही ढिम्म दिसत नव्हते.

दूर झाडावर झोपलेला बिबळ्या. झाड-पाल्यात अगदी बेमालूम मिसळून जाणारे पट्टे.

दुसऱ्या वेळी मात्र एक व्यवस्थित झोपलेला बिबळ्या पाहायला मिळाला.

चाहूल लागल्यावर आमच्या दिशेने टाकलेला एक कटाक्ष, क्षणभरातच पुन्हा निद्राधीन झाला

अभयारण्यात पक्षी असंख्य आहेत. संपूर्ण दिवस वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती अक्खा प्रदेश चिवचिवाटाने जिवंत ठेवतात. पहिल्या दिवशी तर झोप येईना इतके चित्र विचित्र आवाज सतत येत होते. खोकल्यासारखा आवाज करणारे भुंकणारे हरीण, डुकरे, घुबडे, रातकिडे व एक दोन पक्षी हे रात्रीचे संगीतवादक तर पहाटे जंगली कोंबडे, माकडे, कावळे हे पथक व टिटव्या, खंड्या हे दिवसभर कामावर. काही चित्रे व वेगवेगळ्या वेळी रेकॉर्ड केलेले आवाज इथे देत आहे.
जंगली कोंबड्या Red junglefowl



Indian Eagle Owl

Bronzed Drongo

Blue-bearded bee-eater
Blue-bearded bee-eater

Greater racket-tailed drongo

Asian barred owlet

black hooded oriole

Spotted woodpecker



साळींदराचा काटा

अन्य माहिती:
अन्न : साधारण बंगाली पद्धतीचे जेवण. भाताचे महत्व. प्रामुख्याने मांसाहार. "आवान बांगवी" नावाचा तिखट किंवा गोड पदार्थ, तांदळाचे पीठ वापरून केळीच्या पानात मेंदीच्या कोनासारखे साचे बांधून उकडून बनवला जातो. रसगुल्ल्याप्रमाणे "खीर तोवा" दुधापासून बनविले जाते.
Sweets | SEMRNE
खीर तोवा

राहणीमान : त्रिपुरा अतिशय गरीब राज्य आहे याची जाणीव सर्वत्र होत राहते. ग्रामीण भागात आधुनिक गरजांचा स्पर्शच नसल्याने लोक समृद्ध नसले तरी समाधानी आहेत. मैदानी भागात मुख्यत्वे भाताची शेती चालते. डोंगराळ भागात रबर व चहाची लागवड सध्या वाढत आहे. बंगाली व स्थानिक कोकबोरोक भाषा येथे प्रामुख्याने बोलल्या जातात. हिंदी नगण्य, असामी थोडी समजली जाते. एक खेदयुक्त उल्लेखनीय बाब म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या पिढीतला अशिक्षित तरुण बघितला. अभयारण्यात रक्षक म्हणून कामाला असलेला हा तरुण एवढी वर्षे व्यवस्थेला दुर्लक्षित करत राहिला व व्यवस्थेकडूनही दुर्लक्षित कसा राहिला याचे फार आश्चर्य व दुःख वाटले.

आधुनिक घर
चहाचा मळा

भात शेती
कला :
वस्त्र : ईशान्य भारतात वस्त्रकला फार समृद्ध आहेत. कापूस, सावर इत्यादी सुती व मुगा, टसर आणि इरी या रेशमी धाग्यांपासून विणलेली वस्त्रे व त्यावरील कलाकुसर अत्यंत सुंदर. त्रिपुरा मध्ये प्रामुख्याने सुती हातमाग व त्यावरील साधी व जामदानी पद्धतीची कलाकुसर केली जाते. कलकत्ता कॉटन व ढाका जामदानी नावाने या प्रकारातील साड्या अन्यत्र अधिक परिचित आहेत. साधारण सर्वच भागात साडीची पद्धत केवळ बंगाली लोकात आहे. बाकी सर्व समाजात स्त्रिया मेखला-चादोर सारखे पांघरायचा पदर वेगळा असणारे वस्त्र वापरतात.
त्रिपुरी सुती साडी

नवविवाहित बंगाली जोडपे, रेशमी कुडता व सुती साडी
अलंकार : त्रिपुरी लोकांना चांदीचे फार आकर्षण व महत्व आहे. अनेक जमातीच्या स्त्रिया, प्रामुख्याने रियांग जमातीचे लोक (नृत्य विषयात चित्रातील लोक) चांदीचे दागिने भरभरून वापरतात. बांबूचे बनविलेले अलंकारही येथील खासियत आहे. अतिशय नाजूक काम असलेले, कोणत्याही धातूचा वापर नसलेले सुबक दागिने बांबू पासून बनवतात.
हस्तकला : बांबू व भाजक्या मातीची कलाकुसर सर्वत्र पाहावयास मिळते.
नृत्य : वनवासी लोकांची लोककलेची परंपरा प्रत्येक जमातीत वेगळी आहे. रियांग या प्रमुख जमातीचे होजगिरी नृत्य विशेष उल्लेखनीय. घरातील ताट, कळशी इत्यादींचा कलात्मक वापर असलेले हे नृत्य साधे दिसले तरी बरेच अवघड आहे हे या आंतरजालावरील व्हिडीओ मध्ये जरूर पहा.

संकीर्ण:
माझ्या एकल प्रवासादरम्यान माझ्या अनुभवाचा व अभ्यासाचा काही भाग थोडा अधिक आकर्षक बनवून फेसबुक वर पोस्ट करण्याची मला एक सवय आहे. त्यामुळे एक औत्सुक्य निर्माण होतेच, तसेच त्यानिमित्ताने त्या प्रदेशाविषयी इतरांनाही माहिती होते. त्रिपुराविषयक हे पोस्ट इथेही समाविष्ट करून या लेखाची सांगता...




: समाप्त :

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...